Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

$
0
0

सर्वात कमी तापमानाची नोंद

--

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व हिलस्टेशनवर मात करीत नाशिकमध्ये थंडीचा पारा सर्वात खाली घसरला. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककर गारठले असून, मंगळवारी ७.४ अंश सेल्सियसवर असणारा थंडीचा पारा आणखी घसरून ६ अंश सेल्सियसवर आला. सध्या राज्यातील सर्वात थंड ठिकाण म्हणून नाशिक अव्वल ठरले आहे. हुडहुडी भरविणारी ही थंडी ख्रिसमसनंतरच कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे म्हणून राज्याला सुपरिचित असली तरी यंदा या पर्यटनस्थळांपेक्षाही नाशिकमध्ये तापमानाने निचांक गाठला आहे. मंगळवारी देखील नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे ७.४ अंश से‌ल्सियस तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमान २८ अंश सेल्सियस होते. नाशिकनेच हा रेकॉर्ड तोडला असून, बुधवारी अवघ्या सहा अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही २७.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे नाशिक लगतच्या जळगाव जिल्ह्यात १० तर पुणे जिल्ह्यात ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. ख्रिसमस होईपर्यंत अशाच वातावरणाचा अनुभव नाशिककरांना येऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीमुळे सुर्योदयापूर्वीच धुके पडत असून, शेकोटी आणि जॉगिंगचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. उबदार कपडे परिधान करण्यास अबाल वृध्दांकडून प्राधान्य दिले जात आहे.

--

पाच दिवसातील तापमानाची नोंद

दिनांक किमान तापमान

१९ डिसेंबर ११.५

२० डिसेंबर १३.२

२१ डिसेंबर १३.०

२२ डिसेबंर ७.४

२३ डिसेंबर ६.०

--

गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद

दिनांक तापमान

७ जानेवारी २०११ ४.४

९ फेब्रुवारी २०१२ २.७

६ जानेवारी २०१३ ४.४

२९ डिसेंबर २०१४ ६.१

११ जानेवारी २०१५ ५.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक पिशव्यांचा वापर पडला महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांवर प्रतिबंद असतानाही अशा पिशव्यांचा शहरात वापर होत आहे. महापालिकेने अशा व्यापाऱ्यांवर वर्षभरात कारवाई करीत ७५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, हे हिमनगाचे टोक असून, हानिकारक पिशव्यांचा वापर पाहता महानगरपालिकेकडून नावापुरती कारवाई होत असल्याचे दिसून येते.

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास हानिकारक ठरतात. या पिशव्या लवकर नष्ट होत नाहीत. तसेच, नाला किंवा गटारीत पिशव्या अडकून बसल्या तर पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेकडून नियमितपणे करण्यात येते. तसेच, या पिशव्या वापरताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत आरोग्य विभागाने १३७ केसेस करीत ७५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. यात सर्वाधिक केसेस मे महिन्यात झाल्या. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी केसेस करीत महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ३३ हजार ७०० रुपयांचा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल केला. महापालिकेकडून कारवाईत सातत्य नसते. व्यापारी याचा फायद घेत सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. महापालिकेची कार्यपध्दती पाहता याविषयी नागरिकांमध्येही जागरूकता येण्याची गरज असून, नागरिकांनीच या पिशव्यांची मागणी न केल्यास हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात.

--

महिना - केसेस - दंड

एप्रिल - १५ - २५ हजार २००

मे- ४८ - ७ हजार ३००

जून - १८ - २ हजार ४००

जुलै - ४ - १ हजार ७००

ऑगस्ट - ३९ - ३३ हजार ७००

सप्टेंबर - ११ - २ हजार १००

ऑक्टोबर - १ - २ हजार

नोव्हेंबर - १ - २००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची पर्स लांबवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेकडील पर्स ओढून दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना मंगळवारी गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात घडली. शंकरनगर परिसरात राहणाऱ्या उषा विश्वास भानोसे (वय ५७) या दुपारच्या सुमारास शिशुविहार बालक मंदिर या शाळेतून घरी जात असताना सावरकरनगर येथील टकले ज्वेलर्सच्या पुढे येताच पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी भानोसे यांच्या खांद्यास अडकवलेली पर्स ओरबाडून पळ काढला. या पर्समध्ये मोबाइल, रोकड असा सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज होता.

प्रवासादरम्यान चोरी

बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडील ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये रंजना प्रकाश यादव (वय ४९) यांनी फिर्याद दिली. यादव सीबीएस येथून दिंडोरीकडे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी संशयित महिलेने यादव यांचे लक्ष विचलित करून त्यांच्याकडील ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

विद्यार्थ्यास मारहाण

किरकोळ कुरापत काढून चार संशयितांनी शाळकरी विद्यार्थ्यांस लोखंडी शस्त्राने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सम्राट हॉटेलसमोर घडली. पीडित विद्यार्थी एच. वाय. पाटील हा शाळेतून घरी जात असताना त्याला चौघा संशयितांनी अडवून कुरापत काढून चौघांनी मिळून मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग येथील तलाठी वसंत भीमराव चव्हाण यास दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. दोन दिवसापूर्वीच येथील भूमापकास अडीच हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

अजंग येथील तक्रारदार यांनी मालेगाव देना बँक येथून चार लाख वीस हजार रुपये पीककर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनीसंपूर्णपणे परतफेड देखील केली होती. शेतीच्या सातबाऱ्यावरील पीककर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी बँकेकडून दाखला देखील आणला होता. सदरचा दाखला तलाठी वसंत चव्हाण यांच्याकडे देऊन साताबाऱ्यावरील बोजा कमी करावा, अशी विनंती केली.

मात्र, तलाठी चव्हाण यांनी यासाठी ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने एसीबी नाशिक यांच्याकडे तक्रार दिली. एसीबीने बुधवारी सापळा रचून चार वाजेच्या सुमारास तलाठी चव्हाण यांना मालेगाव येथील रावळगाव नाका परिसरात तक्रारदाराकडून २०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटीएचएमच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या रोशनी मुर्तडक, शरयू पाटील, शिवानी देशमुख, सायली सूर्यवंशी या मुलींची भोपाळ येथे २५ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील शालेय तलवारबाजी स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर अमरावती येथील मोशीरोडच्या विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे.

या खेळाडूंची मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड झाली होती. आठ विभागांतून प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी पात्रता सिद्ध केली होती. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. बी. बी. शिंदे, प्रा. सुनील जाधव, प्रा. डी. एम. आहेर, प्रा. के. पी. लवांड व प्रा. बी. बी. पेखळे, शरद पाटील, सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनाक्षीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महाराष्ट्र राज्य क्रीडा युवा संचालनालय, पुणे यांच्या तर्फे शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सोनाक्षी शिंगाडे हिने प्रथम पारितोषिक पटकावले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५५ किलो वजनी गटात सोनाक्षीने हे यश संपादन केले. या यशाबद्दल मविप्रचे संचालक दिलीप पाटील, मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, उपमुख्याध्यापक पी. एस. कापडणीस, क्रीडा शिक्षक बी. एम. आहेर, जे. आर. काळे, मार्गदर्शक पृथ्वीराज वडघुले यांनी सोनाक्षीचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे आज पुरस्कार वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे दरवर्षी वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाही विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या पाच व्यक्तींना असा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आज, शुक्रवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सच्चिदानंद सद‌्गुरू श्रीराम महाराज बडवाह, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या हस्ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यातील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून, पुरस्कारार्थींमध्ये नाशिकमधील दोन समाजसेवींचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री गोडसे, बडोदा यांना वैदिक क्षेत्र, पुण्याचे रमाकांत परांजपे यांना संगीत क्षेत्र, नाशिकच्या मीना बापये यांना वैद्यकीय क्षेत्र, तर सोलापूरच्या अपर्णाताई रामतीर्थंकर, नाशिकच्या शैला उघाडे यांना समाजसेवेसाठी या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुण्याच्या षड्ज-पंचमतर्फे 'स्वतंत्रते भगवती' कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच प्रमुख संत, छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर अशा एकूणच ७०० वर्षांतील कालखंडात राष्ट्रातील मानसिक, सामाजिक जडण-घडण उलगडून दाखविणारा निवेदनात्मक गीतांचा समावेश असेल. अभिनेते शरद पोंक्षे, हेमंत बर्वे यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. कार्यक्रमाला समाजबांधवांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था समाज सहायक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड‌ीकॅथलॉनतर्फे ख्रिसमस सोहळ्याचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी येथील डीकॅथलॉन या स्पोर्टस् स्टोअरतर्फे डिसेंबर महिन्यात ख्रिसमस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील नामांकित ब्रँडस््च्या खेळांच्या साहित्यावर भरघोस डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच विविध खेळांच्या स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे.

डीकॅथलॉनतर्फे सुरू झालेल्या ख्रिसमस सोहळ्यात ग्राहकांना ‌विविध स्किम्सचा लाभ घेता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये २६ ते २८ डिसेंबरपर्यंत ख्रिसमस किड्स स्पोर्टस् कॅम्प, २५ डिसेंबर रोजी ड्यूएथलॉन, २७ डिसेंबर रोजी रीलॅक्स अँड बॅलन्स योगाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान ग्राहकांना क्रीडा साहित्यावर आकर्षक डिस्काऊंट देण्यात येणार असून, ग्राहकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिकेला लावणाऱ्या पालकांवर गुन्हे

$
0
0

कारवाईला गती देण्याचे पोलिसांचे संकेत; शहरातून तीस मुलांची सुटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे स्टेशन, सिग्नल, गंगाघाट, विविध मॉल्सच्या बाहेर केविलवाण्या चेहऱ्याने भीक मागणाऱ्या ३० मुलांची सुटका करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. एवढेच नव्हेतर मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त केले म्हणून चार पालकांविरोधात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिस, महिला व बालकल्याण विभाग तसेच चाइल्ड लाईन संस्थेच्या संयुक्त विद्यामाने हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत ० ते १४ वयोगटातील ३० मुलांची सुटका करण्यात आली. भीक मागणाऱ्या महिला व लहान मुलांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांनी नऊ पथके तैनात केली होती. यात, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला पोलिस कर्मचारी इत्यादींचा समावेश होता. या पथकाने सीबीएस, शालिमार, त्र्यंबक नाका, बिटको चौक, शरणपूररोड, शरणपूररोड पोलिस चौकी, गंगापूररोड तसेच शहरातील बहुतांशी वाहतूक सिग्नलवर तपासणी केली. त्र्यंबक नाका, सीबीएस, बिटको चौक, शरणपूररोड पोलिस चौकी व गंगाघाटावर भीक मागताना लहान मुले व महिला मोठ्या संख्येने आढळून आल्या. शहरातून ० ते ६ या वयोगटातील १६ तर ६ ते १४ वयोगटातील १४ मुलांना ताब्यात घेण्यात आले. या मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या चार पालकांविरोधात सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली तसेच उपनगर पोलिस स्टेशनमध्ये बाल न्याय अ​धिनियम २००० च्या कलम २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली. हा एक सामाजिक प्रश्न असून, पालकांच्या निष्काळजीपणामुळे कोवळ्या वयातील मुलांच्या हक्कांवर गदा येते. यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, अपहरण करून आणलेल्या मुलांचा भीक मागण्यासाठी वापर केला जातो काय याबाबत चौकशी सुरू असून, तसा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नसल्याचे उपायुक्त अंबिका यांनी स्पष्ट केले. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांची मेडिकल करून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ​देवेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले. संबंधित मुलांच्या पालकांचे समुपदेशन करून मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे व गणेश कानवडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमसंस्कारातून जिंकली मने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ. इंजिनीअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विल्होळी येथे विशेष श्रमसंस्कार शिब‌िर सुरू आहे. यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम घेवून तसेच श्रमदान करून ग्रामस्थांचे मन जिंकले. शिब‌िरात सहभागी विद्यार्थ्यांनी गावातर्फे सर्व सहकार्य मिळेल. त्यांच्या कल्पनांचा, शिक्षणाचा गावाला उपयोग व्हावा, असे मत विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

शिबिरात ग्रामस्वच्छता, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, महिला सबलीकरण,अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छ व स्वस्थ भारत यासंबंधी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी नानासाहेब गुरुळे यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर उपस्थित होते. शिबिरात जॉगिंग ट्रॅक परिसरात श्रमदान, पत्रक वाटप, गावातील जैन मंदिर परिसरातील गोशाळेत श्रमदान, रक्तदान शिब‌िर आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच लेक वाचवा, जलसंवर्धन, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शिबिरात आकाशवाणीचे निवेदक ऋषिकेश आयाचित म्हणाले, की आजच्या मार्केंटिंगच्या युगात संवादकौशल्यांची पकड महत्त्वाची आहे. लहानपणापासून वाणी शुद्धता अवगत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. डॉ. शेखर जोशी यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर, डॉ. पुरुषौत्तम पुरी यांनी आहार व योगा या विषयावर, डॉ. आदिती वाघमारे यांनी हास्ययोगावर, जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी स्पर्धा परीक्षा व अभियांत्रिकी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान याविषयावर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवीर यांनी स्वच्छतेतून सम्रुद्धीकडे या विषयावर व्याख्यान दिले. शिबिर समारोपप्रसंगी वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. नानासाहेब गुरुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतील नोकरीसाठी साडेसात लाखांची फसवणूक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील ओळखीचा फायदा घेऊन मुलीला कामाला लावून देणार असे खोटे आश्वासन देऊन तिघा महिलांनी तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेनमध्ये राहणाऱ्या हेमा धनजी चव्हाण (वय ५९) यांची मुलगी हर्षा हिस नोकरी पाहिजे होती. त्यासाठी हेमा यांनी संशयित हंसा लालजी मकवाना, मनीषा मकवाना आणि विजया मकवाना यांच्याशी ७ नोव्हेंबर २०१२ रोजी संपर्क साधला. सदर मुलीला नाशिक महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरी देऊ असे सांगत संशयितांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार चव्हाण यांनी मनीषा आणि विजया मकवाना यांच्याकडे जानेवारी २०१५ पर्यंत तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये दिले. तर, दोघा संशयितांनी वेगवेगळ्या कागदपत्रांवर चव्हाण यांच्या सह्या करून घेत नोकरी देण्यास टाळाटाळ केली.

वारंवार चालढकल होत असल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी पैसे मागितले असता तिन्ही महिलांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच, नोकरी देण्याबाबत हात वर केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तिघींविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. महापालिकेच्या नावाखाली झालेल्या लुबाडणुकीच्या प्रकारात आणखी संशयितांचा सहभाग आहे काय याचा सखोल तपास करण्याची मागणी केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी वेळ देणे क्वचितच शक्य होत असल्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यांना जबाबदारीची जाणीव करून दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येईल,' असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-पालखे यांनी केले. नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पाल्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन प. सा. नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमात शालेय स्तरापासून विविध मोठ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. जोशी-पालखे यांनी मार्गदर्शन करतांना वेळेचे बिघडते गणित मुलांकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाल्यास त्यांचा उत्साह वाढून पुढील अभ्यासासाठी मदतच होते. त्यामुळे असे समारंभ गरजेचे आहेत असेही त्यांनी

नमुद केले. जिल्हा सरकारी वकील आर. वाय. घोंगडे यांनी पाल्याच्या आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. चौफेर विकासासाठी व्यायाम, आहार व ध्यान आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले. इतर आमंत्रित पाहुण्यात दिवाणी न्यायाध‌ीश एस. झेड. पवार, वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, सहदिवाणी न्यायाधीश पठारे आदींनीही मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे यावेळी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन व पतसंस्थेचे अध्यक्ष अयुबखान पठाण यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालक वर्गाने परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारीसह फरार संशयित अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील कंचन शोरूम येथून सोमवारी रात्री सातच्या सुमारास टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने चोरी झालेली सफारी कार पोलिसांनी परत मिळवली. या प्रकरणी पोलिसांनी नांदुरमध्यमेश्वर येथील रवींद्र पांडूरंग पगारे यास ताब्यात घेतले. पगारेने नवी कोरी सफारी स्टोर्म ही कार चोरून नेल्यानंतर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

द्वारका परिसरातील शोरूममध्ये सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे वर्दळ होती. यावेळी पायी आलेल्या संशयित पगारेने शोरूममध्ये जाऊन सफारी गाडीची टेस्ट ड्राईव्हची मागणी केली होती. त्यानुसार शोरूमचे सेल्समन देवेंद्र पवार हे त्याच्यासोबत गेले होते.

विशेष म्हणजे एक मोबाइल क्रमांक वगळता इतर कोणतीही माहिती शोरूम व्यवस्थापनाने घेतली नाही. टेस्ट ड्राइव्हसाठी बाहेर गेलेली कार उड्डाणपुलावर जाताच संशयित पगारे याने पवार यांना चाकूचा धाक दाखवून गाडीतून उतरवून दिले व सफारी घेऊन तो मुंबईच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी शोध पथक

तयार करून अंधेरी, येवला, वैजापूर आदी ठिकाणी जाऊन वाहनाचा शोध घेतला. दरम्यान, पगारेने दिलेला नंबरची माहिती पोलिसांनी घेतली असता तो मुंबईतील एका व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. मूळचा निफाड येथील असलेला सदर व्यक्ती पगारेचा मित्र आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली.

पोलिसांचा शोध सुरू असताना मंगळवारी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे चोरी झालेली टाटा सफारी बेवारस स्थितीत आढळून आली. पोलिसांनी तब्बल ४८ तास थंडीच्या कडाक्यात साध्या वेषात सापळा रचून संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी सकाळपर्यंत वाहन घेण्यासाठी संशयित आला नाही. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता नांदुरमध्यमेश्वर येथील एका व्यक्तीने गाडी विकण्यासाठी आणल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी नांदुरमध्यमेश्‍वर येथे जाऊन संशयित पगारेला ताब्यात घेतले.

संशयित हा आठ महिन्यापूर्वी होमगार्डमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सिनीअर पीआय मधुकर कड, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोलिस नाईक सोमनाथ सातपुते, पोलिस कर्मचारी मिलिंद परदेशी, राजेंद्र काळोखे, कवि खराटे आदींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांसाठी आता ‘उद्योग सारथी’ संकल्पना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योगाची पायाभरणी करताना विविध विभागांचे परवाने कमीत कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे 'उद्योग सारथी' ही एक खिडकी संकल्पना नाशिक विभागात राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.

परवान्यांच्या कामातील किचकटता कमी होईल, असा आशावादही यावेळी डवले यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघू किंवा मध्यम स्वरुपाचा उद्योग सुरू करताना किंवा निर्मिती अथवा सेवा प्रकल्प सुरू करताना उद्योजकाला महावितरण, कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण कार्यालय, बाष्पके संचालनालय अशा अनेक प्रकारच्या कार्यालयांकडून विविध परवाने प्राप्त करवे लागतात. मात्र, ते मिळवताना प्रत्येक कार्यालयाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करावा लागतो. यात वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही किचकटता टाळण्यासाठीच 'उद्योग सारथी' ही एक खिडकी संकल्पना राबविण्यात येत आहे.

या समितीची कार्यकक्षा व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. समितीची बैठक महिन्यातून एकदा किंवा आवश्यकतेप्रमाणे अधिकवेळा होईल. उद्योजकाला यापुढे अनेक ठिकाणी अर्ज न करता एक खिडकीतच अर्ज द्यायचा आहे. सदस्य सचिव तो संबंधितांकडे पाठवून त्यावर कार्यवाही करतील.

उद्योग सारथी कक्षामार्फत द्यावयाच्या विविध सेवाही निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्योग, कामगार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, बँकिंग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर रचना, अन्न व औषध प्रशासन, कामगार विमा संचालनालय आदी विभागांच्या सेवांचा यात समावेश आहे.

अशी आहे समिती

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाचे प्रादेशिक अधिकारी किंवा क्षेत्र व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक अधिकारी, बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक, कामगार उपायुक्त, आरोग्य व औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, विशेष निमंत्रित असे या समितीचे सदस्य असतील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूप सौंदर्य !

$
0
0

प्रा. संध्या केळकर

चित्रातील भावपूर्ण रेषा जेंव्हा आकार म्हणजेच रूप धारण करतात तेंव्हा त्यात एक आशय निर्माण होतो. निर्गुण निराकार असलेल्या संकल्पनेला व भावनेला या आकाराच्या आधाराने वाट करून देऊन सगुण साकार केलेले असते. आशयाला अनुरूप आकार व माध्यम यांच्या आधारे चित्राच्या आकृतीबंधाची रचना होत असते. त्यातील आकाराचे एकमेकांशी असलेले नाते फार महत्वाचे असते.

आकारांची चित्रातील रचना किंवा शिल्पातील घनाकाराची मांडणी जर डोळ्यांना रुचणारी असेल तरच त्यात आस्था निर्माण होते. चित्र बघत असताना आपले लक्ष काही ठराविक आकारांकडे वेधले जाते. आणि नंतर त्या आकारांसोबत आलेले इतर आकार आपल्याला दिसतात. त्यात कलाकाराने आकारांची मांडणी एका विशिष्ठ विषयानुसार केलेली असते. त्यासाठी एखादा आकार मोठा दाखवून किंवा पोत (Texture) निर्माण करून हे साध्य केलेले असते. या साठी आपण अजिंठ्याचे यशोधरा,राहूल आणि गौतम बुद्ध या चित्राचे उदाहरण घेऊ. ह्या चित्रात अश्या प्रकारचे आकृतिबंध तयार केले आहेत. गौतमबुद्धाची प्रतिमा यशोधरा व राहुल यांच्या प्रतिमेपेक्षा खूपच मोठी दाखविली आहे. त्यात बुद्धाची अध्यात्मिक उंची दाखविण्यासाठी बुद्धाचा आकार खूप मोठा दाखविला आहे.

कोणताही आकार आपल्याला नुसत्या डोळ्यांनी त्रिमिती रुपात किंवा घनाकारात (लांबी, रुंदी, उंची) दिसतो. पण त्याच आकाराला कागदावर किंवा कॅन्व्हासवर उतरविताना चित्रकाराला त्या घनतेचा (Volume) म्हणजेच खोलीचा (Depth) आभास निर्माण करावा लागतो. तेंव्हा मूळ आकाराचे व्दिमितीय रूप तयार होते. चित्रात हे त्रिमिती रूपाचे व्दिमितीय रूप छायाभेदाने साध्य करता येते. म्हणूनच या त्रिमितीय आभासाला चित्रात खूपच महत्वाचे स्थान आहे.

चित्रामध्ये अनेक आकार असले तरी त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यातून चित्रविषय स्पष्ट होत असतो. चित्रामध्ये काही भाग उजळ आणि काही भाग गडद असतो. घन आकार दाखवण्यासाठी गडद रंगांचा वापर केला जातो आणि ॠण आकार दाखविण्यासाठी उजळ रंग वापरले जातात. काही वेळेला याच्या उलट म्हणजे घन आकार उजळ तर ॠण आकार गडद असू शकतात. चित्रकाराने त्या आकारांचा तोल इतका सुंदर साध्य केलेला असतो. त्यामुळे चित्राला एकात्मता प्राप्त होते. बघणारा त्या चित्राचा आनंद घेऊ शकतो.

इथे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आकार मांडणीत एखाद्या आकाराला महत्वाचे स्थान देणे. त्या स्थानाला अवधान बिंदू असे म्हणतात. तो चित्रचौकटीत फार महत्वाची भूमिका बजावतो. साधारणत: कोणत्याही चित्रात चित्र विषयाचा प्रमुख आकार अगदी मधोमध सहसा असत नाही. मध्यापासून थोडा दूर पण अगदी चित्रचौकटीच्या कोपऱ्यातहि नाही अशी रचना असते. त्या आकाराला अनुसरून इतर आकारांची रचना व रंगसंगती असते की जेणेकरून मुख्य आकाराला प्राधान्य मिळेल.

चित्र प्रदर्शनात अनेक प्रकारची चित्रे लावलेली असतात. त्यातील चित्रातून आपल्याला प्रत्येक चित्राची मांडणी म्हणजेच आकार मांडणीचे वैशिष्ट्य दिसून येते. त्यात खूपच विविधता असते. काही कलाकार निसर्गात जसे दिसून येते तसेच्या तसे चित्रात आभासमान करतात. त्या आकारांना नैसर्गिक आकार मांडणी म्हणतात. तर काही कलाकार निसर्गातील आकारांना त्याच्या आवडीनुसार वेगळे रूप देतात. त्यामध्ये अलंकारिक आकार, भौमितिक आकार येतात. यामध्ये आकार मांडणीत बदल असला तरी मूळ आकारांचे वैशिष्ट व त्याच्या गुणांची जपणूक केलेली असते. त्याप्रकारच्या चित्रांना अलंकारिक आकार मांडणी म्हणतात.

काही कलाकार पूर्णत: कल्पित आकारांची मांडणी करताना दिसतात. त्यात निसर्गात दिसणाऱ्या आकारांशी काहीही साधर्म्य नसते. चित्रांची मांडणी केवळ रंगांच्या माध्यमातून होत असते. बघणाऱ्याने त्यात काय दिसते ते शोधायचे असते. अश्या प्रकारच्या चित्रांना केवलाकारी (Abstract) चित्र म्हणतात. तर काही चित्रे त्रिकोण, चौकोन, गोल या सारख्या भौमितिक आकारांच्या मांडणीतून निर्माण झालेली असतात. त्यांना वस्तू सापेक्ष नसलेले आकार ( Non Objective Form) म्हणतात. तरीदेखील त्यात चित्रकाराचे विचार लक्षात येऊ शकतात.

ही आकारांची विविधता लक्षात घेतली तरच कोणतेही चित्र पाहताना त्या चित्राला आपण संपूर्ण न्याय देऊ शकतो. त्यातील आकार सौंदर्य लक्षात घेऊन चित्रकाराला काय सांगावयाचे आहे हे समजू शकतो. त्या चित्राचा भाव समजू शकतो. जो आकार निसर्गात दिसतो त्याला अतिशय सुंदर रीतीने चित्रकाराने चित्रात मांडलेला असतो. काहीवेळेला अगदी 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर' असेही घडताना दिसते. चित्रकाराला मिळालेली दैवी देणगीच हे करू जाणे. आकार सादृश्यतेतून निर्माण होणारा हा चित्रविषयक भाव म्हणजेच रूपसौंदर्य होय.

(लेखिका कला अभ्यासिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जामिनासाठी बनावट कागदपत्रांचा वापर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संशयिताच्या जामिनासाठी बनावट कागदपत्र सादर करून कोर्टाची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजेश मुलसंजीवन तिवारी आणि कृष्णा भाऊ जाधव अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. तिवारी चेतनानगर येथील तर जाधव इगतपुरी येथील रहिवाशी आहे. १७ डिसेंबर २०१४ पासून संगनमत करून दोघा संशयितांनी न्यायालयाची फसवणूक केली. तिवारी याच्या जामिनासाठी जाधव याने बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून जामीनदार झाला होता. मात्र, कागदपत्रांच्या छाननीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खुटवडनगर येथील दिलीप गोविंदा जाधव (वय ५५) यांनी दोघांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ट्रकसह दुचाकीची चोरी

शहरातील वेगवेगळ्या भागांमधून ट्रकसह तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. हनुमानवाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स समोरून रविवारी पहाटेच्या सुमारास एमएच १५ सीके ९२९९ क्रमांकाची ट्रक चोरीला गेला. या प्रकरणी राजीव गांधी भवनमागे राहणाऱ्या नीलेश मंगलचंद्र जैन यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. बोरगड म्हसरूळ येथे राहणाऱ्या शिवाजी पांडूरंग भोये यांची एमएच १५ डीआर ६३१९ क्रमाकांची दुचाकी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली. तर, देवळाली गावात राहणाऱ्या तुषार आनंद सांगोरे यांची एमएच १५ सीएच ६६२३ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. आणखी एका घटनेत नाशिकरोड परिसरातील परवेज सैयद यांची एमएच सीझेड ७६७२ क्रमांकाची दुचाकी रेजीमेंटल थिएटर येथून चोरीला गेल्याची नोंद उपनगर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

विवाहितेची आत्महत्या येवला तालुक्यातील मांजरवाडा येथील २२ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. सोनाली गणेश पवार, असे या विवाहितेचे नाव आहे. सोनाली यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांना येवल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वडाळा शिवारात घरफोडी घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने वडाळा शिवारातील शिवाई बंगल्याचा कडी कोयंड तोडून घरातील विविध गृहपयोगी वस्तू आणि बंगल्याच्या आवारात पार्क केलेली सॅन्‍ट्रो कार चोरून नेली. या प्रकरणी रमेश गोविंदराव भोईटे (वय ६६) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातील गॅस शेगडी, अॅक्वागार्ड, केनस्टार मिक्सर आणि घराबाहेरील एमएच १५ बीएन १८४ क्रमांकाची सॅन्ट्रो कार चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमीला पडतोय चावट नाटकांचा वेढा

$
0
0

नाशिक रंगभूमीवरही आता 'फक्त प्रौढांसाठी'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून एका 'तसल्या' नाटकाची बरीचशी चर्चा नाशिकच्या रंगकर्मींमध्ये जोर धरत होती. ही चावट नाटके येतात कशी व पाहिली जातातच कशी ही चर्चा असण्याबरोबरच नाशिकच्या रंगभूमीला ही नाटके नवीन नाहीत, रंगभूमीने काही बदल आत्मसात केले पाहिजे तरच प्रेक्षकांचा विकास होईल, अशी चर्चाही झडत आहे. 'एक चावट मधुचंद्र' या नाटकाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही चर्चा नाटकाचा हाऊसफुल्ल शो पाहून मात्र फिकी पडल्याचे चित्र होते.

खासगी आयुष्य आणि सार्वजनिक ठिकाणचे वर्तन यांच्यातला उरलासुरला भेद संपवण्याचे काम सध्याची बरीचशी नाटके करताना दिसत आहेत. आपण आपल्या आयुष्यात जे काही अत्यंत खासगीत अनुभवतो किंवा आपल्या चंचल मनोभूमीवर काही वेळा मनुष्य जे स्वैर उच्छृंखल खेळ खेळत असतो, ते आता वास्तवाला सामोरे जाण्याचा बेधडकपणा, भावनांचा निचरा म्हणून प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्याला प्रेक्षकांनी मान्यता दिली आहे, असा समज करून लेखक नाटके लिहू लागली आहेत. दिग्दर्शकही बिनधास्तपणे ती करण्यात धन्यता मानत आहेत. सध्या अशी अनेक नाटके येत आहेत. नाशिकच्या रंगभूमीवरही 'त्या' प्रकारची नाटके आता येऊ लागल्याने अनेक रसिक, प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 'एक चावट मधुचंद्र' हे नाटक त्यापैकीच एक आहे. परंतु, नाशिकला प्रौढांसाठी नाटक दाखविण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या नाटकांचा प्रवास 'गोलपिठा' पासून सुरू होतो. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' काव्यसंग्रहावर बेतलेले हे नाटक वारांगणा व्यवसायावर प्रकाश टाकणारे आहे. त्याची भाषा शिवराळ आहे. मला तुमची म्हणा, भोगसम्राट, अवध्य, जंगली कबुतर, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी, एक चावट संध्याकाळ, सिनेतारका बेगम शबाब, एक चावट मधुचंद्र अशी काही नाटके यापूर्वी नाशिकच्या रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांनी एक काळ गाजवलाही आहे. त्यामुळे प्रदीर्घ चर्चा झडल्याही आहेत. 'भडका' हे देखील नाटक यापैकीच एक होते. त्यात टब बाथमध्ये अंघोळ करणारी अभिनेत्री दाखविण्यात आली होती. खास या दृश्यासाठी नाटकाला जाणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. 'अवध्य' नाटकाची जाहिरातच मुळात 'वयात आलेल्या तरुणांसाठी वयात आलेले नाटक' अशी करण्यात येत होती. 'अहो मी

तुमची' या नाटकात तर १४ बलात्काराची दृश्ये काहीअंशी दाखवली होती.

सेन्सॉरकडून परवानगी मिळते कशी?

चावट नाटकांना सेन्सॉरची परवानगी मिळते कशी हा मोठा प्रश्न आहे. परंतु, सेन्सॉरला सादर केलेली स्क्रिप्ट व प्रत्यक्षात दाखविण्यात येणारे नाटक यात जमीन आसमानचा फरक अनेक नाटकांमध्ये दिसतो. अनेक लेखक, दिग्दर्शक नाटकात बरीचशी तफावत ठेवतात. 'तसल्या' काही नाटकांना मात्र सेन्सॉर 'ए' ग्रेडचाच दर्जा देत‌े. आता सादर होणारे 'एक चावट मधुचंद्र' नाटक 'ए' ग्रेडच आहे. परंतु, आबंटशौकीन प्रेक्षकाला या सर्वांशी काही देणेघेणे नसते तर त्याला काही पहायला मिळणार म्हटल्यावर तो नाटकांना आवर्जुन येतो.

मराठी नाटकात तरी ब्लॅकआऊट करून काही दृश्ये दाखविण्यात येतात मात्र इंग्रजी रंगभूमी तर यापेक्षा पुढारलेली असून, तेथे अशा सीनला अजिबातही धरबंध नसतो. आता आपल्या रंगभूमीमध्ये तशीच नाटके येऊ घातली आहेत. 'सखाराम बाईंडर' आल्यावर ते पाहणे चूक नाही व अशी नाटके आल्यावर ती पाहणेही गैर नाही. प्रेक्षकांनी आता काही बदल स्वीकारलेच पाहिजे.

- एक ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाखा स्थलांतरावरून पिंगळे-चुंभळे भिडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसरूळ शाखा स्थलांतरावरून माजी खासदार देवीदास पिंगळे आणि संचालक शिवाजी चुंभळे यांच्यात पुन्हा शीतयुद्ध पेटले आहे. संबंधित शाखा ही देविदास पिंगळेंच्या नातेवाईकांच्या जागेवर असल्यानेच ती हलविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर स्थानिकांनी विरोध केल्यानंतर म्हसरूळ विविध कार्यकारी सोसायटीने मात्र या स्थलांतरास पाठिंबा दर्शविला आहे. सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेला शाखा स्थलांतर करण्याचे पत्र दिले असून स्थलांतर आता अटळ आहे.

म्हसरुळ शाखा स्थलांतर करण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेकडून सुरू आहे. मात्र संबंधित जागेवरून ही शाखा स्थलांतर करण्यास म्हसरुळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी व सभासदांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा बँकेची म्हसरुळ शाखा आजमितीस ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवणे शेतकऱ्यांसाठी हितावह आहे. तसेच नवीन ठिकाणी शाखा स्थलांतरित केल्यास अंदाजे ५० लाख खर्च येणार असल्याचा दावा केला होता. बँकेचे स्थलांतर करावयाचे असेलच तर म्हसरुळ गावांतील म्हसरुळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जागेमध्ये बँकेचे स्थलांतर करावे जेणेकरून शेतकरी बांधवांना बँकेत असलेला कष्टाचा पैसा असा वायफळ जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून बँकेची म्हसरुळ शाखा आहे त्याच ठिकाणी किंवा वि. का. सोसायटीच्या जागेत स्थलांतर करावी अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून बँकेत उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे.

याच सोसायटीचे चेअरमन साहेबराव मोराडे, व्हा. चेअरमन भागावत पगारे यांच्यासह काही सभासदांनी गुरूवारी जिल्हा बँकेला पत्र देवून स्थलांतराला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. म्हसरूळ सोसायटीत जागा नसल्याने आम्ही जागा देवू शकत नाही असे सांगून सध्याची जागा ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीची नसल्याने स्थलांतर करण्यात यावी, असेही त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच यापूर्वी सोसायटीच्या नावाने दिलेल्या तक्रार अर्जाशी सोसायटीचा संबंध नसल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
पिंगळे-चुंबळे वाद कारणीभूत

सध्या देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्यात विस्तवही जात नाही. एकमेकांना शहकाटशह दिला जात आहे. आता यातून ही शाखाही सुटली नाही. संबंधित शाखा देविदास पिंगळेंच्या नातेवाईकांच्या जागेवर असल्याचा आरोप शिवाजी चुंबळे यांनी केला आहे. त्यामुळे ही जागा सोडून शाखा नव्या जागेत स्थलातंरीत करण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा बँक वर्तुळात आहे. एकमेकांना शह देण्याच्या नादात मात्र शाखेचा बळी जायला नको अशी चर्चा सध्या सुरू आहे.

..कोट..

बँकेच्या अगोदरची शाखेची जागा शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची होती. तसेच त्या जागेसाठी जादा भाडे द्यावे लागत होते. शेतकऱ्यांच्या सूचना आल्यानंतर संबंधित शाखा मुख्य रस्त्यावर आणि कमी भाडे देऊन आणली आहे.

- शिवाजी चुंबळे, संचालक, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेची बैठक सकारात्मक

$
0
0

नाशिक : ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) गुरुवारी बैठक झाली. पर्यायी आणि इमर्जन्सी लँडिंगसेवा सुरू करण्याचा गो-एअर या विमान कंपनीचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव कंपनीने एचएएल प्रशासनाला काही महिन्यांपूर्वीच दिला आहे. त्यावर एचएएलने अंतिम निर्णय न घेतल्याने गुरुवारी बैठक झाली. त्यास खासदार हेमंत गोडसे यांच्यासह गो-एअर कंपनी आणि एचएएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. धावपट्टी उपलब्ध नसल्याच्या कारणाने मुंबई विमानतळावर बहुतांशवेळा विमानांना लँडिंगसाठी सिग्नल मिळत नाही. त्यामुळे ही विमाने अरबी समुद्र परिसरात घिरट्या घालतात. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई विमानतळापासून नजिक असलेल्या ओझर विमानतळाची उपलब्धता पर्यायी म्हणून झाल्यास अधिक प्रभावी होणार आहे. म्हणून मुंबईला पर्यायी आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी ओझर येथे परवानगी मिळावी, अशी गो-एअरची मागणी आहे. सद्यस्थितीत ओझर विमानतळ आणि पॅसेंजर टर्मिनल सज्ज असले तरी त्याचा वापर नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहम्मद पैगंबरांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोडला अन्नदान, चित्ररथांची मिरवणूक आदी कार्यक्रम उत्साहात झाले. मोहम्मदिया सोशल ग्रुपतर्फे अन्नदान करण्यात आले.

मिरवणुकीत अंजुमन ए मोहम्मदिया मदरशाच्या विद्यार्थ्यांनी फलकाद्वारे दहशतवाद आणि स्त्री भ्रूण हत्याविरोधी तसेच 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' असा संदेश दिला. मिरवणुकीत हिंद सोशल ग्रुप, रहेबर सोशल ग्रुप, मदिना सोशल ग्रुप, आयएसपी-सीएनपी प्रेस, मसजिद ए हनफिया नौजवान मुस्लिम कमिटी, गुलाम ए नबी ग्रुप, संजेरी सरकार फ्रेण्ड सर्कल, अंजुमन ए अशरफिया सोशल ग्रुप, रजा फ्रेण्डस सर्कल, गरीब नवाज ग्रुप, मीरा दातार संस्था, नाशिकरोड जुलूस कमिटी, केजीएन ग्रुप, दोम दोम शांदवलशाह सोशल संस्था आदी मंडळाचा सहभाग घेतला.

गोसावीवाडीतून सुरू झालेली मिरवणूक आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको, दुर्गा उद्यान, विहीतगावमार्गे देवळालीगावातील गाडेकर मळा येथे आली. तेथे मार्गदर्शनपर सभा झाली. देवळालीगाव मशिदीचे इमाम हजरत आमीर मिसबाह यांचे प्रवचन झाले. मौलाना हारुन रशिद, मौलाना अख्तर, मौलाना जफर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकरोडच्या मशिदीतील मौलानांचा सत्कार करण्यात आला. मोहम्मदिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष इमरान खान, सचिव इम्तियाज सैय्यद, शेर खान, इमरान शेख, अमजद शेख, मोसिन शेख आदींनी संयोजन केले.

देवळाली कॅम्पला रोषणाई

देवळाली कॅम्पमधील चौकाचौकात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रोषणाई व आकर्षक देखावे करण्यात आले. जुन्या बसस्थानक आवारात उभारलेला देखावा मुख्य आकर्षण बिंदू होता. मुख्य मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. दुपारी तीनला शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

हिंदुस्तान झिंदाबादचा नारा

जुने नाशिक : 'हिंदुस्तान झिंदाबाद, आतंकवाद मुर्दाबाद'च्या घोषणा देत गुरुवारी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस-ए-मेहम्मदिया काढण्यात आला. तत्पुर्वी, मुस्लिम धर्मगुरुंनी देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुवा करत देशावरील सर्व संकटे नष्ट होऊन देशातील विविधता, एकता व अखंडता कायम रहावी अशी प्रार्थना केली.

जहाँगीर मशिद चौकातून हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूस काढण्यात आला. तत्पूर्वी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपायुक्त एन. अंबिका यांनी पोलिस प्रशासनातर्फे मुस्लिम धर्मगुरुंचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. ठिकठिकाणी जुलूसचे गुलाबपाणी शिंपडून स्वागत झाले. जुलुसच्या अग्रभागी हातात इस्लामी ध्वज घेतलेले अरबी वेशातील घोडेस्वार, सजावट केलेली वाहने होती.



सर्वधर्म समभावाचे दर्शन

देवळाली कॅम्प : जुन्या बस स्थानकावर नाशिकच्या प्रसिध्द हजरत सादिक शाह (हुसैन) यांच्या दरगाहची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली तर छावा संघटनेच्या ब्लॅक बॉईज मंडळाने मलेशियातील जहीर अलोर मस्जिदची प्रतिकृती साकारण्यात आली. देवळालीत सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यात अनेक चित्र रथ सहभागी झाले. उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक भगवान कटारिया, भाऊसाहेब धिवरे यांनी मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले. मिरवणुकीत मशीद कमिटीचे ट्रस्टी अफजलखान जुम्माखान, इम्रान शेख, वासिम कुरेशी, नसीर सैय्यद, शमशुद्दीन पीरजादा, निसार खान, फारुख खान, आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images