Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धनत्रयोदशी : धन-धान्य अन् धन्वंतरीपूजन

$
0
0

अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीला धन, धान्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. याच दिवशी देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाल्याने धन्वंतरींच्या पूजनासही मोठे महत्त्व आहे.

भारत हा कृषी संस्कृतीला प्राधान्य देणारा देश असल्याने सणांवरदेखील कृषिक्षेत्राचा प्रभाव असतो. कृषी संस्कृतीत धान्य, धन यांच्या पूजेला महत्त्व असल्याने दिवाळीत धनत्रयोदशीला धन, धान्याचे पूजन करण्यासह या द‌िवशी सोने, चांदी खरेदीस महत्त्व द‌िले जाते. धनत्रयोदशीनिमित्त केल्या जाणाऱ्या दीपदानामुळे अपमृत्यू टळतो, अशीही भावना आहे. द‌िवाळीला सुरुवात झाल्याने या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेकडे केले जाते. दक्ष‌िणेस मृत्युदेवता यमाची द‌िशा मानली जात असल्याने आयुष्यरक्षणाची प्रार्थना मृत्युदेवतेकडे केली जाते. या द‌िवसाशी न‌िगडित एका आख्याय‌िकेनुसार मृत्युदेवता यमाने एक द‌िवस आपल्या दूतांना व‌िचारले, ‘कुणाचेही प्राणहरण करताना तुम्ही भावन‌िक होतात का?’ या प्रश्नावरील एका चर्चेत एका दूताने हेमानामक राजाच्या पुत्राच्या प्राणहरणाव‌िषयीचा प्रसंग सांग‌ितला, ‘राजाचा हा पुत्र व‌िधिल‌िखितानुसार वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युलोकात जाणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतर चौथा दिवस तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. जेव्हा यमराज राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचे डोळे सोन्या-चांदीने दीपतात आणि यमराज आपल्या जगात (यमलोकात) परतले. जे लोक घराबाहेर द‌िवा लावून या द‌िव्याची वात दक्ष‌िण द‌िशेस ठेवून पूजन करतील त्या घरातील अपमृत्यू टळेल, असा आशीर्वादही त्यांनी दिला. अशाप्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचविले.’ त्यामुळे या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. याच द‌िवशी समुद्रमंथनातून धनदेवता लक्ष्मी व आरोग्यदेवता भगवान धन्वंतरीही प्रकट झाल्याची श्रद्धा आहे.

--

धनपूजनाचे महत्त्व

आजच्या द‌िवशी दीपदान आण‌ि दीपप्रज्वलनाचेही महत्त्व मानले जाते. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याचे पूजन, दीप प्रज्वलन, वास्तू, दुकानाचे पूजन, बाग, गोशाळा, घाट, विहीर, तलाव या परिसरात दीपप्रज्वलन, द्रव्य-आभुषणांची खरेदी, कुबेरपूजन, यम दीपदान, यमराजपूजन केले जाते. या दिवशी साळीच्या लाह्या, गुळ, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून ते दिले जातात. दूध, मध, तूप यांचे तीर्थही दिले जाते.

--

इतर देशांमध्येही पूजा

धन्वंतरी देवतेची महती केवळ भारतातच नाही, तर परदेशांमध्येही तितकीच मोठी आहे. याचे उदाहरण म्हणजे बँकॉक एअरपोर्टवर समुद्रमंथनाची भव्य प्रतिकृती बनविण्यात आली आहे. त्यामध्ये धन्वंतरींची सोळा फुटांची मूर्ती बसविण्यात आली असून, त्याखाली लहान-लहान बाटल्यांमध्ये पाणी ठेवले जाते व अमृत म्हणून ते इतरांनाही दिले जाते. जेथे जेथे हर्बल चिकित्सेला मानले जाते तेथे तेथे विशेषतः आशियायी देशांमध्ये धन्वंतरी पूजनास महत्त्व आहे.

--

नाशिकमध्ये पहिला धन्वंतरीयाग

पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पहिला धन्वंतरीयाग नाशिकमध्ये करण्यात आला. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी या प्रकारचा याग करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आरोग्यविषयक व्याख्यानेही आयोजित केली जातात.

--

धनत्रयोदशीला ‘आरोग्य हेच धन’ या विचाराने धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. गेल्या काही वर्षांत धन-धान्याच्या पूजेबरोबरच धन्वंतरी देवतेची घराेघरी पूजा करण्याचे महत्त्व वाढले आहे.

-वैद्य विक्रांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इ-सुविधा केंद्रांवरील कर्मचारी पगाराविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जन्म मृत्यू दाखल्यांच्या वितरणासह विविध कामे करणाऱ्या इ-सुविधा केंद्रांमधील कॉम्प्यूटर ऑपरेटर्सला ठरलेला पगार वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जाऊ लागल्या आहेत. दोन-दोन महिने त्यांना पगार मिळत नसल्याने दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा सवाल या ऑपरेटर्सकडून उपस्थित होऊ लागला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी इ-सुविधा केंद्र सुरू केले आहेत. या सुविधा केंद्रांमधून नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले वितरित केले जातात. त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी व महापालिकेचा तत्सम करभरणा येथेच करवून घेतला जातो. त्यासाठी शहरातील २२ इ-सुविधा केंद्रांवर ६५ ते ७० कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र एप्रिल महिन्यापासून ते या सुविधा केंद्रांमध्ये काम करीत असून, त्यांना दरमहा साडेचार हजार रुपये पगार निश्चित करण्यात आला. ऑपरेटर्सकडून काम करवून घेणाऱ्या टीम लिडर्सलाही १० हजार रुपये पगार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, जुलै ते सप्टेंबरपर्यंत पगार थकविण्यात आल्याने टीम लिडर्सने काम सोडल्याचा दावा तक्रारदारांकडून केला जाऊ लागला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर्सला प्रत्येक तीन महिन्यांनी पगारवाढ देण्याची ग्वाही कंत्राटदाराने दिली होती. पगारवाढ तर नाहीच निश्चित केलेला पूर्ण पगारही ऑगस्टपासून देण्यात आलेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा नऊ हजार रुपये पगार मिळणे अपेक्षित असताना शनिवारी (दि. १४) सहा हजार पगार दिल्याचे तक्रारदारांनी सांगितलेे.

जे कामगार कामचुकारपणा करतात त्यांनाही पूर्ण पगार हवा असतो. महापालिकेकडून सर्व्हिस चार्जेस मिळत नसतानाही सणासुदीचा काळ असल्याने कामगारांचे पगार केले आहेत.

कैलास आढाव,

प्रोग्राम मॅनेजर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकाचौकांत फराळाचा दरवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरम उकळत्या तेलात फराळाचं मिश्रण पडताच होणारा आवाज... शेवेचा खमंग वास... लाडू बांधणीसाठी सुरू असलेली लगबग अन् त्या सोबतीला महिलावर्गाच्या गप्पांना आलेला रंग... असे वातावरण सध्या शहरातील अनेक चौकांमध्ये दिसून येत आहे. शहरात दिवाळीचा उत्साह उधाणला असून, फराळ बनविण्यालाही गती मिळाली आहे. आचाऱ्यांकडून फराळ बनवून घेण्यास महिलावर्ग पसंती देत आहे.

दिवाळी आणि खमंग, चविष्ट फराळ यांचे समीकरण दिवाळी सण जवळ येऊ लागताच अधिक गहिरे होऊ लागते. शेव, चकली, चिवडा, लाडू, अनारसे, शंकरपाळे, चिरोट्या, बालुशाही असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ यादरम्यान बनविले जातात. पूर्वी दिवाळीसाठी खास फराळ बनविण्याच्या उद्देशाने किराणा भरला जात असे व त्यानंतर ताबडतोब फराळ बनविण्यास महिलावर्ग सज्ज व्हायचा. दिवाळीचे काही दिवस अगोदर संपूर्ण दिवसभर फराळ बनविण्याचा उत्साह घराघरांत दिसून येत असे. सध्या परिस्थितीत बदलली आहे. महिला घरातच फराळ बनविण्यापेक्षा आचारी लोकांकडून किंवा रेडीमेड फराळास पसंती देत आहेत.

सिडको, म्हसरूळ, नाशिकरोड, पंचवटी, मखमलाबाद अशा शहरातील प्रत्येक कोपऱ्यात आचारी दाखल झाले आहेत. फराळ बनविण्याचे साहित्य आणि मजुरी देऊन त्यांच्याकडून फराळ बनवून घेतला जात आहे. सोसायट्यांमधील महिलावर्ग एकत्रित येत सोसायटीच्या पार्किंगमध्ये किंवा सोसायटीजवळील मोकळ्या जागेत हे पदार्थ करून घेत आहेत, तर काही ठिकाणी यासाठी मंडपही टाकण्यात आले आहेत. प्रतिकिलो ७० रुपये मजुरी आचाऱ्यांकडून आकारण्यात येत आहे.

---

दिवाळीच्या काही दिवस अगोदर आम्ही फराळ बनविण्याच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करतो. दररोज सकाळी ९ ते ३ या वेळेत वेगवेगळे पदार्थ मागणीनुसार बनवून दिले जातात.

-दीपककुमार, आचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेमध्ये वाहनांना नो एन्ट्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दिवाळीतील खरेदीसाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, तब्बल आठ मार्ग १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान वाहन विरहित ठेवण्यात येणार आहे.
वर्षातील सर्वात मोठ्या सणाचे पडघम वाजले असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. सर्वाधीक गर्दीचे प्रमाण नेहमी प्रमाणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, एमजीरोड आदी ठिकाणी दिसून येते आहे. रविवारी तर गर्दीचा उच्चांक दिसून आला. अगदीच गल्लीबोळ असलेल्या या भागात वाहतूक कोंडीसह इतरही त्रास होतो आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी या परिसरात येणाऱ्या वाहनांवर थेट बंदीच घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत लागू राहतील.

या मार्गावर वाहनांना बंदी
- मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे येणारी मालवाहू वाहने
- अशोकस्तंभ ते रविवार कारंजाकडे जाणारी वाहने
- दिल्ली दरवाजा ते धुमाळ पाँईट
- रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली
- बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा
- नेपाळी कॉर्नर ते मेनरोडमार्गे धुमाळ पॉईट
- सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईट
- रविवार कारंजा ते धुमाळ पॉईट

हा एक पर्यायी मार्ग
मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे येणाऱ्या वाहनांना मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबाद नाका, रामवाडी, चोपडा लॉन्समार्गे गंगापूर नाका असा प्रवास करावा लागेल. वरील मार्गात व वेळेत परिस्थितीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्व सूचना न देता बदल करण्याचे अधिकार पोलिसांनी राखून ठेवले आहे.

स्थानिकांसाठी रहिवाशी पुरावा आवश्यक
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात अनेक नागरिक राहतात. त्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक व पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. त्यामुळे सदर निर्बंधातून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना वगळण्यात आले आहे. हा नियम फक्त दुचाकी वाहनांसाठी असून, यासाठी स्थानिक रहिवाशांना रहिवासाबाबत एक तरी ओळखपत्र सादर करावेच लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६० कोटींचे रस्ते विनाचर्चा मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका तिजोरीत पैशांचा खडखडाट असून प्रशासन स्मार्ट सिटीसाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असतांनाच सोमवारच्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मागच्या दाराने तब्बल २६० कोटींच्या रस्ते डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी दिली.

सिंहस्थात साडेचारशे तसेच गेल्या वर्षी शहरात १९२ कोटीं खर्चून रस्ते डांबरीकरण करण्यात आले असताना दिवाळीत पुन्हा रस्त्यांसाठी तब्बल २६० कोटींचा बार फोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे किरकोळ विषयांवर तासनतास भाषणे ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील एकाही नगरसेवकाने या २६० कोटींच्या घुसखोरीबद्दल अवाक्षरही न काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या डांबरीकरणातील मलाई चाखण्यासाठी महासभेत गोंधळाचा खेळ खेळला गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या प्रश्नावरून शिवसेनेने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. शिवसेनेने गोंधळ घातल्याने शिवसेना-भाजप नगरसेवक सभागृहात एकमेकांपुढे उभे ठाकल्याने जोरदार वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. महापौरांनी एका झटक्यात सदस्यांची विकासकामे मंजूर केल्याचे जाहीर केले. या प्रस्तावांबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. कारण या प्रस्ताव मंजुरीची पटकथा अगोदरच लिहिली गेल्याचे मानले जात आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार आणि उद्यान निरिक्षकांच्या विषयावर साडेतीन तास चर्चा झाली. परंतु, याआड सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येत तब्बल २६० कोटींच्या रस्त्यांची कामे मागच्या दाराने मंजूर करून घेतली.

महासभेनंतर पत्रकारांशी बोलतांना महापौर भानसी यांनी जादा विषयात सादर करण्यात आलेल्या सुमारे २६० कोटींच्या रस्ते डांबरीकरणाला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये शहरातील सहाही विभागातील कॉलनीअंतर्गत रस्त्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागात साडेसात कोटींची रस्ते डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत. तसेच सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्तेही यात केले जाणार आहे. विशेष म्हणजे महासभेच्या जादा विषयांच्या विषय पत्रिकेतही हे विषय समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे २६० कोटींचे रस्ते कामे मागच्या दाराने मंजूर केल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सबका साथ, सबका विकास
काही महिन्यांपासून महासभेतील गोंधळाचा सत्ताधारी भाजपसह विरोधातील शिवसेनेलाही फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. गजानन शेलार यांनी तर थेट दोघांवर मॅच फिक्सिंगचा आरोप करत दोघांमधील छुपी युती चव्हाट्यावर आणली. शहरात यापूर्वीच साडेसहाशे कोटींचे रस्ते झाले. त्यानंतर गेल्या महासभेत ३७ कोटींचे डांबरीकरण विनाचर्चा मंजूर केले. आता सत्तारूढ भाजपने २६० कोटींच्या कॉलनीअंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या कामांना मागच्या दाराने मंजुरी दिली. त्यावर शिवसेनेने कोणताही आक्षेप घेतला नाही. शिवसेनेने यात ‘मम’ म्हटल्याने ‘सबका साथ, सबका विकास’ होत असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रशासनही उदार
आर्थिक स्थितीचे कारण देत नगरसेवकांना ७५ लाख निधीवरून सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणणाऱ्या आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही २६० कोंटीच्या रस्त्यांबाबत एकदम उदार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरसेवक निधीसाठी दोनशे कोटींची कामे रद्द केली होती. ती कामे रद्द केल्यानेच वाढीव कामांसाठी निधी उपलब्ध होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. गेल्या वर्षापेक्षा शंभर कोटींचा बोजा येणार असला तरी, यंदा केवळ २५ टक्केच निधी खर्च होणार असल्याचा दावा केला आहे. उर्वरित ७५ टक्के खर्चाचा भार पुढील वर्षी पडेल असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकारात्मक विचार देऊ शकतो जीवदान

$
0
0



jitendra.tarte@timesgroup.com
jitendratarte@MT

नाशिक: शहराजवळच सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका डोंगर कड्यावरून शहरातील एका समुपदेशकांना मोबाइल कॉल आला. मोबाइल क्रमांक अज्ञात असला तरीही समुपदेशकांनी तो कॉल रिसिव्ह करण्याची तत्परता दाखविली. पुढच्या क्षणाला त्यांच्या कानावर शब्द आदळत होते, ‘सर, मला एकाच प्रश्नाचे उत्तर हवे आहे. अखेरच्या काही क्षणांमध्ये आत्महत्येचा निश्चय बदलू शकतो का? मी एका उंचशा डोंगरावर उभा राहून खोलवर बघतो आहे. मी दरीत उडी घ्यायच्या तयारीत आहे..’
समुपदेशकांनी त्या तरुणाच्या शब्दफेकीतील गांभीर्य ओळखत त्याच्या अंतर्मनाला साद घातली. त्यांचे पुढचे वाक्य होते , ‘मित्रा, तू जो कोणी आहेस.. ज्या अर्थी जीवन-मरणाच्या सीमारेषेवर तुला मला कॉल करण्याची इच्छा झाली, त्याच अर्थी तू आत्महत्या करणार नाहीस! तू केवळ एकदा मला भेट आणि त्यानंतरही तुला मरावं वाटलं तर खुशाल मर.. पण मरण्याची वेळ आता निश्चित नाहीये.. डॉक्टर पोटतिडकीने त्याची समजूत काढत होते.
त्यांच्या या कळकळीच्या संवादाला तरुणाच्या अंर्तमनाने प्रतिसाद दिला. तो म्हटला, ‘असं असेल तर मला लगेचच तुमच्याकडे यायचे आहे. पण इतक्या लांब शहरात तुमच्यापर्यंत पोहचायचे तर खिशात एकही रुपया नाही. कसा येऊ ?’ समुपदेशकांनी सांगितले, ‘मिळेल त्या वाहनात बसून
अशा पत्त्यावर ये. तिथे गाडीचे भाडे मी देतो.’ पुढच्या काही तासातच हा तरुण सांगितलेल्या पत्त्यावर हजर झाला. डॉक्टरांनी गाडीभाड्याचे पैसे देत त्याला अगोदर खाऊ-पिऊ घातले अन् विश्वासाने बोलते केले.
तो सांगू लागला, ‘सर, अखेरच्या क्षणाला मला कुणीतरी ऐकून घेतयं ही भावनाही माझ्यासाठी आधाराची आहे. मी आजवर सगळीकडून नाकारला गेलो...अशा ‘नाही रे’ ..अवस्थेपासून त्याला बोलतं करत डॉक्टरांनी ‘आहे रे..’ अवस्थेपर्यंत समुपदेशकांनी आणले. अखेरीला त्याच्या डोळ्यात त्यांना आशावादाची चमक दिसली. तो म्हटला, ‘सर , मला खूप जगायचं आहे. मला माझ्यातली क्षमता जगाला दाखवून द्यायची आहे. होय, मी निश्चितच खूप काही करू शकतो. फक्त, माझ्या पाठीवर आधाराचा हात राहू द्या !’
ज्या डोंगराच्या पठारावर घोंघावण्यास केवळ वारा धजावतो तिथे त्याला एका भेळेच्या कागदाच्या कपट्यावरील एका सकारात्मक लेखात डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक अखेरच्या क्षणी मिळाला. अन् पुढच्या काही क्षणांमध्ये खुरटू पाहणारी तरुणाईची वेल टवटवित होण्यासाठी जीवनरसाच्या दिशेने धावू लागली.
या प्रसंगातून ‘मना सज्जना’ साठी संदेश देताना या प्रसंगातील नावे गोपनीय ठेवण्याच्या अटीवर समुपदेशक म्हणाले , ‘केवळ एक सकारात्मक विचार, एका व्यक्तीसाठी नवे जीवन देण्याची क्षमता ठेवतो. त्यासाठी पहिल्यांदा दुसऱ्याला ऐकायला शिका आणि समोरच्याशी बोलताना सकारात्मकता पेरायला शिका...!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव महासभेमध्ये ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात हागणदारीमुक्त अभियानादरम्यान बांधण्यात आलेल्या शौचालयांची तोडफोड होत असून, महापालिका प्रशासन याबाबत काहीच कारवाई करीत नाही. अनेक भागात असलेली जुनी शौचालये नवीन बांधकाम करण्यासाठी तोडण्यात आल्याने महापालिकेच्या हागणदारीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असल्याचा आरोप करीत जनता दल नगरसेवकांनी महासभेत ठिय्या मांडला. यामुळे सोमवारी महासभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

महापालिकेच्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत सोमवारी महासभा झाली. प्रारंभी ३ वाजता बोलवण्यात आलेली मासिक सर्वसाधारण महासभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. यानंतर दुपारी ४ वाजात वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नाव निश्चितीसाठी विशेष महासभा झाली. महासभेला सुरुवात होतात जनता दलचे नगरसेवक शौचालय बांधकाम व तोडफोड प्रकरणी आक्रमक झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.

दरम्यान, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या नाव निश्चितीसाठी सभागृहातील गटनेत्यांनी बंद पाकिटात आपापल्या पक्षातील सदस्यांची नावे दिली. नगरसचिव धसे यांनी ही नावे सभागृहांपुढे वाचून दाखवली. ‘एमआयएम’चे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी या नावांच्या निश्चितीचे निकष काय आहेत? तसेच समितीवर घेण्यात आलेले वृक्षप्रेमी आहेत का? वृक्षसंवर्धनासाठी त्यांचे योगदान तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. १५ सदस्यीय असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीत अखेर ११ नावे निश्चित करण्यात आली.

‘हागणदारीमुक्त’वर प्रश्नचिन्ह
शौचालयप्रश्नी जनता दल नगरसेवक अब्दुलबाकी रेशनवाला, तन्वीर झुल्फेकार, शबाना शेख सलीम यांनी ठिय्या मांडला. सर्वे नंबर ५७ मध्ये मच्छीबाजार, नंदन चौक परिसरात हागणदारीमुक्त अभियानांतर्गत जुनी शौचालये तोडण्यात येऊन नवीन शौचालय बांधण्यात येणार होती. मात्र, अद्यापही शौचालयांचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ आली आहे. मात्र, महापालिका प्रशासन हागणदारीमुक्तीचे गोडवे गाते आहे, असा आरोप त्यांनी केला. शौचालयांची तोडफोड करणारे कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. सर्वे नंबर ५७ मधील शौचालय बांधकाम करणाऱ्या ठेकेदास नोटीस देण्यात यावी असे आदेश देण्यात आले.

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य
अन्सारी मोह. अस्लम खालिद अहमद, इस्राइल खान इस्माईल खान, नंदकुमार सावंत, निहाल अहमद मो. सुलेमान, सोहेल अहमद अब्दुल करीम, सबिहा मुज्जमीर कफाती, शेख जाहिद शेख झाकीर, शेख माजीद हाजी मोह. युनूस, मदन गायकवाड, विजय देवरे, कविता बच्छाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांचे त्र्यंबकला कामबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेच्या साफसफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाने शहराबाबत असलेल्या प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रकाश पाडला. त्र्यंबक शहराची सफाई ठेका पद्धतीने करण्यात येते. ठेकेदाराने रोजंदारी कामगारांना महिन्याची १६ तारीख उजाडली तरीही वेतन अदा न केल्याने कामगारांनी कामबंद ठेवले आहे. यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गत काही दिवसांपासून मुख्याधिकारी कार्यालयात आलेल्या नाहीत. त्यांना प्रकृती ‌ठीक नसल्याचे सांगण्यात येते. ठेकेदाराचे दोन महिन्यांपासून बिल अदा करण्यात आलेले नाही. याबाबत प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या बिलाच्या धनादेशावर मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. मात्र, नगरपालिका फंडात पैसेच नसल्याने ठेकेदाराचे बिल अडकले आहे. दरम्यान, इतर फंडातून पैसे वर्ग करण्यासाठी मुख्यधिकारी येतील तेव्हा बघू अशी प्रशासनाची भूमिका राहिल्याने हा तिढा सुटलेला नाही. नगराध्यक्षा तृप्ती धारणे या सोमवारी सायंकाळी कामगारांच्या वेतनाबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जू..’ला अमर शेख वाङमय पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू..’ या आत्मकथनाला महाराष्ट्र साहित्य परिषदच्या बार्शी (जि. सोलापूर) शाखेतर्फे देण्यात येणारा शाहीर अमर शेख वाङमय पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतील तज्ज्ञ परीक्षकांनी एकमताने या पुरस्कारासाठी ‘जू..’ या आत्मकथनाची निवड केली आहे.

साहित्यक्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार गेली बारा वर्षे देण्यात येतोय. पुरस्काराचे यंदा तेरावे वर्ष आहे. पुणे विभाग शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ. पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष अॅड. अतिश तांबोळी, शिक्षण अधिकारी सत्यवान सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी येथे येत्या १२ नोव्हेंबर रोजी पाटेकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ऐश्वर्य पाटेकर हे के. के. वाघ कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या ‘भुईशास्त्र’ या पहिल्याच कवितासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी आणि राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. उडिया, बंगाली, उर्दू, हिंदी, इंग्रजी आदी भाषांत कवितांचे अनुवाद झाले आहे.

ख्यातनाम लोकशाहीर अमर शेख यांच्या नावाने पुरस्कार मिळत आहे. त्यांचं मोठेपण जाणून आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य जनताजनार्दनाला अर्पण केले, सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता, अशा माणसाच्या नावाने अन त्यांच्याच जन्मभूमीत हा पुरस्कार मिळत आहे. हे भाग्य ‘जू’ आत्मकथनाने मला दिले.
- ऐश्वर्य पाटेकर, लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरण नागरेला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हनुमानवाडी कॉर्नरच्या रस्त्यावर दीड वर्षांपूर्वी सुनील वाघ या भेळविक्रेतेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी किरण दिनेश नागरे त्याला पोलिसांनी रविवारी (दि. १५) रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

किरण नागरे हा मखमलाबाद परिसरात येणार असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ या परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहुल लागताच नागरेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. सुनील वाघ याच्या खून प्रकरणातील कुंदन परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागूल यांना या अगोदरच वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन नागरे फरार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार सावंत बंधूंना रशियातून आमंत्रण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणाऱ्या भव्य आंतरराष्ट्रीय मॉस्को वॉटरकलर फेस्टिव्हलसाठी नाशिकचे चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत या दोघांची विशेष निवड करून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

क्ला शेवा आर्ट स्कूल मॉस्को या जगप्रसिद्ध संस्थेतर्फे डी एल टेली ग्रॉफ सेंटर ऑफ मॉस्को या ठिकाणी या इंटरनॅशनल मॉस्को वॉटर कलर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेचे जगभरात तीन लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन सब्स्क्रायबर्स असून संपूर्ण रशियात विविध ठिकाणी या आर्ट स्कूलमध्ये दहा हजारहून अधिक रशियन व सोबत विविध देशातील कला विद्यार्थी, चित्रकार अध्ययन करीत आहेत.

या इंटरनॅशनल मॉस्को वॉटरकलर फेस्टिव्हलमध्ये जगातील १६ देशांतील २१ निवडक निमंत्रित जगप्रसिद्ध चित्रकारात लॉरेन मॅकेकेन (अमेरिका), व्हेलिंनटेन वरलाटो (इटली), लुई ई (चीन), युडूस (कोरिया), मायकेल जस्वीझ (पोलंड), लुईस प्रदोन (स्पेन), इगोर सावा (इटली), फेलीक्स शिनबर्ग (जर्मनी), लण्की लीवेस (फ्रान्स) यासारख्या ज्येष्ठ चित्रकारासह सावंत बंधूची जलरंग चित्रे, मॉस्को फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहेत. त्यात चित्रकार राजेश सावंत यांची गाजलेली ‘हॉर्स’ या क्रिएटिव्ह चित्रमालिकेतील चित्रे तर प्रफुल्ल सावंत यांची रशिया, मॉस्कोतील सेंट बासील, रेड स्वेअर, व्हिक्टोरी आर्च या स्थळांवर आधारित निसर्ग चित्र मालिका मॉस्को फेस्टिव्हलमध्ये झळकणार आहेत.

या मॉस्को फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण म्हणजे निवडक चित्रकारांच्या वर्कशॉप मधील चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या जलरंगतंत्र व शैली या विषयावर आधारीत तिन दिवसीय इंटरनॅशनल वर्कशॉपचा रशियातील चित्रकार व चित्ररसिक आस्वाद घेणार आहेत.

जागतिक चित्रपुस्तिकेत स्थान

चित्रकार सावंत बंधूच्या कुंचल्यातून मॉस्कोचे सौंदर्य टिपण्यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली आहे. मॉस्को वॉटर कलर फेस्टिव्हलच्या जागतिक चित्रपुस्तिकेत ही चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांच्या चित्रांना स्थान देण्यात आले आहे. ही जागतिक पुस्तिका जगभरात आयोजकांकडून प्रसारित करण्यात येणार आहे. यापूर्वीही, सावंत बंधूना इटली, तुर्की, अलबानिया, मलेशिया, चीन, जॉर्डन, दुबई, फ्रान्स यासारख्या अनेक देशांनी निवडक निमं‌त्रित चित्रकार म्हणून बोलाविण्यात आलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८९ उद्यानांच्या कामांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने आउटसोर्सिंगवर उद्यान निरीक्षकांची पदे भरण्याचा प्रस्ताव ठेवला असतानाच सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी आउटसोर्सिंगने दिलेल्या २८९ उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची चिरफाड केली.

ठेकेदारांनी ८० टक्के उद्यानांकडे पाठ फिरविली. ठेकेदारांनी बोगस बिले काढल्याचा आरोप भाजपचे शाम बडोदे यांनी केला आहे. कोट्यवधी रुपये देऊनही उद्यानांची अवस्था खराबच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला अन्य सदस्यांनीही साथ दिल्याने महापौरांनी उद्यानांच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या महासभेत उद्यान विभागाच्या वतीने चार उद्यान निरीक्षक आउटसोर्सिंगने भरती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या विषयांवरून उद्यानांच्या देखभाल व कामांवरच चर्चा सुरू झाली. भाजपचे शाम बडोदे यांनी महापालिकेने उद्यानांची देखभाव व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांनीच या उद्यानांची वाट लावल्याचा आरोप केला. सहा विभागात चार ठेकेदारांना जवळपास दहा कोटींचे कामे देण्यात आली आहेत. ‘नाशिक पश्चिम’मधील ३५, नाशिकरोडमधील ७६, पंचवटीतील ५४, नवीन नाशिक येथील ४९ तर सातपूर परिसरातील २४ अशी एकूण २८९ उद्यानांची कामे चार ठेकेदारांना देण्यात आली. मात्र, या ठेकेदारांनी उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिली नसल्याचा आरोप केला. ठेकेदारांनी अटी व शर्तीप्रमाणे काम केले नसून उद्यानांमध्ये गवत उभे राहिले आहे. त्यामुळे या उद्यानांची पाहणी करून चौकशी करण्याची मागणी बडोदे यांनी केली.

दर ठेका होणार रद्द

चारही उद्यान ठेकेदारांनी अटी व शर्तीचा भंग केला असून महापालिकेची फसणूक केल्याचाही आरोप केला. अन्य सदस्यांनीही त्याला सहमती दर्शवली. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी या उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीमध्ये झालेल्या कामांची चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांचा ठेका रद्द होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत निवडीसाठी भाजपकडून ‘तारीख’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सत्ता येऊन सात महिने उलटल्यानंतरही सत्ताधारी भाजपला स्वीकृत सदस्यांची निवड करता येत नसल्याने शिवसेनेने सोमवारी महासभेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

स्वीकृतच्या सदस्यांचे डॉकेट भाजपने महासभेत न आणल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्या दोन सदस्यांच्या नावे जाहीर करण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी नकार दिल्यानंतर शिवसेनेने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर पुढच्या महासभेत डॉकेट ठेवू, असे आश्वासन दिले. परंतु, शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाल्याने व भाजपचे सदस्यही उभे राहिल्याने महापौरांना १५ मिनिटे सभागृह तहकूब करत मार्ग काढला.

महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्य निवडीचा घोळ सुरूच आहे. भाजपने आपल्या कोट्यातील तीन नावे दिलेली नाहीत. सोमवारच्या महासभेतही स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर होऊ शकली नाही. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तीन नावांवर एकमत होऊ शकलेले नाही. प्रशासनाने स्वीकृत सदस्य निवडीसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली. परंतु, सत्ताधाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. शिवसेनेने आपल्या कोट्यातील दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल करत भाजपवर दबाव वाढवला. त्यामुळे सोमवारच्या महासभेपूर्वी भाजपकडून त्यांच्या सदस्यांचे अर्ज प्रशासनाकडे दाखल होतील. तसेच महासभेत सदस्यांची निवड होईल, अशी चर्चा होती.

महासभा सुरू होताच शिवसेना गटनेते विलास शिंदे व सदस्यांनी स्वीकृतचा मुद्दा पुढे करत, शिवसेनेच्या स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. महापौरांना जादा विषय दाखल करून घेत व विकासकामांचे विषय मंजूर करत धोरणात्मक विषय पुढच्या महासभेत जाहीर करण्याचे आदेश दिले. मात्र, शिवसेनेने त्यांच्याच दोन सदस्यांची नावे जाहीर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक होत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनेच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर महापौरांना सभा चालवणार असल्याचे सांगितले. यावेळी ‘तारीख पे तारीख’ किती? असा सवाल शिवसेनेच्या सदस्यांनी केला. यावेळी शिवसेना व भाजपचे सदस्य आमने-सामने आले. त्यामुळे महापौरांनी सभा १५ मिनिटांसाठी तहकूब केली. त्यामुळे भाजपला स्वीकृतवरून पुन्हा दोन पावले मागे यावे लागले आहेत.

‘भाजप-शिवसेनेचे फिक्सिंग’

स्वीकृत सदस्य निवडीवरून महासभा सुरू होता शिवसेना व भाजपने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार संतप्त झाले. शिवसेना-भाजप यांनी फिक्सिंग करीत सभा चालू द्यायची नाही, असे ठरविल्याचा आरोप केला. प्रत्येक महासभेत गोंधळ घालून सभा तहकूब केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या चुकीच्या कामांना शिवसेनेचे ‘प्रोटेक्शन’ आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा हल्ला शेलार यांनी चढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांशी अरेरावी; दाम्पत्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अमलीपदार्थ सेवन करून रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास समज देणाऱ्या पोलिसांनाच पती-पत्नीने अरेरावी केल्याची घटना कॉलेजरोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे.

राहुल प्रेम गांधी आणि हर्षा राहुल गांधी (रा. रामेश्वरनगर, पाइपलाइन रोड) अशी अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. राहुल व हर्षा रविवारी भोसला टी पॉईंट भागात अमली पदार्थ सेवन करून एकमेकांशी हुज्जत घालतांना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी समज देत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्याने आरडाओरड करीत आमचा वैयक्तिक वाद असून तुमचा काय संबध? असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी हर्षा हिला पोलिस वाहनात बसण्याचा आग्रह धरला. त्यावर संतापलेल्या हर्षाने पोलिस महिलेचे केस धरून ‘तुमच्याकडे बघून घेऊ’ अशी धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये या दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट वस्तूंची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट वस्तूंना नामांकित बॉश कंपनीचे लेबल वापरून वस्तू विक्री करणाऱ्या हार्डवेअर दुकानदाराविरूद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कॉपिराईट भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली. बॉश कंपनीचे प्रतिनिधी अजय डापसे यांनी आपल्या कंपनीचे बनावट वस्तू विकल्या जात असल्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून शंकरनगर, टाकळीरोड येथील गुरूदेव सोसायटीतील नुराणी हार्डवेअर या दुकानावर छापा टाकला असता बॉश कंपनीचे नाव असलेले साहित्यांचे खोके मात्र त्यामध्ये बनावट वस्तू आढळून आल्या. त्यात कार्बन ब्रश सेट, हायमर, मिनी ग्राईंडर आदी २ लाख १० हजार ५५५ रुपयांचा बोगस माल आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी दुकानदार मुर्तजा अबिदअली काचवाला (४० रा. भिकुसा मिलसमोर, पंचवटी ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात महिला जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत अ‍ॅटोरिक्षा पलटी झाल्याची घटना महामार्गावरील भुजबळ फॉर्म परिसरात घडली. या अपघातात दोन महिला प्रवासी जखमी झाल्या असून रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून अंबड पोलिस स्टेशनमध्ये इनोव्हा कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रंजना राजू पवार (रा. इगतपुरी) आणि दीपाली विकास सोमवंशी (रा. गणेशचौक, सिडको) असे जखमी महिला प्रवाशांची नावे आहेत. चंद्रशेखर भगवान वेताळ (रा. विजयनगर, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिला प्रवासी रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास (एमएच १५ ईएच १४६७) या रिक्षातून प्रवास करीत असताना हा अपघात झाला. विजयनगर येथून सीबीएसकडे निघालेल्या रिक्षास कृष्णबन कॉलनी चौफुलीवर पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारने (एमएच ०४ सीजे ६३३४) धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात दोघी महिला जखमी झाल्या. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकमधून डिझेलची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलेल्या मालट्रकमधून स्कार्पिओतील तिघा भामट्यांनी डिझेलचोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अरजिंदर कलविंदर राजपूत (रा.चंद्रपूर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राजपूत शुक्रवारी शहरात आले होते. माडसांगवी बिद्रा कंपाऊंड येथे त्यांनी आपल्या ताब्यातील मालट्रक (एमएच १४ एव्ही ४२१५) पार्क केला असता ही घटना घडली. मध्यरात्री राजपूत आपल्या ट्रकमध्ये विश्रांती घेत असतांना स्कार्पिओ (एमएच १२ व्ही आर ५५८३) मधील तिघांनी मालट्रकमधील सुमारे साडे चार हजार रुपयांचे ७५ लिटर डिझेल काढून पोबारा केला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकामार्गावर घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोकामार्ग परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ९८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्रितेश सुरेश देशमुख (रा. सुंदरश्याम अपा. सागर स्विटमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख कुटुंबीय शनिवारी (दि. १४) बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ७६ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ९८ हजाराचा ऐवज चोरून नेला. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून घरफोडी करून चोरटे दुचाकीवर पसार झाले आहेत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांच्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक तरुणाचा खून झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

विशाल दावल हिरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय बोरसे यांनी फिर्याद दिली. संजय यांच्यासह सुनंदा आणि विशाल हे सर्वजण एकत्र राहतात. विशाल यास दोन बहिणी असून त्यांचे लग्न झालेले आहेत. विशाल हा रिक्षा चालवितो. घरी आल्यावर विशाल न दिसल्याने संजय यांनी याबाबत चौकशी केली. विशाल हा सागर शिंदे, दीपक पगारे आणि प्रमोद जाधव यांच्यासोबत बाहेर गेल्याचे समजले. रात्री नाशिकरोड पोलिसंनी ‘विशालची तब्येत गंभीर असून तुम्ही तातडीने इंदिरानगर पोलिस ठाण्यात जा’ असा निरोप दिला. त्यानुसार संजय व विशाल याची आई दोघेही इंदिरानगर पोलिसात गेले. त्यांना वडनेर चौफुलीकडे जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याने विशालचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. संजय यांनी तातडीने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून सागर शिंदे (रा. वडाळागाव), दीपक पगारे (देवळाली गाव) आणि प्रमोद जाधव (रा. नाशिकरोड) यांच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए इन्स्टिट्यूटतर्फे ‘जीएसटी’बाबत मार्गदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेन्ट्स ऑफ इंडियाच्या नाशिक सीए शाखेतर्फे अशोका मार्ग येथील आयसीएआय भवनमध्ये दोन दिवसांची जीएसटी परिषद झाली. परिषदेचे उद्‍घाटन दिल्लीतील सीए बिमल जैन, पुण्याचे प्रीतम माहुरे यांनी केले. नाशिक शाखेचे अध्यक्ष विकास हासे, उपाध्यक्ष मिलन लुणावत, सचिव रोहन आंधळे, हर्षल सुराणा, रणधीर गुजराथी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

परिषदेच्या पहिल्या दिवशी बिमल जैन यांनी ‘वस्तू आणि सेवा पुरवठा’ यावर आधारित प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना याबाबत संवाद साधला. प्रीतम माहुरे म्हणाले, की जीएसटीमध्ये व्यावहारिक अडचणींसह वर्गीकरण आणि मूल्यांकन करणे महत्त्वाचे झाले आहे. सीए अविनाश पोद्दार यांनी वस्तू व सेवा भरण्याची वेळ, चलने आणि ई बील भरण्याची वेळ यावर मार्गदर्शन केले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जयपूर येथील सीए जतीन हरजाई यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट संकल्पना, समस्या, उपाय व परतावा व जॉब वर्क, शाखा हस्तांतरण, जीएसटी अंतर्गत माल अनुज्ञप्ती या विषयावर मार्गदर्शन केले. मुंबई येथील सीए अशित शाह यांनी जीएसटीमधील नियोजन क्षेत्र या विषयावर माहिती दिली. परिषदेत नाशिकसह विविध ठिकाणांहून दोनशेपेक्षा अधिक सीए सहभागी झाले. सीए रेखा पटवर्धन, रणधीर गुजराथी, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सदस्य विक्रांत कुलकर्णी, रवीकिरण राठी आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images