Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

सातपूर : एमआयडीसीतील एका बारमध्ये मद्य पिण्यावरून झालेल्या वादात हर्षल साळुंखे या तरुणाचा मृत्यूप्रकरणातील तिघा संशयितांना न्यायालयाने सोमवारी पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच कंपनी व्यवस्थापन व सीटू कामगारांमध्ये झालेल्या वादात प्रवीण मेटकर या कामगार मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन कामगारांना न्यायालयाने सोमवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच गुन्हातील आरोपी डॉ. डी. एल. कराड यांना अद्याप अटक झालेली नाही. फायनन्स कंपनीत वसुलीचे काम करणाऱ्या स्वप्नील पुंड या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी माधुरी घावटे या महिलेस कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी भरण्याच्या वादात तरुणाचा खून

$
0
0

काही तासांत संशयितास जेरबंद

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड एमआयडीसीत एका कंपनीत मशिनमध्ये पाणी भरण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर खुनात झाले असून यात ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा (२०, रा. पांडवनगरी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर काही तासांच्या आतच पोलिसांनी तपास करून संशयितास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अंबड एमआयडीसीतील आशापुरा रबर उद्योग या कंपनीत ही घटना घडली. कंपनीत ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा आणि घनश्याम देविदास मोरे (३६, रा. रामकृष्णनगर, अंबड) यांच्यात वाद झाले. याप्रसंगी मोरे याने रबर कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने ग्यानेंद्रकुमारच्या मानेवर वार केला. ग्यानेंद्रकुमार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीसांना मिळताच सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे व अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतून पळून गेलेल्या मोरे याचा तपास सुरू केला. यानंतर काही तासात पोलिसांनी मोरेला ताब्यात घेतले. याप्रकरणी रणजीतकुमार वर्मा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यात्माची भक्ती जोपासली गेली पाहिजे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मी अनेक वर्षे कॉर्पोरेट कंपनीत काम केले आहे. सध्या स्वत: कंपनीचा मालक आहे. कॉर्पोरेटविश्वात काम करणाऱ्यांकडे अध्यात्मासाठी वेळ नसतो. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण असतो, असे अनेकांकडून सांगितले जाते. मात्र, कर्म करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे अध्यात्माचा विसर पडतो. त्यामुळे जीवनात सुख आणि आनंदाची प्राप्ती करायची असेल तर अध्यात्माची भक्ती जोपासली गेलीच पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी येथे व्यक्त केले.

गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत सोमवारचे पुष्प गुंफताना डॉ. देखणे बोलत होते. स्व. डॉ. वि. म. गोगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'कॉर्पोरेट कर्मयोग' या विषयावर हे व्याख्यान झाले. या वेळी डॉ. देखणे यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की जीवनात अधिक पैसा व श्रीमंती मिळाली म्हणजे सुख व आनंदाची प्राप्ती होऊ शकेल असे नाही. आजच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लाखो लोक नोकऱ्या करतात. त्यांना हजारो रुपयांपासून लाखो रुपयांचे पॅकेजही मिळतात. मात्र, एवढा पैसा मिळवूनही त्यांना सुख व आनंद मिळत नाही. त्याउलट कामाचा तणाव, वेळेचा अभाव, संघर्ष, अनारोग्य यांचाच सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनात खऱ्या अर्थाने सुख व आनंद मिळवायचा असेल तर अध्यात्माची गोडी लावली पाहिजे.

या वेळी विकास गोगटे, विवेक गोगटे, विनिता गोगडे, अनिता गोगटे आदी उपस्थित होते. अरुण शेंदुर्णीकर यांनी स्व. गोगटे यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी संगीता बाफना, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

आजचे व्याख्यान

वक्ते : संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख

विषय : उच्च शिक्षणाची गुणवत्ता : एक मोठे प्रश्नचिन्ह

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारात १४० बंद कुपनलिकांचे पुनर्भरण

$
0
0

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या उपक्रमाने वाढली भुजलपातळी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात रेवंदडा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात राबविलेल्या जलसंधारणाच्या पॅटर्नने भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. बंद कुपनलिकांना पुनर्जीवित करण्याचे काम यातून झाले. प्रतिष्ठानने राबविलेल्या कार्यक्रमात गेल्यावर्षी या काळात दहा मिनिटेही न चालणारे बोअरवेल निवडण्यात आलेले होते. ते सध्या पाऊण तास चालत आहेत.

सामाजिक उपक्रमांवर भर असलेल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जलपुनर्भरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यात बंद कुपनलिका व विहीर पुनर्भरण करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्याकडून हे काम पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. त्यांना फक्त साहित्य आणून द्यावे लागते. यामध्ये नंदुरबार शहरात प्रतिष्ठानने १४० ठिकाणी पूर्णपणे बंद तसेच कमी पाणी असलेल्या कुपनलिका निवडून तेथे असे काम झाले आहे.

कुपनलिका पुनर्भरण म्हणजे...
पावसाळ्यात छतावरील वाहून जाणारे पाणी पाईपच्या मदतीने घराजवळच्या कुपनलिकेला जोडून सोडले जाते. यासाठी कोळसा, वाळू, खडी, बारीक वाळूचा उपयोग करुन एक फिल्टरदेखील तयार केले जाते. पावसाळ्यात किमान १५ ते २० वेळा या पद्धतीने कुपनलिकेतून पाणी शेकडो फूट जमिनीखाली सोडले जात असल्याने या भागातील जलपातळी वाढण्यास मदत होते. याचप्रकारे विहीर पुनर्भरणदेखील केले जाते. कमी खर्च आणि सोपा असलेला हा प्रकल्प लाभदायक आणि पथदर्शी आहे. अनेकांना याचा लाभ झाला असून, दरवर्षी मार्चपासूनच केवळ हंडाभर पाणी कुपनलिकेतून येत असे, मात्र जलपुनर्भरणानंतर या मे महिन्यातही ३ तासांपेक्षा अधिक पाणीउपसा होत आहे, असे मत डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्यावर्षी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून जलपुनर्भरणाचे काम करून घेतल्यानंतर यंदा मे व जून महिन्यातही किमान ४ ते ५ तास कुपनलिकेतून पाणी मिळत आहे.
-भरत निकुंभे, ग्रामविकास अधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यम्मी टिफिन स्पर्धा अन् स्टार्टर मेकिंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरू झाल्या, की दररोज टिफिनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न त्यांच्या आईसमोर उभा राहतो. पदार्थ हेल्दी असण्याबरोबरच तो टेस्टीही असायला हवा, अशी मुलांची मागणी पूर्ण करता करता त्यांची दमछाक होते. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या चोखंदळ महिलांसाठी चटक मटक यम्मी टिफिन बॉक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

येत्या शनिवारी (दि. २ जून) दुपारी १२.३० वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, त्र्यंबकरोड येथे ही स्पर्धा होणार आहे. याच ठिकाणी दुपारी ३ वाजता मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉपही आयोजित करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त 'मटा'तर्फे विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चटक मटक यम्मी टिफिन बॉक्स कॉम्पिटिशन आणि मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉप आयोजन करण्यात आले आहे.

स्वयंपाकघरात जाऊन नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड अनेकांना असते. केवळ गरज म्हणून नाही तर स्वत:ची कल्पकता लढवून त्या पदार्थांमध्ये ट्विस्ट आणणे अनेकांना उत्तमरीत्या जमते. अशा व्यक्तींच्या पाल्यांचा टिफिनही तितकाच स्पेशल असतो. या स्पर्धेद्वारे असे पदार्थ सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉपमध्ये पालक चीज कटलेट ओट्स टिक्की, लौकी कबाब असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर कसे करायचे याविषयी विवेक सोवनी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी ०२५३ - ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर संपर्क साधावा.

स्पर्धेसाठीचे नियम...

स्पर्धेला येताना स्पर्धकांनी पदार्थ बनवून आणावा, पदार्थ स्पर्धकांनी स्वतः बनविलेला असावा, स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही, स्पर्धेसाठी पदार्थ तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचा चालेल, स्पर्धा दुपारी १२.३० वाजता सुरू होईल, स्पर्धेच्या ठिकाणी १५ मिनिटे अगोदर यावे, उशिरा आलेल्या स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार नाही, स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य असून, त्यासाठी फी नाही, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील

(मटा कल्चर क्लब लोगो, ७व्या वर्धापनदिनाचा लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यू आर कोड वापरावा.)

स्पॉन्सर्स लोगो बातमीत समाविष्ट असल्याने बातमी नाशिक प्लसच्या पहिल्या पानावर घ्यावी.

स्पॉनर्स लोगो स्टेटस = पॉवर्ड बाय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये बहिरम यांचा मार्ग मोकळा?

$
0
0

कळवण : कळवण नगरपंचायतीसाठी उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी निर्धारित वेळेत रोहिणी सुनील महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे मयूर बहिरम यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याचीच शक्यता असली तरी भाजपच्या सुरेखा जगताप यांचे आव्हान कायम असल्याने निवडणूक घेण्यात येणार आहे.

कळवण नगरपंचायतवर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. प्रथम नगराध्यक्षा होण्याचा बहुमान सुनीता पगार यांना मिळाला. आता नगराध्यक्षपद आदिवासी राखीव असल्याने भाजपकडून सुरेखा जगताप, काँग्रेस आघाडीकडून काँग्रेसचे मयूर बहिरम यांच्यात समोरासमोर लढत आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अडीच वर्षे इतर मागासवर्गीय गटातून सुनीता पगार यांनी नगराध्यक्ष पद उपभोगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुसूचित जमाती गटातून उमेदवार नसल्याने आघाडीचा धर्म पाळत अडीच वर्षे काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद राहणार आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक-एक वर्षांचे रोटेशन ठरवत बहिरम व रोहिणी महाले या दोघांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे.

भाजपकडे १७ पैकी केवळ ३ नगरसेवक असून चौथ्या भाजप पक्षाच्या निवड चिन्हावर निवडून आलेल्या भाग्यश्री पगार या विद्यमान उपनगराध्यक्ष असून त्यांनी सुरवातीपासूनच सत्ताधारी आघाडी सोबत राहून नुकतेच उपनगराध्यक्ष पद पदरात पाडून घेतले आहे. आजच उपनगराध्यक्ष पदाची देखील निवड होणार असून,कार्यकाळ पूर्ण न झाल्याने पगार यांचीच फेरनिवड होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा, नामपूरमध्ये मतदान शांततेत

$
0
0

निकालाकडे लागले लक्ष; सटाणा शहरात सर्वाधिक मतदान

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मंगळवारी अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. तालुक्यातील गोराणे येथील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्काराचा अपवाद वगळता इतरत्र शांततेत मतदान झाले.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दहा तर नामपूर येथील बारा मतदान केंद्रावर मतदान झाले. सर्वाधिक मतदान सटाणा शहरातील गणात झाले असून या ठिकाणी ७६ टक्के मतदान झाले. सटाणा येथील मतदान केंद्रात शेतकरी गणासोबतच व्यापारी व आडते गट तसेच हमाल मापारी गट या तिघां गटांचे मतदान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. सटाणा गणनिहाय झालेली मतदानाची टक्केवारी : आराई २४ टक्के, सटाणा २४ टक्के, मुंजवाड २४ टक्के, खमताणे २४ टक्के, कंधाणे २४ टक्के, डांगसौदाणे २४ टक्के, तळवाडे दिगर २४ टक्के, चौगाव २४ टक्के, अजमेर सौंदाणे २४ टक्के, वायगाव २४ टक्के.

उद्या मतमोजणी

सटाणा व नामपूर बाजार समितीसाठी गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. सटाणा बाजार समितीसाठी येथील प्रशासकीय इमारतीत तर नामपूर येथील मतमोजणी बाजार समितीच्या गोडाउनमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण महाजन व सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट महाग दिल्याने कार घातली अंगावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्लॉट व्यवहारात फसविल्याच्या संशयातून खरेदीदाराने पैसे परत करण्याची मागणी करीत मूळ मालकाच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार अमृतधाम परिसरात घडला. यात मूळ जागामालक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव ठाकरे (रा. पारिजात अपार्ट. के.के. वाघ कॉलेजमागे) असे संशयिताचे नाव आहे. तर, संदीप प्रभाकर महाले (रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) हे या घटनेत जखमी झाले आहेत. महाले यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि. २६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गंगोत्री विहार परिसरातील गार्डनजवळ फिर्यादी ठाकरे उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या संशयित महालेने, 'तू मला फार महाग प्लॉट दिला. आत्ताच्या आता मला पाच लाख रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबीयांना मारून टाकेल' असे धमकावले. थोडा वेळ वादावादी झाली. या वादावर पडदा टाकून ठाकरे आपल्या घराकडे पायी निघाले. मात्र, संतप्त महालेने आपल्या कारने त्यांना धडक दिली. या घटनेत महाले जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक योगिता पवार करीत आहेत. शहरात जमीन खरेदी विक्रीबाबत फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, वादातून थेट ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली असून, घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८ हजार विद्यार्थ्यांची अकरावीसाठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत नाशिक शहरातून सुमारे अठरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य महामंडळाचा दहावीचा निकाल अद्याप लागणे बाकी असले तरीही या प्रक्रियेतील पहिला भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठवड्यापासून वाढीस लागली आहे. अकरावीसाठी शहरातील ५७ कनिष्ठ कॉलेजेसमध्ये सुमारे २७ हजारावर जागा आहेत.

शिक्षण विभागाकडून मंगळवारी सायंकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार नाशिकमधून १७ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेंतर्गत नोंदणी केली आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या शहरांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिकमधील एकूण विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत नोंदणीस आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राज्यभरात या सहा शहरांमधून आतापर्यंत एकूण १ लाख ६१ हजार ९३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, मंगळवारी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामुळे या नोंदणीत येत्या काही दिवसांमध्ये आणखी वेगाने भर पडणार असल्याचा शिक्षण विभागाचा अंदाज आहे. बारावीचा निकाल बुधवारी (दि. ३०) जाहीर होणार आहे. या निकालापाठोपाठ दहावीचा निकाल काही दिवसांच्या अंतराने जाहीर करण्यात येतो. यामुळे आता दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलमध्ये बदल्यांचे वारे

$
0
0

कारकूनांपासून नायब तहसीलदारांपर्यंतच्या ५० जणांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागात बदल्यांचे वारे वाहत असून कारकून ते नायब तहसीलदार संवर्गातील ५० कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जारी केले. या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी १ जून रोजी हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एका पदावर तीन-तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया अटळ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्त्यारीत १५ तहसील कार्यालयांसह टंचाई, महसूल, निवडणूक, ग्रामपंचायत, रोजगार हमी अशा विविध शाखा कार्यरत आहेत. या शाखांसह तहसील कार्यालयांच्या अख्त्यारित काम करणाऱ्या, कारकून, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार या संवर्गातील सुमारे ५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांच्या आदेशावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे मंगळवारपासूनच नियोजित सुटीवर जाणार असल्याने त्यांनी सोमवारी रात्री ११.३० पर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. हे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले. त्यामुळे महसूल वर्तुळात दिवसभर बदल्यांचीच चर्चा होती. कोणाला कोठे बदली देण्यात आली याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत होते. कोणाला बदली मिळाली, कोण यंदा बदलीच्या ऑर्डरमधून सुटले याचीच चर्चा महसूल वर्तुळात रंगली होती. नियमानुसार दोन वर्षाहून अधिक कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या स्वागत कक्षातील गणेश लिलके आणि टंचाई शाखेतील जीवन राठोड या दोन अव्वल कारकुनांची अनुक्रमे पाथर्डी आणि कोशिंबे (ता. दिंडोरी) येथे मंडळ अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अशा झाल्या बदल्या

नायब तहसीलदार : ६

अव्व्ल कारकून : २३

कारकून : १२

मंडळाधिकारी : ९

एकूण : ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस बँकांचा संप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेतनवाढीच्या प्रश्नावर देशभरातील बँकचे कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. त्यामुळे ३० व ३१ मे रोजी बँकेचे व्यवहार ठप्प होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील ३५० हून अधिक बँकेचे सहा हजार कर्मचारी या संपात सहभाग घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक व जुन्या खासगी बँकेतील ग्राहकांना व्यवहार करण्यात अडचण येणार आहे.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या ९ संघटनेचे दहा लाख कर्मचारी युनायटेड फोरम बँक युनियनच्या झेंड्याखाली एकत्र आल्या असून, त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप बँक कर्मचारी, अधिकाऱ्याच्या वेतनवाढीच्या प्रश्नांबाबत सरकारच्या उदासीनतेच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे इंडियन बँक असोसिएशनतर्फे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फक्त २ टक्के प्रस्ताव दिल्याच्या विरोधात असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. जलद वाटाघाटीतून पगारवाढीच्या प्रश्नावर करार करावा, पगारवाढीच्या करारात श्रेणी एक ते श्रेणी सात अशा सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांचा समावेस करावा यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.

बँके कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी २ टक्के वाढीचा प्रस्ताव दिल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे सर्व संघटना एकत्र आल्या आहे. बँक कर्मचारी व अधिकारी सुध्दा या संपामुळे असल्यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील व त्याचा फटकाही ग्राहकांना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावी डॉक्टरांना संवादाचे धडे

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : @jitendratarteMT

नाशिक : रुग्णालयातील एखाद्या संवेदनशीलप्रसंगी अलीकडील काळात डॉक्टर आणि रुग्णालयाच्या स्टाफवर वाढत्या हल्ल्यांचे प्रकार विचारात घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मेडिकलच्या विद्यार्थ्यांना संवादाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुढचे पाऊल टाकत तीन सामाजिक संस्थांवर विद्यापीठाने ही जबाबदारी सोपविली आहे. डॉक्टर आणि समाज यांच्यातील सुसंवाद वाढीला लागावा, यासाठी या संस्थांच्या माध्यमातून भावी डॉक्टरांना समतोल संवाद साधण्यासोबत एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जाणार आहेत. जुलैनंतर या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जे. जे. रुग्णालय आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या या प्रयत्नाला महत्त्व आहे. हा उपक्रम सर्व वैद्यकीय शाखांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अॅलोपथी, दंतवैद्यक, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, नर्सिंग, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड ऑडिओलॉजी या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा घेता येईल. विद्यापीठाने हा उपक्रम कुणासाठीही सक्तीचा केलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतल्यास त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी याचा फायदाच होणार असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. संवादकौशल्य किंवा व्यक्तिमत्त्वाच्या अंगाने भावी डॉक्टरांच्या सादरीकरणात कमतरता राहू नये, यासाठी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.

यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांमध्ये संवेदनशील बनलेले रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील पुरेशा संवादाच्या अभावामुळेच डॉक्टरांवर हल्ले झाले असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. रुग्णाच्या काही संवेदनशील स्थितीची माहिती देण्यासाठी डॉक्टर आणि संबंधित स्टाफकडे पुरेसे संवादकौशल्य आवश्यक असते. त्या दृष्टीने या धर्तीवर प्रयत्न झाल्यास आरोग्य अभ्यासक्रमालपलीकडील व्यावसायिक कौशल्यांचा विकास साधण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात, असेही विद्यार्थ्यांचे मत आहे.

अभ्यासक्रमासाठी नाममात्र नोंदणी शुल्क

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तीन सामाजिक संस्थांचे सहकार्य विद्यापीठाच्या वतीने घेतले जाणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा नसेल. या संस्थांना यासाठी वेगळे शुल्क देण्यात येणार नाही. मात्र, जे विद्यार्थी संवादविषयक कौशल्यांसाठी या संस्थांच्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्याकडून नाममात्र नोंदणी शुल्क घेतले जाईल. महाविद्यालयांमध्ये दिवसभरासाठी किंवा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वेळेत काही दिवसांसाठी संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निहारिका कुटे टॉपर

$
0
0

दहावी 'सीबीएसई'मध्ये शहरातील शाळांचा १०० टक्के निकाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीएसई बोर्डाच्या पाठोपाठ सीबीएसई बोर्डानेही मंगळवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या या निकालासंदर्भातील माहितीनुसार शहरातील विविध सीबीएसईच्या शाळांमधून सिम्बायोसिस स्कूलची विद्यार्थिनी निहारिका कुटे हिने ९८ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला. याशिवाय शहरातील सीबीएसई माध्यमाच्या विविध शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती संबंधित शाळांच्या वतीने देण्यात आली.

सिम्बायोसिस स्कूल

सिम्बायोसिस स्कूलमधून दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व १३२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शाळेतून ९८ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर निहारिका कुटे, दुसऱ्या क्रमांकावर ९६.८ टक्के गुणांसह प्रथम कापुरे, तिसऱ्या क्रमांकावर ९६.६ टक्क्यांसह सोहम करंदीकर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या शाळेतून साई पाटील आणि साहील नवले यांनी इंग्रजीत ९७ गुण मिळविले. हिंदी विषयात ९९ गुण मिळविणारे १२ विद्यार्थी ठरले. दोन विद्यार्थ्यांनी मॅथ्समध्ये १०० गुण मिळविले. एका विद्यार्थ्याने सायन्समध्ये ९९ तर तीन विद्यार्थ्यांनी एसएसटी विषयात ९९ गुण मिळविले.

दिल्ली पब्लिक स्कूल

दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या शाळेमधून वैदेही सिन्हा या विद्यार्थिनीने ९७.४ टक्के मिळवित प्रथम क्रमांक पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावरील वेद शिंदे याने ९७.२ टक्के गुण मिळविले. तर आदित्य राठी या विद्यार्थ्याने ९६.६ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला. शाळेतील १५ टक्के विद्यार्थ्यांनी सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थी संख्येच्या ४० टक्के आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ८६.१८ टक्के असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. या शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये १००, इंग्रजीमध्ये ५ विद्यार्थ्यांनी ९८, हिंदीमध्ये ३ विद्यार्थ्यांनी ९९, फ्रेंचमध्ये एका विद्यार्थ्याने ९६, मॅथ्समध्ये ७ विद्यार्थ्यांनी ९९, सायन्समध्ये दोन विद्यार्थ्यांनी ९८ तर एसएसटीमध्ये ४ विद्यार्थ्यांनी ९७ गुण मिळविले आहेत.

किशोर सूर्यवंशी स्कूल

यंदा परीक्षेचे स्वरूप बदलले असूनही शाळेची आठ वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली असल्याचे किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शालेय संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

विद्या प्रबोधिनी प्रशाला

विद्या प्रबोधिनी प्रशालेचाही दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेत वैष्णवी कासार हिने ९६.८ टक्के मिळवित पहिला क्रमांक पटकाविला. प्रथमेश पाटील याने ९६.६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक पटकाविला तर नेहा कुऱ्हाडे हिने ९६.४ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकाविला. शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळविले. ३० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक तर ४० टक्के विद्यार्थ्यांनी ७१ ते ८० टक्कयांदरम्यान गुण मिळविले.

केंब्रिज स्कूल

केंब्रिज शाळेचाही सीबीएसई दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतून अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुण मिळवून प्रथम, निधी देशक याने ९५ टक्के गुणांसह द्वितीय, समृद्धी डेरे हिने ९५.४ टक्के गुणांसह तृतीय, केतन सुरवसे याने ९५.१ टक्के गुणांसह चतुर्थ आणि जान्हवी सोनावणे हिने ९५ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविले. शाळेत १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सुमारे ९० टक्क्यांवर गुण मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंपाठोपाठ जिल्हाधिकारीही रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांसाठी रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, तेही कौटुंबिक कारणास्तव शनिवारपर्यंत रजेवर गेल्याने महापालिकेला सध्या कुणी वाली नसल्याचे चित्र आहे.

आयुक्त रजेवर जाताना आपल्या कामाची जबाबदारी कुणाच्या तरी खांद्यावर सोपवून जात असतात. त्यानुसार आयुक्त मुंढे यांनी आपला कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. मात्र, तेही शनिवारपर्यंत सुटीवर गेल्याने महापालिकेतील काम ठप्प झाले आहे. रविवारी सुटी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सोमवारीच कामावर येतील, असा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाताना महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त किंवा इतर तत्सम अधिकाऱ्याकडे जबाबदारी द्यायला पाहिजे होती. मात्र, ती दिली नसल्याने अडचणीचे होणार आहे. आयुक्त आणि प्रभारी आयुक्त नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सोमवारपासून कामाची सुरवात होणार होती. मात्र, त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कामाचा रोज आढावा सादर करावा, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, आता आयुक्तच नसल्याने कोणाला आढावा सादर करायाचा हा मोठा प्रश्न आहे.

कर्मचाऱ्यांचा सुस्कारा

आयुक्त मुंढे महापालिकेत आल्यापासून कर्मचारी दहशतीच्या सावटाखाली काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला होता. त्याबाबत आयुक्तांना भेटून निवेदनही दिले होते. मात्र, तरीही आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले, तर काहींवर निलंबनाची कारवाई केली होती. मध्यंतरी आयुक्त सुटीवर जाणार, अशी चर्चा होती. त्या वेळी आयुक्त पुन्हा कामावर हजर झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा होती. आता आयुक्त खरोखरच सुटीवर गेल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

अतिरिक्त आयुक्तांकडे जबाबदारी

आयुक्त मुंढे यांनी प्रभारी आयुक्तपदाची धुरा जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली होती. मात्र, जिल्हाधिकारीही सुटीवर गेल्याने आता महापालिकेची जबाबदीरी अतिरिक्त आयुक्तांवर येऊन पडली आहे. प्रभारी आयुक्तांच्या गैरहजेरीत तातडीची कामे मार्गी लावण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव परिसरातील अतिक्रमणे हटविली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव येथील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवर असलेले पत्र्याच्या शेडच्या घरांचे अतिक्रमण मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हटविण्यात आले. अतिक्रमण काढण्यासाठी येथे पथक आल्यावर त्यांनी आवाहन केल्याने काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. उर्वरित अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयासाठी प्रस्तावित असलेल्या जागेत मजुरी करणाऱ्या काही कुटुंबांनी पत्र्याची कच्ची घरे उभी केली होती. येथे अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य होते. कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी ही अतिक्रमणे अडथळा ठरत असल्यामुळे माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी व पोलिस बंदोबस्तात हजर झाले. त्यांनी हे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या. काहींनी स्वतःहून सर्व अतिक्रमण काढून घेतले. त्यानंतर उर्वरित छोटे-मोठे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. सचिव आर. आर. मारवाडी, सहाय्यक पोलिस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि शिक्षण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् ‘त्यांनी’ साधला पंतप्रधानांशी संवाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपल्याला कधी बोलायला मिळेल असा साधा विचारही ज्या माणसाच्या येणार नाही, अशा देवळाली कॅम्पमधील एका सलून व्यावसायिकाला चक्क पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

नाशिक जिल्ह्यामधील 'मुद्रा लोन'धारकांमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुद्रा लोनचे सर्व हप्ते नियमितपणे किंबहुना अधिक पैसे खात्यात भरणारे देवळालीतील पन्नासवर्षीय हरी गनौर ठाकूर यांनी थेट पंतप्रधानांशी संवाद साधला.

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी बातचीत केली. विशेष म्हणजे मोदींनी सहज आणि सोप्या शैलीत हरी ठाकूर यांच्याशी संवाद साधला. मात्र, या लाभार्थ्याला मराठी येत नसल्याने पुढील संवाद हिंदीतच झाला. केंद्र सरकारने एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत देशभरात लहान-मोठ्या व्यवसायांना कर्ज दिले गेले. पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी नमो अॅप आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कॉन्फरन्सद्वारे ही कॉन्फरन्स झाली.

देवळालीत गेल्या ४० वर्षांपासून सलूनचा व्यवसाय करीत असलेल्या या व्यावसायिकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या देवळाली शाखेतून १५ डिसेंबर २०१७ रोजी व्यवसायवाढीसाठी मुद्रा योजनेतून ४ लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करताना त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत असलेला हप्त्याच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा केली आहे. त्यामुळ‌े बँकेचे मॅनेजर विक्रांत कुमार यांनी लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बी. व्ही. बर्वे व विभागीय प्रमुख बी. एस. टाव्हरे यांना त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पंतप्रधानांशी संवाद साधण्यापूर्वी केंद्राच्या 'डीएफएस' खात्याकडून त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांची निवड झाली होती.

प्रामाणिकपणामुळे मिळाली संधी

संसरीसारख्या गावात राहणारे ठाकूर हे कर्ज घेतल्यावर दुसऱ्या महिन्यापासूनच दरमहा ८७०० रुपये हप्ता असतानाही महिनाकाठी न चुकता १० हजार रुपयांचा नियमित भरणा करीत आहेत. त्यामुळे त्यांचे एकूण १५ हप्ते आज बँकेत जमा झाले आहेत. त्यांच्या याच प्रामाणिकपणामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली.

--

बँकेच्या शाखेजवळच प्रामाणिकपणे काम करणारे हरी ठाकूर मुद्रा योजनेतील कर्जाची नियमित फेड करीत आहेत.

-विक्रांत कुमार, शाखा प्रबंधक, महाराष्ट्र बँक, देवळाली

मुद्रा योजनेतून कर्ज घेतल्याने मला व्यवसायवृद्धीस मदत झाली. नवीन साहित्य घेण्यासह दुकानातही सुधारणा करता आली.

-हरी ठाकूर, लाभार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्माघाताने मृत्यू?

$
0
0

त्र्यंबकेश्वर : येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील नागास्वरूपराणी साईसत्य राजाचारी असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चक्कर आल्यानंतर तिला नातेवाईकांनी त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉ. आडके यांनी तपासून मृत घोषित केले. त्र्यंबक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील यांचा चार दिवसांत कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी दुपारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची भेट घेतली. या वेळी पोलिसांनी आजवर केलेल्या तपासाची माहिती भानसी यांना देण्यात आली. पाटील यांनी लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने काही माहिती असल्यास तपासाच्या दृष्टिकोनातून ती देण्याचे आवाहन सिंगल यांनी केले.

पाटील शनिवारपासून बेपत्ता आहेत. कार्यालयीन दबावामुळे पाटील बेपत्ता झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सुरुवातीला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दिसल्याबाबत चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात पोलिसांनी येथील सर्व सीसीटीव्ही फूटेज बघितले असता त्यात पाटील दिसत नाहीत. दुसरीकडे पोलिसांनी शहरातील बहुतांश हॉटेल्स, नदीकिनारा, हॉस्पिटलदेखील तपासले. पाटील बेपत्ता होऊन चार दिवस उलटले असून, चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर भानसी यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा, अशी विनंती महापौरांनी केली. पोलिस आयुक्त सिंगल यांनी आजवर झालेल्या तपासाबाबत भानसी यांना माहिती दिली. दुसरीकडे कार्यालयीन जाचामुळे पाटील बेपत्ता झाल्याचे सांगितले गेल्याने आपल्याकडे काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, अशी विनंती सिंगल यांनी केली. पाटील बेपत्ता झाले, त्या वेळी त्यांनी मोबाइल घरीच ठेवला होता. त्यांच्याकडे फक्त एक एटीएम कार्ड असून, त्याचाही वापर पाटील यांनी अद्याप केलेला नाही. टेक्नॉलॉजीच्या आधारे एकही पुरावा समोर आलेला नसून, याचमुळे तपासावर परिणाम होत असल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त होते आहे.

कुटुंबीयांचा जीव टांगणीला

चार दिवसांपासून पाटील बेपत्ता असून, कुटुंबीयांसह पाटील यांचे सहकारी आणि नातलगांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे १५ दिवसांच्या रजेवर गेले असून, महापालिकेचे प्रशासन याबाबत नक्की काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पोलिसदेखील महापालिका अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती अधिकाराचा ‘राडा’ पोहचला कोर्टात

$
0
0

पोलिस महासंचालकासह २० अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे फर्मान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी न करता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिल्याची फिर्याद घेऊन एक व्यक्ती थेट कोर्टापर्यंत पोचली. कोर्टाने हा दावा दाखल करून घेत विविध जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिस महासंचालकांनाही हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्या कोर्टात प्रकरण आले असून, यात नेमकी काय घडामोड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची बुधवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी दिलीप तुकाराम निकम (रा. बालाजी सदन, नागचौक, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका जागेबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागिवली. हे काम तसे किरकोळ मात्र, यानंतर सुरू झाली वादाची मालिका. निकम यांच्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक अरुण रंगाराव देशमुख यांनी वेळेत माहिती दिली नाही. यानंतर सदर प्रकरणात निकम यांनी अपील केले. तेथून हे प्रकरण त्र्यंबक नाका येथील माहिती आयोगापर्यंत पोहचले. मात्र, महसूल, पोलिस, माहिती आयोग, ग्राहकमंच आदी विभागांनी मिळून आपल्याला न्याय मिळू दिला नसल्याचा मजुरी काम करणाऱ्या निकम यांचा दावा आहे. आपणला काहीवेळा मारहाण आणि दमबाजीही झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस महासंचालकांनीही सर्वांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत निकम यांनी जिल्हा कोर्टात खासगी फिर्याद दाखल केली.

कोर्टाने सदर फिर्याद दाखल करून घेतली असून, विविध पदांवर कार्यरत असलेल्या २० अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याबाबत आदेश दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे. माहिती अधिकाराबाबत दोन टोकाच्या भूमिका नेहमीच पुढे येतात. त्यामुळे हे दुधारी अस्त्र नेमकी कोणावर उलटणार, हे लवकरच कोर्टात स्पष्ट होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यांना हजर राहण्याचे आदेश

विश्वास ढवळे (ग्राहकमंच, बुलढाणा), विनायक लोंढे (ग्राहक मंच, अकोला), एम. एम. नाईक (ग्राहक मंच, अहमदनगर), मोहन चव्हाण (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद), पंढरीनाथ पाटील (निवृत्त, उपनगर), अरुण देशमुख (ग्रामसेवक, जळगाव), हेमंत भंगाळे (वकील, जळगाव), नेमीनाथ मुगदूम (प्रबंधक, ग्राहक मंच, जळगाव), पूनम मलिक (ग्राहक मंच, जळगाव), संतोष परदेशी (ग्राहक मंच, जळगाव), घनेश सोनवणे (ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव), संजय बोरवाल (ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव), डॉ. जालिंदर सुपेकर (पोलिस अधीक्षक, जळगाव), लक्ष्मीकांत पाटील (पोलिस उपायुक्त, नाशिक), र. सा. सोनार (राज्य माहिती आयोग, नाशिक), जी. आर. राठोड (पोलिस, पेठ पोलिस स्टेशन), सु. सा. चौधरी (राज्य माहिती आयोग, नाशिक), रवींद्रकुमार सिंगल (पोलिस आयुक्त, नाशिक), सतीश म्हात्रे (पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), गोविंद माईनकर (ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार्मनी आर्ट गॅलरीत शिल्प प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हार्मनी आर्ट गॅलरी व शहरातील शिल्पकारांच्या वतीने ज्येष्ठ शिल्पकार व रंगकर्मी नेताजी भोईर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिल्पाकृती प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कवी किशोर पाठक अध्यक्षस्थानी होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्‍वस्त विनायक रानडे, झारखंड येथील चित्रपट दिग्दर्शक श्रीराम डालटन, अरुण नेवासकर, ज्येष्ठ शिल्पकार सुरेश भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजा पाटेकर यांनी कलावंतांचा सत्कार केला. प्रा. बाळ नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनात शिल्पकार यतीन पंडित, सुरेश भोईर, श्रेयस गर्गे, नीलेश ढेरे, वरुण भोईर, शरद मैंद, प्रा. योगेश गटकळ, प्रा. भूषण कोंबडे, प्राचार्य सचिन जाधव, सागर शिरसाट यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून, त्यात साईबाबा, छत्रपती शिवराय, संत जनार्दन स्वामी, शंकर महाराज, महात्मा फुले, नागाईदेवी, मंगेश पाडगावकर आदींच्या शिल्पाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी पहिल्याच दिवशी गर्दी करीत कलाकृतींना दाद दिली. हे प्रदर्शन ३१ मेपर्यंत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत खुले राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images