Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महावादनाने निनादणार आज गोदाघाट

$
0
0

महावादनाने आज

निनादणार गोदाघाट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत आज (२ एप्रिल) महावादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ढोलताशा महासंघ अध्यक्ष पराग ठाकूर, ज्ञान प्रबोधिनीचे जेष्ठ ताशावादक राजन घाणेकर, श्रद्धा नालंमवार प्रवीण व्यवहारे, हर्षल सदगीर, मोनिका आथरे, शैलजा जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पाडवा पटांगण, गोदाघाट येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रात ढोल वादनाची परंपरा प्राचीन असून पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनींचा सहभाग ढोल वादनात अत्यंत स्फुर्तीदायक आहे. तरुण वर्गाचे आकर्षण असलेले ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या कामगिरीला समर्पित आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३५ ढोल पथके सहभागी होणार आहेत. १५०० ढोलवादक, ताशावादक, आणि तास-झांज वादकांच्या सहभागांतून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली जाणार असून जवळजवळ दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा आत्मानुभव या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरुवात

$
0
0

महाजन बंधूंच्या मोहिमेला सुरुवात नाशिक : महाजन बंधू फाउंडेशनतर्फे आयोजित 'सी टू स्काय' या अनोख्या आणि साहसी मोहिमेला मुंबईतून उत्साहात सुरुवात झाली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्र पार करण्यासाठी स्काय जोश मोहीम आहे. महाजन ब्रदर्स आणि मुंबईच्या रहिवाशांनी या मोहिमेला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनंतर रॅलीची सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीर्ण झाल्यानंतरच सुटेल ‘शिवबंधन’ !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप शेतकरी हिताचे निर्णय घेत नव्हते. शिवसेनेत असताना कित्येक दिवस राजीनामे खिशात ठेवले. पण, शिवसेनेनेही शेतकरी हिताचे निर्णय न घेणाऱ्या भाजपसोबत पुन्हा मैत्रीबंध जोडले. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण माझ्यात रुजल्याने शिवबंधन सोडलेले नाही. ते जेव्हा जीर्ण होईल तेव्हाच सुटेल, असे स्पष्टीकरण महाआघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार धनराज महाले यांनी दिले. एचपीटी-आरवायके महाविद्यालयातील राजकीय जनजागृती कार्यक्रमात 'शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावरही शिवबंधन कायम कसे', या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.

एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागातर्फे सोमवारी राजकीय जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, सुरेश भटेवरा, प्रकाश अकोलकर, राजकीय विश्लेषक डॉ. मेधा सायखेडकर, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे होते.

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना महाले म्हणाले, की पर्यटन विकासातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे दिंडोरीत पर्यटन विकासाला चालना देण्यासह तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण्यासाठी कार्य करण्याची इच्छा आहे. सत्ता मिळावी म्हणून नव्हे, तर शिवसेनेतील सध्याची तत्त्वे आणि त्यांची भूमिका न पटल्याने पक्ष बदलला, असे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात डॉ. सायखेडकर यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्वपीठिका सांगताना लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व विशद केले. अकोलकर यांनी 'निवडणुका आणि माध्यमे' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर भटेवरा यांनी दोन्ही सत्रांचे विवेचन केले. राजकीय जनजागृती कार्यक्रमात मंगळवारी (दि. २) सकाळी ९ वाजता महायुतीचे नाशिक मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

\Bजिल्ह्याला नाही वाली

\Bजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण, पालकमंत्र्यांनी एकाही शेतकऱ्याच्या घरी भेट दिली नाही. सत्ता उपभोगणारे नागरिकांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचे भान हरपले आहे. त्यामुळे जिल्ह्याला वाली उरला नाही, अशी टीका करीत नाशिकला खंबीर आणि पाणीदार नेतृत्वाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

नाशिककर मृण्मयीचाआशियाई स्पर्धेत ठसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थायलंडमध्ये ३० व ३१ मार्च रोजी झालेल्या ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारताची रोइंगपटू मृण्मयी सालगावकर हिने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवत ठसा उमटवला. मृण्मयीने एस ४ (५०० मीटर) व पेअरमध्ये (२००० मीटर) प्रत्येकी एक सुवर्ण, तर सिंगल प्रकारात २००० मीटर रोइंगमध्ये रौप्यपदक मिळविले. मृण्मयी नाशिकची रोइंगपटू असून, ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिककर मृण्मयीचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय यश आहे.

मृण्मयीने थायलंडमध्ये ३० मार्च रोजी झालेल्या ज्युनिअर गटातील इनडोअर रोइंग चॅम्पियनशिपमध्ये सिंगल प्रकारात रौप्यपदक पटकावले. हा पदकांचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत ३१ मार्च रोजी तिने एस ४ आणि पेअरमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली. मृण्मयीचे लक्ष्य मिशन ऑलिम्पिक असून, २०२४ मधील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत गोल्ड मेडल जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. आनंदनिकेतनमध्ये दहावीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मृण्मयीला रोइंगमध्येच करिअर करायचे असून, त्यासाठी तिने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. माजी महापौर प्रकाश मते व विक्रांत मते यांनी स्थापन केलेल्या वॉटर्सएज क्लबवर ती गेल्या चार वर्षांपासून सराव करीत असून, तिला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. वॉटर्सएज क्लबने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले असून, मृण्मयी हा यशाचा वारसा पुढे नेत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक तांबे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला दिवसाआड नव्हे दररोज पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा उच्चांक गाठत असल्याने परिसरातील जलाशयातील पाणी साठवणीचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी त्र्यंबक शहरावर घोंगावणार पाणीसंकट तुर्तात तरी टळले आहे. गत ११ वर्षांपासून उन्हाळ्यातील तीन महिने एक दिवसाड होणारा पाणीपुरवठा यावर्षी मात्र दररोज आणि नियमीत वेळेत होणार आहे.

यावर्षी १ एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठा करावा लागणार अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र गौतमी बेझे प्रकल्पावर असलेली तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. शहराला अंबोली आणि गौतमी बेझे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सिंहस्थ २०१५ मध्ये २७ कोटी रुपये खर्च करून गौतमी बेझे धरणातील पाणी त्र्यंबक शहरासाठी आणले आहे. तत्पूर्वी अंबोली धरणात असलेला पाणीसाठा उन्हाळयात पुरवठा करणे शक्य होत नव्हते म्हणून एक दिवसआड नियोजन करावे लागत होते. गौतमी बेझे धरणातील पाणी आले मात्र तरी देखील तांत्रिक अडचणीमुळे गतवर्षांपर्यंत एक दिवसआड पाणी हे नियोजन कायम राहीले होते. यावर्षी दोन महिने आगोदरच पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामयणे यांनी दोन्ही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर गौतमी बेझे धरणाची परिस्थिती समजावून घेतली आणि त्या ठिकाणी अतिरिक्त वीजपंप बसविण्यात आले आहेत. गौतमी बेझे धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. यापुढील तीन महिने दररोज नियमीत पाणी पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे या वर्षी त्र्यंबकवासियांचे पाणी संकट टळले आहे. दरम्यान सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना त्र्यंकेश्वर येथे दररोज पाणीपुरवठा होणार आहे. मात्र नागरिकांनी जपून पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती शिल्पा रामयणे, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेगावकर, ठक्कर क्रेडाईच्या कार्यकारिणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुण्याचे सतीश मगर यांची, तर चेअरमनपदी अहमदाबादचे जक्षय शहा यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष अनंत राजेगांवकर यांची कोषागारपदीवर नियुक्ती करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर यांची राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी तथा घटना समितीचे अध्यक्ष या विशेष निमंत्रित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रेडाई नॅशनल व क्रेडाई महाराष्ट्राची सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच पार पडली. क्रेडाई नॅशनलच्या सर्वसाधारण सभेत २०१९-२१ या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुख्य समितीत क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष सुनील कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दिल्ली येथे फेब्रुवारीत पार पडलेल्या 'युथकॉन २०१९' परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेडाईच्या वतीने श्वेतपत्रिका सादर करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी क्रेडाई नाशिकचे कार्यकारिणी सदस्य गौरव ठक्कर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच, क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव पारीख यांची, तर क्रेडाई नाशिकचे सुनील कोतवाल यांची मानद सचिव या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली. यावेळी नाशिकचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी एक्झिबिशन कमिटीच्या समन्वयक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. युथविंगचे समन्वयक निशित अटल यांची महाराष्ट्राच्या सहसमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला क्रेडाई नॅशनलचे मावळते चेअरमन गीतांबर आनंद, जक्षय शहा यांच्यासह देशभरातील क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीचा डोंगर वाढताच!

$
0
0

थकबाकी पोहचली अडीचशे कोटींवर; वसुलीसाठी मोहीम

..

- घरपट्टीची थकबाकी : १८४ कोटी

- पाणीपट्टीची थकबाकी : ६७ कोटी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी यंदा वाढली असली तरी, मागील अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीचाही आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात विक्रमी अशी ११४ कोटींची घरपट्टी ३१ मार्चअखेर वसूल झाली असली तरी, अजूनही ३५ कोटी थकबाकी आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी २५० कोटींवर पोहचल्याने पालिकेने आता घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण ४ लाख २८ हजार ४९० मिळकतींची घरपट्टी सदरी नोंद आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी वसुलीसाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २५३ कोटींचे उद्दिष्टे निश्चित केले होते. परंतु, मुंढे यांनी लादलेल्या अवाजवी करवाढीने पालिकेचे उद्दिष्ट कोसळले. त्यातच मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींचा वाद न्यायालयात अडकला आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यांनी घरपट्टीसाठी १४९ कोटींचे सुधारीत उद्दिष्टे निश्चित केले होते. त्यापैकी ३१ मार्चअखेर ११४ कोटी ३० लाख रुपयांची वसुली होऊ शकली आहे. घरपट्टीची सन २०१९ पूर्वीची १८३ कोटी ७४ लाखांची थकबाकी होती. चालू आर्थिक वर्षात ११५ कोटी असे एकूण २९८ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली प्रशासनाला अपेक्षित होती. मात्र गेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्चअखेर मागील थकबाकीपोटी ३४ कोटी ३३ लाख, तर चालू मागणीपैकी ७९ कोटी ९६ लाख रुपये वसूल झाले आहेत. मागील थकबाकीची १८.६९, तर चालू मागणीची ६९.५२ टक्के वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. सुमारे २९८ कोटींच्या एकूण मागणीचा विचार करता केवळ ११४ कोटींची घरपट्टीची वसूल होऊन थकबाकीचा आकडा हा १८४ कोटींपर्यंत गेला आहे. त्यात पाणीपट्टीचीही थकबाकी जमा केली, तर एकूण थकबाकीचा आकडा हा २५० कोटींपर्यंत पोहचल्याने पालिकेला ही थकबाकी वसुलीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

...

पाणीपट्टीची थकबाकी ६७ कोटी

महापालिकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे ५४ कोटी निश्चित केले होते. सन २०१८ पूर्वीची थकबाकी ५५ कोटी होती. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात पाणीपट्टीतून पालिकेला एकूण १०९ कोटींची वसुली अपेक्षित होती. प्रत्यक्षात गेल्या वर्षीची वसुली ही ४५ कोटींपर्यंत गेली. त्यात चालू वर्षाच्या मागणीपैकी केवळ २८ कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे १७ कोटींची थकबाकी राहिली आहे. त्यामुळे आतापर्यंतची पाणीपट्टीची थकबाकी ही ६७ कोटींपर्यत पोहचली आहे.

...

वसुली मोहीम चालणार

पाणीपट्टी आणि घरपट्टी थकबाकीची रक्कम ही २५० कोटींच्या पार गेल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थकबाकी वसुली मोहीम सुरूच ठेवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टीची थकबाकी असलेल्या सुमारे दोन हजार थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहेत. वॉरंटची मुदत संपलेल्या मिळकती जप्त करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पाच हजारापेक्षा जास्त रकमेची पाणीपट्टी थकीत असलेल्या थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरील बुडून अपंग तरुणाचा मृत्यू

$
0
0

निफाड : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अपंग तरुणाचा चांदोरी येथील विठ्ठलवाडी परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सोमवारी ही घटना उघडकीस आली.

चांदोरी बस स्थानकाजवळ राहणारा समाधान देवराम सांबरे (वय २३) हा रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेला होता. पण तो घरी परत

न आल्याने त्याच्या आईने विचारपूस केली. सोमवारी सकाळी समाधानचे मित्र शुभम गारे गोदावरी नदीपात्राकडे शोधायला गेले असता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकर्त्यांकडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. समाधान नदीत पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. समाधान हा जन्मता अपंग होता त्याचे हात सरळ नव्हते त्यामुळे तो बुडाला असावा, असा अंदाज आहे. समाधानच्या पश्चात वृद्ध आई व तीन विवाहित बहिणी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज

$
0
0

फोटो - सतीश काळे

समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज

मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. वाटवानी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात गरजू, वंचितांची संख्या खूप मोठी असून या प्रत्येकापर्यंत कोणी एक संस्था, व्यक्ती पोहोचू शकत नाही. अशा गरजूंसाठी आजच्या पिढीने, तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीत संवेदनशीलता असून त्या भावनेशी स्वत:ला जोडण्याची गरज आहे. यासाठी गरजवंतांकडे दुर्लक्ष करण्याची समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज असून दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी डॉ. भरत वाटवानी यांनी केले.

कालिदास कलामंदिरात रविवारी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी, जॉर्डन, सिरिया, येमेनसारख्या संवेदनशील युद्धप्रवण क्षेत्रात वैद्यकीय सेवा दिलेले डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे प्रमोद गायकवाड यांच्या कार्याची उकल करणारा एक संवाद हा मुलाखतपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे व वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधत या तिन्ही मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडला.

यावेळी बोलताना डॉ. वाटवानी यांनी निराधार मनोरुग्णांसाठी सुरू केलेल्या श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीविषयी माहिती दिली. आनंदवन, हेमलकसा येथे बाबा आमटे यांची भेट घेत त्यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्याची दिशा मिळाली. त्यातूनच निराधार मनोरुग्णांसाठी काम करणे सुरू झाले. त्यामुळेच आतापर्यंत साडे सात हजार रुग्णांचे पुनर्वसन करता आले. परंतु, हे काम येथपर्यंतच थांबणारे नसून भारतभरात चार लाख निराधार मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. स्वकेंद्रीत होण्यापेक्षा समाजकेंद्री होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जॉर्डन, सिरिया, येमेन या युद्धप्रवण क्षेत्रात स्वत:चा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. भरत केळकर यांनी यावेळी या सेवेमागील प्रेरणा, अनुभव यावेळी सांगितले. तसेच सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनीही सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभन कथन केले. यावेळी डॉ. हेमंत कोतवाल, विनायक रानडे, अभय कुलकर्णी, विनिता धारकर, किरण चव्हाण, राजेश बोरा, उमेश वानखेडे, राजेश कोठावदे, शिरीष कदम आदी उपस्थित होते.

---

प्रत्येकात दडलाय चांगला माणूस

समाज माध्यमांवर व्यक्त होत असलेले वाद, तंटे यामुळे काही काळात फेसबुक बंद केले. मात्र, त्यानंतर समाजकार्यासाठी हीच समाज माध्यमे उपयुक्त ठरली. लहानपणापासून सामाजिक विषमता बघायला मिळाली. ही विषमता मिटविण्यासाठी काम सुरू केले. या कामात एक एक जण सहभागी झाला आणि सोशल नेटवर्किंग फोरमचे काम सुरू झाले. प्रत्येक व्यक्तीत चांगला माणूस दडला आहे, त्याच्यातील संवेदनशीलता जागृत करण्याची गरज आहे, असे आपले अनुभवकथन करताना प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लयकारी’च्या रंगात रसिक रंगणार!

$
0
0

जानमाळी यांच्या अलंकारिक चित्रशैलीतील चित्रांचे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रकार दिनकर जानमाळी यांच्या भारतीय अलंकारिक चित्रशैलीतील चित्रकृतींचे प्रदर्शन २ ते ८ एप्रिल या कालावधीत जहाँगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. 'रंग-रेषांची अनोखी बंदिश' म्हणता येईल असे जानमाळी यांचे चित्र आहे. आपण जे जगतो, आजूबाजूला पाहतो, त्याचे प्रतिबिंब कलावंताच्या कलाकृतीत सहजपणे पडत असते. जगणे म्हणजे काय? याचा हा शोधच असतो. प्रदर्शनाचे 'शीर्षकच' लयकारी आहे.

रंग-रेषातून आशय व विषयाची लय समोर येते आणि त्यातून चित्राचे वेगळेपण मनावर ठसते. कुठलीही रेषा आपला स्वभाव घेऊन येते. इथल्या संस्कृतीचं परंपरांचे दर्शन घडवणारी ही चित्र आहेत. अर्धनारी नटेश्वर, मंगळागौर, नागप्रणय, साजसंध्या, शकुंतला, पंढरपूर वारी, अयोध्या आगमन, सत्यवान सावित्री यावरून चित्रांचे वेगळेपण लक्षात येते. सौंदर्य आणि संस्कृतीतील कथा यांचा समन्वय येथे चित्रांतून समोर येतो. त्या काळातील वेशभूषा, दागिने, नृत्यप्रकार, गोंदण, वस्त्र यांचा वापर चित्राचे वैशिष्टे ठळक करतो. पुराणकथा व लोककथांतून इथे चित्रांचे विषय आले आहेत. त्यातून होणारा आविष्कार मनमोहक व माहिती पूर्ण आहे. 'बंदिश-रेषांची-एक रचनात्मक गुंफण, रंग रेषांची मैफल रसिकाला निश्‍चितच आनंद देणारी आहे.

...

संवाद साधण्याची शैली

चित्रकार दिनकर जानमाळी यांचा शेतकरी कुटुंबात जन्म आणि सोबत कलेची आवड यातून त्यांच्यातील चित्रकाराला वेगळं काही तरी करण्याचा ध्यास होता. त्यातून चित्रकलेचे त्यांनी रितसर शिक्षण घेतले. कला शिक्षणाची पारंपरिक चौकट मोडून इथल्या परंपरेशी, मातीशी नाते सांगणारे आपल्याला कलाकृतीतून काही मांडता येईल का? हा विचार त्यांच्या मनात होताच. नाशिक शहर, इथली मंदिरे, जुने वाडे, इमारती माणसे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि संवाद साधण्याची शैली यातून त्यांची जडणघडण झाली. नाशिक परिसरातील सण, उत्सव, परंपरा, जत्रा त्यांनी जवळून बघितले असल्याने त्याचे प्रतिबिंब चित्रात उमटले.

...

बालपण जुन्या नाशकात गेले. त्यामुळे तिथल्या चालीरीती, सण साजरे करण्याच्या पद्धती मनावर खोलवर बिंबले. काहीतरी सांगायचं ही ऊर्मी स्वस्थ बसून देत नव्हती. त्या जाणिवेतून कागदावर चित्रे आकार घेऊ लागली. स्वत:ची शैली शोधण्यासाठी फार धडपड करावी लागली नाही. ती आपसूकच चित्रांतून निथळत होती.

- दिनकर जानमाळी, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांसाठी कृत्रिम तलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नांदगावकर पुढे सरसावले आहेत. नांदगाव तालुक्यात पाण्यासाठी आसुसलेल्या वन्य जीवांसाठी विविध संस्था, संघटना तसेच वैयक्तिक रित्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. वन्य जीवांसाठी पाण्याच्या गव्हाणी, छोटे पाणी तलाव, अन्नासाठी पशू थांबे यांची नांदगाव तालुक्यात व्यवस्था केली जात आहे. नांदगाव शहरात वन्यजीव पाणपोई मदत कक्ष उभारण्यात आला आहे. युवा फाउंडेशनच्या वतीने दानशूरांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागापूर परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते राजेंद्र पवार यांनी आपल्या जागेत पशू थांबे व छोट्या पाणी तलावाची उभारणी केली आहे. नांदगाव शहरात तहानलेल्या वन्य जीवांसाठी पशुपक्षीमित्र व सर्पमित्र दीपक रमेश घोडेराव यांनी एका पाणी गव्हाणीची सोय केली आहे. कालिका चौकातील दानशूर मंडळींनी वर्गणी जमा करून दोन गव्हाणी तयार केल्या आहेत.

भावनिक साद

नांदगावच्या युवा फाउंडेशनने नागरिकांना भावनिक साद घातली आहे. नागरिकांनी मुक्या प्राणी व पक्ष्यांसाठी पाणी व्यवस्था करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन युवा फाउंडेशन सामाजिक संस्था नांदगांवचे सुमित सोनवणे, संदीप जेजुरकर, दीपक घोडेराव, शशी पाटील आदींनी केली आहे. मनमाड नांदगाव मार्गावर नागापूर येथे छोटे छोटे पाणी तलाव व अन्न पशु थांबे उभारून जि. प.चे माजी सदस्य, गटनेते राजेंद्र पवार यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कट्टा - युवक समन्वय समिती - प्रतिक्रिया

$
0
0

निवडणूका जवळ आल्या की, युवकांबाबत विविध घोषणाबाजी केली जाते. राजकारणी युवकांना केंद्रस्थानी ठेवून आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कार्य होताना दिसत नाही. दोन कोटी रोजगार देणार असे आश्वासन सत्ताधारी सरकारने दिले होते, मात्र ते प्रत्यक्षात उतरलेले नाही. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात इंजिनीअरिंग कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी एकही मोठी कंपनी शहरात आलेली नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

प्रसाद देशमुख

- -

निवडणुकांमध्ये तरुण व शेतकरी यांना समोर ठेवून प्रचार केला जातो. या प्रचारात मोठी आश्वासने दिली जातात. पण ते प्रत्यक्षात उतरत नसल्याने आमच्या भावनांचा खेळ होतो आहे. शहरी व ग्रामीण भागातील मुलामुलींचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हे प्रश्न जाणत कार्य होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा नाही, शहरात रहायचे म्हटले तर वसतिगृह नाही. या प्रश्नांना निवडणुकीच्या माध्यमातून वाचा फोडण्याची गरज आहे.

भूषण काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राची वाजेंवर शिस्तभंगाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या सदस्य आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यासंदर्भातील बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्यावरील दोषारोप निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाजे यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शारीरिक वा तत्सम मर्यादांमुळे दिव्यांग बांधव मतदानाचा हक्क बजावणे टाळतात. लोकसभा निवडणुकांत अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी मतदान करावे यासाठी अशा बांधवांना मतदानाच्या दिवशी घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची व पुन्हा त्यांना घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले आहेत. दिव्यांग बांधवांना मतदान प्रक्रियेत कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि आल्याच तर त्याचे तातडीने निराकरण करता यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन बैठक बोलावली होती. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वाजे या बैठकीला अनुपस्थित होत्या. अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. ती देखील घेतली नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत खुलासा मागविला असता अन्य महत्वाची कामे असल्याने बैठकीला येऊ शकले नाही असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला. वसतिगृहांची पाहणी करण्यासाठी जावे लागत असल्याने समाजकल्याण विभागाकडील दोन वाहने देण्यासही वाजे यांनी नकार दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या कामकाजात त्यांच्याकडून स्वारस्य दाखविले जात नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने दोषारोपपत्र तयार केले आहे. ते समाजकल्याण विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिव्यांग बांधवांना निवडणूक काळात सोयीसुविधा पुरविण्याच्या प्रक्रियेत समाजकल्याण विभागाची जबाबदारी मोलाची आहे. परंतु, या विभागाच्या अधिकारी बैठकीला उपस्थित राहात नाहीत. अन्य महत्वाची कामे असल्याचा खुलासा देतात. सरकारी कर्तव्य पार पाडण्यात त्यांची अनास्था दिसून आली. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली असून सचिवांकडे चार्जशीट पाठविले आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या निर्णयाचा ‘निमा’कडून निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लू रुग्णाचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्यास संबंधित खासगी वैद्यकीय व्यावसायिकावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा आदेश महापालिकेने नुकताच काढला आहे. या प्रकरणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

स्वाइन फ्लूबाबत आज लोकांमध्ये भीती आहे. आजार व त्याची लक्षणे तीव्र झाल्यावर रुग्ण डॉक्टरांकडे धाव घेतात. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. समाजाचा खासगी डॉक्टरांवर विश्वास आहे. नाशिक शहरातील बरीचशी आरोग्य व्यवस्था खासगी वैद्यकीय व्यावसायिक सांभाळत आहेत. परंतु, नाशिक महापालिकेने खासगी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीच दिली असून, ती अतिशय निंदनीय बाब असल्याचे निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

..

जनजागृती करावी

स्वाइन फ्लूबाबत जागरुकता व्हावी असे वाटत असेल, तर महापालिकेने विविध वैद्यकीय संघटना जसे निमा, आयएमए यांच्यामार्फत शिबिरे घ्यावीत. डॉक्टरांसाठी स्वाइन फ्लूबाबत नवीन नियमावली आली असल्यास त्याबाबत अवगत करावे, असे आवाहन डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक सापडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार माणिकराव गावित यांचे खासगी स्वीय सहायक भगवान रामचंद्र गिरासे हे शनिवारी (दि. ३०) सायंकाळपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी मुंबईपासून त्यांचा तपास सुरू केला असता ते सोमवारी (दि. १) सकाळी गुजरातमध्ये सापडले. गिरासे हे मुंबईच्या टिळक भवनाजवळून शनिवारी सायंकाळी बेपत्ता झाले होते. तेव्हापासूनच मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी गुजरामध्ये त्यांचा शोध लागला आहे. गिरासे यांची अवस्था पाहता त्यांचे अपहरण झाले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गिरासे गुजरातमध्ये सापडले तेव्हा त्यांचे केस आणि मिशी कापलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, पोलिसांनी भगवान यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले. पोलिस तपासात त्यांनी काहीही सांगितलेले नाही. ते बोलण्याच्या अवस्थेतच नाहीत. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मानेवर इंजेक्शन दिल्याने सूज झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी फक्त ‘मी रेल्वेतून पडलो’ एवढेच बोलले. त्यांच्यावर घरी वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

धुळ्यात ‘मै भी चौकीदार’
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांसह कोट्यवधी समर्थकांशी ‘मै भी चौकीदार हू’ या विशेष मोहिमेअंतर्गत रविवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे थेट संवाद साधला. शहरातील राम पॅलेस येथे रविवारी सायंकाळी या संवाद कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी युतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे, ज्येष्ठ संघ पदाधिकारी रवी बेलपाठक, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, लोकसभा विस्तारक शशिकांत वाणी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ मतदान केंद्रे संवेदनशील

$
0
0

केंद्रनिहाय पोलिसांचा आढावा

...

संवेदनशील केंद्रे

- शहरातील केंद्रे : ४३

- ग्रामीण भागातील केंद्रे : १७

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्हाभरात ६० मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यातील ४३ केंद्रे ही नाशिक शहरातील आहेत. संवेदनशील केंद्रांचा आढावा पोलिसांनी घेतला असून, त्या आधारे या केंद्रांची सुरक्षा, पोलिसांचा वाढीव बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदी बाबींकडे लक्ष पुरविले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. पोलिसांनी सध्या आपले लक्ष अवैध मद्य, शस्त्र तसेच पैशांची वाहतूक रोखणे तसेच समाजकंटकांना वेळीच आवार घालणे यावर केंद्रित केले आहे. दुसऱ्या पातळीवर पोलिसांकडून संवेदनशील मतदान केंद्राचा आढावा घेतला जात आहे. शहरातील एकूण ११०६ मतदान केंद्रे आहेत. सन २०१४ मध्ये हा आकडा १०५३ इतका होता. जवळपास दीडशे मतदान केंद्रांमध्ये यावेळी वाढ झाली आहे. यातील ४३ मतदान केंद्रे ही संवेदनशील ठरविण्यात आली आहे. यासाठी या मतदान केंद्रांवर यापूर्वी झालेल्या वादांचा, गुन्हेगारीचा निकष ठरविण्यात आला. जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये १७ संवेदनशील केंद्रे आहेत. संवेदनशील केंद्राची सुद्धा वर्गवारी असून, वादांची जास्त शक्यता असलेल्या केंद्रांचा पोलिसांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. या ठिकाणी आवश्यक तितका बंदोबस्त तैनात करणे, मतदान केंद्राजवळील इमारती, या ठिकाणाहून होणारी वाहतूक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पोलिसांकडून सूचनांचे अदान-प्रदान सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रतिबंधात्मक कारवाई, मतदान केंद्रांची सुरक्षा, राजकीय गुन्हेगारी मोडून काढणे, नाकाबंदी अशा बाबींवर पोलिसांचा फोकस राहिला आहे.

...

पोलिस बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीसाठी शहर पोलिस दलातील तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बाहेर ६१७ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ६८३ होमगार्ड्स असून, पोलिस आयुक्तालयातील ८० टक्के कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून अर्जस्वीकृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना आज (दि.२) प्रसिद्ध होणार असून, नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकृतीलाही सुरुवात होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी दिली.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावून तयारीची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, की 'रॅन्डमायजेशनची प्रक्रिया उत्तमप्रकारे पार पडली. नवमतदारांनी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला असून, ६३ हजारांहून अधिक उमेदवारांनी त्यास प्रतिसाद दिला. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात यावे लागेल. तेथे त्यांचे अर्ज बारकाईने तपासले जातील. त्यानंतर उमेदवारासह पाच व्यक्ती दालनात येऊन नामनिर्देशनपत्र सादर करू शकतील. याबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. आचारसंहिताभंगचे प्रकार रोखण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, समन्वयासाठी जिल्हाधिकारी प्रशासनासह पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, बँक अधिकाऱ्यांचा एकत्रित ग्रुपही तयार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजाच्या एकूण खर्चासाठी १० कोटींची वित्तमर्यादा आयोगाने घालून दिली असून, ती पुरेशी असल्याचे मांढरे यांनी सांगितले. मतदारांना निर्भयपणे उमेदवार निवडून देता यावा, शांततामय वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सूरू असून, त्यास राजकीय पक्षांसह नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मांढरे यांनी केले.

...

सुमारे ४७२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग

जिल्ह्यात ४ हजार ७२० मतदान केंद्रे असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यापैकी १० टक्के म्हणजेच ४७२ मतदान केंद्रांमधून लाइव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात बसून या ४७२ मतदान केंद्रांमधील प्रत्येक केंद्रावर नजर ठेऊ शकणार आहेत. सुरगाणासारख्या दुर्गम भागात मात्र शक्यतो वेबकास्टिंग केले जाणार नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.

..

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र वितरण व स्वीकृती - २ ते ९ एप्रिल

नामनिर्देशन पत्रांची छाननी - १० एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक - १२ एप्रिल

मतदानाचा दिनांक - २९ एप्रिल

मतमोजणीचा दिनांक - २३ मे

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक : २७ मे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षांनी आईला मिळाले कुटुंब

$
0
0

पोलिसांनी घेतला पुढाकार; समुपदेशननंतर मनोमिलन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रतिकूल परिस्थितीत रक्ताचे पाणी करून मुलांचा सांभाळ केला. मुले मोठे झाली. दोघांना सरकारी नोकरी मिळाली. संसार फुलला पण यात कधीकाळी कुटुंबाचे पालनपोषण करणारी आईच दूर झाली. सुना आणि मुलांबरोबर पटत नसल्याने त्या माऊलीने रस्त्याची चादर अन् आकाशाचे पांघरूण केले. सोशल मीडियामुळे आईची कैफियत समोर आली अन् पोलिसांनी पुढाकार घेत त्या वृद्ध माऊलीला हक्काचे घर मिळवून दिले.

प्रमिला नाना पवार (वय ६१, रा. नंदुरबार) असे या कष्ट सोसणाऱ्या मातेचे नाव आहे. वस्तू व सेवा कर कार्यालयात असणाऱ्या नाना पवार यांचे १९९५ मध्ये निधन झाले अन् पवार कुटुंबावर आभाळ कोसळले. अवघ्या १४ ते १५ वर्षांच्या मुलांना सोबत घेऊन प्रमिला पवार यांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आतिष या मुलास नंदुरबार येथेच कंडक्टरची नोकरी लागली, तर दुसरा मुलगा सतीश हा वस्तू व सेवा कर विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी पवार कुटुंबात नंदनवनच फुलले. मुलांचे विवाह पार पडले. मात्र, यानंतर सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रमिला पवार यांच्यावर नियतीने जणू आभाळाच कोसळवले. सुनांशी पटेना, मुलेही साथ देईनात. अशावेळी त्यांनी घराबाहेर पडून भटकंती सुरू केली. बऱ्याच वर्षांपासून त्या नाशिकसह इतर काही ठिकाणी फिरत राहिल्या. मागील आठवड्यात एका सोशल मीडियावर प्रमिला पवार यांचा कैफियत मांडणारा व्हिडीओ व्हायरला झाला. त्यात त्या आपला मुलगा फौजदार असल्याचे सांगत होत्या. या व्हिडीओची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यंत आली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी प्रमिला पवार यांचा आणि त्यांच्या मुलांचा शोध घेतला. नाशिकमध्ये राहणाऱ्या सतीश पवार यांना सहकुटुंब बोलावून घेऊन तिघांचेही समुपदेशन केले. झालेले गैरसमज दूर करीत नांगरे पाटील यांनी तिघांचे मनोमिलन घडवून आणले. यानंतर मायलेक आपल्या घरी रवाना झाले. पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामामुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहीर अनुदानासाठी आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर आणि योगिता प्रकाश धनगर या दाम्पत्याने शासनाच्या योजनेतील सिंचन विहिरीच्या खोदकामाचे अनुदान मिळण्यास उशिर होत असल्याने सोमवारी (दि. १) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांचे गोपनीय पथक हजर असल्याने त्यांनी शेतकरी दाम्पत्यांकडून रॉकेलचा डबा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी दाम्पत्यांविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांची शेतजमीन असून, या जमिनीवर पंचायत समिती शिंदखेडामार्फत शासनाच्या योजनेतील सिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे नियमानुसार खोदकाम करताना गावातीलच न्हानू देवराम धनगर हे विहिरीच्या खोदकामास अडथळा करीत खोटे अर्ज पंचायत समितीमध्ये करीत आहेत. त्यामुळेच विहिरीचे अनुदान मिळण्यास उशिर होत असल्याची तक्रार प्रकाश धनगर यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. मात्र, प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे धनगर दाम्पत्याने संतप्त होऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर प्रकाश पोपट धनगर आणि पत्नी योगिता प्रकाश धनगर यांनी सोमवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

...अन् अनर्थ टळला
याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला पूर्वकल्पना असल्याने शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय पथकातील नरेंद्रसिंग कचवाह, चंद्रकांत पाटील, भूषण खेडवन, सुधाकर पाटील हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पहारा ठेवून होते. अचानक सकाळी अकरा वाजेनंतर धनगर दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन रॉकेलचा डबा उघडताच पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलचा डबा हिसकावून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी प्रकाश धनगर व पत्नीकडून सर्व माहिती जाणून घेत आंदोलनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>