Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘शेअर’ गुंतवणूक ; दक्ष रहा

$
0
0

'शेअर' गुंतवणूक; दक्ष रहा

तज्ज्ञांचा गुंतवणुकदारांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दलालांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक असून, कोणत्याही चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे टाळावेच. तसेच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत दलालांचा अधिक हस्तक्षेप असेल आणि तुम्हाला योग्य माहिती मिळत नसेल तर, लागलीच 'एसईबीआय' किंवा 'एनएसडीएल'कडे संपर्क साधावा. तसेच शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कायम दक्ष रहा', असा सल्ला 'भारतीय शेअर बाजार यंत्रणेविषयी माहिती' या परिसंवादात तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना दिला.

भारत प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (एसईबीआय) आणि राष्ट्रीय प्रतिभूति डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या संयुक्त विद्यामाने 'भारतीय शेअर बाजार यंत्रणेविषयी माहिती' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता त्र्यंबकरोडवरील हॉटेल ऐमराल्ड पार्क येथे हा परिसंवाद झाला. एसईबीआयचे जनरल मॅनेजर संजय पुरव आणि एनएसडीएलचे मॅनेजर मिहीर मोघे यांनी उपस्थितांना शेअर मार्केट संदर्भात मार्गदर्शन केले.

एसईबीआयचे जनरल मॅनेजर पुरव म्हणाले की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दलालांकडून फसवणूक होतेय, असे वाटल्यास एसईबीआयकडे संपर्क साधा. ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची देखील सोय असल्याने आर्थिक नुकसान सहन करु नका. शेअर गुंतवणूक केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेसह जागतिक अर्थव्यवस्थेचाही तितकाच अभ्यास करायला हवा. शेअर गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे. पण, यातील चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे टाळायला हवे. त्यासाठी गुंतवणुकदारांनी कायम दक्ष रहावे. बँक आणि ब्रोकर्स यांच्या हालचालींवर गुंतवणुकदारानेच बारिक लक्ष ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.

एनएसडीएलचे मॅनेजर मोघे म्हणाले, की ऑनलाइन तंत्रज्ञानामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक सोपी झाली आहे. शेअर मार्केटमधून होणारा नफादेखील अधिक आहे. पण, गुंतवणुकदारांची अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी प्रत्येक शेअर खरेदी करताना खबरदारी घेणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. शहरातील शेअर गुंतवणुकदार मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते. गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमधील अनेक शंकांचे निरसन करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दापूरकर यांचा गौरव

$
0
0

प्रा. दापोरकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

नाशिकरोड : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. जे. मेहता हायस्कूल आवारातील के. एन. केला महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. अश्विनी दापोरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. मीना कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. मीना कुटे यांनी प्रा. दापोरकरांवरील आठवणींचा हिंदोळा पुस्तिकेचे प्रकाशन केले. मंगेश जोशी व निलोफर शेख यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ जारस यांनी आभार मानले. संजय शिंदे, अशोक अरिंगळे, वृषाली कुलकर्णी आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमी संघटनेवर केंद्राकडून बंदी

$
0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

स्टुडंटस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे असून, तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ (सुधारणा-२००४) अन्वये सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढून बंदीबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ओडिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्ये आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना योग्य ते कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सिमीशी संबंधितांना न्यायाधीकरणाने नोटिसा बजावल्या असून त्या-त्या पातळीवर त्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा उलटून ज्येष्ठ नागरिक ठार

$
0
0

मनमाड : अॅपे रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू व ५ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी

नांदगाव तरोडा मार्गावर घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी दिघोळे (रा. जळगाव बुद्रुक) यांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना मालेगाव येथे हलविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरखेडमधून मिळणार दिंडोरी, निफाडला पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरीसह निफाड आणि चांदवड तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी ओझरखेड धरणामधून पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे आवर्तन सोमवारी (ता. १) सोडण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची गरजही वाढली आहे. यामुळेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी दिंडोरीसह निफाड आणि चांदवड तालुक्यातून होत होती. त्यानुसार केवळ पिण्यासाठी ६३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. चांदवड तालुक्यातील पिंपळद, दिंडोरीतील सोनजांब या प्रासंगिक गावांसह निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, लासलगावजवळच्या रानवड, मिरचीचे पालखेड व इतर अनेक गावांनाही या आवर्तनाचा लाभ होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पाण्याच्या वहनमार्गावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

$
0
0

सांस्कृतिकी

---

सोमवार, १ ते शनिवार ६ एप्रिल

सांस्कृतिक महोत्सव

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे १ ते ६ एप्रिल या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. अंतर्नाद, महावादन, लघुचित्रपट महोत्सव, महारांगोळी तसेच सेवा सरिता या शीर्षकाने कार्यक्रम होणार.१ एप्रिल रोजी अंतर्नाद कार्यक्रम. शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील १००० कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार. २ एप्रिलला महावादन. १५०० ढोल वादकांचे एकत्रित महावादन. ३५ ढोल पथके या कार्यक्रमांत सहभागी. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल, गंगापुर रोड येथे हा महोत्सव होईल. महोत्सवात वोट फॉर भारत, इंडिया ते भारत, माय फॅमिली माय स्ट्रेंथ, इंडियन सोल्जर, सामाजिक मुद्यांवरील साधारणत: १५ फिल्मस् प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचदिवशी ३ एप्रिल रोजी शहराच्या विविध ८ भागांत रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. मोदकेश्वर मंदिर, इंदिरा नगर, कालिका मंदिर, मुंबई नाका, मुक्तीधाम मंदिर, नाशिकरोड, बनारसी नगर, हिरावाडी, यशवंत मंगल कार्यालय, मेरी, श्रीगुरुजी रुग्णालय, गंगापूर रोड, पवन नगर, सिडको, गामणे मळा, पाथर्डी फाटा या भागातून २५०० स्क्वेअर फुटाच्या रांगोळी आपले सण आपली संस्कृती या विषयाला अनुसरून काढण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी २५,००० चौरस फुटाची महारांगोळी. या सर्व रांगोळी रचनेच्या प्रारंभासाठी नाशिक मधील शहिद जवानांच्या माता-पत्नी यांची उपस्थिती. ५०० महिलांच्या सहभागातून ही रांगोळी काढण्यात येणार आहे. सर्व रांगोळ्या पूर्ण करण्यासाठी १० टन रंग व रांगोळी वापरण्यात येणार आहे. याच दिवशी चित्रकला प्रदर्शन. सायकल रॅली ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पाडवा पटांगण ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली कारंजा आणि श्री काळाराम मंदिर पुर्व दरवाजा या दोन ठिकाणाहून ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३१ वाजता हिंदु नववर्षा दिनानिमित्त यात्रा आयोजन केलेले आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन महिलावर्ग करीत आहे.

पाडवा पटांगण, गोदाघाट सायंकाळी ६.३० वाजता

-----

सोमवार, १ ते बुधवार ३ एप्रिल

चित्र-शिल्प प्रदर्शन

के.के. वाघ शिक्षण संस्थेच्या ललित कला महाविद्यालयाच्या वतीने चित्र-शिल्प प्रदर्शन २०१८-१९ होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील आधुनिक चित्रकार पंडित खैरनार यांच्या हस्ते व प्राध्यापक चित्रकार संजय बागुल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी चित्रकार गणेश शिंदे कलाक्षेत्रातील व्यावसायिक दृष्टिकोन व संधी याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शनात बीएफए पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती, प्रदर्शित करण्यात येणार आहेत. पेंटिंग विभागातील फुल फिगर कॅनव्हास पेंटिंग, रचनाचित्र, प्रिंट मेकिंग तसेच मांडणी शिल्प यावर आधारित साधारण १५० कलाकृती तर शिल्पकला विभागात फुल फिगर, थ्री फोर, व्यक्तीशीर्ष शिल्प तसेच रचना व लोरिलिफ, हायरिलीग या कलाकृती विविध माध्यमाद्वारे निर्माण करून त्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत. साधारण ७५ शिल्पाकृती आहेत. मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबई कलाक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे व ललित कला अॅकॅडमीचे पारितोषिक विजेते चित्रकार विक्रांत भिसे मुंबई यांचे रचनाचित्रावर प्रात्यक्षिक होईल. बुधवार ३ एप्रिल रोजी कोल्हापुर नगरीचे शिल्पकार गणेश कुंभार यांच्या व्यक्तीशिल्पाचे प्रात्यक्षिक सकाळी १० वाजता होणार आहे.

के. के. वाघ ललितकला महाविद्यालय, सरस्वती नगर. सकाळी १० वाजता

-----

मंगळवार, २ एप्रिल

गांधी व्याख्यानमाला

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्यावतीने आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे सातवे पुष्प पत्रकार सुनील तांबे गुंफणार आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सावाना आवारातील औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 'महात्मा गांधी आणि फेक न्यूज' या विषयावर तांबे यांचे व्याख्यान होणार आहे. दै. मराठवाडा, औरंगाबाद या वर्तमानपत्राचा मुंबई प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुनील तांबे यांनी सुरुवात केली. इंग्रजी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करू लागले, २००६ साली रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत कमोडिटी करस्पॉन्डंट म्हणून काम केले, रॉयटर्स मार्केट लाईट या माहितीसेवेचे संपादक म्हणून काम त्यांनी पाहिले. २०१४ पासन स्वतंत्र पत्रकार म्हणन तांबे यांनी कामास सुरुवात केली.

औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळकपथ. सायंकाळी ६ वाजता

-----

शुक्रवार, ५ एप्रिल

सुरेल मैफल

संस्कारभारती इंदिरनगर विभाग यांच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता मोदकेश्वर गणपती मंदिर, इंदिरानगर येथे नववर्ष पूर्वसंध्येला सुरेल मैफलीचे आयोजन. गायन आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर कासार. तबल्यावर रसिक कुलकर्णी, हार्मेनियमवर दिव्या रानडे, पखवाजवर दिगंबर सोनवणे, तालवाद्यावर अमित भालेराव राहतील.

मोदकेश्वर गणपती मंदिर, इंदिरानगर सायंकाळी ६.३० वाजता

----

शुक्रवार, ५ एप्रिल

सुनहरी यादें

तरुण सुगंधित क्षणांची सुनहरी यादें हा कार्यक्रम बाबाज थिएटर च्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. लहानपण देगा देवा सारखेच तारुण्यातील फुलपंखी दिवस पुन्हा परत हवेसे वाटतात. वय वाढल्याने जेष्ठ नागरिक श्रेणी मिळाली तरी एखादी सुरेल सुरावट कानावर आली किंवा तारुण्यातील गाण्याचे शब्द आठवले तर मन क्षणात त्या सोनेरी दिवसात जाऊन पोहोचते. या सुनहरी यादें बरोबर कॉलेजचे दिवस आठवतात, तेव्हाची धमाल, मित्रमैत्रिणींची मजामस्ती आवडलेले चेहरे, दिली-घेतलेली वचने, कुणाकुणात गुंतलेले रेशीम धागे यांच्या स्मरणाने पुन्हा ताजेतवाने झाल्याची अनुभूती मिळते. हेच गतकाळातले तरुण सुगंधीत सोनेरी क्षण सुनहरी यादेंमध्ये आहेत. बाबाज थिएटर प्रस्तुत गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला नुतन वर्षाच्या संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ नागरिकांसाठी ही खास मैफल. ४०-५० वर्षांपूर्वीच्या तरुणाईमध्ये रमून जाण्यासाठी गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांची संगीतमय सुरेल मेजवानी आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ. सायंकाळी ५.३० वाजता

शनिवार, ६ एप्रिल

संगीत मैफल

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा नूतन संवत्सर प्रारंभ. शनिवारी यादिवशी बागेश्रीच्यावतीने 'गा बाळांनो श्रीरामायण' ही भक्ती संगीताची मैफल. निर्मिती-संकल्पना-निवेदन-लेखन चारूदत्त दीक्षित. गायक शीला दंडवते, हेमंत कुलकर्णी, वैभव काळे गायन करणार आहेत.

प्रौढ नागरिक मित्र मंडळ, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड सायंकाळी ५.३० वाजता

शनिवार, ६ एप्रिल

वासंतिक नवरात्रोत्सव

श्रीकाळाराम संस्थानतर्फे ६ ते १६ एप्रिल या कालावधीत वासंतिक नवरात्रोत्सव. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन. शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध वक्ते सचिन कानिटकर व जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन. सायंकाळी ५ वाजता सचिन कानिटकर यांचे 'राम चिंतित जावा' व्याख्यान, रविवारी ७ एप्रिलला 'जय श्री हनुमंता' व्याख्यान. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी दीपक मंडळाचे 'संगीत अथंग आवली' तर रविवारी प्रांजली बिरारी-नेवासकर व अभिषेक पटवर्धन यांचे 'अवघा रंग एक झाला' हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही बेशिस्तच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर अंडरपास येथे वाहनचालकांच्या बेशिस्तीवर 'एआय' तंत्रज्ञानाचा उतारा शोधण्यात आला. मात्र, तरीदेखील या अंडरपास परिसरात 'हम नहीं सुधरेंगे'च्या थाटात वाहनचालकांकडून 'वन वे'च्या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा येथील वाहतुकीच्या फेरनियोजनाचे आव्हान यंत्रणांपुढे ठाकले आहे.

इंदिरानगर अंडरपास येथे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीने यंत्रणेने क्लिक केलेल्या छायाचित्रांच्या आधाराने एक हजार २०९ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. नोटिसा बजावण्याचे काम जोरात सुरू असले, तरी या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. विशेषत: रात्री ९ ते सकाळी ९ वाजेदरम्यान शेकडो वाहनचालक 'वन वे'च्या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करून येथून वाहने दामटत असल्याची स्थिती आहे.

शहरात प्रथमच 'एआय' तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही इंदिरानगर अंडरपासमध्ये बसविण्यात आले. या सिस्टीमचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनाचे छायाचित्र क्लिक करीत आहेत. वाहनचालकांना जाच होऊ नये म्हणून दंडात्मक कारवाई लागलीच सुरू करण्यात आली नाही. आता मात्र दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. कॅमेऱ्यांमुळे वन वे नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. मात्र, नंतर त्याचा प्रभाव ओसरला. बरेचसे वाहनचालक सातत्याने नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. दरम्यान, नियम मोडणारे वाहनचालक आणि प्रत्यक्षात बजावण्यात येणाऱ्या नोटिसा यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याने नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अगदी वाहतूक पोलिस असतानाही अनेक वाहनचालक 'वन वे'मध्ये शिरतात. रात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहने सरळ आत येतात. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

--

...तर प्रकरण थेट कोर्टात

आतापर्यंत एक हजार २०९ वाहनचालकांचे पत्ते शोधून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या वाहनचालकांना दंडाची रक्कम भरावी लागेल. नोटिशीत दिलेल्या मुदतीनंतरही वाहनचालक समोर आले नाही, तर त्या वाहनावर ही पॅनल्टी कायम राहते. पुढे हे प्रकरण कोर्टात पोहोचू शकते, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वाहतूक कोंडी आणि नियम मोडण्याचे प्रकार कमी झाले असून, नोटिसा बजावण्याच्या कामास आणखी गती देण्याचा प्रयत्न असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन रिक्षाचालकाची पोलिसावर दादागिरी

$
0
0

नाशिक : अल्पवयीन रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांना अरेरावी आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार नाशिकरोड येथील दत्तमंदिर सिग्नल परिसरात घडला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अल्पवयीन संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार विलास कोटमे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना एमएच १५ झेड ९५१३ क्रमांकाच्या रिक्षात फ्रंट सीट प्रवासी दिसले. त्यांनी रिक्षा अडवली असता त्यात १७ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवताना आढळून आला. तसेच त्याने पोलिसांना धक्काबुक्की करीत अरेरावी केली.

दुचाकी पळविली

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील बळीराम नगर परिसरात कारमधून आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री घडली. या प्रकरणी दुचाकीचालक योगेश गंगाधर कोर (३१, रा. अंबडलिंक रोड) यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. एमएच १५ एफसी ०२१३ या क्रमांकाच्या दुचाकीवरून कौर जात असताना हा प्रकार घडला.

खंडणी उकळण्याचा प्रयत्न

नाशिक : घराच्या व्यवहारातून दोघांनी महिलेस धमकावत तिच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार भद्रकालीतील नानावली परिसरात घडला. या प्रकरणी लीलाबाई कचरू राऊत (४५, रा. पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी विकास अशोक ढोले (रा. कुंभारवाडा) आणि त्याचा मित्र राकेश बाळासाहेब भागवत या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

दुचाकीमालकाची फसवणूक

नाशिक : नवीन दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकाच्या दुचाकीची नोंदणी करून न देता शोरुम मालकाने ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुभाष जवरीलाल नहार (५६, रा. नाशिकरोड) यांच्या तक्रारीनुसार रोमेश लुथरा आणि विजय लुथरा या दोघा शोरुम मालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ११ जुलै २०१८ रोजी त्यांनी आराध्य ऑटो प्रा. लि. शोरुममधून ऍक्सेस दुचाकी रोख पैसे देऊन खरेदी केली. मात्र यानंतर शोरूमचालकांनी वाहनाची नोंदणीच केली नाही.

तीन तलवारी जप्त

नाशिक : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सिडकोतील पवननगर परिसरात कारवाई करून एका युवकाच्या ताब्यातून तीन तलवारी जप्त केल्या. तसेच संशयित युवक नितीन नामदेव काळे (२९, रा. पवननगर) यास अटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नितीन काळे याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एका गोणीत तीन तलवारी आढळल्या. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नितीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुदतबाह्य रिक्षांवर आजपासून कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात धावणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनांचे आयुर्मान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने गत वर्षी निश्चित केले. स्कूल बससाठी १५ वर्षे, तर रिक्षांसाठी २० वर्षे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे. या नियमाआधारे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ एप्रिलपासून २० वर्ष आयुर्मान पूर्ण झालेल्या रिक्षांचा शोध सुरू करण्यात येणार आहे.

शहरात २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. प्रवासीकेंद्री असलेल्या रिक्षा व्यवसायात दरवर्षी भर पडत असून, अनेकदा नियमबाह्य प्रकार समोर येतात. प्रवासी वाहनांना विशिष्ट वयोमर्यादा असते. त्यानंतर त्या वाहनाचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करता येत नाही. रिक्षांसाठी ही आयुर्मर्यादा २० वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. अशा वाहनांचा शोध घेऊन त्या स्क्रॅप करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आज, दि. १ एप्रिलपासून शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रिक्षा, चालक, परमिट अशी महत्त्वाची एकत्रित माहितीचे स्टीकर प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी लावण्याबाबतसुद्धा आरटीओने सूचना केल्या आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

वाहनचोरी, दुचाकी क्रमांकामध्ये छेडछाड रोखण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून शहरातील वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यास सुरुवात होणार आहे. आरटीओने ही जबाबदारी डिलर्सकडे सोपविली असून, ही नंबर प्लेट स्वतंत्र असणार नाही. अत्याधुनिक स्वरुपाच्या या नंबरप्लेटमध्ये छेडछाड करणे शक्य होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. ही जबाबदारी असलेले डिलर्स यासाठी कितपत इच्छुक आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, यामुळे वाहन नोंदणीचा खोळंबा होऊन ग्राहकांना नाहक मनस्तापाला सामोरे जाऊ लागू नये, याकडे आरटीओने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राकडून कांदा खरेदीचे आमिष!

$
0
0

५० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग केंद्र सरकारवर नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन इतका विक्रमी कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून तो साठवणार कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असून, हा निर्णय केवळ नाराज शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तर नाही नाही, असा मुद्दा समोर आला आहे.

यातील ४५ हजार टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार टन कांदा गुजरात राज्यातून खरेदी केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केंद्राकडून महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, केंद्रावर ही कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याला सरासरी ३०० ते ६०० रुपयांपर्यंतचे दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. निर्यात मूल्य शून्य करूनही कांद्याचे मार्केट वधारले नाही. त्यामुळे २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तरीही ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याने आता नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

कांद्याचे दर वाढल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जातो. आपत्तकालीन पुरवठ्याअंतर्गत प्रतिवर्षी कांदा खरेदी होत असतो. आतापर्यंत १३ हजार मेट्रीक टनपर्यंत कांदा खरेदी केल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र ५० हजार मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रीक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रीक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाफेड ही खरेदी करणार आहे. नाफेड व्यतीरिक्त शेतकरी समूह गट शेतकरी कंपन्या यांच्या मार्फतही नाशिक, पुणे, नगर, धुळे येथे खरेदी करण्यासंदर्भात नाफेडचे कार्यकारी संचालक यांची बैठक झाली असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांना फसवणारा आहे. मुळात हा खरेदी केलेला कांदा साठवायला जागाच नाही. गेल्यावर्षी खरेदी केलेला कांदा गोडाऊनमध्ये सडला. २५ हजार मेट्रिक टनाचे असलेले उद्दिष्ट साठवणुकीअभावी साडेतेरा हजार मेट्रिक टनापर्यंत खाली आणावे लागले. तर ५० हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार. हा तर फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे.

-- चांगदेवराव होळकर ,

माजी उपाध्यक्ष नाफेड

आचारसंहितेचा भंग?

५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचा परिणाम अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे कदाचित याबाबतीत तक्रार करण्यात आली तर येत्या काळात हा निर्णय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यास हा निर्णय मागेही घ्यावा लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर हड्डी कारखाने सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हड्डी कारखान्यांवर अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. रविवारी सायंकाळी पथकाने ओवाडी नाला परिसरात असलेल्या ४ ते ५ बेकायदेशीर कारखाने सीलबंद करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर मागच्याच आठवड्यात मृत जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रविवारी पथकाने बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हड्डी व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे. विशेष पोलिस पथकास याविषयी माहिती मिळाल्यावर रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले हड्डी उकळ्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने नष्ट केले जाणार आहे. बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई दरम्यान काहींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईस पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी मटाशी बोलताना दुजोरा दिला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई व सुरत पॅसेंजर २३ एप्रिलपर्यंत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबई-भुसावळ आणि भुसावळ-सुरत पॅसेंजर या रेल्वेगाड्या दि. १ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे ही माहिती प्रसिद्धिपत्रकान्वये देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-भादली सेक्शनदरम्यान नवीन तिसऱ्या रेल्वे मार्गाचे, तसेच नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार असून, २३ एप्रिलपर्यंत या मार्गावरील मुंबई व सुरतकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी १ ते २३ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक ५११५३ डाऊन मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गाडीदेखील या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ अप आणि ५९०७५ डाऊन सुरत-भुसावळ, तसेच गाडी क्रमांक ५९०७८ अप आणि ५९०७७ डाऊन भुसावळ-सुरत पॅसेंजर या गाड्याही १ ते २३ एप्रिलपर्यंत धावणार नाहीत.

--

फायदा मोठा, तोटा नगण्य

कल्याण ते इगतपुरीदरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम झाले आहे. इगतपुरी ते भुसावळपर्यंत काम सुरू आहे. तिसरी रेल्वेलाइन झाल्यानंतर गाड्यांच्या फेऱ्यांचे प्रमाण वाढणार असून, तांत्रिक कारणांमुळे गाड्या रद्द करण्याची नामुष्की टळणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर गाडी रुळांवरून घसरली किंवा अन्य अपघात झाला, तरी तिसरी लाइन सुरू असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. त्यामुळे या कामासाठी ब्लॉकमुळे काही दिवस रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागत असल्या, तरी भविष्यातील फायदा विचारात घेता ब्लॉकमुळे होणारा तोटा नगण्य आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’त भाकरी फिरणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेतील राजकारणाने पुन्हा डोके वर काढले असून, नव्या कार्यकारी मंडळाच्या आगामी बैठकीत भाकरी फिरविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे वातावरण प्रमुख सचिवांच्या विरोधात गेले असून, या पदावरच गदा आली आहे. प्रमुख सचिव हे पद संस्थेत सर्वांत महत्त्वाचे असून, त्यासाठी आता रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 'सावाना'तील कार्यकारी मंडळाची धुसफूस एव्हाना जगजाहीर झाली असून, कार्यक्षम आमदार पुरस्कारावेळी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्याने धमक्या आल्याचे भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यावरून कार्यकारी मंडळात उभी फूट पडली आणि 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने याबाबत तात्काळ खुलासा करण्यात आला. परंतु, हे प्रकरण तेथेच थांबलेले नसून, त्याने आता वेगळे वळण घेतले आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकांवर बैठका होत असून, काही गुप्त खलबतेदेखील होत आहेत. काही पदाधिकारी एका बाजूला झाले असून, आपल्यातीलच एकाला प्रमुख सचिव करावे, असा आग्रह धरला जात असल्याचे ऐकिवात आहे. आता नव्या कार्यकारी मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत प्रमुख सचिव पदावरच गदा येणार असल्याचे सूतोवाच काही पदाधिकाऱ्यांनी केले असून, या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

--

अद्याप मी अजेंडा काढलेला नाही. बैठकीच्या चार दिवस अगोदर अजेंडा काढला जातो. नव्या कार्यकारी मंडळाची बैठक हा रूटीन प्रकार आहे. अजून त्याला वेळ आहे. सध्या मार्चएण्डच्या कामात व्यग्र आहे.

-श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सावाना'त भाकरी फिरणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेतील राजकारणाने पुन्हा डोके वर काढले असून, नव्या कार्यकारी मंडळाच्या आगामी बैठकीत भाकरी फिरविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वातावरण प्रमुख सचिवांच्या विरोधात गेले असून, या पदावरच गदा आली आहे. प्रमुख सचिव हे पद संस्थेत सर्वांत महत्त्वाचे असून, त्यासाठी आता रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 'सावाना'तील कार्यकारी मंडळाची धुसफूस एव्हाना जगजाहीर झाली असून, कार्यक्षम आमदार पुरस्कारावेळी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्याने धमक्या आल्याचे भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यावरून कार्यकारी मंडळात उभी फूट पडली आणि 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने याबाबत तात्काळ खुलासा करण्यात आला. परंतु, हे प्रकरण तेथेच थांबलेले नसून, त्याने आता वेगळे वळण घेतले आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकांवर बैठका होत असून, काही गुप्त खलबतेदेखील होत आहेत. काही पदाधिकारी एका बाजूला झाले असून, आपल्यातीलच एकाला प्रमुख सचिव करावे, असा आग्रह धरला जात असल्याचे ऐकिवात आहे. आता नव्या कार्यकारी मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत प्रमुख सचिव पदावरच गदा येणार असल्याचे सूतोवाच काही पदाधिकाऱ्यांनी केले असून, या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालये गजबजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चएंड म्हणजे महसूल वसुलीसह चालू आर्थिक वर्षातील सर्व व्यवहारांना अंतिम रूप देण्याचा काळ. रविवार असूनही ३१ मार्च रोजी बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये सुटीच्या दिवशीही आर्थिक ताळेबंद पूर्ण करण्याची लगबग पाहायला मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालयासह कोशागारात सकाळपासूनच कामाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. वीज वितरण कंपनीनेही आज ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची सुविधा सुरू ठेवली होती. सुटी असूनही इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांची कार्यालये सुरू ठेवून नियमितपणे कामकाज केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा कोशागारासह १४ उपकोशागारांमध्ये विविध सरकारी कार्यालयांनी सुमारे २०० कोटी रुपयांची ६०० बिले सादर केली. मार्चमध्ये कोशागार विभागात सुमारे १२०० कोटी रुपयांची ८,७०० बिले सादर झाली. ३१ मार्च रोजी रविवार असल्यामुळे दोन ते तीन दिवस आधीच बिले सादर करण्यास सरकारी कार्यालयांनी प्राधान्य दिले. त्यामुळे रविवारी कोशागार विभागावरील ताण काहीसा हलका झाला. मार्चअखेरीस सादर झालेली बिले पुढील आठ दिवसांत निकाली काढली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोकडजप्ती, मद्यसाठा तक्रारींचा अहवाल दररोज द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आचारसंहिता काळात पोलिसांनी शस्त्रास्त्र व मद्यसाठा, तसेच रोकड जप्तीसंदर्भातील तक्रारींचा दैनंदिन अहवाल निवडणूक शाखेस सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी दिले.

मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सी. बी. राजपूत, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मांढरे म्हणाले, की जाहिरात प्रसारण, सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचा खर्चदेखील निवडणूक खर्चात अंतर्भूत असल्याचे पत्र निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना द्यावे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन होईल, याकडेही सर्वांनी लक्ष ठेवून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. भरारी पथकांची कारवाई, मनुष्यबळ उपलब्धतेचा आढावा, मतदानाच्या दिवशी करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचा आढावा, तसेच सी व्हिजिल्सवर प्राप्त तक्रारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

सहाय्यक खर्च नियंत्रकांची जबाबदारी मोठी

निवडणूक काळात उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी आढावा बैठकीत दिल्या.

सागर म्हणाले, की निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चमर्यादा आहे. प्रत्येक सहाय्यक खर्च नियंत्रकानी उमेदवाराच्या प्रत्येक निवडणूक कार्यक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवावे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी नियोजनपूर्ण काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दोन एप्रिल रोजी जाहीर होणार असून, प्रत्यक्ष निवडणूकप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व सहाय्यक खर्च नियंत्रकांनी नेमून देण्यात आलेल्या मतदारसंघात उपस्थित राहून उमेदवार व पक्षांच्या मार्फत होणाऱ्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या अशा विविध माध्यमांद्वारे करण्यात येणाऱ्या खर्चावर देखरेख ठेवून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणूक शाखेस सादर करावा, असे निर्देश आनंदकर यांनी या वेळी दिले. भरारी पथकाद्वारे जप्त करण्यात आलेली रोकड, मौल्यवान ऐवज यांची परिपूर्ण चौकशी करून जप्त केलेले ऐवज निवडणूक शाखेत जमा करून त्याचा अहवालदेखील सादर करावा, असेही आनंदकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर चैत्रोत्सव

$
0
0

कळवण : सालाबादप्रमाणे कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर १३ ते १९ एप्रिलदरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी गडावर सोमवारी प्रशासकीय बैठक झाली. बैठकीत यात्रेचे नियोजन करण्यात आले.

सविस्तर वृत्त..४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर १३ पासून चैत्रोत्सव

$
0
0

प्रशासकीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सालाबादप्रमाणे कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर १३ ते १९ एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी गडावर सोमवारी प्रशासकीय बैठक पार पडली. या बैठकीत यात्रेचे नियोजन, पायी येणारे भविक, पायऱ्यांनी गडावर येणारे आणि ट्रॉली येणारे भाविक यांची दर्शनाची सोय, पाण्याची सोय आदी विषयांवर चर्चा करून संपूर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आले.

सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पोलिस उपअधीक्षक वाघमारे, तहसीलदार बंडू कापसे, देवस्थान ट्रस्ट विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, सप्तशृंगीगड सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, पंचायत समिती कळवणचे गटविकास अधिकारी डी. एल. बहिरम, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रशांत खैरे उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी माहिती दिली. यात्राकाळात चार डेटल डिटेक्टर असतांनाही गर्दीमुळे ते काढून ठेवावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असताना त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून गर्दीचे योग्य नियोजन करून मेटल डिटेक्टरचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी पोलिस व महसूल यंत्रणेसह देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या.

घाटातील कठडे दुरुस्ती, संरक्षण भिंती दुरुस्ती, धोंड्या कोंड्याच्या मार्गावरील धोकादायक विहिरीबाबत तसेच अन्य डागडुजी करणे बाबत उपजिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता केदार यांना सूचना केली. ६ एप्रिलपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे न झाल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी उपस्थित यंत्रणेला दिले. गर्दीकाळात मोबाइल रेंज उपलब्ध राहील, याबाबतीतही बीएसएनएल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांना व शासकीय यंत्रणेला तसेच देवस्थान ट्रस्ट कर्मचारी वर्गाला देण्यात येणाऱ्या पासेसबाबत कडक धोरण अवलंबवावे हेही या बैठकीत ठरविण्यात आले. फ्युनिक्युलर ट्रॉली संबंधित सदस्य या बैठकीस उपस्थित नव्हते. अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पहिल्यांदाच उपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला.

शनिवारी पुन्हा आढावा

अनेकदा चैत्रोत्सव नियोजन बैठकीत झालेल्या चर्चेनुसार होईल ही अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र त्यावर नियोजन होत नाही. हे लक्षात आल्याने नियोजन काय केले यासंदर्भात अहवाल सादर करण्यात यावा. त्यासंबंधीची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात येत्या ९ एप्रिल रोजी घेण्यात येईल, असा फतवा तहसीलदार बंडू कापसेंनी काढल्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नवी दिल्ली… - नाशिक

सकाळी ११.०० …- दुपारी १२.५५

नाशिक… - नवी दिल्ली

दुपारी १.२५… - दुपारी ३.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्ती विकासतर्फे मतदान जागृती

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images