Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जनता भुजबळांच्याच पाठिशी

$
0
0
आपले हित, अहित कशात आहे हे, जनतेला चांगले कळते. त्यामुळे येत्या नाशिक लोकसभा निवडणुकीत कुणाला विजयी करावयाचे, याचा निर्णय जनता जनार्दनच घेईल. कोण विकास करतोय, कोण फक्त गप्पा मारतोय, कोण फक्त आश्वासने देतोय, हेही जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ज्यांची जात आणि धर्म विकास आहे, अशा छगन भुजबळांच्या पाठिशी जनता राहिल, असा विश्वास वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमधील पोलिस असुरक्षित

$
0
0
कायदा आ​णि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अनेकदा कारवाई करावी लागते, मात्र नियम किंवा कायद्याचे पालन करण्याऐवजी पोलिसांनाच मारहाण करण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. वाहतूक पोलिस तसेच पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलिस हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

पाणी कापणाऱ्यांची मस्ती जिरवा

$
0
0
घोटाळ्यांमधून कमावलेला पैसा आणि गुंडागर्दी यांच्या मदतीने निवडणुका जिंकण्याची काँग्रेस आघाडीची रित आहे. या आधारेच आता ते गोरगरीबांचे पाणी तोडण्याची भाषा करीत असून त्यांची मस्ती या निवडणुकीत सर्वसामान्य जनताच ​जिरवणार, अशी टीका शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

महागाईसोबत उत्पन्नही वाढले!

$
0
0
गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना ‘महागाई वाढली असली तरी लोकांचे उत्पन्नही वाढले आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राष्ट्रवादीचे नाशिकचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ जुन्या नाशिकमध्ये आयोजित सभेत बोलताना मलिक यांनी हा अजब युक्तीवाद केला.

उत्सुकता राज ठाकरेंच्या सभेची

$
0
0
‘माझ्या १९ तारखेच्या सभेला या, बघा कसा टराटरा फाडतो’, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना इशारा दिल्याने नाशिकसह राज्याचे लक्ष राज यांच्या आजच्या(शनिवार) सभेकडे लागले आहे.

उपनिरीक्षक पांडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

$
0
0
रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक अनिल नथु पांडव (४६) यांच्यावर शनिवारी जेलरोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देत साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे सहकारी, नागरिक व आप्तेष्ट उपस्थित होते.

मतदानासाठी मतदार यादीत नाव हवेच!

$
0
0
मतदार यादीत नाव नसले तरी अन्य पुरावे दाखवून मतदान करता येईल, अशा प्रकारचे संदेश व्हॉट्स अप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटसवरुन फिरत असले तरी ते बनावट असून मतदार यादीत नाव असलेल्यांनाच मतदान करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विकासात्मक लेखाजोखा

$
0
0
सत्ताधाऱ्यांकडून आपण नेमकी कोणती कामे केली हे पटवून देण्यासाठी पक्षपातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे को-ऑपरेटिव्ह सेलचे राज्यप्रमुख विश्वास ठाकूर यांनी मात्र एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे. आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात कोणती कामे केली याचा लेखाजोखाच त्यांनी माहितीपुस्तिकेच्या स्वरुपात जनतेसमोर मांडला आहे.

अजित पवार आज नाशिकमध्ये

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज(रविवार) नाशिक दौऱ्यावर आहेत. आपल्या एकदिवसीय नाशिक दौऱ्यात ते गिरणारे, भगूरसह लेखानगर परिसरात प्रचारसभा घेणार आहेत.

शक्ती प्रदर्शनासाठी सरसावली सेना

$
0
0
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला शिवसैनिकांनी प्रंचड प्रतिसाद दिला. शिवसैनिकांमधील हा उत्साह पुढील तीन ते चार दिवस टिकवून धरण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून, त्या अनुषगांने प्रचारनीती आखण्यात आली आहे. यासाठी विविध नेत्यांच्या सभा आणि रोडशोच्या आयोजनावर सेनेने भर दिला आहे.

मतदान चिठ्ठी नाही मिळाली? फोन करा

$
0
0
बुथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) कडून मतदान चिठ्ठी वाटप सुरू झाले असले तरी ज्यांना अद्याप चिठ्ठी मिळालेली नाही त्यांना मतदार हेल्पलाइनला फोन करून संबंधित बीएलओचा संपर्क क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीची घरी वाट पाहण्याऐवजी थेट बीएलओला गाठून ही चिठ्ठी प्राप्त करता येणार आहे.

उमेदवाराच्या घराजवळ गोंधळ घालणारा ताब्यात

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या घराजवळ गोंधळ घालून प्रचारकार्यात अडथळा आणणाऱ्याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपीचा उद्देश जाणून घेण्यासाठी त्याची सखोल चौकशी करा, असे निवेदन पाटील यांनी पोलिस तसेच निवडणूक आयोगाला दिले आहे.

नाशिक-पुणे मार्गावर अपघातात तीन ठार

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात हॉटेल अतुलजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये सिन्नर मनसेचे तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांचा समावेश असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.

आधी देशाला काँग्रेसमुक्त करा

$
0
0
देशातली गरीबी सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र असून, देशाला जर गरीबीतून मुक्त करायचे असेल तर पहिल्यांदा काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करावे लागेल. गरीबांच्या नावाने योजना आणायच्या, त्या कधीही गरीबापर्यंत पोहचू द्यायच्या नाहीत. यांचे चेले-चपाटे सगळ्या योजना खाऊन टाकतात. ते श्रीमंत होतात अन् देशाला गरीब ठेवतात, असा घणाघाती आरोप करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शेवटचा रविवार होणार ‘इन्कॅश’

$
0
0
बहुतांश नागरिक रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घरी असल्यामुळे या दिवशी सर्वच पक्ष आपापला उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचावे म्हणून धडपडत असतात. साहजिकच त्यामुळे रविवारच्या दिवशी प्रचाराचा वेग वाढतो. त्यातच राज्यात तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २४ एप्रिलला होणार असल्याने प्रचारासाठी आज, शेवटचा रविवारच उमेदवारांच्या हाती आहे.

गुजराती मतांसाठी खटाटोप!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस बाकी असल्याने प्रमुख पक्षांकडून मतांच्या मोर्चेबांधणीने वेग धरला आहे. यात प्रमुख संघटना, संस्था व समाजाची मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, यात गुजराती बांधवांचाही समावेश आहे.

मोदी आज `थ्रीडी`च्या रूपात

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे उत्सुकता सर्वांना होती. मात्र, व्यस्त कार्यक्रमामुळे नाशिक जिल्ह्यात त्यांची सभा पार पडली नाही. यावर पर्याय महायुतीने चक्क थ्री डी सभेचे आयोजन केले आहे.

मोदी पाणी पळवणार नाहीत!: मुंडे

$
0
0
नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे पाणी पळवणार नाहीत. मोदी प्रधानमंत्री झाले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी करून, नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण तर धुळ्यातून डॉ. भामरे यांना विजयी करा, असे आवाहन केले.

दोन हायवे प्रकल्प अडचणीत

$
0
0
अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात सीमा (एनएच ६) या खान्देशातील दोन रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्पांमधून एल अँड टी कंपनीने काढता पाय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे तब्बल एकूण साडेचार हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून हे रुंदीकरण पूर्ण होण्याला आणखी किती काळ लागेल, याबाबत संभ्रमावस्थाच आहे.

‘शिवसेनेला भुजबळ कसे चालतात?’

$
0
0
मी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगणा-यांना बाळासाहेबांची टिंगल करणारे, त्यांच्यावर केसेस टाकणारे, त्यांना अटक करणारे छगन भुजबळ कसे चालतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images