Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नव्या घरांवर जादा करभार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपाट प्रश्नामुळे शहरातील बांधकाम विभागाची अगोदरच कोंडी झाली असतांना प्रशासनाने आता नवीन घरे घेणाऱ्यांना दुसरा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रधान महालेखाकारांचा आक्षेप आणि महापालिकेच्या आर्थिक नुकसानीचा संदर्भ देत नवीन मालमत्तांच्या घरपट्टीत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने महासभेत जादा विषयात घेतला आहे. एप्रिल २००१७ नंतर नोंदणीकृत होणाऱ्या मालमत्तांवर हा वाढीव कर आकारला जाणार आहे. नवीन मालमत्तांचे कर योग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याच्या या प्रस्तावावर महासभेत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील मालमत्ता रडारवर घेतल्या असून त्यांच्याकडून अधिकाधिक वसुलीसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या मालमत्तांवर पाच ते पंधरा टक्के करवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असताना आता नवीन मालमत्तांवर थेट ४० टक्के करवाढीची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या घरपट्टी आकारणीचे दराच्या दरात गेल्या १७ वर्षांपासून कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रधान महालेखाकाऱ्यांनी वेळोवेळी आक्षेप नोंदविले आहेत. केंद्र सरकार प्रतिवार्षिक महागाई निर्देशांक निश्चित करीत असतात. त्यानुसार १९९९-२०००मध्ये महागाई निर्देशांक ३८९ रुपये असून २०१६-१७चा महागाई निर्देशांक ११२५ रुपये दर्शविला आहे. यात सुमारे २८९.२० टक्के वाढ झाली आहे. १९९९ मध्ये महापालिका हद्दीतील मिळकती, जमिनींचे शीघ्रसिद्ध गणक अर्थात रेडिरेकनरचे किमान दर ५,२२० रुपये होते. २०१७-१८ मध्ये हेच किमान दर २२,२०० रुपये आहेत. यात सुमारे ४२५.२८ टक्के वाढ झाली आहे.

सुधारित मूल्यांकन अपेक्षित
सद्यस्थितीत महापालिकेने मालमत्तांच्या मूल्यांकनाचे वाजवी भाड्याचे आरसीसी, निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौरस फुटास ०.५० रुपये आहे. त्यात ४२५.२८ टक्के वाढ केल्यास २०१७-१८ या आर्थिक वर्षात हेच दर प्रति चौरस फुटास २.१२ रुपये इतके असणे अपेक्षित होते. तसेच आरसीसी बिगरनिवासी मालकत्तेचे कमाल दर प्रति चौरस फुटास १.८० रुपये असून त्यात ४२५.२८ टक्के वाढ केल्यास २०१७-१८ या आर्थिक वर्षात हे दर प्रति चौरस फुटास ७.६५ रुपये असणे अपेक्षित होते. परंतु, सध्या या मिळकतींवर १९९९-२००० च्या मूल्यांकनाच्या दरानुसार कर आकारणी सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या मालमत्ता करात ४० टक्के करवाढ करावी, असा प्रस्ताव जादा विषयात महासभेसमोर ठेवला आहे. ज्या मिळकती १ एप्रिल २०१७ पासून नवीन अस्तित्वात आल्या अथवा तयार झाल्या अशा जमिनी व इमारतींवर वाजवी भाडे त्या-त्या भागानुसार सुधारित मूल्यांकन करता येईल. मात्र, त्यात अधिनियमातील तरतुदींनुसार ४० टक्क्यांपेक्षा वाढ करता येणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनर्ससाठी बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी आधार तसेच मोबाइल क्रमांक घेताना निवृत्तीवेतनधारकांची परवड होऊ नये, यासाठी बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी सर्व बँकांना दिले.

जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी निवृत्तीधारकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पेन्शन आणि तत्सम सरकारी लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असणे अनिवार्य आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ज्येष्ठांची परवड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. निवृत्त ज्येष्ठांसाठी बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावा, असे आदेश त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. यामुळे वयोवृद्धांची परवड थांबण्यास मदत होणार आहे.

जानेवारीत स्वतंत्र पंधरवडा
प्रत्येक बँकेने ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. या क्रमांकावर निवृत्ती वेतनधारकांनी संपर्क साधल्यास बँकेचे प्र्रतिनिधी थेट संबधितांच्या घरी जाऊन आधार लिंक करतील. यासाठी जानेवारी महीन्यात स्वतंत्र पंधरवडा राबविण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारकांप्रमाणेच अंध व दिव्यांग व्यक्तींनाही ही सुविधा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आधार लिंकिंगसाठी प्रत्येकवेळी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाइल तसेच एटीएमद्वारेही आधार लिंकिंग करणे शक्य असल्याने नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकावर उपोषणाची नामुष्की

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपाची सत्ता असून वरिष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी सर्वसाधारण सभेत मागणी केलेले नागरी विकास‍कामे जिल्हा व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व रक्षा संपदा विभागाच्या किचकट अटींमुळे मार्गी लागू शकलेली नाहीत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मोजाड यांनी दिला आहे.

उपोषणाबाबत नगरसेवक मोजाड यांनी भाजपचे सर्व नगरसेवक व शहर पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांची भेट घेत लेखी पत्र दिले. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात सर्वात ज्येष्ठ नगरसेवक असलेले बाबुराव मोजाड यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनास दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे अंबड गावाने आपल्या जमिनी १९४८ मध्ये लष्कराला दिल्या. त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वे नंबर ३ व १७७ या सरकारी जागेवर पूनर्वसनास परवानगी दिली. १९८५ पासून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी नगररचना आराखडा तयार करून दिलेला नाही. येथे राहणाऱ्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबतचा प्रश्न २० वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी नगरसेवक मोजाड हे १९८५ पासून पाठपुरावा करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना सहकार्य मिळालेले नाही.

शिंगवे बहुला, अंबडवाडी, चारणवाडी, सोनेवाडी या भागात २००८ मध्ये रस्त्याचे सर्व्हे करून हद्दी खुणा कायम केल्या आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण करण्याकामी घर मालकांचे संमतीपत्र सादर करूनही कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी अतिक्रमणे हटवित नाहीत. परिणामी अतिक्रमण समस्या कायम राहिल्याने वाहतूक कोंडी सुटू शकलेली नाही. दुर्घटना झाल्यास गावात फायर ब्रिगेड व अॅब्युलन्ससारखी वाहने शिरण्यास अडथळा होतो. गावातील काही नागरिकांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यास रस्ते बनविणे सोयीचे होईल. यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासन संबंधित अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शवित असल्याने गावातील रस्ते अरुंद होत आहेत. याशिवाय परिसरात रस्त्यांची दुरवस्था, मुख्य ठिकाणी हायमास्ट, देवळाली बाजार भागातील रस्त्यावर व बायलेनमधील अतिक्रमण व चारणवाडी ते शिंगवे बहुला पाथवेचे काम लवकर सुरू करावे, अशा विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

गेल्या ३० वर्षांपासून नगरसवेक असूनही माझ्याच गावाचा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. नागरी विकासाकामात प्रशासनाला गांभीर्य आणि त्यांच्यात समन्वय नसल्याने लोकशाही मार्गाचा अवलंब करीत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
- बाबुराव मोजाड, नगरसेवक, कॅन्टोन्मेंट बोर्ड

नागरिकांच्या विकासासाठी नगरसेवक मोजाड यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. बोर्डात नगरसेवकांनीच सुचवलेली कामे होत नसतील तर सामान्य जनतेचे काय? भाजप नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील.
- प्रमोद मोजाड, शहरप्रमुख, युवासेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशरूम फॅक्टरी ग्रामस्थांनी केली बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिरावणी गावातील लोणे वस्तीजवळ वर्षभरापासून सुरू असलेली मशरूम कंपनी ग्रामस्थांनी पुढाकार घेत बंद पाडली आहे. या फॅक्टरीमुळे महिरावणी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते. विशेष म्हणजे या फॅक्टरीतील पाणी थेट नंदिनी नदीत सोडले जात होते.

मशरूम फॅक्टरीमधील दूषित पाण्यामुळे महिरावणी गावातील लहान मुले आजारी पडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मनसे तालुकाध्यक्ष तथा उपसरंपच रमेश खांडबहाले यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. फॅक्टरी व्यवस्थापनाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर उपसरंपच खांडबहाले यांनी घटनास्थळाची पुन्हा पाहणी केली. प्रदूषणाची पातळी हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्याने स्थानिक गावकऱ्यांनी सर्व कामगारांना बाहेर बोलावून फॅक्टरी तात्काळ बंद केली. प्रदूषणाच्या समस्येवर जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत फॅक्टरी सुरू होऊ दिली जाणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

या प्रसंगी उपसरंपच खांडबहाले यांच्यासह सुधाकर लोणे, माधव गोराळे, बहिरू मटाले, विलास लोणे, राजाराम लहंगे, विजयानंद वाघ, सोपान खांडबहाले, तानाजी गोराळे, नाना आगळे, लक्ष्मीबाई लोणे, जिजाबाई लोणे, आशाबाई लोणे, मंदाबाई लोणे, सुनीता लोणे, मनीषा लोणे आदी शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचा मोर्चा श्रमिकनगरकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वडाळागावातील शंभर फुटी रोडवरील तब्बल चारशेहून अधिक झोपड्यांची अतिक्रमणे हटविल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आता कारवाईचा मोर्चा गंजमाळ येथील श्रमिकनगर झोपडपट्टीकडे वळवला आहे. येथील झोपडपट्टी धारकांना घरकूल योजनेत घर मिळूनही ताबा सोडत नाहीत. त्यामुळे श्रमिकनगरमधील झोपड्यांच्या अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर लवकरच फिरविला जाणार आहे.

पंधरा वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या वडाळागावातील शभंर फुटीरोडवर झोपड्यांचे अतिक्रमण महापालिकेने काढले. त्यापाठोपाठ आता श्रमिकनगरवर कारवाई सुरू केली आहे. श्रमिकनगरमधील ३०० झोपडीधारकांची वडाळा शिवारातील घरकूल योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, घरकुल वाटपासाठी ड्रा काढण्याचा महापालिकेने दोनदा प्रयत्न करूनही लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे झोपडी निर्मूलनाच्या घरकुल योजनेच्या मूळ उद्देशालाच अतिक्रमित झोपडीधारकांनी हरताळ फासल्याचे यातून समोर आले होते. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमित झोपडीधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, महापालिकेच्या या आवाहनाला झोपडीधारकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेला कारवाईचे हत्यार उपसावे लागत आहे. महापालिकेने आता या झोपड्या बळपूर्वक हटविण्याची तयारी केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागातील सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

राहत्या ठिकाणी हवे पूनर्वसन
महापालिकेच्या प्रस्तावित कारवाईला कडाडून विरोध दर्शवित राहत्या ठिकाणीच घरकुलांची उभारणी करून पूनर्वसन करण्याच्या मागणीसाठी गंजमाळ येथील श्रमिकनगरवासियांनी केली आहे. दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. सदर जागेवर झोपडीधारक ५० ते ६० वर्षांपासून राहत आहेत. परिसरातच मोलमजुरी करून हे झोपडीधारक उदरनिर्वाह करीत आहेत. झोपडीधारकांची मुले परिसरातील शाळेतच शिक्षण घेतात. सदर झोपडपट्टी अधिकृत घोषित असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल योजनेसाठी लाभार्थी निश्चितीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या झोपडीधारकांना वडाळा शिवारात वा अन्य ठिकाणी घरकुले न देता राहत्या ठिकाणीच घरकूलांची उभारणी करून त्यांचे पूनर्वसन करावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा राडा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील शिवसेना व भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अद्वय हिरे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद (लकी) खैरनार व पंचायत समिती सदस्य गणेश (विकी) खैरनार यांच्यावर कॅम्प भागात राज्यमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा सेना भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या प्रकरणी प्रसाद खैरनार (वय २२, रा. सोयगाव नववसाहत मालेगाव) यांनी छावणी पोल‌सि ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारस फिर्यादी प्रसाद खैरनार व त्यांचे मित्र एका दुकानातून खरेदी करून भाजप नेते अद्वय हिरे यांच्या वाहनातून (एमएच १२ एफएफ ७८६) कॅम्प रस्त्याने वनविभागाच्या कार्यालयजवळून जात होते. त्यांच्या पाठीमागून अविष्कार भुसे व त्यांचे मित्र राहुल गायकवाड, विकी चव्हाण आले. त्यांनी खैरनार यांची गाडी अडवून तोडफोड केले. तसेच प्रसाद खैरनार यांना मारहाण केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खैरनार यांचे बंधू भाजपचे पंचायत समिती सदस्य गणेश खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या वाहनावरही (एम एच ४१ व्ही ७७९१) हल्ला केला. हल्लेखोरांनी खैरनार बंधू व अक्षय राणा यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करून दमदाटीही केली. रात्री उशिरा छावणी पोल‌सि ठाण्यात अविष्कार भुसे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणातील आरोपी राहुल गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तो जखमी असल्याने त्यास नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मालेगाव की बिहार?

हिरे यांच्या कार्यालयापासून या मोर्चास प्रारंभ झाला. प्रांत कार्यालय प्रांगणात मोर्चाचा समारोप झाला. ‘तालुक्यात सेनेची गुंडगिरी, मंत्री पुत्राचा प्रताप जनता भयभीत, मालेगाव की बिहार? शिवसेनेच्या गुंडांचा करा विचार,’ असे फलक झळकले.

उपोषणाचा इशारा

प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील आविष्कार भुसे सध्या फरार आहे. त्यांना बुधवारपर्यंत अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराला बजावली नोटीस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिका प्रशासनाने महाराष्ट्र टाइम्समधील आग विझणार कशी? या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे. अग्निशमक केंद्र उभारणीचे काम बंद ठेवल्यामुळे ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारकडे अग्निशामक विभागातील राज्यसंवर्गातील पद तातडीने भरण्याची मागणी केल्याची माहिती मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली.

गेल्या आठवड्यात (दि. १७) महाराष्ट्र टाइम्सने ‘आग विझणार कशी’ या वृत्तातून शहरातील अग्निशामक विभागाची पो‌लखोल केली होती. या केंद्राचे काम रखडले असल्यामुळे पालिका प्रशासनाने वृत्त झळकताच सोमवारी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत सटाणा नगरपरिषदेने शहरातील नवीन अमरधामलगत ५८ लाख रुपये खर्च करून स्वतंत्र व सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या केंद्राचा सांगाडा उभारून काम अपुर्णावस्थेत आहे. याबाबत वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासनाला जाग आली. त्यांनी तत्काळ संबंधित ठेकेदाराला पाचारण केले. ठेकेदारांचे बील अदा करण्यास दिरंगाई झाल्या कारणाने त्यांनी कामास विलंब केल्याची माहिती असून त्यांना तात्काळ बिल अदा करण्यात आले आहे. सदरचे काम विनाविलंब सुरू करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सटाणा पालिकेच्या अग्शिमन केंद्राकडे आग विझविण्यासाठी असलेला बंब हा गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वीचा आहे. वस्तुस्थिती मान्य करून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी शासनाकडे अंगुली निर्देश करीत वाहनांची तांत्रिक माहिती परिवहन विभागाकडून आल्यानंतर भंगारमध्ये काढण्यात येत असल्याने, आम्ही काहीही करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. पर्यायी दुसरा बंब घेण्यास शासनाच्या निकषांची अडचण समोर असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकारी मिळणार!

दरम्यान, अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक हे राज्य संवर्गातील पद सटाणा नगर परिषदच्या प्रशासन विभागात मंजूर आहे. मात्र असे असतांनाही गेल्या काही वर्षांपासून हे पदच रिक्तच आहे. यामुळे शासनाकडून पूर्णवेळ तांत्रिक व प्रशिक्षित अधिकारी मिळावा अशी मागणी करण्यात आली आल्याचे डगळे यांनी सांगितले.

‘ते’ अधिकारीही वैतागले

सद्यस्थितीत लेखा विभागातील मनोहर बोरसे यांच्याकडे अर्धवेळ व प्रभारी अधिकारी म्हणून अग्निशमन विभागाचा कार्यभार आहे. याशिवाय बोरसे यांच्याकडे घंटागाडी, वैकुंठ रथ आदींचीही जबाबदारी आहे. त्यामुळे बोरसे यांनी आपणास इतर जबाबदारीतून मुक्त करून लेखाविभागातील कामास पूर्णवेळ नियुक्ती द्यावी, अशी लेखी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

खालप (ता. देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची परस्पर खासगी व्यक्तीला विक्री करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी चार महिन्यांपूर्वी करुनही संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही होत नाही, त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा खालप येथील युवा कार्यकर्ते कैलास देवरे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

खालप येथील ग्रामपंचायतीची लोहोणेर येथील गिरणा नदीकाठालगत गट नंबर ७९ मधील विहीर सरपंच, त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी गावातील नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर खासगी व्यक्तीला विक्री केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पंधरा दिवसात संबंधितांवर कार्यवाही झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विकासाची संकल्पना एकांगी वाटते’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आपल्या अर्थव्यवस्थेने उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासूनच विकास वेडा झाला असून, गेल्या तीन वर्षांत तर तो कामातून गेला आहे. अलीकडच्या काळात विकासाची संकल्पना एकांगी झाली आहे. त्यामुळेच विकास कशाला म्हणायचे याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आर्थिक व राजकीय विश्लेषक आणि लेखक बी. युवराज यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘वेडा विकास शहाणा कसा होईल.? जागतिकीकरण आणि पर्यायी विकासनीती’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह हे होते.

बी युवराज म्हणाले, खासगीकरण,उ दारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण आपल्या देशाने स्वीकारुन पंचवीस वर्षे उलटले आहेत. या दरम्यान देशातील नागरिकांच्या जगण्याचा संघर्ष सुरू असून, तो दिवसेंदिवस कठीण होत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या मूलभूत गरजाही पुरेशा भागत नसतील तर ज्याला विकास म्हटले जाते आहे ती केवळ एकांगी वाढ किंवा सूज आहे हे मान्य करावे लागेल.

युवराज यांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांवरही टीका केली. ते म्हणाले, अधिक गुंतवणूक म्हणजे अधिक विकास असे चित्र सध्या निर्माण केले जात आहे. मात्र ज्याचा या देशातील सामान्य जनतेशी सामाजिक गरजांशी काहीही संबंध नाही अशी बुलेट ट्रेन, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारखी डोळे दिपवून टाकणारी स्वप्ने दाखवून आपली दिशाभूल सरकार आणि राजकीय पक्ष करीत आहे. हे बदलण्याकरिता जागृत होण्याची,आपले हक्क आणि निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याची शक्ती जनतेने मिळविणे गरजेचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००९ साली झालेल्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले होते. यात मालेगाव येथील तत्कालीन मनसेचे नेते व भाजपचे विद्यमान महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनमाड चौफुली येथे आंदोलन केले होते. या प्रकरणी आज गायकवाड यांना एक जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मध्ये २००९ छावणी पोल‌सिात २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने गायकवाड यांना वेळोवेळी सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात वॉरंट जारी केले होते. मात्र वॉरंट बजावूनही गायकवाड हजर न राहिल्याने न्यायालयाने यांच्या विरुद्ध अजमीनपात्र वॉरंट काढले होते. छावणी पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अजमीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर ते सकाळी येथील छावणी पोल‌सि ठाण्यात हजर झाले होते. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून दुपारी येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना पोल‌सि कोठडी सुनावली आहे. गायकवाड हे सध्या भाजपचे महानगरअध्यक्ष असून त्यांनी सुरुवातीला मालेगाव विकास आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आता भाजपवासी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार गावांमधील ‘लकी ड्रॉ’ स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कन्येला ‘लकी ड्रॉ’मध्ये गॅस एजन्सी मिळाल्याने निवड पद्धतीवरच हरकत नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली असून तक्रारींमुळे चार तक्रारींचे ड्रॉ स्थगित करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी याबाबत चौकशी करणार आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) कंपनीने जिल्ह्यात वितरक वाढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले. सोडत पद्धतीने एजन्सी वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. लकी ड्रॉ पद्धतीने २२ पैकी १८ ठिकाणांसाठी सोडत काढली. पहिल्या दिवशी १३ तर नंतर पाच ठिकाणांची सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील नलवाडपाडा, निमगाव, महालपटनी, देव डोंगरा या चार गावांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या गॅस एजन्सीचा ऑनलाइन लकी ड्रॉ नागरीकांच्या तक्रारींमुळे स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या चारही गावांचे ड्रॉ नंतर काढण्यात येणार असल्याचे एचपीसीएलच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या दिवशी खासदार चव्हाण यांच्या कन्या स्नेहल सुभाष भोये ‘लकी ड्रॉ’मध्ये लाभार्थी ठरल्या. मर्जीतील व्यक्तींनाच एजन्सी देण्यात आल्याचा आरोप करीत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, प्रशासन उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांच्याकडे सोपव‌िले आहे.

या गावांमधील ड्रॉ मंजूर
बार्हे, धारगाव, ठाणगाव, कळवाडी, डांगसौदाणे, जातेगाव, न्यायडोंगरी, देशमाने बुद्रुक, टिंगरी, पळसविहिर, अलियाबाद, हातगड, कनाशी, खर्डे दिगार, मुखेड, चिरचवे (गळाणे), भारम, कानलमंडले

या गावांचा ड्रॉ स्थगित
नलवाडपाडा, निमगाव, महालपटनी, देवडोंगरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरीवर जंगल निर्माण करणे शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीचे नैसर्गिक पद्धतीने प्रवाह वाढवितानाच ब्रह्मगिरी पर्वतावरही जंगल निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना केले आहे.

नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने गोदावरी सन्मान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, फाउंडेशनचे राजेश पंडित, किरण भालेराव, सुनील मेंढेकर, रोहन देशपांडे, सुनीता पलोड आदींसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थ‌ित होते. ब्रह्मगिरी पर्वतावर पुन्हा नैसर्गिक पद्धतीने जंगल कसे निर्माण करता येईल? ब्रह्मगिरी परिसर ते रामुकंड या दरम्यान ९२ कुंड असून त्यांच्या पुनर्जिवनाबाबतही बैठकीत चर्चा झाली. गोदावरीचा नैसर्गिक पद्धतीने प्रवाह वाढव‌िणे, शालेय विद्यार्थी, विविध स्तरातील लोकांचा सहभाग घेऊन ब्रह्मगिरीचे व प्राचीन कुंडांचे पूनर्जिवन केल्यास संस्कृतीचे जतन आणि निसर्गाचेही संरक्षण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यटनवाढीलाही याचा फायदा होणार असून सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या आमदारांना रस्त्यासाठी जास्त निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भाजपाच्या आमदारांना ७० टक्के निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना केवळ ३० टक्के निधी दिला जात आहे. म्हणून ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप आमदार योगेश घोलप यांनी केला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांना वाढीव निधी मिळावा या मागणीसाठी नागपूर विधानभवनाबाहेर देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप यांनी आंदोलन केले. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार किशोर पाटील, आमदार डॉ. मिणचेकर आदी सहभागी झाले.

ग्रामीण भागात रस्त्यांना वाढीव निधी मिळावा यासह इतर मागण्यांचा फलक फडकावून आमदार घोलप व ग्रामीण भागातील चार आमदारांनी विधानभवनासमोर अनोखे आंदोलन केले. नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे, या रस्त्यांसाठी वाढीव निधी द्यावा यासाठी हे आंदोलन होते. घोलप म्हणाले, की ग्रामीण भागात रस्त्यांअभावी विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. या भागात वाहतूकीची कोणतीही सुविधा नसल्याने महिलांना मोठा त्रास सहन लागतो. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने बससेवा पूर्णपणे मिळत नाही. रस्त्याच्या कामांसाठी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे मोठी समस्या निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना श्रमदानाशिवाय पर्याय उरत नाही. शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर होती. मात्र, अद्याप रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. याबाबत शासनाने योग्य कार्यवाही करून ग्रामीण भागातील रस्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी वसुलीसाठी सरसावल्या बँका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्च महिना जवळ येऊ लागल्याने बँकांनी कर्जदारांकडे थकलेल्या हप्त्यांचा तगादा लावणे सुरू केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट्य गाठण्यावर प्रत्येक बँक वसुली प्रतिनिधींनी भर दिला आहे.

मार्च महिना जवळ येत असल्याने बँकांनी आपली वसुली कडक करण्यास सुरुवात केली आहे. अनियमित कर्जदारांच्या घरी वसुलीसाठी माणसे पाठविणे सुरू केले असून काही लोकांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मार्च अखेरीस बँकांना आपल्याकडील ताळेबंद रिझर्व बॅँकांना सादर करावा लागतो. पैसे देण्याचे प्रमाणे आणि वसुलीचे प्रमाण योग्य असेल तर बँकांचे कौतुक केले जाते; परंतु वसुली व्यवस्थित नसेल तर कारवाईलाही तोंड द्यावे लागते. यासाठी बँकांनी आतापासून थकबाकीदारांच्या घरचे वसुलीसाठी कर्जदारांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. मोठ्या रकमेचे हप्ते शिल्लक आहेत अशा कर्जदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. काहींच्या घरी पोस्टाने पोच दिली जात आहे. काही बँकांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. थकलेले कर्ज एकरकमी भरण्यास तयार असलेल्या कर्जदारांना व्याजात सवलत देऊ केली आहे.

सरकारी बँका आपल्या थकबाकीदारांना सौम्य शब्दात माह‌िती ‌देत आहेत. तर काही खासगी बँकांनी वसुलीसाठी ‘खास’ माणसे नेमली आहेत. काही लोकांनी वसुलीसाठी चेक दिले, ते चेक बाउन्स झाले आहेत. त्यानाही नोटिसा प्रसिध्द केल्या जात आहेत. जे कर्जदार सापडत नाहीत अशा थकबाकीदारांसाठी जामीनदार राहिलेल्या व्यक्तींवर कर्जवसुलीसाठी दबाव टाकला जात आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नावांमध्ये समावेश असलेले जामीनदारही हवालदिल झाले आहेत.

सध्याच्या अस्वस्थ व सामाजिक अर्थिक परिस्थितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही नेते थकबाकी वसुलीत अडथळे निर्माण करतात. तसे त्यांनी करू नये. कर्जमाफी हवी; परंतु तिच्या बऱ्या वाईट परिणामांपैकी एक परिणाम म्हणजे बँकेची कर्जपरतफेड होय. बँकानी वसुली करताना एक तंत्र जपावे. बडे मालदार व कर्जबुडव्यांची वसुली सक्तीने करावी.
- अरुण कुकडे, निवृत्त बँकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजीनगरमध्ये गुदामाला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील पवारवाडीजवळील बालाजीनगरमध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुशनच्या गुदामाला मोठी आग लागली. त्यात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या तीन बंबांनी आग वेळीच विझविल्याने मोठी हानी झाली नाही.

बालाजीनगरमध्ये आरीफ अन्सारी यांचे क्लासिक कुशन नावाचे आहे. त्यांनी शाहीद अन्सारी यांच्या परवान्याच्या आधारे पत्र्याचे कुशनसाठी दीड वर्षांपूर्वी गुदाम उभे केले आहे. सायंकाळी गुदामामध्ये कोणी नसताना अचानक आग लागली. शेजारी दाट लोकवस्ती असल्याने दुर्घटनेची भीती होती. नाशिकरोडच्या दोन व पंचवटीच्या एका बंबाने २० मिनिटात आग आटोक्यात आणली. नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे, प्रकाश बोराडे, गणेश सातभाई, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाचे अधिकारी सी. एन. भोळे, एस. के. गायकवाड, डी. आर. गाडे, एस. एस. पगारे, व्ही. के. ताजनपुरे, वाय. व्ही. मोरे, एस. एल. पाटील, आर. एस. बैरागी, बी. व्ही. आहिरे, आर. एक. मानकर आदींनी पराकष्टा करून आग आटोक्यात आणली. शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाध्याय परिवारातर्फे आज वक्तृत्व स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीमद भगवद्गीता जयंतीनिमित्त स्वाध्याय परिवाराच्या वतीने आयोजित गीताजयंती वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (दि. २१) पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख मार्गदर्शक धनश्री तळवलकर उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबक रोडवरील लवाटेनगर परिसरातील ठक्कर डेव्हलपर या मैदानावर ही स्पर्धा सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

स्पर्धेला यंदाही नाशिक विभागातून युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यांमधून सुमारे ३७ हजार तरुणांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती स्वाध्याय परिवाराच्या वतीने देण्यात आली. या अंतिम फेरीत स्पर्धक ‘गीता तेजाचे दर्शन : मानवमूल्य संवर्धन’या विषयावर विचार मांडणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाध्याय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे यंदा ४१ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी भारतातील विविध राज्यांसह इग्लंड, अमेरिका, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, सिंगापूर, थायलंड आदी देशांमध्येही या स्पर्धा स्वाध्याय परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आल्या. विशेष म्हणजे गीताजयंती निमित्त ही स्पर्धा विविध १८ भाषांमध्ये पार पडली. देशभरातून सुमारे साडेचार लाख तरुणांनी याधेत सहभाग घेतला. तरूण पिढीमध्ये गीता या ग्रंथातील विचारांचे चिंतनास या उपक्रमातून प्रेरणा दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून रोकड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खात्यामधून अज्ञात चोरट्याने सुमारे १४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने परस्पर लांबविले. एचडीएफसी बँकेच्या थत्तेनगर शाखेमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप धोंडीराम गुंडरे (४४, रा. निशिगंध अ‍ॅव्हेन्यू, दत्त मंदिर स्टॉप, उंटवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गुंडरे यांचे एचडीएफसी बँकेच्या थत्तेनगर शाखेत बचत खाते आहे. रविवारी अज्ञात भामट्यांनी त्यांच्या खात्यातील १४ हजार रुपये परस्पर लांबविली. पैसे काढल्याचा मेसेज मोबाइलवर आल्याने ही घटना उघडकीस आली.

तोतया पीएसआयची महिलेस शिवीगाळ

पीएसआय असल्याची बतावणी करीत फायनान्स कंपनीच्या थकबाकी वसुलीसाठी एकाने आपल्याला दमदाटी व शिवीगाळ केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नयना सातपुते (रा. कोहिनूर कॉलनी, राजीवनगर) यांनी तक्रार दिली आहे. सातपुते यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. सातपुते यांचे पती प्रितेश सातपुते घरी असताना त्यांच्या मोबाइलवर शनिवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. मी पीएसआय राणा बोलत असून तुम्ही फायनान्सचे पैसे तात्काळ भरा; अन्यथा अटक करील अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. अधिक तपास हवालदार राणे करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर काठेगल्लीत छापा

काठे गल्लीतील कॅमल हाउस परिसरात जुगार खेळणाऱ्या १२ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे दोन हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

कॅमल हाउस परिसरातील मोकळ्या जागेत काही नागरीक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी (दि. १९) सायंकाळी तेथे छापा टाकला. सुरेश वलटे याच्यासह ११ साथीदार पत्त्यांद्वारे जुगार खेळताना आढळून आले. संशय‌ितांच्या ताब्यातून दोन हजार ७०० रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरून बदनामी

बनावट फेसबुक अकाउंटद्वारे महिलेच्या पतीची बदनामी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा त्रिपाठी (रा. पपया नर्सरीजवळ) या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने त्रिपाठी यांच्या पतीचा फोटो वापरून अनू त्रिपाठी नावाचे बनावट फेसबुक अकाउंट सुरू केले. या अकाउंटवर पतीचे बदनामीकारक फोटो टाकण्यात आले. याबाबत पत्नीने सदर अकाउंटवर चॅटिंग करून जाब विचारला असता अज्ञाताने त्यांना अश्लिल भाषेत चॅटिंग केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी पुण्याचा अभ्यास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुण्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, विकासकामांची पाहणी करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुण्याचा एकदिवसीय अभ्यास दौरा केला. यावेळी पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचे कौतुक करून नाशिककरांसाठी अशाच पद्धतीने केंद्र सरकारला अपेक्षित विकासकामे राबविण्याचा विचार असल्याचे थविल यांनी सांगितले.

या दौऱ्यात थविल यांच्यासह मुख्य नगररचनाकार कांचन बोधले, मुख्य अभियंता मनोहर पोकळे, कंपनी सेक्रेटरी महेंद्र शिंदे यांचाही समावेश होता. नाशिक शहराचा स्मार्ट सिटी मोहिमेतील समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचे काम एक वर्ष अगोदर सुरू झाल्याने ते आघाडीवर आहे. नाशिकच्या पथकाने औंधमधील पुनर्रचना करण्यात आलेला रस्ता, सायकल लेन, प्लेसमेकिंग, नागरी समस्या निवारण व्यवस्था, आधुनिक वास्तुरचनाशास्त्रानुसार बनविलेले पदपथ, स्पीडब्रेकर, लोकांना बसण्यासाठीची खास व्यवस्था पाहिली. तसेच, सिंहगड रस्त्यावरील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि इतर सहकाऱ्यांकडून स्मार्ट सिटीअंतर्गत दृष्ट‌िपथात असणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती घेतली. कामाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यथाशक्ती वापर करत ‘कॉर्पोरेट टच’ देऊन कामे करणे आवश्यक आहे. विकासकामांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी करून घेतल्यास कामे अधिक लोकाभिमुख होतात. कार्यपद्धतीचा ढाचा स्मार्ट सिटी मोहिमेत बदलला जात आहे, असे प्रतिपादन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्टी फर्स्टलाच उड्डाण!

$
0
0

२३ डिसेंबरला केवळ शुभारंभाचा सोपस्कार

नाशिक : येत्या २३ डिसेंबरला विमानसेवेचा उद्‍घाटन समारंभ मोठ्या दिमाखात होणार असला तरी नाशिककरांना मात्र विमानसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तांत्रिक कारणास्तव एअर डेक्कनची विमानसेवा ३० डिसेंबरनंतरच उपलब्ध होणार आहे. तशी अधिकृत माहिती एअर डेक्कनने ‘मटा’ला दिली.

केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीने नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यातील मुंबई-कोल्हापूर ही सेवा आठवड्याभरासाठी लांबणीवर पडली आहे. त्यासाठी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. तर, नाशिक आणि जळगाव या दोन शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उद्‍घाटन येत्या २३ डिसेंबरला होत आहे. जळगाव-मुंबई या सेवेचा उद्‍घाटन सोहळा जळगाव विमानतळाच्या ठिकाणी दुपारी दीड वाजता तर नाशिक-पुणे या सेवेचा शुभारंभ सायंकाळी साडेसहा वाजता ओझर विमानतळाच्या ठिकाणी होणार आहे.

‘त्या’ दिवसांचे बुकिंग नाहीच

एअर डेक्कनने १५ डिसेंबर रोजी विमानसेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू केले. सेवा २३ डिसेंबरपासून सुरू होत असताना बुकिंग मात्र २२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, कंपनीने २२ ते ३० या कालवधीत स्लॉट बुक झाल्याचे त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केले. तसेच, ३१ डिसेंबरनंतरचेच बुकिंग एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर घेतल्याची खात्रीलायक माहिती ‘मटा’ला मिळाली आहे. बुकिंगला मोठा प्रतिसाद असून, तब्बल १५ दिवसांचे तिकीट बुक झाल्याचे त्यांच्या वेबसाईटवरच दिसून येत होते. प्रत्यक्षात अशा प्रकारचे बुकिंगच झाले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

विमानसेवा शनिवारपासून

नाशिक आणि जळगाव या दोन शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उद्‍घाटन येत्या शनिवारी, २३ डिसेंबर रोजी होत आहे. जळगाव-मुंबई या सेवेचा उद्‍घाटन सोहळा जळगाव विमानतळाच्या ठिकाणी दुपारी दीड वाजता तर नाशिक-पुणे या सेवेचा शुभारंभ सायंकाळी साडेसहा वाजता ओझर विमानतळाच्या ठिकाणी होणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याची विनंती एअर डेक्कनचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) कॅप्टन गोपीनाथ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे.

विमानसेवेच्या उद्‍घाटन सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी मान्यवारांना निमंत्रण पाठविले जात असून, त्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, नाशिककरांना अपेक्षित विमानसेवा या शुभारंभादिवशी सुरू होणार नसल्याची बाब स्पष्ट होत आहे.

विमानाची उपलब्धता

एअर डेक्कन कंपनीने नवीन विमानाची खरेदी करून नाशिक, जळगाव, पुणे आणि कोल्हापूर या सेवा सुरू करीत असल्याचे सांगितले. मात्र, हे विमान सेवेसाठी रुजू होण्यासाठी अवधी असल्याचे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच केवळ शुभारंभावेळी हिरवा झेंडा दाखविण्याच्या सोपस्कारापुरता कंपनीकडून विमान उपलब्ध केले जाणार आहे. मात्र, प्रवासी विमानसेवा देण्यासाठी विमान उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच येत्या ३० डिसेंबरपर्यंत कंपनीकडून नाशिक, मुंबई, जळगाव किंवा पुणे या शहरांसाठी कुठलीही सेवा दिली जाणार नाही. तशी अधिकृत माहिती कंपनीच्याच अधिकाऱ्याने ‘मटा’शी बोलताना दिली आहे. त्यामुळे २२ किंवा २३ डिसेंबरपासून सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना यंदाही विमानसेवेने हुलकावणी दिली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षातच नाशिककरांना सेवा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्वय हिरेंवरही गुन्हा दाखल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भाजप नेते अद्वय हिरे यांचे समर्थक खैरनार बंधूंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसेना-भाजप रस्त्यावर उतरलेली असतांना त्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुत्रांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. तर बुधवारी खैरनार यांच्यावरील हल्ल्यातील जखमी आरोपी राहुल गायकवाड यांनी देखील अद्वय हिरे व खैरनार बंधूंविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी येथील छावणी पोल‌सि ठाण्यात अद्वय हिरेंसह खैरनार बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाने मालेगावातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी मध्यरात्री खैरनार बंधुवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंगळवारी मूकमोर्चा काढून मंत्री भुसे यांचे पुत्र अविष्कार यांना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर दुसरा आरोपी राहुल गायकवाड हा जखमी असल्याने त्यास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्याच्या फिर्यादीवरून छावणी पोल‌सि ठाण्यात अद्वय हिरे, विकी खैरनार, लकी खैरनार व रोहित भामरे या चौघांवर ३०७सह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

राहुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत सोमवारी रात्री शहरातील साठफुटी रोडजवळ शिवनेरी कट्टा येथे गायकवाड हे मित्रांसोबत बसलेले असतांना अद्वय हिरे, लकी खैरनार, विकी खैरनार व रोहीत भामरे कार घेऊन आले. कुरापत काढून त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करून चाकूने हल्ला केला. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, खैरनार यांच्यावरील हल्ल्याच्या दोन दिवस उशिराने गायकवाड यांनी फिर्याद का दिली? असा प्रश्न उपस्थित झाला असून, या संपूर्ण प्रकरणास राजकीय रंग घेतला आहे.

हिरेंच्या अटकेची मागणी

खैरनार बंधूच्या हल्ल्याप्रकरणी भाजप व सेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली असून, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन देत अद्वय हिरे यांसह तिघांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने,

शहरप्रमुख रामा मिस्तरी, नेते बंडू बच्छाव, उपसभापती सुनील देवरे, विनोद वाघ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हिरेंसह

तिघांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येवून शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपकडून उपोषण

खैरनार बंधू हल्ला प्रकरणी भाजपच्या वतीने बुधवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण करण्यात आले. मंगळवारी अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येऊन अविष्कार भुसे यास अटक करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. उपोषणात आमदार अपूर्व हिरे यांच्यासह उपसभापती अनिल तेजा, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, लकी गिल, काशिनाथ पवार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images