मटा गाइड - व्याघ्रगणना -- राज्यनिहाय व्याघ्र संख्या राज्य....२००६....२०१०...२०१४....२०१८ उत्तराखंड....१७८,....२२७....३४०.......४४२ उत्तर प्रदेश.....१०९.....११८....११७........१७३ बिहार....१०....८....२८......३१ आंध्रप्रदेश....९५....७२....६८........४८ तेलंगाणा......--......--....--.....२६ छत्तीसगड....२६....२६....४६........१९ मध्यप्रदेश....३००....२५७....३०८.......५२६ महाराष्ट्र....१०३....१६९....१९०....३१२ ओडिसा....४५....३२....२८........२८ राजस्थान....३२....३६....४५........६९ झारखंड....--....१०....३........५ कर्नाटक....२९०....३००....४०६........५२४ केरळ....४६....७१....३६.....१९० तामिळनाडू....७६....१६३....२२९.........२६४ गोवा....--....--....५......३ आसाम....७०....१४३....१६७.......१९० अरुणाचल प्रदेश....१४....००....२८.......२९ मिझोरम....६....५....३..........० उत्तर पश्चिम बंगाल....१०....--.....३.....० एकूण....१४११....१७०६....२२२६.......२९६७ -- कुठे किती वाघ? प्रदेश......२००६..........२०१०.....२०१४....२०१८ शिवालिक पर्वत आणि गंगेचा प्रदेश....२९७....३५३.....४८५.....६४६ मध्य भारत आणि पूर्व घाट....६०१.....६०१.....६८८....१०३३ पश्चिम घाट.....४०२......५३४.....७७६....९८१ ईशान्य आणि ब्रह्मपुत्रेचा प्रदेश....१००....१४८.....२०१......२१९ -- येथे घटले वाघ छत्तीसगड राज्यात २०१४ मध्ये ४६ वाघ होते. २०१८ मध्ये त्यात घट झाली असून आता तेथे १९ वाघ शिल्लक आहेत. गोव्यामध्ये गेल्या गणनेत ५ वाघ आढळले होते. तर गेल्या वर्षी तेथे केवळ तीनच वाघ आढळून आले. मिझोरममध्ये गेल्या गणनेत ३ वाघ दिसले होते. यंदा तेथे एकाही वाघाची नोंद झालेली नाही. उत्तर पश्चिम बंगाल क्षेत्रातही गेल्यावेळी ३ वाघ दिसले होते. यंदा तेथे एकही वाघ आढळून आलेला नाही. -- देशातील व्याघ्र प्रकल्प देशात एकूण ६० व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात संवेदनशील क्षेत्र ४०१४५ वर्ग किलोमीटर, तर बफर झोन ३२६०३ वर्ग किलोमीटर असा एकूण ७२७४९ वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्र राखीव आहे. १९७३-७४ मध्ये व्याघ्र संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्प साकारण्याची घोषणा झाली. त्याच वर्षी एकूण ९ ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले. २०१६ मध्ये ओरंग (आसाम) आणि कमलांग (अरुणाचल प्रदेश) हे व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले. -- महाराष्ट्र चौथा महाराष्ट्रात एकूण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधारी यांचा समावेश आहे. व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राचा नंबर चौथा आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक ५२६, कर्नाटकात ५२४ आणि उत्तराखंडमध्ये ४४२ वाघांची नोंद झाली आहे. -- गणनेत यांचा सहभाग राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डेहराडून), राज्य सरकारांचे वनविभाग, वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली), युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलिअम अँड एनर्जी स्टडिज् (डेहराडून), रिसर्च बायोलॉजिस्ट, प्राधिकरणाचे माजी अधिकारी, व्याघ्र तज्ज्ञ. अशी झाली गणना ३,८१,४०० वर्ग किलोमीटर एवढे वनक्षेत्र गणनेसाठी निवडण्यात आले. ५,२२,९९६ किलोमीटर क्षेत्रावर पायाच्या ठशांचे सर्वेक्षण करण्यात आले. १४१ ठिकाणी २६,८३८ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले कॅमेऱ्यांद्वारे १,२१,३३७ वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर नजर टाकली गेली कॅमेऱ्यांद्वारे तब्बल ३,४८,५८,६२३ एवढे फोटो काढण्यात आले. त्यातील ७६,६५१ फोटो हे वाघांचे होते तर ५१,७७७ फोटो बिबट्यांचे होते. एकूण ५,९३,८८२ एवढ्या मानवी दिवसांच्या परीश्रमानंतर गणना पूर्ण झाली दर चार वर्षांनी देशात व्याघ्रगणना --
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट