Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘भाई’ चित्रपटाला थिएटरच मिळेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरील 'भाई, व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाला मोक्याची थिएटर्स मिळत नसल्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत चांगलीच आगपाखड केली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या चित्रपटासाठी थिएटर मिळत नाही, मग मराठी माणसाने जायचे कोठे असा सवालही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रात ४००० थिएटर्समध्ये सिम्बा हा हिंदी चित्रपट सुरू आहे. त्यापैकी मोक्याची काही थिएटर्स मांजरेकर मागत असून, त्यांना वितरकाने याबाबत नकार दिला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिम्बा हा चांगला चित्रपट असून, त्यात अनेक मराठी कलाकार आहेत. त्याबाबत आपल्याला काही म्हणायचे नाही. मात्र, 'भाई' चित्रपटासाठी थिएटर मोकळे करून दिले पाहिजे. कारण हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पु. ल. देशपांडे हे मराठी माणसाचे दैवत होते. त्यांचा जीवनपट दाखवण्यासाठी मुंबई, पुणे येथे थिएटर मिळू नये यासारखी शोकांतिका दुसरी नाही, असेही मांजरेकर म्हणाले. भाईंना जीवनात अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला होता. आता त्यांच्या चित्रपटालाही संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे, असे सांगतानाच हा केवळ इगो प्रॉब्लेम असल्याचे मांजरेकर म्हणाले. 'पुलं'चा चित्रपट म्हणजे दिव्य होते. या चित्रपटाची लांबी मोजली तर ती नऊ तासांची भरणार असल्याने बरीच काटछाट करून पूर्वार्ध व उत्तरार्ध अशी रचना केली आहे. उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्यात लगेचच रीलिज करणार आहे. यात त्या काळातील सत्तर कलाकारांच्या भूमिका असल्याचे मांजरेकर म्हणाले. यात बाळासाहेब ठाकरे, हिराबाई बडोदेकर, पंडित नेहरू यांच्या भूमिका आहेत. मात्र, एका प्रश्नाचे उत्तर देताना यात कुसुमाग्रजांची भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले. पु. लं. ची भूमिका साकारणारे सागर देशमुख यांनी भूमिकेविषयी त्यांचे अनुभव सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजकांचे आंदोलन स्थगित

$
0
0

वीजदरवाढीबाबत लवकरच निर्णय होणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीज दरवाढीसंदर्भात उद्योजकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीचे विभागीय संचालक श्रीकांत जलतारे यांनी दिल्याने उद्योजकांनी त्यांचे प्रस्तावित आंदोलन स्थगित केले आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व औद्योगिक, व्यापारी व ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता बी. के. जानवीर यांची गुरुवारी भेट घेतली. महावितरणने केलेल्या अवास्तव दरवाढीच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय उद्योजकांनी सांगितला. तसेच ५० हून अधिक उद्योजक महावितरणच्या कार्यालयात आले होते.

वीज नियामक आयोगाने प्रत्यक्षात दिलेली ३ ते ६ टक्के दरवाढ, पॉवर फॅक्टर इन्सेटिंव कमी केल्याने ती २० ते २५ टक्के झाली आहे. त्यामुळे उद्योजकांना भरमसाठ बिले प्राप्त झाली असून उद्योजक अडचणीत आले आहेत. नाशिकमधील स्टील उद्योग दुसऱ्या राज्यात स्तलांतरित होत आहेत. वीज नियामक आयोगाने जी दरवाढ जाहीर केली होती. तीचा कालावधी २०२० पर्यंत असताना महावितरणने आयोगाला चुकीची माहिती देऊन मुदतीपूर्वीच दरवाढ केली आहे. यामुळे उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता बी. के. जानवीर यांनी उद्योजकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महावितरणचे विभागीय संचालक श्रीकांत जलतरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जलतरे यांनी मंडलेचा यांच्याशी संवाद केला. राज्यातील उद्योजकांच्या अडचणींची व भावनांची आम्ही दखल घेतली असून त्यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला. याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र आहिरे, योगिता आहेर, मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी, सुधाकर देशमुख, आयमा सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, उदय रकिबे, विजय जोशी, विराल ठक्कर आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटविताना पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेला विरोध करून पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना वडाळा नाका भागात घडली असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरूजीतसिंग तेजपालसिंग हुजंन व कमलजितसिंग तेजपालसिंग हुजंन (रा. मधुबन शोरूम जवळ, काठेगल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वडाळा नाका भागात महापालिकेने बुधवारी (दि. ३) दुपारी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. सर्व्हे नं. ४९४ -३ व सर्व्हे नं. ४९५ मधील अतिक्रमणे जमीनदोस्त करीत असतांना संशयितांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत विरोध केला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या हवालदार बहरवाल, पोलिस नाईक रवींद्र खांडेकर आणि शिपाई विष्णू पोले यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. यावेळी शिपाई पोले यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लक्ष्मण गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

भाडे तत्त्वावरील कॅमेऱ्याचा अपहार

भाडेतत्वावर घेतलेला कॅमेरा परत न करता अपहार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील एका फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धैर्यशील इंद्रभान सूर्यवंशी (रा. बोराळे, ता. चांदवड) असे अटक केलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. या प्रकरणी आतिश राजपूत (रा. विसेमळा, कॉलेजरोड) यांनी तक्रार दिली. राजपूत यांचा कॉलेजरोडवरील युनिटी पार्क येथे कॅमेरे भाडेतत्वाने देण्याचा व्यवसाय आहे. लग्नसराईच्या काळात गरजेनुसार फोटोग्राफर व्हिडीओ कॅमेरे अथवा फोटोग्राफी कॅमेरे भाडे तत्वावर घेतात. एक हजार रुपयांची अनामत रक्कम घेऊन एका दिवसासाठी ते पाचशे रुपये दर आकारले जातात. संशयित फोटोग्राफर सूर्यवंशी याने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सुमारे ३५ हजारांचा कॅमेरा भाडे तत्वावर नेला. मात्र, सत्तर दिवस उलटूनही कॅमेरा किंवा त्याचे भाडे न दिल्याने राजपूत यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली.

ध्यानमग्न साधकाचे मोबाइल लंपास

ध्यानधारणेसाठी गोदाकाठी बसलेल्या एका व्यक्तीचे दोन मोबाइल चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना केटीएचएम परिसरातील बोटक्लब परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकमंडई येथील अब्दुल कादीर रज्जाक बेग यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बेग हे २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ध्यानधारणा करण्यासाठी केटीएचएम परिसरातील गोदाकाठावरील बोटक्लब भागात गेले. निवांत ठिकाणी त्यांची ध्यानधारणा सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी चटईजवळ ठेवलेले सुमारे १८ हजार रुपयांचे दोन मोबाइल चोरून नेले.

दहशत पसरविणाऱ्या

तरुणास पंचवटीत अटक

दहशत माजविण्यासाठी लोखंडी फायटर घेऊन फिरणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. फायटर हस्तगत करून त्याच्याविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज धनराज रामचंदानी (२५, रा. भोरे सदन, सरदार चौक) असे संशयितांचे नाव आहे. रामकुंडावरील रामसेतू पुलाजवळ त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई विष्णू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी शिवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाची आत्महत्या

देवळालीगावातील आण्णाभाऊ साठेनगर भागातील २८ वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजू संजय हरणे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने बुधवारी (दि. ३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात साडी बांधून गळफास लावून घेतला होता. शेजाऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन त्यास बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष शनिवारी मालेगावी

$
0
0

मालेगाव : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर ४ व ५ जानेवारी रोजी धुळे व नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ५ जानेवारी रोजी धुळे येथील दौरा आटोपून अभ्यंकर हे दुपारी ३ वाजता मालेगावी शासकीय विश्रामगृहावर येतील. यावेळी अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांच्यासमवेत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी, मनपा आयुक्त, मनपा शिक्षण मंडळ अधिकारी यांच्यासमवेत ते चर्चा करणार आहेत. दुपारी ४ वाजता मनमाडकडे प्रस्थान करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्राबाई फुले यांना

$
0
0

फुले सांस्कृतिक मंडळ

क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्योतिबा फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना नाशिकरोड येथे अभिवादन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर, गायत्री गाडेकर, डॉ. सीमा ताजणे, शोभा मंडलिक, उषा वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेकडून कारवाईचा बार!

$
0
0

१२ सहकारी संस्थांना नोटिसा; निसाका, नासाकाचाही समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अध्यक्षांसह प्रशासनाने आता वसुलीवर जोर दिला आहे. जिल्ह्यातील १२ बड्या सहकारी संस्थांवर कर्जवसुलीसाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बँकेच्या ३८ आजी-माजी संचालकांना एकीकडे नियमबाह्य कर्जवाटप आणि थकबाकी वसुलीसाठी सहकार विभागाने नोटिसा बजाल्या असतानाच, आता ३४७ कोटींची थकबाकी थकविल्याप्रकरणी १२ सहकारी संस्थांसह या संचालकांना बँकेने कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. नासाका, निसाकासह आर्मस्ट्राँग कारखाना, श्रीराम सहकारी बँकेचा त्यात समावेश आहे.

जिल्हा बँक सध्या आर्थिक संकटातून जात असून, बँकेची थकबाकी वाढल्याने नवीन कर्जवाटपासाठीही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नूतन अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकी वसुलीवर जोर दिला आहे. विशेषत: बड्या थकबाकीदार संस्थाकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. बॅँकेने सन २००२ ते २०१३ दरम्यान केलेल्या कर्जवाटपापैकी तब्बल ३४७ कोटींची थकबाकी आहे. या कर्जवाटपात मोठी अनियमीतता असून, हे कर्ज वसूल न झाल्याने बँकेचा एनपीए वाढला. या पार्श्वभूमीवर बॅँकेच्याच माजी संचालकांनी या वाटप झालेल्या कर्जप्रकरणाची चौकशीची मागणी केली असता, या कर्जाचे वाटप नियमबाह्य पद्धतीने केल्याचे समोर आले आहे. या १२ संस्थांना अनियमीत कर्जवाटप झाल्याचा निष्कर्ष नोंदवत बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधक यांनी ३८ आजी-माजी संचालकांसोबतच १२ संस्थांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना मालमत्तांवर थेट टाच आणली जाणार आहे. सोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. सोबतच बँकेचे ८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संचालकांनी नियमबाह्य कर्जवाटप केले असतानाही अधिकाऱ्यांनी त्याला होकार दर्शवल्याने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहे. संचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ तारखेला आपले म्हणणे मांडण्याची संधी जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.

... या संस्थांचा समावेश

निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना, आर्मस्ट्रॉंग, रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या, मालेगाव, श्रीराम सहकारी बॅंक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि. का. सोसायटी या संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. खुलासा समानधाकरक न आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे सर्व सदस्य स्थायीतून होणार निवृत्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेत आपल्याच सदस्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे भाजपने आता स्थायी समितीवरील सर्व नऊ सदस्यांना निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार भाजपचे पाच सदस्य निवृत्त होणार असले तरी उर्वरित चार सदस्यही राजीनामा देतील, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. वाद टाळण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर सभापतींसह नऊ सदस्य भाजपचे आहेत. स्थायीच्या सदस्याचा कार्यकाळ हा नियमाप्रमाणे दोन वर्षाचा असून १६ पैकी ९ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. सध्या स्थायीवर हिमगौरी आहेर-आडके, दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, शांता हिरे, भिकूबाई बागूल, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया हे नऊ सदस्य आहेत. यापैकी पाच सदस्य नियमाप्रमाणे निवृत्त होणार आहेत. उर्वरित चार सदस्यांना दोन वर्षांची संधी मिळणार आहे. मात्र, भाजपने वाद टाळण्याठी तसेच सर्वांना पदे मिळण्यासाठी सर्व नऊ सदस्यांना निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षाप्रमाणेच स्थायीवर नवीन टीम पाठवली जाणार आहे. त्यामुळे दिनकर पाटील आणि उद्धव निमसेंनाही राजीनामा द्यावा लागणार आहे. या दोघांना भाजपने स्थायीच्या सभापतीपदाचे आश्वासन दिले होते. निदान दुसऱ्या वर्षी तरी संधी मिळेल या अपेक्षेवर दोन्ही सदस्य होते. मात्र, आता त्यांनाही राजीनामा द्यावा लागणार असल्याने उर्वरित सदस्य राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बातम्या १

$
0
0

प्रतीक, ताहेर यांची विजयी सलामी

राज्यस्तरीय

बॉक्सिंग स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रतीक गोडगे, ताहेर इनामदार यांनी १९ वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सलामी दिली.

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ६४ किलो गटात पिंपरी चिंचवडच्या प्रतीक गोडगेने मुंबई उपनगरच्या ओजस्वी यादवला पराभूत केले, तर पुणे शहरच्या ताहेर इनामदारने औरंगाबादच्या कौस्तुभ केदारला हरविले. अन्य लढतीत पुणे जिल्ह्याच्या केशव हंसने जळगावच्या सिद्धार्थ सपकाळेवर विजय नोंदविला. ५२ किलो गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने आक्रमक खेळ करत औरंगाबादच्या अक्षित मोहतुरेवर बाजी मारली. ५६ किलो गटात पिंपरी चिंचवडच्या शशांक पगारेने आक्रमक खेळ करत नगरच्या गणेश बागरेवर बाजी मारली.

स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बागवे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी ऑलिंपियन मनोज पिंगळे, शि‌वछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, शशिकांत तापकीर, भरत व्हावळ, स्पर्धा व्यवस्थापक मदन वाणी आदी उपस्थित होते.

निकाल : ४९ किलो : आदित्य दंडी (अकोला) वि.वि. साहिल शेख (पुणे); अक्षय माळी (नंदुरबार) वि.वि. तन्मय दाभाडे (पुणे); पवन साळवे (जळगाव) वि.वि. शुभम नवघरे (नाशिक); संदेश काटकर (कोल्हापूर) वि. वि. महंमद रिझवान अन्सारी (मुंबई), श्रेयस कांबळे (सांगली) वि. वि. गौरव जाधव (कोल्हापूर शहर), मुकुल शिंदे (सातारा) वि. वि. मीर पगार (नगर), विशाल देवीराम (पालघर) वि. वि. सिद्धार्थ उपाध्यय (मुंबई उपनगर), शिवाजी गेदाम (क्रीडापीठ) वि. वि. सुभान नझीरहुसेन (सांगली शहर).

५२ किलो : गणेश पडवळ (कोल्हापूर) वि. वि. ऋत्वीक लोखंडे (चंद्रपूर), नाना पिसाळ (क्रीडापीठ) वि. वि. महंमद अमीर शेख (मुंबई जिल्हा), यश पाटील (ठाणे) वि. वि. प्रथमेश मराठे (नंदुरबार), देवेंद्रसिंह दामडे (जळगाव) वि. वि. प्रतीक नाबगे (नगर जिल्हा).

५६ किलो मुले : विक्रांत सुपेकर (औरंगाबाद) वि. वि. रणवीर महाडिक (सोलापूर), अब्दुल अन्सारी (मुंबई उपनगर) वि. वि. रोहित अटोळे (सातारा), निशांतसिंग (रायगड जिल्हा) वि. वि. राहुल अलाने (बीड).

६० किलो मुले : शुभम भालेराव (ठाणे) वि. वि. प्रथमेश वाघमारे (नगर जिल्हा).

६४ किलो मुले : सुजित माळी (सांगली) वि. वि. उत्कर्ष कडू (नाशिक), संकेत मुटकुरे (नागपूर) वि. वि. अल्पेश यादव (धुळे), तेजस कर्णेकर (मुंबई) वि. वि. गणराज कुवर (नंदुरबार), स्वप्नील साळवी (सातारा) वि. वि. फरदिन खान (नगर), सोहेल पप्पूवाले (क्रीडापीठ) वि. वि. सूरज शिंदे (लातूर), शुभम कुसुरकर (सोलापूर) वि. वि. प्रज्वल पाटील (सांगली), बुद्धभूषण निकम (जळगाव) वि. वि. प्रसाद जाधव (नगर), दीपक जाधव (क्रीडापीठ) वि. वि. अथर्व लाड (नाशिक).

९१ किलोवरील मुले : नूर महंमद शेख (नाशिक शहर) वि. वि. अक्षित सकदसारिया (मुंबई उपनगर).

बोपण्णा-शरण उपांत्य फेरीत

चुरशीच्या लढतीत पेस- रेयस व्हॅरेला जोडीवर मात

महाराष्ट्र ओपन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारताच्या रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीने महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत गुरुवारी भारताचा लिअँडर पेस आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार मिगुल अँजल रेयस-व्हॅरेला जोडीचे आव्हान परतवून लावत दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ३८ वर्षीय बोपण्णाची आक्रमक सर्व्हिस, ३२ वर्षीय शरणचा नेटजवळचा सुरेख खेळ आणि दोन्ही खेळाडूंनी दाखवलेला संयम विजयासाठी महत्त्वाचा ठरला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील कोर्टवर एकवर ही लढत रंगली. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित बोपण्णा-शरण जोडीने सहा मॅच पॉइंट वाचवीत पेस-व्हॅरेला जोडीवर ६-७ (४), ६-४, १७-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ही लढत १ तास ४५ मिनिटे चालली. गेल्या वर्षी या स्पर्धेत बोपण्णा हा जीवन नेदुन्चेळीयनसह सहभागी झाला होता, तर पेस हा पुरव राजासह खेळला होता. त्या वेळी बोपण्णा-नेदुन्चेळीयन जोडीने पेस-पुरव जोडीला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड काही पेसला करता आली नाही. पहिला सेट जिंकूनही पेस-व्हॅरेला जोडीला बोपण्णा-शरण जोडीचे आव्हान परतवून लावण्यात यश आले नाही. आता उपांत्य फेरीत बोपण्णा-शरण जोडीची सिमोन बोलेल्ली-इव्हान डॉडिग जोडीशी लढत होईल. सिमोन-इव्हान जोडीने दुसऱ्या फेरीत केविन क्रवित्झ-आंद्रेस मिल्स जोडीवर ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पेस-व्हॅरेला जोडीने टायब्रेकमध्ये सरस खेळ करून बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-शरणने आपला संयम गमावला नाही. तिसऱ्या गेममध्ये ४५ वर्षीय पेसची सर्व्हिस ब्रेक झाली. मात्र, पुढच्याच गेममध्ये शरणलाही आपली सर्व्हिस राखता आली नाही. यानंतर सातव्या गेममध्ये पेसची, तर आठव्या गेममध्ये शरणची सर्व्हिस ब्रेक झाली. या नंतर व्हॅरेलालाही आपली सर्व्हिस राखता आली नाही. बोपण्णाने ही संधी साधली आणि आक्रमक सर्व्हिस हे आपले 'अस्त्र' वापरून हा सेट ६-४ असा जिंकून बरोबरी साधली. यामुळे सुपरटायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात दोन्ही जोड्यांकडून ड्रॉप, ओव्हर हेड, व्हॉली, बॉडी शॉट याचा अप्रतिम वापर करण्यात आला.

यात बोपण्णा-शरणने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, पुढे पेस-व्हॅरेलाने 'कमबॅक' करून ८-८ अशी बरोबरी साधली. पेसने जबरदस्त सर्व्हिस करून मॅच पॉइंट मिळवला. यानंतर बोपण्णाने बिनतोड सर्व्हिस करून ९-९ अशी बरोबरी साधली. यानंतर बोपण्णा-शरण जोडीने सहा मॅच पॉइंट वाचविले, तर एक मॅच पॉइंट मिळवला होता. यानंतर १५-१५ अशा बरोबरीनंतर व्हॅरेलाचा रिटर्न चुकला आणि बोपण्णा-शरण जोडीने १६-१५ अशी आघाडी घेतली. यानंतर बोपण्णा-शरण जोडीने पुढील गुण घेत विजयी जल्लोष केला.

एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

भारताच्या रामकुमार रामनाथनला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. याच बरोबर भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. रामला चौथ्या मानांकित मलेक जझिरीवर सनसनाटी विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, विजयाच्या समीप असताना रामकडून चुका झाल्या आणि त्याला त्याचा फटका बसला. जझिरीने ही लढत ६-७ (६), ७-६(५), ६-३ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही लढत रात्री १ वाजून २० मिनिटांनी संपली. जागतिक क्रमवारीत १३२ व्या स्थानावर असणाऱ्या रामने लढतीत दुसऱ्या सेटच्या टायब्रेकपर्यंत वर्चस्व राखले होते. यानंतर त्याला सर्व्हिसमध्ये सातत्य राखता आले नाही. खरे तर या लढतीत रामची सर्व्हिस जझिरीपेक्षा सरस झाली होती. २४ वर्षीय रामने २० बिनतोड सर्व्हिस केल्या, तर जझिरीने केवळ ६. मात्र रामने ८ दुहेरी चुका केल्या. यातील, ४ त्याने निर्णायक सेटमध्ये केल्या. त्यामुळेच हातातोंडाशी आलेला विजय रामला मिळवता आला नाही.

अँडरसन, कार्लोविचची आगेकूच

एकेरीतील इतर लढतींत अग्रमानांकित केविन अँडरसनने स्पेनच्या २१ वर्षीय जाउम मुनारला ६-३, ६-३ असे सहज नमविले, तर बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने ट्युनिशियाच्या मलेक जझिरीचे आव्हान ७-५, ६-२ असे परतवून लावले. यानंतर क्रोएशियाच्या इव्हो कार्लोविचने लॅटव्हियाच्या एर्नेस्ट्स गुलबिसवर ७-६ (५), ७-६ (५) असा विजय मिळवला.

---------

पेसचे अपयश कायम....

बोपण्णा-शरण जोडी या स्पर्धेला टोकियो ऑलिंपिकची तयारी म्हणून बघत आहेत. दुसरीकडे, पेसला प्रतिस्पर्धी जोडीमध्ये एक तरी भारतीय असताना मागील अडीच वर्षात एकही लढत जिंकता आलेली नाही. प्रतिस्पर्धी शरण असताना त्याने चार लढती गमावल्या आहेत. जीवन नेदुन्चेळीयनविरुद्धही तो चार वेळा पराभूत झाला आहे. बोपण्णाविरुद्ध तो फेब्रुवारी २०१७मध्ये दुबईत पराभूत झाला होता. भारताच्या अव्वल टेनिसपटूविरुद्ध पेसने शेवटचा विजय सप्टेंबर २०१६मध्ये मिळवला आहे. त्याने सेंट पीटरर्सबर्ग ओपन स्पर्धेत आंद्रे बेगमनसह खेळताना पूरव राजा-शरण जोडीला नमविले होते.

...

धावफलक :

भारत : पहिला डाव - मयंक अगरवाल झे. स्टार्क गो. लायन ७७, लोकेश राहुल झे. शॉन मार्श गो. हॅझलवूड ९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १३०, विराट कोहली झे. पेन गो. हॅझलवूड २३, अजिंक्य रहाणे झे. पेन गो. स्टार्क १८, हनुमा विहारी खेळत आहे ३९; अवांतर - ७; एकूण - ९० षटकांत ४ बाद ३०३

बाद क्रम : १-१०, २-१२६, ३-१८०, ४-२२८.

गोलंदाजी : मिचेल स्टार्क १८-०-७५-१, जोश हॅझलवूड २०-७-५१-२, पॅट कमिन्स १९-३-६२-०, नॅथन लायन २९-५-८८-१, मार्नस लबूस्काखनी ४-०-२५-०.

--------------

खेळ आकड्यांचा...

१८ - चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावले.

८ - पुजाराने परदेशात आठवे शतक झळकावले. यापूर्वी, पुजाराने जोहान्सबर्गला (२०१३) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, कोलंबोला (२०१५ व २०१७) आणि गॉलला (२०१७) श्रीलंकेविरुद्ध, साउदम्प्टनला (२०१८) इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली; तसेच या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड आणि मेलबर्न कसोटीत पुजाराने शतक झळकावले होते. त्यापाठोपाठ आता सिडनी कसोटीतही पुजाराने शतक साजरे केले.

५ - कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवे शतक झळकावले. पुजाराने इंग्लंडविरुद्धही पाच शतके झळकावली आहेत.

४५८ - या दौऱ्यात आतापर्यंत पुजाराने ७६.३३च्या सरासरीने सर्वाधिक ४५८ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

३ - ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत पुजाराने तीन शतके झळकावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशी कामगिरी करणारा तो तिसराच भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, १९७७च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुनील गावसकर यांनी तीन शतके, तर २०१४-१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने ४ शतके झ‌ळकावली होती.

११३५* - या दौऱ्यात चौथी कसोटी खेळणाऱ्या पुजाराने आतापर्यंत ११३५ चेंडू खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्यांच्या यादीत पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९२८-२९च्या दौऱ्यात इंग्लंडच्या हर्बर्ट सुटक्लाइफ यांनी १२३७ चेंडूंचा सामना करताना ३५५ धावा केल्या होत्या, तर भारताच्या राहुल द्रविडने २००३-०४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १२०३ चेंडूंचा सामना करत ६१९ धावा केल्या होत्या.

...

झीशन अली यांचे

आयटाकडून पुन्हा स्वागत

पुणे : खेळाडूंशी असलेला उत्तम संपर्क लक्षात घेऊन अखिल भारतीय टेनिस असोसिएशनला (आयटा) डेव्हिस कप प्रशिक्षक झीशन अली यांचे वरिष्ठ निवड समितीत पुन्हा 'स्वागत' करावे लागले.

मागे गुरूग्राम येथे 'आयटा'ची कार्यकारी समितीची बैठक झाली होती. त्यात 'आयटा'ने झीशन अली यांना डच्चू दिला होता. त्याचबरोबर समितीचे प्रमुख एस. पी. मिश्रा यांनाही वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी माजी खेळाडू विशाल उप्पल आणि अंकिता भांबरी यांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वीच समितीत असलेले रोहित राजपाल यांना अध्यक्ष करण्यात आले होते, तर नंदन बाळ आणि बलरामसिंग यांचे स्थान कायम राखण्यात आले होते. मात्र, गुरुवारी 'आयटा'ने अचानक 'यू टर्न' घेतला. राजपाल म्हणाले, 'खेळाडूंच्या नेहमी संपर्कात असलेल्यांपैकी झीशन एक आहेत. म्हणूनच आम्ही समितीत पुन्हा त्यांचा समावेश केला आहे. झीशन हेच आता खेळाडूंना मार्गदर्शन करतील.' झीशन हे पाच सदस्यीय समितीत उप्पल यांची जागा घेतील. उप्पल यांना समितीतून वगळताना त्यांना विश्वासात घेतले होते का, असे विचारले असता राजपाल म्हणाले, 'त्यांना या निर्णयाची आधीच कल्पना देण्यात आली होती. त्यांची याबाबत काहीही तक्रार नाही. नवीन सदस्यांची पहिली बैठक झाली तेव्हाही उप्पल उपस्थित नव्हते.' उप्पल म्हणाले, 'आयटाकडून आपल्याला नियुक्तीचे कुठलेही लिखित स्वरुपात पत्र मिळाले नव्हते. त्यामुळे नाराज व्हायचे कारण नाही.' आश्चर्याची गोष्टी म्हणजे उप्पल यांची नुकतीच फेड कपचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर अंकिता भांबरीची प्रशिक्षकपदी. उप्पल म्हणाले, 'मला फेड कपचा कर्णधार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मी त्याचीच तयारी करीत होतो. अस्तानाला रवाना होण्यापूर्वी आम्ही शिबिरही घेणार होतो. तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही काही दिवस आधीच अस्तानाला जाणार होतो.' आधीच्या फेड कप लढतीत भांबरी हिच कॅप्टन आणि प्रशिक्षक होती.

...

असोसिएशनला माझे योगदान योग्य वाटत असेल, तर संघाच्या हितासाठी मी नेहमीच तयार असतो. मला समितीतून वगळण्याचा निर्णयही असोसिएशनचाच होता आणि तो मी मान्यही केला होता. आता त्यांना माझी गरज वाटत असेल, तर मी पुन्हा ती भूमिका निभावण्यास तयार आहे. खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसची ताजी माहिती माझ्याकडे आहे. खेळाडूंच्या मी नेहमीच संपर्कात असतो.

- झीशन अली.

...

..अशी चूक पुन्हा होणार नाही!

सिडनी : एकीकडे पहिल्या दोन कसोटीत सलामीवीरांना अपयश आल्यानंतर मयंक अगरवालने मिळालेल्या संधीचे सोने केले खरे; पण आपल्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात त्याला पुन्हा अपयश आले. अगरवालने ७७ धावांची खेळी केली.

आपल्या या अपयशाबद्दल अगरवाल म्हणाला की, शतकी खेळी करण्यात मला अपयश आले, यामुळे मी निराश झालो आहे. पण, यातून मला धडा मिळाला आहे. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. मी नॅथन लायनवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यात मला यश आले नाही. मी स्वतःची विकेट फेकली याचे मला वाईट वाटते.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून अगरवाल आणि पुजारावर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करण्यात आला. त्याबद्दल अगरवाल म्हणाला, 'न्यूझीलंडच्या 'अ' संघाकडून अशा गोलंदाजीचा अनुभव मी घेतलेला आहे. पण, त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाची अशी गोलंदाजी नक्कीच आव्हानात्मक होती. त्यांचे वेगवान उसळते चेंडू खेळणे कठीण होते. त्यात त्यांनी सातत्यही राखले आणि जराही निसटण्याची संधी आम्हाला मिळू दिली नाही.'

...

पुजाराचा दरारा!

मालिकेत तिसरे शतक; मयंकचे अर्धशतक; भारत ४ बाद ३०३

वृत्तसंस्था, सिडनी

ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेट मालिकेत सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून मोहोर उमटविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात १३० धावांची नाबाद खेळी करत आपला दरारा कायम असल्याचे दाखवून दिले. पहिल्याच दिवशी भारताने पुजाराच्या या शतकामुळे ४ बाद ३०३ अशी दमदार मजल मारली आहे. भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल अजूनही लयीत असल्याचे दिसून आले. त्याने ७७ धावांची खेळी केली; पण शतकापासून तो पुन्हा एकदा वंचित राहिला.

दिवसअखेर पुजारा आणि हनुमा विहारी (३९) नाबाद होते. भारताने पहिल्या दिवशी केलेल्या या कामगिरीमुळे ही मालिका ३-१ अशी जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

पुजाराने २५० चेंडूंचा सामना करत १६ चौकारांसह ही शतकी खेळी केली; तसेच विहारीसह ७५ धावांची अभेद्य भागीदारीही रचली. भारताचा सलामीवीर के.एल. राहुल पुन्हा अपयशी ठरला. त्याने अवघ्या ९ धावा केल्या. पण, दुसऱ्या टोकाकडून मयंकने किल्ला लढवला. नंतर त्याला पुजाराची साथ लाभली. दोघांनी उपाहारानंतर दोघांनी आपली भागीदारी ११६ धावापर्यंत नेली. उपाहारानंतर त्यांनी आक्रमक खेळ केला. अगरवालने आपले दुसरे अर्धशतक यादरम्यान झळकाविले. त्याच्या या खेळीत २ षटकारांचा समावेश होता, जे षटकार त्याने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर लगावले. पण, नंतर लायननेच त्याचा अडसर दूर केला. ३४व्या षटकात अनावश्यक फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मात्र पुजाराच्या संयमी खेळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. अगरवाल परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचे मैदानात आगमन झाले; पण यावेळीही त्याची प्रेक्षकांनी हुर्यो उडविली. मात्र कव्हर ड्राइव्ह चौकार लगावून कोहलीने आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्यानंतर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाला विराटच्या (२३) रूपात यश मिळाले. विराटला सातत्याने लेगला चेंडू टाकून बेजार करण्याचा डाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आखला आणि त्यात विराट अडकला. जोशच्या गोलंदाजीवर तो यष्टीपाठी झेलचीत झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी खेळता आली नाही. फटका मारण्यापासून परावृत्त करण्याचे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे तंत्र यावेळीही यशस्वी ठरले आणि अजिंक्य उसळत्या चेंडूवर झेलचीत झाला.

६३व्या षटकात भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यावेळी भारताला मोठ्या भागीदारीची गरज होती. या दोघांनी ७२ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. अजिंक्यनंतर मैदानात उतरलेल्या हनुमा विहारीने पुजारावरील ओझे कमी केले. त्यामुळे पुजाराने १९९ चेंडूंत आपले १८वे कसोटी शतक पूर्ण केले. पुजाराने यावेळी चौथ्यांदा २००पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला आहे. १९७७-७८मध्ये सुनील गावसकर यांनी असा विक्रम केला होता. पुजाराचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सहावे शतक आहे.

तत्पूर्वी, भारताने सकाळी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात यावेळी दोन बदल झाले. अश्विन अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्याजागी कुलदीप यादवला स्थान मिळाले तर के.एल. राहुलने रोहित शर्माची जागा घेतली. ऑस्ट्रेलियन संघातही दोन बदल केले गेले. त्यात पीटर हँड्सकॉम्ब आणि मार्नस यांचा समावेश होता. अॅरन फिंच आणि मिचेल मार्शऐवजी या दोघांचा विचार करण्यात आला.

...

दक्षिण आफ्रिकेने पाकला

१७७ धावांत रोखले

वृत्तसंस्था, केपटाउन

ड्युअॅन ऑलिव्हिएर, डेल स्टेन आणि कॅगिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानचा पहिला डाव १७७ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा २१ षटकांत १ बाद ८५ धावा केल्या होत्या. त्या वेळी सलामीवीर मार्कराम ५७, तर हशिम अमला ७ धावांवर खेळत होता.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. पाचव्या षटकात डेल स्टेनने फखर झमानला (१ धाव) बावुमाकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ फिलँडरने इमान उल हकला (८ धावा) पायचीत केले, तर ड्युअॅनने अझर अलीला (२) अमलाकरवी झेलबाद केले. त्यामुळे पाकिस्तानची ३ बाद १९ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर शान मसूद आणि असद शफिक यांनी पाकिस्तानला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. रबाडाने असदला बाद करत ही जोडी फोडली. असदने २६ चेंडूंत ४ चौकारांसह २० धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ आलेला बाबर आझमही केवळ दोन धावांची भर घालून परतला. त्याला ड्युअॅनने बाद केले. त्यानंतर शान मसूद आणि सर्फराज अहमद यांनी पाकिस्तानला शतकी टप्पा पार करून दिला. ही जोडी जमणार असे वाटत असतानाच रबाडाने शानला बाद केले. शानने ७१ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार सर्फराजने महंमद आमीरच्या साथीने पाकिस्तानला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. ४५व्या षटकात ड्युअॅनने सर्फराजला बाद केले. सर्फराजने ८१ चेंडूंत ९ चौकारांसह ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर झुंज देत आमीरने पाकिस्तानला १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : पहिला डाव - ५१.१ षटकांत सर्वबाद १७७ (सर्फराज अहमद ५६, शान मसूद ४४, महंमद आमीर नाबाद २२, ड्युअॅन ऑलिव्हिएर ४-४८, डेल स्टेन ३-४८, कॅगिसो रबाडा २-३५) वि. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव - २१ षटकांत १ बाद ८५ (मार्कराम खेळत आहे ५७, हशिम अमला खेळत आहे ७, डीन एल्गर २०).

..

यश नहारचे शतक;

पूना क्लबचा विजय

पुणे : यश नहारच्या नाबाद शतकाच्या जोरावर पूना क्लबने पुणे महापौर करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनी इलेव्हनवर दहा विकेटनी मात केली.

सनी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यात अद्वय सिधयेने सर्वाधिक ४२ धावांची, तर हर्ष संघवीने ३० धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना यश नहार आणि अजिंक्य नाईक यांनी पूना क्लबला बाराव्या षटकातच विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : सनी इलेव्हन - २० षटकांत ६ बाद १३१ (अद्वय सिधये ४२, हर्ष संघवी ३०, शुभम हरपळे नाबाद २१, दीपक शिळमकर २-१७) पराभूत वि. पूना क्लब - ११.४ षटकांत बिनबाद १३५ (यश नहार नाबाद १०४, अजिंक्य नाईक नाबाद २१); रांजणे अॅकॅडमी - सर्वबाद ४६ (अक्षय साळवे ११, पियूष साळवी ३-५, धीरज फटांगरे २-११) पराभूत वि. डेक्कन जिमखाना - ४ बाद ४९ (सौरभ नागवडे ३१, ऋषभ चव्हाण ३-९).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधी खर्चाचाही कंटाळा!

$
0
0

मंजूर झालेल्यापैकी १५ टक्केच खर्च; आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या बजेटमध्ये विकासकामांसाठी पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिस्सारण, समाजकल्याणसह १३ विभागांना सुमार एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, डिसेंबरपर्यंत अवघे १५ ते २० टक्केच निधी खर्च झाला आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जास्त निधी शिल्लक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावत, खुलासा मागितला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे मार्चपर्यंत निधी खर्चाचे नियोजनही सादर करावे लागणार असल्याने अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकासकामांसाठी त्रिसूत्री लावत, रस्ते कामांना ब्रेक लावला होता. शहराच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम, मलनिस्सारण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुर‌वठा या विभागांवरचा निधी अर्थसंकल्पात वाढविला गेला. नागरिकांशी थेट संपर्कात येणाऱ्या या १३ विभागांना जास्तीचा निधी दिला होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, समाजकल्याण आणि नगरनियोजन विभाग या चार विभागांना सहाशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, या विभागांना निधी खर्चात अपयश आले आहे. मुंढे यांनी निधीखर्चाकडे दुर्लक्ष केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुंतल्याने निधीखर्चाकडे फारसे लक्ष दिलेले नसल्याचे समोर आले आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील वर्षाचे अर्थसंकल्पाचे नियोजन सुरू केले असतांनाच, त्यांच्यासमोर धक्कादायक बाबी समोर येत आहेत. डिसेंबरच्या बैठकीत प्रत्येक विभागाने सादर केलेली खर्चाची आकडेवारी धक्कादायक असून निधी उपलब्ध असतांनाही तो खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामाची संथ गती राखल्याने धारेवर धरले असून निधी खर्च का झाला नाही, याबाबतचा खुलासा करण्यास सांगितले आहे. सोबत तीन महिन्यात निधी कसा खर्च करणार याचे नियोजन सादर करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मुंढे नेमके काय करत होते?

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात विकासकामांपेक्षा बैठकांचाच सिलसिला जास्त चालत होता. दररोज बैठका घेऊन मुंढे विकासकामांचा आढावा घेत होते. मात्र, तरीही एवढा निधी अखर्चित राहिल्याबद्दल लोकप्रतिनिधींनीही तोंडावर हात ठेवला आहे. मुंढे दररोज बैठका घेत असतांनाही, एवढा निधी अखर्चित राहिल्यामुळे मुंढे नेमके बैठका कशाच्या घ्यायचे, असा प्रश्न आता लोकप्रतिनिधी करीत आहेत. विकासकामांसाठी पैसा द्यायचे नाहीत आणि दुसरीकडे निधीही खर्च करायचा नाही, असे त्यांचे धोरण होते, असा आरोप केला जात आहे.

विभाग.......................मंजूर निधी................खर्च निधी

बांधकाम.....................२७६ कोटी................५६ कोटी १२ लाख

आरोग्य व अभियांत्रिकी.....३०३ कोटी................४० कोटी

समाजकल्याण................१३५ कोटी................१६ कोटी

नगररचना.....................१११ कोटी................३३ लाख

विद्युत व यांत्रिक................५९ कोटी................१३ कोटी २२ लाख

शिक्षण............................६९ कोटी................३७ कोटी

घनकचरा........................६९ कोटी................३२ कोटी

सार्वजनिक आरोग्य............३० कोटी................९ कोटी ६१ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांची अचानक तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेने गुरुवारी विविध भागांत अचानक बेशिस्त रिक्षा चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामुळे रिक्षाचालकांची चांगलीच धावपळी उडाली. वाहतूक पोलिसांनी १२८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली, तर २१ रिक्षाचालकांना थेट वाहनकोर्टात धाडले. याशिवाय मोबाइलवर बोलणाऱ्या २८ वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

शहर वाहतूक शाखेच्या चारही युनिट्सच्या हद्दीत आणि प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फ्रंट सीट, तसेच कागदपत्रे नसलेल्या रिक्षांना पोलिसांनी लक्ष्य केले. कारवाईदरम्यान रिक्षा सोडून जाणाऱ्यांच्या रिक्षांना जॅमर बसविण्यात आले. याचवेळी पोलिसांनी मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा रडारवर घेतले. त्यांच्याकडून पाच हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग सागरचा गिर्यारोहणात झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीव्र इच्छाशक्ती, मेहनत घेण्याची तयारी कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकते, याचे उदाहरण म्हणजे सागर वसंत बोडके. जन्मत: ७५ टक्के अंधत्व असूनही गिर्यारोहणाच्या आवडीमुळे गड, शिखर पादाक्रांत करत अंगी असलेली जिद्द यशापर्यंत पोहोचवतेच हे त्याने सिद्ध केले आहे. राष्ट्रीय पातळीवर अंधाच्या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातही त्याने विशेष प्राविण्य मिळविले आहे.

इगतपुरीतील मोडाळे येथील सागरला जन्मत:च अंधाराचा सामना करावा लागला. या आव्हानावर मात करणेही तो शिकला. त्यामुळे शिक्षण, नोकरी, छंद या सर्वांमध्येच तो त्याचे कर्तृत्व सिद्ध करतो आहे. दहावीत ८२.६० टक्के गुण प्राप्त करत सागर विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाचा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा होता. हातमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनाही त्यामुळे सागरच्या शिक्षणाची चिंता सतावत होती. मात्र, समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाचा आधार त्याला मिळाल्याने त्याची निवास व भोजनाची चिंता मिटली. त्यामुळे अभ्यास, गिर्यारोहण यात तो यश मिळवू शकला. गिर्यारोहणात असा कोणता गड कोट नाही की, सागरने तो पादाक्रांत केलेला नाही. कळसूबाई शिखर ४ वेळा सर करणारा पहिला अंध तरुण म्हणून त्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने याच प्रावीण्याच्या बळावर वर्षभरापूर्वी मुंबई महापालिकेत नोकरीही मिळविली. त्यामुळे सागरला नवा सन्मानही प्राप्त झाला. त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत अनेक संस्थांनी त्याचा पुरस्कारांनी सन्मान केला आहे.

\Bहे गड, किल्ले केले पादाक्रांत\B

हरिहर गड, सुधागड, रायगड, विश्रामगड, रामशेज, गाळणा, अडकिल्ले, दुर्गाभांडार, पाबरगड किल्ला, किल्ले हतगड, बळवंतगड, चोल्हेरे, मालेगावचा भूईकोट, अंकाई-टंकाई, दुन्धागड, पिसोळगड, किल्ला मुल्लेर, अजमिरा, दातेगड, खांदेरी, उंदेरी, जलदुर्ग, पद्मदुर्ग, कोलाराई, सायन पोर्ट, मुंबई, खैराई, शहगड, पेमगिरी, माणिकपुंज, खोजाभुइकोट, तोरणगड (पुणे), कंकराळा (मालेगाव) आदी किल्ले सागरने लिलाया सर केले आहेत.

आई-वडिल, शिक्षक, प्रशिक्षक तसेच काही सेवाभावी संस्था यांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. माझ्यातील कलागुणांना खरी उभारी देण्याचे काम समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाने केले आहे. वसतिगृहाचे गृहप्रमुख सुभाष फड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. धीर व आधार दिला यामुळेच मी यश मिळवू शकलो.

- सागर बोडके

लोगो : लुई ब्रेल जयंती विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणात नांदगावचा टक्का घसरला

$
0
0

दुष्काळ, स्थलांतरामुळे मोहिमेवर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत नांदगाव तालुक्याचा टक्का जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. या तालुक्यातील ६१ हजार १६५ बालकांपैकी ४२ हजार ५४१ बालकांना म्हणजेच ७० टक्के बालकांनाच लस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भागात ऊसतोड कामगारांचे स्थलांतराचे प्रमाण मोठे असल्याने लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्ततेस अडचणी निर्माण होत असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ मध्ये जगातील गोवर आजाराने मृत्यूचा अभ्यास केल्यानंतर त्यात जगातील १ लाख ३४ हजार बालमृत्यू गोवरने झाल्याचे आढळले. यामध्ये ४९ हजार बालके भारतातील होती. त्यामुळे या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील बालकांना गोवर, रुबेला लसीकरण देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ११ लाख ३९ हजार ५४९ ग्रामीण भागातील मुले-मुली लाभार्थी असून, त्यापैकी १० लाख २६ हजार ९९९ मुला-मुलींना या मोहिमेंतर्गत लस देण्यात आली आहे. म्हणजेच ग्रामीण भागात एकूण ९० टक्के लसीकरणाचे काम झाले आहे. मोहिमेत मालेगावमध्ये कमी प्रतिसाद मिळत असल्याच्या कारणामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मौलवींची भेटही घेतली होती. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात सर्वांत कमी प्रतिसाद नांदगाव तालुक्यात आहे. त्यानंतर दिंडोरी तालुक्यात १०० टक्के लसीकरण झाले असून, खालोखाल त्र्यंबक तालुक्यात ९७ टक्के, तर देवळा व निफाड तालुक्यात ९४ टक्के लसीकरण झाले आहे.

नांदगाव तालुक्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांची कामे झाल्यावर ते तेथून निघून जातात. परिणामी, लसीकरणासाठी नोंदी असलेल्या सर्व बालकांचे लसीकरण करण्यास अडचणी येत आहेत. तरीदेखील १५ तारखेपर्यंत १०० लसीकरण पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

\B- डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्याधिकारी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले स्मारक कृती समितीच्या सभेत गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संगमेश्वरातील मोसम पुलावरील महापालिका शाळा ७४ च्या जागेवर महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी वाल्मीकनगर शाळेत सुरू असलेल्या कृती समितीच्या बैठकीत उपमहापौर सखाराम घोडके यांच्या मुलाने गोंधळ घातला आणि सभा उधळून लावली, असा आरोप माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

येथील शासकीय विश्रामगृहावर पगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन घोडके यांच्यावर तोफ डागली. शहरात महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. स्मारकाविषयी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २) तालुक्यातील विविध गावात सभा घेण्यात आल्या. वाल्मीकनगर शाळेत रात्री उशिरा बैठक सुरू असतांना घोडके यांचा मुलगा ललित तसेच विनोद वाघ यांनी गोंधळ घातला. बैठकीत भाषण करणाऱ्या कैलास तिसगे यांना शिवीगाळ करीत दमबाजी केल्याचा आरोप पगारे यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. यावेळी उत्तम कचवे, प्रकाश वाघ, संजय वाघ, नितीन शेवाळे, नथु सूर्यवंशी, नरेंद्र वसईकर आदी उपस्थित होते.

व्यापारी गाळे बांधण्याचा अट्टहास

फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी सर्वपक्षीय विचार मंच संचालित कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. परंतु, संबंधित जागेवर व्यापारी गाळे बांधण्याचा उपमहापौर सखाराम घोडके, ललित घोडके यांचा अट्टहास आहे. म्हणून त्यांनी सभेत गोंधळ घातला, असा आरोप पगारे यांनी केला.

याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुलेंचे स्मारकास विरोध नाही. मात्र, या मुद्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे. स्मारकाच्या नावाखाली गावोगावी बैठका घेऊन गुलाब पगारे आमची बदनामी करीत आहेत. तसे करण्याचे काय कारण? संबंधित जागेवर व्यापारी गाळे उभारण्याचा ठराव सरकारने विखंडित केला आहे. स्मारकाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करायला हवा.

- सखाराम घोडके, उपमहापौर, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वयाचे बंधन झुगारून जिद्दीने ध्येय गाठा

$
0
0

उद्योजिका नेहा म्हैसपूरकर यांचे महिलांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांनी घर आणि कुटुंबाच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करतांना वयाने बंधन बाळगून काम करण्यापेक्षा वेगळे करायचे आहे, अशी जिद्द ठेऊन काम केल्यास ध्येयापर्यंत नक्की पोहचता येते. पण हे काम करतांना त्यात आपल्याला समाधान मिळते की नाही, हे जाणून घेणेही गरजेचे आहे, असे मत उद्योजिका नेहा म्हैसपूरकर यांनी केले.

माळी समाज सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्तीदिन कार्यक्रम शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये गुरुवारी झाला. गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार, व्याख्यान, नाटिका असा सर्वसमावेशक हा कार्यक्रम होता. यावेळी उद्योजिका म्हैसपूरकर बोलत होत्या. यावेळी मेट शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हैसपूरकर म्हणाल्या, की सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केल्याने महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून देशातील विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. महिलांनी सावित्रीबाईंचे विचार आपल्या कृतीत आणण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सुनिता निमसे म्हणाल्या, की महिलांना सावित्रीबाईंमुळे स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केल्यास चांगला समाज निर्माण मदत होईल.

माळी समाज सेवा समितीचे महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला माळी यांनी प्रास्ताविक केले. तर सरचिटणीस चारुशीला माळी यांनी आभार मानले. यावेळी नीलिमा सोनवणे, लता राऊत, प्रीती महाजन, नगरसेविका माधुरी बोलकर, सुप्रिया खोडे, कुसुम शिंदे, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुष्का माळी व श्रावणी बागूल यांनी 'मी सावित्रीबाई बोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर करुन सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. तसेच 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा संदेश दिला.

\Bया महिलांचा सन्मान

\Bकार्यक्रमात गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भिमा जोंधळे, मंगला रोकडे, मंजुळा महाजन, संजीवनी म्हैसफुके, सुधा पगार, रेवती माळी, रागिणी सूर्यवंशी, दिपाली चौधरी या महिलांना सन्मानित करण्यात आले.

..

लोगो : तिचं विश्व

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीजन अॅकॅडमी

$
0
0

व्हिजन अॅकॅडमी

जेलरोड : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने जेलरोडच्या शिवराम नगर येथील व्हिजन अकेडमी शाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका सुनीथा थॉमस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्या म्हणाल्या की, ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल या बंधनात अडकून ठेवले जात होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाज व्यवस्थेला नजुमानता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री मुक्तीचा व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. दिपाली भट्टड म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी बालविवाह, सती जाणे, केशवपन आदी अत्याचारांना प्रखर विरोध केला. हें सर्व करतांना त्यांना क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांनी साथ दिली. त्यामुळे स्त्री शिक्षणात त्यांचेही भरीव योगदान आहे. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर नाटीका सादर केली. प्रवीण अहिरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घटनाविरोधी सरकारला खाली खेचा!

$
0
0

संविधान सन्मान सभेत डॉ. राजू वाघमारे यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संविधान निर्मात्यांनी या देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक समान दर्जा दिला आहे. सध्याचे भाजप-शिवसेना सरकार नागरिकांचे अस्तित्वच नाकारत आहे की काय, अशी शंका येते. भारतीय संविधानामुळे केवळ मागासवर्गीयच नाही तर देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणार आहे. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत हा विषय नेऊन, अशा जातीयवादी सरकारला खाली खेचले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केले.

नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गुरुवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित संविधान सन्मान सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव होत्या. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र बागूल, सुरेश मारू, नगरसेवक राहुल दिवे, भाई आंबोरे उपस्थित होते.

प्रादेशक समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह सुरेश मारू व रमेश साळवे यांना डॉ. वाघमारे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वाघमारे यांनी यावेळी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. भाजप देशातील जनतेला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे संविधानविरोधी सरकार खाली खेचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शोभा बच्छाव यांनी केंद्र आणि राज्यात काँग्रेसचे सरकार परत आणण्यासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन केले. रमेश कहांडोळे, वत्सला खैरे, आशा तडवी, वसंत ठाकूर, बबलू खैरे, गोपाळ बस्ते, हनीफ बशीर, ज्युली डिसुझा, राजकुमार जेफ, रामकिसन चव्हाण, अरुण दोंदे, प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी राहुल दिवे, सुरेश मारू, रमेश साळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित श्याम खनपटे, अशोक शेंडगे, विलासराज बागूल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मस्थळ फेरपडताळणी; पुढील आठवड्यात बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ५७५ अनधिकृत धार्मिक स्थळाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळांची फेरपडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील आठवड्यात फेरपडताळणीचा अहवाल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीच्या मान्यतेनंतर अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारीनिहाय यादी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या धार्मिक स्थळांच्या निष्कासनासाठी राज्य सरकारने निर्धारित केलेली प्रक्रिया अंमलात न आणता महापालिकेने सरसकट कारवाई सुरू केल्याने विनोद थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १ नोव्हेंबर २०१८ रोजी या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने महापालिकेला अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने धार्मिक स्थळावर कारवाई करण्यापूर्वीची प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची फेरपडताळणी केली जात असून नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी व सातपूर या पाचही विभागांमधील फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिकरोड विभागातील फेरपडताळणी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारपर्यंत सहाही विभागातील धार्मिक स्थळांबाबतचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त होईल. त्याच आठवड्यात धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीच्या मान्यतेने अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारीनिहाय यादी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर हरकती सूचना मागवल्या जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थशास्त्र, भूगोल विषयावर हिरे कॉलेजमध्ये चर्चासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात अर्थशास्त्र, भूगोल या विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

'इंडियन अॅग्रिकल्चर : प्रॉब्लेम्स अॅन्ड प्रॉस्पेक्टस' या विषयावर विचारमंथन केले जाणार आहे. कृषिप्रधान भारतातील बहुतांश लोक हे शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. भारतीय शेतीच्या समस्या आणि त्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येणे शक्य आहे, याचा विचार या चर्चासत्रात केला जाणार आहे. अर्थशास्त्र आणि भूगोल विषयातील राष्ट्रीय स्तरावरील अनेक ख्यातनाम संशोधक-अभ्यासक या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. नंदू पवार, कला व वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. विनीत रकिबे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवर फॅक्टरसंदर्भात ‘निमा’त कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'निमा'तर्फे पॉवर फॅक्टर संदर्भात शुक्रवारी (दि. ४) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निमा हाऊस, सातपूर येथे सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.

१ सप्टेंबर २०१८ पासून वीजदरांत झालेल्या बदलास अनुसरून पॉवर फॅक्टर पेनल्टी, इन्सेन्टिव्ह या विषयावर विस्तृत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. टीडीके एप्कॉस कंपनी कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. कार्यक्रमास वक्ते प्रो. डॉ. डी. ई. कुशारे हे असून उपस्थितांना वरील विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. एमएसईडीसीएल चे मुख्य अभियंता जनवीर हे प्रमुख अतिथी असणार आहेत. वरील विषयावर उद्योजक व व्यावसायिकांमध्ये जनजागृती निर्माण होणे आवश्यक असून या कार्यशाळेद्वारे उद्योजकांचा संभ्रम, प्रश्न व शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न असून उद्योजक व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे यांनी केले आहे.

वस्त्रोद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी

नाशिक : वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या वेबासाइटवर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करावयाचे आहे. सर्व संबंधित वस्त्रोद्योग घटकांनी https://www.dirtexmah.gov.in या वेबसाइटवर ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी व वीजदर सवलतीसाठी अर्ज पाठवावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार बसडेपोसाठी जागेची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने सिटी बससेवेसाठी आवश्यक चार डेपोसाठी राज्यपरिवहन महामंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे. महामंडळाच्या ताब्यात असलेले नाशिकरोड, जुने सीबीएस, सातपूर व निमाणी हे बसडेपो भाडेतत्त्वावर मिळावेत, असा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे. आता महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

सिटी बससेवा पालिकेमार्फत चालविण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यासाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर सिटी बससेवा चालविण्याचा महासभेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मक्तेदार नियुक्तीसाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. महापालिकेच्या बससेवेअंतर्गत शहरात ४०० सीएनजी बसची खरेदी केली जाणार आहे. बस खरेदी आणि चालक नियुक्तीची जबाबदारी मक्तेदाराची असली तरी या बससेवेसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टर्स उभारण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. पालिकेला सर्वप्रथम डेपो हवे असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे असलेले चार डेपो भाडेतत्त्वावर मिळावेत, असा प्रस्ताव महामंडळाकडे देण्यात आला आहे. नाशिकरोड येथील मुक्तिधाममागील आनंदनगर परिसरात महामंडळाने सिंहस्थकाळात ५.७४ हेक्टरपैकी ३ हेक्टर जागेत डेपो क्रमांक तीनची उभारणी केली आहे. या ठिकाणी १२ फलाट आहेत. याशिवाय जुने सीबीएस येथील ०.६३ हेक्टर जागेतील १० फलाटांचे बसस्थानक, सातपूर येथील एमआयडीसीलगतच्या ०.९३ एकर जागेत उभारणी केली जात असलेला बसडेपो तसेच निमाणी येथील ०.६४ हेक्टर जागेतील बसस्थानकाची जागा पालिकेला बसडेपोसाठी भाडेतत्त्वावर द्या, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

चार ठिकाणी बस टर्मिनल

बसडेपोसह चार ठिकाणी आणखी बस टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी हे बस टर्मिनल असतील. पहिल्या टप्प्यात आडगाव येथील ट्रक टर्मिनस, तपोवनातील साधूग्रामसमोरील आरक्षित जागा, नाशिकरोड येथील रेल्वस्थानकालगतची सिन्नरफाटा परिसरातील जागा, तसेच पाथर्डी फाटा येथील जकात नाक्याच्या जागेवर बस टर्मिनल उभारण्याची योजना आहे. शेल्टरसाठी पीपीपी तत्त्वावर निविदा काढण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images