Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिक्षकाच्या निरोप समारंभात विद्यार्थी, पालक गहिवरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

एखाद्या शिक्षकाची बदली झाली म्हणून संपूर्ण गावावर शोककळा पसरणे, विद्यार्थ्यांनी रडारड करणे असा अनुभव इगतपुरी तालुक्यातील फांगुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याला आला. यामुळे जि. प. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते किती घट्ट असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

फांगुळगाव शाळेत गेल्या अकरा वर्षांपासून असलेले शिक्षक वैभव धर्मराज गगे यांची बदल झाली. त्यांची बदली होताच संपूर्ण गावावर जणू शोककळाच पसरली. गेले पंधरा दिवस विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या तोंडी एकच विषय होता तो म्हणजे आपल्या सरांची बदली झाली.

ऑनलाइन बदल्यांची अपरिहार्यता लक्षात घेता गावकऱ्यांनी हा निर्णय स्वीकारला. सरांच्या निरोप समारंभात संपूर्ण गाव जमा झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. विद्यार्थ्यांना हुंदका आवरणे अवघड झाले होते. गगे सरांबद्दल बोलताना प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता. इगतपुरी तालुक्यात मुंबईतील विविध संस्थांच्या मदतीने तालुक्यातील बावीस शाळांचे डिजिटलायजेशन व तीन गावात महिलांसाठी पाणीपुरवठ्याची सोय गगे सरांनी करून दिली आहे. 'तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्यामुळे ह्या जन्माचे सार्थक झाले,' अशी भावना गगे सरांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीच्या व्यापाऱ्यांबाबत खोत यांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण, मालेगाव, सटाणा व साक्री तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांचे नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्या दरम्यान विक्री केलेल्या द्राक्षांचे ७ कोटीहून अधिक रक्कम दिल्ली येथील आर. जे. सी. कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी द्राक्ष उत्पादकांनी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. खोत यांनी या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे संबंधित व्यापाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. सदाभाऊ खोत यांची द्राक्ष उत्पादक खंडू शेवाळे, जिभाऊ कापडणीस, बापू खैरणार, नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार यांनी भेट घेतली. बागलाण तालुक्यातील मोसम परिसरासह, साक्री, मालेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या ३० पेक्षाही अधिक वर्षांपासून दिल्ली येथील आजादपूर बाजार समितीमधील अधिकृत व्यापारी आर. जे. सी. कंपनीच्या दुकान क्र. सी. ४९४ चे मालक रेाहित प्रकाश अजवाणी, जतीन अजवाणी, व प्रकाश अजवाणी यांच्याकडे द्राक्ष पाठवित होते. आजपर्यंत द्राक्ष विक्रीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत होते.

मात्र नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी १८ या महिन्या दरम्यान सुमारे ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे विक्री केलेल्या द्राक्षांचे पैसे अद्यापही आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. वेळोवेळी दुरध्वनीद्वारे चर्चा हेावून पैसे पाठवित असल्याचे भासवित होते. मात्र आज आठ महिने उलटूनही आमचे पैसे मिळत नसल्याने आमची पसवणुक झाल्याची आमच्या लक्षात आल्या असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी राज्यमंत्री खोत यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फनिक्युलर ट्रॉलीचे सोमवारी लोकार्पण

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील पहिल्या फनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (२ जुलै) मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत वणी येथील सप्तश्रृंग गडावर होणार आहे. फडणवीस यांचा प्राथमिक दौरा शुक्रवारी सकाळी प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनही तयारीला लागले आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाण्याकरिता भाविकांना ५५१ पायऱ्या चढाव्या लागतात. अपंग, वृद्ध तसेच बालकांना या पायऱ्या चढण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. भाविकांच्या सोयीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फनिक्युलर ट्रॉलीच्या प्रस्तावाला मान्यता मिळविली. १५ ऑगस्ट २००९ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक अडचणींवर मात करीत तब्बल नऊ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या ट्रॉलीच्या वापराला यंत्रणांनी तपासणीअंती हिरवा कंदील दाखविला आहे.

आचारसंहितेत अडकले होते उद्घाटन

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व त्यापाठोपाठ आलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे या ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडत होते. परंतु, शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लवकरच संपणार असून, त्यामुळे पुन्हा विकासकामांचा धडाका सुरू होणार आहे. या ट्रॉलीच्या लोकार्पण सोहळयाला २ जुलैचा मुहूर्त जवळपास निश्‍चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्र्यांचा प्राथमिक दौरा शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार सोमवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री फडणवीस विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. तेथून वाहनाने ते दुपारी एक वाजता सप्तशृंग गडावर पोहोचतील. येथे फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर भवानी पाझर तलावाचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुन्हा ओझर विमानतळावर येऊन विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल होऊ शकतो, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पार पडावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे औद्योगिक धोरण ‘उद्योगस्नेही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात नवे औद्योगिक धोरण हे 'उद्योगस्नेही' असणार असून, ते सप्टेंबरअखेर जाहीर केले जाईल. हे धोरण राज्यात औद्योगिक विकास प्रगतिपथावर नेणारे असेल, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिक येथे उद्योजकांशी संवाद साधला. ते म्हणाले, की महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण हे देशात पहिल्या क्रमांकाचे असेल. त्यात जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती कशी होईल यावर फोकस केला जाणार आहे. हे धोरण जाहीर करण्यापूर्वी राज्यभर उद्योजकांशी संवाद साधला जात आहे. त्यातून त्यांच्या सूचना व अडचणी लक्षात घेऊन धोरण तयार केले जाणार आहे. हे धोरण तयार झाल्यानंतर ते सर्वांना बघतासुद्धा येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे नवीन औद्योगिक धोरणाची रूपरेषा ठरविण्याकरिता उद्योगमंत्री सुभाष देसाई तीन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर असून, शुक्रवारी ते नाशिकला आले. या वेळी आयोजित केलेल्या बैठकीत विविध औद्योगिक संघटनांबरोबर हॉटेल ताजमध्ये त्यांनी चर्चा केली. या वेळी उद्योजकांनी नाशिकचे विविध औद्योगिक प्रश्नही त्यांच्यासमोर मांडले. बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, जळगाव येथील उद्योजकांसह आयमा, निमा, नाइस, उद्योगभारतीसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. राज्याने २०१३ मध्ये ठरवलेले औद्योगिक धोरण पाच वर्षांसाठी होते. त्याची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर या धोरणास मंत्रिमंडळाने सहा महिने मुदतवाढ दिली. ३० सप्टेंबरपर्यंत ही वाढ आहे. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी सप्टेंबरपूर्वी हे धोरण जाहीर करणार असल्याचे सांगितले.

राज्याचे औद्योगिक धोरण महत्त्वाचे असून, त्यासाठी उद्योगमंत्र्यांनी हा दौरा केला. उद्योगमंत्री बुधवारी पुणे येथे गेले. त्यानंतर गुरुवारी ते सोलापूर व लातूर येथे त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी औरंगाबाद व नाशिक येथील औद्योगिक संघटनांबरोबर चर्चा केली. नाशिक येथे झालेल्या बैठकीत 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, 'आयमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र आहिरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर, लघु उद्योग भारतीचे संजय महाजन, निर्यात संघटनेचे रमेश पवार, 'नाइस'चे अध्यक्ष विक्रम सारडा, सिन्नरचे नामकर्ण आवारे, मालेगावचे अन्सारी खुर्शीद यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगरच्या उद्योजकांनी नव्या धोरणाबाबत सूचना केल्या.

उद्योजकांच्या मते, असे असावे धोरण

- औद्योगिक धोरण ठरवताना ते उद्योजकांसाठी सरळ व स्पष्ट असावे

- उद्योजकांना चालना मिळावी

- राज्याच्या झोनबदलाचा विचार करावा

- सर्वांसाठी समान संधी असावी

- वीजदर राज्यात सारखे असावे

- स्थानिक स्वराज संस्थांच्या करापासून मुक्तता करून औद्योगिकनगरी करावी

- नव्या उद्योगांसाठी जशा योजना आहे तशाच अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी असाव्यात

- निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, महिला उद्योजकांना प्लॉटवाटपात आरक्षण असावे

- झूमला वैधानिक दर्जा द्यावा

- कृषी प्रक्रिया उद्योगासाठी धोरण असावे

कामगार संघटनेबाबत रोष

उद्योजकमंत्र्याच्या बैठकीत गुन्हे दाखल असलेल्या कामगार संघटनेवर बंदी टाकावी. त्यासाठी धोरण जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. औद्योगिक शांतता व तंटामुक्त औद्योगिक क्षेत्र असावे यासाठी नियम असावे अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त करण्यात आली.

दोन हजार प्लॉट ताब्यात

राज्यातील उद्योग सुरु न झालेले दोन हजार औद्योगिक प्लॉट ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे वाटपही आता लवकर केले जाईल अशी माहिती उद्योगमंत्री यांनी दिली. नव्या उद्योगांना संधी मिळावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलंबिका प्रकरणी दस्ताऐवज लवादाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवी संस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील महत्त्वाचा दस्ताऐवज जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी महाराष्ट्र महसूल लवादाकडे सोपविला. या प्रकरणी येत्या ७ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

कोलंबिका देवी संस्थानच्या १८० एकर जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आले. महसूलमधील अधिकारी आणि संस्थानच्या काही विश्वस्तांसह २६ जणांवर जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्याकडे अर्धन्यायिक सुनावणी सुरू होती. परंतु, संस्थानच्या विश्वस्तांनी या प्रकरणी महसूल लवादाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे लवादाने प्रांताच्या सूनावणीला स्थगिती दिली आहे.

महसूल लवादाकडे शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्ताऐवज सादर करण्याचे निर्देश लवादाने दिले. त्यानुसार तो सादर केल्याची माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाप्यांनंतरही अड्डे जोमात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरेरोडवरील अरिंगळे मळा येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्यास नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून अटक केली. या अड्ड्यावरून नाशिकरोड पोलिसांनी शिवाजी तुकाराम अरिंगळे (वय ४२) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार कारवाई केली आहे. या संशयिताकडून पोलिसांनी दारूही जप्त केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची कारवाई वारंवार केली जात असूनही जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे सुरूच असल्याचे चित्र आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकलहरे भागातील सिद्धार्थनगर, अरिंगळे मळा, पळसे, शिंदे या ठिकाणी बेकायदेशीर दारूविक्रीचे अड्डे सर्रास सुरू आहेत. याशिवाय शहरातील देवळालीगाव, सुभाषरोड, जेलरोड पाण्याची टाकी, गोरेवाडी, बिटको हॉस्पिटलजवळ, पळसे, शिंदे, सिन्नर फाटा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार, नाशिकरोड बस स्थानकाच्या पाठीमागे, चेहेडी जकात नाका या ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्यातील काही अड्ड्यांवर पोलिसांनी धाडीही टाकल्या आहेत. मात्र, या प्रत्येक कारवाईत संबंधित जुगार अड्ड्यांचे मालक फरार झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. बहुतेक जुगार अड्ड्यांवर कल्याण बाजार नावाचा जुगार सुरू असतो. अनेक अड्डे स्थानिक आजी-माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या मालकीचे असल्याचे यापूर्वीच्य कारवाईतून उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकरोड पोलिसांना अंधारात ठेवून पोलिस उपायुक्तांनी इतर पोलिस ठाण्यांच्या पोलिस पथकाच्या सहकार्याने जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत.

अनैतिक व्यवसायही तेजीत

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदे गावाजवळ एका ढाब्यावर नुकताच अनैतिक व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केला. यापूर्वीही शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा बिटको चौकातच एका लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिस छप्यात उघड झाले होते. येथून मोठ्या संख्येने महिलांची सुटका करण्यात आली होती. शिंदे गावाजवळील अनैतिक व्यवसायाच्या अड्ड्यावर परप्रांतीय मुलीही आढळून आल्या होत्या. हा अड्डाच मुळात परप्रांतीयाकडून चालविला जात होता. असे असतानाही स्थानिक पोलिसांना मात्र सुगावाही लागला नव्हता.

ओव्हरलोड वाहतुकीसाठी चिरिमिरी

सिन्नर फाटा येथे पोलिस चौकीसमोरूनच दररोज शेकडो ओव्हरलोड वाहने बिनधास्त ये-जा करताना दिसतात. विशेष म्हणजे येथे बऱ्याचदा नाकाबंदीही सुरू असते. एकलहरे येथून राखेची वाहतूक करणारी सिन्नरच्या अथवा नाशिकच्या दिशेने जाणारी ओव्हरलोड वाहने पोलिसांसमोरच सर्रास ये-जा करताना दिसून येतात. एकलहरे येथील राखेची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने कोटमगाव, जाखोरीमार्गे थेट शिंदे गावाजवळ महामार्गावर येऊन पुढे पुण्याच्या दिशेन जातात. परंतु, त्यापैकी कोणत्याही वाहनांवर पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. चिरिमिरीचा धंदा येथेही जोरात सुरू असल्याचे दिसून येते.

(लोगो : क्राइम वॉच)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

$
0
0

शिरपूर तालुक्याच्या कोळीद, पनाखेडला कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोळीद व पनाखेड गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय थाटून बसलेल्या चौघा बोगस डॉक्टरांविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकजण पसार झाला आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक घेऊन बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषद व महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. या चारही डॉक्टरांविषयी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे यापूर्वीही तक्रारी होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. २७) सकाळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शिवचंद्र सांगळे, शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी, आयुर्वेद अधिकारी डॉ. मुरमरे, अन्न निरीक्षक शामराव साळी, डॉ. प्रेमराज चव्हाण, पोलिस निरीक्षक शिरसाठ व दहा कॉन्स्टेबलच्या पथकाने या डॉक्टरांवर धडक कारवाई केली. यामध्ये ताजुद्दीन करुद्दीन शेख, आसिफ युसूफ पिंजारी व सादिक शब्बीर लोहार (तिघे रा. कोळीद) हे बोगस डॉक्टर पथकाला आढळून आले. तर पनाखेड गावात राकेश शंकरलाल भत्रावाले हा बोगस डॉक्टर आढळून आला. यातील सादिक लोहार हा फरार झाला असून, इतर तिघांना बोगस डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय साहित्यही जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कृषिविकास

$
0
0

नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने नाशिकला 'राज्याचे किचन' म्हंटले जाते. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक जिल्हा आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदा यासाठी देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो व फुले निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचे जाळे पसरले आहे. साखर कारखाने, बेदाणा केंद्र, वाइनरी, शीतगृहे यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे नाशिकची पीकसंस्कृतीही बदलत चालली आहे. अशा या नाशिक जिल्ह्याच्या कृषिसंस्कृतीवर आजच्या (१ जुलै) कृषिदिनानिमित्त टाकलेला प्रकाश.

नाशिकमधील पिके

नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.

पीकपद्धती व प्रमुख पिके

द्राक्ष, कांदा, भात, गहू, मका, बाजरी, डाळिंब ही नाशिकमधील प्रमुख पिके आहेत. १९९५ पूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, हरभरा या पिकांवर नाशिकचा भर होता. मात्र, यानंतर कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला. आज द्राक्ष, कांदा, टोमॅटो या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, बागलाण ही तालुके द्राक्ष शेतीसाठी ओळखली जातात. मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यांत प्रामुख्याने कांदा व डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा ही तालुके भात, नाचणी, वरईच्या पिकांसाठी ओळखली जातात.

नाशिकमधील निर्यात होणारी पिके

मंत्रभूमी म्हणून नाशिक ओळखले जात असले तरी जिल्ह्याची खरी ओळख कृषीमुळेच होते. नाशिकमधून कांदा व द्राक्ष जगभरात निर्यात केले जातात. देशात सुमारे ३३ टक्के कांदा महाराष्ट्रातून पुरवला जातो. यामध्ये जिल्ह्याचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. द्राक्ष निर्यातीतही राज्यात नाशिक आघाडीवर आहे. याशिवाय टोमॅटोचीही निर्यात केली जाते. यामुळे देशाला परकीय चलनही प्राप्त होते. सरकारी धोरण कुचकामी असतानाही नाशिकमधून दरवर्षी हजारो टन कांदा, द्राक्ष व टोमॅटोची निर्यात होते.

द्राक्ष निर्यातीची आकडेवारी (टनमध्ये)

वर्ष……....…….. निर्यात

२०११-२०१२....…२८,०००

२०१२-२०१३.....…४८,४६५

२०१३-२०१४….....६७,२४४

२०१४-२०१५.....…४९,७६८

२०१५-२०१६….....१,००,००८

या आकडेवारीवर नजर टाकल्यास शेती विकसित होत गेली तसतशी निर्यातही वाढत गेली. १९९९ मध्ये अवघी चार हजार टन निर्यात होत होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांच्या आकडेवारी नजर टाकल्यास दरवर्षी त्यात वाढच होत गेली. २०१५-२०१६ मध्ये एक लाख टन विक्रमी निर्यात झाली. नाशिकच्या बदलत्या शेतीचे हे सुखावह व आनंददायी चित्र आहे.

कांदा निर्यात

वर्ष ..................निर्यात (टन लाखात)

२०११-१२..............१५.५२

२०१२-१३...............१८.२२

२०१३-१४..............१३.५८

२०१४-१५..............१०.८६

२०१५-१६..............११.१४

२०१६-१७...............३५.०

भारतातून कांदा निर्यात वाढत गेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३३ टक्के असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा ७० टक्के आहे.

नाशिकमधील बदलेली पीकपद्धती

जिल्ह्याच्या प्रारंभी ज्वारी, बाजरी, मका, कुळीद ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. शेतीचा विकास होत गेला तशीतशी पीकपद्धतही बदलत गेली. आज फूलशेती, स्ट्रॉबेरीचेही पीक घेतले जाऊ लागले आहे. कॉफीचे पीक घेण्याचाही प्रयोग नाशिकमध्ये झाला आहे. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. पिकांचे लागवडीखालील क्षेत्रही झपाट्याने वाढले आहे. शेतकरी गटशेतीही करू लागले आहेत. यामुळे शेतात एकाच वेळी वेगवेगळी पिके घेता येणे शक्य होत आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा), चायना (चांदवड, येवला, नांदगाव) असे विभाजन केले जाते. याशिवाय त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी ही आदिवासी तालुके म्हणून ओळखली जातात. निफाड व दिंडोरी ही कृषीतील आघाडीची तालुके आहेत. सिन्नर या दुष्काळी तालुक्यानेही नवी ओळख निर्माण केली आहे. भाजीपाल्याबरोबर द्राक्ष व डाळिंब शेती येथे झपाट्याने विकसित झाली आहे.

कसमादे पट्टा

कसमादे पट्ट्यात ४० ते ५० वर्षांपूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू व हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. पावसावर शेती अवलंबून होती. यामुळे ही पिके घेणे सोयीचे ठरत होते. मात्र, शेतीचा विकास होत गेल्याने शेतकरी प्रयोग करू लागला. यामुळे आज बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू, हरभरा ही दुय्यम पिके झाली असून, सटाणा व कळवणमध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस व कांद्याने प्रथम स्थान घेतले आहे. या नगदी पिकांमुळे या तालुक्यातील अर्थकारण झपाट्याने बदलले आहे. मालेगाव व देवळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांतही पीकपद्धतीत बदल झाला आहे. बाजरी, मका, कुळीद या पिकांबरोबरच कांदा आणि डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. याशिवाय मालेगाव तालुक्यात कपाशीचेही उत्पादन घेतले जात आहे. या भागात तीन साखर कारखाने असल्याने काही शेतकरी उसाचेही उत्पादन घेत आहेत.

चायना पट्टा

चायना म्हणजे चांदवड, येवला व नांदगाव. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनीही वेगवेगळे प्रयोग करून पीकपद्धतीत आमूलाग्र बदल आणला आहे. या तालुक्यांमध्ये बाजरी, मका, भाजीपाला ज्वारी ही पारंपरिक पिके शेतकरी आजही घेत आहेत. मात्र, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी शेतीतही नवनवीन प्रयोग करून विकास साधला आहे. चांदवड तालुक्यात द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय फूलशेतीचा प्रयोग येथे यशस्वी झाला आहे. येवला तालुक्यात आज कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. द्राक्ष शेतीही येथे केली जात आहे. यामुळे नाशिकची कृषिसंस्कृती दिवसागणिक बदलत चालल्याचे दिसून येत आहे. नांदगावमध्ये कपाशी, गहू, डाळिंब पिकाने मोठे क्षेत्र व्यापले आहे. यामुळे पर्जन्यमान कमी असूनही शेतकरी पिकांमध्ये बदल करू लागला आहे.

आदिवासी तालुक्यातील शेती

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा ही आदिवासी तालुकेही शेतीमध्ये प्रयोग करू लागली आहेत. येथे पर्जन्यमान अधिक असल्याने भात, नाचणी, वरई, हरभरा ही पारंपरिक पिके आजही प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांवर अवलंबून न राहता येथील शेतकरी नव्या पिकांकडे वळले आहेत. सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वर आघाडीवर असले तरी सुरगाण्यातही या पिकाने चांगले बस्तान बसवले आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये टोमॅटो शेती केली जात आहे. याशिवाय फळशेती करण्याकडेही या तालुक्यांचा कल वाढू लागला आहे.

-

सिन्नर, निफाड, दिंडोरी व नाशिक

सिन्नर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्याने शेततळे निर्माण करून आपली दुष्काळी ओळख जवळपास पुसून टाकली आहे. यामुळे या तालुक्यात आज शेतीला बहर आला आहे. बाजरी, गहू, भाजीपाला या पिकांबरोबर आज द्राक्ष, कांदा व डाळिंब ही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. निफाड व दिंडोरी ही सधन तालुके म्हणून ओळखली जातात. या तालुक्यांमध्ये बहुपीक पद्धत पाहायला मिळते. द्राक्ष, कांदा, गहू, मका, फूलशेती व भाजीपाला अशी विविध पिके घेण्यात ही तालुके आघाडीवर आहेत. द्राक्ष निर्यातीत निफाड व दिंडोरी ही जिल्ह्यातील आघाडीची तालुके आहेत. पाण्याची व्यवस्था असल्याने या तालुक्यांमध्ये सुरुवातीपासून नगदी पिके घेण्यात येत आहेत. पाण्यामुळे या तालुक्यांतील लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे.

निफाड तालुका (४७ वर्षांची आकडेवारी)

वर्ष ..……. एकूण क्षेत्र…...लागवडीखालील क्षेत्र

१९८०…….......१०५१०३…...... ७६,९८१

१९९०…….....१०५१०३….......७९,२०१

२०००……......१०५,१०३.......……८१,८१२

२०१०…...... १,०५,१०३......……८४,२३१

२०१७….......१०५,१०३..…... ८४,९२५

या एका तालुक्याचा जरी आढावा घेतला तरी लागवडीखालीत क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.

शेतीवर आधारित उद्योगधंदे

साखर कारखाने

नाशिकमध्ये जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने, त्यावर आधारित अनेक उद्योगधंद्यांचे जाळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात छोटी-मोठी २४ धरणे आहेत. यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने साखर कारखान्यांचा पाया रोवला केला. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून एकून नऊ साखर कारखाने सुरू करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे आपले साखर कारखाने मिळाले, तर स्थानिकांना रोजगार मिळाला. उसामुळे जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले गेले. कादवा, वसाका, निसाका, गिरणा, नासाका, रानवड या सहकारी कारखान्यांबरोबरच रावळगाव, द्वारकाधीश, केजीएस या कारखान्यांनी जिल्ह्याच्या कृषी व्यवसायाला बळकटी दिली. यामुळे कृषी व्यवसायाला नवा आयाम मिळाला.

वायनरी उद्योग

द्राक्षपंढरी म्हणून नाशिकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दर्जा व गुणात्मक द्राक्ष उत्पादनामुळे द्राक्षांची मागणी वाढली. यामुळे द्राक्ष क्षेत्रातही वाढ झाली. द्राक्षांचे उत्पादन वाढल्याने त्यावर आधारित उद्योगांची गरज निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यात वायनरी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशाची वाइन कॅपिटल म्हणून नाशिक नावारूपाला आले. यामुळे द्राक्षांना विदेशीबरोबरच स्थानिक बाजारपेठही उपलब्ध होऊन चांगले दर मिळण्यास मदत झाली. यामुळे रोजगारवाढीलाही चालना मिळाली. जगातील सुमारे २० देशांत नाशिकची वाइन जाते. सुला विनियार्ड, यॉर्क वायनरीज, फ्लेमिंगो, व्हिनटेज, एनडी, सोमो अशा नामांकित वाइनरींनी नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. याशिवाय बेदाणा उद्योगही वाढीस लागला.

पोल्ट्री, गोटफार्म व दुग्धव्यवसाय

पोल्ट्री व्यवसायही भरभराटीस येत आहे. उद्योगांसारखा व्यवसायातही रोजगार निर्माण होत आहे. नाशिकमध्ये पोल्ट्री व्यवसायाने प्रगती करीत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. सिन्नर, देवळा, मालेगाव, सटाणा, चांदवड, निफाड, कळवण या भागांत बारमाही पिके घेऊ न शकणारे शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे पाच हजार पक्ष्यांची क्षमता असलेले ५२०० पोल्ट्री युनिट्स आहेत. या उद्योगातून सुमारे २५ ते ३० हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.

शेतीचे क्षेत्र कमी होत गेल्याने शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व गोटफार्म हा जोडधंदा म्हणून पसंती दिली. सद्य:स्थितीत सिन्नर तालुक्यात सर्वाधिक गोटफार्म आहेत. अलीकडे या व्यवसायाने मोठी प्रगती केली आहे. शेळ्यांची बाहेरील देशात निर्यात होऊ लागल्याने गोटफार्मची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत झाली. नाशिक दूध उत्पादनात सक्षम असून, बाहेरील जिल्ह्यातही दूध पुरवले जाते. मुंबईला भाजीपाल्याबरोबरच दुधाचाही पुरवठा केला जातो. यामुळे शेतीवर आधारित जोडधंदा वाढीस लागण्याबरोबर रोजगारही उपलब्ध झाला.

(संकलन : अनिल पवार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील एकही मूल कुपोषित राहणार नाही व ग्राम बालविकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, ग्रामसेवकांनी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करून कुपोषित बालके शोधावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात मोहीम सुरू केली असून, त्यासाठी बैठकींचे सत्र सुरू झाले आहे.

नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक शनिवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात झाली. त्या वेळी लांडगे बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी दत्तात्रेय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी ईशाधीन शेळकंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे आदी उपस्थित होते.

लांडगे यांनी विविध विभागांचा आढावा घेताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पिण्याच्या पाण्याचा आढावा घेताना लांडगे यांनी सर्व जलस्रोतांचे शुद्धीकरण करून पावसाळ्यात एकाही गावात साथ उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अंगणवाडीचा आढावा घेताना अपूर्ण अंगणवाडी बांधकामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. धोकादायक व नादुरुस्त अंगणवाडीत एकही तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालक आढळून न आल्याने तेथे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.

सुरुवातीला महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे यांनी कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. आरोग्य व आहारसंहितेनुसार आहार व औषधे देण्यात येत आहे की नाही, याबाबत सर्व संबंधितांकडून माहिती घेण्यात आली. दिंडोरी तालुक्यात पुनर्सर्वेक्षण करून सर्व तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राम बालविकास केंद्रांना नियमित भेटी देण्याचे आदेश दिले. डॉ. डेकाटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेताना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणीचा आढावा घेतला. शौचालय वापराबाबत प्रत्येक गावात जनजागृती करून हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत व सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोची निवडणूक डिसेंबरअखेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेत रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटवण्याचा निर्णय घेतला असून, पाच जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मर्चंट बँकेच्या नवनियुक्त संचालकांच्या निवडणुका डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेने पाठवलेल्या आदेशाची माहिती दिली. मात्र, निवडणुकीच्या तारखेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

रिझर्व्ह बँकेने ६ जानेवारी २०१४ रोजी अनिमिततेचे कारण पुढे करीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जे. बी. भोरिया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर बँकेचा जसा नफा वाढला तसा एनपीए वाढला. त्यामुळे बँकेची स्थिती नाजूक असल्याच्या तक्रारी सभासदांनी सुरू केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बँक बरखास्त करताना प्रशासक म्हणून भोरिया यांची चार वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरासाठी पुन्हा मुदत दिली. ही मुदत ६ जानेवारी २०१९ रोजी संपणार आहे. त्याअगोदर त्यांना संचालक मंडळाची निवड करून त्यांच्याकडे कार्यभार सोपवावा लागणार आहे.

मुदतीपूर्वी संचालक मंडळ बरखास्त

नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक २०१० मध्ये झाली होती. या वेळी हुकूमचंद बागमार यांच्या पॅनलचे सर्व २१ पैकी २० संचालक निवडून आले होते. विरोधी गटातर्फे गजानन शेलार हे एकमेव सदस्य होते. संचालक मंडळाला वर्ष बाकी असताना व बागमार चेअरमन असतानाच बँक बरखास्त झाली.

काय आहे पत्रात?

रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक एस. पी. कडेमणी यांनी ११ जून रोजी पत्र पाठवले असून, ते बँकेला शनिवारी मिळाले. त्यात सबसेक्शन ३६ एएए नुसार बीआर अॅक्टनुसार संचालक मंडळाकडे ५ जानेवारी २०१९ पूर्वी कार्यभार हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

८० शाखा, दीड लाखावर सभासद

मल्टिस्टेट शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या ८० शाखा असून, त्यात ७८ शाखा राज्यात, तर हैदराबाद व सुरत येथे दोन शाखा आहेत. या बँकेचे १ लाख ७९ हजार ९०५ सभासद आहेत. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला ५४ कोटी १ लाखाचा ढोबळ, तर सर्व खर्च व तरतुदीनंतर ३५ कोटी २१ लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता.

पाचव्या वर्षी नफा

प्रशासक नियुक्तीनंतर बँकेला सलग पाचव्या वर्षी भरघोस नफा झाला होता. बँकेकडे या आर्थिक वर्षात १४८६ कोटी ३० लाख ठेवी होत्या. त्यात तीन महिन्यांत घट झाली असून, आज बँकेकडे १४२१ कोटी ६९ लाख ठेवी आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात ८४९ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज होते. जूनअखेर हे ८३९ कोटी १९ लाख झाले आहे. गुंतवणूक ९९१ कोटी ३८ लाख व रिझर्व्ह फंड ४१७ कोटी २७ लाख व भागभांडवल ५० कोटी १२ लाख कायम आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण आर्थिक वर्षात १०.५९ टक्के झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभाडी पोहोचले फिरते पोलिस पथक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील छावणी पोलिस ठाणे अंतर्गत जिल्ह्यातील पहिले फिरते पोलिस पथक उपक्रमाचे शनिवारी दाभाडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद साधला जावा यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली. पहिल्याच दिवशी पाच तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असल्याचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

जयहिंद इंग्लिश मीडिअम स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेजच्या सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर, वाहतूक शाखेचे पो. नि. नरेंद्र भदाणे, नगरसेविका ज्योती भोसले, वीजवितरण कंपनीचे चव्हाण, तलाठी पी. पी. मोरे, दशरथ निकम, मनोज हिरे, उपसरपंच नीलिमा बाविस्कर, अमृत निकम आदी उपस्थित होते.

हर्ष पोद्दार म्हणाले, छोट्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यास नागरिक धजावत नसतात. फिरते पोलिस पथक उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यामध्ये संवाद साधला जाऊन दुरावा कमी होण्यास मदत होईल. पोलिस निरीक्षक घुसरे यांनी सांगितले, सर्वसामान्य नागरिक अनेकदा पोलिस ठाण्यात येण्यास घाबरतात. एखादी समस्या छोटी असतानाच तिचा निपटारा केला नाही तर ती पुढे मोठ्या समस्येत तिचे रुपांतर होते. त्यामुळे फिरते पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांनी गावांमध्ये, शहरी भागांत जावून नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे या उपक्रमात अपेक्षित आहे.

नरेंद्र भदाणे, दामिनी पथक महिला समुपदेशक केंद्राच्या अपेक्षा पगार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी कोपर्डी अत्याचाराच्या घटणेवर पथनाट्य सादर केले.

काय आहे पथक?

फिरते पोलिस ठाणे अंतर्गत एक पोलिस उप निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक हवालदार, शिपाई असे कर्मचारी असतात. हे पथक त्या त्या ठिकाणी जावून तात्पुरती व्यवस्था करून एका दिवसांसाठी पोलिस ठाणे उभारून कामकाज करतात.

पाच अर्जांवर कार्यवाही

दाभाडी येथे पहिल्याच दिवशी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण पाच तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती घुसर यांनी दिली. यात दोन तक्रारी अर्जावर जागेवर निपटारा करण्यात यश आले. शेजाऱ्यांमध्ये असलेला वाद दोन्ही बाजूकडील तक्रारदारांमध्ये चर्चेअंती तडजोड करत मिटविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत हत्याकांड- पान एकवरून

$
0
0

....एकच टाहो फोडला!

--

म. टा. वृत्तसेवा, घोटी

खेडभैरव (माळीवाडा) येथील तिहेरी हत्येने इगतपुरी तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातलगांनी घटनास्थळी व घोटी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. या तिन्ही मृतदेहांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, घोटी ग्रामीण रुग्णालयात आपली आई, पत्नी व चार वर्षीय मुलाचा मृतदेह पाहताच गणेश शंकर चिमटे यांनी एकच टाहो फोडला. या घटनेतून वाचलेला यशला पाहून त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

गावातच शेती व मजुरी करणारा गणेश हा आपल्या कुटुंबासमवेत माळवाडी या छोट्याशा वाडीत राहतो. शेजारी त्याचे दोन भाऊ व त्याचे कुटुंबीय राहतात. चुलतभाऊ सचिन गणपत चिमटे हा आपल्या आईवडिलांसह राहतो. हत्याकांडाची घटना घडली तेव्हा गणेश कावनई येथे गेला होता, तर अन्य दोन भाऊ हे शेतीच्या कामात व्यस्त होते. गणेशच्या घरात आई हिराबाई, पत्नी व दोन मुले रोहित व यश होते. याचदरम्यान पुतण्या सचिन हा घरात शिरला व त्याने चुलती हिराबाई, चुलत भावजयी मंगल व रोहित यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जागीच गतप्राण केले.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित सचिन गणपत चिमटे हा अविवाहित आहे. त्याने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही काही करीत नाही, याबाबत नेहमी चेष्टा करीत असल्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याची कबुली संशयित सचिनने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

$
0
0

- चुलती, चुलत वहिनी व पुतण्याचा खून

- इगतपुरीतील खेडभैरव (माळवाडी) येथील घटना

- सख्या पुतण्यानेच केली हत्या

..

म. टा. वृत्तसेवा, घोटी

खेडभैरव परिसरातील माळवाडी (ता. इगतपुरी) येथे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता सख्ख्या चुलत भावाच्या कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला करीत एका जणाने तिघांची हत्या केली. या घटनेत एक सहा वर्षीय बालक बाहेर पळून गेल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, या घटनेत वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे. रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली संशयित आरोपीने दिल्याने पोलिस सूत्रांनी सांगितले.

माळवाडी येथे गणेश शंकर चिमटे हा आपल्या कुटुंबासमवेत राहतो. शनिवारी गणेश हा बाहेर गेला होता, तर घरी त्याची आई, पत्नी व मुले होती. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या गणेश चिमटे यांचा चुलतभाऊ सचिन गणपत चिमटे (वय २१) याने अचानक घरात घुसून चुलती हिराबाई शंकर चिमटे, भावजयी मंगल गणेश चिमटे (वय ३०) यांच्यावर धारदार शस्राने प्राणघातक हल्ला चढविला. अनपेक्षितपणे हा हल्ला झाल्याने या दोन्ही महिलांना प्रतिकार करता आला नाही. सपासप वार केल्यामुळे सासू-सुना जागीच गतप्राण झाल्या. संशयित आरोपी सचिनने रोहित गणेश चिमटे (वय ४) व यश गणेश चिमटे (वय ६) यांच्यावरही वार केले. मानेवर घाव बसल्याने रोहित गंभीर जखमी झाला, तर यशच्या हातावर घाव बसल्यानंतर त्याने घरातून पळ काढत आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

जखमी रोहित व यशला तत्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने रोहितचा मृत्यू झाला. यशच्या हातावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक अतुल झेंडे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सचिन चिमटे यास ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला.

- सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नामको’ची प्रशासकमुक्ती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेत रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटविण्याचा निर्णय घेतला असून, पाच जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मर्चंट बँकेच्या नवनियुक्त संचालकांच्या निवडणुका डिसेंबरअखेर होण्याची चिन्हे आहेत. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेने पाठविलेल्या आदेशाची माहिती दिली. मात्र, निवडणुकीच्या तारखेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

रिझर्व्ह बँकेने ६ जानेवारी २०१४ रोजी अनिमिततेचे कारण पुढे करीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जे. बी. भोरिया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर बँकेचा जसा नफा वाढला तसा एनपीए वाढला. त्यामुळे बँकेची स्थिती नाजूक असल्याच्या तक्रारी सभासदांनी सुरू केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बँक बरखास्त करताना प्रशासक म्हणून भोरिया यांची चार वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरासाठी पुन्हा मुदत दिली. ही मुदत ६ जानेवारी २०१९ रोजी संपणार आहे. त्याअगोदर त्यांना संचालक मंडळाची निवड करून त्यांच्याकडे कार्यभार सोपवावा लागणार आहे.

मुदतीपूर्वी संचालक मंडळ बरखास्त

नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक २०१० मध्ये झाली होती. या वेळी हुकूमचंद बागमार यांच्या पॅनलचे सर्व २१ पैकी २० संचालक निवडून आले होते. विरोधी गटातर्फे गजानन शेलार हे एकमेव सदस्य होते. संचालक मंडळाला वर्ष बाकी असताना व बागमार चेअरमन असतानाच बँक बरखास्त झाली.

काय आहे पत्रात?

रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक एस. पी. कडेमणी यांनी ११ जून रोजी पत्र पाठवले असून, ते बँकेला शनिवारी मिळाले. त्यात सबसेक्शन ३६ एएए नुसार बीआर अॅक्टनुसार संचालक मंडळाकडे ५ जानेवारी २०१९ पूर्वी कार्यभार हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

८० शाखा, दीड लाखावर सभासद

मल्टिस्टेट शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या ८० शाखा असून, त्यात ७८ शाखा राज्यात, तर हैदराबाद व सुरत येथे दोन शाखा आहेत. या बँकेचे १ लाख ७९ हजार ९०५ सभासद आहेत. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला ५४ कोटी १ लाखाचा ढोबळ, तर सर्व खर्च व तरतुदीनंतर ३५ कोटी २१ लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता.

पाचव्या वर्षी नफा

प्रशासक नियुक्तीनंतर बँकेला सलग पाचव्या वर्षी भरघोस नफा झाला होता. बँकेकडे या आर्थिक वर्षात १४८६ कोटी ३० लाख ठेवी होत्या. त्यात तीन महिन्यांत घट झाली असून, आज बँकेकडे १४२१ कोटी ६९ लाख ठेवी आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात ८४९ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज होते. जूनअखेर हे ८३९ कोटी १९ लाख झाले आहे. गुंतवणूक ९९१ कोटी ३८ लाख व रिझर्व्ह फंड ४१७ कोटी २७ लाख व भागभांडवल ५० कोटी १२ लाख कायम आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण आर्थिक वर्षात १०.५९ टक्के झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

लोगो

डॉक्टर्स डे

vinod.patil@timesgroup.com

Vinod.PatilMT

नाशिक : शहराचे आरोग्य ज्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या हाती, तो वैद्यकीय विभागच सध्या कोमात गेला आहे. महापालिकेत सध्या दोनशे डॉक्टरांची आवश्यकता असताना, वैद्यकीय विभागाचा कारभार अवघ्या ६० डॉक्टरांवर सुरू आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांची १०३ पदे मंजूर असतानाही ४३ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय विभागाकडे फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ आणि त्वचारोज्ज्ज्ञ एकही नाही. वैद्यकीय विभागात ७५४ पदे मंजूर असताना केवळ ४५१ कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय विभागाचा गाडा सुरू आहे. त्यामुळे अपुऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीसंख्येमुळे शहरातील रुग्णांची हेळसांड होत असून, नाशिककरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहरात चार रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने व ३० शहरी प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या सेवा देताना अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर वैद्यकीय विभागासाठी ७५४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी ४५१ पदांवरच कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ३०३ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या अस्तित्वातील, तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालये, दवाखान्यांसाठी उपलब्ध कर्मचारीसंख्या अत्यंत तोकडी आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेच्या रुग्णालयांवरील रुग्णसंख्येचा ताण मात्र वाढतच आहे. जागितक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यामुळे २० लाख लोकसंख्येसाठी शहरात किमान दोन हजार डॉक्टर आवश्यक आहेत. शहरात खासगी डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी शहरातील पाच ते सहा लाख गोरगरीब रुग्णांचा भार हा महापालिकेच्या रुग्णालयांवरच असतो. त्यामुळे सध्याच्या भारतीय स्टँडर्डनुसार महापालिकेला किमान दोनशे डॉक्टरांची गरज असताना, सध्या केवळ ६० डॉक्टरांवरच वैद्यकीय विभागाचा गाडा सुरू आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे सध्या एकही फिजिशियन नाही. सोबतच मानसोपचारतज्ज्ञ, कान, नाक व घसातज्ज्ञ आणि त्वचारोगतज्ज्ञांची पदेही रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभारही प्रभारींच्या हाती आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असताना, सध्या या पदावर एकही वैद्यकीय अधिकारी नाही. असिस्टंट मेंट्रन, एक्स रे टेक्निशियन, एक्स रे असिस्टंट अशी तांत्रिक पदांचीही कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना, सध्याच्या डॉक्टरांचीही दमछाक होत आहे.

भरतीही बारगळली

अपुऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याने महापालिकेने आपल्या हॉस्पिटलमध्ये मानधन तत्त्वावर २८ डॉक्टरांसह २५१ अन्य पदांची जम्बो भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाढत्या आस्थापना खर्चाचा हवाला देत सरकारने नोकरभरतीला बंदी घातल्याने पेचात सापडलेल्या महापालिकेने या पदांची मानधनावर भरती करण्याचा प्रस्ताव तयार करीत तो महासभेतही मंजूर करून घेतला होता. त्यासाठी दरवर्षी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आता हा भरतीचा प्रस्तावही बारगळला आहे.

नव्याने आराखडा

महापालिकेकडून सध्या नव्याने आस्थापना आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागालाही नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वैद्यकीय विभागाने तातडीने पदे भरण्यासंदर्भातील आवश्यक स्टाफची यादी प्रशासन उपायुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक व रिक्त पदे भरण्यासंदर्भात नवीन आराखडा तयार केला जात आहे.

पदाचे नाव मंजूर पदे रिक्त पदे

वैद्यकीय अधीक्षक १ १

उपवैद्यकीय अधीक्षक १ १

निवासी वैद्यकीय अधिकारी २ २

मुख्य वैद्यकीय अधिकारी २ १

वैद्यकिय अधिकारी १०३ ४३

प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४ ४

फिजिशियन ३ ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तडीपार गुन्हेगार जेरबंद

$
0
0

तडीपार गुन्हेगार जेरबंद

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध भागांत गुन्हे दाखल असलेल्या सुमित संदीप दिंडोरकर याला पोलिसांनी तडीपार केलेले असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुमित दिंडोरकरवर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला हद्दपार केले होते. मात्र, हद्दपार असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेश चौक येथे सापळा रचला. सुमित येणार असल्याची माहिती मिळाली असल्याने पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये सुमितवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार भास्कर मल्ले करीत आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक तडीपार केलेले गुन्हेगार फिरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी परिसरात आज डॉक्टरांकडून वृक्षारोपण

$
0
0

ब्रह्मगिरी परिसरात आज डॉक्टरांकडून वृक्षारोपण

सिडको : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टरांकडून आज, रविवारी (दि. १) ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हरितविश्व व हरित ब्रह्मगिरी या संस्थांतर्फे ही माहिती देण्यात आली. सकाळी सात वाजता त्र्यंबकेश्वरमधील आंबेडकर चौकापासून प्रभात फेरी निघणार असून, उदासीन आखाडामार्गे ती ब्रह्मगिरीकडे जाईल. ब्रह्मगिरी पर्वतावर पिंपळ, हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, मोह, साग, नीलगिरी, करवंदे, शिसव, आंबा, सीताफळ, फणस, काजू, सादडा आदींचे रोपण करण्यात येणार आहे.

--

गावठी कट्टा जप्त (फोटो)

सिडको : अंबड पोलिसांनी शनिवारी एका तरुणाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वावरेनगर भागात रवी रामअंजोर त्रिपाठी (वय २७, रा. सातपूर) हा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी हेमंत आहेर व दीपक वाणी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांना ही माहिती दिल्यावर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, दत्तात्रय गवारे व दुष्यंत जोपळे यांनी वावरेनगर भागात सापळा रचून ही कारवाई केली. त्रिपाठी यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

तडीपार जेरबंद

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध भागांत गुन्हे दाखल असलेल्या सुमित संदीप दिंडोरकर याला तडीपार केलेले असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अंबडचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेश चौक येथे ही कारवाई केली. हवालदार भास्कर मल्ले तपास करीत आहेत.

---

पॉइंटर्स

आरोग्य बँक मदतीला -२

बहुद्देशीय हॉल वेटिंगवर! -३

विठ्ठला टाळ विठ्ठ्ल दिंडी, विठ्ठला तोंडी उच्चारा -४

अनुष्काशी सह'मत' -५

कलेतून मिळाला अर्थार्जनाचा मार्ग -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून बाहेर पडताच बिबट्याने ठोकली धूम

$
0
0

पाडळीतील घटना; वनविभागाच्या प्रयत्नातून मिळाले जीवदान

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील पाडळी येथे अन्नपाण्याच्या शोधार्थ फिरत असलेला दोन वर्षे वयाचा बिबट्या शुक्रवारी (दि.२९) रात्री विहिरीत पडला. शनिवारी (दि. ३०) वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जीवदान दिले. मात्र विहिरीत टाकलेल्या शिडीवर सरसर चढून वर आलेल्या बिबट्याने धूम ठोकली.

तालुक्यातील पाडळी येथे नाईका मळा परिसरात बाळू व विष्णू रेवगडे यांची शेतजमीन आहे. येथेच यांची सामाईक विहीर आहे. शुक्रवारी रात्री अन्नपाण्याच्या शोधार्थ परिसरात आलेल्या बिबट्याला अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. विहिरीत जवळपास एक परस पाणी असून, पाण्यात पडलेल्या बिबट्याने विहिरीच्या एकाबाजूला असलेल्या कपारीत आश्रय घेतला. सकाळी विष्णू रेवगडे यांचा मुलगा दत्तू हा विहिरीकडे मोटार सुरू करण्यासाठी गेला असता, मोटार सुरू होत नसल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज त्याला ऐकू आला. भरभीत झालेल्या दत्तूने लागलीच कुटुंबीयांना याबाबत कळविले. तोपर्यंत रेवगडे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता पाडळी गावात पसरली. घटनास्थळी बघ्यांची खूप गर्दी जमली. वनविभागाचे अधिकारी पी. बी. सोनवणे यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर सोनवणे यांच्यासह अनिल साळवे, सरोदे लोंढे यांच्यासह व कर्मचाऱ्यांनी पाडळी येथे धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

सुमारे ७ ते ८ परस खोल असलेल्या विहिरीत प्रारंभी बाज सोडण्यात आली. तसेच शिडीही लावण्यात आली. बिबट्याने जीवरक्षणासाठी आलेल्या बाजेवर बसकन मांडल्यानंतर दोराच्या सहाय्याने बाजेसह बिबट्याला वर खेचण्यात येत होते. विहिरीतून बाहेर येण्यासाठी काही अंतर बाकी असतानाच बिबट्याने बाजेवरून शिडीचा आधार घेत कठड्यावर येवून जवळच असलेल्या गिन्नी गवताच्या दिशेने धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या आरोग्यासाठी ‘त्यांची’ समाजसेवा

$
0
0

बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता बाफना यांचे थॅलेसिमिया, कुपोषणाविषयी कार्य

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : कुपोषण, थॅलेसिमियासारख्या समस्यांवर काम करून बालकांच्या आरोग्याची स्वत:च्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या डॉ. संगीता बाफना शहरातील बालरोगतज्ज्ञांपैकी एक नाव. त्र्यंबकेश्वर, हरसूल येथील साप्ते, आंबोली, घुमोरी अशा भागांमधील कुपोषित मुलांची काळजी घेणे असो किंवा आदिवासी शाळा वैद्यकीयदृष्ट्या दत्तक घेणे असो, बालकांना केंद्रस्थानी ठेवून शक्य तितके कार्य करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. वैद्यकीय पेशा हा केवळ मिळकतीचे साधन नव्हे तर समाजाची सेवा करण्याचे माध्यम आहे, हे ओळखत निरपेक्ष भावनेने त्यांचे कार्य सुरू आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण काहीतरी उद्देश ठेवून धावत असल्याचे दिसते. वैद्यकीय क्षेत्रही याला अपवाद नाही. पण अनेक डॉक्टर असेही आहेत जे वैद्यक क्षेत्राकडे समाजसेवा म्हणून बघत आहेत. डॉ. संगीता बाफना या थॅलेसिमिया फाउंडेशन नाशिक, जनकल्याण ब्लड बँक थॅलेसिमिया सेंटर नाशिक, टचवूड फाउंडेशन, नाशिक या संस्थांच्या संचालकपदी कार्यरत असून, या माध्यमातून सुरू असलेले त्यांचे काम आज अनेक चिमुकल्यांसाठी वरदान ठरत आहे. सकस आहार, बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी, वेळोवेळी तपासणी या माध्यमातून बालकांना कुपोषणातून बाहेर काढायचे, या निर्धारातून डॉ. संगीता बाफना यांनी जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांसाठी काम करणे सुरू केले. पालक योग्य काळजी घेत नसल्याने आज बालकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आहे, हे ओळखत अंगणवाड्या, ग्रामीण भागातील घराघरांमध्ये प्रबोधन करण्यात त्यांचा सहभाग आहे. लहान मुलांना काय व कसा आहार दिला पाहिजे, स्वच्छता व आरोग्य यांचा संबंध अशा कित्येक गोष्टी त्या बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी करत आहेत. ना पैशांची ना प्रसिद्धीची अपेक्षा केवळ समाजाची सेवा हे लक्षात ठेवून अव्याहतपणे त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. गेल्या तीन वर्षांपासून जलाराम गतिमंद शाळेतील मुलांची नियमित तपासणी, आदिवासी भागांमध्ये आरोग्याची होत असलेली हेळसांड पाहता शाळा वैद्यकीय दत्तक घेतली आहे.

चिमुकल्यांच्या वेदना जाणल्या

थॅलेसिमिया या आजारामुळे चिमुकल्यांना होणाऱ्या वेदना जाणत २७ वर्षे डॉ. बाफना सेवा करत आहेत. या मुलांना जगवण्यासाठी दर महिन्याला त्यांना रक्त द्यावे लागते. या मुलांचे त्यांचे भविष्य काय, हे नेमके ठाऊक नसले तरी त्यांच्या वेदना कमी करायच्या आणि चांगल्या दिवसांची दारे त्यांच्यासाठी खुली करायची, या उद्देशाने २७ वर्षांचा काळ त्या कार्य करीत आहेत.

लहान बालकांना वैद्यकीय सेवांची मोठी गरज आहे, हे ओळखत मी या कार्याला सुरुवात केली. नाशिकमधील अनेक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित येत काम करतात. त्यात वेळोवेळी सहभाग नोंदवून समाजासाठी माझ्या कार्याचा उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी आपला वाटा दिलाच पाहिजे.

डॉ. संगीता बाफना, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येवला येथील रहिवाशी व मालेगाव येथे शिक्षणासाठी आलेल्या १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी समीर जुनेद अन्सारी (रा. कछी रोड, परदेशपुरा, येवला) याला १० वर्ष सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली जिल्हा अपर सत्र न्यायधीश आर. एच. मोहंमद यांनी हा निकाल दिला.

येवला येथील बालिका मालेगाव येथे काकांकडे शिक्षणासाठी आली होती. समीर जूनेद अन्सारी याने तिच्यावर पाळत ठेवत तिला १० जून २०११ रोजी पळवून नेले. औरंगाबाद येथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सदर बालिकेच्या काकाने जुनेदविरुद्ध १३ जून २०११ रोजी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होवून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. एस. शेवाळे यांनी सहा साक्षीदार तपासले. सबळ पुरावे लक्षात घेता न्यायालयाने जूनेदला भादवी कलम ३६३, ३६६ अंतर्गत पाच वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भादवी कलम ३७६ अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये पीडित बालिकेला देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images