Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककर थंडीने गारठले

$
0
0

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील निच्चांकी तपमानाची नोंद नाशकात होत असतानाच गुरुवारी आर्द्रता कमी झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्ये किमान तपमान ६.४ तर निफाडमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ५.६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.

नाशिकचे बुधवारी (दि. २६) तपमान ६ अंश सेल्सिअस इतके होते. त्यात गुरुवारी वाढ झाली असली तरी आर्द्रता कमी झाल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना चांगलाच जाणवत आहे. बुधवारी ३० टक्के असलेले हवेतील आर्द्रतेचे प्रमाण गुरुवारी २४ टक्क्यांवर गेल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळेच दिवसाही नाशिककरांना उबदार कपडे घालणे अत्यावश्यक झाले होते. पाच दिवसांपासून सातत्याने किमान तपमानात घसरण होत आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर शहर परिसरात लपेटल्याचे दिसून येत आहे. येते काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निच्चांकी ६.१ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयडीआय, फॉरेन ट्रेड सेंटर द्या

$
0
0

खासदार हेमंत गोडसे यांचे केंद्र सरकारला साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने नाशिकमध्ये आयडीआय (इंटरपेनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट) सुरू करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांच्याकडे केली आहे. तसेच नाशिकमध्येच फॉरेन ट्रेडचे काऊंटर सुरू करण्याची मागणी गोडसे यांनी केंद्राकडे केली आहे.

नाशिककमध्ये आयडीआय सुरू करण्यासाठी खा. गोडसे आणि उद्योजकांनी मिश्र यांची भेट घेतली. नाशिकमध्ये सुमारे पाच हजारहून अधिक छोटे-मोठे उद्योग आहेत. मात्र, या उद्योगांसाठी कुशल कामगार मिळत नाहीत. नाशिकमध्येच आयडीआयचे केंद्र सुरू झाल्यास या उद्योगांना कुशल कामगार मिळणार आहे. 'आयडीआय'च्या माध्यमातून या इंडस्ट्रिजमध्ये उद्योगांच्या मागणीनुसार कामगारांना ट्रेनिंग दिले जाईल. त्यामुळे या कामगारांना संबंधित कामांचा योग्य अनुभव असणार आहे. तसेच इंडस्ट्रिजचेही उत्पादन वाढणार असून इंडस्ट्रिजला मोठा बुस्ट मिळेल अशी अपेक्षा आहे. मिश्र यांनीही सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले.

खा. गोडसे व उद्योजकांनी फॉरेन ट्रेडचे डायरेक्टर जनरल अनुप वाधवन यांची भेट घेवून फॉरेन ट्रेडचे सेंटर नाशिकला सुरू करण्याची मागणी केली आहे. नाशिकमधून दर महिन्याला इंडस्ट्रिजचे १५०० व अॅग्रीकल्चरचे १००० कन्टेनर निर्यात होतात. त्यासाठी दरवेळी पुण्याला लायसन्स परवानगी व क्लेम करण्यासाठी जावे लागते. त्यामध्ये अनेक चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये वेळ, श्रम वाया जावून पैसाही खर्च होतो. त्यामुळे शेतकरीही निर्यात संदर्भात विचार करत नाही. फॉरेन ट्रेडचे कार्यालय सुरू झाल्यास बऱ्याच उद्योजक तसेच शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. त्याचा उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही लाभ होणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धात्रकफाटा थांबा झाला जीवघेणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. पूर्वीपासून तेथील प्रवाशांचे केंद्र असलेला हा थांबा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचा ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

धात्रक फाटा बसथांबा हा पूर्वी महामार्गावर होता. रस्ता रुंदीकरनानंतर सहा पदरी झालेल्या या रस्त्यावर तीन दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक टाकताना दोन्ही स‌र्व्हिस रस्त्यांच्या बाजूने हनुमाननगरपासून जत्रा हॉटेलपर्यंत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. शहर वाहतुकीच्या बसेस या महामार्गावरून धावत असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी या जाळ्यांवरून उडी मारून बस गाठावी लागते. तसेच स्त्रियांना जाळी ओलांडणे शक्य होत नाही. त्यामूळे बस हुकून मनस्ताप सहन करावा लागतो. या थांब्यावर स्थानिक नागरिक, एच.ए.एल.चे कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची सदैव वर्दळ असते. बस आल्यानंतर ती गाठण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने अनेक जण जाळ्यानवरून पडून जखमी होतात. तसेच स‌र्व्हिस रस्त्यावरील वाहनांना या गर्दीमुळे अडथला येऊन अपघातही होतात. पालकांना यामुळे आपल्या शालेय पाल्यांना सोडण्यासाठी हनुमाननगर किंवा जत्रा थांबा येथे जावे लागते. यामुळे अंतर तर वाढतेच पण, या दोन्ही थांब्यांवर वाहतुकीची गर्दी होते. दुभाजाकांमुळे दुखापती होण्याची व मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. अशीच परिस्थिती महामार्गावरील इतर थांब्यांवरही असून, महामार्गावरील शहर बस सेवा सध्या अडचणीची ठरत आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शहर वाहतुकीच्या बसेस या स‌र्व्हिस रस्त्यावरून वळवाव्यात, तसेच पूर्वीप्रमाणे थांब्यावर प्रवासी निवारा शेड उभारावेत, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रात्री अपरात्री नागरिकांना अडवून त्यांची लुटणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी गुरूवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास निमाणी येथे अटक केली. पंकज पुरूषोत्तम मोरे (२०) आणि पंकज आघव (२७) अशी या संशयितांची नावे आहे.

फिर्यादी किशोर पाटील एका नातेवाईकाच्या मदतीसाठी रात्री खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. रात्री अडीच्या सुमारास ते आपल्या मुलासोबत परतत असताना, काट्या मारूती चौकीजवळ त्यांना पाटील अशी हाक मारत दोघा भामट्यांनी थांबवले. त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर 'पाटील' असे लिहिल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. यानंतर, कुमावतनगर येथे राहणाऱ्या संशयितांनी एक मोबाइल कॉल करायचा बहाण करीत पाटील यांच्याकडून मोबाइल घेतला. तसेच त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपये काढून घेतले. दोघा चोरट्यांनी लागलीच लाल रंगाच्या पल्सरवर धूम ठोकली. पाटील यांनी ही माहिती पोलिसांना कळवताच गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी निमाणीजवळ दोघांना जेरबंद केले. घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप प्रवेशकर्त्ये रोडावले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२७) होणाऱ्या नाशिकमधील कथीत भव्य प्रवेश सोहळा हा स्थानिक भाजप नेत्यांच्या आतातायी भूमिकेमुळे आता फुसका बार ठरण्याची शक्यता आहे. या प्रवेश सोहळ्याने मनसेसह इतर पक्ष हैराण झाले तरी त्यांनी वेळीच सावध होत, डॅमेजकंट्रोल सुरू केल्याने निम्मे नगरसेवकांनी माघार घेतली आहे. तर काही संभ्रमावस्थेत सापडले असून, नुकत्याच भाजपवाशी झालेल्या एका नेत्याच्या मर्जीखातर केवळ पाच ते सात नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय भुकंप कागदावरच राहणार असून, या सोहळ्याची हवा काढण्याचे प्रयत्न भाजपच्याच एका गटाकडून केले जात आहेत.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील नाराजांना पक्षात घेण्याची मोहीम उघडली आहे. त्याच मोहिमेचा पुढचा भाग हा येत्या रविवारी मनसेसह इतर पक्षातील १५ ते २० नगरसेवक व काही बडे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजपचे नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या दाव्यांमुळे मात्र मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष गटाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपमध्ये कोणते नगरसेवक जाणार याची चाचपणी करण्यातच इतर पक्षांचे पदाधिकारी गुंतले असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. तर मनसेने हा प्रवेश सोहळा उधळून लावण्यासाठी रणनिती तयार केली असून, नगरसेवकांना माघारी फिरवण्यासाठी डॅमेजकंट्रोल केले जात आहे. निवडणुकांना अजून सव्वा वर्ष असल्याने काही नगरसेवक प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत. तर काही नगरसेवकांनी नकार कळविल्याने या प्रवेश सोहळ्याची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपवाशी झालेल्या या नेत्याची ताकद वाढू नये म्हणून काही भाजपचेच नेते प्रयत्न करत असल्याने फक्त पाच ते सहाच नगरसेवक प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यावरील निर्यातमूल्य हटविले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सत्ताधारी भाजप व शिवसेना खासदारांच्या दबाव व शेतकऱ्यांच्या रेटयापुढे केंद्र सरकार झुकले असून, वाण‌‌ज्यि मंत्रालयाने कांद्यावरील निर्यातमूल्य चारशे डॉलरवरून थेट शुन्यावर आणले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याला जागतिक बाजारपेठ मिळणार असून, कांद्याची थेट निर्यात करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे कांद्याचे घसरलेले दरही वाढणार असून, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नाशिकला होणार आहे.

भाजप व शिवसेना खासदारांच्या दबावानंतर केंद्र सरकारने १० डिसेंबरला कांद्याचे निर्यातमूल्य ७०० डॉलरवरून ४०० डॉलर आणले होते. मात्र पाकिस्तानमध्ये कांद्याचे निर्यातमूल्य शुन्य असल्याने भारतीय कांद्याला बाजारपेठ मिळत नव्हती. तर निर्यात मूल्य घटविल्यानंतरही जिल्ह्यातील कांद्याचे दर वाढले नसल्याने शेतकरी संतप्त होऊन केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. चव्हाण आणि गडकरींच्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र सरकारने गुरूवारी कांद्यावरील निर्यात मूल्य हटविण्याची अध‌किृत घोषणा केली. कांद्याचे निर्यातमूल्य थेट ४०० डॉलरवरून शुन्यावर आल्याने कांद्याच्या निर्यातीवर आता केंद्राचे कोणतेही बंधन राहणार नाही. कांदावरील एमईपी हटवल्याने कांद्याची निर्यात वाढून देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे दर वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. सध्या कांद्याची आवक बाजारपेठेत वाढल्याने दर अधिक कोसळ्याची शक्यता होती. मात्र निर्यातमूल्य हटव‌ल्यिाने आता सरासरी दर वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडी नदीवर नवीन पूल उभारावा

$
0
0

लामखडे मळा कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे अजुनही अपूर्ण अस्वस्थेत असल्याबद्दल रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात १० वर्षात लोकवस्ती वेगाने वाढली आहे. परंतु, त्या तुलनेत मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. जलवाहिनी अजुनही जुनीच आहे. त्यामुळे अतिशय कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. स्थानिकांनी आपल्या तक्रारींचे गाऱ्हाणे महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या सभापती सुनीता शिंदे यांच्याकडे मानले. यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी सी. बी. आहेर यांनी रस्त्याची व इतर कामे तातडीने मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले. यावेळी विजय पवार, विश्वनाथ पंडित, एस. एन. सातपुते, रितेश वाघेला, एस. एन. भगत, अरविंद पटेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाच्या डोळ्यात अंजन

$
0
0



शिवाजी चौकातील मंडईच्या बाजूलाच महापालिकेचे मैदान आहे. मैदानाच्या बाजूला महापालिकेच्या पुढाकाराने व्यायमशाळा आणि लोकमान्य वाचनालय उभारण्यात आले आहे. व्यायमशाळा अद्याप सुरू करण्यात न आल्याने त्यासाठी असलेला भला मोठा हॉल सध्या धुळखात पडून आहे. वाचनालयात दररोज वृत्तपत्र, नियतकालिके आणि पुस्तक वाचनासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी येतात. मात्र, मैदानावरील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास वाचनालयात येणाऱ्यांना सहन करावा लागतो. याबाबत 'मटा'ने मैदानाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध करताच शिवाजी चौकातील रहिवाशांनी सामाजिक प्रबोधनपर बॅनर मंडईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा मैदानाची योग्य निगा राखणाऱ्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात लावण्यात आलेल्या बॅनरवर सन २०१४-२०१५ चे आगळेवेगळे पुरस्कार असे म्हटले आहे. भाजी मार्केट शेजारील मैदान स्वच्छ व सर्वांगसुंदर करणे, मैदानात ज्येष्ठांसाठी वृक्षारोपण, सर्वांसाठी ग्रीन जिम करण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांच्या वतीने अभिनव पुरस्कार असे म्हटले आहे. प्राणवायू, सिडको भूषण, स्वच्छता सम्राट, नशामुक्ती, जनहितैषी सेवक देवारत्न अशा विविध पुरस्कारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बॅनरवर लावलेल्या विविध पुरस्कारांच्या घोषणेमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. बॅनर कोणी लावला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

प्रशासन होणार का जागे? स्थानिकांच्या पुढाकराने बोलके बॅनर भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता तरी महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी मैदानाच्या दुरवस्थेकडे लक्ष घालावे, अशी मागणी शिवाजी चौकातील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांनी गजबजले नाशिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्दी पावलेले नाशिक सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहे. थंडीच्या दिवसांचा चांगलाच फायदा नाशिकला होत असून, येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक नाशिकच्या दिशेने येत आहे. येथूनच काही अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर, वणी-सापुतारा तसेच शिर्डी या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ओढीमुळे पर्यटक नाशिकला वळत आहेत.

रेंगाळलेल्या थंडीमुळे थोडा उशिरा सुरू झालेला पर्यटकांना आवडणारा थंडीचा मोसम आता चांगलाच बहरला आहे. नाशिक परिसरातील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी फुल्ल गर्दी केली असल्यामुळे पर्यटकांनी शहर बहरले आहे; मात्र पार्किंग व रस्ते यांची योग्य सोय नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सध्या डोके वर काढत आहे. प्रत्येक ठिकाणी अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्यामुळे पर्यटकांची नाराजीही पसरली आहे. शहरातील पांडवलेणी, चामरलेणी, रामसेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसर, दिंडोरी, चांदवड परिसरातील ऐतिहसिक किल्ले पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत अाहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी फिरण्यासाठीही पर्यटक राजीखुशीने तयार होत असून, नांदूरमध्यमेश्वरला भेट देण्यासाठी पसंती देत आहेत. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले नांदूरमध्यमेश्वर नेहमीच पर्यटक, वनस्पतिशास्त्रज्ञ व गिरिभ्रमंतीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.

द्राक्षबागांनी बहरलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर म्हणजे हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण. वन विभागाच्या माहितीनुसार १५० जातींचे परदेशी व स्थानिक पक्षी येथे पाहायला मिळतात. फ्लेमिंगो, स्पुनबिन, ग्रे व परपल हेरॉन, पेंटेड स्कॉर्क, आयबीस, टिल्ट यांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे निरीक्षण मनोरे उभारले आहेत.

विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यापेक्षा या निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटक अधिकांश वळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी पर्यटकांची संख्याही वाढली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्याबरोबर परराज्यातील पर्यटकांनी हजेरी लावून येथील निर्सगाच्या अनोख्या आविष्काराचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली आहे.



जिल्हा परिसरातही होते भ्रमंती

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र, जवळच असणारे भंडारदरा धरण, धुक्यांच्या दुलईत हरवणारा कसारा घाट, कावनई व टाकेद यासारखी ऐतिहासिक धार्मिक स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील 'चेरापुंजी' म्हणून इगतपुरी तालुक्याची खरी ओळख असली तरी अवघा नाशिक जिल्हा गड-किल्ल्यांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. रतनगड, साल्हेर-मुल्हेर, ओंधा-पट्टा, धोडप, कौळाणे, मार्कंडेय, रामशेज व अनकाई असे सह्याद्रीच्या रांगेतील अनेक गड-किल्ले पर्यटकांना खुणावत आहेत.





धार्मिक पर्यटनालाही प्रचंड वाव

नाशिक हे नैसर्गिक पर्यटनापेक्षाही धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला येण्याची आज गरज आहे. त्र्यंबकेश्वर तसेच रामकुंड या दोन ठिकाणी पर्यटनाला वाव असला तरीही आणखी अनेक धार्मिक ठिकाणे नाशकात आहेत; मात्र त्याकडे कुणाचे अधिक लक्ष जात नसून त्याची जाहीरात करण्याची गरज आहे. हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनेरी, समर्थ रामदासांनी वास्तव्य केलेले आगर टाकळी, इच्छामणी गणपती (उपनगर ), एकमुखी दत्तमंदिर, कालिका मंदिर, देवळाली कँपजवळ असलेले खंडोबाची टेकडी, चामर लेणी, नवश्या गणपती, भक्तिधाम (पेठ नाका), मुक्तिधाम (नाशिक रोड) या देखील धार्मिक पर्यटनस्थळांमध्ये मोडणाऱ्या ठिकाणांची माहिती पर्यटकांना मिळाल्यास येथेही भेटी देण्यास ते उत्सुक असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुड मॉर्निंग; हे बरं आहे का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दररोज सकाळी उठताच डबा, बादली घेऊन लोटापरेड करताना गावच्या बाहेर वेशीनजीक तर कधी नदीकाठी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची आता चांगलीच तारांबळ उडत आहे. यासाठी येवला पंचायत समितीने आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. ती म्हणजे 'गुड मॉर्निंग'. या मोहिमेंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके भल्या पहाटे विविध गावात अचानक जाऊन गावाजवळ उघड्यावर लोटापरेड करणाऱ्यांना गाठत आहेत. नुसतेच गाठत नसून त्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देताना समज देत आहेत.

येवला तालुक्यातील एरंडगाव येथे असेच एक पथक भल्या पहाटे पोहचताना पथकातील अधिकाऱ्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प दिले तेंव्हा हाती लोटा घेऊन निघालेले चांगलेच खजिल झाल्याचे दृश्य नजरेत पडले. निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छता, शौचालयाचा वापर वाढवणे यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच वचक बसावा यासाठी पंचायत समितीच्या पथकाने गांधीगिरी करून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. गांव शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले असताना व घरी शौचालय बांधलेले असतानाही उघड्यावर लोटापरेडसाठी जाणाऱ्यांची अजूनही संख्या कमी नाही.

अशाच पद्धतीने गावाच्या आसपास उघड्यावर शौचास निघालेल्या येवला तालुक्यातील एरंडगाव येथील जवळपास तीस जणांना भल्या पहाटे येवला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गाठताना त्यांना गुलाबपुष्प दिले. 'गुड मॉर्निंग' असे म्हणतानाच हे बरं आहे का? असा सवाल यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी लोटापरेड करणाऱ्यांना करत त्यांचे डबे देखील जप्त केले. गुलाबपुष्प हाती पडताना मात्र लोटापरेड करणारे चांगलेच खजिल झाल्याचे चित्र दिसले.

येवला तालुक्यातील एरंडगाव येथे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, माजी सरपंच, दोन विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे गुड मॉर्निंग पथक भल्या पहाटे ५.३० वाजता गावात फिरले. तेव्हा उघड्यावर लोटापरेड करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. उघड्यावर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र देखील यावेळी कॅमेऱ्यातही कैद करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे. गावोगावी पथके पाठवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.

गावे हागणदारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पथकाद्वारे प्रबोधन केले जात आहे. बाहेर प्रातर्विधीस जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली जाताना समजही देण्यात आली. उघड्यावर प्रातर्विधीस जाणाऱ्यांची संख्या कमी न झाल्यास यापुढे अशांची नावे ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. ज्यांनी शौचालयासाठी अनुदान घेतले आहे, त्यांचे अनुदान परत मागितले जाईल. इतरांना रुपये १२०० पर्यंत दंडही भरावा लागू शकतो.

- आनंद यादव, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), येवला पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सटाणा बायपासचा प्रश्न मार्गी लावणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा पूर्वेकडील बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील सप्ताहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दालनात शिष्टमंडळासह मान्यवरांची बैठक घेण्यात येऊन ठाम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. विलास बच्छाव यांच्यासह शिष्टमंडळाने सटाणा शहरातील प्रलंबित पूर्वेकडील बायपास व केळझर पाणीप्रश्नावर खासदार डॉ. भामरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पूर्वेकडील व प्रस्तावित पश्चिमेकडील बायपास संदर्भात शेतकऱ्यांसह विविध मान्यवरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी डॉ. विलास बच्छाव यांनी पूर्वेकडील बायपास शहरासाठी कसा योग्य आहे या बाबत माहिती सादर केली. खासदार डॉ. भामरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पुढील सप्ताहात मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे सुचित केले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत पूर्वेकडील बायपास रस्ता मंजुरीचे संकेत दिले.

तसेच, सटाणा शहरासाठी आवश्यक असलेल्या ठेंगोडा येथील गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून, लवकरच या संदर्भात प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली. हरणबारी, केळझर व चणकापूर धरणातील पाणी शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणक्षेत्रातील लाभार्थी व शेतकऱ्यांनाच देण्यात यावे. अन्यत्र ते वळविण्यात येवू नये, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडत खासदार डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बैठकीस डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक साहेबराव सोनवणे, भाऊसाहेब राजे, शिवाजी सोनवणे, दगा सोनवणे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, पंकज सोनवणे, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, शामकांत मराठे, डॉ. शेषराव पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्पर सेवेसाठी कटिबद्ध व्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

लोकांना उत्तम आणि तत्पर सेवेसाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेहमी कटिबद्ध असले पाहिजे, तेव्हा सुशासन दिन साजरा करण्याचे धाडस आपण करू शकतो, असे प्रतिपादन उपविभागीय प्रांताधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डी. गंगाथरण यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय कळवण, तहसील कार्यालय व पंचायत समिती कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुशासन दिनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आपण लोकसेवक आहोत याचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नये. जे काम आपल्या वाट्याला आले आहे, ते प्रामाणिक आणि निष्ठेने केले तरच एक नव्या भारताची सुरुवात आपण करू शकू. कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनी महसूल विभागाच्या योजना व तणावमुक्त काम याबाबत मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी स्वच्छ भारत अभियान, कृषी विभाग, सेवा हमी कायदा याबाबत माहिती दिली. सुशासन दिनाचे औचित्त्य साधून तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रवींद्र सपकाळे, विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी यांनीही अनुक्रमे आरोग्य सुविधा व माहिती अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.

सुशासनाचे दिले धडे

सटाणा : बागलाण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील टिळकरोडवर भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.

सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील, भाजपाचे नेते व मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, महेश देवरे, साहेबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपाचे शामकांत मराठे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, श्रीधर कोठावदे, रमेश देवरे, आण्णा अहिरे, पंकज सोनवणे, दिलीप खैरनार, संजय छाजेड, साहेबराव सोनवणे, बिंदुशेठ शर्मा, यशवंत येवला, शरद ततार, राजेंद्र पुरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळ निर्मूलन निश्चितच शक्य’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाई शासननिर्मित असून, शासनाचे दिशाहीन धोरण, जलनियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार आणि अनास्था हेच या भीषण परिस्थितीचे कारण आहे. कोणतेही सरकार आले तरी यात काही फरक पडत नाही, असे परखड मत जलसंधारणतज्ञ सुरेश खानापुरकर यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह होते. शिरपूर पॅटर्न या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जलसंधारण मॉडलचे जनक म्हणून सुरेश खानापुरकर ओळखले जातात. अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या शिरपूर तालुक्यात ही अभिनव योजना राबवून सुमारे ऐंशी टक्के शेती बागायती करण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शिरपूर पॅटर्न या विषयावरील व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील पर्जन्यमान, जमिनीची पोत, आतापर्यंत शासनाने राबविलेल्या योजनांचे अपयश आणि दुष्काळ यांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पाणीपुरवठा व जलसंधारण योजनांमुळे फक्त राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार श्रीमंत झाले. योग्य धोरणे राबवून एका वर्षात राज्य टँकरमुक्त करणे शक्य आहे. परंतु, हितसंबंधाच्या प्रभावामुळे आणि भ्रष्टाचारासाठी गावोगावी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सिंचनाबाबत शासनाची आकडेवारी दिशाभूल करणारी असून, प्रत्यक्षात चौदा टक्के जमीनही अद्याप सिंचनाखाली आलेली नाही. उगमापासून संगमापर्यंत जास्तीत जास्त पाणी अडविणे, पाणी मुरविणे, मृदासंधारण करणे आणि उपलब्ध पाण्याचा शहाणपणाने वापर करणे त्यास वनीकरणाची जोड देणे हे योग्यप्रकारे केल्यास दुष्काळ अत्यंत कमी खर्चात व कमी कालावधीत कायमस्वरूपी हटविणे शक्य आहे, हेच आम्ही शिरपूर पॅटर्नद्वारे दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

सुरुवातीला वाचनालयाचे सहकार्यवाह रविराज सोनार यांनी प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष अजय शाह यांच्या हस्ते खानापुरकर यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. जिज्ञासु श्रोत्यांच्या प्रश्नांना खानापुरकर यांनी तांत्रिक माहिती आणि आकडेवारीसह उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले. हे व्याख्यान राधाकिसन कल्याणमल अॅण्ड कंपनीने स्व. राधाकिसन रामविलास बडाळे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड कृउबासाठी १७६ अर्ज दाखल

$
0
0

मनमाड : मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जागांसाठी निवडणूक होत असून, शेवटच्या दिवशी १७६ अर्ज दाखल झाले आहेत. आता १३ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीतील १८ जागांपैकी सोसायटीच्या ११ जागांपैकी सात सर्वसाधारण जागांसाठी ६४, महिला राखीव दोन जागांसाठी ११, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी १३ व भटक्या विमुक्त जागेसाठी १४ तर ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन जागांसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आर्थिक दुर्बल घटक गट आठ, अनुसूचित जाती गटासाठी सात, व्यापारी गट दोन जागांसाठी २२, हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि. २८ डिसेंबरला छाननी व १३ जानेवारीला होणाऱ्या माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पॅनल निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीवासीयांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

टाकळी येथे महापालिकेने मलःनिसारण प्रकल्प उभारला आहे. त्याची क्षमता ७० मेट्रिक लिटर टन आहे. शेजारीच दुसऱ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याची क्षमता ४० मेट्रिक लिटर टन आहे. कंत्राटदाराचे दहा कामगार येथे काम करतात. एसपीएमएल कंपनी हा प्रकल्प ठेकेदारीवर चालवते.

शहराच्या मैल्याचा ताण उंटवाडी, मोरवाडी, भुजबळ फार्म येथील मलःनिसारण प्रकल्प बंद करून त्यांचा मैला टाकळी येथील प्रकल्पात सोडला जात आहे. सातपूरपासूनचा मैला येथे जमा होतो. त्यामुळे ताण वाढला आहे. मैल्यावर प्रक्रिया करून तो नदीत सोडला जातो. क्लोरिनेशनच्या एक, क्लॅरिफायरच्या दोन आणि प्युरिएशनच्या दोन प्लॅन्टद्वारा मैल्यावर प्रक्रिया केली जाते. खराब पाणी नदीत सोडले जाते तर राहिलेला मैला अन्यत्र हलविला जातो.

असह्य उग्र दर्प स्वच्छ हवा मिळावी म्हणून नागरिक या निसर्गरम्य रस्त्याने सायंकाळी फिरण्यासाठी जातात. परिसरात लोकवस्ती आहे. मलःनिसारण प्रकल्पातील विषारी वायू हवेत फैलावल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. जेलरोडपर्यंत हा उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांना वाचवा : ढगे नगरसेवक शैलेश ढगे 'मटा'शी बोलतांना सांगितले, की महासभा आणि स्थायी समितीत हा प्रश्न उपस्थित केला. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आर. के. पवार (अधीक्षक अभियंता मलनि:सारण केंद्रप्रमुख) आणि अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांची बैठक घेतली. प्रकल्पाचा ठेकेदार दोषी आढळला तर त्याला ब्लॅकलिस्ट करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

प्रयत्न सुरू : पवार अधीक्षक अभियंता (प्रकल्प) यू. बी. पवार म्हणाले, की मलःनिसारण प्रकल्पातून थंडीच्या दिवसात उग्र वास जास्त येतो. तक्रारी आल्यानंतर आम्ही रात्री व दिवसा या परिसरात फिरलो. नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा हिवाळ्यात रात्री जास्त त्रास होतो असे समजले. महापालिका यावर तातडीने उपाययोजना करत आहे. तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या भूखंडावर अनधिकृत मार्केट

$
0
0

अंबडगाव शिवारातील सर्व्हे नंबर ३०५/अ वरील लेआऊट मधील महापालिकेच्या भूखंडावर व्यावसायिकांनी कब्जा केलेला आहे. बाजारमूल्यानुसार सुमारे तीन कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडांवर अनधिकृत मार्केट बसविण्यात आले आहे. या भागात माणिकनगर, उपेंद्रनगर व महाजन नगर यांचा समावेश आहे. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक सोनवणे यांना बरोबर घेत महापालिकेच्या अतिक्रमण व सभापती कांचन पाटील यांच्याकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली केली आहे. रहिवाशांसाठी गार्डन, समाजमंदिर, वाचनालय किंवा मुलांना खेळण्यासाठी मैदान यासाठी मोकळा भूखंड आरक्षित केला होता. मात्र, तेथे एका महिलेने आपल्या मालकीची जागा असल्याचे भासवित अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्याच जागेवर अतिक्रमणधारकांकडून महापालिकेचे कर्मचारी २०-३० रुपयांची पावती फाडण्यात धन्यता मानत आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालत कोट्यवधी रुपयांच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नगरसेवक सोनवणे व परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

महापालिकेने माणिकनगर, उपेंद्रनगर व महाजन नगरमधील रहिवाशांसाठी मोकळ्या सोडलेल्या भूखंडावर मार्केटचे अतिक्रमण केल्याची तक्रार माणिकराव सोनवणे यांनी केले. याबाबत अतिक्रमण विभाग व सभापती पाटील यांना मार्केट हटविण्याबाबत निवेदन दिले आहे. महापालिकेच्या तीन कोटीच्या जागेवर मार्केटचे झालेले अतिक्रमण महापालिका दिसत नाही का, असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अल्फा’च्या कामगारांना वेतनवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड एमआयडीसीतील अल्फा इंजिनीअरिंग कंपनीत वेतनवाढ करार झाला. याचा ३०० कायमस्वरुपी कामगारांना लाभ होणार आहे. वेतनकरारानुसार कामगारांना सुमारे ७० हजार रुपयांचा फरक मिळणार आहे. वेतनकराराची घोषणा होताच कामगारांनी गुलाल उधळीत जल्लोष केला.

'अल्फा इंजिनीअरिंग'चे कंपनी व्यवस्थापन व सीटू युनियन यांच्यात समझोत होऊन वेतनकरार करण्यात आला. कंत्राटी पद्धतीने काम करत असतांना सन १९९८ पासून कामगारांनी सीटूचे सभासत्व स्वीकारलेले आहे. त्यात सर्वच कामगारांना सीटू'च्या पाठपुराव्यानंतर कायमस्वरूपी करण्यात आला. सध्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना सन २०१७ मध्ये कामयस्वरुपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.

वेतनकरार १ जून २०१७ पर्यंत आहे. यामध्ये कंपनी कायमस्वरूपी ३०० कामगारांना प्रत्येक पगारात ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. तसेच स्पेशल अलाऊंस, कुटुंबासह १ लाखाची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस म्हणून पूर्ण वेतन, दिवाळी

बक्षिस ३ हजार रुपये, किरकोळ रजा २१, अर्जित रजा १२, ७ आजारपणासाठी रजा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कंपनीत काम करणाऱ्या ३५० कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसारच वेतन दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका सर्कल येथे मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नसली तरी द्वारका सर्कलच्या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

द्वारका सर्कलच्या ठिकाणी वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर (एमएच ०४ एफ ९१८२) नाशिककडून धुळ्याकडे जात होता. या टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने महामार्गावरील बोलेरो (एमएच १७ व्ही ९०५४) या चारचाकी वाहनाला धडक दिली. पुढे जाणाऱ्या टँकरने डस्टर कारने (एम. एच. ४३ ए. आर. ५२९८) धडक देत वळण घेतले. त्याचवेळी महामार्गावर उभ्या असलेल्या चार चाकी मालगाडीला धडक देत टँकर बंद पडला. या अपघातात बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे टँकर लिक होऊन अनावस्था प्रसंग निर्माण होतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती.

मात्र, पोलिसांनी तातडीने या अपघाताची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे मात्र, सुमारे अर्धा तास वाहतुकीकोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची दखल घेत पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बाजारासाठी हट्ट

$
0
0

आमदार सानपांची शिष्टाई अयशस्वी; विक्रेते परतले रिकाम्या हाताने

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदाघाटावरील भाजीबाजार हायकोर्टाने अनधिकृत ठरविल्या नंतरही भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी या अनधिकृत बाजारासाठी थेट महापालिका आयुक्तांकडे हट्ट धरला. विशेष म्हणजे आमदारांच्या नेतृत्वात सकाळी या भाजीविक्रेत्यांनी गंगाघाटावर पुन्हा बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी आमदार सानप व भाजी विक्रेत्यांनी चर्चा केली असली तरी आयुक्तांनी थेट नकार दिल्याने आमदारांनाच खाली हात परतावे लागले.

सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदाघाटावरील भाजीबाजार हटविण्यात आला. संबंधित जागेसाठी महापालिकेने थेट हायकोर्टात लढाई जिंकत ही जागा भाजी विक्रेत्यांच्या ताब्यातून सोडवून आणली. महापालिकेने इथल्या भाजी विक्रेत्यासाठी नदीकाठावर नवी बाजार मंडई बांधली. मात्र, या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत या विक्रेत्यांनी सहभाग घेतला नाही. आता सिंहस्थ आटोपताच या विक्रेत्यांनी पुन्हा गोदाघाटावर बस्तान बसविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आमदार सानप यांनी पुढाकार घेतला असून हा हायकोर्टाने अनधिकृत ठरविलेला भाजीबाजारावर अतिक्रमणासाठी त्यांनी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी भाजीबाजार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याची कुणकुण महापालिकेला लागल्याने शुक्रवारी गोदाकाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. तर भाजी विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यासाठी महापालिकेच्या पाच गाड्याही तैनात करण्यात आल्या. पोलिस व महापालिकेच्या पथकाने आमदारांच्या आशीर्वादाने होणारे अतिक्रमण उधळून लावले.

रामकुंडावरील नाभिक आणि भाजीपाला व्यावसायिक तसेच पुरोहित बांधवांनी कुंभमेळ्यात मोठे सहकार्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यानंतर याच ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. परत आता या सर्वांना जागा मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.

- बाळासाहेब सानप,

आमदार, नाशिक पूर्व


अन् आमदारांचा झाला नाईलाज

अतिक्रमणाचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आमदार सानप यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. संबंधित जागा कोर्टाच्या आदेशानुसार देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी आमदारांना सांगितले. गणेशवाडीतील भाजीबाजारात शिल्लक गाळ्यांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मात्र, गोदाघाटावर अतिक्रमण करण्याचा हट्ट सानप यांनी कायम ठेवला. आयुक्तांनी मात्र त्याला असमर्थता दर्शवली. तर कोर्टात आम्ही पूर्ण अपील करू असे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही आश्वासनाशिवाय परतण्याची वेळ आमदारांवर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षी स्वच्छतागृहाची भेट

$
0
0

देवळाली कॅम्पमध्ये व्यापाऱ्यांकडून पुढाकार म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांकडून शहराची गरज ओळखून सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती केली जात आहे. नव्या वर्षात ही अनोखी भेट जनतेला उपलब्ध होणार आहे. झेंडा चौक समोरील नागझिरा नाल्यावर श्री गायत्री चेरीटी ट्रस्ट यांच्या सहकार्यातून देवळाली व्यापारी असोसिएशन हा उपक्रम करीत आहे.

व्यापाऱ्यांनी अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्याचा घेतलेल्या निर्णयाला कॅन्टोन्मेन्ट प्रशासनानेही दिरंगाई न करता हिरवा कंदील दाखविला. या कामाचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, उद्योगपती महाराज बिरमानी, कॅन्टोन्मेन्टचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भूमिपूजन झाले. यावेळी नगरसेवक भगवान कटारिया, आशा गोडसे, तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, संजय गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी शहरासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत असतात तरी देखील नागरिकांची अपेक्षापूर्ती होऊ शकत नाही हे सत्य असल्याने व्यापारी व दानशुरांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रकल्प उभारले जातात. यात देवळाली आघाडीवर आहे.

व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर, उपाध्यक्ष तीरथ वासवानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यकारी अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जुबीन शाह, संदीप गोडसे, शिनू जोस, धनंजय सावंत, असिफ मन्सुरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images