तूर्तास पाणीदिलासा! (मुख्य अंक पान १ लीड) नगरमधून जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी (दि. ३१) सुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणी सोडणे लांबणीवर पडल्याने नगर आणि नाशिककरांनाही तात्पुरता दिलासा मिळाला आहे. --- बोनस आला रे! (प्लस पान १ लीड) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सातपूर आणि अंबड औद्यौगिक वसाहतींमधील ३३ कंपन्यांनी कामगारांसाठी घसघशीत बोनस देण्याची घोषणा केली आहे. कामगारांना १६ ते ५० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार असून, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत मोठे चलनवलन घडून येणार आहे. बोनस जाहीर झाल्यामुळे कामगारांत समाधानाचे वातावरण आहे. --- नाशकात १७ 'ट्रॅप' (प्लस पान २ लीड) नाशिक विभागात लाचखोरीच्या गुन्ह्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यावर्षी आतापर्यंत ८० सापळे लावले आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्राचा विचार करता जळगाव जिल्हा लाचखोरीत सर्वांत आघाडीवर असून, त्यातही महसूल आणि पोलिस खाते नेहमीप्रमाणे सर्वांत पुढे आहे. नाशिकमध्ये १७ सापळे यशस्वी करीत 'एसीबी'ने २१ जणांना अटक केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट