Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झेडपीच्या सीईओच्या कामाचा धडाका सुरुच.......

$
0
0

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोहिम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या परिच्छेदातील बाबींची पूर्तता करण्यासाठी ३० मे ते १२ जून या कालवधीत धडक मोहीम राबविण्याचे निर्देश झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी वित्त विभागाला दिले आहेत.

स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवालात जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व पंचायत समितीकडील १५ हजार ९५३ परिच्छेद प्रलंबित असून, परिच्छेद निकाली काढण्याचे काम अतिशय असमाधानकारक आहे. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे यांनी तालुकानिहाय नियोजन केले असून, ३० मेपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे.

घरकुलची सुनावणी

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांची सुनावणी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. ३१ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. घरकुल योजनेत ज्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम सर्वात कमी आहे, घरकुले मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत तसेच दुसरा व तिसरा हप्ता अद्याप वितरित केलेला नाही अशा ग्रामपंचायतीची सुनावणी केली जाणार आहे. या सुनावणीत संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, उपअभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, ग्रामीण गृह निर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरकुले वेळेत का पूर्ण झाले नाही, कामे प्रलंबित राहण्याची कारणे आदींबाबत यावेळी संबंधितांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

कडकनाथ कोंबड्या वाटप

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पेठ येथील आढावा बैठकीत कुपोषण निर्मूलनासाठी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उप विभाग पेठ येथील अभियंता गवळी यांनी करंजाळी येथील अंगणवाडीमधील कुपोषित बालकांच्या पालकांना कडकनाथ जातीची एक नर व एक मादीची जोडी कुपोषित बालकांना अंडी देण्यासाठी वाटप केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक मतदारसंघावरही सेनेचा भगवा फडकवा

$
0
0

उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीच्या ताब्यातील नाशिक विधान परिषदेचा गड खेचून आणल्यानंतर आमदार नरेंद्र दराडेंनी शुक्रवारी मातोश्रीवर धाव घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधान परिषदेचा गड सर केल्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाचाही गड जिंका, असे आदेश ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच, नाशिककरांनी बऱ्याच दिवसांनंतर पेढे खाऊ घातल्याबद्दल त्यांनी नाशिककरांचे आभारही मानले.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांचा दारूण पराभ‌व पराभव केला. भाजपच्या पाठिंब्यानंतरही राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा मतदारसंघ शिवसेनेकडे प्रथमच आला आहे. विजयानंतर नवोदित आमदार नरेंद्र दराडेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मातोश्रीवर जाऊन शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंचा सत्कारही केला.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंसह पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक मतदारसंघात सेनेची एंट्री

विधान परिषदेसोबतच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही उमेदवार उभा करण्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, असे सांगत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काही दिवसांपासून शांत बसलेल्या चेन स्नॅचर्सने दोन ठिकाणी हात साफ करीत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. दोघांनी मिळून इंदिरानगर आणि भद्रकाली परिसरात चेन स्नॅचिंग केली असून, सराइतांचा मागमूस काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

मंदाकिनी श्रीराम कोकाटे (वय ७०, रा. श्रीजी हाइट्स, तपोवन रोड, काठे गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीजी हाइट्स या बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोकाटे राहतात. पाय मोकळे करण्यासाठी गुरुवारी सकाळी त्या इमारतीच्या आवारात आल्या होत्या. साडेदहाच्या सुमारास घरी परतण्यासाठी त्या सोसायटीच्या आवारातील लिफ्टजवळ थांबल्या. या वेळी तिथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांपैकी एक जण उतरून कोकाटे यांच्याजवळ आला. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील पोत खेचून चोरटा रस्त्यावर आला. तिथे दुचाकीवर थांबलेल्या साथीदारासह त्याने पोबारा केला. मुळे तपास करीत आहेत. चेन स्नॅचिंगची आणखी एक घटना इंदिरानगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. कमलाबाई प्रभाकर वाघ (वय ६५, रा. आत्रीपूजन अपार्ट., परबनगर) यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. परिसरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात गुरुवारी सकाळी फुले घेण्यासाठी वाघ गेल्या होत्या. फुले घेऊन अनुष्का सोसायटीसमोरून त्या घराकडे पायी परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. मागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची आणि ८५ हजारांची पोत ओरबाडून धूम ठोकली.

दुकान फोडणारा संशयित अटकेत

गूळ बाजारात बंद दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी अनिल यादव (वय २८, रा. समतानगर, टाकळी रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने गूळ बाजारातील विजय अव्हेन्यू सोसायटीतील गाळ्यामध्ये हरीष पवार यांच्या मालकीचे दुकान बुधवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत संशयितास अटक केली. हवालदार सोनार तपास करीत आहेत.

घंटा चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

म्हसोबा मंदिरातील लोखंडी रॉडला टांगलेल्या नऊ पितळी घंटा चोरणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. ही घटना जिल्हा परिषद परिसरात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सखाराम सूर्यवंशी, आकाश भीमराव सांगळे (दोघे रा. सिद्धार्थनगर, सामनगाव रोड) आणि नितीन भीमा आहेर (रा. पगारेमळा, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हा परिषदेसमोरील लक्ष्मी मोटारसायकल वर्क शॉप येथील म्हसोबा मंदिरात शिरून चोरट्यांनी प्रवेशद्वारावर लोखंडी रॉडला लावलेल्या नऊ पितळी धातूच्या घंटा करवतीच्या साह्याने कापून लंपास केल्या होत्या. या प्रकरणी शरद मंडाले यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच तपास करीत संशयितांना अटक केली. संशयितांकडून दुचाकी आणि घंटा असा सुमारे ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

ट्रॅव्हल्स बसमधून बॅटऱ्यांची चोरी

पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून चोरट्यांनी आठ बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना महामार्गावरील अमृतधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीपसिंग बिरबलसिंग बेनिवाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस बुधवारी रात्री कंपनीच्या अमृतधाम परिसरातील कुणाल हॉटेलशेजारील जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या बसमधून ८० हजार रुपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्या. उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ बांधकाम पुन्हा बांधून द्या!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नाशिकमधील गंगापूर रोडवरील 'ग्रीनफिल्ड लॉन्स' या लँडस्केप व मंगल कार्यालयाच्या वादग्रस्त बांधकामाविषयी 'जैसे थे'चे स्पष्ट आदेश असूनही आणि या आदेशाची माहिती मिळूनही नाशिक महापालिका अधिकाऱ्यांनी केलेली तोडकामाची कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना चांगलीच भोवली आहे. न्यायालयाने जोरदार दणका दिल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांना न्यायालयाची माफी तर मागावी लागलीच; शिवाय तोडलेले बांधकाम दीड महिन्यात पालिकेच्याच खर्चाने बांधून देण्याची हमीही देणे भाग पडले.

'ग्रीनफिल्ड लॉन्स'चे अभिजीत पाटील यांनी अॅड. संदीप शिंदे यांच्यामार्फत पालिकेच्या कारवाईविरोधात सुटीकालीन न्यायालयात तातडीने रिट याचिका दाखल केली. 'जे बेकायदा बांधकाम आहे ते आम्ही स्वत:हूनच काढलेले असून, जे नियमित होऊ शकते त्याविषयी चार महिन्यांपूर्वीच अर्ज केलेला आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित असतानाही पालिकेकडून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात आहे', असे म्हणणे पाटील यांच्यातर्फे न्या. शाहरुख काथावाला व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर २१ मे रोजीच्या प्राथमिक सुनावणीत मांडण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने दोन दिवसांनी सुनावणी ठेवत तोपर्यंत संबंधित सर्व्हे नंबर '४/२बी-१ए ते ४/२बी-१जी'वरील बांधकामाविषयी 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. मात्र, 'या आदेशाची स्पष्ट माहिती अॅड. शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व आयुक्तांना दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरुपात दिली असताना आणि पालिकेच्या वकिलांनीही यासंदर्भातील माहिती प्रशासनाला दिली असताना २१ मे रोजीच संध्याकाळी ५ वाजता पालिकेचे कार्यकारी अभियंता रोहिदास बहिराम, नगररचना अतिरिक्त संचालक आकाश बागुल व विभागीय अधिकारी संगीता गायकवाड यांच्या पथकाने ग्रीनफिल्ड लॉन्सची मोठी संरक्षक भिंत, ओटा व अन्य लहान बांधकामांवर बुलडोझर चालवला. तसेच ग्रीनस्केपचीही नासधूस केली', असे अॅड. शिंदे यांनी २३ मे रोजीच्या सुनावणीत निदर्शनास आणले. त्यामुळे खंडपीठाने त्याची अत्यंत गंभीर दखल घेत आयुक्त व रोहिदास बहिराम यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्यक्तिश: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तरीही आयुक्त मुंढे हजर राहिले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करून मुंढेंविरोधात 'न्यायालय अवमानाची कारवाई का करू नये', अशी 'कारणे दाखवा' नोटीस काढतानाच 'दुपारी ३ वाजता हजर व्हा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल', असा गर्भित इशाराही दिला. ही नामुष्की ओढवल्यानंतर मुंढे यांनी तातडीने मुंबईत धाव घेत दुपारी ३ वाजता न्यायालयात हजेरी लावली.

मुंढेंची सारवासारव

'आपल्याला दुपारी ४ वाजता न्यायालयाच्या आदेशाची माहिती मिळाली', अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न मुंढे यांनी केला. तर 'गोदावरी नदीपात्राजवळच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयानेच एका जनहित याचिकेत दिलेला होता, त्याअनुषंगाने कारवाई सुरू होती. शिवाय, बेकायदा बांधकाम लॉन्समालकांनीच स्वत:हून तोडले होते', असे सांगण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे अॅड. वैभव पाटणकर यांनी केला.

न्यायालयाने सुनावले

- 'आम्ही आताच्या क्षणाला बांधकाम बेकायदा होते की नाही या विषयाचा विचारच करत नसून, न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही एवढ्याच मुद्याचा विचार करीत आहोत. न्यायिक शिस्तही प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. आयुक्तांनी आदेशाचे पालन केलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यावरून आम्ही त्यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालय अवमानाची कारवाई करू शकतो. त्यांनी कोठडीत जावे, अशी तुमची इच्छा आहे का? नसेल तर इतर मुद्यांबाबत युक्तिवाद करूच नका', अशा शब्दांत खंडपीठाने अॅड. पाटणकर यांना सुनावले. त्याचवेळी पालिका कार्यालयात व अधिकाऱ्यांना दुपारी ३ वाजता आदेशाविषयीची लेखी माहिती मिळाल्याचे कागदपत्रांवरूनच स्पष्ट होत असून, त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता अधिकाऱ्यांनी कारवाई कशी काय केली?', असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.

दीड महिन्यात पुन्हा उभारणी

अखेरीस आदेशाची माहिती मिळूनही तोडकामाची कारवाई झाल्याची बाब मुंढे यांना मान्य करावी लागली. त्यामुळे 'झालेल्या कारवाईबाबत माफी मागतो. यापुढे न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल', असे मुंढे यांनी स्पष्ट केले. तेव्हा 'केवळ माफी मागून चालणार नाही, तुम्हाला तोडलेले बांधकाम पुन्हा पालिकेच्या खर्चाने बांधून द्यावे लागेल', असे खंडपीठाने सुनावले. त्यामुळे 'आम्ही तोडलेले बांधकाम पुन्हा बांधून देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करू आणि दीड महिन्यात ते काम पूर्ण करू', अशी हमी मुंढे यांनी दिली. अखेरीस खंडपीठाने मुंढे यांची माफी व हमी नोंदीवर घेऊन त्यांना संभाव्य कारवाईतून मुक्त केले आणि याविषयीची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली. त्याचवेळी बांधकामाविषयीची प्रगती न्यायालयात कळवत रहावी, असेही निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले.

कोट

''न्यायालयाचा आदेश असतानाही आयुक्त न्यायालयात हजर राहिले नाही. अखेर न्यायालय अवमानाच्या कारवाईचा इशारा दिल्यानंतर ते हजर झाले. आयुक्तांची ही वर्तणूक योग्य नाही. भविष्यातही अशी वर्तणूक राहिली तर न्यायालय त्याकडे गांभीर्याने बघेल.''

-मुंबई उच्च न्यायालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छा कमी केल्या की समस्या संपतील

$
0
0

ब्रह्मकुमार सूरजभाई यांचे प्रतिपादन

वसंत व्याख्यानमाला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज अपेक्षांचा भडिमार प्रचंड झाल्याने जीवन जगणे मुश्किल झाले आहे. अपेक्षा कमी केल्यास जीवन जगणे सुसह्य होऊ शकते. आपण आनंदी राहिले तर जगणे खूप सोपे आहे, परंतु इच्छांनी आपल्याला व्यापून टाकलेले आहे. इच्छा कमी केल्या की समस्या संपतील, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी केले.

गोदाघाटावर आयोजित व्याख्यानमालेत शुक्रवारी पंचविसावे पुष्प 'जीवन विषयक शंका समाधान' या विषयावर ब्रह्मकुमार सूरजाभाई यांनी गुंफले. हे व्याख्यान माणेकलाल भटेवरा यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. सूरजभाई पुढे म्हणाले, की सकाळची सुरुवात रम्यपणे हसत हसत केली तर पूर्ण दिवस चांगला जातो. परंतु, आजकाल हसण्यासाठीही लोकांना डॉक्टरकडे जावे लागते. नाशिकची लोकसंख्या २२ लाख आहे, तर त्यासाठी १ हजार डॉक्टर आहेत. प्रत्येक डॉक्टरकडे पेशंटसची गर्दी ही असणारच. त्यामुळे आपण डॉक्टरकडे न जाता कसे निरोगी राहू याचा विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मनुष्य हा नेहमी नकारात्मक विचार करतो, त्याने सकारात्मक विचार केला तर तो देवत्वाला पोहोचेल परंतु, त्याच्या मनात नेहमी नकारात्मक घंटा वाजत राहिली तर मात्र त्याचा परिणाम शरीरावरही होईल.

आजमितीला संवाद कमी होत आहे. संवादाअभावी तर ५६ लाख केसेस घटस्फोटाच्या आहेत. न्यायालयदेखील निकाल देता देता थकणार आहे, इतक्या या केसेस आहेत. आपल्याला अध्यात्माकडे जायचे आहे. अध्यात्म हे सर्व विकारांवर औषध आहे. आपल्याला सुखी जीवन जगायचे असल्यास अध्यात्माचा अंगीकार केला पाहिजे, असेही सूरजभाई म्हणाले.

---

आजचे व्याख्यान

वक्ते : राजेंद्र फातर्णेकर

विषय : अणुऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासेगाव येथे युवकाचा खून

$
0
0

दिंडोरी : रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होत युवकाचा निर्घृण खून झाला. पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका संशयितास अटक केली आहे. तीन जण फरार झाले आहेत. उत्तम गुलाब लहांगे (वय २२) व सुनील संजय लहांगे (वय २२) हे फिरायला जात असताना संजय सुकदेव बेंडकुळे याने चारचाकी गाडीने कट मारला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. संजय बेंडकुळे, संदीप बेंडकुळे, भावराव बेंडकुळे, तानाजी बोके यांनी वाद घालत सुनील लहांगेवर तलवारीने पोटावर वार केला. उपचारादरम्यान त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस; पोलिसांनी उधळली हौस

$
0
0

मांत्रिकासह पाच जणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. निव्वळ अंधश्रद्धा असूनही लोक या जादूटोण्यावर विश्वास ठेवून स्वत:ची फसवणूक करून घेतात. पैशांची गरज होती म्हणून पालघर येथील महिलेने दोन मांत्रिकांवर विश्वास ठेवला. मात्र, त्यांचा हा पैसे पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावत दोन मांत्रिकांसह पाच जणांना अटक केली. या दोन्ही मांत्रिकांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा व भारतीय दंड विधान संहिता अन्वये पैशांचा पाऊस पाडणे, फसवणूक करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद रोड, नांदूर येथील देव मोटर्स येथे गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तब्बल एक कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकत ही कारवाई केली. पूजा सुरू असतानाच आडगावचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्यासह पोलिस पथकाने देव मोटर्स येथे छापा टाकला. या छाप्यात प्रमोद सूर्यवंशी याच्यासह मांत्रिक संदीप सीताराम वाकडे (रा. भुजबळ फार्म, सप्तशृंगीचौक, सिडको), सुधीर दत्तू भोसले (रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव, नाशिकरोड), तुषार राजेंद्र चौधरी (साईबाबानगर, सिडको), चंद्रकांत राघोजी जेजुरकर (रा. पाथरवट लेन, शिवाजी चौक, पंचवटी) यांना अटक करीत गुन्हा दाखल केला.

एक कोटी रुपयांचा पडणार होता पाऊस...

नालासोपारा येथील एका महिलेने लोकांकडून १० लाख रुपये घेतले आहेत. ते देण्यासाठी तिला पैशांची गरज होती. तिने नाशिक येथील परिचित प्रमोद बापू सूर्यवंशी (रा. जागृतीनगर, नाशिकरोड) याच्याकडे आठ दिवसांपूर्वी चर्चा केली होती. तेव्हा सूर्यवंशीने आपल्या ओळखीतले मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात. मात्र, त्या पूजेसाठी देवी म्हणून एका बालिकेला बसवावे लागते. तसेच, पूजापाठासाठी मांत्रिकास व त्याच्या सहकाऱ्यांना ६० हजार रुपये द्यावे लागतील. हे सर्व केल्यानंतर मांत्रिक एक करोड रुपयांचा पैशांचा पाऊस पाडतील, असे सूर्यवंशी याने त्या महिलेला सांगितले होते.

मांत्रिकाच्या सांगण्यावरून मांडली पूजा

पैशांची गरज असलेल्या या महिलेने सूयंवशीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ती एका कुमारीकेसह नाशिकरोडला आली. तिने सूर्यवंशीची भेट घेतली. त्याला तीस हजार रुपये दिले. देव मोटर्स औरंगाबाद येथे सुधीर भोसले, चंद्रकांत जेजुरकर, तुषार चौधरी, मांत्रिक संदीप वाकडे व निखिल यांची त्या महिलेला ओळख करून दिली. त्यांनी पूजेसाठी लागणारे साहित्य आणले. रात्री अकराच्या सुमारास या लोकांनी त्या महिलेला आणि कुमारिकेला देव मोटर्स येथील ऑफिसमध्ये नेले. तेथे संदीप वाकडे व निखील हे दोघा मांत्रिकांच्या सांगण्याप्रमाणे पूजा मांडली. त्यांची पूजा सुरू झाल्याच्या थोड्यावेळातच आडगाव पोलिसांनी छापा टाकत पाचही जणांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीला सुरुवात

$
0
0

प्रवाशांच्या मागणीची पूर्तता

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित आरामदायी ‘नंदुरबार-पुणे’ स्लीपरकोच शिवशाही शुक्रवार (दि. २५) पासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, ही मागणी जोर धरू लागली होती. त्या मागणीला मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाकडून ‘नंदुरबार-पुणे’ या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गास मोठा फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून सुटणारी ‘नंदुरबार-पुणे’ शिवशाही दररोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी ‘पुणे-नंदुरबार’ शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सोडली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एकीकडून भाडे ९७२ रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहितीही गावीत यांनी दिली.


या अगोदर शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लीपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार एसटी महामंडळाकडून शिवशाही बस सुरू केली आहे. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील. तर परत येताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा मार्ग राहणार आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

शिवशाहीची वैशिष्ट्ये...
स्लीपरकोच आरामदायी सिट
संपूर्ण वातानुकूलित बस
मोबाईल चार्जर पोर्ट
जीपीएस ट्रॅकिंग सुविधा
अग्निशमन बंब
एअर सस्पेंशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांना पाणी दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईच्या सावटातून शहरवासीयांची मुक्तता झाली आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मोठ्या प्रकल्पांत एकूण ६५ हजार ८१४ दलघफू इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. त्यापैकी सध्या १३ हजार ४८९ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा १० हजार १२० दलघफू इतका शिल्लक होता. परिणामी, पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचे सावट दूर झाले आहे. जिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांपैकी गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चणकापुर आणि गिरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत मात्र गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी आणि नागासाक्या हे पाच प्रकल्प गेल्या वर्षी कोरडे पडले होते. यंदा मात्र या प्रकल्पांत काही प्रमाणात पाणी आहे, तर भोजापूर आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही कोरडेठाक पडलेले आहेत. मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास पाणीटंचाईचे संकट ओढवणार नाही. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्यास पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा (दलघफू)

प्रकल्प- संकल्पित पाणीसाठा- २०१८

पाणीसाठा-टक्केवारी

गंगापूर- ५६३०- ३९३७- ३४

कश्यपी-१८५२-१३०१-७०

गौतमी गोदावरी-१८६८-१८८-१०

आळंदी-९७०-१४०-१४

पालखेड-६५३-३६७-५६

करंजवण-५३७१-६२०-१२

वाघाड-२३०२-९६-०४

ओझरखेड-२१३०-३२५-१५

पुणेगाव-६२३-६९-११

तीसगाव-४५१-३७-८

दारणा-७१४९-३११४-४४

भावली-१४३४-४३-०३

मुकणे-७२३९-५४५-०८

वालदेवी-११३३-३४३-३०

कडवा-१६८८-२३८-१४

नांदूरमध्यमेश्वर-२५७-१९-०७

भोजापूर-३६१-००-००

चणकापूर-२४२७-५६७-२३

हरणबारी-११६६-७३-०६

केळझर-५७२-१०७-१९

नागासाक्या-३९७-००-०२

गिरणा-१८५००-२९२७-१६

पुनद- १३०६-४२६-३३

माणिकपुंज-३३५-००-००

एकूण-६५८१४-१३४८९-२०





विभागातील पाणीसाठा (दलघमी)

जिल्हा-प्रकल्पसंख्या- प्रकल्पीय उपयुक्त साठा-आजचा उपयुक्त साठा- टक्केवारी

नाशिक-१०३-१४९३.८४-४५१.८७-३०.२५

नगर-३९-१२१७.६३-२२५.३७-१८.५१

धुळे-५८-४८१.२६-८७.१७-१८.११

नंदुरबार-४१-१९४.३२-७२.०७-३७.०९

जळगाव-११२-१४२५.४५-२३३.८८-१६.४१

एकूण-३५३-४३३७.८०-९००.५५-२०.७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुगल’ले लागनी ‘अहिराणी’नी गोडी

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

खान्देशी लोकांची बोली भाषा असलेल्या 'अहिराणी'चा गुगल की-बोर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे अहिराणी लोकसाहित्याचा वारसा जतन करणे अधिक सोपे झाले आहे. खान्देशातील लोकांना आपल्या बोलीभाषेत इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी या की-बोर्डच्या माध्यामातून मिळाली आहे.

खान्देशातील नागरिकांचे शिक्षण, रोजगार, व्यापारानिमित्त शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. मात्र, आपला प्रांत सोडला, की परप्रांतात पुन्हा आपली बोली भाषा, अहिराणी बोलायची संधी मिळत नाही. त्यामुळे अहिराणी भाषेचा वापर कमी होत आहे. गुगल की-बोर्डच्या नव्या फीचरच्या माध्यमातून अहिराणी भाषेचा जगभरात प्रचार-प्रसार होणार आहे. या की-बोर्डमध्ये अहिराणी भाषेतून लिहिणे आता शक्य झाले आहे. की-बोर्डमध्ये अहिराणी भाषेचा समावेश झाल्याने अहिराणी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

असा असेल की-बोर्ड

गुगल की-बोर्डवर देवनागरीतून अहिराणीसह मराठी, हिंदी टाइप करणे अशक्य नाही. मात्र, मराठी आणि हिंदी टाइप करताना गुगलचा की-बोर्ड एखाद्या शब्दाचे अनेक पर्याय देतो. त्या तुलनेत अहिराणी बोली भाषेसाठी यापूर्वी शब्दपर्याय दिले जात नव्हते. गुगलने यात बदल करीत अहिराणी शब्दांची भर घातल्याने बोली भाषेतून संवाद साधणे अहिराणी बोलणाऱ्या जगभरातील नागरिकांना सोयीचे झाले आहे.

या भाषांचाही नव्याने समावेश

बहामिनीझ, कनाउजी, फिजन, गगाउज, हल्बी, कराकल्पक, कनुरी, कोमी, मोक्षा, पानगासिआन, सॅन्गो, वेप्स, वोरो, वाडगी, झीउज या जगभरातल्या बोली भाषांचा गुगल की-बोर्डमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अहिराणी लोकसाहित्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गुगल की-बोर्डचे हे नवे फिचर मोठी कामगिरी करेल. अहिराणी गुगल की-बोर्डच्या माध्यमातून स्मार्टफोनद्वारे अहिराणी भाषेतील संवाद वाढतील.

- रामदास वाघ, अहिराणी कवी

गुगल की-बोर्डने अहिराणी भाषेचा समावेश केलेले फीचर अतिशय सुंदर आहे. अहिराणीचा प्रसारासाठी यापूर्वी आम्ही नाशिकमध्ये सर्वांत मोठे अहिरणी साहित्य संमेलही भरविले होते. आता या की-बोर्डमुळे अहिराणी भाषेच्या माध्यमातून शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण करता येईल.

- निंबा पाटील, संस्थापक अध्यक्ष, खान्देश मराठा मंडळ

अनेक बोली भाषा लुप्त पावत असताना गुगलने अहिराणीला आपल्या की-बोर्डमध्ये स्थान देणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक वेळा सोशल मीडियावर चॅट करताना मराठीतून अहिराणी शब्द टाइप करावे लागायचे. यातून अहिराणी भाषेचा गोडवा राहत नसे.

- विशाल धोंडगे, युवक

खान्देशात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी बोली भाषेचा गुगलने की-बोर्डमध्ये समावेश केल्याने अहिराणी भाषा आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. की- बोर्डवरच आता अहिराणी शब्द वापराता येणार आहेत.

- दर्शना देवरे, युवती

मराठी आणि अहिराणी या दोन भाषांच्या लहेजात खूप फरक आहे. काहीअंशी अहिराणी राजस्थानी आणि गुजराती भाषेशी साधर्म्य साधते. देवनागरीतून अहिराणी शब्द टाइप करताना अनेकदा अडचणी येतात. गुगलने आता अहिराणी शब्द अपडेट केल्याने ही भाषा संवादाच्या दृष्टीने अधिक सोपी झाली आहे.

- म. सु. पगारे, संचालक, भाषासाहित्य आणि संशोधन मंडळ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू घाटांचे लिलाव आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सात वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी या लिलाव प्रक्रियेला आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांसाठी लिलाव घेऊनही त्यास प्रतिसाद मिळतो की नाही याबाबत साशंकता असून, संबंधित घाटांचे लिलाव सप्टेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया गौण खनिज विभागाने गत महिन्यातच सुरू केली आहे. पर्यावरणाशी संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या घाटांच्या लिलावाला परवानगीसाठी कार्यवाही सुरू होती. दुसऱ्या समितीसमोर हे प्रस्ताव ठेवण्यात आले असून, संबंधित समितीने हिरवा कंदील दाखविताच या घाटांचे लिलाव करण्याची प्रशासनाची तयारी होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेली ही लिलाव प्रक्रिया आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकली आहे. गौण खनिज विभागाकडून दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी वाळूचे लिलाव घेतले जातात. मात्र, गतवर्षभर लिलाव प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यातच पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळले जात नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियेवरच बंदी घातली. परिणामी गत डिसेंबरपासून लिलाव बंद होते. मार्चअखेरीस लिलावाची प्रशासनाने तयारी केली. परंतु, आचारसंहितेमुळे अडसर निर्माण झाला. आता पुन्हा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता ३० जूनपर्यंत लागू असणार आहे. वाळू लिलावाच्या ठेक्याला ग्रामसभेचीही मान्यता लागते. ही मान्यता आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्याने लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसव्या कर्जमाफीमुळे बँका, सोसायटी अडचणीत

$
0
0

दिलीप बनकर यांची स्पष्टोक्ती

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

सरकारचे चुकीचे कृषीधोरण आणि फसवी कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेसह विविध कार्यकारी सोसायटीसुद्धा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्हा बँकेला सरकारने यापुढे केवळ पाचशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाची मर्यादा घालून दिल्यामुळे पुढील काळात जिल्हा बँक व सोसायटींमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे अशक्य होईल, अशी भीती माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक दिलीप बनकर यांनी व्यक्त केली.

पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बनकर बोलत होते. ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर, उपसरपंच संजय मोरे, बाळासाहेब बनकर, संपतराव विधाते, चंद्रकांत खोडे, सुशीला बनकर, संदीप बनकर उपस्थित होते.

बनकर म्हणाले, दोन वर्षपूर्वी आपण व भास्कर बनकर गटाने सोसायटी निवडणूक एकत्रित लढविली. सर्व जागा जिकूंन सत्ता चालविण्याचे सूत्र व धोरण निश्चित केले. मात्र नंतरच्या काळात जि. प. निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढले. असे असले तरी राजकारणात शब्द पाळला नाही, असा संदेश जाऊ नये म्हणून आपण कार्यकर्ते, हितचिंतकांची नाराजी पत्करून सोसायटीच्या सत्तेचे धोरण व सूत्र पाळले. ठरल्याप्रमाणे चेअरमन निवड विनाडावपेच पार पडली. संस्थेचे हित व आर्थिक अडचण लक्षात घेऊन संचालक मंडळाने कर्जवसुलीवर भर द्यावा.

तानाजीराव बनकर म्हणाले, दिलीप बनकरांनी ठरविले असते तर सोसायटीवर स्वतःच्या गटाची सत्ता स्थापन करून मर्जीतला संचालक चेअरमनपदी विराजमान केला असता. मात्र राजकीय मतभेद विसरून दिलीप बनकरांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचा आदर्श इतर नेत्यांनी घ्यावा. नूतन चेअरमन चंद्रकांत खोडे यांनी मनोगतातून आदर्श व पारदर्शक कामकाजाची परंपरा यापुढेही सोसायटीत सुरू राहील, अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक म्हणून गेले अन् जलमित्र बनले

$
0
0

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमुळे उमरावणे टंचाईमुक्तीच्या वाटेवर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटनाची आवड सर्वांनाच असली तरी पर्यटन स्थळांबद्दलची आत्मियता प्रत्येकजण जपतोच असे नाही. किंबहूना तेथे अस्वच्छता करणे पर्यटन स्थळांचे विद्रूपीकरण करण्याचा उद्योग करणारेच अधिक असतात. नाशिकमधील काही तरुणांनी मात्र केवळ पर्यटन स्थळावरील निसर्गाविष्काराचा आनंद घेतला नाही, तर परिसरात जलसंधारणाचे काम हाती घेऊन सामाजिक बांधिलकीचा परिचयही दिला आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील उमरावणे गावाची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

नाशिक, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर शहापूर तालुक्यात उमरावणे हे गाव आहे. या गावालगतच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. विहीगाव येथील अशोका धबधबा पहाण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या भागात येत असतात. निसर्गाचा हा नितांत सुंदर अविष्कार नेत्रांमध्ये साठविण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडते. नाशिकमधील गुरूगोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी गत पावसाळ्यात येथे धबधबा पाहण्यासाठी गेले होते. अन्य ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांशी गप्पा मारताना त्यांना उमराणे गावातील पाणीटंचाईची माहिती मिळाली. ही बाब लक्षात ठेऊन या विद्यार्थ्यांनी पुन्हा उन्हाळ्यात या गावाला भेट दिली. गावातील दोन सार्वजनिक विहिरी आणि हापसा आटल्यामुळे चिल्यापिल्यांसह महिलांना पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र त्यांना पहावयास मिळाले. जलसमृध्दी अभियान या नावाखाली त्यांनी या गावामध्ये श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. १० मेपासून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक शनिवार, रविवारी २५ ते ३० विद्यार्थ्यांचा ग्रुप भल्यासकाळी येथे श्रमदानासाठी दाखल होतो. सायंकाळी उशिरापर्यंत येथे श्रमदान केले जाते. आतापर्यंत येथे या तरुणाईने तीन दगडी नालाबांद तयार केले असून, विहिरीतील गाळही काढण्यात आला आहे. पाच शोषखड्डे तयार करण्यात आले असून, आता ५० सीसीटीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. गुरू गोविंदसिंग इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हील आणि मॅकेनिकल विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात स्वत:ला झोकून दिले असून, त्याचे फळ ग्रामस्थांना या पावसाळ्यानंतर मिळू शकणार आहे.

गावाची पाण्याची गरज

वर्षाकाठी ५४ लाख लिटर एवढी या गावाची पाण्याची गरज आहे. त्यांची सध्या १० लाख लिटर पाण्याची व्यवस्था होते. परंतु, जलसमृध्दी अभियानांतर्गत केल्या जात असलेल्या कामांमुळे येथे ६५ लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे. याचाच अर्थ गरजेपेक्षाही २० लाख लिटर अधिक पाणीसाठा त्यांना उपलब्ध करून देण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे श्रमदान सुरूच ठेवण्यात येणार आहे. या गावाला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार या जलमित्रांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांना एमपीआयडीचा फटका

$
0
0

केबीसी प्रकरणात १५० कोटींची मालमत्ता पडून

--

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : arvindjadhavMT

नाशिक : राज्यभर गाजलेल्या केबीसी घोटाळ्याच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेला कायदाच गुंतवणूकदारांच्या मुळावर उठला आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितरक्षण कायद्यातील (एमपीआयडी) तरतुदींचा योग्य वापर न झाल्यामुळे जवळपास दीडशे कोटींची मालमत्ता पडून आहे. यात जवळपास ५० कोटी रुपयांच्या रोकडचा समावेश असून, मैत्रेयप्रमाणे त्यावेळी कायद्याची अंमलबजावणी झाली असती, तर आज ८० टक्के गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले असते.

केबीसीमध्ये पैसे गुंतवले की ठराविक दिवसांनंतर तीनपट अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणच्या या स्कीमचा बोलबाला राज्यभरात झाला. काही महिन्यातच कंपनीने शेकडो कोटींची उलाढाल केली. दरम्यान, कंपनीविरोधात मार्च २०१४ आणि जुलै २०१४ असा दोन वेळा गुन्हा नोंदविण्यात आला. यातील पहिल्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे होता. पोलिसांचा फास आवळल्यानंतर चव्हाण पत्नीसह सिंगापूरला परागंदा झाला. एमपीआयडी अॅक्टमधील तरतुदींनुसार गुंतवणूकदारांना पैसे परत होणे महत्त्वाचे आहे. मैत्रेय कंपनीबाबत पोलिसांनी या तरतुदींचा चांगला वापर केला. सर्व रोकड एस्क्रो खात्यात भरून पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने त्याचे वाटप केले. आता कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वाटप होणार आहे. केबीसीचे गुंतवणूकदार मात्र याबाबत दुर्दैवी ठरले. पोलिसांनी जप्त केलेला सर्व मुद्देमाल, पैसे, संपत्ती थेट कोर्टाकडे जमा केली. त्यामुळे ती सोडवून गुंतवणूकदारांना परत करणे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून झाले. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, कोर्टाच्या निर्णयानुसार पैसे वाटपाबाबत पुढील कार्यवाही होऊ शकते. सन १९९९ मध्ये आलेल्या एमपीआयडी कायद्याला विरोध होत होता. सन २०११ च्या सुमारास हायकोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता या कायद्याचा वापर होत असून, त्याचे खाचखळगे समोर येत आहेत. विविध कोर्ट आपले निर्णय देत असून, त्यातूनच काय करावे आणि काय करू नये, याबाबत पोलिस अवगत होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कायद्याचा त्यावेळी योग्य वापर झाला नसल्याचा फटका शेकडो गुंतवणूकदारांना बसत आहे. केबीसीचा घोटाळा २०६ कोटींचा असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात त्याची व्याप्ती १६० कोटींच्या पुढे नसून, तेवढी संपत्ती आजही पडून असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे.

केबीसीची स्थिती

गुन्हा दाखल झाला - २०१४

एकूण आरोपी - ११

एकूण फिर्यादी अथवा साक्षिदार - ५९५२

बँक खात्यातील रोकड - २४.८६ कोटी

जप्त अचल मालमत्ता - १०० कोटी

जप्त रोख रक्कम - ४.६६ कोटी

जप्त सोन्याची किंमत - १९ कोटी

२०१५ मध्ये १९ मालमत्ता जप्त

--

...म्हणून हवे प्रशिक्षण

नवीन कायदा आला की त्याचा वापर तपासी अधिकाऱ्याच्या किंवा वरिष्ठांच्या सूचनांनुसार केला जातो. मात्र, संबंधितांना कायद्याची माहिती असतेच असे नाही. एस्क्रो खात्याबाबत तसेच त्यातील बारीकसारीक माहिती असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. एस. जगन्नाथन यांनी त्याचा वापर मैत्रेय प्रकरणात खुबीने केला. मैत्रेयच्या दोनच वर्षाआगोदर मात्र ही काळजी घेण्यात आली नाही. नवीन कायद्याची अंमलबजावणी करताना असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांसह सरकारी वकिलांना सतत प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् तयार व्हायचे एमडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमडी या ड्रग्जची तरुणांमध्ये लोकप्रियता असल्याने पोलिस तस्करांच्या सतत मागावर असतात. त्यामुळे पोलिसांना भणक लागू नये, यासाठी तस्कर अगदी बेमालूमपणे आपले काम करीत होते. सफैउल्लाकडून ऑर्डर आल्यानंतरच अरविंद कुमार एमडी तयार करण्याचे काम करीत होता.

नाशिकमधील रणजीत मोरे, पंकज दुंडे व नितीन माळोदे या तिघांना १६ मे रोजी क्राईम ब्रँचच्या पथकाने एमडी ड्रग्जसह अटक केली होती. या तिघांकडे चौकशी केली असता पोलिसांना मीरारोड भागातील नदीम सौरठीया या मध्यस्थाची माहिती मिळाली. देहविक्री करणाऱ्या महिलांना तसेच तिथे येणाऱ्या ग्राहकांना एमडी पुरविण्याचे काम नदीम करीत होता. नदीम आपला माल सफैउल्ला फारूख शेख (वय २३, रा. मीरारोड, मुंबई) श्रीमंत युवकाकडून घेत असल्याचे समोर येताच पोलिसांनी सफैउल्लाला देखील अटक केली. यातील नदीमकडून येणाऱ्या ऑर्डरनुसारच सफैउल्ला अरविंदकडे ड्रग्जची मागणी करीत होता. सफैउल्ला वगळता इतर आरोपींचा थेट संबंध अरविंदकुमारशी येत नव्हता. मागील तीन वर्षांपासून हा उद्योग सुरू असल्याचा कयास असून, गुन्ह्याचा सर्वच अंगाने तपास केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

क्रूड पावडरची निर्मिती

ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे ज्ञान असलेला अरविंदकुमार क्रूड पावडर तयार करून ठेवयाचा. ही पावडर तयार करण्यासाठी तो वेगवेगळे सात घटक एकत्र करायचा. एकत्र केलेल्या घटकांना ठराविक तापमानावर गरम केले की क्रूड पावडर तयार होते. एखादी ऑर्डर आली की क्रूड पावडरच्या मदतीने एमडी पावडर तयार व्हायची. एक किलो क्रूड पावडरमधून अर्धा किलो एमडी पावडर तयार होत असल्याची माहिती संशयिताने पोलिसांना दिली. नोकरीपेक्षा या व्यवसायात मोठा पैसा मिळत गेला. सफैउल्लाकडील ८० लाखांची कार जप्त करण्यात आली होती. अरविंदकुमारकडेही महागडी कार आढळून आली आहे. आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा तसेच अनुभवाचा गैरवापर करणाऱ्या अरविंदकुमारसह त्याच्या जोडीदाराकडे पोलिस अधिक चौकशी करीत असून, त्यातून काही मोठ्या भानगडी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे निरीक्षक आंनद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरणार, दीपक गिरमे, एएसआय चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, संतोष कोरडे, शांतराम महाले, निलेश भोईर, रावजी मगर, मोहन देशमुख, प्रतिभा पोखरकर, चालक सूर्यवंशी, दिपक जठार यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेचा अभियंता बेपत्ता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील शनिवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जातो, असे सांगून ते सकाळी सहाला घराबाहेर पडले. इमारतीच्या खाली आल्यानंतर मोबाइल, डायरी व चिठ्ठी गाडीत ठेवल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. मला माझ्या नोकरीचा व कामाचा अतिशय त्रास होत असून, माझा शोध घेऊ नका, असे आवाहन त्यांनी मुले, पत्नी व आईला चिठ्ठीद्वारे केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील अतिकामाच्या ताणामुळे पाटील गेल्या तीन-चार दिवसांपासून तणावात होते, अशी माहिती सहकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी ग्रीन फिल्ड लॉन्सप्रकरणी घडलेल्या माफीनामा नाट्यातील भाग पाटील यांच्या हद्दीतला असल्याने या वादाशीही संबंध असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये पसरली आहे. गंगापूर पोलिसांत बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

रवींद्र पाटील १९९९ पासून महापालिकेत कार्यरत असून, यापूर्वी पाणीपुरवठा, बांधकाम विभागात त्यांनी उपअभियंता म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते सहाय्यक अभियंता म्हणून नगररचना विभागात कार्यरत होते. शुक्रवारी त्यांची पुन्हा पाणीपुरवठा विभागात बदली झाली होती. यापूर्वी नगररचना विभागात कार्यरत असताना त्यांच्याकडे टीपी दोन स्कीममधील आनंदवलीचा परिसर सोपविण्यात आला होता. पाटील गेल्या आठवड्यापासून ताणतणावात होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेच्या एनएमसी ई कनेक्ट अॅपवरील तक्रारीही त्यांच्याकडे प्रलंबित होत्या. त्यामुळे अगोदरच ते अधिकाऱ्यांच्या लिस्टवर आले होते. त्यातच ग्रीन फिल्ड प्रकरणी घडलेल्या नाट्याचा भाग त्यांच्या कार्यक्षेत्रात होता. त्यामुळे आपल्यावरही कारवाई होईल, अशा दडणाखाली पाटील होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाटील सकाळी सहा वाजता आयुक्तांच्या नाशिकरोड येथील वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून घरातून निघाले. त्यांनी इमारतीच्या खाली आल्यानंतर आपला मोबाइल व डायरी गाडीतच ठेवली व निघून गेले. साडेआठ वाजता पेपर पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी खाली आल्यावर त्यांना गाडीचा दरवाजा उघडा दिसला. त्यात मोबाइल व डायरी होती. परंतु, पाटील अन्य कोणासोबत गेले असतील म्हणून त्या मोबाइल व डायरी घरात घेऊन गेल्या. परंतु, एक वाजेपर्यंत पाटील घरी न परतल्याने त्यांनी चौकशी सुरू केली, तसेच गाडीची पाहणी केली. त्यात त्यांना एक चिठ्ठी आढळून आली. पाटील यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली चिठ्ठी पाहून त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शोधाशोध सुरू केला. दुपारी दोन वाजता गंगापूर पोलिसांत त्यांच्या मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली.

तीन पथके स्थापन

पोलिसांनी बेपत्ताची तक्रार आल्यानंतर त्यांच्या शोधासाठी तीन पथके स्थापन करून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांसह त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करीत त्यांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. अनेक सहकाऱ्यांनी पाटील हे तणावात असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी पाटील यांच्या मोबाइलवरील संभाषणाचा डाटाही मागविला असून, गेल्या दहा दिवसांत त्यांचे कोणाकोणाशी फोनवर बोलणे झाले याची माहिती शोधण्याचे काम सुरू केले आहे.

चिठ्ठीतील मजकूर

प्रिय जय, भाग्यशा, शीतल व आई, मला माफ करा. माझा शोध कुठेही घेऊ नये. मला माझ्या नोकरीचा व कामाचा अतिशय ताण होत आहे. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. शीतल, मुलांची व आईची काळजी घे. आता तुझ्यावरच जबाबदारी आहे. मी कोणाचेही वाईट केलेले नाही. तरी माझ्या नशिबी असे आले आहे. तरी देवा मला माफ कर.

-रवींद्र पाटील

नाशिकरोडला दिसले

दरम्यान, पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरू केला असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी गंगापूररोड व नदीकाठचा परिसर शोधून काढला. पोलिसांचा शोध सुरू असतानाच पाटील सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एका आर्किटेक्टला भेटल्याचे सांगितले जात आहे. संबंधित आर्किटेक्ट मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना पाटील यांची भेट झाली, अशी माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरू केले आहे.

अभियंत्यांची गर्दी

पाटील बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच नगररचना विभागातील सर्व अभियंत्यांनी गंगापूर पोलिसांत धाव घेतली. यावेळी महापालिकेतील सर्व अभियंते व उपभियंत्यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. पाटील चुकीचे पाऊल उचलणार नाहीत असे सांगत त्यांच्या शोधासाठी धावाधाव सुरू केली. महापालिकेच्या बोटी घेऊन अभियंत्यांनी गोदावरी नदीचा परिसर पिंजून काढला. सर्व अभियंते उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.

ग्रीन फिल्डशी संबंध?

पाटील यांच्या बेपत्ता होण्याचा घटनाक्रम ग्रीन फिल्डवरील कारवाईशीही असल्याची चर्चा महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात महापालिकेच्या आयुक्तांनाच हायकोर्टात माफीनामा द्यावा लागला होता. हा विभाग पाटील यांच्याकडेच होता. त्यामुळे संभाव्य कारवाईचा धसकाही त्यांनी घेतला असावा, अशी चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. पाटील अत्यंत संवेदनशील होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल अशी भीतीही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोलून दाखविली होती, अशी चर्चा पोलिस स्थानकाच्या आवारात अभियंत्यांमध्ये सुरू होती.

--

या प्रकरणी बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबीयाने फिर्याद दिली असून, त्यानुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे. याबाबतच तपास सुरू असून, पाटील यांनी लिहिलेली नोट समोर आली आहे. बेपत्ता असलेले पाटील यांचा शोध लागल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रभाषेविषयीची आस्था वाढायला हवी

$
0
0

एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असली तरी तिच्याविषयीची आस्था आणि प्रेम वाढायला हवे, अशी अपेक्षा एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

भारत सरकारच्या नगर राजभाषा कार्यान्वय समिती निलांबर कोलकाताच्या वतीने 'एक साँझ कविता कहानी की' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील केबीटी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी घारड बोलत होते. व्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक तुलसीदास गडपायले, एसबीआयचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, नीलांबर कोलकाता संस्थेचे अध्यक्ष डॉ. विमलेश त्रिपाठी, उपाध्यक्ष यतीश कुमार, कथालेखिका वंदना राग, कवी दासू वैद्य, हिंदीतील नामवंत कवी आशुतोष दुबे, रश्मि भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते.

घारड म्हणाले, कुठल्यातरी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रभाषेतील नियोजित कार्यक्रम अन्यत्र हलवावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची संख्या देखील समाजात राष्ट्रभाषेबद्दल किती आस्था आहे, हे दाखवून देते. ही आस्था वाढावी असे वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर भरतनाट्यमद्वारे सरस्वती वंदना सादर करण्यात आली. आस्था मांदळे आणि शिवानी जोशी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या संगीतबद्ध कविता सादर केल्या. या सुश्राव्य रचनांना रसिकांनी दाद दिली. त्यानंतर कोलकाता येथील साहित्यक व सांस्कृतिक संस्था नीलांबरच्या संकल्पनेतून कवितांवर आधारित विविध मोंताज, कोलाज तसेच माईम प्रकार देखील सादर करण्यात आले. यावेळी साहित्य आणि संस्कृतीचा मिलाप असलेल्या कार्यक्रमात साहित्यिकारांच्या रचनेवर दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजा, सोहम सीबीएसईत टॉपर

$
0
0

शहरातील शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) चा इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी लागला. या निकालात नाशिकमधील सर्व सीबीएसई शाळांचा निकाल सुमारे १०० टक्के लागला आहे. ९५.६ टक्के गुण मिळवून सिम्बायोसिस कॉलेजची विद्यार्थिनी अनुजा आहिरे आणि केम्ब्रिज विद्यालयातील सोहम गायकवाड या विद्यार्थ्यांनी संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील शाळांमधून अव्वल क्रमांक पटकाविला.

सीबीएसईचा राष्ट्रीय स्तरावरील निकाल ८३.१ टक्के लागला. सीबीएसईच्या तीन विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागातून ९७.३२ टक्क्यांचा विद्यार्थी पहिला आला. चेन्नई विभागातून ९३.८७ टक्क्यांचा विद्यार्थी, तर दिल्ली विभागातून ८९ टक्क्यांचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आहे.

एअर फोर्स स्टेशनच्या केंद्रीय विद्यालयातून यंदा ७५ विद्यार्थी बारावीसाठी प्रविष्ट झाले होते. पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्सच्या वर्गात ६२ पैकी ६१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कॉमर्स विद्याशाखेतून १३ पैकी १३ विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याची माहिती प्राचार्य खेमेंद्र तोडवाल यांनी दिली.

नेहरू नगर केंद्रीय विद्यालयातूनही बारावीसाठी ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ५९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. या विद्यालयातून ऋतूजा मुजूमदार हिने ९२.६० टक्के मिळवत सायन्स विद्याशाखेत पहिला क्रमांक पटकाविला. दुसऱ्या क्रमांकावर ९० टक्क्यांसह सदाशिव कांबळे, तिसऱ्या क्रमांकावर ८५.४० टक्क्यांसह सुदर्शन झाडे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कॉमर्स विद्याशाखेतून स्नेहा भालेराव हिने ८७.४ टक्के मिळवित प्रथम, सोनाली जमनीक हिने ८१.२ टक्के मिळवित व्दितीय क्रमांक पटकाविला.

सिम्बॉयोसिस स्कूलनेही बारावीत १०० टक्के निकालाची नोंद केली. या शाळेतून ३१ विद्यार्थ्यांनी सायन्स विद्याशाखेतून परीक्षा दिली होती. या शाळेतून तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, सहा विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान, १७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले आहेत. या शाळेतून अनुजा टिपरे हिने ९५.६ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय क्रमांक मुकुल अचावाल याने पटकावित ९३.८ टक्के गुण मिळविले आणि सलोनी खन्ना हिने ९३.४ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकाविला.

नाशिक केम्ब्रिज स्कूलचा निकालाही १०० टक्के लागला. या शाळेतून सोहम गायकवाड याने ९५.६ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी किमान ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले असल्यची माहिती शाळेने दिली. श्रुती पवार हिने ९५.४ टक्के आणि प्रेक्षा फडके हिने ९४ टक्के मिळवित अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकाविले.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार मार्कशिट

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ही सुविधा digilocker.gov.in या लिंकवरून मिळवता येऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचारी पूल लवकरच सेवेत

$
0
0

रेल्वेचे विभागीय प्रबंधक यादव यांची घोषणा; मनमाड रेल्वेप्रवाशांना दिलासा

शुभ वार्ता

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांच्या उत्सुकतेचा व प्रतिक्षेचा विषय बनलेला मनमाड रेल्वे स्थानकातील महत्वाकांक्षी पादचारी पूल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेचच तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी घोषणा भुसावळ रेल्वेचे विभागीय प्रबंधक रामकुमार यादव यांनी मनमाड रेल्वे स्थानकात केली. त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे सध्या पुलाच्या कामामुळे होत असलेले हाल व मोठी गैरसोय थांबणार आहे.

रेल्वे प्रबंधक रामकुमार यादव हे नाशिक दौऱ्यावर आले असता शनिवारी सकाळी त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकात विकासकामांची पाहणी केली. रेल्वेच्या नव्या पादचारी पुलाचे तसेच रेल्वे स्थानकातील नव्या लिफ्टचे काम, अतिक्रमण काढून त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे प्रगती पथावर असलेले कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नव्या पादचारी पुलाचे काम तील महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा पूलही प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनमाड स्थानकातील नवा पूल तीन महिन्यांत सुरू होणार ही प्रवासी वर्गासाठी आनंदाची बाब ठरणार आहे, या नव्या पुलाच्या कामासाठी रेल्वे स्थानकातील दीडशे वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल तोडण्यात आला. तसेच हा पूल तोडल्याने केवळ फलाटावरील मागच्या पुलाने स्थानकाबाहेर पडण्याशिवाय सध्या प्रवाशांना कोणताही पर्याय शिल्लक नाही. लवकरच सुरू होणारा नवा पूल हा विस्तृत व भक्कम आहे. नव्या पुलामुळे मागच्या बाजूला असलेल्या पुलावर सध्या पडत असलेला ताण कमी होण्याची चिन्हे आहेत. प्रबंधकांच्या भेटीमुळे रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांमध्येही उत्साह पसरला असून, कामे तातडीने पूर्ण होतील असा अंदाज आहे.

पुलावरील ताण कमी होणार

फलाटावरील मागच्या बाजुला बसलेला पूलच प्रवाशांना आधार आहे. त्यामुळे सध्या या एकाच पुलावर खूप ताण पडत आहे. रेल्वेप्रवाशांना पुढील डब्यातून उतरल्यानंतर स्थानकाबाहेर पडण्यासाठी खूप मागे जावे लागते. त्यामुळे लहान मुलांसह, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच ओझे असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. अनेकदा पुलावरून उतरताना गर्दीत पायात पाय अडकल्याने अनेक प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. तसेच काहींमध्ये वाद तर रोजचेच झाले आहेत. आता नवा पूल लवकरच सेवेसाठी सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

लिफ्ट पंधरा दिवसात सेवेत

मनमाड स्थानकात प्रवाशांसाठी लिफ्ट बसविण्याचे काम वेगात सुरू आहे. हे कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसात लिफ्ट सुरू होईल, असे विभागीय प्रबंधक रामकुमार यादव यांनी शनिवारी सांगितले. एकूणच मनमाड रेल्वे स्थानकातील विकासकामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून, प्रबंधकाच्या घोषणेने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्यायामासाठी जाणाऱ्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी चाकूहल्ला करीत मानेवर वार केला. ही घटना शुक्रवारी सकाळी गंगापूररोडजवळील संत कबीरनगर येथे घडली असून, यात चंद्रमुनी मधुकर इंगोले (वय २०, रा. पाइपलाइनरोड, संत कबीरनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

शुक्रवारी सकाळी मित्र सागर वाघमारे याच्यासह चंद्रमुनी घरातून नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी निघाला होता. घरापासून काही अंतर दूर जाताच दोघे संशयित पाठीमागून पल्सरवरून आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या संशयिताने दुचाकीवरून खाली उतरत चाकू काढून चंद्रमुनीच्या मानेजवळ वार केला. यात तो जखमी झाला. त्यानंतर दोघे संशयित पल्सरवरून पळून गेले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार गोवर्धन तपास करीत आहेत.

--

अल्पवयीन युवतीचे अपहरण

दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात असलेल्या म्हसोबावाडी परिसरातून दोघा संशयितांनी एका अल्पवयीन युवतीला आमिष दाखवून पळवून नेले आहे. या प्रकरणी अपहृत युवतीच्या आईच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १४ वर्षांची युवती शुक्रवारी (दि. २५) आपल्या आईसह घरात झोपलेली होती. याच वेळी संशयित किशोर व सोपान या दोघांनी मुलीला काही तरी आमिष दाखवून पळवून नेले. याबाबत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

--

ग्राहकाचा मोबाइल चोरी

मेनरोडवरील दिल्ली दरवाजा येथे फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने खिशातून लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. गिरीश मुरलीधर गर्गे (रा. पंचवटी, कपालेश्वर मंदिरामागे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी सकाळी मेनरोडवरील दिल्ली दरवाजा भागात गर्गे जांभळे खरेदी करीत असताना संशयिताने त्यांच्या शर्टाच्या खिशात हात घालून १८ हजार ५०० रुपयांचा मोबाइल हातोहात लांबविला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस नाईक जगदाळे करीत आहेत.

--

अंबड लिंकरोडवर आत्महत्या

अंबड लिंकरोडवरील म्हाडा परिसरात ४५ वर्षांच्या दिनकर फकिरा सोनवणे (रा. भोर टाऊनशिप, म्हाडा, अंबड लिंकरोड) यांनी शुक्रवारी (दि. २५) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोनवणे यांनी घरी असताना अज्ञात कारणातून स्वत: विषारी औषध सेवन करून घेत आत्महत्या केली. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गारले करीत आहेत.

--

अल्पवयीन युवकाची आत्महत्या

पंचवटीतील हिरावाडी परिसरात १५ वर्षांच्या युवकाने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. अमित पवन अग्रवाल (रा. रुनील रेसिडेन्सी, कमलनगर, हिरावाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरी असताना अमितने विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात आल्यावर त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार मेतकर करीत आहेत.

--

क्राईम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images