Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिटीबसच्या १२६३ फेऱ्या रद्द

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिवृष्टीमुळे मंगळवारी शहरातील सिटी बससेवा कोलमडल्यामुळे एसटी महामंडळाला १२६३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीचे ५ लाख ३७ हजार रुपयाचे उत्पन्न बुडाले. बुधवारी शहरातील सिटीबसची वहातूक सुरळीत झाली असली तरी शाळांना सुट्या असल्यामुळे अनेक बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्यामुळे एसटीला पावसाचा दुहेरी फटका बसला.

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसानंतर मंगळवारी पावसाने जोर पकडल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत सर्व पुलावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे अनेक बस अर्ध्यावर खोळंबल्या. मंगळवारी मुसळधार पावसामुळे कामानिमित्त जाणाऱ्यांची गर्दी कमी असतांनाही बसची संख्या कमी झाल्यामुळे या बस फुल्ल होत्या. तर बुधवारी बसेसची संख्या जास्त असूनही शाळांना सुट्टी असल्यामुळे प्रवाशी कमी होते. त्यामुळे सिटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या त्यात एसटी किती उत्पन्न बुडाले याचा आकडा अद्याप आला नाही. सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणाहून याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते.

अतिवृष्टीमुळे शहरातील गोदाकाठबरोबरच इतर पुलांवरून वाहन पोलिस प्रशासनाने बंद केली. त्यानंतर एसटीची संपूर्ण वाहतूकच कोलमडली. ज्या बस रस्त्यावर धावत होत्या त्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागल्यामुळे एसटीचा प्रवास शहरातून तिप्पट वेळेचा झाला. पूर्व भागाकडून पश्चिम भागाकडे एसटी धावू शकल्या नाहीत. त्यामुळे जवळच्या डेपोतच त्या पार्क करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांची झाली दैना

$
0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची दैना उडवली आहे. रस्त्यांच्या दैनावस्थेचे चित्र पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी व वाहून आलेला गाळ यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली असून महापालिकेने खड्डे बुजण्यासह रस्ते मोकळे करण्यासाठी बुधवारी युद्धापातळीवर यंत्रणाला कामाला लावली. पुरामुळे रस्तेच नव्हे तर सोसायट्याही जलमय झाल्याने स्थिती पूर्ववत होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

मंगळवारच्या पावसाने शहरातील रस्तेच नाल्यामंध्ये रुपांतरीत झाले. शहरातील संपूर्ण प्रमुख रस्ते व कॉलनी रस्त्यांवर दिवसभर पाणी साचल्याने सुमारे ५० टक्के रस्ते खराब झाले. विशेष म्हणजे यातून सिंहस्थात तयार केलेले नवे रस्तेही सुटू शकले नाहीत. अतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली. जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांवर रस्ता शोधण्याची वेळ आली. कृषीनगर, महात्मानगर, कॉलेजरोड, सीबीएस, गंगापूररोड, द्वारका, नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या भागातील रस्ते पाण्यात गेल्याने त्यांची पूर्ण चाळण झाली. पूर ओसरल्यानंतर अनेक रस्त्यांवर पाण्यासोबत गाळ साचला. शहरातील प्रमुख रस्ते शेजारील सोसायट्यामंध्ये पाणी साचले. हेच पाणी नागरिकांनी रस्त्यावर टाकले.

बांधकाम विभागाचे शहरातील १६०१ किलोमीटरपैकी २५० किलोमीटरचे डांबरीकरण रस्ते लायबलिटीमध्ये आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची आहे. तर सिंहस्थामध्ये शहरात १०७ किलोमीटरचे रस्ते झाले असून त्यांची लायबलिटीही ठेकेदारांची आहे. या रस्त्यांचे काम ठेकेदार करणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका

$
0
0

महापुराच्या थैमानानंतर प्रशासनापुढे चिखल, गाळ व कचरा निर्मूलनाबरोबरच रोगराई नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. अद्यापही अनेक इमारतींची तळघरं, सखल भाग येथे पाणी तुंबलेले आहे. पाणी ओसरलेल्या भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे रहिवासी भयभीत आहेत. डास, चिलटे यांचा उच्छाद सुरू झाला आहे. पुरात वाहून आलेला चिखल, पालापाचोळा, मृत प्राणी-पक्षी याची तातडीने विल्हेवाट लावली नाही तर ताप, डायरिया, मलेरिया, लेप्टोसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन त्यांच्यापरीने कामाला लागले आहेच, पण आभाळातून पडणारा वरुणराजा अद्याप उसंत घेत नसल्याने नागरिकांनाही विनाविलंब या कामाला स्वतःहून जुंपून घ्यावे लागणार आहे. सोबतच विविध सामाजिक मंडळे, गणेश मंडळे यांनीही याकामी हातभार लावला तरच हा स्वच्छतेचा जगन्नाथाचा रथ ओढता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजिस्ट्रेशन केलंत का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण महिना सुरू झाला, की तरुणींमध्ये एक नवा विषय चर्चेला येतो तो म्हणजे 'मटा श्रावणक्वीन'. याची चाहूल लागताच श्रावणक्वीनच्या वेबसाइटवर मोठ्या संख्येने तरुणींनी आपले फोटो अपलोड करून रजिस्ट्रेशन केले आहे. मॉडेलिंग असो वा अभिनय या क्षेत्रांत नाशिकच्या तरुणींना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन'चा यंदाचा सिझन सुरू झाला असून, येत्या ११ ऑगस्ट रोजी एलिमिनेशन राऊंड होणार असून, सोमवारी (८ ऑगस्ट) नावनोंदणीची शेवटची तारीख आहे. त्यानंतर नाव नोंदवता येणार नाही. 'िऱ्हदम म्युझिक' या कार्यक्रमाचे म्युझिक पार्टनर आहेत.

माहितीसाठी येथे साधा संपर्क

फोन ः ०२५३-६६३७९८७
वेळ ः सकाळी ११ ते सायं. ५.

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर 'Participate now' या पर्यायावर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येणार आहे. या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नं., इ-मेल अॅड्रेस, तुमचे पॅशन काय?, उंची, वजन, हेअर कलर, आय कलर आदी तुमच्याविषयी माहिती नमूद करायची आहे. यामध्ये तुमचे पाच फोटोदेखील अपलोड करायचे आहेत.

व्होट फॉर हर

श्रावणक्वीनमध्ये यंदा वाचकांनाही सहभागी करून घेत येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या तरुणींना वाचक व्होट करू शकता. यामध्ये ज्या तरुणींना सर्वाधिक व्होट मिळतील, त्यांची निवड एलिमिनेशन राऊंडसाठी होणार आहे.

नियम :

- रॅम्प वॉक केल्यानंतर स्पर्धकाला एका मिनिटात स्वतःची ओळख करून द्यावी लागेल.

- स्पर्धकाने स्वतःला येणाऱ्या कोणत्याही कलाकौशल्याचे सादरीकरण दोन मिनिटांत करावयाचे आहे. त्यानंतर परीक्षक स्पर्धकाला सामान्यज्ञानाशी संबंधित एखादा प्रश्न विचारतील.

- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरहून तिसऱ्यांदा शेळ्यांची निर्यात

$
0
0

खराब हवामानाचा बसला फटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा धुमाकूळ आणि ढगाळ हवामानाचा कार्गो विमानसेवेलाही फटका बसला. त्यामुळेच मंगळवारी (२ ऑगस्ट) शेळ्यांची निर्यात होऊ शकली नाही. अखेर बुधवारी दुपारी २ वाजता १४०९ शेळ्या-मेंढ्यांना घेऊन युक्रेनचे कार्गो विमान शारजाला रवाना झाले. आतापर्यंत जवळपास पाच हजार शेळ्या-मेंढ्यांची शारजाला रवानगी झाली आहे. येत्या सोमवारी (८ ऑगस्ट) पुन्हा निर्यात केली जाणार आहे.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) मालकीचे असलेल्या विमानतळावरून १५ जुलै रोजी कार्गो विमानाद्वारे प्रथमच शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्यात आली. सुमारे १६४८ शेळ्या-मेंढ्या अवघ्या तीन तासात शारजा येथे पोहचविण्यात आल्या. त्यानंतर २६ जुलै रोजी १६७८ शेळ्यांची निर्यात करण्यात आली. तिसरी निर्यातही २९ जुलै रोजी करण्याचे निश्चित होते. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने ही निर्यात होऊ शकली नाही. हॅलकॉन या कार्गो सेवा कंपनीद्वारे आणि कार्गो सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड व अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रयत्नातून ही निर्यात केली जात आहे. अखेर मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारी ही निर्यात करण्याचे नियोजन करण्यात आले. पण, शहर परिसरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ओझर एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमने (एटीसी) कार्गो विमान उतरविण्यास परवानगी देण्यास नकार दिला. मात्र, युक्रेनचे कार्गो विमान शारजाहहून निघाले होते आणि ते कराचीपर्यंतही आले होते. त्यानंतर हे विमान तेथूनच पुन्हा शारजाला रवाना झाले. मात्र, ओझर कार्गो कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी जवळपास दोन हजार शेळ्या गेल्या काही दिवसांपासून आणण्यात आल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने या शेळ्यांना मोठा फटका बसला. काही शेळ्या दगावल्या तर काहींना तातडीने मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात आले.

हवामान विभागाने ४८ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने कार्गो सेवेबाबत अनिश्चिता होती. अखेर बुधवारी सकाळी एटीसीने परवानगी दिल्याने सकाळी आठच्या सुमारास कार्गो विमान ओझर विमानतळावर आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास विमानाने शारजाकडे उड्डाण केले. यावेळी १२४ मेंढ्या आणि १२८५ शेळ्या अशा एकूण १४०९ शेळ्या-मेंढ्यांचीच निर्यात होऊ शकली. दरम्यान, शारजा येथील कडक नियम आणि विशिष्ट पद्धतीच्या शेळ्यांचीच मागणी असल्याने गेल्या दोन वेळच्या निर्यातीच्या तुलनेत यंदा २०० शेळ्या कमी जाऊ शकल्या आहेत. बुधवारच्या या निर्यातीवेळी हॅलकॉनचे सीईओ सुधाकर सेन, सानप प्रा. लि.चे संचालक जयंत सानप, शिवाजी सानप, अमिगो लॉजिस्टिकचे एमडी साजिद खान, सोव्हिका लॉजिस्टिकचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट एन एस हंस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या सिव्हिलमध्ये गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) दाखल करण्यात आलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. एकाने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचेच्या दरवाजा फोडला. यामुळे गोंधळात आणखी भर पडली.

जुन्या नाशिकच्या हेलबाऊडी मशिदीच्या मागील बाजूस राहणारी नगमा कादीर खान (वय २२) हिला प्रसूतीकळा येत असल्याने बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिवसभर कोणीही लक्ष दिले नाही. रात्री आठच्या सुमारास तिचा रक्तदाब वाढल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. यावरून नगमाच्या नातेवाइकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गोंधळ घातला. पायी रुग्णालयात आलेली नगमाचा अवघ्या काही तासांतच मृत्यू कसा होतो, असा प्रश्न उपस्थित करीत नातेवाइकांनी डॉक्टरविरुद्ध सरकारवाडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

रुग्णालयाच्या परिसरातील गोंधळ प्रकरणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसीपी, डीसीपीसह पीआय यांनी नातेवाइकांची समजूत काढत वातावरण शांत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंच्या नवनिर्माणावर फेरले पाणी

$
0
0

ठाकरेंकडून गोदावरी पुराची पाहणी; गोदापार्क पाहून उद्विग्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारच्या महापुराने उद्‍ध्वस्त झालेल्या गोदाकाठ परिसराची मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पाहणी केली. तसेच स्थलातंर केलेल्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. गोदाकाठसह मुंबई नाका परिसरात जाऊन पाणी साचलेल्या भागाचीही त्यांनी पाहणी केली. महापुरामुळे उद्‍ध्वस्त झालेल्या गोदापार्कला भेट देत आपल्या स्वप्नांचा झालेला चक्काचूर पाहून ठाकरे निराश झाले. नवनिर्माणची ही अवस्था बघून ते चांगलेच व्यथित झाले.

महापुरानंतर मंगळवारी राज ठाकरे यांनी दुपारी नाशिकला भेट दिली. विश्रामगृहावर आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलिम शेख यांच्याकडून त्यांनी शहराच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अंभ्यकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी व्हिक्टोरीया ब्रीज गाठला. या पुलावरून त्यांनी गोदेच्या पुराची पाहणी केली. त्यानंतर ठाकरेंनी रामकुंडावर जाऊन परिस्थिती पाहिली. त्यानंतर गाडगे महाराज पुलावर जाऊन तेथे पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबीयांची ठाकरेंनी भेट घेतली. स्थलातंरीतांशी चर्चा करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर ठाकरेंनी पंचवटीतल्या अमरधाम येथील पुलावर जाऊन परिस्थिती पाहिली. काझी गढीच्या कोसळलेल्या भागाची ठाकरेंनी दुरूनच पाहणी केली. त्यानंतर ठाकरेंनी मुंबई नाका परिसराची पाहणी केली. या भागात सोसायट्यामंध्ये घरांचे पाणी घुसले. काही बंगल्यामध्येच पाणी शिरले होते. त्यामुळे सकाळपासूनच या नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. या ठिकाणी जाऊन ठाकरेंनी नागरिकांची भेट घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

नाशिकच्या नवनिर्माणची खून असलेल्या गोदापार्कची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे ठाकरेंनी दौऱ्यात शेवटी गोदापार्ककडे धाव घेत पाहणी केली. पुरामुळे गोदापार्क पूर्ण उद्‍ध्वस्त झाला आहे. गोदापार्कची अवस्था बघून ठाकरेही अस्वस्थ झाले. त्यामुळे ठाकरे यांनी या ठिकाणी महापौर व आयुक्तांसोबत एकातांत चर्चा केली. पुरामुळे स्थलातंरीत झालेल्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यासह शहरातील सर्व रस्ते मोकळे करण्याचे आदेश ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले.

अन् ठाकरे झाले निराश

गोदापार्क हे राज ठाकरेंचे स्वप्न होते. रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने साडेतीन किलोमीटरचा गोदापार्क तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अर्धा किलोमीटर काम पूर्णत्वास आले असतानाच महापुराने संपूर्ण गोदापार्कचीच वाट लावली. पुरात लॉन्स, लाईट, स्टाईल्स सर्वच वाहून गेले. पावसाळ्यापूर्वी गोदावरीच्या सौंदर्यसृष्टीत भर घालणारे गोदापार्क मंगळवारच्या पुराने सौंदर्यहीन झाले होते. त्यामुळे ठाकरे गोदापार्कच्या झालेल्या हानीने चांगलेच उद्विग्न झाले. नाशिककरांना दाखवलेल्या स्वप्नावरच पाणी फिरल्याने ठाकरेंनी अपसेट होऊन विश्रामगृह गाठले. त्यानंतर पत्रकारांशीही संवाद टाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल प्रकरण: वेळ वाया गेल्याने भरपाईचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल प्रकरणाचे काम धुळे येथील विशेष न्यायालयात चालू असून, गुरुवारी २५ संशयित आरोपींचे वकील कामकाजप्रसंगी हजर राहू न शकल्याने न्यायालयाचा वेळ वाया गेला म्हणून न्या. आर. आर. कदम यांनी आरोपींच्या वकिलांनी पाच हजार रुपये भरपाई न्यायालयाला द्यावी, असे आदेश दिले.

घरकुलच्या खटल्यातील ५३ आरोपींपैकी २५ आरोपींच्या वकिलांचे गुरुवारी, दुसऱ्या न्यायालयात कामकाज असल्याने ते उलटतपासणीसाठी धुळ्यातील विशेष न्यायालयात येऊ शकले नाहीत. त्यांनी तसा अर्ज न्यायालयास सादर केला होता, मात्र न्यायालयाचा वेळ वाया गेला म्हणून आरोपींच्या वकिलांनी एकत्रितपणे पाच हजार रुपये भरपाई न्यायालयाला द्यावी, असे आदेश खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी दिले. खटल्याचे पुढील कामकाज शुक्रवारपासून नियमित सुरू होईल, असे सांगण्यात आले.

'त्यांचे म्हणणे खोटे'

घरकुल प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी ईशू सिंधू यांची उलटतपासणी गुरुवारी आरोपीचे वकील जितेंद्र निळे घेतली. साक्ष देताना सिंधू म्हणाले की, 'मला बांधकामांबद्दल ज्ञान नाही, मी बांधकामतज्ज्ञ नाही हे खोटे आहे. माझा बांधकामांबाबत अभ्यास आहे. परंतु, त्या विषयी माझ्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नाही. जळगावची घरकुल योजना ही शहराच्या मोठ्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि कुठलीही नगरपालिका ही विकासासाठी ठराव मंजूर करीत असते हे म्हणणे खोटे आहे.'

'आरोपींचा दावा चुकीचा'

नगरपालिकेने नगरपालिका अॅक्टनुसार तरतुदींचे उल्लंघन केलेले नाही हे खरे नाही. तपासाधिकारी व त्यांचे अधिकारी यांनी घरकुल योजनेचा तपास हा एकतर्फी व बेकायदेशीररित्या केलेला आहे आणि या केसमध्ये आरोपींचे म्हणणे ऐकूण घेतले नाही. हे म्हणणे देखील खरे नसल्याचे सिंधू यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमिताभसोबतचा ‘तो’ फोटो आयोगासमोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळ्यातील दंगलप्रकरणी नियुक्त चौकशी आयोगासमोर विविध गटांकडून सादर सीडीज् पाहण्याचा आदेश झाल्यानंतर या सीडींच्या सत्यतेवर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न अॅड. शिशिर हिरे यांनी उपस्थित केला. अॅड. हिरे यांनी आपल्या म्हणण्याला पुरावा म्हणून सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केलेला अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा पोलिस अधिकाऱ्यांचा फोटो आयोगासमोर सादर केला.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षात धुळे दंगलीच्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांच्यापुढे कामकाज सुरू आहे. विविध गटांतर्फे अॅड. प्रकाश परांजपे, अॅड. जी. व्ही. गुजराथी, अॅड. अशपाक शेख, अॅड. समीर पंडित आदींचे युक्तिवाद झाले आहेत. पोलिस पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी विविध गटांतर्फे झालेले युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न गुरुवारी केला.

विविध गटांतर्फे दाखल झालेल्या दंगलीबाबतच्या सीडी ११ ऑगस्टला पाहण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. त्यासंदर्भात अॅड. हिरे यांनी युक्तिवादात सांगितले की, या सीडींवर कसा विश्‍वास ठेवावा हा प्रश्‍न आहे. कारण, या सीडी केंद्रीय फोरॅन्सिक लॅबकडून प्रमाणित होऊन आलेल्या नाहीत. त्यात संगणकाच्या मदतीने काही बदल करता येऊ शकतात. त्याच्या पुराव्यादाखल अॅड. हिरे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कक्षाबाहेर प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत अॅड. हिरे, तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पटील, अधिकारी विकास थोरात आदींसह कर्मचाऱ्यांचा फोटो काढून तो आयोगाला दाखवला. कम्प्युटरमधील सॉफ्टवेअरच्या मदतीने ही कमाल करता येऊ शकत असल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले.

'अॅसिड हल्ल्याचा विचार करावाच लागेल'

अॅड. हिरे यांनी सांगितले की, दंगल नियंत्रणासाठी पोलिसांना कसरत करावी लागते. तराजू-काट्यासारखी एखादी बाजू कमी-अधिक होऊ शकते. स्थितीप्रमाणे पोलिसांना नियंत्रणासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यांनी तो केला. ६ जानेवारी २०१३ ला धुळे शहरात मच्छीबाजार व परिसरात झालेल्या दंगळीच्या वेळी पोलिसांना गोळीबार करावा लागला. दंगलखोरांनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात सुमारे ६० ते ७० पोलिस कर्मचारी जखमी झाले. या अॅसिड हल्ल्याचा विचार गांभीर्याने करावा लागेल, असेही अॅड. हिरे यांनी निक्षून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडला नाही कणा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीचा महापूर ओसरल्यानंतर गोदाकाठासह उपनगरांचा भाग अद्यापही पूर्वपदावर आलेला नाही. गोदाकाठावरील वस्त्यांमध्ये कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे बेघर असलेल्या नागरिकांना आता रोगराईचा सामना करावा लागत आहे. रस्ते अजूनही चिखलाने माखले असतांना महापालिकेची यंत्रणा मात्र ढिम्म आहे. गोदाकाठावर उत्पन्न झालेल्या स्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचनामा करण्यासाठी १० पथके तयार करण्यात आले असून शुक्रवारपासून (दि.५) पंचनामे सुरू होणार आहेत.

गोदावरीला आलेल्या महापुराने नदीकाठाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील अनेक भागांमध्ये घुसलेले पाणी ओसरले असून पुरामुळे स्थलातंरित झालेले नागरिक आपल्या निवासस्थानी परतत आहेत. परंतु, पुरामुळे झालेल्या विद्रुपीकरणामुळे त्यांना पुन्हा स्थलांतरीक कॅम्पमध्ये परतण्याची वेळ आली आहे. नदीकाठावर झालेले विद्रुपीकरण दुसऱ्या दिवसही कायम आहे. नदीकाठावरील सर्व रस्ते अजूनही चिखलाने माखले असल्याने गोदाकाठ पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

रामकुंड, काळाराम मंदिराचा परिसर अमरधाम, गाडगेमहाराज पूल, गणेशवाडी, सराफ बाजारात साचलेल्या पाणी आणि गाळामुळे आता या भागात रोगराईचे संकट उभे राहिले आहे. आरोग्य विभागाकडून मदतकार्य राबविले जात असले तरी यंत्रणा अपुरी पडत आहे. रस्त्यांच्या साफसफाईसाठी महापालिकेने जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर उतरवले आहे. परंतु, हानीच मोठी असल्याने काम संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे नागरिकांच्या मदतीला नगरसेवक व सामाजिक संस्था धावून आल्या आहेत. विविध संस्थाकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅम्प लावून तपासणी केली जात आहे. तर आवश्यक ते औषधोपचारही केला जात आहेत. उपमहापौर गुरुमीत बग्गा, नगरसेविका विमल पाटील यांनी पंचवटीत आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांना मदत केली. तर आरटीओ विभाग, मराठा कट्टा, बिल्डर्स असोसिएशन, बाप्पा सिताराम ग्रुप, नाशिकरोड गुरूद्वारा ग्रुप, लायन्स क्लब या संस्थानी गुरुवारी नागरिकांना मदतीचा हात दिला.

११४ ठिकाणचा गाळ उचलला महापालिका बांधकाम विभागाने दोन दिवसात शहरातील २६ जेसीबी, ३२ ट्रॅक्टर, तीन स्क्रॅपर, १२ डंपर जुंपत शहरातील रस्ते मोकळे करण्यासह माती उचलण्याची मोहीम उघडली. गाळ हटविण्यासह रस्ते मोकळे करण्यासाठी २६८ मजूर राबत आहेत. ११४ ठिकाणची माती उचलण्यासह हे रस्ते मोकळे करण्यात आल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. शहरातील ८५ ठिकाणी साचलेले होते. जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणच्या पाण्याला वाट करून देण्यात येत आहे.

४९४ मेट्रिक टन कचरा संकलन पुरामुळे गोदावरीच्या उपनद्यासंह शहरातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. हा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाने यंत्रण लावली असली तरी काम संथ गतीने सुरू आहे. गुरुवारी शहरातून केवळ ४९४ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यात नदीकाठावर वाहून आलेल्या कचऱ्याचाही समावेश आहे. अतिरिक्त घंटागाडीच्या मदतीने कचरा उचलला जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

खासगी हॉस्पिटल्सचा पुढाकार शहरातील प्रति‌ष्ठित ११ मोठ्या हॉस्पिटल्सने महापालिकेला मदत देण्याची तयारी दाखवली आहे. या हॉस्पिटल्सची ११ पथके शुक्रवारपासून (दि. ५) नदीकाठावरील कॅम्पमध्ये जाऊन नागरिकांची फिरत्या दवाखान्यांच्या मदतीने आरोग्य तपासणी करणार आहेत. एमव्हीपी, सिक्स सिगमा, सार्थक, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, वोक्हार्ट, शताब्दी, लाईफ केअर, सुजाता बिर्ला, अपोलो, ऋषिकेश हॉस्पिटल आदींनी प्रत्येकी एक अॅम्ब्युल्नस, दोन डॉक्टर व औषधी देण्याची तयारी दर्शवली आहे.

गोदाकाठवर सर्वप्रथम नागरिकांना पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य दिले जात आहे. महापालिका व विविध संस्थाच्या मदतीने नागरिकांसाठी मदतकार्य राबविले जात आहे. सामाजिक संस्थानी मदतीसाठी पुढे यावे. - गुरुमित बग्गा, उपमहापौर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गेडाम यांच्या विरोधात याचिका

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जनरल मुखत्यारधारकास परस्पर टीडीआर न देण्याच्या तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्णयाला माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. मुद्रांक शुल्काचाच टीडीआर हस्तांतराचा आदेश असतांनाही, डॉ. गेडाम यांनी परस्पर बंदी

लादल्याचा आरोप दातीर यांनी केला असून, हा आदेश बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

जमिनीची खरेदी करण्याऐवजी मुद्रांक अधिनियम कायद्याचे नियमानुसार मुंद्राक व शुल्क भरून तसेच जमीन मालकास योग्य तो मोबदला अदा करून तपशील दस्तावेजात दाखल करून रितसर होणाऱ्या जनरल मुखत्यारपत्र तयार केले जाते. परंतु, तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी नियमानुसार असणाऱ्या जनरल मुखत्यार पत्रालाच आव्हान देत, टीडीआर हस्तांतरणास विरोध केला होता. सर्व कार्यालयामध्ये जनरल मुखत्यारपत्र धारकाचे अधिकार कायम आहेत. त्यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षकाचे पत्रही आहे. तरीही डॉ. गेडाम यांनी जनरल मुखत्यारधारकास परस्पर टीडीआर देण्याच्या कायदेशीर अधिकाराला परस्पर ब्रेक लावला. असे व्यवहार करण्यावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांसह

बिल्डरांचे नुकसान झाले आहे. शासनाचा बंदी आदेश नसतांनाही, त्यांनी परस्पर तोंडी आदेश देवून व्यवहाराची कोंडी केली. विधी विभागही त्यांच्याच तालावर नाचत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंपिंग स्टेशन पाण्यात; पाणीपुरवठा ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहर व तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊनही भर पावसाळ्यात सिन्नरकरांना पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. सततच्या पावसामुळे दारणा नदीला आलेल्या पुरामुळे चेहडी येथील पंपिंग स्टेशन पाण्यात गेले. त्यामुळे पाणी उपसणे बंद झाल्याने सिन्नर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

सिन्नरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी, (दि. ३१ जुलै) पुन्हा फुटल्याने पाणी उचलणे बंद झाले होते. त्यानंतर सोमवारी, (दि. १) पाऊस सुरु असल्याने जलवाहिनी रेपेरिंगचे काम थंडावले. त्यानंतर चेहडी येथील पंपिंग स्टेशनच पाण्याखाली गेले. या सर्व परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसापासून सिन्नर शहरास भीषण कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहरास पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख, नगरसेवक बापी गोजरे, अभियंता सुनील पाटील यांचेसह नगरपालिका कर्मचारी प्रयत्न करीत असून लवकरच सिन्नरचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांमुळेच पूरस्थिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह संपूर्ण राज्यातील पूरपरस्थितीला अनधिकृत बांधकामेच जबाबदार आहेत. तरीही राज्यसरकार अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासारखे मूर्खपणाचे निर्णय घेत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नाले बुजवले गेल्यानेच ही आपत्ती आल्याचे सांगून सर्वच शहरांची ती समस्या बनल्याचे ठाकरेंनी यावेळी सांग‌ितले. गोदावरीला आलेल्या पुरासंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली असून, आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांग‌ितले. तसेच महापुरानंतर महापालिका प्रशासनाचे काम उत्तम चालू असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. घनकचरा व डेब्रसि शहरातून पूर्णपणे बाहेर काढण्याची सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. गोदावरीला आलेल्या महापुराच्या स्थितीची बुधवारी पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक वर्षांनंतर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेले नुकसान पाहून वाईट वाटले. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. महापौर व आयुक्तांसोबतच महापुरासंदर्भात चर्चा केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात अनधिकृत बांधकामांवर सर्वाधिक हातोडा मारला गेला. परंतु, तरीही नाल्यांवर बांधकाम झाले. नदीकाठावरही अतिक्रमण होऊन ही बांधकामे सरसकट अधिकृत केली जात आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांमुळे आज पूरस्थिती ओढावली आहे. परंतु यातून सरकार काही शिकण्याऐवजी अशी बांधकामे सरसकट अधिकृत करून मूर्खपणाचे निर्णय घेत आहे. शहरातील नाले व नदीवरील अतिक्रम‌ित बांधकामांसह घनकचरा व बांधकामाचे डेब्र‌िसही पुराच्या घटनेला जबाबदार आहे. घनकचरा पूर्णपणे उचलण्यासह डेब्र‌िसचे स्वतंत्र टेंडर काढून काम देण्याच्या सूचना आपण केल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. असे केले नाही तर अशीच परिस्थिती कायम राहील, असेही ते म्हणाले.
हा आनंदाचा विषय नाही गोदापार्कच्या दुरवस्थेवर माध्यमांनी टीका केल्याने ठाकरे चांगलेच संतापले होते. गोदापार्कची दुरवस्था होणे हा आनंदाचा विषय नाही, असे सांगून येथे माझी नव्हे, तर नाशिककरांची मुलेच खेळायला येणार होती, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. महापुराने नुकसानच होते असे सांगून त्यांनी महापूर येणार म्हणून अजून किती वरती बांधकाम करायचे, असा उलट सवाल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतांचा आकडा दहावर

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारच्या अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता दहावर गेली आहे. तर, एकूण ७७ घरांचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात एकूण ९४० कुटुंबांमधील ३१६७ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ धरणांमधून अजूनही विसर्ग सुरुच असून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी झालेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभरात आठ जणांचा बळी गेला होता. तर, आणखी दोन जण बुधवारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे बळींचा आकडा दहावर गेला आहे. २ व्यक्ती जखमी असून एकूण २० जनावरे ठार झाली आहेत. एकूण २८०० कोंबड्या मृत पावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ७७ घरांचे नुकसान झाले आहे. तर, पावसाच्या पुरामुळे एकूण ९४० कुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यात ३१६७ व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध धरणांमधून गुरुवारीही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास भोजापूर धरणातून ९९२, गंगापूरमधून ३०२४, कश्यपीमधून ४१८, आळंदीमधून १२६३, कडवामधून ३७४४, नांदूरमध्यमेश्वरमधून ६१८५७, चणकापूरमधून २१६, हरणबारीमधून २५८८, केळझरमधून ५९०, ठेंगोडा येथून ६९६८, पालखेडमधून ७५०८, करंजवणमधून ३५००, वाघाडमधून २८६५, पुणेगावमधून १२०७, दारणातून १५८३४, भावलीतून ४८१, वालदेवीतून १३०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

तातडीने पंचनामे करा

पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनीही महसूल यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले असून,

शुक्रवार सकाळपासून पंचनामे करण्याचे काम सुरु होणार आहे. पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल तयार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षणाला धक्का लावू नका

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून, महापालिकेने आपल्या पाणी आरक्षणाला धक्का लावू नये. यासाठी महापा‌लिकेने हायकोर्टात बाजू मांडावी, अशी मागणी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापालिकेने ९ ऑगस्टच्या हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी होवून आपला हक्क सांगावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे. दरम्यान, शहरात होणारी पाणीकपात थांबवून दोनवेळ पूर्णवेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश दिला असून, पैठण जलायशयात येणारे पाणी अडवू नका, असे आदेश दिला आहे. तसेच पाणी सोडण्यांसदर्भातील माह‌िती ९ ऑगस्टला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठावाड्यानंतर आता नाशिकचेही लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने या वादात उडी घेत, हायकोर्टात महापालिकेने पार्टी होवून आपली बाजू मांडावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या आरक्षणाला धक्का न लावता, हायकोर्टाने काय तो निर्णय घ्यावा. परंतु पालिकेचे आरक्षित पाणी त्यातून वगळावे, अशी मागणी महापालिकेने कोर्टात करावी अशी मागणी शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा मराठवाडा विरुद्ध नाशिक असा संघर्ष सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२००८च्या ‌शिध्याचे पैसे अद्याप थकीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह अन्य नद्यांना पूर आल्यामुळे पूरग्रस्तांना शिधावाटपाची कोणतेही आदेश शासनाने न दिल्यामुळे पूरग्रस्तांसाठी सामाजिक संस्था धावून आल्या आहेत. दरम्यान २००८ साली झालेल्या पुरानंतर मोठ्या प्रमाणात शासनातर्फे शिधा वाटप करण्यात आला होता. पण त्याचे पैसेही रेशन दुकानदारांना शासनाने दिले नसल्याचेही समोर आले आहे. नाशिक जिल्हयात अतिवृष्टी झाल्यामुळे ७७ घरांचे नुकसान झाले आहे, तर ३१६७ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त झालेल्यांना मदत अपेक्ष‌ित होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी स्थलांतरीत असलेल्या पूरग्रस्तांना मात्र कोणताही शिधा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जर शिधा दिला, तर रेशन दुकानदारांनी संपकाळातही शिधा वाटप करू असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगितले होते. पण शासनाचे कोणतेही आदेश नसल्यामुळे हा शिधा वाटप करण्यात आला नाही. पूरग्रस्तांना धान्य, साखरेसह इतर वस्तू गेल्या वेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी अशी तरतूद का करण्यात आली नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोरी, सायखेडा पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या गावांना मंगळवारी, (दि. २) गोदावरीच्या पुराचा तडाखा बसल्यानंतर येथील पाणीपुरवठा करणे अवघड झाल्याने सरकारच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच येथील पू्रग्रस्तांना प्रशासनाकडून पाहणी करून योग्य ती मदतही करण्यात आली.

गोदावरीच्या पुरामुळे पाणीपुरवठा करणे अवघड झाल्याने सिन्नर येथून सायखेडा गावासाठी ४ पाण्याचे टँकर पाठवण्यात आले. निफाड तहसील प्रशासन व पंचायत समिती यांनी विविध सामाजिक संस्था, चांदोरी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने चांदोरी येथील पूरग्रस्त भागातून विस्थापित आणि पुरामुळे गावात घरामध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना जेवण, पाण्याच्या बॉटल्स दिल्यात. दरम्यान विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी चांदोरी गावाला तर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी बुधवारी, (दि. ३) चांदोरी, सायखेडा गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

अखेर बाजार भरला

गेल्या तीन दिवसापासून गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जनजीवन विस्कळीत झाले होते ते काल पूर्वपदावर आले. सायखेडा गावातील पेठेत असणारे पाणी ओसरल्याने व्यापाऱ्यांनी गुरूवारी, (दि. ४) आपली दुकाने उघडली होती. व्यावसायिकांचे अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निकृष्ट काम उघड

त्र्यंबकेश्वर : सततच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरला सिंहस्थादरम्यान रस्ते आणि गटारी यांचे झालेले नियोजन शुन्य काम उघडे पडले. यावरून सिंहस्थ ध्वजारोहण १४ जुलै २०१५ आणि त्यानंतर शाहीस्नानाच्या दरम्यान जर असा १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस एका दिवसात झाला असता तर प्रशासनाने नेमके काय केले असते, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी विचारला. यासोबतच प्राचीन कुशावर्त तीर्थ ओव्हर फ्लो झाले आणि पुराणात येथे प्रकट होऊन पुन्हा गुप्त झालेली गोदावरी वाहती झाल्याची घटना मंगळवारी, (दि. २) पाहावयास मिळाली. या महिन्यातील पुढील आठवड्यात ध्वज अवतरणास मुख्यमंत्री महोदयांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा पुन्हा कुशावर्तातून गंगा बाहेर पडली तर काय करणार. अशा परिस्थितीत प्रशासन कसे नियोजन करते हा खरा प्रश्न आहे.

हरसूल-वाघेरा घाट खुला

हरसूल-वाघेरा घाट ३० तासांच्या अथक प्रयत्नाने अखेर एकेरी वाहतुकीसठी खुला करण्यात आल्याने परिसातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संपर्क तुटला

कळवण : संततधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील शेवटच्या टोकाला असलेले पिंपळसोंड, उंबरपाडा येथील अंबिका नदीची उपनदीवर या गावाजवळ पाइपच्या मोरीवरून पूराचे पाणी वाहत आहे. येथील शंकर चौधरी या युवकाने नागरिकांना मदतीला घेऊन रस्त्यावरील चिखल थोड्याफार प्रमाणात हटविला. सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील देवलदरी ते चापापाडा या नदीवरील फरशी पूल पुरात वाहून गेल्यामुळे नागरिकांना नदीतून प्रवास करावा लागत आहे. या पाड्यावर तीनशे ते साडेतीनशे लोक वस्ती आहे.

दिंडोरीत नुकसान

दिंडोरी : तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने २२७७ हेक्टर शेतीसह २२८ घरांचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. याबाबत तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी अहवालाची माहिती दिली आहे.


पूरपाण्याचा फायदा; शेतीचे नुकसान

सिन्नर : गेल्या दोन दिवसांच्या पावसाने येथील भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने कालव्याला पूरपाणी सोडावे अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली. पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून १५० क्यूसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिन्नर संगमनेर तालुक्यातील १३ गावांना पूरपाण्याचा फायदा होणार आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील माळवाडी, दुशिंगपूर, खंबाळे, पांगरी, चास, भोकणी, सुरेगाव, मऱ्हळ, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे, दोडी, दातली या गावांना फायदा होणार आहे. कडवा धरणापासून ५०० मीटर अंतरावर असलेला कालव्याचा उजव्या बाजूचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने कालव्याचे पूरपाणी मंगळवारी संध्याकाळी बंद करण्यात आले. तर धारणगाव आणि कुंदेवाडी येथील पुलांच्या बाजूला असलेला भराव वाहून गेला. तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहणेरचा गिरणा नदीवरील पूल बंद

$
0
0

घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाड (जि. रायगड) येथील सावित्री नदीवरील ब्रिटिश काळातील नदीवरील पुलाच्या घटनेची गंभीर दखल घेत सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाने लोहणेर येथील गिरणानदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

विंचूर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावरील लोहणेर येथील गिरणानदीपात्रावर असलेला पूल हा ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशांनी सन १९४४ मध्ये बांधकाम केलेला नऊ मीटरचे वीस गाळे असलेला पूल वाहतुकीसाठी बांधला होता. या पुलाला आजमितीस तब्बल ७२ वर्षांचा कालावधी उलटूनही पूल वाहतुकीसाठी सुरूच होता. या पुलाचे आयुष्यमान संपल्याने या पुलाला पर्यायी नवा पूल शेजारीच उभारण्यात आला असून या दोघा पुलांवरून राज्य महामार्गावरील अवजड वाहनांसह वाहतूक दररोज होत आहे.

जुन्या पुलाला थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्यात येऊन या पुलावरून सटाणा शहराकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. तर या पुलाला जोडून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून नाशिककडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक होत असली तरीही सदरचा राज्यमहामार्ग हा गुजरातला जोडणारा नजिकचा महामार्ग असल्याकारणाने मुंबई, पुणे, नगरसह कर्नाटककडे जाणारी गुजरात व आंध्रप्रदेशमधील वाहतूक या ठिकाणाहून होत असते. यामुळे मोठी अवजड वाहतूक या पुलावरून होत असते. या पुलाच्या खालून गिरणानदी वाहत असून पुलापासून नदीचे अंतर काही शेकडो फुटांचे आहे. नदीपात्र अत्यंत विशाल असून पावसाळ्यात नेहमीच या नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो.

नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक

चणकापूर व पुनद धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग, पूरपाणी यामुळे मोठ्या प्रमाणात नदीला पाणी येत असते. अनेकवेळा लोहणेर गावापर्यंत पाणी गेल्याचे आख्यायिका आहेत. या अनुषंगाने महाड येथील घटनेनंतर प्रशासनाने खडबडून जागे होत. पुलावरील वाहतूक बंद केल्याने नव्या पुलावरून आता दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पुलाचा वापर पुन्हा निश्चित केव्हा सुरू करण्यात येईल, याबाबत प्रशासनाने साशंकता व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बिंदू महाराजांचा उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट माहितीच्या अधिकार कायद्याची पायमल्ली करत असल्याचा निषेध करण्यासाठी डॉ. बिंदू महाराज यांनी उपोषणाचा इशारा दिला.

ट्रस्टच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ते व सल्लागार महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविली असता देवस्थान ट्रस्टने त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यावर केलेल्या अपीलाची मात्रा निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे डॉ. बिंदूजी महाराज यांनी १५ ऑगस्टपासून मंदिरासमोरच उपोषणाचा इशारा दिला आहे.

ट्रस्टकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती अर्ज देऊनही तसेच त्यावर रीतसर अपील अर्ज दाखल करूनही कारवाई होत नाही. याबाबत त्यांनी त्र्यंबक तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. त्र्यंबक देवस्थानला मिळत असलेले दान, देवस्थानकडून होणारा खर्च, देवस्थान वापरीत असलेली वाहने, त्या वाहनांना झालेले अपघात, वाहनांची दुरुस्ती आदी विषयांची माहिती डॉ. बिदूजी महाराज यांनी मागितली. तसेच देवस्थान ट्रस्टची इमारत, पुरातत्व विभागाचे नियम डावलून देवस्थान ट्रस्टच्या इमारतीत करण्यात आलेले फेरबदल आदी महत्त्वपूर्ण विषयांबाबतही डॉ. बिंदूजी महाराज यांनी माहिती मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या साडे अठरा लाखांवर ‘पाणी’

$
0
0

पावसामुळे २३९० फेऱ्या रद्द

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर व परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाने जिल्ह्यातील एकुण २३९० फेऱ्या रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या बसफेऱ्या रद्द केल्यामुळे महामंडळाला १८ लाख ४५ हजार २८३ रुपयाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. अतिवृष्टीमुळे जिवीतहानी व बसेसचे नुकसान झाले नसले तरी २२ हजार किलो मिटरवर एसटी मात्र धावू शकली नाही. बुधवारनंतर मात्र सर्व वाहतूक सुरळीत झाली. दुपारी दीडपर्यंत औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ही निफाड व पिंपळगावमार्गे वळविण्यात आली. त्यानंतर सायखेडा मार्गेही वहातूक सुरळीत सुरू झाली.

अतिवृष्टीमुळे मोठा फटका नाशिक शहरातील डेपोला बसला. नाशिकहून बाहेरगावी जाणाऱ्या ३७८ फेऱ्या रद्द केल्यामुळे त्यातून ४ लाख १४ हजार ४२ रुपयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शहर वहातुकीच्या १ हजार २६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ५ लाख ३७ हजार २९ रुपयाचे उत्पन्न बुडाले. नाशिक शहरातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. तर ज्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तेथेही बस पोहोचल्या नाही. ट्रॅफिक जॅममुळे या बसेसला नुकसान झाले. प्रवाशांची संख्याही घटल्यामुळे काही बस रद्द करण्यात आल्या.

जिल्ह्यात एकुण एसटी महामंडळाचे १३ आगार असून त्यात नाशिकप्रमाणेच सिन्नर येथील १३१, पेठ येथील ११२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे पिंपळगाव ९५, सटाणा ९२, इगतपुरी ८२, कळवण ७२ लासलगाव ५३, मालेगाव ३६, मनमाड ३०, नांदगाव १६, येवला ३० इतक्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images