त्रिपुरासारख्या दुर्गम राज्यालाही स्थलांतराच्या स्थितीतून आम्ही स्थैर्य मिळवून दिले आहे. त्रिपुरातील प्रत्येक माणसाला पुरेसा रोजगार आणि आदिवासींसाठी वनहक्क कायद्याची ९९ टक्के अंमलबजावणी करत आम्हीच खरा विकास साधला आहे. गुजरातचा विकास केवळ भांडवलदारांचा देखावा आहे. मोदी हे भांडवलदारांचे प्यादे आहे, असा प्रहार त्रिपुराचे मंत्री जितेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.
गुजरातच्या तुलनेत त्रिपुरा वरचढच
↧
↧
...त्यांनी मला आव्हान देऊ नये!
ज्यांना बापजाद्यांच्या जिवावर पक्षाची विरासत मिळाली आहे, त्यांनी मला निवडणूक लढविण्याचे आव्हान देवू नये. कारण, मी चौदा वेळा निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून गेलो आहे. तुम्ही एकदा तरी निवडणूक लढवून जिंकून दाखवा आणि मग मला आव्हान द्या, असे प्रत्युत्तर केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.
↧
... आता निघाले दिल्ली लुटायला!
राज्यातील विविध भूखंडांपासून स्वतःच्या उद्योगात भ्रष्टाचाराद्वारे भुजबळांनी गडगंज संपत्ती कमावली आहे. आजवर त्यांनी महाराष्ट्र लुटला असून, आता ते दिल्ली लुटायला निघाल्याची टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांना लक्ष्य केले.
↧
कार अपघाताच तिघे ठार
कळवण शहरपासून अभोणा रस्त्यावरील कळमथे फाट्यानजीक मोरी पुलावरून वॅगण कार पन्नास फूट खाली कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
↧
प्रचार फेरी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामुळे गोरगरीबांनाही ‘किंमत’ मिळू लागली आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक घरेलू काम करणाऱ्या महिला अचानक आजारी पडल्या आहेत.
↧
↧
मुसळगावच्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. चित्रा उर्फ शोभा सुकदेव शिंदे (वय ३०) रा. मुसळगाव, या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
↧
भालेराव अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचे आगीत २.५ कोटींचे नुकसान
निफाड तालुक्यातील कोठुरे शिवारातील भालेराव अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील कोठुरे येथील शिवाजी भालेराव यांच्या मालकीची ही इंडस्ट्री आहे.
↧
लाडक्या बडीसाठी केले जीवाचे रान
मधमाशांनी हल्ला केल्याने जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या आपल्या लाडक्या बडी या कुत्र्याची रात्रंदिवस सुश्रुषा करून त्याला मरणाच्या दारातून सहीसलामत बाहेर आणण्याचे काम येथील ह्रदयरोग विशारद डॉ. संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
↧
अत्यावश्यक सेवेच्या कक्षाला ‘उष्माघाताचे’ कोंदण
परिसरात उष्णतेच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकांना वाढत्या उन्हाचा त्रास होत आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या रुममध्येच बंद पडलेले कुलर ठेवून तात्पुरती सोय केली आहे.
↧
↧
शिरपूर पॅटर्न देखावाच
काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरीश पटेल यांच्या शिरपूर पॅटर्नची भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुंनगुट्टीवार यांनी चिरफाड केली. शिरपूर पॅटर्न म्हणजे जनतेला उल्लू बनवण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
↧
शिरपूर पॅटर्न अन् मराठा फॅक्टरवर मदार
धुळे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २४ एप्रिलला मतदान होत आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदारसंघात एकोणावीस उमेदवार नशीब आजमावत असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरीश पटेल आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात काँटे की टक्कर होत असल्याचे दिसून येते.
↧
काँग्रेसचे प्रचार कार्यालय बनले वादग्रस्त ठिकाण
दोन माजी आमदारांच्या खडाजंगीनंतर सटाणा शहरातील काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय आता रोजच्या भांडणांनी चकमकीचे ठिकाण बनले असल्याची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
↧
जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून रविवारी जिल्ह्यात काही भागात पाऊस व गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांची धावपळ झाली. गारपिटीमुळे सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात बुधवारी बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला होता.
↧
↧
महिला उद्योग केंद्र उद्योगाविनाच
निलकंठेश्वर नगर शेजारील महिला उद्योग केंद्र आजतागायत उद्योगाविनाच आहे. त्यातच दहा वर्षांहून अधिक काळापासून महिला उद्योग केंद्राची वास्तू पडून असल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.
↧
घराचे स्वप्न झाले दुरापास्त
सिडको व सातपूरसारख्या कामगार वस्तींमध्ये इमारतींचे काम जोरात सुरू आहे. परंतु, इमारतींमधील फ्लॅट मात्र कामगारांच्या बजेटच्या बाहेर गेले आहेत. यात सरकारच्या विविध करांमुळे घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.
↧
आमीर खानच्या फोनद्वारे मतदारांमध्ये जनजागृती
मतदारांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता आपल्या उमेदवारांची माहिती जाणून स्वयंस्फूर्तीने मतदान करावे, असे आवाहन सिने अभिनेता आमीर खान यांच्याकडून फोनद्वारे केले जात आहे. मतदारांना ७१६२७१ या कॉल सेंटरहून कॉल येत असून तो रेकॉर्डेड आहे.
↧
वीज कोसळून बैलजोडी ठार
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर अजूनही थांबलेला नाही. रविवारी मालेगाव, निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. बागलाण तालुक्यातील मोसम आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी पावसासह गारपिटीने पुन्हा थैमान घातले. तवळवाडे दिगर येथे वीज कोसळून बैलजोडी ठार झाली.
↧
↧
शहरात दोघांच्या आत्महत्या
शहरातील विविध भागांमध्ये तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. उपनगर येथील त्रिमूर्ती चौकात राहणारे सचिन मोहन कानडे (३२) यांनी घरामध्ये विषारी औषध सेवन केले. त्यांना औषधोपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
↧
‘बारूं’च्या पुस्तकाचे नाशिकला वावडे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या ‘कोब्रा स्टिंग’ला काऊंटर पार्ट म्हणून संजय बारू यांच्या ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर, द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ पुस्तकाने दिल्ली आणि देशभरात मोठा धमाका केला असताना नाशिकला मात्र या पुस्तकाचे प्रचंड वावडे आहे.
↧
पंचवटीत मायलेकींसह तिघांची आत्महत्या ?
पंचवटीतील मेहेरधाम परिसरातील एका सोसायटीत मायलेकींसह तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहांजवळ पोलिसांना विषाची बाटली सापडल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
↧
More Pages to Explore .....