Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा

$
0
0

मालेगाव : कायम मद्यपान करणाऱ्या पतीने २४ वर्षीय पत्नीला मोबाइलमध्ये अश्‍लील ब्ल्यू फिल्म दाखवित तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह त्याला मदत करणाऱ्या सात जणांवर येथील द्याने, रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडितेचा २०१६ मध्ये गुजरातमधील कोटरमंडी नाईवाडा (जि. सूरत) येथील तरुणाशी विवाह झाला. लग्‍न झाल्याच्या एक महिन्यापासून पाच ऑगस्ट २०१७ पर्यंत वेळोवळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले. पीडितेला अपत्य नाही. तिचा पती नेहमी नशेत राहून तिला रात्री मोबाइलवर बळजबरीने अश्‍लील फिल्म दाखवित असे. तिने नकार दिल्यास बल्यू फिल्मप्रमाणे तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करत असे. त्यामुळे पीडितेने पती, सासरा, सासू यांच्यासह सासरच्या तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून अंगावारील स्रीधन काढून घेतले. तसेच माहेरून ५० हजार रुपये आणले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गौरी पटांगणावर दाम्पत्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भिकाऱ्यास मारहाण होत असताना मदतीसाठी गेलेल्या दाम्पत्यास टोळक्याने मारहाण केल्याची घटना गोदाघाटावरील गौरीपटांगणावर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश पंडित गरूड (२२ रा. गंगाघाट) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गरूड दाम्पत्य शनिवारी (दि. १४) रात्री गौरी पटांगणावर फेरफटका मारीत असताना ही घटना घडली. फेरफटका मारीत असताना तीन तरुण एका भिकाऱ्यास मारहाण करीत होते. यावेळी दाम्पत्य मारहाण सोडविण्यासाठी गेले असता संशयितांनी गरूड यांच्या पत्नीस शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. अधिक तपास हवालदार घोरपडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी, हिंदी गीतांनी रंगला बहारादार नमन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘हे सावळ्या घना’, ‘घनश्याम सुंदरा’ यासारख्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ‘नमन’ हा मराठी-हिंदी गितांचा कार्यक्रम झाला. यात रजिंदर कौर व नेहा मूर्ती यांनी गाणे सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी तब्बल २२ हून अधिक गाणे सादर करण्यात आले.

स्वरजित संगीत अॅकॅडमी आयोजित नमन या कार्यक्रमाची संकल्पना रागिणी कमतीकर यांची होती. या कार्यक्रमाची सुरुवात ‘गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू’ या भक्ती गीताने झाली. त्यानंतर ‘ओंकार अनादी अनंत’ यासह विविध गाणी सादर करण्यात आले. पंजाबी भाषिक असलेल्या रजिंदर कौर यांनी गायलेले ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘श्रावण घन निळा’ यासारख्या मराठी गाणांनी रसिकांनी दाद दिली. नेहा मूर्ती यांनी सादर केलेल हे सावळ्या घना, सलोना सा सजन हे गीतांनाही दाद मिळाली. या गाण्यांच्या मैफिलीत चाँद फिर निकला, आएगा आनेवाला, काहे तरसाए जियरा, मोहे रंग दो लाल, याद किया दिन ने, ना जिया ना लागे या हिंदी गाणेही सादर करण्यात आले. ‘नमन’ या कार्यक्रमात काही गाणे नेहा व रजिंदर यांनी एकत्र सादर केले तर काही गाणे दोघांनी स्वतंत्र सादर केले. दिवाळीची सर्वत्र गर्दी असताना या कार्यक्रमात रसिकांनी गर्दी केली. स्वानंद बेदरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला लोकप्रतिनिधींचा एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील बसस्टँडच्या ठिकाणी महिला प्रवाशांना साधी स्वच्छतागृहाची सुविधाही योग्य पद्धतीने उपलब्ध होत नसल्याची बाब ‘मटा’ने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ या वृत्तमालिकेद्वारे उजेडात आणली. याची दखल महिला लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे. महिलांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी करतानाच या प्रश्न योग्य तो पाठपुरावा करू, असा निर्धार या आमदारांनी केला आहे.

परिवहन मंत्र्यांची भेट घेणार

महिलांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बसस्टँडमधील महिला स्वच्छतागृहाची समस्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली आहे. त्याची दखल घेतली आहे. स्वच्छ आणि चांगल्या सुविधा असलेले स्वच्छतागृह बसस्टँडच्या ठिकाणी उपलब्‍ध व्हावे यासाठी परिवहन मंत्र्यांची लवकरच भेट घेईन. त्यांना निवेदन देऊन या प्रश्नी पाठपुरावा करेन.

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम


विधीमंडळात प्रश्न मांडणार

बस स्टँडमधील महिला स्वच्छतागृहांची अवस्था सर्वत्र बिकट आढळते. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा प्रश्न मांडला हे चांगले केले आहे. यामुळे वास्तव समोर आले. जिल्ह्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. इगपतुरी व ञ्यंबकेश्वर हे तर पर्यटन स्थळ असल्याने येथे महिला प्रवाशांना स्वच्छतागृहाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत सरकारला जाब विचारणार आहे. यासाठीच लोकप्रतिनिधी म्हणून विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करेन.

- निर्मला गावित, आमदार, त्र्यंबक-इगतपुरी

वेळप्रसंगी निधीही देणार

‘महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तपत्राने जिल्ह्यातील बस स्टँडवरील महिलांच्या गैरसोयी बद्दल घेतलेला मागोवा आम्हा लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. अत्यंत साध्या सुविधाही महिलांना मिळत नाही, हे मालिकेतून निदर्शनास आले. सटाणा, ताहाराबद व नामपूर या माझ्या विधानसभा क्षेत्रातील बस स्टँडवर तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना सूचित केले आहे. अत्यंत नाजूक विषय हाताळून महिला प्रवाशी व सर्व सामान्य प्रवाशांच्या समस्येला वाचा फोडली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जाते आणि साधे स्वच्छतागृहही स्वच्छ नसते. हा विरोधाभास आहे. वेळ प्रसंगी निधी देण्यासाठी बांधील आहे.

- दीपिका चव्हाण, आमदार, सटाणा


महामंडळाला पत्र देणार

स्वच्छतागृहाच्या ठिकाणी पैसे घेतले जातात तर सुविधाही मिळणे आवश्यक आहे. स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एसटी महामंडळाने स्वच्छतेबाबत राज्य पातळीवरच टेंडर काढले आहे. त्यामुळे यापुढील काळात महिला प्रवाशांना गैरसोय होणार नाही, अशी खात्री आहे. प्रशासनानेही स्वच्छता आणि अन्य बाबींसंदर्भात सतर्क रहायला हवे. याप्रश्नी महामंडळाला पत्र देऊन महिलांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी करेन.

देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांनीच अखेर केली डागडुजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अनेकदा तक्रारी करून, निवेदन देवूनही सार्वजनिक बांधकाम खाते कळवण शहरातील मेन रोडवरील खड्डे बुजवण्याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे शहरतील काही व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने या रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. मुरूम टाकून हे खड्ड्ये बुजव‌ण्यिात आले. कळवणच्या या युवकांच्या गांधीगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कळवण शहराचा मुख्य आत्मा असलेल्या मेनरोडवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या दिव्यातून वाट काढली लागते. खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. रात्री या रस्त्यांवर प्रवास करणे म्हणजे शारीरिक दुखापतीला आमंत्रण देणे. रात्री फिरायला येणाऱ्या नागरिक महिलांना या खड्ड्यातून चालणे दुरापास्त झाले आहे.

नवीन रस्ता झाला नाही तरी चालेल मात्र डागडुजी तर करा अशी मागणी अनेकदा करूनही बांधकाम विभागाला जाग आली नाही. शेवटी कळवण मधील साहेबराव पगार, अजय मालपुरे, मोत‌रिाम पगार, शरद पगार, मोयोद्दीन शेख, बाजीराव पगार, मनीष पगार, किरण पगार आदींनी परिश्रम घेत या रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकला. या युवकांच्या उपक्रमाचे शहरातील नागरिकांसह वाहन चालकांनी कौतुक केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मुलांनी लुटला दीपोत्सवाचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चुंचाळे शिवारातील विराटनगर, अंबड लिंकरोड या कामगार वसाहतीत असलेल्या श्री सिद्धिविनायक शाळेतील विशेष मुलांची पर्यावरणपूरक दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.

या विशेष मुलांच्या आनंदात महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार, बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे, राजेश भावसार, बॉश कंपनीचे श्याम शेवकर, दीपक देवरे, चंद्रकांत महाले, मानव उत्थान मंचच्या वतीने बलजित कौर, कुलदीप कौर आणि संस्थेचे नीलेश धामणे सहभागी झाले होते.

येथील विशेष मुले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यात आली. मानव उत्थान मंचच्या वतीने मुलांना खाऊवाटप व शिक्षक-कर्मचारी यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

संस्थेचे गणेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका दीपाली सूर्यवंशी, प्रतिभा रिंढे, सुप्रिया गुंजाळ, रवी गुंजाळ, सेविका मालती बच्छाव, मंगला महाजन यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाने उजळणार झोडगेतील शिवालय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दीपोत्सव जवळ आला की मालेगाव, धुळेसह नाशिक येथील शिल्पकलेतील दिग्गजांसह, पुरातत्त्व-इतिहास संशोधक, धार्मिक अभ्यासकांना ज्या उत्सवाची ओढ असते तो उत्सव म्हणजेच झोडगे प्र‌ाचिन शिवालय दीपोत्सव यंदा शुक्रवारी ‘प्रकाशमान’ होणार आहे. तालुक्यातील झोडगे येथील भूम‌जिशैलीतील माणकेश्वर शिवालय प्रांगणात गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जाणारा ‘झोडगे दीपोत्सव’ यावर्षी दीपावली पाडवाच्या दिवशी अर्थात २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ पासून साजरा होणार आहे.

दीपोत्सवाच्या प्रकाशपर्वात सर्वत्र प्रकाशाची उधळण होत असताना तालुक्यातील झोडगे गावातील ७५० वर्ष जुने यादवकालीन प्राचीन शिवालय मात्र अंधारात राहत होते. दिवाळी सणाचे निमित्त साधून या ऐतिहासिक शिवालयाचे जतन, संवर्धन व्हावे, अधिकाधिक लोकांपर्यंत शिवालयाचा वारसा पोहचावा यासाठी जागृती व्हावी म्हणून ‘दिवा लावू तेजाचा, वारसा जपू शिवालयाचा’ या संकल्पनेवर आधारित हा ‘झोडगे दीपोत्सव’ ग्रामस्थांकडून गेल्या सहा वर्षांपासून साजरा होत आहे. यंदा झोडगे दीपोत्सवाचे सातवे वर्ष आहे.

काही वर्षांपासून हजारो दिव्याच्या प्रकाशात हे शिवालय प्रांगण प्रकाशमान होत आहे. यावर्षी देखील जास्तीत जास्त दिव्यांनी शिवालय प्रांगण प्रकाशित करण्याचा संकल्प झोडगेकरांनी सोडला आहे. या दीपोत्सवात समस्त झोडगेकर व मालेगाव परिसरातील शिवालयप्रेमींनी जास्तीत जास्त दिवे घेवून सायंकाळी ४ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन झोडगे दीपोत्सव परिवाराने केले आहे.

मंदिर प्रकाशझोतात

गेल्या सहा वर्षांपासून दीपोत्सवाचे आयोजनामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अनेक भागातील लोक दीपोत्सवाच्या माध्यमातून हे शिवालय बघायला येतात. येथे साजरा होणाऱ्या दीपोत्सवाने अनेकांना आकर्षित केले आहे. तसेच शिवालयाच्या जतन व संवर्धनाच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील येत आहे. नुकतेच या संपूर्ण मंदिरावर रासायनिक प्रक्रिया देखील करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ धावले मदतीला!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे सुरू झालेले हाल लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) प्रवाशांच्या मदतीला धावून आला. आरटीओने काही ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या बस विविध मार्गांवर उपलब्ध करून दिल्या. बसस्टँडच्या बाहेर या बसद्वारे सेवा देण्यात आली. अत्यल्प दरात प्रवाशांना बस उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला.
सकाळी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस शहरातील बस स्थानकांबाहेर दाखल झाल्या. फॉर इमर्जन्सी ड्यूटी अशी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) ऑर्डर त्यांवर लावण्यात आली. आरटीओच्या अधिकाऱ्यांनीच बस स्थानकांमध्ये जाऊन उदघोषणेद्वारे प्रवाशांना मार्गदर्शक सूचना केल्या. राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे प्रवासी वाहतूक बंद असली तरी नागरिकांनी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसची मदत घ्यावी, असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले. विशेष म्हणजे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली. सकाळी सहा ते दुपारी एक या वेळेत पुणे, औरंगाबाद, धुळे या मार्गावर ठक्कर बसस्थानकातून मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्स सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत झाली. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या जीप व तत्सम वाहतूकदारांची एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवाळी झाली. त्यामुळे दुपारी बारापासून हळूहळू बस स्थानकांमधील गर्दी कमी होऊ लागली. दुपारनंतर ठक्कर, महामार्ग, सीबीएस तसेच नाशिकरोड बसस्थानके ओस पडली. मात्र, एकूणच हा संप खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या पथ्यावर पडला असून, त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी होऊ लागली आहे.

स्कूल बसचालकांना धास्ती

संपकाळात प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चा आधार घेऊन राज्य सरकारच्या गृह विभागाने खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस इतकेच नव्हे तर मालवाहू वाहनांनादेखील प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी स्कूल बसेस पुरविण्याची मागणी केली. परंतु, रस्त्यावर स्कूल बसेसचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने बहुतांश स्कूल बसेस रस्त्यावर उतरल्याच नाहीत. महामार्गांवर मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहारदार झेंडू खाणार दीपोत्सवात भाव...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम झेंडूच्या बाजारपेठेवर झाला असून, मागणी जास्त तर पुरवठा कमी होत असल्याने येत्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांना चढ्या भावाने झेंडू खरेदी करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

दसऱ्याच्या वेळी झेंडूची आवक चांगली होती. मात्र, त्यानंतर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे दरी, मातोरी, मुंगसरा भागात ज्या शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांच्या हातातोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. सणाचे दिवस असल्याने बाजारात झेंडूच्या फुलांना चागली मागणी आहे. मात्र, पुरवठा होत नसल्याने शेतकरीदेखील हतबल झाला आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात लक्ष्मीपूजनावर होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचा तुटवडा निर्माण होणार असल्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. तुटवडा निर्माण झाल्याने सरासरी दोनशे रुपये (जाळी) दराने मिळणारी झेंडूची फुले ३०० रुपये (जाळी) दराने विकली जातील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दसऱ्यानंतर पाऊस जास्त झाल्याने पिकांवर औषध फवारणी करावी लागली. त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर झाला. त्यामुळे भाव चढे राहणार आहेत. पावसाचा जोर इतका होता, की अनेक शेतांमधील रोपे, फुले जमिनीवर पडली असून, तर काही ठिकाणी रोपेच उन्मळून पडली आहेत. काही शेतांमध्ये फुलांचा रंग बदलून काळपट झाला आहे, तसेच कीडदेखील लागली आहे. अनेक शेतांमध्ये फुलांचा टवटवीतपणा जाऊन त्याठिकाणी फुलांचा चिखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांना ‘धनलाभ’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने सोमवारी रात्री पासून बंद पुकारला. यामुळे शहरातील बससेवाही बंद झाली. या संधीचे सोने करुन घेत रिक्षा चालकांनी आपली पोळी भाजून घेतली. ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत जनतेला वेठीस धरले.
एसटीच्या संपामुळे रिक्षा चालकांना आयती संधी चालून आली. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील बस वाहतूक बंद असल्याने रिक्षाचालकांनी आपले उखळ पांढरे केले. ज्या ठिकाणी रोज १० रुपये भाडे आकारले जाते, अशा ठिकाणी ५० रुपये सीटप्रमाणे भाडे घेण्यात आले. शहरातील बहुतांश वाहतूक एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून होते. संपामुळे फक्त बाहेरगावाच्या बस बंद असतील, असा लोकांचा समज होता. परंतु, सकाळी कामाला जायला निघाल्यावर अनेकांना शहर वाहतूक बंद असल्याचा फटका बसला.
यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जाणारे कामगार जाऊ शकले नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. कॉलेजेसमध्ये सबमिशन सुरू आहे. विद्यार्थ्यांनादेखील या संपाची झळ बसली. सीबीएस शाल‌िमार येथून नाशिकरोडकडे रिक्षा जात असतात. शालिमार चौकाच्या भोवती सीट गोळा करण्यासाठी रिक्षाचालक सतत फेऱ्या मारत असतात. परंतु, मंगळवारचे चित्र उलट होते. संपामुळे रिक्षा जागेवर दिसतच नव्हत्या.


खासगी वाहने मिळविताना दमछाक
शहरातील बसस्थानकांवर शुकशुकाट असल्याने व्दारकासह विविध परिसरांमध्ये नाशिकबाहेर जाण्यासाठी प्रवाशांना पायपीट करावी लागली. एसटीच्या संपामुळे अनेकांनी गावी जाण्याचे नियोजन सकाळपासूनच बदलले होते. अनेकांनी मोबाइल अॅपचा उपयोग करीत ओला टॅक्सीची ऑनलाइन बुकिंग करुन थेट शहरालगतचे महामार्ग गाठले. तेथे मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करत एसटीला पर्याय शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
शहरात ठक्कर बाजार मध्यवर्ती बसस्थानकासह महामार्ग बसस्थानकातही शुकशुकाट होता. यामुळे द्वारका परिसरातून शहराबाहेर जाण्यसाठी अनेकांनी रिक्षा आणि ओला टॅक्सीचा आधार घेतला. व्दारकाच्या उड्डाणपुलाखालून मिळेल त्या वाहनात बसण्याची तयारी अनेकांनी दाखविली. यासाठी ट्रक, टेम्पो, पीकअप आदी वाहनांचा आधार नागरिकांनी घेतला. तर ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेचा फायदा घेत काही वाहनचालकांनी अव्वाच्या-सव्वा भाडे सांगितल्याने अनेकांनी ऐन उन्हात पायपीट करत द्वारका परिसर गाठला.
येथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्सच्या खासगी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याने प्रवाशांची गर्दी दिवसभर दिसून आली. खासगी वाहने मिळविण्यासाठी अनेकांनी पायपीट केली. येथून औरंगाबाद, शिर्डी व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती. या वाहनांनी एसटी भाड्याच्या दरांप्रमाणेच प्रवाशांना नेल्याने येथे त्यांची अडवणूक झाली नाही. मात्र, संपाच्या दिवशी अपेक्षेच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमीच होती. पाडव्यापासून प्रवाशांची संख्या जास्त असणार आहे. तोवर संपाचा तिढा न सुटल्यास प्रवाशांची अडचण होईल.

नाशिकमधील बसस्थानकांमध्ये शुकशुकाट असल्याने मी खासगी वाहनाच्या शोधात द्वारकापर्यंत आलो. ट्रॅव्हल्सच्या बसेस उपलब्ध असल्या तरीही त्या लांबच्या मार्गावरील होत्या. त्यामुळे बराच वेळ वाहनाची प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस एका पीकअपचा आधार घेऊन निफाडमध्ये पोहचलो.
- नंदकिशोर खेलूकर, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष निर्यातदारांनी मांडली कैफियत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

द्राक्ष बागाईतदार व निर्यातदार यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव पटनाईक, संचालक अश्विनीकुमार, कृषी विभागाचे अधिकारी एन. के. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत चितेगाव येथील एनएचआरडीएफच्या कार्यालयात बैठक झाली.

यावेळी द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे, महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, खजिनदार महेंद्र शाहीर, मध्य विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले, अशोक गायकवाड, अरुण मोरे सहभागी झाले होते.

बैठकीत खापरे यांनी युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करताना भारताला युरोपकडून लागणारा टॅक्स व भारताची ज्या देशाशी स्पर्धा आहे, त्या चिली देशाला लागणारा टॅक्स यात मोठी तफावत असल्याचे सांगितले. टॅक्स जास्त लावला जात असल्यामुळे स्पर्धा करताना हा टॅक्स भारतीय उत्पादकांना जास्त भरावा लागतो. तो कमी करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. उपस्थित द्राक्ष निर्यातदार व द्राक्ष बागाईतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी सचिवांसमोर ११ मागण्या ठेवल्या. त्यात द्राक्षांच्या नवीन जातींच्या निर्मितीसाठी गती द्यावी, बांगलादेशाचे आयात शुल्क, राष्ट्रीय विकास योजनेला गती द्यावी, केंद्राने अर्थसहाय्य निधी कमी केला आहे त्याचा फेरविचार व्हावा, विमा प्रकारात पारदर्शकता यावी, द्राक्ष निर्यात करताना सहभागी घटकांना प्रशिक्षण आयोजित करणे अशा मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांचा अग्रक्रमाने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्ली येथून आलेल्या अधिकारी वर्गाने दिल्याचे खापरे व भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षाची प्रतिमा डागाळू नका

$
0
0

पालकमंत्र्यांनी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना भरला दम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वीकृतचा वाद, पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद तसेच, आमदार-पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्ववाद आणि बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांच्या प्रकरणात भाजपचे नाव बदनाम होत असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन चांगलेच संतप्त झाले आहेत. तुमच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळते आहे, त्यामुळे पक्षाची प्रतिमा सांभाळा असा दमच त्यांनी आमदार, महापौर, उपमहापौर व पदाधिकाऱ्यांची बैठकीत भरला.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी अचानक नाशिकची धावती भेट पक्षातील पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन झाडाझडती घेतली. दाखल होताच महाजनांच्या समोर भाजपच्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वीकृतसाठी लॉबिंग केले. काही जण प्रदेशाध्यक्ष, तर काही जण मुख्यमंत्र्यांकडेच लॉबिंग करीत आहेत. शहरात या विषयावरून पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची गंभीर दखल महाजन यांनी घेतली. शंभर खाटांचे रुग्णालय प्रकरण, पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद आणि लाचखोर प्रकरणात भाजपचा संबंध येत असल्यावरून पक्षाचे नुकसान होत असल्याचे सांगत महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमोर पालकमंत्र्यांनी पक्षाच्या ढासळत्या प्रतिमेचा पाढाच वाचला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाचखोर अधिकाऱ्याच्या अटकेनंतर या अधिकाऱ्यांचे भाजपमधील नेत्यांशी संबंध असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच पक्षात उफाळून आलेली गटबाजी बघता जनमानसात पक्षाची प्रतिमा मालिन होत असून, प्रतिमा जपा असा दमच त्यांनी पुन्हा एकदा महापौरांसह पदाधिकारी, नगरसेवकांना दिला. हा शेवटचा अल्टिमेटम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणात महापौरांच्या भाचेजावयाला अटक करण्यात आल्याने यात भाजपला अडकवू नये, असा दमच पालकमंत्र्यांनी महापौरांना भरला.

पालिकेत घेतला आढावा

महापालिकेत पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले. आता यापुढे मी स्वतःच महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असून, दर महिन्याला नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील. स्वीकृत सदस्यांची नावे पुढील महासभेवर दिली जातील. तसेच, वादही लवकरच मिटवले जातील, असे त्यांनी सांगितले.

पंचनाम्याचे आदेश

परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्षासह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याचे महाजन यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजपचा संबंध नाही

लाचखोर अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी भाजपमधील काही नेत्यांकडून दबाव येत असल्याच्या आरोपांची आपण गंभीर दखल घेतली असून, याचा भाजपशी काही संबंध नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. दोषींवर कारवाई होणारच असे ठणकावून सांगितले. तसेच, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी योग्यवेळी कारवाई केल्याचे सांगत या कारवाईचे त्यांनी समर्थन केले.

स्वीकृतचा तिढा कायम

भाजपमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवरून सुरू असलेला घोळ, इच्छुकांची वाढती संख्या पाहता हा तिढा आणखीनच वाढला आहे. याबाबत महाजन यांनी पदाधिकाऱ्यांशी गुफ्तगू केले असून, आता हा वाद टाळण्यासाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी एक नाव वगळता इतर सर्व नावे बाद करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याऐवजी नवीन नावे निश्चित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६० कोटींचा संशयास्पद धुरळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी गळती असताना तसेच, भूमिगत गटारींसाठी निधी नसताना सत्ताधाऱ्यांकडून केवळ रस्त्यांच्या कामांवर केल्या जाणाऱ्या २६० कोटींच्या उधळपट्टीवर संशय व्यक्त केला जात आहे. अडीच वर्षांत रस्त्यांवर सातशे कोटी खर्चूनही पुन्हा त्याचसाठी २६० कोटी रुपये उधळले जात असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपसह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच शंका घेतली असून, मागील दाराने मंजूर होणाऱ्या या कोट्यवधींच्या प्रस्तांवाबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने या विषयामध्ये चुप्पी साधल्याने सेना-भाजपची मिलीजुलीही चव्हाट्यावर आली आहे.

सोमवारच्या महासभेत विषयपत्रिकेवर विषय नसतानाही तब्बल २६० कोटी रुपयांच्या डांबरीकरणाला मंजुरी देण्यात आली. सिंहस्थात ४६५ कोटी रुपयांचे रस्ते तयार झाले. मनसेच्या सत्ताकाळात १९२ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी दिली होती. त्यातील शंभर कोटींचे रस्ते अजूनही कागदावर आहेत. पावसाळ्यात ३७ कोटींच्या रस्ते दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६९४ कोटी रुपये रस्त्यांसाठी खर्च करण्यात आले आहेत. आता पुन्हा २६० कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आल्याने अडीच वर्षांत रस्त्यांवरचा खर्च एक हजार कोटींच्या घरात जाणार आहे. प्रभागनिहाय प्रत्येकी साडेसात कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. पाच वर्षांपूर्वीच्या कॉलनी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याचा दावा शहर अभियंता यू. बी. पवार यांनी केला असला तरी, तो हास्यास्पद आहे.

राष्ट्रवादी कोर्टात जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी मागच्या दाराने मंजूर झालेल्या रस्ते कामांवर आक्षेप घेत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. पारदर्शकतेचा टेंबा मिरविणाऱ्या भाजपने सत्तेचा गैरवापर करत वारंवार जादा विषय घुसविले आहेत. महासभेत प्रस्ताव न ठेवताच २६० कोटींचा प्रस्ताव मंजूर केला. एवढ्या रस्ते कामांची शहराला गरज काय असा सवाल उपस्थित करीत बजेटमध्ये तरतूद नसताना रस्ते विकासाची कामे मंजूर झाल्याने संशय निर्माण होतो. याबाबत कायदेशीर मत मागवून न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. आयुक्तांची भूमिका पाहता निवडणुकीला उभे राहायचे तर नाही ना? असा सवालदेखील शेलार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यसंवर्धनासाठी धन्वंतरींची आराधना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुखमय जीवनाची मंगलकामना घेऊन आलेल्या दीपावलीने सध्या सर्वत्र चैतन्य संचारले असून, शहरात मंगळवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली. धन्वंतरी देवतेचे पूजनही करण्यात आले.

धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यास धनसमृद्ध होते, असे मानले जात असल्याने सोने-चांदी खरेदीलाही अनेकांकडून पसंती देण्यात आली. अश्विन वद्य त्रयोदशी अर्थात, धनत्रयोदशीनिमित्त वस्त्रालंकाराची खरेदी, तसेच उपवास करण्यात आला. घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून पूजन करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. सायंकाळी तिळाच्या तेलाचे दिवे लावत त्याच्या वातीचे टोक दक्षिणेला ठेवून यमदीपदान करण्यात आले. घराघरांत धने व पत्री खडीसाखर देवासमोर ठेवण्यात आली. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची परंपरा यंदाही व्यापारी बांधवांनी जोपासली.

घरोघरी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. नागरिकांकडून यथाशक्ती दानही करण्यात आले. धनत्रयोदशीला अनेकांनी सायंकाळी दिवा तेलाने भरून त्याची पूजा केली आणि तो दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवला.

भागवत पुराणात विष्णू भगवानांच्या चोवीस अवतारांत धन्वंन्तरी भगवानाचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी धन्वंतरी देवतेचे पूजनही करण्यात आले. धन्वंतरीपूजनप्रसंगी सर्वांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, अशी कामना करण्यात आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, धने, गुळ असा प्रसाद वाटण्यात आला. काहींनी कडुनिंबाच्या पानांचे बारीक तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून वाटली.


‘नाशिकच्या भूमीत साकारावे मंदिर’

सुशीला चिकित्सालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चांदीचे धन्वंतरीचे नाणेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. भगवान धन्वंतरी यांचे मंदिर नाशिकच्या भूमीत व्हावे आणि ते सर्व आरोग्यरक्षकांचे श्रद्धास्थान व्हावे, अशी इच्छा डॉ. माधवनाथ महाराज यांनी व्यक्त केले. या पूजनाच्या वेळी डॉ. राजेंद्र खडे, नवनाथचे बाबा देशमुख, प्रकाश पाटील, वैभव कुळकर्णी, नंदू पवार, फेरोज मणियार, विविध वैद्यगण, आयुर्वेद औषधनिर्माते आणि विक्रेते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी वाहतूकदारांना मालेगावात ‘लक्ष्मीदर्शन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने येथील नवीन व जुन्या बसस्थानकातील तब्बल तीनशे फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दिवाळीत गावाकडे जाणाऱ्या नोकरदारांचे, तसेच सुटीत फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. याऊटल खाजगी वाहतूकदरांनी मात्र संधीचे सोने करत दोन दिवस आधीच ‘लक्ष्मीदर्शन’ करून घेतले.

सकाळी सकाळी-नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानकात गर्दी केली होती. मात्र सकाळी केवळ तीन बसेस नाशिकच्या दिशेने रवाना झाल्यानंतर आगारातून एकही बस सुटली नाही. या संपात येथील ३०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. एसटी कामगार व इंटक या संघटना सहभागी असून, कामगार सेना मात्र यात सहभागी नाहीत. बसस्थानकात दिवसभर पोल‌सि बंदोबस्त होता.

सात लाखांचे नुकसान

मालेगाव आगारातून दिवसाला सुमारे ३९२ फेऱ्या होतात यातील ७ ते ८ फेऱ्याच झाल्याने सुमारे ६ ते ७ लाखांचा आर्थिक फटाका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लक्झरी चालकांची दिवाळी

संपाबाबत अनेकांना कल्पना असल्याने अनेक प्रवाशांनी लक्झरी, टॅक्सी, अॅपे, अॅटो रिक्षा या खासगी वाहतुकीचा पर्याय निवडला. दिवाळीच्या सुटीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने येथील बसस्थानकाबाहेर सकाळपासूनच खाजगी लक्झरी कंपन्यांनी आपल्या गाड्या उभ्या केल्या होत्या. मात्र यावेळी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सायाने बुद्रुक परिसरातील घोडेपीर दर्गाजवळील एका तलावात येथील दोघ मुलांचा बुडून मृत्यू झाला. यसुद अमीर खालिद अहमद (वय १२, रा. पवारवाडी) व अरबाज युनुस खान (वय १२, रा. पवारवाडी) असे या दोघ मृतांची नावे आहेत.

पवारवाडी भागातील चष्मे गुलाब या मदरशात हे दोघे शिकत होते. सोमवारी त्यांनी सकाळची नमाज पठण केल्यानंतर मदरसातून बाहेर पडले असता थेट घरी न जात घोडेपीर दर्ग्याजवळ असलेल्या २० ते २५ फूट खोल तलावानजीक केले. याठिकाणी अरबाज तलावातील पाण्यात बुडाल्याने त्यास वाचवण्यासाठी यसूदने पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाणी व गाळ असल्याने ते दोघे त्यात फसले व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशामक दलास दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पवारवाडी पोल‌िस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथित खंडणीखोर पत्रकारांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती अधिकारात वैयक्तिक माहितीची मागणी करून त्याद्वारे तब्बल एक लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित तिघा पत्रकारांना मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. या तिघांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांनी अशा प्रकारे किती जणांची लूट केली आहे हे पोलिस तपासात समोर येऊ शकते.

स्टिफन अँथोनी आढाव (वय ३७, रा. स्वारबाबानगर, सातपूर), मायकल जॉन खरात (३०, इंगळेनगर, जेलरोड) व त्यांचा मित्र सचिन रघुनाथ तुपे (स्वारबाबानगर, सातपूर) अशी खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कथित पत्रकारांची नावे आहेत. प्रहार या स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार, कॅमेरामन म्हणून काम करणाऱ्या दोघांसमवेत त्यांच्या एका मित्राचा यात समावेश आहे.

या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक हरिश्‍चंद्र पगार यांच्या तक्रारीनुसार, कथित पत्रकार मायकल खरात याने माहितीच्या अधिकारात काही वैयक्तिक स्वरूपाची माहिती मागविली होती. माहिती समोर येऊ द्यायची नसल्यास पगार यांनी एक लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी धमकी मायकलने दिली. याबाबत तडजोड होऊन ही रक्कम २० हजार रुपये इतकी निश्चित झाले. मात्र, संशयित आरोपींच्या मागणीबाबत अधीक्षक पगार यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात सापळा रचण्यात आला. लाचखोर मायकल खरात यासह इतर दोघे खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी पोहोचले. ते रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी संशयितांना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहरात असे प्रकार वाढल्याची चर्चा असून, गैरमार्गाने पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यदीपसंध्येने धनत्रयोदशी अविस्मरणीय

$
0
0

बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी इंदिरानगर येथे कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेने ‘नृत्यदीपसंध्या’ हा कार्यक्रम सादर केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची धनत्रयोदशीची संध्या अविस्मरणीय ठरली.

कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रम सादर करण्याचे नृत्यांगण कथक संस्थेचे हे सलग सातवे वर्ष आहे. दर वर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विनायक पुरोहित, उपाध्यक्षा मनीषा कुलकर्णी, कार्यवाह वसंत चिकोडे आणि नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांनी दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रकाशयोजना आणि ध्वनिसंयोजन अरविंद भवाळकर यांनी केले. क्षमा देशपांडे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात निहारिका देशपांडे, प्रचीती भावे, विशाखा अस्वले, विश्वा देशपांडे, बागेश्री पारनेरकर, तन्वी खर्डे, देवयानी अवसरकर, तन्वी कुलकर्णी, गायत्री पाटील यांनी नृत्य प्रस्तुत केले.

--

लयबद्ध अदाकारी

कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या शिववंदनेने झाली. संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी लयबद्ध पदन्यास आणि नजरेच्या अदाकारी दाखवत दादरा तालातील ‘कौन अलबेली के नैना रसिले ही ठुमरी सादर केली. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या ‘ए रे मना तू श्याम की कर वंदना’ ही कृष्णवंदना प्रस्तुत केली. केहेरवा तालातील ‘सजन बिना ना लागे जिया मोरा’, ‘सावन की ऋत आयी रे सजनीया’ आणि झपतालातील कृष्णाचे वर्णन असलेली बिंदादीन महाराजांनी रचलेली ‘श्याम छबी अती बनी’ या पारंपरिक बंदिशी सादर केल्या. पं. भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या एकतालातील ‘जय दुर्गे’ या दुर्गास्तुतीच्या सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचा शेवट ‘शिव के मन शरण हो’ या त्रितालातील भैरवीने झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुर्वे, पगारे पुरस्कार साहित्यिकांना प्रदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे सुर्वे साहित्य पुरस्कार आणि कैलास पगारे विशेष काव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे तसेच शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची उपस्थिती होती.
यंदाचा नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला तसेच प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ कादंबरीला व प्रा. सुनील विभूते यांच्या विस्मयकारी या ज्ञानकथेला प्राप्त झाला. कैलास पगारे काव्य पुरस्कार सारिका उबाळे यांच्या ‘शिरस्नाता’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, साहित्य आणि जीवनाचे नाते जोडणाऱ्या सुर्वे यांच्या साहित्याने कष्टकरी, कामगारांना मूल्य आणि लढाईचे बळ दिले. मराठी साहित्य कला-सौंदर्यात अडकले होते. नारायण सुर्वे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने क्रांती करत सातासमुद्रापार झेंडा फडकवला. तसेच रामचंद्र जाधव यांनी मराठी साहित्यात बंडाचे निशाण फडकावत नारायण सुर्वे यांनी कष्टकऱ्यांना लढण्याचे बळ दिले. त्यांनी कवितेतून शेतकरी, कामगार, शोषित वर्गावरील अन्यायाला वाचा फोडली, असे मत व्यक्त केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर यशोधरा पगारे, राजू नाईक उपस्थित होते. डॉ. हेमलता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारार्थी कलाकृतींचा परिचय प्रा. डॉ. विवेक खरे यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने खरेदीमुळे सराफ बाजारात परतले चैतन्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धनत्रयोदशीनिमित्ताने घरातील पारंपरिक दागिन्यांचे पूजन केले जाते. परंतु, संचित धनात वृद्धी व्हावी, यासाठी बाजारातून सोने-खरेदी करण्यावरही अनेकांचा भर असतो. सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सुवर्णबाजारात धनत्रयोदशीला मोठी उलाढाल झाली. चोख सोन्यासाठी मंगळवारी ३०,८०० तर हॉलमार्कसाठी ३०,००० रुपये भाव होता. तसेच चांदी ४२,००० रुपये असल्याने बाजारात चांगली उलाढाल झाली.

धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला आपल्याला हव्या त्या शैलीतील, वजनाचे दागिने, तुकडे मिळावेत यासाठी अनेकांनी प्रसिद्ध सोन्याच्या पेढ्यांवर आगाऊ नोंदणी करून ठेवल्याची माहितीही यावेळी विक्रेत्यांनी दिली. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीच्या सणाची सुरुवातही धनत्रयोदशीला सोने घेऊन केली जाते अशी प्रथा आहे. धनत्रयोदशीला सोने घेऊन लक्ष्मी पूजनाच्यावेळी सोन्याची पूजा केली जाते. सोने खरेदीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीचे शिक्के, लक्ष्मी, सरस्वती तसेच गणेशाच्या सोन्याच्या शिक्क्यांना मोठी मागणी होती.

महिलावर्गासाठी पसंतीचे दागिन्यांचे विविध डिझाइन उपलब्ध असल्याने सराफगल्लीत सकाळपासूनच गर्दी झाली होती. त्याप्रमाणे बाजारात गर्दी झाली. गेल्यावेळपेक्षा यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी आणखी दोन तीन दिवस सोने खरेदी चांगली होईल, अशी आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आजचा बाजार हा अगदी अनपेक्षित होता. धनत्रयोदशीला सोने खरेदी होते ही पूर्वपरंपरा आहे. परंतु, इतका चांगला बाजार मिळेल असे वाटत नव्हते. आज सोन्या-चांदीची चांगलीच उलाढाल झाली.

- अक्षय देवळालकर, सोन्याचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images