Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सट्टा लावणारे तीन बुकी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याचे काम करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही कारवाई चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द राजस्थान रॉयल दरम्यानच्या सामना सुरू असताना करण्यात आली.

गुरप्रतिसिंग हरबनसिंग जट (रा. फ्लॅट क्रमांक १, केवडीबन, तपोवन), अमित अनिल देसले (रा. फ्लॅट क्रमांक १३, हरिवंदन सोसायटी, टॅक्ट्रर हाऊसच्या मागे, पंचवटी) आणि सतनाम दिलीपसिंग राजपूत (रा. बळीराजानगर, रेखाराणी व्हिला बंगला, बळी मंदिराशेजारी) अशी या तिघांची नावे आहेत. आयपीएलमध्ये टी २० क्रिकेट सामन्यांचा झटपट निर्णय होतो. त्यामुळे सामना कोण जिंकणार, हरणार एवढेच नव्हे तर कोणता फलंदाज किती धावा करणार, कोणत्या बॉलवर सिक्सर बसणार अशा वेगवेगळ्या पध्दतीने साटोडी जुगार खेळतात. क्रिकेट सामन्यांवर बेटिंग हा नवीन प्रकार नसला तरी प्रत्येक मोसमात पोलिसांना नवनवीन संशयित सापडतात. याबाबत क्राईम ब्रँचला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अंबड एमआयडीसी परिसरातील हॉटेल रिग्जच्या पहिल्या मजल्यावरील रूमसमोर असलेल्या पार्टेशनमध्ये सट्टा घेणाऱ्या वरील तिघा संशयितांना अटक केली. आयपीएल क्रिकेट सामन्याचे मोबाइल फोनवर होणाऱ्या थेट प्रेक्षपणाआधारे संशयित ग्राहकांकडून सट्टा स्वीकारत होते. सट्टेबाज प्रत्येक कॉल्सनंतर कोडवर्डच्या मदतीने त्याची नोंद एका रजिस्टरमध्ये करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून नऊ मोबाइल एक कार असा चार लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच रोकड हस्तगत केली असून, त्यांच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार विजय गवांदे, पोलिस नाईक मोहन देशमुख, आसिफ तांबोळी, एस. बी. म्हसदे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, चालक एएसआय संजय सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्पादक अन् ग्राहकांत संवाद हवा

$
0
0

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही वस्तूचा उत्पादक आणि तिचा उपभोग घेणारा ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद असायला हवा. कृषिप्रधान भारतात आपण अजूनही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद घडवून आणू शकलेलो नाही. त्यामुळे ना उत्पादकाला दाम मिळतो ना ग्राहकाला महत्तम समाधान, अशी खंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांनी शनिवारी व्यक्त केली.

मुक्त विद्यापीठामध्ये आयोजित अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण आढावा बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्राहक संरक्षणचे रवींद्र साळुंखे, दिलीप फडके, दुर्गाप्रसाद सैनी, अरुण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारपासून सुरू झालेल्या परिषदेचे शनिवारी औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी ग्राहक संरक्षण चळवळीमध्ये काम करणारे जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंतचे आणि गुजरातपासून आसामपर्यंतचे देशभरातील ४५० प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. डॉ. वायुनंदन पुढे म्हणाले, की कृषिप्रधान देशात शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद असायला हवा. दुर्दैवाने तो तेवढ्या व्यापक स्वरूपात नाही. त्यामुळे शेतकरी दामापासून तर ग्राहक गुणवत्तापूर्ण मालापासून वंचित राहातो. मुक्त विद्यापीठाच्या आवारात पिकणारा केसर आंबा आणि नारळ आम्ही थेट ग्राहकांना उपलब्ध करून देतो. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसादही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ही वार्षिक सभा म्हणजे ग्राहक संरक्षण चळवळीबाबत अंतर्गत विचारमंथन असून, आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा त्यामध्ये घेण्यात येत आहे. भविष्यातील वाटचाल कशी करायला हवी, याबाबतही या सभेत विचारमंथन होत असून, काही ठराव रविवारी समारोपाच्या दिवशी मांडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सहसचिव दिलीप फडके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठुआतील दोषींवर कठोर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कठुआ घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय हितरक्षक सभेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाक्षऱ्यांची मोहीमही राबविण्यात आली.

शाळांमधील लैंगिक शिक्षण व स्वत:चे संरक्षण याबाबत विद्यार्थी व पालकांसाठी शिबिर घेण्यात यावे. पाठ्यपुस्तकांमध्ये महिला अत्याचार व कायद्याची माहिती द्यावी. कुठल्याही बलात्काराच्या घटनेमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानामध्ये सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बलात्कार, लैंगिक शोषण व छेडछाडीबद्दल जनजागृती करावी, देशात धर्म व जातीच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविणाऱ्या संस्था, संघटना व राजकीय पक्षांवर बंदी घालावी यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनात भारतीय हितरक्षक सभेचे किरण मोहिते, कृष्णा शिंदे, भागवत गागुंर्डे, शरद जाधव, सचिन जाधव यांसह विद्यार्थी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पेट्रोल ८२.३० रुपये लिटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारी नाशिक शहरात पेट्रोलसाठी ८२ रुपये ३० पैसे प्रतिलिटर दर नोंदविला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. गत पंधरवड्यापासून शहरात हे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांच्या तुलनेत शहरात सुमारे पाच ते सात रुपयांची दरवाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या पेट्रोलदराच्या आकडेवारीवरून दिसून येते.

पेट्रोल दरवाढीसंदर्भात अधिक माहितीसाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलरचे सदस्य नितीन धात्रक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या इंधन दरवाढीमु‌ळे स्थानिक ठिकाणीही या किमतींमध्ये भर पडते आहे. नाशिकमध्ये तीन महिन्यांपासून 'डीपीसी' म्हणजे डेली प्राइज चेंज या नियमाची अंमलबजावणी पेट्रोलपंपांकडून होत आहे. यानुसार रोज बदलते दर जाहीर केले जाऊन त्यानुसार आकारणी करण्यात येते." दुसरीकडे पेट्रोलच्या या उच्चांकामुळे नागरिकांनी सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

सामान्यांच्या आवाक्यात इंधनाचे दर आणण्यासाठी नियोजन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती गांभीर्याने पार पाडावी.

- अमोल शिंगणे, ग्राहक

इंधन खर्च हा आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम असला तरीही देशातील इतर शहरांमध्ये या किमती इतक्या उंचीच्या नाहीत. धोरणांमध्ये सुलभता आणून काही प्रमाणात या दरवाढीची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे.

- मधुकर पवार, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आचारसंहितेने विकासकामांना ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असून, त्यामुळे प्रस्तावित विकासकामे आणि झालेल्या कामांची उद्घाटने लांबणीवर पडणार आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री सप्तशृंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पणाचा संभाव्य २५ एप्रिलचा मुहूर्तही टळला असून, भाविकांना आता ३१ मेनंतरच या ट्रॉलीद्वारे दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.

वणी येथील सप्तशृंगगडावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगबांधव, तसेच लहान मुलांच्या सोयीसाठी खासगी कंपनीच्या माध्यमातून फ्युनिक्युलर ट्रॉली उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रॉलीचे कामही पूर्ण झाले आहे. 'यशदा'च्या पथकासह आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ट्रॉलीची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान लिफ्टच्या फायर ऑडिटसह गर्दी व्यवस्थापनाबाबतही साशंकता उपस्थित करण्यात आली. त्यामुळे चैत्रोत्सवातील उद्घाटनाचा मुहूर्त टळला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने पूर्तता करून ना हरकत प्रमाणपत्रही प्राप्त करून घेतले. त्यामुळे चैत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उद्घाटनाचा सोहळा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आपत्ती व्यवस्थापनाबाबतची साशंकता कायम राहिल्याने पुन्हा अडथळा निर्माण झाला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ट्रॉली सुरू आहे. कृषी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान उद्घाटन करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू होते. मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून गडावरील परिस्थिती जाणून घेतल्याचेही समजते. त्यामुळे पुढील आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा लांबणीवर पडला आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येतील की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाला एप्रिलअखेर सुरुवात करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने भूसंपादन प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. परंतु, आचारसंहितेमुळे या कामाचे भूमिपूजनही लांबणीवर पडणार आहे.

विकास कामे पडणार लांबणीवर

विधान परिषदेची निवडणूक मेअखेरीस असून, त्यामुळे पुढील दीड महिना आचारसंहितेचे निर्बंध राहणार आहेत. २४ मे रोजी मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल केली जाऊ शकते. परंतु, त्यानंतरच्या काही दिवसांतच आमदार अपूर्व हिरे यांच्याही सदस्यत्वाची मुदत जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. जुलैपूर्वीच या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून, त्यामुळे पुन्हा विकासकामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात- भारत ज्ञान विज्ञान संस्था अधिवेशन

सर्वाधिक वाचलेली बातमी3

$
0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी

गडचिरोलीत चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकडून जीएसटी वसुली नसावी

$
0
0

अखिल भारतीय किसान संघाचे संघटनमंत्री दिनेश कुलकणी यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही वस्तूच्या अंतिम उपभोक्त्याकडून जीएसटी वसूल केला जावा असा सरकारचा निकष आहे. मात्र, शेतकरी जो माल पिकवितो त्याचा अंतिम उपभोक्ता अन्य कुणी असतानाही खते, अवजारे व तत्सम अनेक शेतीपयोगी वस्तूंच्या विक्रीवर शेतकऱ्यांकडून जीएसटी आकारला जातो. प्रत्यक्षात त्याला तेवढे उत्पन्नही मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. शेतकऱ्याला या कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढायचे असेल तर त्याला उत्पादनावर आधारित हमीभाव द्यावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान संघाचे संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले, की सध्या पूर्ण देश कृषिक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चिंतीत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे. परंतु जमीन आणि कृषीक्षेत्र आहे तेवढेच आहे. देशातील लोकसंख्येला भविष्यातही पोटभर जेवण मिळावे यासाठी पुरेशी शेती उत्पादने व्हायला हवीत. शेती फायद्याची ठरत नसल्याने देशातील ६० टक्के शेतकरी अन्य व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक असून कृषिक्षेत्र श्रीमंत होत असताना शेतकरी मात्र दिवसेंदिवस गरीब होत असल्याची खंत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

पिकाच्या लागवडीपासून ते प्रत्यक्ष बाजारात विकण्यापर्यंत शेतकरी अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करीत असतो. त्यामुळे त्याला व्यवस्थापकाचा दर्जा दिला जाऊन त्यानुसारच मोबदला मिळायला हवा. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे अजून तसे होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये या विषयाला स्पर्श केला असून त्यामुळे भविष्यात याबाबत काही होईल अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनांची गरज आहे. त्यांना सकस आणि पौष्टिक असे सेंद्रिय अन्नपदार्थ हवे आहेत. शेतकऱ्यांनी छोटे-छोटे गट करून त्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादने निर्मितीवर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्याला कुशल मानावे

विपणन व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. शेतकरी तीन रुपयांना विकणारी वस्तू ग्राहकांना १० रुपयांना मिळते. मार्केटिंग सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशन काढले जाते. प्रत्यक्षात शेतकरी आणि ग्राहकाला त्याचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्याला कुशल कामगार मानायला हवे, अशी किसान संघाची जुनी मागणी आहे. मात्र, सरकार त्याला सामान्य मजुराचा दर्जा देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समृद्धी’साठी जिल्ह्यात ६५ टक्के भूसंपादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात आजमितीस ६५ टक्क्यांहून अधिक जमीन अधिग्रहण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह काही गावे वगळता बहुतांश गावांमधील संयुक्त मोजणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधील काही गावांमधील जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये जमीन अधिग्रहणासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र, शिवडे व आजूबाजूच्या काही गावांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवित जमिनी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील पेच सुटू शकलेला नाही. परंतु, दुसरीकडे सिन्नरमधील इतर गावे आणि इगतपुरी तालुक्यात जमीन अधिग्रहणाला प्रशासनाने यश येते आहे. समृद्धीसाठी जिल्ह्यातील १२८० हेक्टर जमिनी आवश्यक आहे. त्यामध्ये १२०० हेक्टर खासगी तर उर्वरित क्षेत्र वनविभागाचे आहे. प्रशासनाने दोन्ही क्षेत्र मिळून आतापर्यंत ७०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. मे अखेरपर्यंत अधिग्रहणाचे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने दोन्ही तालूक्यात दोन पथकं कार्यरत आहेत.

अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मदत

सिन्नर व इगतपुरी तालुक्यात एकाच प्रकल्पबाधित गटांची संख्या अधिक आहे. या गटांमध्ये दोनपेक्षा अधिक खातेदार आहेत. परिणामी खातेदारांची मनधरणी व त्यांच्याकडून जमीन हस्तांतरीत करून घेताना अधिकाऱ्यांची कमतरता भास होती. या सर्व प्रक्रियेला वेळ लागत होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची प्रकल्पासाठी मदत घेतली आहे. आठ अधिकारी व कर्मचारी प्रशासनाची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे. प्रत्येकी चार जणांचे दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये दोन पथके काम करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे आज शहरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणूक, घरपट्टी दरवाढ व भाजपअंतर्गत वाढलेला कलह या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज, सोमवारी (दि. २३) नाशिकमध्ये येणार आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधान परिषदेसाठीचे इच्छुक त्यांची वैयक्तिक भेट घेण्याची चर्चा आहे.

गेल्या वेळेस भाजपच्या स्थापना दिवसाची तयारी करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला असला, तरी तो सभेसाठी होता. आता ते विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने बोलणार असल्याचेही बोलले जाते. यात भाजपच्या अंतर्गत कलहाचा विषयसुद्धा त्यांच्यासमोर चव्हाट्यावर येण्याची, तसेच घरपट्टीवाढीविरोधात होत असलेल्या विरोधाबाबतही ते पदाधिकाऱ्यांनी सूचना करण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यात विधान परिषद निवडणुकीच्या विषयावरदेखील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक असले, तरी त्यात कोण प्रबळ ठरेल याचा कानोसाही ते घेणार आहेत. भाजपकडे या निवडणुकीसाठी निवडून येण्याचा जादुई आकडा नाही. त्यामुळे कोणत्या पक्षांबरोबर आघाडी करायची, शिवसेनेबरोबर चर्चा करायची की नाही, अशा विविध अडचणी पदाधिकारी त्यांच्यासमोर मांडणार असल्याचेही बोलले जात आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचनाही ते पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. यावेळी ते नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची शक्यता धरून त्यावरही मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचत आहे की नाही, बूथ रचना यांसारखे विषयसुद्धा ते या दौऱ्यात हाताळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅनाची सुटकेस’ अभिवाचनाचे गारुड

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आयाम'निर्मित आणि 'ग्रंथ तुमच्या दारी' आयोजित अक्षरबाग वाचनकट्टा चळवळीअंर्तगत रविवारी 'हॅनाची सुटकेस' या कादंबरीचे अभिवाचन डिसुझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक संघाच्या सभागृहात झाले. ओवी हिने या कादंबरीशी समरसून केलेल्या अभिवाचनाने उपस्थितांवर चांगलेच गारुड केल्याचे दिसून आले.

कॅरेन डिव्हाइन यांच्या कादंबरीचे माधुरी पुरंदरे यांनी भाषांतर केले असून, दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या छळ छावणीमध्ये मारल्या गेलेल्या हॅनाची ही कथा आहे. हॅनाची सुटकेस एका म्युझियममध्ये दिसते आणि त्यावरूरुन कथेला सुरुवात होते. ही सुटकेस तपकिरी रंगाची असते. त्यात बऱ्यापैकी साहित्य ठेवता येईल, असा तिचा आकार असतो. मोठ्या प्रवासासाठी ती वापरली गेली असेल, हे तिच्या आकारावरून स्पष्ट होते. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा अतोनात छळ झाला. त्यांना उपाशी डांबण्यात आले. त्यांच्यावर अतोनात अत्याचार करून ठार मारण्यात आले. या काळात ६० लाख ज्यू लोकांचा अंत झाल्याचे मानले जाते. त्यात १५ लाख लहान मुलांचा समावेश होता. हॅना हीदेखील त्यात असलेली एक मुलगी होती. तिला स्केटिंगसह अनेक खेळांची आवड असते. मात्र, युद्धजन्य स्थितीत तिची आणि आईची ताटातूट होते. भाऊदेखील तिच्यापासून दुरावतो, अशी ही कथा आहे. एक तासाच्या या कथेचे वाचन ओवी हिने ओघवत्या शैलीत केले. सुवर्णा क्षीरसागर हिने त्याला साजेसे पार्श्वसंगीत दिले. निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे होते. ध्वनी संकलनांची जबाबदारी आदित्य रहाणे यांनी चपखलपणे पार पाडली.\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत ज्ञान विज्ञान’च्या अधिवेशनात मंथन

$
0
0

'भारत ज्ञान विज्ञान'च्या अधिवेशनात मंथन

नाशिकरोड : महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि शेती आदी क्षेत्रांत देशभर कार्यरत असलेल्या भारत ज्ञान विज्ञान समुदाय संस्थेचे नाशिका तालुकास्तरीय ग्रामीण विभागाचे पहिले द्विवार्षिक अधिवेशन पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच पार पडले. त्यात संबंधित क्षेत्रांतील विविध विषयांवर मंथन झाले. संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जायभावे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अधिवेशनास पळसे, शिंदे, भगूर, शेवगेदारणा, मोहगाव, जाखोरी येथील शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत गायखे, राज्य सहसचिव राहुल गवारे, जिल्हा सचिव लक्ष्मण जाधव, सहसचिव नीता कोष्टी यांच्यासह जिल्हा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नाशिक तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी नारायण जाधव, उपाध्यक्षपदी संतोष सोनवणे, उज्ज्वला कासार, सचिवपदी विजया बंदरे, सहसचिवपदी धनजय तुंगार, योगिता देवराळे, खजिनदारपदी सतीश टिळे, तर सदस्य म्हणून जयदीप जोशी, संजय जाट, नानासाहेब सरोदे, योगिता कासार आणि रामेश्वर खांडेबराड यांची निवड करण्यात आली.

फांद्यांची छाटणी

सातपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट जलवाहिनीसाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. त्यासाठीच्या महावितरण कंपनीच्या वीजतारांना वृक्षांच्या फांद्या स्पर्श करीत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पंपिग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीजतारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यास महावितरणने प्रारंभ केला आहे. सातपूर एमआयडीसीच्या पोल फॅक्टरीतून गंगापूर पंपिग स्टेशनला स्वतंत्र वीजपुरवठा दिलेला आहे. पंपिग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याचे अभियंता गायकवाड यांनी सांगितले.

बॅरिकेड पडले नाल्यात

सातपूर : अंबड एमआय़डीसीत पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी वेअर हाउसच्या मुख्य रस्त्यांवर पोलिस ठाण्यांच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात येते. मतमोजणीचे काम संपल्यानंतर येथे लावलेले बॅरिकेड्स पुन्हा पोलिस ठाण्यांमध्ये नेले जातात. परंतु, त्यापैकी एक बॅरिकेड गेल्या कित्येक महिन्यांपासून परिसरातील नाल्यात पडून असल्याचे आढळून येत आहे. पोलिसांनी हे नाल्यात पडलेले बॅरिकेड त्वरित उचलून न्यावे, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांसह कामगारवर्गाने व्यक्त केली आहे.

(थोडक्यात)

((((महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेने कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे याविषयी डॉ. जायभावे यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशानातील विविध सत्रांत महिला आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शेती या विषयांवर सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.))))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार संभाजीराजेंची रामशेज किल्ल्यास भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी (दि. २२) रामशेज किल्ल्यास भेट दिली. छत्रपती युवा सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती युवा सेना, शिवप्रेमी आणि रामशेज आशेवाडी ग्रामस्थ यांनी त्यांचे स्वागत केले.

रामशेज किल्ला बघण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. स्वागताप्रसंगी उद्योजक किरण चव्हाण, इतिहास संशोधक गिरीश टकले, छावा संघटनेचे करण गायकर, राम खुर्दळ, वन विभागाचे अधिकारी शिव बाला आदी उपस्थित होते.

गणेश कदम यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की रामशेज किल्ल्यावर दहा वर्षांपासून जन्मोत्सव केला जातो. स्वराज्याची पताका फडकवत ठेवणारा हा रामशेज किल्ला उपेक्षित राहिलेला आहे. या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, येथील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हायला हवे. हा किल्ल्या पर्यटन स्थळ व्हावे यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त १३ व १४ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिकाही खासदार संभाजीराजे यांनी देण्यात आली. तुषार भोसले, यश बच्छाव, विलास गायधनी, ज्ञानेश्वर भोसले, दीपक जाधव, विजय उगले, शुभम बोडके आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ हजार प्रकरणे लोक अदालतीत मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल ५२ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी लोकअदालतीचे कामकाज सुरू करण्यात आले.

लोकसंख्येबरोबर न्याय व्यवस्थेवर वाढत जाणारा ताण आणि त्यामुळे न्यायदानात होणारा विलंब लक्षात घेता लोकअदालत हा सक्षम पर्याय सर्वांसमोर असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, समाजसेवक, पक्षकार व संबंधित विभागाचे अधिकारी हजर होते.

लोक अदालतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी आठ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर, दावा पूर्व दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय म्हणजे एक लाख ९० हजार ५७ इतकी होती. कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी एक हजार ९०२ प्रकरणे आजच्या लोकअदालतीत निकाली निघाली. तर, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी ५० हजार ३७१ निकाली काढण्यात यश मिळाली. दोन्ही मिळून तब्बल ५२ हजार २७२ प्रकरणांचा निपटारा झाला. दावा दाखल प्रकरणांमध्ये एकूण १५ कोटी ९९ लाख ४० हजार ९३३ इतकी रक्कम वसूल झाली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ९४ लाख ३७ हजार ८६७, एनआय अॅक्ट प्रकरणाशी निगडीत केसेसमध्ये आठ कोटी १६ लाख २९ हजार ३८९ रुपये वसूल करण्यात आले. मागील वर्षांपासून दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या लोक अदालतीत किमान ५० हजार केसेस निकाली काढण्यात जिल्हा कोर्टाला यश मिळाले असून, दंड अथवा वसुलीचे प्रमाणही वाढते आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार एम. बुक्के यांनी लोक अदालतीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई सोशल’तर्फे सीड बँकेचा प्रारंभ

$
0
0

'आई सोशल'तर्फे सीड बँकेचा प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नाशिकरोड येथील आई सोशल ग्रुपने सीड बँक सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्याकडी फळांच्या बिया संस्थेकडे द्याव्यात, असे आवाहन अध्यक्ष संतोष बोराडे, सचिव दीपक भागवत, उपाध्यक्ष श्याम आकुल यांनी केले आहे. नागरिकांनी जांभूळ, सीताफळ, चीकू, फणस आदी फळांच्या बिया संस्थेकडे जमा कराव्यात. या बिया संस्था इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर येथे येत्या पावसाळ्यात रोवणार आहे. बिया जमा करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष संतोष बोराडे (८०८७०० १३४२), सचिव दीपक भागवत (८४११९७००९९), उपाध्यक्ष श्याम आकुल (९३७०३७२६८५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणाची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी कचरा विलगीकरण करून घंटागाडीत द्यावा, वस्तूंचा पुनर्वापर करावा, वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांचा वापर करावा, शक्य असेल तेथे पायी जावे, कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी. यापैकी किमान एक उपक्रम सुरू करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी पॅटर्न’ची चाचपणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत एकाही पक्षाकडे ३२६ हा मतांचा जादुई आकडा नाही. परिणामी निवडून येण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पॅटर्न या निवडणुकीत वापरता येईल का, याबाबत आता चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी-भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण,तोंडावर लोकसभा निवडणुका आल्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणे अवघड आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता ताब्यात घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपबरोबर आघाडी केली होती. आता विधान परिषदेमध्ये याच पॅटर्नचा वापर करावा, असा एक मतप्रवाह सुरू झाला असून, त्याची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना व भाजप हे सत्ताधारी पक्ष असले, तरी या दोन्ही पक्षांत युती होणे अवघड आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचेही काँग्रेसबरोबर जिल्ह्यात सख्य नाही. त्यामुळे भविष्यात एकमेकांच्या विरोधात असलेले हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सर्व पक्षांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मोठा अडथळा आहे. पण, सत्ता मिळवण्यासाठी याअगोदर हे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हे पक्ष नेमकी कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेला ११९ मतांची गरज

एकूण ६५१ सदस्य असलेल्या या निवडणुकीत निवडून येण्यासाठी ३२६ चा आकडा पार करावा लागणार आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक २०७ मते असली, तरी त्यांना निवडून येण्यासाठी ११९ मतांची गरज पडणार आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला, तरी या पक्षाला ४८ मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्षांची ३८ व माकपची १३ मते बाजूला वळवलीस तर शिवसेनेला ही निवडणूक सोपी होणार आहे.

युतीला निवडणूक सोपी

भाजपकडे १६७ मते असून, त्यांना निवडून येण्यासाठी १५९ मतांची गरज पडणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला, तर १०० मतांची फायदा होऊ शकतो. पण, ५९ मतांसाठी या पक्षालासुद्धा अपक्ष व इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली, तर त्यांना कोणाची गरज पडणार नाही. पण, तशी शक्यता तूर्त कमी आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेससाठी अवघड

राष्ट्रवादी व काँग्रेसने या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात एकत्रित उभा केला, तर या दोन्ही पक्षांकडे १७१ मते राहणार आहेत. त्यांना निवडणुकीसाठी १५५ मतांची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी त्यांना अपक्षांसह इतर छोट्या पक्षांची मोट बांधावी लागणार असून, ती अवघड आहे.

जास्त उमेदवार असल्यास

विधान परिषदेच्या या निवडणुकीत तीन किंवा चार तुल्यबळ उमेदवार असल्यास या निवडणुकीचे गणितही बदलणार आहे. त्यात हे उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे असल्यास या निवडणुकीचे गणित छोटे पक्ष व अपक्षांभोवतीच फिरणार आहे.

((स्ट्रिप : विधान परिषद निवडणूक

नेतेमंडळींची इमेज घेणे.))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, तसेच, खासगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायाजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई-आर १ तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इनमध्ये सदर विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.in या वेब पोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा वापर करून दि. ३० एप्रिलपर्यंत विवरणपत्र ई-आर १ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचा सर्व नियोक्त्यांचा पूर्वीच्या महारोजगार वेब पोर्टलवरील डाटा https://rojgar.mahaswayam.in या नवीन महास्वयम वेब पोर्टलवर मायग्रेट करण्यात आलेला असून, तिमाही विवरणपत्र ईआर-१ सादर करण्याची सुविधा या वेब पोर्टलवर १ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही वेबसाइट ओपन करून एम्लॉयर (लीस्ट अ जॉब)वर क्लीक करून एम्प्लॉयर लॉग-इनवर यूजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग-इन करून ईआर रिपोर्टमध्ये ई-आर १ या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

त्यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (०२५३) २५००६५३ या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजूस उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग करावा. यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांनवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, असेही चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोर जी’नेही जपलीय वाचनसंस्कृती

$
0
0

नाशिक :

मोबाइल, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृतीचे कसे होणार, अशी कळवळून चिंता व्यक्त होत असेल तर ती वृथा आहे. कारण फोर जीच्या जमान्यातही म्हणजे नेटसॅव्ही चौथ्या पिढीनेही वाचनसंस्कृती आपलीशी केली आहे. विशेष म्हणजे नवी पिढी पुस्तकांबाबत अधिक सजग झाली आहे. हे निरीक्षण नोंदवले आहे पुस्तकांच्या जगात वावरणारी प्रकाशक मंडळी, वाचक, तरुणाई आणि हातगाड्यावर पुस्तके विकणाऱ्या विक्रेत्यांनी. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागली आहे. शहरात प्रसिद्ध असलेली पुस्तक पेटी, तसेच अखंड चालणारी पुस्तक भिशी तरी किमान हेच सांगत आहे.

शहरात विनायक रानडे या वाचनप्रेमीच्या माध्यमातून पुस्तक पेटी नावाचा उपक्रम अतिशय वेगाने सुरू असून, आता तर राज्याबाहेर, देशाबाहेर, जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये हा पुस्तक पेटी उपक्रम गेला आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून, मराठी मंडळांकडून मागणी असून दिवसेंदिवस हा पसारा वाढत चालला आहे. पुस्तक भिशी हा उपक्रमदेखील मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असून, एकदा वाचलेले पुस्तक देऊन दुसरे पुस्तक घेण्याचा उपक्रमही शहरात सुरू आहे. यात तरुणाई विशेष रस घेत असून, अनेकांनी याला तंत्रज्ञानाची जोडदेखील दिलेली आहे. www.donateyourbooks.in नावाची एक वेबसाइट ओंकार गंधे नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाने तयार केली असून, या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही गरजूंना पुस्तके दान करू शकता. अशा काही उपक्रमांतून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहेत.

पुस्तकं माणसाला नक्की देतात तरी काय, या प्रश्नाचं उत्तर एकच ठोसपणे काही देता येईल असे नाही. व्यक्तिपरत्वे या उत्तरात भिन्नता असू शकते; पण पुस्तके जे काही देतात ते मात्र चांगलेच असते. आज ठिकठिकाणी ग्रंथालये उभी आहेत; पण ती दिवसागणिक प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांनी समृद्ध होताहेत का आणि वाचकांचा आनंद द्विगुणित होतो आहे का, हा खरा प्रश्न आहे. 'वाचनसंस्कृती समृद्ध व्हायला हवी' अशी व्यासपीठावरची पॉप्युलर विधाने ग्रंथालय समृद्ध करू शकत नाहीत. त्यासाठी आंतरिक उमाळ्याने काम करणारा कुणी तरी असावा लागतो आणि त्यानं वाचकांचा आनंद द्विगुणित करण्याचा ध्यासही घ्यावा लागतो. हाच ध्यास सध्या शहरातील पुस्तकांविषयीच्या अनेक योजना घेत असून, वाचकांना समाधान देत आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना वाचनाची भूक आहे का, या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक येते. 'माझं ग्रंथालय'सारख्या उपक्रमांतून याचा प्रत्यय आला आहे. पुस्तकांना मुलांपर्यंत नेणे गरजेचे आहे. त्यात मुले आपल्या जगण्याचा आशय शोधत असतात. मराठी भाषेशी, भाषेच्या वेगळेपणाची नाळ त्यांच्याशी नकळत जोडली गेली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ आस्थेवाईकपणे केलेल्या कामांचे फळ आहे हे मला कायम वाटत राहते.

- विनायक रानडे, पुस्तकप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यानिश्चितीबाबत आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनामार्फत दरवर्षी सुट्यांची निश्चिती करण्यात येते. यंदाही ही निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत जाहीर करण्यात आली असून मुख्याध्यापकांच्या अखत्यारित असलेल्या सुट्ट्यांबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उन्हाळा व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यांसारख्या सणांना सुटी देण्यात यावी, असे सुचविण्यात आले आहे.

सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी लागली असून १ मे रोजी निकाल मिळणार आहे. १५ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होणार आहेत. राज्यभरातील शाळांमध्ये सुट्यांबाबत सुसूत्रता राहावी, यासाठी शिक्षण संचालनामार्फत या बाबी सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी मुख्याध्यापकांनी समन्वय साधून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या अखत्यारितील सुट्या कळविणे बंधनकारक असणार आहे. तसेच स्थानिक सुट्ट्या व सरकार स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सर्व सुट्ट्या शाळांना घेणे बंधनकारक असणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी किमान २०० दिवस म्हणजे आठशे घड्याळी तास तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी किमान २२० दिवस म्हणजे एक हजार घड्याळी तास शाळेचे कामकाज सुरू ठेवणे आवश्यक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात आज जनआंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून अन्यायकारक आणि जनभावना चिरडणारी भरमसाठ करवाढ करण्यात येत असून, या तुघलकी करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी ११ ते सायंकाळी सहा या वेळेत राजीव गांधी भवनसमोर हे धरणे आंदोलन होणार आहे.

नाशिक महापालिकेने ३१ मार्च २०१८ रोजी काढलेल्या आदेश क्र. ५२२ अन्वये शहरातील शेतजमिनी, मोकळ्या जागा, मैदाने, वॉचमन केबिन, हॉस्पिटल्स, हॉटेल, शाळा, विद्यार्थी वसतिगृह अशा सर्व प्रकारच्या मिळकतींवर नव्यानेच करवाढ केली आहे. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तिप्पट करवाढ करण्यात आली असून या माध्यमातून नाशिककरांची आर्थिक कोंडी केली जात आहे. जनविरोध लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी हरित पट्ट्यातील शेतीवरील कर रद्द करून पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर निम्मा केल्याची घोषणा केली आहे. कार्पेट क्षेत्राऐवजी बिल्टअप क्षेत्रावर कर, गावठाणातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे नवीन बांधकाम केल्यास त्यावर पाचपट कर, सर्व सोसायट्या व बंगल्यांच्या साइड मार्जिन जागेवर देशात प्रथमच कर लादल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच समितीने आंदोलन पुकारले असून त्यास भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन महापालिकेला आदेश क्र. ५२२ रद्द करण्यासाठी भाग पाडावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, अॅड. नितीन ठाकरे, त्र्यंबकराव गायकवाड, गजानन शेलार आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images