Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक - घरकुल योजनेचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे

$
0
0

घरकुल योजनेचा

आढावा 'व्हीसी'द्वारे

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. गिते घेणार माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी व ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेबाबत १७ एप्रिल रोजी तालुकास्तरावर सर्व लाभार्थ्यांसह आढावा सभा घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत. सर्व १५ तालुक्यात या आढावा बैठका होणार असून, डॉ. गिते व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत.

सिंचन विहिरी व घरकुल योजना विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यात येत आहे. योजनेबाबत या बैठकीसाठी गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, ग्रामसेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, संबंधित लाभार्थी यांनी उपस्थित राहावयाचे आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून तालुक्यांसाठी नेमून दिलेले संपर्क अधिकारी यांनी तालुक्यास उपस्थित राहून आढावा घ्यायचा आहे.

दरम्यान, ज्या लाभार्थ्यांची कामे पूर्ण होऊनही अदयाप लाभ मिळाला नसेल, निधी उपलब्ध असूनही देण्यास टाळाटाळ केली जात असेल, अशा लाभार्थ्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना आपल्याकडे थेट तक्रार करावी असे आवाहनही डॉ. गिते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघंबा शेरमाळ योजनेस पाच कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील वाघंबा शेरमाळ डोंगर हद्दीतील पाणी पश्चिम वाहिनीद्वारे अरबी सुमद्रात वाहून जात होते. हे पाणी अडवून ते तापी तुटीच्या खोऱ्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पात वळविण्यात यासाठीच्या नियोजित वाघंबा शेरमाळ डोंगर वळण योजनेस आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगर रागांतुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गुजरातकडे वाहून जाते. या पाण्याचा वापर स्थानिकांसाठी व्हावा यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केले. आता हे सर्व पाणी पाणी हरणबारी धरणात जावून मिळणार असल्याने हरणबारी लाभक्षेत्रातील गावे व मोसम खोऱ्याला या पाण्याचा लाभ मिळणार आहे. परिसरातील सिंचन व बिगर सिंचनास अतिरीक्त पाणी उपलब्ध हेाणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली. आगामी काळात हरणबारी उजवा कालव्यातून वाढीव कालवा पारनेर-सातमानेपर्यंत या पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांचाही पाठपुरावा सुरू असल्याचे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य प्रवक्तेपदी जगताप

$
0
0

स्वाभिमानी 'शेतकरी'च्या

राज्य प्रवक्तेपदी जगताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नुकतीच देहू येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांची दोन दिवस खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या राज्य कार्यकारिणीत काही राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची खांदा पालट करण्यात आली. त्या बदलात नाशिक जिल्हा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कवी संदीप जगताप यांना संघटना व पक्ष याचा राज्य प्रवक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रातील नामवंत ग्रामीण कवी, शेतकरी संपात अग्रेसर असणारे नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथील संदीप जगताप यांनी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती.

जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करताना अतिशय सूत्रबद्द केलेलं संघटनेचं काम, शेतकरी समस्यांचा असलेला सखोल अभ्यास, प्रभावी वक्तृत्व, कवी, लेखक म्हणून राज्यभर असलेली ओळख व ठामपणे घेतलेल्या शेतकरी हिताच्या भूमिका या सगळ्यांचा विचार करून खा. राजू शेट्टी यांनी संदीप जगताप यांच्या वर संघटना व पक्ष याची प्रसार माध्यमात अधिकृत भूमिका मांडण्यासाठी व अजून राज्यभर संघटनेच्या प्रचार प्रसारासाठी राज्य प्रवक्ता म्हणून निवड केली. तसेच या निवडीमुळे राज्यकार्यकारणी समितीचे सदस्यही ते झाले.

अतिशय कमी वयात व चळवळीचा कमी अनुभव असताना माझ्यावर खा. राजू शेट्टी व इतर सर्व सन्मानीय पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जी जवाबदारी सोपवली. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, असे प्रतिक्रिया संदीप जगताप यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी नाशिककर’च्या झेंड्याखाली लढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात दोन पावले मागे येत हरित क्षेत्रातील शेती करातून वगळण्यासोबतच पिवळ्या पट्ट्यातील जमिनीवर करयोग्य मूल्य ४० पैशांऐवजी २० पैसे करून करवाढीच्या आंदोलनाची तीव्रता कमी केली आहे. परंतु, आयुक्तांच्या या निर्णयानंतरही करवाढीविरोधात तयार झालेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने या अन्यायकारक, बेकायदेशीर, सुलतानी करवाढीविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 'मी नाशिककर' या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार उन्मेश गायधनी यांनी दिली.

दरम्यान, या करवाढीविरोधात महापौर रंजना भानसी यांनी येत्या गुरुवारी (दि. १९) महासभा बोलावली असून, त्याद्वारे प्रशासनाची कोंडी केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाविरोधात शहरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना होती. त्यामुळे आयुक्तांनी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी दोन पावले माघारी येत हरित पट्ट्यातील शेतजमीन वगळत, तसेच पि‌वळ्या पट्ट्यातील जमिनीच्या करात ४० पैशांवरून २० पैशांची कपात केली आहे. परंतु, नव्या मालमत्तांचे वाढवलेले पाच करयोग्य मूल्य कायम ठेवले आहे. परिणामी पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर कायम राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या करवाढीविरोधात यापूर्वी स्थापन झालेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या झेंड्याखाली लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे असून, उन्मेश गायधनी सल्लागार आहेत. समितीत एका सरचिटणीसासह नऊ सदस्य आहेत. महापालिका आयुक्तांनी नव्यानेच जी अन्यायकारक, बेकायदेशीर, सुलतानी करवाढ केली आहे, त्याविरोधात जनजागृती करण्याचे आणि त्यातून व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने ठरविले आहे. करवाढीविरोधातील जनआंदोलनाचे नियोजन आणि त्याची रुपरेषा शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती ठरवीत आहे. करवाढीविरोधातील या जनआंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींचे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती स्वागतच करते. सर्वांनी कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होऊन नाशिककरांना न्याय मिळवून देण्यासासाठी आपले राजकीय झेंडे बाजूला ठेवून केवळ 'मी नाशिककर' या नात्याने सहभागी व्हावे, असे आव्हान कृती समितीतर्फे करण्यात येत आहे.

--

महासभेत वादंगाची चिन्हे

करवाढीमुळे भाजपविरोधातील असंतोषाची धग कमी करण्यासाठी सत्ताधारी भाजपने येत्या गुरुवारी (दि. १९) तातडीने विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या करवाढीच्या निर्णयाला भाजपचा विरोध असला, तरी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपलाही असंतोषाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने महापौरांनी १९ रोजी सभा बोलावली आहे. त्यामुळे या सभेत वादंग होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून याबाबत प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात चिमुकलीचा मृत्यू

$
0
0

वरवंडी येथे अज्ञात वाहनाने दिली धडक

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुटीत मामाच्या गावाला वरवंडी (ता. देवळा) येथे आलेल्या वार्शी (ता. देवळा) येथील आठ वर्षांच्या चिमुकलीचा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. या अपघातामुळे वरवंडी व वार्शी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वरवंडी येथे तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वार्शी येथील इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेली माधुरी धनाजी पवार (वय ८ वर्षे) ही उन्हाळी सुटी लागल्याने शनिवारी वरवंडीला आपल्या कुटुंबियांसह आली होती. रस्ता ओलांडत असताना माधुरीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने माधुरी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. गंभीररित्या जखमी झालेल्या माधुरीला अधिक उपचारासाठी कळवण येथे येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मयत माधुरीच्या अपघाती निधनाने वार्शीसह वरवंडी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात वाहनाधारका विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर माधुरीवर वार्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरीच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

वरवंडी हे गाव देवळा-कळवण रस्त्याच्या कडेला आहे. गाव रस्त्याच्या एका बाजूला व शिवार दुसऱ्या बाजूला असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता ओलांडताना सतत काळजी घ्यावी लागते. या रस्त्यावर सतत अपघात होतात. त्यामुळे वरवंडीच्या दोन्ही बाजूंना तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत.

-किशोर चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठाण पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वांत जुन्या गावठाण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह या भागाचा कायापालट करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महापालिकेच्या नव्या मालमत्ताकराच्या धोरणामुळे येथील पुनर्विकास योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नव्या करयोग्य मूल्य दराने येथील घरपट्टी ही वाढल्याने या भागाचे नूतनीकरण आणि वापरात बदलाचे प्रयत्न फसणार आहेत. महापालिकेच्या या अवाजवी करवाढीमुळे या भागात भाजपविरोधी वातावरण तयार होत असून, त्याला हवा देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित आंदोलनाची तयारी केली आहे.

सध्याचे जुने नाशिक आणि पंचवटीचा काही भाग हा गावठाणात येतो. मूळ नाशिक अशी आपली ओळख हा भाग अजूनही जपून आहे. शहरातील व्यापाराचे व पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल याच भागात होते. शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना या भागातील समस्या मात्र कायम आहेत. अरुंद रस्ते, जुनी वाडे, पडकी घरे, रस्ते आदी प्रश्न या भागात आहेत. या भागाच्या पुनर्विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक जणांनी तर आपले घर सोडून या भागातून काढता पाय घेतला आहे. जुने व पडीक वाडे, घरे दुरुस्तीसाठी पुरेशी जागा नसल्याने, तसेच वाढीव चटई क्षेत्र मिळत नसल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. येथील जुन्या वाड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून भाडेकरूंमुळे न्यायालयात प्रलंबित आहे. याच कारणामुळे जुने नाशिक व गावठाण भागात मोठे रस्ते व्हावे, पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळावी, तसेच वाढीव चटई क्षेत्र मिळून मिळकती विकसित करण्याच्या दृष्टीने क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्य व केंद्र सरकार, तसेच महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. लोकप्रतिनिधीही मंत्रालयात बैठकींवर बैठकी घेत आहेत. असे सर्व चित्र असताना महापालिकेच्या नवीन कर धोरणामुळे या सर्व कार्यावर पाणी फिरणार आहे. या भागातील बहुतांश घरे भाडेतत्त्वावर आहेत. सात ते दहा रुपयाने अनेक भाडेकरू आजही या ठिकाणी वास्तव्य करतात. नवीन मालमत्तांचे करयोग्य मूल्य हे ५० पैशांवरून दोन रुपये, तर अनिवासीचे सात रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्विकास करताना येथील नागरिकांना अव्वाच्या सव्वा घरपट्टीचा सामना करावा लागणार आहे. सध्या गावठाण भागाला ३०० ते एक हजारांपर्यंत घरपट्टी आहे. मात्र, नव्या करवाढीने घरपट्टीत पाच ते दहा पट वाढ होणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आंदोलनाचे नियोजन

नव्या करवाढीमुळे येथील पुनर्विकास रखडण्याची शक्यता असल्याने करवाढीविरोधात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी या संदर्भात प्रयत्न सुरू केले असून, या करवाढीविरोधात लोकांना जागरूक केले जाणार आहे. गा‌वठाणातील रहिवाशांचा लवकरच मेळावा आयोजित केला जाणार असून, मोठ्या आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलस्वार श्रमिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरकाम, तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या व या कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या महिलांचा नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे श्रमिका सायकल रॅलीचे आयोजन करीत यथोचित सन्मान करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या रॅलीत सुमारे ६० श्रमिक महिलांनी सहभाग नोंदविला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिक शहरात गेल्या १० वर्षांपासून सायकल चळवळ राबविण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवीत सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

महात्मानगर क्रिकेट मैदान ते शांतुशा लॉन्स, गंगापूररोड अशा मार्गावर शनिवारी सकाळी ७ वाजता श्रमिका सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर या विशेष आमंत्रित श्रमिकांचा सन्मान करून त्यांचा नीलेश जाजू यांच्या सखी सारीजकडून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मार्गदर्शक हरीश बैजल, अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, वैभव शेटे, आदी सदस्य उपस्थित होते.

लीलाबाई राजपूत (वय ५८) गेल्या चाळीस वर्षांपासून सायकल चालवीत काम करण्याच्या ठिकाणी पोहोचतात. यावेळी लीलाबाईंनी सांगितलेला अनुभव असा, की त्या काळात सायकल वापरण्यामुळे अनेक वेळा त्यांनी समाजातील प्रवृत्तींचा सामना केला. आजही मुले नोकरीला आहेत. आई सायकलवर कामाला जाते याची मुलांनाही लाज वाटते. मात्र, मोटारसायकल वापरण्याची ऐपत असूनही गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सवयीमुळे सायकल चालवीत काम करण्यास जाण्याची वेगळीच मजा असल्याचे त्यांनी सांगितले. त्या घरोघरी जाऊन मसाज करण्याचे काम त्या करतात.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध नाश्त्याचे पदार्थ सायकलवर विकणाऱ्या गौरी पटवर्धन यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या व कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या अनेक महिला श्रमिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या घटकांना सायकल चळवळीत सामावून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. या श्रमिका सायकल रॅलीसाठी गौरी समाजकल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.

दरम्यान, नाशिकमध्ये सुरू असलेल्या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून नाशिक शहराच्या विविध दहा विभागांत दहा प्रमुख आणि कमिट्यांची नियुक्तीही यावेळी करीत त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. शहरातील दहा प्रमुख विभागांत एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पाच किंवा अधिक कमिटी मेंबर्सची टीम सायकलिंगच्या प्रचार व प्रसाराचे काम करेल.

पंढरपूरसाठी ऑनलाइन नोंदणी

नाशिक सायकलिस्टतर्फे पंढरपूर सायकलवारीसाठी फेसबुक इव्हेंटद्वारे ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. दि. १३ ते १५ जुलैदरम्यान निघणाऱ्या या पंढरपूर सायकलवारीमध्ये श्रमिका सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनीही नोंदणी केली असून, सायकल वापरणाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शनिवारी 'सायकल विथ कमिशनर'

नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या सायकल चळवळीची माहिती मुंढे यांना देण्यात आली आणि 'वॉक विथ कमिशनर' या नवी मुंबईत गाजलेल्या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 'सायकल विथ कमिशनर' असा उपक्रम घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. मुंढे यांनी तात्काळ त्यास होकार दिला. येत्या शनिवारी (दि. २१ ) सकाळी ६.३० ते ८.३० वाजेदरम्यान सायकलवर गोल्फ क्लब येथे येऊन ते नागरिकांशी संवाद साधतील.

(अँकर) फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढविरोधात बैठक

$
0
0

करवाढविरोधात बैठक

पंचवटी : शेतजमिनीवर कर लादण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी पुढील आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी आज, रविवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता आडगाव येथे शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीस आडगाव, मानूर, नांदूर आदी परिसरातील शेतकरी उपस्थित राहतील.

म्हसोबा महाराज यात्रा

पंचवटी : म्हसोबा महाराज यात्रोत्सव आज, रविवारी (दि. १५) म्हसोबा पटांगणात होणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्रींचा अभिषेक व महापूजा, सायंकाळी सवाद्य मिरवणूक व महाप्रसाद, दशावतारी सोंगे व बोहाडा आदी कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीविरोधात १७ ला वकिलांची बैठक

$
0
0

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात नाशिक बार असोसिएशन सरसावली आहे. बार असोसिएशन आणि नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती यासाठी एकत्र आली असून, या संदर्भात विचार करण्यासाठी १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयातील लायब्ररी हॉलमध्ये बैठक होणार आहे. महापालिकेने नुकतेच मालमत्तेवर, तसेच शेतजमीन मिळकतींवर मोठा कर वाढवला आहे.

निशा शिराळचे यश

नाशिक : जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या 'गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या' या विषयावरील शालेय निबंध स्पर्धेत सर्व शाळांमधून यश मिळवणाऱ्या वैदेही उर्फ निशा गुलाबराव शिराळ या विद्यार्थिनीचा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सत्कार केला. वैदेही महापालिकेच्या देवळाली येथील शाळा क्रमांक १२७ मध्ये आठवीत शिक्षण घेते. या वेळी वैदेहीच्या पालकांसह विलास चाबूकस्वार, विलास काळे उपस्थित होते.

सत्कार समारंभ

नाशिक : नाशिक बार असोसिएशनचे सभासद अॅड. मिलिंद निकम, अॅड. शिवाजी थापेकर, अॅड. मुग्धा गांगुर्डे, व अॅड. विजय शितोळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अॅड. वैशाली भोसले या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या असून, या सर्वांचा नाशिक बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सोहळा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा कोर्टातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची बदली

$
0
0

कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची बदली

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गत तीन वर्षांपासून मुख्य कार्यकारीपदावर असलेले विलास पवार यांची जोधपूर येथे डिफेन्स इस्टेट ऑफिसरपदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी तेजपूर येथील डिफेन्स इस्टेट ऑफिसर अजय कुमार पदभार स्वीकारणार आहेत. तोपर्यंत औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार बी. नायर यांच्याकडे येथील कार्यभार देण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स इस्टेट यांच्यामार्फत तसा आदेश नुकताच स्थानिक यंत्रणेला प्राप्त झाला आहे. देशभरातील एकूण १७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी देवळालीच्या विकासात मोठी भर घालताना भूमिगत गटार योजना, रखडलेली कामगार भरती, यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका, शालेय विद्यार्थ्यांकरिता अटल टिकरिंग लॅब यांसारख्या विविध योजना, शहरातील सर्व एलईडी, आनंदरोडवरील क्रीडा संकुल, शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या फ्री होल्ड केसेस मार्गी लावणे, कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या घरांना शौचालये, आठवडेबाजार अतिक्रमण व काँक्रिटीकरण,उर्दू शाळेचा प्रश्न, हायड्रॉलिक फायर ब्रिगेड, साठेनगरचा रस्त्यांचा प्रश्न, सर्व देयके व करप्रणाली ऑनलाइन करणे, तसेच प्रशासकीय कामकाज संपूर्णपणे संगणकीकृत करणे आदी कामे मार्गी लावली. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत केंद्र व राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांनी बोर्डाला मिळवून दिला होता.

----

थोडक्यात

--

'प्रेस सोसायटी'स चार कोटींचा नफा

जेलरोड : नाशिकरोड प्रेस कामगारांच्या आयएसपी सोसायटीला २०१७-१८ या वर्षात तीन कोटी ९१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सचिव विष्णू जगताप यांनी दिली. संचालक भगवान मोरे, गणेश काळे, राजेंद्र चंद्रमोरे, साहेबराव गाडेकर, हिरामण आव्हाड, रमेश जाधव, संदीप गांगुर्डे, मंगला खर्जुल, सुनंदा कडाळे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले, की ३१ मार्च २०१८ अखेर भागभांडवल १९.९६ कोटी असून, खेळते भांडवल १९७.९५ कोटी आहे. सभासद संख्या २,६९८ असून, स्वनिधी २७.०६ कोटी आहे. १५७.२७ कोटींच्या सभासद ठेवी जमा असून, ९६.२६ कोटी कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. एनपीए शून्य टक्के, तर सीडी रेशो ५४ टक्के आहे. संस्थेने तरलतेपोटी ६४.८० कोटींची गुंतवणूक केली आहे. संस्थेचा सीआरआर १.७९ टक्के असून, आज संस्था बँक कर्जमुक्त आहे. चालू वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे नियोजन आहे. संस्था स्थापनेपासून संचालक मंडळाने व्यवसायवृद्धी व सभासद समाधानासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थी सत्कार होतो. सभासदांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सभासदांच्या मागणीचा विचार करून कर्जमर्यादा १० लाखांवरून १५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

---

पॉइंटर्स

--

वेध एमएच-सीईटीचे -२

भाजीविक्रेत्यांना नोटीस -३

आमची सोसायटी आमची शान -४

बालमित्राच्या भेटीची ओढ -५

फोनमधील स्मार्ट रहस्य -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंथेटिक ट्रॅकची धूळधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील धावपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवित असल्याने भविष्यात त्यांना आणखी 'गती' मिळावी यासाठी बनविण्यात आलेल्या आडगाव नाका परिसरातील सिंथेटिक ट्रॅकला सध्या चक्क जॉगिंग ट्रॅकचे स्वरूप आले आहे. असंख्य नागरिक येथे जॉगिंगसाठी अनधिकृतपणे घुसखोरी करीत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चाच्या या सिंथेटिक ट्रॅकची धूळधाण झाल्याची भावना क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या या सिंथेटिक ट्रॅकवर दररोज सकाळी शेकडोंच्या संख्येने नागरिक अनधिकृतपणे घुसखोरी करून जॉगिंग करताना दिसून येत आहेत. मात्र, तरीही या ट्रॅकची जबाबदारी असलेले प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे. या मैदानाचे प्रवेशद्वार बंद असतानादेखील त्यावर चढून शेकडो नागरिक येथे सर्रास घुसखोरी करीत आहेत. त्यांच्याकडून होणाऱ्या बेलगाम वापरामुळे या सिंथेटिक ट्रॅकवर धूळ, खडे पसरत असल्याने हा ट्रॅक सुरू करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

नाशिकचे नाव सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने अॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. मात्र, त्यानंतरही नाशिकमध्ये खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची ओरड सातत्याने केली जात होती. नाशिकमधील धावपटूंना सिंथेटिक ट्रॅकवर सराव करण्यासाठी थेट मुंबई-पुण्याला धाव घ्यावी लागत होती. ही गरज ओळखून आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. हा ट्रॅक तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्र वापरण्यात आलेले आहे. मात्र, तयार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या ट्रॅकचा दुरुपयोग सुरू झाला. या ठिकाणी परिसरातील लहान मुले खेळण्यासाठी येऊ लागली. जॉगिंगसाठी येणाऱ्यांचाही हा ट्रॅक जणू अड्डाच झाला आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ट्रॅकची धूळधाण झाली आहे. मात्र, तरीही प्रशासन याबाबत मौन बाळगून आहे. येथील समस्यांसंदर्भात विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यावेळी या ट्रॅकचा वापर फक्त खेळाडूंसाठीच व्हावा, असे ठरविण्यात आले. मात्र, तसे घडले नाही. काही काळापूर्वी या ठिकाणी हास्य क्लबदेखील सुरू करण्यात आला होता. मात्र, खेळाडूंनी वेळीच आक्षेप घेतल्याने तो बंद झाला. मध्यंतरी या ठिकाणी आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यावेळी खेळाडूंसोबत आलेल्या शिक्षकांनीही ट्रॅकवर नाचत धुडगूस घातला होता.

सहा कोटींचा खर्च

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आलेला हा सिंथेटिक ट्रॅक चारशे मीटर लांबीचा असून, त्यात आठ लेन आखण्यात आलेल्या आहेत. अॅथलेटिक्सच्या ट्रॅकप्रमाणेच सिंथेटिक टेनिस कोर्टचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. या सर्व कामासाठी सहा कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, पुरेशा दक्षतेअभावी हा खर्च वाया जातो की काय, अशी धास्ती क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बंद प्रवेशद्वारावरून घुसखोरी

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नेमलेले नसल्याने येथील बंद प्रवेशद्वारावरून घुसखोरी करून तेथे सिंथेटिक ट्रॅकवर जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना कोणाकडूनही मज्जाव केला जात नाही. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वेळीच रोखले नाही, तर कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ट्रॅकचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकमेव ट्रॅक धोक्यात

शहरातील अनेक खेळाडू मातीच्या ट्रॅकवर सराव करतात. परंतु, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज भासते. नाशिकमध्ये हा एकमेव सिंथेटिक ट्रॅक आहे. हा ट्रॅकच खराब झाला, तर नाशिकमधील खेळाडूंचे कधीही न भरून येणारे नुकसान होऊ शकेल, अशी भावना खेळाडून आणि क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमधील धावपटूंसाठी हा एकमेव सिंथेटिक ट्रॅक आहे. त्याचे नुकसान होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. यासंदर्भात काही काळापूर्वी बैठक झाली होती. परंतु, या समस्येबाबत तोडगा निघालेला नाही. खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून त्वरित निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.

-मोनिका आथरे, धावपटू

(लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असिफाला न्याय मिळायलाच हवा...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम्मू-काश्मीर येथील कठुआतील आठ वर्षीय असिफा या बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरात रविवारी ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात आले. असिफाला न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी करतानाच यापुढे अशा घटना घडून नयेत, यासाठी समाजाने सजग राहण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील प्रवेशद्वाराजवळ असिफाची प्रतिमा उभारण्यात आली होती. या ठिकाणी असिफाला न्याय द्या, असा आशय असलेले फलक घेऊन बालिका उभ्या होत्या. या वेळी महाविद्यालयीन तरुणाईने प्रतिक्रिया व्यक्त करताना, अशा घटना घडण्यापूर्वीच समाजाने दुष्कृत्ये रोखण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहन केले. महिलांच्या संरक्षणासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यानंतर पेटलेल्या मेणबत्त्या, तसेच न्याय मागणारे फलक हाती घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. हा मार्च चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नल, त्र्यंबक नाकामार्गे पुन्हा अनंत कान्हेरे मैदानावर पोहोचला. येथे असिफाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चामध्ये १ ते ५ वर्षांच्या बालिकांचा सहभाग लक्षणीय होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला. अब्दुल्ला टिनवाला, ताहेर काचवाला, मुफ्तीनल मर्चंट, युसुफ बवाहीर व जाफर शेख, सोनाली शेलार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा मार्च काढण्यात आला. त्यामध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नेटिझन्स ग्रुपने सहकार्य केले. भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात मेणबत्त्या पेटवून पीडितेसाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी सुनील परदेशी, शरद केदारे, उषा गवई, संध्या राजपूत, सुषमा बोराडे, सविता खंदारे, आरती निकम, समर शेख आदी उपस्थित होते. भोसला मिलिटरी हायस्कूलजवळूनही अशाच प्रकारचा कँडल मार्च काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जग में सुंदर दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जग में सुंदर दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम' या पदावर अनोखे पदलालित्य साधत भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या जीवनचरित्रातील कथाप्रसंगांमधला भाव अतिशय तरल पद्धतीने कथ्थकच्या माध्यमातून ठाण्याच्या भावना लेले यांनी सादर केला. या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते नटराज पं. गोपीकृष्ण जयंतीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित 'नृत्यानुष्ठान' या कार्यक्रमाचे.

प. सा. नाट्यगृहात कीर्ती कलामंदिरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे हे आठवे पुष्प आहे. लेले यांच्या पाठोपाठ पुण्यातील धनश्री नातू-पोतदार यांनीही सादर केलेली साडेसहा मात्रांची भिन्नलोभा तालातील नि:बद्ध रामवंदना प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संजीवनी कुलकर्णी यांच्या ज्येष्ठ शिष्या भावना लेले यांनी कथ्थकचे सादरीकरण केले. दोन्हीही सत्रातील सादरीकरणासाठी यंदा श्रीरामनवमीचे औचित्य साधून 'राम' ही संकल्पना निवडण्यात आली होती. याच संकल्पनेस अनुसरून कलावंतांनी सादरीकरण केले. सुरुवातीला पं. नरेंद्र शर्मा रचित 'नीलांभुजं श्यामल कोमल अंगम्' या रामस्तुतीचे सादरीकरण केले. यानंतर शुद्ध नर्तनात त्यांनी १७ शिखरमात्रांचे तालबद्ध सादरीकरण केले. त्यांना गायक म्हणून श्रीरंग टेंबे, हार्मोनिअमवर हिमांशू गिंडे, तबल्यावर अथर्व कुलकर्णी व पढंतसाठी पल्लवी लेले यांची साथसंगत लाभली.

यानंतरच्या सत्रात रोशन दाते यांच्या शिष्या धनश्री नातू-पोतदार यांनी साडेसहा तालप्रस्तुतीमध्ये सुंदर पदन्यास साधत प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर द्रुत तीन तालात गिनतीयाँ , गतनिकास आणि टुकडे सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. नातू-पोतदार यांना तबल्यावर मंगेश करमरकर, गायन आणि संवादिनीसाठी मनोज देसाई, पढंतसाठी रसिका कुलकर्णी यांची साथसंगत लाभली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष प्रमुख पाहुणे होते. पियू आरोळे यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शायदा पुन्हा सिव्हिलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुटकेची संधी दिसताच पसार झालेली गर्भवती शायदा शफिक पठाण ही महिला कैदी अखेर वेदना आणि दोन वेळच्या जेवणासाठी पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परतली. विशेष म्हणजे जेलरोड येथून परतीच्या प्रवासासाठी तिला एकेक रुपया मागावा लागला.

कधीही डिलेव्हरी होईल, अशा स्थितीत असलेली शायदा शुक्रवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधून सुरक्षारक्षकांना चकवा देऊन पसार झाली होती. मालेगाव येथील शायदा आणि तिच्या पतीवर खुनाचा आरोप असून, दोघेही नोव्हेंबर २०१७ पासून सेंट्रल जेलमध्ये आहेत. शायदाबरोबर दोन वर्षांचा अरबाज असून, जेलमध्ये आली त्या वेळी शायदा गर्भवती होती. दिवस भरल्याने शायदाचे पोट दुखू लागले. त्यामुळे तिला गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, जेल प्रशासनाच्या महिला कर्मचाऱ्याची नजर चुकवून शायदा अरबाजसह फरार झाली होती. तिचा तपास सुरू असताना शायदा रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वत: हजर झाली. हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली शायदा टप्पा टप्पा करीत जेलरोडवरील एका दर्ग्यात येऊन थांबली होती. उन्हाचा तडाखा, पोटातील भूक आणि पैशांची कमी यामुळे तिने कसेबसे दोन दिवस काढले. जेलच्या चौकटी तोडून पळाली तरी शायदाकडे करण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे शनिवारी एकेक रुपया मागून कसे तरी रिक्षाच्या भाड्यापुरते पैसे जमा केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरनेच घेतला चालकाचा प्राण

$
0
0

एमआयडीसीतील घटना; तीन मोटारसायकलींचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीत कंटेनर बाजूला उभा करून कंपनीचा पत्ता विचारणाऱ्या चालकाचा त्याच कंटेनरखाली मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव रामबाण साहू (वय ४३) असे आहे. यात तीन मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले, तर एक टपरीचालक जखमी झाला. सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सय्यद तपास करीत आहेत.

मुंबईवरून नाशिकला माल खाली करण्यासाठी रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास तीन कंटनेर आले होते. कंपनीचा पत्ता माहिती नसल्याने चालकांनी बॉश

(मायको) कंपनीच्या नवीन गेटवर कंटेनर उभे केले. कंटेनर उभे करताना ते न्युट्रल करून सुरूच ठेवण्यात आले. मात्र, उतारामुळे कंटेनर सुरू झाला. चालक रामबाणने कंटेनरमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून तो कंटेनरच्याच चाकाखाली आला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

मोटारसायकलमुळे थांबला कंटेनर

चालकाच्या मृत्यूनंतर उतारावरील कंटेनर रस्त्याच्या पुढे गेला. अखेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींमुळे कंटेनर थांबला; अन्यथा कंटेनरच्या धडकेने मोठी दुर्घटना घडली असती. यात मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. या वेळी टपरीचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. वेळेवर कंपनीत मटेरियल रिकामे करण्यासाठी जाणाऱ्या कंटेनरचालकाने प्रसंगसावधान राखले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. मात्र, घाईत सुरू असलेला कंटेनर पार्क करीत पत्ता विचारण्यासाठी गेलेल्या चालकाचे प्राण त्याच्याच वाहनाने घेतल्याने वाहनचालकांनी हळहळ व्यक्त केली. हवालदार सय्यद तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात १५५४ शिधापत्रिकांनी घेतला पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल कंपन्यांप्रमाणेच शिधापत्रिकाधारकांनाही आता जिल्ह्यात 'पोर्टेबिलिटी'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची मुभा असून, आतापर्यंत दीड हजाराहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घेतला आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा व्यवस्था मंत्रालयाने कामगार, मजूर, नोकरदार व्यक्तींच्या सोयीसाठी रेशन धान्य वितरणाबाबत विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेला 'आधार' कार्डची जोड देण्यात आली असून, आधार क्रमांकाच्या आधारे जुने रेशनकार्ड दाखवून नव्या किंवा बदलीच्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्याकडून नोंदणी करता येऊ शकणार आहे. नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही 'पोर्टेबिलिटी'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना राज्यांपर्यंत किंवा त्याअंतर्गत शहर, गावपातळीवरच चालविण्यात येणार होती. स्मार्ट कार्डवर आधारित रेशनकार्डमुळे स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून काही राज्यांत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य होऊ लागले आहे. जिल्ह्यात याच सुविधेद्वारे आतापर्यंत १५३४ शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घेतला आहे.

तालुकानिहाय पोर्टेबिलिटी केलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या

तालुका संख्या

नाशिक (श) ५१४

नांदगाव २१३

चांदवड १४५

मालेगाव १२४

मालेगाव (ग्रा) ११२

बागलाण ९४

दिडोरी ९३

नाशिक (ग्रा) ८३

निफाड ६२

देवळा २७

येवला १९

इगतपुरी १७

कळवण ११

पेठ ०९

सिन्नर ०७

सुरगाणा ०२

त्रंबकेश्वर ०२

एकूण १५३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल टेबलवरच आयपीएलवर सट्टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयपीएल या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चौघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. गंगापूर रोडवरच एका हॉटेलमध्ये टेबलवर बसून हे चौघे बेटिंग लावत होते. त्यांच्यावर गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कारवाई झाली. या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

आयपीएलमध्ये सामना कोण जिंकणार, हरणार, एवढेच नव्हे तर कोणता फलंदाज किती धावा करणार, कोणत्या बॉलवर सिक्सर बसणार अशा वेगवेगळ्या पद्धतीने सट्टेबाज बेटिंग लावतात. क्रिकेट सामन्यांवर बेटिंग हा नवीन प्रकार नसला तरी प्रत्येक मोसमात पोलिसांना नवनवीन संशयित सापडतात. अशाच एका टोळीबाबत गंगापूर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोधपथकाने गंगापूर रोडवरील हॉटेल रिगल बार अँड रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावर बेटिंग करणाऱ्या सचिन दादाभाऊ फरकडे (वय २३, रा. आनंदनगर, सिडको), अजय शंकर धुमाळ (रा. गंगापूर नाका), सनी सुनील शिंदे (रा. इंदिरानगर) आणि हर्षद दामोदर घुले (रा. आडगाव टप्पा) या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी संशयित ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आले. संशयितांकडून काही मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.डी. पाटील यांनी दिली. चौघांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. हवालदार उगले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला अन् सुका कचरा विलगीकरणाचा संकल्प

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे विल्होळी परिसरात साकारण्यात आलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला 'मटा'च्या वाचकांनी रविवारी भेट देत हा प्रकल्प समजावून घेतला. यावेळी सर्वांनीच ओला अन् सुका कचरा विलगीकरणाचा संकल्प केला. 'मटा'तर्फे आयोजित या उपक्रमात वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या या 'पायलट प्रोजेक्ट'ची तपशीलवार माहिती घेतली.

शहरातील विविध प्रकल्प, संस्था आदींच्या कामकाजाची माहिती वाचकांनाही व्हावी आणि त्यांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने 'जाणून घेऊ या मटासंगे' हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत 'वेस्ट टू एनर्जी' हा महापालिकेचा वीजनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प जाणून घेण्यास इच्छुक वाचकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडक वाचकांना रविवारी प्रकल्प भेटीसाठी नेण्यात आले होते.

महापालिका क्षेत्रातील २० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून येथे वीजनिर्मिती केली जाणार आहे. जर्मनीची जीआयझेड कंपनी या प्रकल्पाची सल्लागार कंपनी आहे. हैदराबादच्या रामकी या कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाची मालकी महापालिकेचीच राहणार आहे. दरमहा एक लाख युनिट वीज मिळविण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २० टन ओला कचरा व १० टन मलजल महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिले जाण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, जोपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्याविषयी प्रबोधन होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक तेवढा कचरा जमा होणे शक्य होत नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम अपेक्षित वीजनिर्मितीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कटाक्षाने ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावेळी 'मटा'च्या वाचकांशी संवाद साधताना केले. या आवाहनाला शहराच्या विविध भागातून उपस्थित असलेल्या नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कचरा विलगीकरणाचा संकल्प केला.

पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट'

शहरातील विविध हॉटेल्समधून वाया जाणाऱ्या अन्नपदार्थांचे संकलन करून जैविक कचरा या प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केला जातो. या प्रकल्पासाठी जर्मन सरकारने सात कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. अशाप्रकारे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा हा देशातील पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट' असल्याने देशाचे याकडे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाचे अभियंते तथा समन्वयक सुनील खैरनार, साइट इन्चार्ज वसिम, सहकारी प्रवीण कांबळे आदींनी यावेळी वाचकांना या प्रकल्पाविषयीची माहिती सांगितली.

तज्ज्ञ अन् नागरिक म्हणतात...

'वेस्ट टू एनर्जी' हा राज्यातील पहिलाच प्रकल्प उत्तम रीतीने उभारला आहे. या ठिकाणी अनेक कामे कर्मचारीवर्गाकडून केली जात असली, तर काही यंत्रे वापरली तर निश्चितच फायदा होईल. येथून जादा प्रमाणात वीजनिर्मिती झाली पाहिजे.

-सी. व्ही. इंगळे, उपकार्यकारी अधिकारी, महावितरण

या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी नाशिककरांचे योगदान आवश्यक आहे. याबाबत असंख्य नाशिककर अनभिज्ञ असून, अधिकाधिक नागरिकांना या प्रकल्पाची माहिती दिली, तर अनेक जण कचरा विलगीकरणास प्राधान्य देतील. येथे तसे करण्यात खूप वेळ जात आहे.

-व्ही. डी. चौधरी

या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीजनिर्मिती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रकल्पाची माहिती आम्हालासुद्धा नव्हती. 'मटा'च्या उपक्रमामुळे ती आम्हाली मिळाली. सर्व नागरिकांना याची माहिती दिली पाहिजे, तरच नागरिकांचाही सहभाग यात वाढेल. हा प्रकल्प कायम सुरू राहावा.

-सुरज माळी

कचऱ्यापासूनही किती फायदा होऊ शकतो हे या प्रकल्पामुळे समजले. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना प्राधान्याने करवून देणे गरजेचे आहे. खत प्रकल्प सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा प्रकल्प माहिती नसल्याने नागरिकांत जनजागृती दिसून येत नाही. नाशिककरांना हा प्रकल्प खुला केला पाहिजे.

-भय्यासाहेब कोठावळे

----

अँकर

लोगो : जाणून घेऊ या मटासंगे

---

(फोटो : सतीश काळे)

राजन जोशी या बातमीशी संबंधित प्रतिक्रिया व चौकट ऑफिसच्या इ मेल देणार आहेत. त्या बातमीस जोडाव्यात.)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनची अॅपेरिक्षाला धडक; दहा प्रवाशी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

काळी पिवळी व्हॅन व अॅपे रिक्षा यांच्यात मनमाड-मालेगाव मार्गावर कानडगाव फाट्यानजीक रविवारी दुपारी झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

काळी पिवळी व्हॅन (एमएच १५ ई ३८५२) मनमाडकडून मालेगावकडे जात होती. त्याचवेळी मनमाडकडे येणाऱ्या (एमएच ४१ सी ५६६३) अॅपे रिक्षाला व्हॅनची जोरदार धडक बसली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. कोणाच्या हाताला, पायाला तर काहींच्या डोक्याला मार बसला आहे. जखमींना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या अपघातात रिक्षा व व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टीवाढविरोधास बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरपट्टीवाढीविरोधातील शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या धरणे आंदोलनाचे बळ वाढताना दिसत असून, 'निमा' आणि 'आयमा' या उद्योजकांच्या संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षानेदेखील आज, सोमवारी (दि. १६) घरपट्टीवाढीविरोधात ढोल बजाव आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाविरोधीतील आंदोलन आणखी जोर धरण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेने नुकतीच मालमत्ता करात १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या घरपट्टीवाढीविरोधत शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे येत्या २३ तारखेला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याला 'निमा'ने पाठिंबा दिल्याची माहिती अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने निमा हाऊस येथे भेट दिल्यानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत सदर घरपट्टीवाढीसंदर्भातील सर्व पैलूंवर चर्चा झाली. ही दरवाढ अन्यायकारक असून, याची झळ सामान्य नागरिक ते उद्योजक अशा सर्वांनाच सोसावी लागणार आहे. औद्योगिक वापराच्या पाणीदरात वाढ झाली आहे. विजेचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. अशात झालेल्या या घरपट्टीवाढीमुळे उद्योजकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही घरपट्टीवाढ सर्वांसाठी अन्यायकारक असून, त्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

महापालिकेची महासभा दि. २३ एप्रिल रोजी होत असून, याच दिवशी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास 'निमा'ने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. बैठकीस निमा पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावल, शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, सल्लागार उन्मेश गायधनी, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सदस्य गजानन शेलार, ॲड. तानाजी जायभावे, शिवाजी म्हस्के यांची उपस्थिती होती.

'आयमा'चाही वाढीस विरोध

घरपट्टीवाढीविरोधातील शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या धरणे आंदोलनास 'आयमा'नेदेखील पाठिंबा दिल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी दिली. घरपट्टीवाढीसंदर्भात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळाने 'आयमा'च्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'निमा' व 'आयमा' या उद्योजकांच्या संघटनांनी या आंदोलाला पाठिंबा दिल्याने या आंदोलनाचे बळ आणखी वाढले आहे.

'आप'चे आज 'ढोल बजाव'

घरपट्टीवाढीच्या निर्णयास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध सुरू केलेला असतानाच आम आदमी पक्षानेही या निर्णयाविरोधात आज, सोमवारी (दि. १६) 'ढोल बजाव' आंदोलन पुकारले आहे. राजीव गांधी भवनसमोर दुपारी १२.१५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे घरपट्टीविरोधातील रस्त्यावरील लढाईस खऱ्या अर्थाने प्रारंभ होत आहे. 'आप'ने या घरपट्टीवाढीबाबत बोलताना सांगितले, की ही वाढ जीवघेणी, अवाजवी आणि अव्यवहार्य आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करून अनावश्यक घरपट्टीवाढीविरुद्ध हे आंदोलन पुकारले आहे. नाशिककरांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे. याअगोदर या घरपट्टीवाढीविरोधात 'आप'ने स्वाक्षरी मोहीमदेखील राबविली होती. त्यानंतर हे आंदोलन केले जाणार आहे. घरपट्टीवाढीविरोधात राजकीय पक्षांबरोबरच सर्व क्षेत्रांतून त्याला विरोध होत आहे. त्यामुळे त्याविरुद्ध सभागृहाबरोबरच आता सभागृहाबाहेरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

(महापालिका निष्पक्षचा लोगो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images