Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अर्भक मृत्यूप्रकरणी क्लिनच‌ीट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणात वैद्यकीय विभागाने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. रुग्णालयाने रंगवलेल्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारावर वैद्यकीय अधीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे.अर्भकाच्या जन्माअगोदरपासून संबंधित महिलेवर योग्य उपचार झाले असून, डॉक्टर आणि रुग्णालयाचा यात दोष नसल्याचा दावा करत त्यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. परंतु, अजून संशय बळावू नये तसेच वाद होऊ नये यासाठी सविस्तर चौकशी सुरूच असल्याचा दावाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केला आहे.

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणाला वैद्यकीय विभागाच्या चौकशी अहवालाने ट्व‌िस्ट मिळाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणात न्याय मिळावा व डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह वैद्यकीय अधीक्षकांकडून या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागविला होता. त्यानुसार, डॉ. राजेंद्र भंडारी यांनी प्राथमिक चौकशी अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केलेला आहे.

वैद्यकीय अधिक्षकांच्या चौकशी अहवालात सदर महिलेकडे दुर्लक्ष केल्याबाबत करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळून आलेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. उलट प्रसुतीवेळी एक तास अगोदरपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मेतकर त्याठिकाणी हजर होते. दर दोन तासांनी महिलेची तपासणी होत असल्याचा दावा उपचाराच्या रेकॉर्डवरून करण्यात आला आहे. परंतु, अर्भकाच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी आल्यात. त्यामुळे अर्भकाला तातडीने उपचाराची गरज होती. म्हणून नातेवाईकांच्या सल्ल्यानेच त्याला शताब्दी हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याचा दावा डॉ. भंडारी यांनी केला. शताब्दी हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचाराची सुविधा असल्याने ही प्रक्रिया राबविल्याचे सांगत, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्यात आली आहे. सदर महिलेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप चुकीचा असून डॉक्टरांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीच्या नोंदी असल्याचा पुरावा त्यांनी पुढे केला आहे. त्यामुळे मृत अर्भकाच्या नातेवाईकांकडून या चौकशी अहवालाची च‌िरफाड केली जाण्याची शक्यता आहे.

म्हणे चौकशी सुरूच

आयुक्तांना सादर केलेला अहवाल हा प्राथमिक असल्याचे डॉ. भंडारी यांनी म्हटले आहे. या चौकशी अहवालात सरळ सरळ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यात आला असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, नातेवाईकांचा रोष नको म्हणून अजूनही चौकशी सुरू असल्याचे नाटक करण्यात आले आहे. या प्रकरणात शताब्दी हॉस्पिटलचीही चौकशी करण्यात येत असून, त्यानंतर संपूर्ण चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

समज हीच कारवाई

इंदिरा गांधी रुग्णालयात महिलेला प्रसुतिकळा सुरू असताना नर्स मोबाइलवर खेळत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकाने केला होता. आपल्याशी उद्धट वर्तन केल्याने कारवाईची मागणी केली होती. परंतु, या प्रकरणातही वैद्यकीय विभागाने कर्मचाऱ्यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांना समज देण्यात आल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरचा श्वास मोकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या जेसीबीचा पंजा गुरूवारी सातपूरच्या अतिक्रमणांवर चालला आणि शहराने मोकळा श्वास घेतला. शिवाजी मंडईसह रस्त्यातील शेकडो अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

औद्योगिक वसाहतीचे गाव म्हणून सातपूरची सुरुवातीपासूनच ओळख आहे. मात्र, गाव वाढत गेले तसे अतिक्रमणेही वाढली. अनेक वर्षांपासून गावाला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. गाव अतिक्रमणमुक्त करण्याबाबत नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढतच असल्याचा आरोप नगरसेविका सीमा निगळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महापालिकेकडे केला होता. यावेळी सातपूर गावातील रस्त्यांचा श्वास मोकळा करा, अशी मागणी नगरसेविका निगळ यांनी केली होती. महापालिकेने ग्रामस्थ व नगरसेविका निगळ यांची मागणी लक्षात घेत सातपूरच्या रस्त्यांचा श्वास अखेर मोकळा अतिक्रमण काढत मोकळा केला.

दिवसभर चाललेल्या मोहिमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, सोनवणे, वरिष्ठ

पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या सहाही विभागांतील अतिक्रमण विभागाची वाहने व शंभरहून अधिक कर्मचारी मोहिमेत सक्रिय होते. पोलिसांकडूनही महिला पोलिसांसह ५० कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी देण्यात आला होता.

अरेरावी करणाऱ्यांना पिटाळले

अनेक महिन्यांपासून महापालिकेकडून रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या जात होत्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर गुरूवारी झालेल्या मोहिमेत अरेरावी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरत पिटाळून लावले. अंगावर येणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांची हवा काढली. यावेळी खुद्द वरिष्ठ पोलिस निरीक्षक आखाडे यांनीही अरेरावी करणाऱ्यांचा समाचार घेतला.

कमानीपासून सुरुवात

अतिक्रमण मोहिमेसाठी सकाळी दहा वाजताच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा ताफा पोलिस स्टेशनच्या आवारात तैनात होता. साडेदहा वाजता कमानीपासून अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी रस्त्यात

असलेल्या टपऱ्या व पत्र्यांच्या शेडचे अतिक्रमण काढण्यात आले.

फळ विक्रेत्यांचा गोंधळ

शिवाजी मंडईच्या बाहेर फळे विक्री करणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी महिलांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला समजावूनच घेत नसल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने गोंधळ घालणाऱ्या महिलांना बाजूला करत फळांच्या टोपल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांत जमा केल्या. यानंतर महिलांनी एकच महापालिकेच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

गाळ्यांचा रस्ता मोकळा

शिवाजी मंडईत असलेल्या सर्वच गाळेधारकांनी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांसाठी पायी चालण्यासाठी असलेल्या पादचारी मार्गांवर अतिक्रमणे केली होती. तर भाजीविक्रेत्यांनीदेखील महापालिकेने दिलेल्या शेडच्या बाहेर अतिक्रमणे केली होती. मोहिमेत मंडईतील सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे मंडईचा श्वास मोकळा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

युवकाचा पाय मोडला

सातपूर गावातील बाळू भंदुरे या युवकाचा त्र्यंबकेश्वररोडवरील मशिदीजवळ अतिक्रमण मोहीम सुरू असताना पाय मोडला. अचानक एक जड वस्तू पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अखेर शिवाजी महाराजांचे दर्शन!

महापालिकेची स्थापना झाल्यावर सातपूरला शिवाजी मंडईची उभारणी करण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा मंडईच्या बाहेर उभारला होता. परंतु, दिवसगणिक वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे राजांचे दर्शन दुर्लभ झाले होते. गुरूवारी अतिक्रमण मोहीम फत्ते झाल्याने राजांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

..तर फौजदारी गुन्हे

दिवसभर चाललेल्या अतिक्रमण मोहिमेत शिवाजी मंडईसह रस्त्यात येणारी शेकडो अतिक्रमणे

महापालिकेने जमिनदोस्त केली. पुन्हा कोणी अतिक्रमण केले तर त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले. महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर सतत लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे कंपनीसाठी ख्रिसमस कार्निव्हल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब म्हणजे नाशिककरांना मनोरंजनाच्या जगात नेणारा सर्वांचा खास सोबती. फक्त चित्रपट, नाटकांपर्यंत मर्यादित न ठेवता अनेकांना अवघ्या कलाजगताची सफर घडवून आणणारा कल्चर क्लब हा सोबती सदस्यांना मिळाला असून, ही सोबत आणखी रंगतदार बनविण्यासाठी ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी रॉकिज् अँड डूडलर्स, बी स्केअर कॉम्लेक्सच्या समोर, श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ, कॉलेज रोड या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे.

ख्रिसमस म्हटले की आठवतो सांताक्लॉज, गिफ्ट आणि धमाल मस्ती. मात्र, महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी यंदाचा ख्रिसमस स्पेशल असणार आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० ते रात्री ९ दरम्यान बच्चे कंपनीसाठी ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यात बच्चे कंपनीला चॉकलेट, केक तर मिळणारच आहे, शिवाय जादूचे प्रयोगही पहायला मिळणार आहेत. विविध प्रकारचे गेम्स, टॅटू मेकिंग, ख्रिसमस ट्री, फेस पेन्टिंग आदी या कार्निव्हलमध्ये लहानग्यांना अनुभवायला मिळेल. बच्चे कंपनीसाठी प्रवेश निःशुल्क आहे. यात तीन ते १२ वर्षांपर्यंतची मुले सहभागी होऊ शकतात.

कल्चर क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटक, सांगीतिक कार्यक्रम, हॅप्पी स्ट्रीट्स, श्रावण क्वीन अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद कल्चर क्लब सदस्यांना वर्षभर घेता येतो. तसेच सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देत असते.

नाटकांसारख्या कार्यक्रमांनाही मटा कल्चर क्लबकडून सदस्यांना विशेष सवलत देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजन जगताची सफर करण्यासाठी तयार व्हा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकांवर संपर्क करा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुन्हा ‘जैसे थे’

$
0
0

चव्हाण मळ्य ातील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मोठ्या पोलिस बंदोबस्तात मे २०१६ मध्ये उठविण्यात आलेली बिटको कॉलेज शेजारील चव्हाण मळ्यातील झोपडपट्टी दीड वर्षात पुन्हा जैसे थे वसली आहे. या जागेवर मालकी सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील शेकडो झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर या जागेवर पुन्हा झोपडपट्टी वसल्याने महापालिकेची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीड वर्षापूर्वी येथील झोपडपट्टी अनधिकृत ठरवून ही झोपडपट्टी हटविण्याचा खटाटोप महापालिका प्रशासनाने कुणाच्या इशाऱ्यावर केला होता, असा सवाल आता विचारला जात आहे.

नाशिकरोडच्या बिटको कॉलेजच्या मागील बाजूस चव्हाण मळ्यातील बहुचर्चित झोपडपट्टी महापालिकेच्या जागेवर अनधिकृत वसलेली असल्याचे जाहीर करून अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रचंड पोलिस फौजफाट्यासह दि. २४ मे २०१६ रोजी या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवला होता. या झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याप्रसंगी संपूर्ण शहरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. चव्हाण मळ्यातील सुमारे सव्वा एकर जागेवर ही झोपडपट्टी गेल्या काही वर्षांपासून वसलेली होती. यात ११४ झोपडपट्टीधारक वास्तव्याला होते. या झोपडपट्टीच्या जागेवरच पीपल्स रिपब्लिकन पार्टी या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने संपर्क कार्यालयही थाटलेले होते. परंतु, गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने अचानक या जागेवर आपली मालकी सांगत ही झोपडपट्टी अनधिकृत आणि अतिक्रमित असल्याचे घोषित करून या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवला होता. चव्हाण मळ्यातील अनधिकृत झोपडपट्टी हटविण्याच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांतून स्वागतच करण्यात आले होते.

दीडशे झोपड्यांचे मोहोळ

सध्या या संपूर्ण जागेवर पुन्हा एकदा झोपडपट्टी वसली असून, महापालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोरच पुन्हा एकदा या जागेवर झोपडपट्टीचे अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. असे असतानाही पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग या जागेवरील झोपडपट्टीला अभय देण्याची भूमिका घेत असल्याने पालिकेने दीड वर्षभरापूर्वी केलेली कारवाई केवळ एक दिखावा असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या याठिकाणी सुमारे दीडशे झोपड्यांचे मोहोळ जमा झाले आहे.

चव्हाण मळ्यातील जागा खासगी मालकीची आहे. मात्र त्यापैकी केवळ ३ गुंठे जागा पालिकेच्या मालकीची आहे. तेवढीच जागा मोकळी करण्यासाठी गेल्यावर्षी झोपडपट्टी हटविण्याची कारवाई केली होती. मात्र सध्या महापालिकेची ही जागा रिकामीच पडली आहे.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड या जागेवर दीड वर्षभरापूर्वी केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई कोणाच्या इशाऱ्यावर पालिका प्रशासनाने केली होती, असा प्रश्न पुढे आला आहे. या कारवाईनंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त व पालिकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून पालिकेच्या या कारवाईचा निषेधही केला होता. याशिवाय झोपडपट्टी आपल्या जागेवर वसली असल्याचा दावा हिराबाई दामू भालेराव या महिलेने करून या जागेवर आपली मालकी सांगणारे प्रशासन दिशाभूल केल्याचाही दावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्फ’चे आरोग्य सुधारणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुरवस्था झालेल्या गोल्फ क्लबचे (अनंत कान्हेरे मैदान) रुपडे आता लवकरच पालटणार आहे. येथील विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिले असून, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील व्यायामप्रेमींचे प्रमुख केंद्र असलेल्या गोल्फ क्लबची दुरवस्था ‘मटा’ने प्रभावीपणे मांडली आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त आपण नागपूरला असून, शहरात येताच प्रामुख्याने गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकचे काम हाती घेतले जाईल. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन आमदार प्रा. फरांदे यांनी दिले. शहरातील अनेक नागरिकांनी त्याबद्दल ‘मटा’चे आभार मानले आहेत.

शहरात जॉगिंगचे प्रमुख ठिकाण म्हणून गोल्फ क्लब मैदान साऱ्यांनाच परिचित आहे. या ठिकाणी शहराच्या विविध भागातून व्यायामप्रेमी नागरिक येतात. मात्र, सध्या या मैदानाला अनेक समस्यांनी ग्रासले असून, अनेक नागरिक या मैदानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. या ठिकाणी पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात वावर असतो. परंतु, येथे शौचालयासारखी मूलभूत सुविधादेखील सुस्थितीत नसल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागते. या मैदानाला कुठल्या अर्थाने मैदान म्हणायचे, असा प्रश्न सध्यात पडत आहे. अनेक दिवसांत येथे साफसफाई झालेली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात गवत वाढल्याने मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. येथे अनेकदा गायी-म्हशी चरण्यासाठी येतात. येथे जॉगिंग करणाऱ्यांना त्यांच्यामधून वाट काढावी लागते. मैदानात येणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत येथे बसण्यासाठी पुरेशा जागेचा अभाव दिसून येतो. येथे बसविण्यात आलेले बहुसंख्य बाकदेखील तुटलेले आहेत. ट्रॅकवर पुरेसे विजेचे दिवे नसल्याने सायंकाळनंतर या ठिकाणी पुरेसा प्रकाशच पडत नाही. सायंकाळनंतर या ठिकाणी सर्वांसमक्ष अनेक प्रेमीयुगुले अंधाराचा फायदा घेऊन अश्लील वर्तन करताना दिसतात, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर ‘मटा’ने फोकसद्वारे प्रकाश टाकल्याने गोल्फ क्लबचे रुपडे पालटणार असल्याच्या निर्णयाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

--

तज्ज्ञांचे घेणार सहकार्य

गोल्फ क्लबचे रूप पालटण्यासाठी शहरातील नामवंत आर्किटेक्ट्स व डिझायनर्स यांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची डिझाइन्स मागवून घेतली जाणार असून, त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रा. फरांदे यांनी दिली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गोल्फ क्लबची दुरवस्था ‘गोल्फ क्लबचे बिघडले ‘स्वास्थ्य’’ या शीर्षकांतर्गत बुधवारच्या अंकातील फोकसद्वारे उघड केली होती. या वृत्ताची दखल नागपूर येथे असलेल्या आमदार प्रा. फरांदे यांनी ‘मटा’च्या ऑनलाइन आवृत्तीच्या माध्यमातून घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोन गटांत तुफान दगडफेक

$
0
0

गजानन कॉलनीतील घटना; पोलिसांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील चाळीसगावरोड परिसरातील गजानन कॉलनीत बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेची माहिती अवघ्या काही वेळातच संपूर्ण शहरात पसरली आणि सोशल मीडियातून अफवांचा पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत व्हॉटस्अॅप, फेसबुकवर अनेक पोस्ट फिरत होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगावरोड परिसरात बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास गजानन कॉलनी परिसरालगत असलेल्या एका गटाकडून ३०० ते ४०० जणांचा जमाव चालून आला. तर दुसऱ्या बाजूने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन धावपळ सुरू झाली. या वेळी घटनास्थळावरील काही नागरिकांनी आझाद नगर पोलिस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती देवून पोलिसांची कुमक मागविण्याची सूचना मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूने दगडफेक सुरू होऊन एका गटाकडून काचेच्या बाटल्यांचा मारा सुरू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमाव पांगवून शांततेचे आवाहन केले. या वेळी पोलिसांवरदेखील एका बाजूच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना समजताच त्यांच्यासह घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह कर्मचारी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार रात्रीपासून घटनास्थळ व परिसरात एसआरपीएफ व पोलिस दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.

आयजी चौबेंची पाहणी

गजानन कॉलनी परिसरात दोन गटात वाद झाल्याची बातमी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयकुमार चौबे यांना समजताच त्यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची सखोल माहिती घेतली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या परिसरात गेल्या काही वर्षांत तीनवेळा दंगली झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंड‌ित कॉलनीत ‘वन-वे’ची अंमलबजावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंड‌ित कॉलनीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ‘वन वे’चा पर्याय पोलिसांनी दिला आहे. या निर्णयाची काही अंशी अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. काही दिवस नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्ष‌ित असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी व्यक्त केली. या ठिकाणी सम-विषम पार्किंगचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. २० डिसेंबरपासून नियम लागू करण्यात आले आहेत.

पंड‌ित कॉलनीतील दोन प्रमुख रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा असते. त्यात रस्त्यावर एखादे वाहन पार्क झाल्यास झालेली कोंडी लवकर सुटत नाही. सततच्या त्रासाला स्थानिक नागरिकदेखील वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंड‌ित कॉलनीतील दोन्ही प्रमुख रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. गंगापूररोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या बाजूने जुनी पंड‌ित कॉलनीमार्गे राजीव गांधीभवन शेजारील टिळकवाडी सिग्नलकडे येणाऱ्या वाहतुकीस हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. २० डिसेंबरपासून टिळकवाडी सिग्नलकडून गंगापूररोडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना तनिष्क शोरूमसमोरून राणे डेअरीच्या उजव्या बाजूने नवीन पंड‌ित कॉलनीमार्गे मॅरेथॉन चौकाकडे जावे लागणार आहे. दरम्यान, नवीन पंड‌ित कॉलनीतील या रस्त्यावरदेखील बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. त्यामुळे हा मार्गदेखील वन वे घोष‌ित करण्यात आला आहे. राणे डेअरी ते मॅरेथॉन चौक असा मार्ग एकेरी करण्यात आला असून, मॅरेथॉन चौकाकडून शरणपूररोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना जुनी पंडीत कॉलनीतील मार्गाचा वापर करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादांचा युवांवरील विश्वास ठरला सार्थ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गीता समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानी असण्याची गरज नाही. प्रेम असले की ग‌ीता समजते. गीता समजण्यासाठी अर्जुन होऊ जावे लागते. विद्यार्थी होऊन गेलात, तर गीता समजेल. युवांनी (युवान) तेच केले आहे. त्यांना गीतेचा खरा अर्थ कळलेला आहे. दादांनी युवांवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्रीदीदी तळवलकर यांनी केले.

पांडुरंगशास्त्री आठवले प्रवर्तित स्वाध्याय परिवाराच्या वतीने गीताजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीप्रसंगी विराट जनसमुदायाला उद्देशून त्या बोलत होत्या. त्र्यंबकरोड येथील ठक्कर मैदानात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

धनश्रीदीदी म्हणाल्या, की सर्व स्तरांतील युवकांना एकत्र भेटण्याचा योग दादांनी आणला. विस्तार तोच असला, तरी व्याप मात्र वाढलेला आहे. कोणताही विचार माणसापर्यंत पोहोचविणे हार्ट टू हार्ट व हर्ट टू हर्ट असते, तेव्हा ते कठीण असते. विचार सांगताना तो छापून टाकणे ही पद्धत सोपी आहे. पण, माणसाचे माणसापर्यंत पोहाेचणे अवघड आहे. स्वाध्यायाने तेच काम केले आहे. स्वाध्याय माणसापर्यंत उठून जातो. युवांकडून कार्य करून घेतो. युवांच्या बाबतीत स्वाध्याय खूप पॉझिटिव्ह आहे आणि युवांनीही तो विश्वास सार्थ ठरवला आहे, असेही दीदी म्हणाल्या.

स्वाध्याय परिवारातर्फे सुमारे ४१ वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विश्वव्यापक स्वरूप देण्यात आले असून, यंदा देशातील १८ राज्ये व इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांत १८ भाषांत झालेल्या या स्पर्धेत तब्बल साडेचार लाख युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी ‘गीता : तेजाचे दर्शन, मानवमूल्य संवर्धन’ असा विषय देण्यात आला होता. नाशिक विभागातून३७ हजार ११० युवक-युवतींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा युवा केंद्रापासून ते गट, तालुका, जिल्हा या टप्प्यांत घेण्यात आल्या. नाशिक विभागाची अंतिम फेरी गुरुवारी झाली. यावेळी १२ विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यानंतर धनश्रीदीदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी गीतेच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे पठण करण्यात आले. कार्यक्रमानंतर हजारो युवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

गीतेच्या तेजाचे दर्शन

स्पर्धेच्या अंतिम फेरीत सौरभ पगार, माधवी गुप्ता, मंगेश जगताप, योगेश परदेशी, अविनाश भगरे, श्रुती खैरनार, भक्ती जोशी, माधुरी पाचपोहे, विशाल तांबे, मंगेश पवार, मुकेश पाटील, विवेक पाटील यांची निवड झाली होती. त्यांनी मराठी व हिंदी भाषेतून गीतेविषयीचे विचार प्रकट केले. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ देण्यात आला होता. शेवटी परीक्षकांनी निकाल जाहीर केला. विजेत्यांना दीदींनी च्या हस्ते गौरविले.


विराट गर्दी अन् चोख व्यवस्थापन

कार्यक्रमासाठी दुपारपासूनच स्वाध्यायींचा ओघ सुरू होता. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था भोसला सैनिकी शाळेच्या मैदानावर करण्यात आली होती. स्वाध्याय परिवाराचे स्वयंसेवक ठिकठिकाणी मार्गदर्शन करीत होते. मैदानापासून स्वाध्यायी पायीच, पण शिस्तीत कार्यक्रम स्थळाकडे मार्गक्रमण करीत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणीही स्वाध्यायींच्या अपूर्व शिस्तीचे दर्शन घडले. हजारोंचा जनसमुदाय असूनही सारे जण विशिष्ट रांगेत मैदानावर स्थानापन्न झाले होते. संपूर्ण कार्यक्रमावर ड्रोनने नजर ठेवण्यात आली. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका चालविणार स्वतंत्र अपंग शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमदार बच्चू कडू यांच्या राड्यानंतर महापालिकेने अपंग विकास योजनांची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. अपंगांसाठी वीस कोटींचा स्वतंत्र कृती आराखडा तयार केल्यानंतर आता अपंगासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

शहरातील अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाळा चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींत अपंग विद्यार्थ्यांसाठी ही विशेष शाळा सुरू केली जाणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

अपंगांसाठीचा राखीव निधी अखर्चित राहिल्याने महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात महापालिकेत राडा झाला होता. आमदार कडू यांनी थेट आयुक्तांच्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अपंग विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला. त्याअंतर्गत लाभार्थी निश्चितीकरिता महापालिका क्षेत्रातील अंध-अपंगांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले. अंध-अपंगांसाठी स्वतंत्र शाळा, रोजगारनिर्मितीसाठी आयटीआय, हैद्राबादच्या धर्तीवर अद्ययावत उद्यान, आरोग्यविमा, आजारांवर उपचारांसाठी पाच लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य, सहाही विभागांत ऑडिओ लायब्ररी, अर्थसाहाय्य आदी योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

---

प्राथमिक शाळांचा होणार वापर

अपंगांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याकरिता २.५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, उपलब्ध कालावधीत अपंगांसाठी स्वतंत्र शाळेचे बांधकाम करणे शक्य नसल्यामुळे महापालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींत अपंगांसाठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. त्यासाठी शाळांचा शोधही सुरू केला आहे, तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली जाणार असून, महासभेच्या निर्णयानंतर त्यावर पुढे कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे अपंगांना हक्काची स्वतंत्र शाळा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ घडवताहेत व्हर्च्युअल नर्मदा परिक्रमा!

$
0
0

नाशिक ः धर्माचरण करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असलेले नर्मदा परिक्रमेचे स्वप्न आयुष्य उतरणीला लागल्यावर पूर्ण होते. मात्र, हे स्वप्न तत्काळ घरबसल्या पूर्ण होत असेल तर...! हे शक्य केले आहे नाशिकच्या विवेक वासुदेव दंडवते यांनी. दंडवते सध्या नर्मदा परिक्रमेसाठी गेले असून, ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दररोज अनेकांना व्हर्च्युअल परिक्रमा घडवत आहेत.

अध्यात्माकडे वळण्यासाठी आता वयाचे काही बंधन नाही. पूर्वी आयुष्याच्या सायंकाळी होणारी नर्मदा परिक्रमा आता तारुण्यातही होऊ लागली आहे. अनेक तरुण या वारीत सहभागी होऊ लागले आहेत. नर्मदा परिक्रमा हा अत्यंत पवित्र उत्सव असून, अनेक लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. विविध लोकांना तसेच एका वेगळ्या संस्कृतीला भेटण्याची संधी यातून मिळते. त्यामुळे ही परिक्रमा करण्यासाठी आता अनेकजण उत्सुक असतात. परंतु, रोजच्या कामामुळे, व्यापामुळे तितका वेळ काढू न शकलेल्यांसाठी हा आनंद देण्याचे काम दंडवते आहेत. दंडवते गेल्याच महिन्यात परिक्रमेसाठी निघालेले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतून निवृत्त झालेल्या दंडवते यांना अध्यात्माची ओढ असून गणेशबाबांचे ते अनुयायी आहेत. याआधीही त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. यावेळच्या परिक्रमेमध्ये ते रोज फेसबुक लाइव्हवर एक व्ह‌िडीओ टाकतात. यात तेथील भागाची माहिती दिलेली असते. तसेच वाटेत येणारी अनेक मंदिरे, प्राचीन स्थळे यांचा परिचय ते अनेकांना करून देतात. त्यांच्या फेसबुक लाइव्हला असंख्य व्ह्यूज मिळत आहेत. कमेंटचाही पाऊस पडत असून, आमचे नर्मदा परिक्रमेचे स्वप्न या रूपाने पूर्ण होत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

..ही परिक्रमेची पूर्वतयारीच!

विवेक दंडवते यांचा रोजचा व्हिडीओ फेसबूकवर कधी पडतो याची अनेकजण वाट पाहात असतात. एकप्रकारे नर्मदा परिक्रमेची पूर्वतयारीच ते अनेकांकडून करून घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही असून, व्हिडीओ काढण्यात त्या दंडवते यांची मदत करतात. यासाठी रोज मुक्कामच्या जागी मोबाइल चार्ज करून घेणे त्यांना अनिवार्य असते. परिक्रमा आनंदात सुरू असून ते अध्यात्मिक समाधान देत आहेत. Vivek Vasudeo Dandwate या फेसबुक अकाऊंटवर हे लाइव्ह पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणच्या तहसीलदारांचे निलंबन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या आमदार दीप‌िका संजय चव्हाण यांचा अवमान केल्याचे प्रकरण बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अंगलट आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी हक्कभंगाबाबत सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्याला सर्वसदस्यांनी पाठिंबा दिल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली. सध्या तहसीलदार सुनील सौंदाणे हे २६ डिसेंबर पर्यंत रजेवर असून, प्रभारी तहसीलदार म्हणून दीपक धिवरे हे कामकाज पाहत आहेत.

आमदार दीप‌िका चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्यावर विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव दिला होता. मात्र विशेषाधिकार समितीने मुदत वाढ मागितली होती. या विरोधात आमदार चव्हाण व इतर महिला आमदारांनी गुरुवारी सभागृहात ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलदारांवर कारवाई का केली नाही, असा मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आला. तेव्हा विधीमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार, जयंत पाटील आक्रमक झाले. प्रशासकीय अधिकारी सदस्यांना अशी वागणूक कशी काय देवू शकतात, असा शब्दात त्यांनी संतप्त सवाल केला. यासर्वांनी बाजू मांडल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार सौंदाणे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा केली.

बदली मॅटकडून रद्द

याप्रकरणानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये सौंदाणे यांची धुळे येथे रोजगार हमी तहसीलदारपदी प्रशासकीय बदली झाली होती. मात्र या बदली विरोधात सौंदाणे मॅट मध्ये गेले असता मॅटने त्यांना सटाणा येथे पूर्ववत बदली करून राज्याचे प्रधान सचिव यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्ष औटघटकेचा

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

vinodpatilMT

नाशिक ः नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या अध्यक्षांची निवड ही औटघटकेचीच ठरण्याची चिन्हे असून, कलम ८८ अन्वये बँकेवर पुन्हा बरखास्तीची टांगती तलवार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बँकेवर प्रशासक येण्याची शक्यता असून, नव्या प्रशासकाची फाइलदेखील सहकार आयुक्तांकडे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रिझर्व्ह बँकेनेच या बँकेच्या बरखास्तीची शिफारस केल्याने भाजप नेत्यांनी दबाव टाकला, तरी सहकार विभाग बरखास्तीवर ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी सध्या निवडणूक लागली आहे. ही अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक शनिवारी (दि. २३) होत असून, अध्यक्षपदासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी अध्यक्ष परवेझ कोकणी आणि संचालक केदा आहेर यांच्यात रस्सीखेच आहे. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या संचालकांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. अध्यक्षपदासाठी विशेषतः अध्यक्षपदासाठी कोकाटे आणि कोकणी यांच्यात चुरस असून, अध्यक्षपदाचा निर्णय थेट पालकमंत्री गिरीश महाजन घेणार आहेत. बहुमताचा दहाचा आकडा गाठण्यासाठी कोकाटे, कोकणी गटाने प्रयत्न सुरू केले असून, मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीदर्शनाची स्पर्धाही सुरू झाली आहे. येत्या शनिवारी ही निवडणूक होणार असून, भाजपचाच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे.

जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, नाशिक जिल्हा बँकेवर कमळ फुलविण्याचा हा आनंद औटघटकेचा ठरण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या काळात बँकेत झालेल्या गैरकारभाराप्रकरणी बँकेवर बखास्तीची कारवाई होणार आहे. नोकरभरती, संगणक खरेदी, तिजोरी खरेदीतील भ्रष्टाचारासह विविध अनियमिततेप्रकरणी सहकार कायदा कलम ८३ व ८८ अन्वये झालेल्या चौकशीत संचालक मंडळ दोषी असल्याचा अहवाल सहकार आयुक्तांनी तयार केला आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी कलम ११० नुसार रिझर्व्ह बँकेकडे शिफारस पाठविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील कारवाई अंतिम टप्प्यात आहे. रिझर्व्ह बँकेकडूनही बरखास्तीसंदर्भात अनुकूल स्थिती असून, सहकार विभागाने त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. प्रशासकांच्या नावाचीही निश्चिती केली आहे. जिल्हा बँकेत यापूर्वीही प्रशासक राहिलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव यासाठी निश्चित असून, त्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सोबतच कोकाटे आणि कोकणी दोघांवरही कलम ८८ अंतर्गत ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

--

फाइल सहकार आयुक्तांकडे

जिल्हा बँक बरखास्तीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकांच्या नावाची निश्चिती होऊन त्यांची संमतीही मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बरखास्तीसंदर्भातील आदेश काढले जाणार आहेत. त्यानंतर सहकार आयुक्तांकडून प्रशासक नियुक्तीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे भाजपने आपला अध्यक्ष बसविण्यासाठी सर्व प्रयत्न केले असले, तरी अध्यक्षांची खुर्ची अल्पकाळासाठीच ठरण्याची शक्यता आहे.

--

...म्हणून नागपूरमध्ये तळ

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच असली, तरी अध्यक्षपदासह बरखास्तीची कारवाई टाळण्यासाठी सध्या दोन्ही गटांचे नेते नागपूरमध्येच तळ ठोकून आहेत. भाजपकडे अध्यक्षपद मिळाल्यानंतर बँक बरखास्त झाल्यास भाजपचीच बदनामी होणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्याची चाचपणी सुरू असली, तरी सहकारमंत्र्यांच्या विधान परिषदेतील वक्तव्यामुळे भाजपचीच कोंडी झाली आहे. सहकार विभागाने बरखास्तीची शिफारस केल्याचे लेखी उत्तर सुभाष देखमुख यांनी दिले आहे. त्यामुळे बरखास्तीची कारवाई टाळली, तर कोर्टात हा वाद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, सहकारमंत्री अडचणी येण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्रीही सध्या पेचात पडले आहेत.

--

कोकणींचा पत्ता कट?

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपशी घरोबा करून अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याच्या तयारीत असलेल्या परवेझ कोकणी यांना सवर्पक्षीय संचालकांनी विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकणींचा पत्ता कट करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील गैरव्यवहारांच्या चौकशीची कागदपत्रे, अहवाल विरोधकांनी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविल्याची चर्चा आहे. पारदर्शकतेवर बोट ठेवून भाजपकडून कोकणींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कोकणी गटाकडून माणिकराव कोकाटेंच्या नावालाही विरोध केला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी तिसरेच नाव पुढे येण्याचीही शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन प्रचाराचा गुजरातमध्ये बिगुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुजरातमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रचाराचा बिगुल वाजला आहे. बडोदा येथे होणाऱ्या संमेलनाच्या यशस्वितेसाठी मराठी वाङ्मय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी दौरे सुरू केले आहेत. यात मराठी भाषिक भागांना भेटी दिल्या जात आहेत.

गुजरातमधील बडोदा शहरात १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यात महाराष्ट्रातून मराठी भाषिक आणि रसिकांची गर्दी होण्याची आशा आहे. मात्र, त्यांच्यासह गुजरातमधील मराठी आणि गुजराती भाषकांचाही सहभाग असावा, यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील सुरत, नवसारी आणि वापी येथे संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, संपर्कप्रमुख मिलिंद बोडस आणि प्रसिद्धीसमिती प्रमुख संजय बच्छाव यांनी भेटी देत तेथील विविध मराठी मंडळांसह मराठी भाषिक शाळांना संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

सुरतमध्ये मराठा पाटील समाज मंडळ, नवसारीमध्ये श्री गणेश मंडळ, तर वापी येथे अथर्व पब्लिक स्कूलला या प्रतिनिधींनी भेटी दिल्या. संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी मराठी मंडळांच्या प्रतिनिधींना बडोदा येथे होणाऱ्या संमेलनाचे निमंत्रण दिले. संपर्कप्रमुख यांनी संमेलनाचे स्वरूप स्पष्ट केले, तर प्रसिद्धी समितीप्रमुख संजय बच्छाव यांनी संमेलनाची रूपरेषा, त्यात होणारे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली.

साहित्यप्रेमी उभारणार होर्डिंग

साहित्य संमेलनामधील सर्व कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर सूरतसह नवसारी आणि वापी या तीन शहरांमध्ये साहित्यप्रेमी होर्डिंग उभारणार आहेत. मराठी वाङ्मय परिषदेच्या बैठकींमध्ये सुरतमध्ये सार्वजनिक हायस्कूलचे उत्तम पाटील, वसंतराव पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण वडनेरे, उद्योजक व साहित्यिक ईश्वर पाटील, मदन साठे सहभागी झाले. नवसारीमध्ये गुरुदत्त रारावीकर, तर वापीमध्ये संजय बोरसे, प्राचार्या लीना बोरसे, साहित्यिक अश्विनी राणे, सुनील पाटील यांनी आपले विचार मांडले.

शैक्षणिक सहलींचे आयोजन

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनाची माहिती व्हावी, यासाठी राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांनी बडोदा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. त्यास अनेक शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संमेलनस्थळी येणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती कार्याध्यक्ष खोपकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगावकरांनी स्वीकारला पदभार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. तत्पुर्वी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अपर्ण करून पालिका सभागृहात ऋणनिर्देश सभा घेतली. या सोहळ्यास नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, सभापती शिवाजी गांगुर्डे आदींसह भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, लक्ष्मण सावजी, पदाधिकारी उपस्थित होते.

माजी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिलीप जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. यावर स्वरचित कविता सादर केली. बाळासाहेब कदम यांनी जनसंघापासून केलेल्या कार्याचे हे फळ आहे. म्हणून पायाच्या दगडाला विसरू नका असे मार्मिक बोल सुनावले.

लोहगावकर यांनी सर्वांचे आभार मानत जनता जनार्दनाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू. संपूर्ण राज्याला आदर्श वाटावा असा त्र्यंबकेश्वर नगरीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनवून केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने उत्कृष्ठ धार्मिक स्थळ बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्यो सांगितले. सुरेश गंगापुत्र यांनी प्रास्ताविकात भाजपच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गायधनी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नितीन जाधव, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब दीक्षित, उद्धव निमसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मंगला वाघ

$
0
0

निफाड : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मंगला शंकर वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निफाड नगरपंचायतीवर भाजप-सेना युतीची सत्ता आहे. आवर्तन पद्धतीनुसार विद्यमान उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डीले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर मंगला वाघ यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी प‌िठासीन अधिकारी तथा निफाडचे तहसीलदार विनोद भामरे, सहाय्यक अधिकारी किशोर चव्हाण यांनी काम पाहिले. सकाळी दहा वाजता निवडणुकीच्या कामकाजास प्रारंभ झाला. सभागृहात मावळत्या उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डीले, नगरसेवक राजाभाऊ शेलार, जावेद शेख, आनंद बिवलकर आदी १७ पैकी १४ नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष मुकुंद होळकर यांचा खासगी दौरा असल्याने ते गैरहजर होते. या पदासाठी वाघ यांनी दोन अर्ज सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भाजप नेते अद्वय हिरे यांचे समर्थक खैरनार बंधूंवर झालेल्या हल्ला प्रकरणी गेल्या दोन दिवसांत शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्यासह भाजप नेते अद्वय हिरेंवरही गुन्हा दाखल आहे. भाजप आणि सेनेच्या गोटातून परस्परविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असली, तरी अद्याप एकाच आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोल‌िस पथक रवाना केल्याची माहिती छावणी पोल‌िस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांनी दिली.

सोमवारी मध्यरात्री हिरेंचे समर्थक खैरनार बंधू यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अविष्कार भुसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर बुधवारी या हल्ल्यातील दुसरा आरोपी राहुल गायकवाड याच्या फिर्यादीवरून भाजप नेतेअद्वय हिरेंसह तिघांवर गुन्हे दाखल झाले होते.

सीसीटीव्हीद्वारे तपास

पोलिसांनी खैरनार बंधूंवर हल्ला होण्यापूर्वी त्यांनी ज्या दुकानात खरेदी केली तेथील व वनविभाग कार्यानाजीक असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी यांचे त्या वेळीचे मोबाइल लोकेशन ट्रेस करून तपास केला जातो आहे.

चर्चेला उधाण

या प्रकरणातील आरोपी अविष्कार भुसे, अद्वय हिरे यांच्यासह अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोल‌िस पथक रवाना केले असल्याची माहिती विश्वकर्मा यांनी ‘मटा’ला दिली. या मारहाणी प्रकरणामुळे शहरातील वातावरण तापले असून, विविध विषयांच्या चर्चेलाही उधाण आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेताजी, नेहरूंचे संबंध प्रेमादराचे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांवरही समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतर भारताची जडणघडण कशाप्रकारे व्हावी याबाबतही ते समविचारी होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फॅसिस्ट शक्तींची मदत स्वातंत्र्यलढ्याकरिता घेण्यावरून त्यांचे मतभेद झाले असले, तरी त्यांचे परस्पर संबंध प्रेमादराचे होते, असे असे प्रतिपादन स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे अभ्यासक राज कुलकर्णी यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘नेताजी आणि पंडितजी : वैचारिक भूमिका आणि परस्पर संबंध’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्याख्यानास प्रमुख पाहुणे चंद्रशेखर पवार उपस्थित होते.

दोन तासांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात अनेक ऐतिहासिक संदर्भ देत, ओघवत्या शैलीत कुलकर्णी यांनी नेताजी आणि पंडितजींच्या कालखंडाचा व्यापक पट श्रोत्यांसमोर उभा केला. कुलकर्णी म्हणाले, नेताजींच्या गूढ मृत्यूमुळे अनेकांनी विविध कारणांनी पं. नेहरूंबद्दल आणि नेताजींबद्दल प्रवाद निर्माण केले. परंतु त्यात ऐतिहासिक तथ्य नाही. नेहरू आणि नेताजींच्या भूमिका दुसऱ्या महायुद्धापर्यंत समान होत्या. किंबहुना नेताजी हे नेहरूंपेक्षा अधिक डाव्या विचारसरणीचे होते. त्याचे स्पष्ट प्रत्यंतर आपल्याला नेताजींनी स्थापन केलेल्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाच्या जाहीर उद्द‌िष्टांवरून येते. १९३९ साली नेताजींनी त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याशी मतभेद व्यक्त करण्याकरिता अ. भा. काँग्रेस कार्यकारणीच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मात्र एकटे नेहरूच नेताजींच्या पाठीशी उभे राहिले.

नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या विदेशी पत्नी व मुलीची काळजी नेहरूंनी अखेरपर्यंत वाहिली. मात्र त्याची प्रसिद्धी कधी केली नाही. एवढेच नव्हे तर पं. नेहरूंच्या मुत्सद्दीपणामुळे आणि वकिली कौशल्यामुळे आजाद हिंद सेनेतील अधिकारी शिक्षेतून मुक्त झाले व नेहरूंनी त्यांच्यापैकी अनेकांना उच्चपदांवर नियुक्त केले, हा इतिहास आहे. तरीही नेहरुंवर नेताजींसंदर्भात दोषारोप केले जातात. यामागे नेताजीबद्दलचा आदर नसून पं. नेहरूंबद्दलचा द्वेष आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे असे कुलकर्णी म्हणाले. या व्याख्यानाला शहरातील साहित्य क्षेत्रातील श्रोते उपस्थित हातेे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी पेटणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतीसिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातील पाणी वाटपातील नेहमीचीच अनियमितता व प्रशासनाचे करारानुसार ठरलेल्या कोट्यातील पाणी न देण्याचे धोरण यामुळे येवला तालुक्यातील पाणीवापर सहकारी संस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका बघता हा पवित्रा आता मागे घेण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पाणीवापर संस्थांनी आपल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुरू असलेल्या आवर्तनातील पाणी वाटप करण्यास असमर्थता दर्शविली आहे. ‘आम्हाला पाण्याचा हिशोब कळत नाही, क्युसेस कळत नाही. आता तुम्हीच पाणी वाटप करताना शेतकऱ्यांना तोंड द्या...अशी भूमिका पालखेड येवला उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांसमवेत झालेल्या बैठकित पाणी वाटप सहकारी संस्थांनी घेतली. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागापुढे पेच निर्माण झाला आहे.

पालखेड डाव्या कालव्यावरील वितरीका क्रमांक ३३ ते ३५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी व संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (दि. २०) पालखेड पाटबंधारे येवला उपविभागाचे सहाय्यक अभियंता वैभव भागवत यांनी घेतली. या बैठकीत पाणी कोटा व पाणी वाटप धोरणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. अधिकारी नेहमीच केवळ मोठमोठी आकडेवारी दाखवून संस्था पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. ही आकडेवारी आमच्या समजण्या पलीकडची असून ती तुमच्याच जवळ ठेवा. आम्हाला कशासाठी दाखवतात, असा सूर यावेळी संतप्त शेतकऱ्यांसह पाणीवापर संस्थांच्या अध्यक्षांनी लावला. यंदा दोन आरक्षण मिळणार असले तरी पहिल्या आरक्षणात मात्र शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणार नसल्याने पाणी वापर संस्थांनी विद्रोह पुकारला आहे. कोणतीही संस्था पाणी घेणार नसून पाणी वाटप प्रशासनानेच करावे, असे मत संतू पाटील झांबरे, बाबासाहेब थेटे, प्रभाकर रंधे, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल यांनी व्यक्त केले.
पाणी वापर सहकरी संस्था अस्तित्वात नव्हत्या. त्यावेळी पालखेडच्या कर्मचाऱ्यांमार्फतच शेतकऱ्यांना पाणीवाटप होत असे. आता पाणी वाटप करण्यास पाणीवापर संस्थांनी नकार दिल्यावर व पालखेड विभागानेच पाणी वाटप करायलाच पाहिजे.

- अनिस पटेल, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, येवला

सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल, यासाठी आपण सार्वजनिक प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसह पाणी वापर सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. सहकार्य मिळाल्यास पाणीवाटप सुरळीत करता येईल.- वैभव भागवत, सहाय्यक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज नाशिकला शक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकमध्ये गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्याच्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देवळालीचे आमदार योगेश घोलप यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत नाशिकमध्ये स्वतंत्र गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असूनही नाशिकमध्ये अद्यापही गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेजची कमतरता आहे. या कमतरतेमुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांना इतर शहरांतील कॉलेजेसवर अवलंबून राहावे लागते. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार घोलप यांनी ही मागणी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार घोलप यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन नाशिकमध्ये एकमेव गव्हर्नन्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज असून, एकही गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज नसल्याची बाब लक्षात आणून देत नाशिकमध्ये ते सुरू करण्याची मागणी केली. नाशिकमध्ये मोठ्या संख्येने खासगी शिक्षण संस्थांची पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंग कॉलेजेस आहेत. परंतु, त्यांचा खर्च बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. परिणामी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण मोठे आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी, तसेच नाशिकमध्ये सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी या मोठ्या औद्योगिक वसाहतींबरोबरच नोट प्रेस, एचएएल कारखाना, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुरेशी जागाही उपलब्ध असल्याने येथे स्वतंत्र गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज गरजेचे असल्याची बाब आमदार घोलप यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या या मागणीचा राज्य सरकारकडून सकारात्मक विचार करून नाशिकमध्ये नव्याने गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेजला परवानगी दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नाशिकमध्ये येत्या काळात गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण मुलापाठोपाठ हरपला आधारवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/देवळाली कॅम्प

चरितार्थाचा गाडा हाकणाऱ्या कर्त्या शेतकरी मुलाने आत्महत्या केल्याची वार्ता असह्य झाल्यामुळे वृद्ध पित्यानेही शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. पाच दिवसांत दोन आधारवड हरपल्याने भगूर येथील शिरसाट कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नियतीच्या या दृष्ट खेळामुळे शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारी‌पणाचा संवेदनशील मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भगूर परिसरात शिरसाट कुटूंब गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहते. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श घालून देणाऱ्या या कुटुंबाला एका मागोमाग दोन मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. पत्नी आणि भावाने शेतीकरीता घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने जगदिश बहिरू शिरसाट (वय ३७) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी सकाळी परिसरातील रुळावर रेल्वेखाली आत्महत्या केली. जगदिश शिरसाट यांनी भगूर शेतकी सोसायटीमधून भाऊ संदीप यांच्या नावे ९५ हजार रुपयांचे तर पत्नी सुरेखा यांच्या नावे ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याखेरीज इतरांकडूनही पिकासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर नियमित कर्जफेडीला सरकारी १८ हजार ४९२ रुपये अनुदान जिल्हा बँकेत जमा झाले. ते घेण्यासाठी शिरसाठ बँकेत गेले. त्यावेळी हजार रुपयांचा हप्ता निश्चित करून दिला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. हाती पैसे नसल्याने आणि उसनवारीच्या तगाद्यांमुळे व्यथित झालेल्या जगदिश यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुम्ही प्रोत्साहन कर्ज दिले. पण नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीचा त्रास होत असल्याने पुढील काळात माझी पत्नी सुरेखा आणि परिवाराला सरकारकडून न्याय मिळावा, अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली होती. जगदीश यांच्या मृत्यूची वार्ता त्यांचे वडील बहिरू सुखदेव शिरसाट (वय ७१) यांच्यापासून लपविण्यात आली. शुक्रवारी (दि. २२) त्यांनी ही दु:खद वार्ता समजली. बहिरू शिरसाट यांनी या घटनेचा धसका घेतला. त्यातच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचाही आज मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दुःखातून सावरत नाही तोच आधारवडही निखळल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images