Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चार मेडल्स जिंकली पण हरपला सुवर्णअश्व!

$
0
0

नाशिक : माणूस अन् मुक्या जनावरांमधील प्रेमाचा भावनिक धागा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यात ते मुके जनावर म्हणजे सैनिकी शाळेतला रूबाबदार अश्व असेल आणि त्याच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार असणारी सैनिकी शिक्षण घेणारी नवतरूण असतील, तर त्यांच्यातल्या ऋणानुबंधाची गोष्टच निराळी. पण अशाच एका भावूक प्रसंगात भोंसला मिल‌िटरी स्कूलच्या रामदंडींनी त्यांच्या लाडक्या ‘वीरा’ नावाच्या सुवर्णअश्वाला ज्या मैदानावर अखेरचा निरोप दिला, त्याच मातीत अश्वारोहणात चार पदके पटकावून त्याला अनोखी श्रद्धांजलीही त्यांनी अर्पण केली.

भोंसला सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचा सराव व्हावा, या उद्देशाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशाच एका स्पर्धेचे आयोजन नुकतेच पुण्यातील एका रेसकोर्स मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये येथील भोसला मिल‌िटरी स्कूलच्या वतीने चार उमद्या अश्वांसह १६ प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी अश्वारोहणाच्या क्रीडाप्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील काही टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी प्रतिस्पर्धकांना तगड्या चालीने आव्हान देत ‘वीरा’ या भोंसलाच्या उमद्या अश्वाने अवघ्या मैदानाचे लक्ष खेचले होते. स्पर्धेच्या एका थरारक क्षणाला रेसकोर्सवर उभारण्यात आलेल्या ‘हर्डल’ची उंची उडी घेऊन ओलांडताना ‘वीरा’ चा पाय त्यात अडकला अन् क्षणार्धात जमिनीवर मान मुडपल्याने त्याला जखमी अवस्थेत प्राण गमवावे लागले. या घटनेने सुन्न झालेल्या मैदानाने त्याला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्याच्यासोबत आलेले भोंसला मिल‌िटरी स्कूलचे रामदंडी (विद्यार्थी) हमसून रडू लागले. पदकांपेक्षाही त्यांना ‘वीरा’ अतिशय प्यारा होता.

या अनपेक्षित आघाताने रामदंडी स्पर्धेतून माघारी परतण्याच्या काही क्षण विचारात असताना ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने त्यांनी आव्हान जिवंत ठेवण्याचा निर्णय एकमुखी घेतला. अन् पुढे उत्कृष्ट खेळ सादर करत त्यांनी स्पर्धेत वेगवेगळी चार पदके पटकाविली. या पदकांमध्ये वीराच्या पाठीवर रोहण करीत या दुर्घटनेच्या आदल्या दिवशीच पटकाविलेल्या एका पदकाचा समावेश आहे. या अपघात प्रसंगी आपल्या पाठीवर स्वार असलेल्या रामदंडीलाही वीराने स्वत: कोसळताना मोठी इजा होऊ दिली नसल्याची भावनाही यावेळी संघ समन्वयक आणि रामदंडीजने व्यक्त केली. रामदंडींनी या कटू प्रसंगातून उभारी घेत स्पर्धेत मिळविलेली पदके ही वीराला श्रद्धांजली म्हणून अर्पण करण्यात आल्याचे समन्वयक मेजर चंद्रसेन कुलथे यांनी ‘मटा’ शी बोलताना सांगितले.

भोंसला परिवारास चुटपूट

भोंसला मिल‌िटरी स्कूल हे अश्वारोहण स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ‘वीरा’ या घोड्याबाबत घडलेली अपघाताची घटना ही भोंसला परिवारासाठी चुटपूट लावून जाणारी आहे. या अपघाती घटनेचा व्ह‌िड‌ीओ देखील उपलब्ध आहे. आर्मीनेही या घटनेनंतर या मृत अश्वाचे पोस्टमार्टेम केले आहे.

- दिलीप बेलगांवकर, कार्यवाह, सीएचएमई, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक न्यायालयाला ‘न्याय’ कधी म‌ळिणार?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे ग्राम न्यायालय सुरू होऊन दीडवर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र सुविधांना न्याय मिळालेला नाही. त्र्यंबकेश्वर येथील लोकमान्य टिळक व्यापारी संकुलात ग्राम न्यायालय थाटण्यात आले. मात्र या न्यायालयात सुव‌धिांची वाणवा असल्यामुळे पक्षकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तालुका निर्मितीनंतर सतरा वर्षांनी येथे आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी ग्रामन्यायालय सुरू करण्यात आले. देशविदेशातून येथे भाविक येत असतात. त्यांच्या निवासाच्या सुविधांसाठी येथे बांधकामांचा अतिरेक म्हणावा अशी वस्तुस्थिती आढळते. तथापि सरकारी कार्यालयांना येथे इमारतींची वाणवा आहे. शासकीय भुखंड अतिक्रमीत झालेले असताना सरकारी कार्यालय चालविण्यासाठी सरकारी धर्मशाळा आणि व्यवसायीक संकुलांचा आधार घ्यावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर येथे अशाच पद्धतीने ग्राम न्यायालय सुरू झाले. तालुक्यातील खटले येथे चालविले जातात.

स्वतंत्र इमारतीची गरज

ग्राम न्यायालय म्हटल्यावर कौटूंब‌कि केसेस अधिक असतात. साहज‌कि महिला पक्षकार मोठ्या संख्येने येतात. मात्र प्रसाधनगृहाच्या गैरसोयीमुळे महिलांची कुचंबणा होते. वास्तव‌कि पाहता या दीड वर्षाच्या कालावधीत हे न्यायालय स्थलांतरीत करणे गरजेचे होते. केवळ बस स्थानकापसून जवळ हा एकमेव निकष या वास्तुला उपयुक्त ठरला आहे. अन्यथा न्यायालयासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे.

मागण्यांसाठी निवेदन

येथील वकील संदीप मोरे यांनी त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रधान जिल्हा सत्र न्यायाधिश यांना पत्र दिले आहे. येथे आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गंधीने नागरिक हैराण

$
0
0

गोडसे मळ्यातील नाल्यात वाढली डासांची उत्पत्ती

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील आनंद रोडच्या त्रिमूर्ती चौकातून थेट संसरीपर्यंत वाहत असणाऱ्या नाल्यात आजूबाजूच्या रहिवासी भागातून टाकण्यात आलेल्या भूमिगत नाल्यांच्या पाइपमधून गटारांचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चौकापासून थेट संसरी नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी झाली असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

देवळालीत गेल्या पंधरा दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र स्वच्छता मोहिमेदरम्यान केवळ औपचारिकता म्हणून नाल्याची काही भागात स्वच्छता करण्यात आली. मात्र त्रिमूर्ती चौक ते संसरीदरम्यान एकदाही नाला ज्याप्रकारे स्वच्छ करण्याची गरज होती. त्याप्रमाणे करण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन बसस्थानक, पोलिस स्टेशन, स्टेट बँक असा गजबजलेल्या परिसरात हा भाग असल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड व लष्करी हद्दीलगत गोडसे मळा येथून वाहत येणाऱ्या नाल्यात लष्करातील रहिवाशी इमारतींचे पाणी सोडण्यात आले. तेथूनही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी फैलावत आहे. उच्चभ्रू वस्तीसह गोडसे मळा भागातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. या भागात डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढीस लागले असून, डेंग्यूसारखा आजार फैलावण्याची भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकप्रतिनिधींना जाणीव नाही

पहाटेच्या सुमारास आनंद रोड मैदानावर मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे अनेक नागरिक व व्यायामासाठी खंडेराव टेकडी, सह्याद्री नगर, आनंद रोड मैदानावर येणारे खेळाडू, जवळच्या डायमंड लॉज येथील मोफत दवाखान्यात येणारे रुग्ण व साईबाबा मंदिरात येणारे भक्तगण यांची या भागात सतत वर्दळ असते. याशिवाय परदेशी पर्यटकदेखील याच भागात येत असल्याने पसरलेल्या दुर्गंधीने अनेकजणांना नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागते. आनंदरोड परिसरात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी राहतात मात्र त्यांच्या वाहनांच्या काचा बंद असल्याने त्यांना या समस्येची जाणीव होत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर हा नाला नियमित स्वच्छ केला तर आनंदरोड परिसरात दुर्गंधी फैलावणार नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात पुन्हा वाढताहेत पाणवेली

$
0
0

तपोवन कपिला संगमापर्यंत नदीपात्रात घाण

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहराच्या भागातून बाहेर पडून तपोवनाकडे वाहत जाणाऱ्या गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह टाळकुटेश्वर पूलापासून स्थिर होतो. पुढे तपोवनाच्या कपिला संगमापर्यंत हा प्रवाह स्थिर असल्यामुळे सध्या या पाण्यावर शेवाळाचा हिरवा थर साचलेला दिसतो. त्यावर पाणवेलीची वाढ होत असल्याचेही काही ठिकाणी दिसू लागले आहे. गोदापात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळत असलेल्या भागात ही समस्या गंभीर बनत असलेली दिसत आहे.

ड्रेनेजचे पाणी गोदापात्रात मिळू नये यासाठी खास ड्रेनेज लाईन तपोवनातील मलनिस्सारण केंद्रापर्यंत टाकण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणांपासून थेट गोदावरी पात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचे दिसते. सध्या गोदावरीला गंगापूर धरणातून पाणी सोडणे बंद असल्यामुळे गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह स्थिर झालेला आहे. या स्थिर पाण्यात शेवाळ वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या शेवाळाबरोबरच लहान अवस्थेतील पाणवेलीदेखील वाढण्यास सुरुवात झाल्याचे कन्नमवार पूल ते कपिला संगमापर्यंतच्या गोदापात्रात दिसत आहे. हे शेवाळ आणि पाणवेली आताच काढणे सोयी होणार आहे. जर ते लवकर काढण्यात आले नाही तर या पाणवेलींचा पसारा वाढून काढण्याचा खर्च वाढू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना यापुढे पालिका इतमामात मानवंदना!

$
0
0

कारभाऱ्यांचा अजब निर्णय; नव्या वादाला फुटले तोंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान नगरसेवकांना मरणोपरांत मानवंदना देण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. निधन पावलेल्या नगरसेवकांना पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने मानवंदना दिली जाणार आहे. खरे तर महापालिकेच्या कारभाऱ्यांनी आता आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अशी प्रथा इतरत्र कोठेही नसल्याने याबाबत योग्य विचारांती व नियमांच्या चौकटीत निर्णय व्हायला हवा, असा सूर ज्येष्ठांमध्ये व्यक्त होत आहे.

मनसेच्या नेत्या सुरेखा भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकप्रस्तावाच्या सभेत यासंदर्भात नगरसेवकांनी केलेल्या विविध मागण्यांची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी यापुढे विद्यमान नगरसेवकाचे निधन झाल्यास पालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी-जवान त्यांना मानवंदना देतील असा निर्णय जाहीर केला. नागरिकांची सेवा करताना निधन पावलेल्या लोकप्रतिनिधींना अंत्यसंस्कारावेळी पालिकेकडून मानवंदना द्यायला हवी, अशी मागणी अनेकांनी केली होती. पालिकेच्या वतीने महापौर अशाप्रसंगी पुष्पचक्र वाहतात, अशी परंपरा आहे. आजपर्यंत नगरसेवकांना मानवंदना देण्याचा असा प्रसंग कधी आलेला नाही. त्यामुळे याबाबत नियमांची चाचपणी करूनच निर्णय व्हावा, असा सूर व्यक्त होत आहे. विधानसभा अथवा विधान परिषद सदस्याचे निधन झाल्यास सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाऊन त्यावर सदस्य शोकभावना व्यक्त करतात व नंतर ठराव केला जातो. सदर ठराव संबंधितांच्या कुटुंबीयांकडे पाठविला जातो. संसद अधिवेशन सुरू असताना जर विद्यमान लोकसभा अथवा राज्यसभा सदस्याचे निधन झाले, तर त्यादिवशीचे कामकाज स्थगित केले जाते. माजी मंत्र्यांनाही मानवंदना देण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. पण त्यासाठी लिखित स्वरुपाची नियमावली आहे.

निर्णयावर चर्चा महत्त्वाची

भावनेच्या भरात घेतलेल्या या मानवंदनेच्या निर्णयालाही नंतर बंदुकीची सलामी, तोफाची सलामी अशा पर्यायांचे फाटे फुटले तर प्रशासनाच्यादृष्टीने ते अवघड जागचे दुखणे तर होईलच; शिवाय पुढे त्याला विविध अस्मितांची जोड मिळाली तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळेच असे समाजावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतांना त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी, त्याला नियमांची चौकट असावी असा सल्ला काही ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहस्यमय ‘एक शून्य तीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘एक शून्य तीन’ या नावापासूनच नाटकाचा चकवा सुरू होतो. कारण एक शून्य तीन हा आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा महिला आणि बालकांसाठीचा हेल्पलाइन नंबर. त्याचा आणि नाटकातल्या गोष्टीचा थेट कोणताही संबंध नाही. मात्र नाटक स्त्रियांच्या अत्याचारावर काही भाष्य करतं, बलात्कार आणि त्यानंतर खुनाची शिकार झालेल्या काही स्त्रियांच्या अनुषंगाने एका गायब झालेल्या तरुणीच्या शोधाची गोष्ट सांगतं किंवा या गायब तरुणीचा अनुषंग घेऊन हर्षदा या तरुणीच्या गायब होण्याच्या रहस्यापर्यंत पोचतं. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही खास महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २५ डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता प. सा. नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.

या नाटकातील तरुणीचा शोध अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा होतो, तो त्याच्या मांडणीमुळे आणि संपूर्ण घटनेला असलेल्या वेगळ्या बॅकड्रॉपमुळे. स्त्री अत्याचाराशी संबंधित या नाटकातले धागेदोरे विशिष्ट धर्मसूत्रांपर्यंत पोहोचतात आणि एका हिंसक प्रवृत्तीला धार्मिकतेचं पवित्र आवरण असण्याकडे निर्देश करतात. हेच खरंतर या नाटकाचं वेगळेपण आहे. कल्चर क्लब सदस्यांना एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. तसेच नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. तेव्हा आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजनाचा आस्वाद घ्या. या नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाईटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीलकंठेश्वर नगर ‘स्मार्टनगर’मध्ये

$
0
0

प्रभाग सभापतींकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर नगरचा समावेश स्मार्टनगर (मोहल्ला) म्हणून करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील महिन्यात केंद्र सरकारची टीम पाहणी करण्यास येणार आहे.

सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर नगरचा स्मार्टनगर या योजनेत समावेश करण्यात आला. त्यानंतर केंद्राकडून स्वच्छतेवर काम करणारी टीम नीलकंठेश्वर नगरची पाहणी करण्यासाठी येणार आहे. याकरीता सभापती माधुरी बोलकर यांनी स्मार्टनगरची नुकतीच पाहणी केली. तसेच ज्याठिकाणी त्यांना काही त्रुटी आढळल्या त्याठिकाणी दुरुस्तीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या योजनेत स्मार्टनगरातील रस्त्यांवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजीदेखील घेण्याबाबत सल्ला सभापती बोलकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, बांधकाम उप अभियंता संजय पाटील, पाणीपुरवठा उप अभियंता ए. व्ही. जाधव, उद्यानाचे जगदीश लोखंडे, महावितरणचे गायकवाड, आरोग्य विभागाचे संजय गांगुर्डे यांच्यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून मिळाला ‘आधार’

$
0
0

आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या खुलेआम मांडता याव्यात, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ‘मटा संवाद’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नागरिकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी भरभरून मांडल्या. त्या कशा प्रकारे सोडविता येतील, सोडविताना प्रशासनाला काय अडचणी येतात, त्यावर काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याविषयी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले. गंगापूर रोड येथील मविप‍्रच्या केबीटी इंजिनियरींग कॉलेजमध्ये ‘आधार हवाय’ या विषयावर ‘म. टा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, महापालिकेचे सहायक आयुक्त संतोष ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील डिस्ट्र‌िक्ट प्रोजेक्ट मॅनेजर चेतन सोनजे आदी उपस्थ‌ित होते. आधार बाबतच्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

नागरिकांच्या प्रश्नांना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी उत्तरे दिली..

एका अशिक्षित विधवा महिलेकडे मतदान कार्ड, रहिवाशी दाखला आहे. मात्र, जन्मदाखला नाही. यामुळे आधारकार्ड मिळत नाही. यावेळी तिने काय करावे? - शहाणे, नागरिक

- मतदान कार्ड व आमदार किंवा खासदारांनी दिलेला रहिवाशी दाखला आधार कार्डसाठी ग्राह्य कागदपत्रे आहेत. यामुळे आधार कार्ड मिळणे शक्य आहे. मात्र, तरीही आधार कार्ड काढून देण्यास नकार मिळत असेल तर संबंधित केद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्या. पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सात वेळा आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्याप आधार कार्ड मिळाले नाही. यावर उपाय काय? – संतोष गवांदे, प्रकाश जाधव, नागरिक

- एकदा आधार कार्ड नोंदणी केल्यास तुमचा आधार कार्ड क्रमांक तयार होतो. काही तांत्रिक कारणास्तव आधार कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. एकदा नोंदणी केल्यावर पुन्हा-पुन्हा नोंदणी करणे टाळावे. असे केल्यास तुमचे आधार कार्ड कायमचे ब्लॉक होऊ शकते. नोंदणी करुनही आधार कार्ड मिळाले नाही, तर त्याची रीस‌िट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. आताचे स्टेटस तपासून कार्यवाही करता येते.

आधारकार्डच्या अपडेटचे काम ६० ते ७० टक्के बाकी आहे. ज्येष्ठ नागरिकांची फिंगर प्रिंट येत नाही. त्यासाठी काय करावे?.......दीपाली कुलकर्णी (नगरसेविका)

- खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. अधिकृत ६० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. फिंगर प्रिंटच्या संदर्भातील तक्रारी खूप आहेत. त्यावर केंद्र पातळीवर काम सुरू असून लवकरच उपाययोजना केल्या जातील. सुप्रीम कोर्ट आणि यूडीएआय यांच्याकडे आधार केंद्रांची अनुमती देण्याचे अधिकार आहेत. त्यांनी सर्वत्र खासगी आधार केंद्रांची सुविधा बंद केली आहे. यामुळे व्यक्तिगतरित्या आधार केंद्र सुरू करता येणार नाही. पण लवकरच प्रत्येक प्रभागात एक दिवस अशी आधार केंद्रांची सुविधा देऊ.

आधार कार्डांवरील फोटो अतिशय अस्पष्ट आहेत. यामुळे अनेकदा त्याची झेरॉक्स काढल्यास ती प्रत बँक किंवा इतर कार्यालये ग्राह्य धरत नाहीत. यामुळे फोटो अपडेटेशन करण्याची सुविधा सुरू करता येईल का? - अॅड. चिन्मय गाढे

- आधार कार्ड क्रमांक आणि तुमचे नाव ही मुख्य माहिती आहे. आधार कार्डावरील फोटो अस्पष्ट असल्यामुळे ते ग्राह्य न धरणे गैर आहे. कारण, आधारमध्ये फोटो बदलण्याची सुविधा नाही. ज्या ठिकाणी फोटो अस्पष्टचे कारण देत आधार नाकारले जाईल, त्या कार्यालयाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्या. गरज भासल्यास तेथील वेब कॅमेरेही बदलण्यात येतील.

शहरात आधार केंद्र कमी आहेत. वृद्धांना तेथे जाणे शक्य होत नाही. अशा नागरिकांसाठी मूव्हिंग आधार मश‌िन्स केव्हा सुरू होतील? - स्वाती भामरे, नगरसेविका

- मूव्हिंग आधार मशिन्स सुरू आहेत. एका दिवसात फारतर चार-पाच नागरिकांचे आधार कार्ड त्यांच्या घरी जाऊन काढण्याची सुविधा त्याद्वारे उपलब्ध होते. आमच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधल्यास दखल घेतली जाईल. परंतु, जे लोक वृद्धापकाळ किंवा तत्सम कारणामुळे सेंटरपर्यंत येऊच शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे.

नीट, जेईई तसेच बोर्डाच्या परिक्षा अर्जात आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. मात्र, आधार कार्डावरील नाव हे संबंधित परीक्षेच्या फॉरमॅटमध्ये नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत ना? – टी. पी. देवी, नागरिक

- परीक्षा अर्जासोबत आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून जोडणे अनिवार्य आहे. जर आधार कार्डावरील नाव चुकीचे असेल, तर ते अपडेट करून घ्या. प्रथम नाव, वडिलांचे नाव व आडनाव हा आधार कार्डाचा फॉरमॅट आहे. यामुळे योग्य नाव असल्यास परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

माझा मुलगा विदेशात आहे. त्याच्याकडे आधार कार्ड नाही. माझे आणि मुलाचे जॉइंट बँक अकाउंट आहे. माझे आधार बँकेत दिले आहे. पण मुलाचे आधार नसल्याने माझे बँकेतील व्यवहार होत नाहीत. काय करावे? – सुनील चाटी, नागरिक

- तुमच्या मुलाचे आधार कार्ड बँकेत लिंक करावेच लागेल. मुलाचे आधार काढण्यासाठी त्यांना भारतात बोलावून सदरची प्रक्रिया पूर्ण करवून घ्या. मुलाचे आधार लिंक न केल्यास बँकेचे व्यवहार नंतर ठप्प होऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्डवर जन्मतारीख नाही, ती कशी टाकता येईल? - शहाणे.

- ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रावर येऊ शकत असतील तर त्यांना त्यांच्या जन्म तारखेची नोंद करून घेता येऊ शकेल. त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सोबत ठेवावा. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मूव्हेबल नोंदणीची व्यवस्था आहे.

आधार कार्डवरील पत्ता बदलायचा असेल तर बँकेत अपडेट करून मिळतो का? - प्रा. टी. बी. सांळुके

- काही बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात येस बँक, कोटक महिंद्रा, डीसीपी बँक, अॅक्सिस बँक आदी ठिकाणी अपडेट करताना बँकेजवळचे आधार केंद्र लोकेट होते.

बँकांच्या कामकाजासाठी ज्या विवाहीत महिलांचे आधार कार्डवर माहेरचे नाव लागले आहे, त्यांना अडचणी येतात, त्यांनी काय करावे?- रमेश कडलग

- विवाहीत महिलांचे आधार कार्ड माहेरच्या नावाने असण्याची शक्यता असते. त्यांना बँकांच्या व्यवहारासाठी नाव बदलण्याचा साध्या कागदावर अर्ज करता येतो.

दहावीच्या गुणपत्रिका आणि आधारकार्ड यांच्या नावाच्या सिक्वेन्समध्ये बदल असल्याने जेईई, नीट यांसारख्या परीक्षांचे फॉर्म भरताना अडचणी येत असल्यास काय करावे?

- या बाबी आज कंपल्सरी नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षेला काही अडचणी येणार नाहीत. या परीक्षेसाठी अर्ज भरता येतो.

लहानपणी आधारकार्ड काढले असेल, तर ते १८ वर्षांनंतर अपडेट करण्याची गरज आहे का?

- १८ वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करता येऊ शकते. करायलाच हवे, अशी तूर्तास सक्ती नाही.

आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक कसा करायचा?- प्रदीप पाटणकर

- घरबसल्या मोबाइल आधारला लिंक करता येईल. त्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत.

आधार कार्ड काढताना दिलेला मोबाइल नंबरच आधारशी लिंक होतो का?- वृषाली मते

- आधार कार्ड काढताना दिलेल्या मोबाइल नंबर व्यतिरिक्त दुसरा नंबर लिंक करता येतो. सध्या एकापेक्षा जास्त आधारला एकच मोबाइल नंबर लिंक होत असला तरी भविष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आधारला स्वतःच्या नावेच स‌िम असलेला मोबाइल नंबरच लिंक करावा. सीमकार्ड स्वतःच्या नावावर सहज करून घेता येऊ शकते. त्यासाठी आधारची सक्ती नाही.

रविवारी सुटीच्या दिवशी आधार केंद्र सुरू राहील का?- जयश्री कुलकर्णी

- रविवारी सुटीच्या दिवशीही आधारकेंद्र सुरू ठेऊ. तसेच ज्यांना आधार केंद्रावर जाणे शक्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मूव्हेबल क‌िटद्वारे आधार कार्ड काढून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मटाच्या या उपक्रमामुळे आमच्या आधार कार्डविषयीच्या समस्यांवर तोडगा मिळाला. त्यामुळे मटाचे आभार. आधार कार्ड अपडेशनअभावी अनेकांची पेन्शन अडकून पडली आहे. त्रस्त नागरिकांचा सरकारने विचार करावा.

- समाधान पाटील

माझा मुलगा विदेशात राहातो. त्याचे आधार कार्ड नसल्याने बँकेत व्यवहार करताना अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी मंगरुळे यांनी मला त्यावर पर्याय काढून दिला. त्यामुळे माझी समस्या सुटेल असा विश्वास वाटतो.

- सुनील चाटी

या उपक्रमामुळे प्रत्येकाकाला आधारबाबतच्या समस्या सर्वांसमोर मांडता आल्या. त्या समस्यांवर अधिकाऱ्यांकडून अचूक मार्गदर्शनही मिळाले. धन्यवाद.

- रामचंद्र निजामपूरकर

‘मटा संवाद’ सारख्या उपक्रमामुळे नागरिकांच्या आधार कार्ड विषयक समस्या दूर होत आहेत. लोकांच्या मनात आधारबाबत अनेक प्रश्न असून आधारसक्तीबद्दल भीतीही आहे. या उपक्रमामुळे शंकांचे समाधानकारक निरसन होण्यास मदत होईल. नगरसेवकांची मदत घेऊन आणखी काही सेंटर्स सुरू करायला हवीत, अशी अपेक्षा आहे.

- दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

पाल्यांच्या आधारकार्डबद्दल आम्हाला मोठे टेन्शन होते. याचे पूर्णपणे समाधान ‘मटा संवाद’मध्ये झाले. आधारविषयक जनजागृतीची गरज असून, असे उपक्रम राबवायला हवेत.

- डॉ. सुनीता संकलेचा

हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. आधार नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. याबाबत अधिक माहिती मिळणे महत्त्वाचे होते, जे ‘मटा संवाद’सारख्या उपक्रमातून साध्य झाले. नागरिकांच्या समस्यांचे निरसन होण्यासाठी असे उपक्रम व्हायला हवेत.

- स्वाती भामरे, नगरसेविका

मला हा उपक्रम खूप छान वाटला. शंकांचे समाधान थेट अधिकाऱ्यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळाले.

- निवृत्ती जाधव

कार्यक्रम खरंच चांगला आणि आवश्यक होता. आधारविषयक समस्यांचे निरसन झाले. विशेषतः सीनियर स‌िट‌िझनला योग्य सल्ला मिळाला.

- रमेश चव्हाण


बँक खाते आणि आधार कार्डविषयक समस्या होती, ज्याचे समाधान झाले. उपक्रम अतिशय उपयुक्त आहे आणि यासाठी ‘मटा’चे विशेष आभार. आम्हाला मिळालेली माहिती इतरांपर्यंत पोहचवू.

- काशिनाथ पवार

शहरात २१ सेंटर्स सुरू

शहरात ६० सेंटर्सची मागणी केली आहे. त्यापैकी २१ सेंटर्स सुरू आहेत. लवकरच येस बँकेच्या माध्यमातून १० सेंटर्स सुरू होतील. उर्वरित सेंटर्ससाठी आम्ही परवानगीची वाट पाहात आहोत. बहुतांश तक्रारी आधार अपडेशनबाबतच्या असल्यामुळे केवळ याच कामासाठी आम्ही स्वतंत्र सेंटर्स सुरू करू. तेथे नवीन एनरोलमेंट होणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार रविवारीदेखील सकाळी १० ते सायंकाळी सहा यावेळेत आधार सेंटर्स सुरू ठेवण्यात येतील. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधार सेंटर्सपर्यंत येणेच शक्य नाही अशा नागरिकांच्या घरी किट पाठवून अपडेशन करून देण्यात येईल. अनेकदा आधार कार्ड काढूनही ते रिजेक्ट होत असेल, तर अशा नागरिकांच्या आधार कार्डचे स्टेटस तपासून डेटा रिट्राइव्ह करून द्यावा लागणार आहे. त्यासाठी तक्रारदारांनी गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील चारपैकी एक कीट फक्त ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

आधार सेंटर - मोबाइल नंबर- पत्ता

रवींद्र खैरे- ९९२२४४०१९९-जिल्हाधिकारी कार्यालय

रवींद्र गायकवाड- ८२३७७८८००२- जिल्हाधिकारी कार्यालय

रवींद्र विशे - ९५०३५६६०१४- जिल्हाधिकारी कार्यालय

योग‌िता वाघचौरे - ८४४६०२७८०६- मनपा शाळा क्र. ९९, शिवाजीनगर, सातपूर

महेश जगताप - ७७९८६३०४८२ - सेतू कार्यालय, विभागीय आयुक्त, नाशिकरोड

जीवन बर्वे- ९९२२४६८१६४- मखमलाबाद सर्कल कार्यालय

जीवन बर्वे - ९९२२४६८१६४- मनपा शाळा शॉपिंग सेंटर, आनंदवली

कमलेश सोनवणे - ८९८३०९९९०८- मनपा शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर

अशोक माळी- ७०२०५२७८३६- मनपा शाळा १५७९, चेहेडी

वैभव सूर्यवंशी - ७५८८५५८६६९- मनपा शाळा क्र. ३४, नांदूर, पंचवटी

अनिल आठवले - ७७९८५८९६८०- मनपा शाळा क्र. १०७, तोरणानगर, सिडको

राधाकिसन शिंदे - ९८२३९५८६७४- माडसांगवी सर्कल, ऑफिस

मीनाक्षी जोर्वेकर - ९३७३३५९८८८- मनपा शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर

रवी जाधव - ८००७८५३०५४- मनपा कार्यालय, राजीव गांधी भवन

सागर बेदरकर- ९५०३६५००७२- फिरते किट, (वृद्ध व विशेष मुलांसाठी)

माधुरी जाचक - ९७६५५०१३११- अजय मित्र मंडळ हॉल, रथचक्र चौक, इंदिरानगर

नारायण जाचक- ८७९६११८०२३- गीतांजली हॉल, गंगापूर रोड

अशी करा घरबसल्या दुरुस्ती..

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक यांसारख्या दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्या घरबसल्यादेखील करता येऊ शकतात. त्यासाठी युन‌िक आयडेंट‌िफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकावा. तेथे अनेक पर्याय दिसतात. त्यापैकी हव्या त्या पर्यायावर जाऊन दुरुस्ती करवून घेता येते. या वेबसाइटवर रिक्वेस्ट टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर वन टाइम पासवर्ड पाठविला जातो. तो वापरून दुरुस्त्या करता येतात. या वेबसाइटवरून आधारचे स्टेटस तपासता येते. तसेच डिज‌िटल फॉरमॅटमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करता येते. याच वेबसाइटवर रिक्वेस्ट टाकून पत्ताही बदलता येतो. असे बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी या वेबसाइटवर दिली आहे. ही ओरिज‌िनल डॉक्युमेंटस स्कॅन करून ते अपलोड करता येतात.

- चेतन सोनजे, डिस्ट्र‌िक्ट प्रोजेक्ट मॅनेजर

दुरुस्तीसाठी कागदपत्रे (यापैकी आवश्यक ती अपलोड करावीत)

- सरकारी फोटो ओळखपत्र

- सर्व्ह‌िस फोटो ओळखपत्र

- इलेक्ट्र‌िसिटी ब‌िल

- टेलिफोन लँडलाइन ब‌िल

- प्रॉपर्टी टॅक्स रिसिट

- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

- इन्शुरन्स पॉलिसी

- नरेगा जॉब कार्ड

- एआरएमएस परवाना

- पेन्शनर कार्ड

- स्वातंत्र्य सैनिक कार्ड

- किसान पासबुक

- सीजीएचएस / इसीएचएस कार्ड

- इन्कम टॅक्स अॅसेसमेंट ऑर्डर

- व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्ट‌िफिकेट

- पासपोर्ट

(संकलन : रामनाथ माळोदे, सौरभ बेंडाळे, अक्षय शिनकर, योगेंद्र देवरे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला पोलिसाचा भाऊच निघाला चेनचोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. जयभवानीरोडला एक महिलेने मंगळसूत्र चोराच्या स्कूटीला जिद्दीने पकडले. चोर गाडी सोडून पळून गेला. मात्र, महिलेने त्वरित उपनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर चोराला पकडण्यात यश आले. संशयित हा उपनगर पोलिस ठाण्यामधील महिला कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तीनच दिवसांपूर्वी नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर ट्रकचालक प्रकरणी त्र्यंबकेश्वर येथील बीडीओच्या मुलाला अटक करण्यात आली होती. उपनगर पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी - २० डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास जयभवानीरोडवरील तुळजा भवानी मंदिराच्या कडेला फिर्यादी इंदरानी धनजंयकुमार सिंग (४२, आनंदनगर, कदम लॉन्सजवळ, उपनगर) या चालल्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या प्लेजर स्कूटीवरील व्यक्तीने त्यांची सव्वादोन तोळ्याची चेन ओढून पलायनाचा प्रयत्न केला. सिंग यांनी स्कूटी पकडून ठेवली. चोरट्याने त्यांना फरपटत नेले असतानाही सिंग यांनी गाडी सोडली नाही. आरोपीही खाली पडला. त्याने गाडी तेथेच सोडून पोबारा केला. सिंग यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी गस्तीवरील पोलिसांनी कळवले. उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिंग यांच्याकडे विचारपूस केली. स्कूटीच्या नंबरवरुन माहिती घेऊन पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. चेन स्नचिंग करणारा संशयित संजय रघुनाथ म्हसदे (३७, जयभवानीरोड, नाशिकरोड) याला ताब्यात घेतले व महिलेचे मंगळसूत्र हस्तगत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक मृत्यूप्रकरणी सारवासारव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात झालेल्या नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारसारव सुरू केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर, तसेच कर्मचाऱ्यांनाच वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या प्राथमिक चौकशी अहवालात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अर्भकाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवणे क्रमप्राप्त होते, असा दावा करण्यात आला आहे. महापौर रंजना भानसी यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दोषी असतील तर चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात मंगळवारी घडली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा आरोप प्रसूत महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त कृष्णा यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. भंडारी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या खुलाशावरून रुग्णालय दोषीच नसल्याचे भासवले जात आहे. सदर नवजात बालकाने गर्भातच शौच केल्यानंतर ती नाकातोंडावाटे फुफ्फुसात गेल्याने श्वास गुदमरला होता. प्रसुतीनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवजात अर्भकावर प्राथमिक उपचार केले. परंतु, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जन्मल्यानंतर बाळ रडलेही नव्हते. त्यामुळे पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविणे क्रमप्राप्त बनले होते. शताब्दी रुग्णालयात उपचार करताना नवजात बालकाचा मृत्यू झाला, असा दावा केला. आयुक्तांनीही या प्राथमिक चौकशीच्या आधारे रुग्णालयाची चूक नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात घडलेल्या नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्या वर्तनासंदर्भातील तक्रारींचीही गंभीर दखल आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय आणि सुरक्षारकांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आचारसंहिताच तयार करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. यासंदर्भातील निर्देश आयुक्तांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा आरोप प्रसूत महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. नर्स तक्रारीची दखल घेण्याऐवजी मोबाइल खेळत होत्या, अशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. मायको रुग्णालयाबाहेर रिक्षातच महीलेची प्रसूती होत असताना, सुरक्षारक्षक पतंग उडवत होते. तसेच रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयातून गायब असतात. या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका आयुक्त कृष्णा यांनी घेतली आहे. पालिकेची सर्व रुग्णालये, प्रसुतीगृहे, शहरी आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेले सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील रुग्णांनी पेशंटसह त्यांच्या नातेवाईकांसोबतचे वर्तन कसे ठेवावे, त्यांच्याशी नेमके कोणी बोलावे, नम्रपणा आदिंबाबत नियम ठरवले जाणार आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयांतील वाद काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.
महापौरांकडून चौकशीची मागणी

या घटनेची गंभीर दखल सत्ताधाऱ्यांनीही घेतली आहे. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू ओढावल्याची घटना दुदैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली.

अतिरिक्त आयुक्तांकडे चौकशी

प्राथमिक चौकशी अहवालानंतरही महापौरांनी सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर आयुक्त कृष्णा यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदर चौकशी अहवालात पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दोषी असतील तर चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

म्हणून खासगीचा पर्याय

खासगी रुग्णलयासंदर्भातही आयुक्तांनी वैद्यकीय विभागाची पाठराखण केली आहे. नवजात अर्भकाला मनपाचे बिटको रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिका आवश्यक होती. तशी रुग्णवाहिका मनपा अथवा जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नव्हती. तसेच प्रसूत महिलेचे कुटुंब बीपीएल रेशनकार्ड धारक आहे. त्यामुळे बालकावर राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार करता येणे शक्य होते. त्यामुळे संबंधित नातेवाईकांशी चर्चा करूनच एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिकाही या रुग्णालयाकडे असल्याने नवजात बालकाला शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटलमुळे होणार दप्तराचे ओझे कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचविण्याबरोबरच त्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा त्रासही कमी करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासप्रणालीची निर्मिती करण्यात आली असून इयत्ता आठवी ते दहावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना यावरून सर्व विषयांचा अभ्यास सहजपणे करता येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली.

रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी शिवसेनेच्या ‘टॉप स्कोअरर’ या ई-लर्निंग सॉफ्टवेअरचा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी डिजिटल शिक्षण पद्धती अवलंबण्यामागील उद्देश सांगितला. टॉप स्कोअररच्या माध्यमातून विद्यार्थी कधीही, कोणत्याही वेळी फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर यावर अभ्यास करू शकतात. यामुळे शिकवणीसाठी अतिरिक्त वेळही विद्यार्थ्यांना खर्च करावा लागणार नाही. हा वेळ विद्यार्थ्यांनी क्रीडागुणांना वाव देण्यासाठी उपयोगात आणावा, तसेच परीक्षेत मिळणारे मार्क्स म्हणजेच सर्व काही नसून अभ्यासातून काय शिकतो आणि त्याचा कसा उपयोग करतो हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामावून घेत त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासाच्या सॉफ्टवेअरसाठी प्रोमो कार्डचे वाटप केले.

व्हर्च्युअल क्लासरुमचे उद््घाटन

नाशिक महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये खासदार निधीतून डिजिटल क्लासरुम बनविण्यात आल्या आहेत. पोलिस वसाहतीतील मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये या व्हर्च्युअल क्लासरुम स्टुडिओचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिवसेनेने तयार केलेल्या आधुनिक वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यास करणे शक्य झाल्यानंतर नाशिकमधील शाळांमध्ये हा प्रयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर व्हर्च्युअल क्लासरूम असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड फोटो गॅलरीचे उद््घाटनदेखील त्यांनी केले. याठिकाणी ठाकरे बोलतील असे अपेक्षित असल्याने स्टेजची बांधणी, सजावट करण्यात आली होती. परंतु, त्यांनी स्टेजकडे पाठ फिरवत थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसणेच पसंत केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवकर सुधाकर बडगुजर यांची उपस्थिती होती.

सेल्फीची क्रेझ

रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी व कार्यकर्ते यांमुळे सभागृहात प्रचंड दाटीवाटी झाली होती. अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सेल्फीसाठी ठाकरे यांच्याभोवती मोठा गराडा घातला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार टी. राजा सिंह सोमवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रखर हिंदूत्ववादी म्हणून ओळख असलेले हैदराबादचे आमदार टी. राजा सिंह हे सोमवारी (दि. २५) धुळ्यात येणार आहेत. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदू धर्मजागृती सभेला ते प्रमुख वक्ते असून, याठिकाणी जनसमुदायाला ते संबोधित करणार आहेत.

शहरातील मालेगाव रोडलगत गिंदोडिया शाळेजवळ ही सभा सोमवारी (दि. २५) सायंकाळी होणार आहे. या वेळी सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर आणि महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.

हैदराबादमध्ये रामनवमीला शोभायात्रा काढून संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेणारे आमदार राजा सिंह हे त्यांच्या तिखट शैलीसाठी परिचित आहेत. जहाल भाषण करणारे राजा सिंह यांना ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य हिंदू बांधव सभेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे. या सभेबाबत जनजागृती व्हावी यासाठी हिंदू जनजागृती समितीने ग्रामसभा, कोपरासभा, घरोघरी प्रसार, बैठका, होर्डिंग्ज, भित्तिपत्रक, हस्तपत्रके याद्वारे जनजागृती केली आहे.

तसेच शनिवारी (दि. २३) शहरातील प्रमुख मार्गावर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हागणदारीमुक्ती’चे वाभाडे!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी करण्यासाठी मोठा गाजावाजा झालेला असला तरी शहर केवळ फोटोग्राफीपुरता हागणदारीमुक्त झाले आहे. नवीन शौचालय अद्याप वापरण्यासाठी पालिकेने खुले केलेले नाही. त्यामुळे नागरिकांची कुचंबना होत असून, शहर हागणदारीमुक्त म्हणजे प्रशासनाचे ढोंग आहे, असा घणाघाती आरोप येथील महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती भोसले यांनी केला.

येथील पालिकेच्या जुन्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत बुधवारी महासभा झाली. उपमहापौर सखाराम घोडके यांनी शहरात बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनास धारेवर धरले. भीमा भडांगे यांनी मोची कॉर्नर परिसरातील सर्वजनिक शौचालय नागरिकांसाठी कधी खुले करणार? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेविका ज्योती भोसले यांनी थेट शहर हागणदारीमुक्त अभियान म्हणजे ढोंग असल्याची टीका केली. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ‘ते’ सार्वजनिक शौचालय तत्काळ सुरू करण्यात यावेत, असे आदेश दिले. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी जाधव यांनी संबंधित शौचालय स्वच्छता विभागाकडे हस्तांतरित केल्याचे उत्तर दिले. स्वच्छता विभागाचे सोनवणे यांनी ते हस्तांतरित झाले नसल्याचे उत्तर दिल्याने महापौर भडकले.

वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा

वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेला कचरा संकलन ठेका रद्द का करण्यात येवू नये असा प्रश्न डॉ खालिद परवेज यांनी उपस्थित केला. कंपनीकडून कामगारांना किमान वेतन देण्यात येते आहे की नाही याविषयी प्रशासनाने विचारणा करावी अशी सूचना महापौर शेख यांनी केली.

एमआयएमचा सभात्याग

महासभेदरम्यान प्रशाकीय अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देता येत नसल्याने नगरसेवकांनी जनतेस काय उत्तर द्यायचे? असा संतप्त सवाल एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी केला. अधिकारी जबाबदारी घेत नसून, सभागृहात अपूर्ण माहितीच्या आधारे बेजबादार उत्तरे देत आहेत. अशा महासभेस काहीही अर्थ नसल्याचे म्हणत त्यांच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड रेल्वेस्थानक झाले वायफाय

$
0
0


संदीप देशपांडे, मनमाड

नाशिकरोड ते भुसावळ रेल्वे स्थानकांदरम्यानची महत्त्वाची रेल्वे स्थानके वायफाय करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्या अंतर्गत मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात देखील वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनमाड रेल्वेस्थानकातील वायफाय सुरू करण्यात आले असल्याची गुड न्यूज रेल्वे मंडल प्रबंधक आर. के. यादव यांनी पाहणी दौऱ्यात दिली. यामुळे प्रवासी वर्गात विशेषतः तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मनमाड रेल्वे स्थानकाची जंक्शन स्थानक म्हणून देशभरात ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मनमाडमार्गे रेल्वे उपलब्ध असते. याशिवाय अलीकडे धावत्या रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांमुळेही मनमाडची ओळख विविध राज्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनमाड रेल्वे स्थानकाचे नाव चांगल्या अर्थी गाजेल अशा सोयी सुविधा मनमाड स्थानकात देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत आहे.

मनमाड स्थानकात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आर. के. यादव यांनी मंगळवारी मनमाड येथे दिली. या सुविधेकरिता ३२ हॉट स्पॉट केंद्रे निर्मित करण्यात आली असून, मनमाड स्थानकातील वायफाय प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पादचारी पुलाचे काम जोरात

नवा पादचारी पूल सहा महिन्यांत पूर्णत्त्वास येणार असल्याचे संकेत आर. के. यादव यांनी दिले. सध्या पुलाचे काम जोरात सुरू असून, लोखंडी गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सहा महिन्यांत पूल तयार होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

लिफ्ट महिनाभरात

मनमाड स्थानक आधुनिक करताना प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविण्यात येत असून, या लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या महिन्यात लिफ्ट सुविधा सुरू होईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.


मनमाड स्थानकात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ही चांगली बाब आहे. प्रवाशांना त्याचा निश्चितच लाभ होईल. मात्र सुविधांबरोबरच रेल्वे वेळेवर धावतील याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे.

- प्रसाद पंचवाघ, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांगीण अभ्यासातून जातीअंताचा मार्ग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आपल्या ग्रंथांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्थेचा वेध घेऊन विश्लेषण केले. तीव्यवस्थेसारख्या कळीच्या सामाजिक प्रश्नाला हात घालण्याचे श्रेय निःसंशय त्यांचेच आहे. भारतीय समाजशास्त्र आणि भारतीय मानववंशशास्त्र समजून घेण्यासाठी येथील जातीव्यवस्थेचा सर्वांगीण व सखोल अभ्यास गरजेचा आहे. त्याशिवाय आपणास जातीअंताचा मार्ग मिळणार नाही, असे मत लेखक राहुल कोसंबी यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जातीसिद्धांत आणि समकालीन जातीव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते.

कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीव्यवस्थेविषयीचे आकलन अभ्यास तत्कालीन नेत्यांपेक्षा अधिक होता. असे असले तरी सध्याची जातीव्यवस्था समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीसिद्धांत उपयोगी पडत नाही. कारण समकालीन जातीव्यवस्था आता संवैधानिक बनली आहे. तर प्रत्येक सामाजिक अभ्यासाच्या मांडणीमागे राजकीय हेतू असतो. तसा तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीसिद्धांतांतही दिसून येतो. जात ही व्यवस्था म्हणून काम करते हे सांगणारे डॉ. बाबासाहेब हे पहिलेच होते. तथापि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत जातीव्यवस्थेचा विचार केल्यामुळे त्यात त्रुटीही दिसून येतात. देशातील सध्याच्या जातिव्यवस्थेवर कोसंबी म्हणाले, भारतातील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जातीव्यवस्था दिसून येते. व्यवसायावर आधारित अस्पृश्यतेच्या कल्पनेतही प्रदेशाप्रमाणे भिन्नता आहे. ईशान्य भारतात अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था नाही कारण तेथे आदिवासी संस्कृती आहे. जातीव्यवस्था अनेक आहेत. त्यामुळे जाती अंतासाठी जातीव्यवस्थेचा सर्वांगीण व सखोल अभ्यास गरजेचा असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. व्याख्यानानंतर कोसंबी यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

आजचे व्याख्यान

२१ डिसेंबर

विषय : विधिमंडळातील अनुभव

वक्ते : साहित्यिक लेखक सुरेशकुमार वैराळकर, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक कचऱ्याचा वेढा

$
0
0

डाव्या कालव्याचे पाणी शेतात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मनपाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणातून डाव्या कालव्याला सध्या पाण्याचे हिवाळी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या आवर्तनाच्या अगोदर कोरड्या असलेल्या या कालव्याचा वापर कचरा कुंडीप्रमाणे केला जात असल्यामुळे पाणी सोडताच या कालव्यातून पाण्याबरोबर कचराही वाहून शेतात पोहचू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या आता पाण्याद्वारे थेट शेतापर्यंत पोहचू लागली आहे. तरी प्रशासनाने ही समस्या सोडवून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी, अशी मागणी होत आहे.

काही ठिकाणी असलेल्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी कालव्याचे काम सुरू असताना हा प्रवाह खालच्या बाजूने खड्डे खोदून त्यावर सिमेंटचे बांधकाम करून करण्यात आले आहे. खाली कालवा आणि नैसर्गिक नाला अशी रचना असल्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहाला काही अडचणी येत नाहीत. अशा ठिकाणी हा पाण्यावर तरंगणारा कचरा मोठ्या प्रमाणात अडकलेला दिसत आहे. या कचऱ्यामुळे कालव्याच्या पाण्यालाही अडथळा निर्माण होऊन कालवा फुटण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

नदीचे प्रदूषण बनली गंभीर समस्या

कचरा टाकल्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कालव्यात तळाशी टाकलेला कचरा वाहून शेतात जात आहे आणि कडेला असलेला कचरा तसाच साचून राहिलेला पाणी वाढल्यावर हा कचरादेखील वाहून शेतात जाण्याची शक्यता आहे. कालव्याचे पाणी चाऱ्यांतून थेट शेतात जात असते. त्या पाण्यात हा कचरा वाहून जातो, तो थेट शेतात जाऊ लागला आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडकून पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे येऊन पाणी वेगळ्या दिशेनेही वाहून जाण्याचे प्रकार या कचऱ्यामुळे होऊ लागले आहे.

नदीच्या पाण्यात कचरा टाकल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कालव्याच्या पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. मात्र, याकडे पाहिजे तसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या डाव्या कालव्याच्या लगत रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांतून सहजपणे कचरा कालव्यात फेकून देण्याचे प्रकार घडत असल्यामुळे ही समस्या गंभीर बनत चालली आहे.

शेतीला पाणी पुरविणाऱ्या कालव्याचा वापर आता कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे नाल्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात. कालव्याला पाणी येताच हा कचरा वाहत जाऊन तो शेतात पोहचू लागला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे.

-गणपत जाधव, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या जाचाविरोधात रिक्षा-टॅक्‍सीचालकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनधारकांना पोलिसांकडून टार्गेट केले जात असल्याच्या निषेधार्थ रिक्षा - टॅक्सी कृती समितीतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली. वाहन तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची अडवणूक करून त्यांचा मानसिक, आर्थिक छळ केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

निदर्शनांनंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खासगीत पोलिस सांगतात की, आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करण्यास सांगितले आहे. या टार्गेटमुळे अनेकांना नाहक त्रास आणि भुर्दंड सहन करावा लागतो. पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक होत असून, सर्वसामान्य वाहनधारकाला अर्वाच्च्य भाषेत शिव्या देणे, सक्तीने बेकायदेशीर दंडाची वसुली करण्यामुळे पोलिस कर्मचारी शहरातील नागरिकांच्या रोषास बळी पडत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

..ती वाहने सोडा

शहरातील ६८६ रिक्षाधारकांना आरटीओने सायबर क्राइमच्या माध्यमातून खोट्या नोटिसा पाठवून वाहने अडकवून ठेवली आहेत. त्या वाहनांना तात्काळ सोडवण्यात यावे, रिक्षा व टॅक्सीधारकांना पॅसेंजर वाहतूक करणाऱ्या ६/१९२ या कलमाचा नियम लागू होत नसतानाही रिक्षा-टॅक्सी धारकांवर खोट्या केसेस दाखल करून दंडवसुली केली जात आहे. शहरात ‘अधिकृत रिक्षा व टॅक्सी थांबा’, ‘नो पार्किग झोन’ फलक लावावेत अशी मागणी भद्रकाली रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर सैय्यद, शिवाजी भोर, राजू देसले, शशी उन्हवणे यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा प्रारंभानिमित्त सचिवांचा ‘दर्शन’ दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कनची विमानसेवा लांबली असली, तरी या सेवेच्या प्रारंभ सोहळ्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यानिमित्त ते त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी येथे दर्शनाचाही दौरा करणार आहेत. नाशिककरांच्या सेवेत विमानसेवा त्वरित रुजू व्हावी यासाठीच त्यांचा हा दौरा आहे का, असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

एअर डेक्कन या कंपनीच्या विमानसेवेचा येत्या शनिवारी प्रारंभ होत आहे. त्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक आणि पुणे या दोन शहरांसाठीच्या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. याप्रसंगी नाशिकमधील खासदार, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे येणार आहेत. शुक्रवारी रात्री ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. शनिवारी सकाळीच ते त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळच्या प्रारंभ सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. तो आटोपल्यानंतर ते शिर्डीकडे साईबाबांच्या मार्गदर्शनासाठी रवाना होणार आहेत.

--

घाईबाबत प्रश्नचिन्ह

एकीकडे नाशिककरांना विमानसेवा हुलकावणी देत असताना सरकारी अधिकारी मात्र प्रारंभाच्या निमित्ताने सरकारी दौऱ्यातच देवदर्शनही करीत असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तांत्रिक कारणाने सेवा महिनाअखेरीस मिळणार आहे. मग, कंपनीने तिकीट बुकिंगची आणि घोषणेची घाई का केली, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.

--

गेल्या अनेक वर्षांपासून माझे स्वप्न आहे, की पुण्याहून नाशिकला विमानाने यावे. म्हणूनच येत्या ३० डिसेंबर रोजी सायंकाळचे पुणे ते नाशिक हे तिकीट मी बुक केले आहे. मात्र, सेवा मिळणार आहे की नाही, ते एअर डेक्कनने स्पष्ट करावे म्हणजे मला नियोजन करता येईल.

-योगेश गायधनी, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा बंदचा उर्दूला फटका

$
0
0

नाशिक : राज्य सरकारने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३१४ शाळांना कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम उर्दू माध्यमांच्या शाळांवर झाला आहे. राज्यभरातील एकूण १७५ शाळांमध्ये जिल्ह्यातील चार शाळांचा समावेश आहे. या चारही शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील शाळांत स्थलांतरित करण्यात आले आहे.

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील ३१ शाळांचा यात समावेश असून, यात चार शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये दहा, अन्य दोन शाळांमध्ये त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा येणार असल्याने शाळा सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाकडून केली जात आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार असून, हा अधिकारच शाळा बंदच्या निर्णयाने हिरावला जात असल्याच्या प्रतिक्रिया उर्दू शिक्षकांकडून उमटत आहेत.

या शाळा बंद

- जि. प. प्राथमिक शाळा उर्दू, निंबायती, मालेगाव (विद्यार्थिसंख्या ः ९, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि. प. माध्यमिक शाळा

- जि. प. शाळा कळवण उर्दू, कळवण (विद्यार्थिसंख्या ः १०, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि. प. शाळा रामनगर, कळवण

- जि.प. प्राथमिक शाळा उर्दू, दाभाडी, मालेगाव (विद्यार्थिसंख्या ः ४, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि.प. कन्याशाळा, दाभाडी, मालेगाव

- जि. प. प्राथमिक उर्दू शाळा, देवळा (विद्यार्थिसंख्या ः १०, शिक्षकसंख्या ः १)

समायोजन ः जि.प. मराठी शाळा, देवळा


० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. राज्य सरकारने शाळा बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.

- साजीद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन आवारात ओला, उबेरला रेड कार्पेट

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

ओला आणि उबेरसारख्या टॅक्सीसाठी रेल्वेच्या आवारात पार्किंगला जागा देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आवारात ओला आणि उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी सरकारी धोरणानुसार ही कार्यवाही होत असल्याची माहिती ‘मटा’ला दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशन रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे आणि टॅक्सीचालक संघटनेचे पप्पू शेख यांनी ओलासारख्या टॅक्सीसेवेला तीव्र विरोध दर्शविला आहे. ओला, उबेर टॅक्सीचालक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा नाशिकरोड स्थानकात हाणामारीचे प्रसंग उद््भवले होते. त्यामुळे प्रस्तावित पार्किंगमुळे नवा वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत.

--

अधिकाऱ्यांकडून पाहणी

पार्किंगच्या टेंडरची रक्कम १ लाख ९१ हजार ८२५ रुपये असून, बयाणा रक्कम दहा हजार रुपये आहे. २९ डिसेंबरपर्यंत टेंडर जमा करायचे आहे. तीन महिन्याच्या काळासाठी हा करार असेल. भुसावळ आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी पार्किंगच्या जागेची पंधरा दिवसांपूर्वी पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वारासमोर पहिल्या रांगेत ओला व उबेरसारख्या टॅक्सींना जागा देण्याचे नियोजन आहे. सध्या येथे रिक्षा उभ्या राहतात.

---

गोंधळाची स्थिती

नाशिकरोड स्थानकाच्या एक किलोमीटर परिसरात ओला, उबेरसारख्या टॅक्सी उभ्या करण्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी, तसेच पोलिसांनीही परवानगी दिली नसल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष किशोर खडताळे यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे कशी काय परवानगी देऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्याही निर्दशनास रिक्षाचालक संघटनेने हा मुद्दा आणून दिला आहे.

--

आंदोलनाचा इशारा

नाशिकरोडला सुमारे तीनशे रिक्षा व ४५ टॅक्सी आहेत. गेल्या ३५-४० वर्षांपासून ते येथे व्यवसाय करीत आहेत. स्पर्धेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही. ओला व उबेरसारखी टॅक्सीसेवा सुरू झाल्यास आपला संसार उघड्यावर येईल, अशी भीती रिक्षाचालकांना वाटते. उबेर आणि ओलासारख्या कंपन्यांना रेल्वे स्थानक भागात भाडेतत्त्वावर पार्किंगसाठी जागा दिली जाणार आहे, असे सांगून खडताळे म्हणाले, की आम्हीदेखील भाडे भरण्यास तयार आहोत. पण, रेल्वे परवानगी देत नाही. आम्ही विमा व कर भरतो, बॅच व परमिटही आहे. मग हा अन्याय का? यामागे मोठे आर्थिक कारण आहे. या टॅक्सींना पार्किंगसाठी फ्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मुबलक जागा आहे. तेथे आमचा विरोध नाही. रेल्वेने ओला, उबेरला परवानगी दिल्यास रिक्षाचालक रेल्वेखाली आत्महत्या करतील व त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, महंमद शेख, सचिन सोनवणे, रमेश दाभाडे, अनिल शिंदे, गोविंद साळुंके, अरुण गोसावी, मोहिन हिरे, अरुण गोसावी, टॅक्सी संघटनेचे पप्पू शेख, अल्ताफ सय्यद, शेख अलीम विठ्ठल भडांगे, मोहसीन पटेल आदींनी दिला आहे.

--

रेल्वेने प्रवास करणारा उच्चशिक्षितवर्ग मोठा आहे. त्याला ओला, उबेरसारखी टॅक्सीसेवा नाशिकरोड स्थानकात हवी आहे. त्याला अनुसरून रेल्वेने पावले उचलली असतील, तर ते योग्यच आहे. रिक्षाचालकांना फटका बसणार नाही, अशी आशा वाटते.

-प्रा. किरण रकिबे, प्रवासी

--

रेल्वे स्थानकात आमच्या पोटावर पाय देऊन ओला व उबेरसारख्या टॅक्सीसेवेला परवानगी दिली जाणार असेल, तर आमचा त्याला तीव्र विरोध राहील. या टॅक्सीला सिन्नर फाटा रेल्वे प्रवेशद्वारासमोर पार्किंग देण्यास हरकत नाही.

-किशोर खडताळे, अध्यक्ष, रिक्षाचालक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images