Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एसटी मालामाल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंढरपूर येथील आषाढी यात्रेतून सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला ९१ लाख ५७ हजार ६४५ रुपये उत्पन्न मिळाले आहे.

नाशिकहून पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक एसटीने प्रवास करत असल्यामुळे त्याचे नियोजन अगोदरच करण्यात आले होते. तब्बल ७५३ फेऱ्या करत या सहा दिवसात एसटीच्या बसेसने २ लाख ३६ हजार किलोमीटर अंतर पार केले आहे. अद्याप ही यात्रा १० जुलैपर्यंत आहे. ३० जून ते १० जुलै अशा ११ दिवसाच्या या यात्रेच्या सहा दिवसाचे आकडे आले असून त्यात एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातून एसटीने तब्बल तीन हजार ६८७ जादा बसेस सोडल्या. त्यात नाशिकच्या बसेसचाही समावेश होता. नाशिक जिल्ह्यातून १७ आगारातून या बसेससे नियोजन अगोदर करण्यात आले. गेल्या वेळी या काळात मिळालेल्या उत्पन्नापेक्षा या सहा दिवसातले उत्पन्न जास्त आहे. या यात्रेसाठी एसटीने भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी बसचे आरक्षण, आगाऊ आरक्षण तसेच प्रत्यक्ष बसस्थानकावर तात्काळ आरक्षणाची सुविधा प्राप्त करून दिली. तसेच ग्रुप असल्यास त्यांना थेट बस उपलब्ध करून देण्याची सेवासुध्दा होती. त्यामुळे एसटीला प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. नाशिकमधून १९३ पेक्षा अधिक बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

तात्पुरते स्थानक
पंढरपूर येथे मुख्य बसस्थानकातून काही अंतरावर विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे तात्पुरते स्थानक उभारण्यात आले. तेथे नाशिकहून येणाऱ्या भक्तांसाठी जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या नव्या स्थानकात भाविक-प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, उपाहारगृहे, विश्रांती कक्ष, झुणका-भाकर केंद्र, अखंडित वीजपुरवठा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

परतीचा प्रवास एसटीनेच
पंढरपूर यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. त्यापैकी बहुतांश येताना पायी दिंडीने येतात पण आषाढी यात्रा झाल्यानंतर व्दादशीला म्हणजे बुधवारी, ५ तारखेला अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसने निघतात. या पाच तारखेचा आकडाच एसटीने दिला आहे. त्यातून एसटीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अश्विन झळकेने दिले १३ व्यक्तींना जीवदान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण आता अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तामुळे एका जणाला जीवदान मिळते, तर अवयवदानाने अनेक जणांना. नाशिकमध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या अश्विन झळके या युवकाचे अवयव दान करण्याचा, त्याच्या नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे तब्‍ल १३ लोकांना जीवदान मिळाले आहे.

जेलरोड येथील अश्विन झळके अपघातात ब्रेन डेड झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांच्‍या परवानगीनंतर अवयव दानाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ऋषिकेष हॉस्पिटलच्या १४ डॉक्टरांची टीम मेहनत घेत होती. ऋषिकेष हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

अश्विन राहणार अवयवरुपाने जिवंत

जेलरोडवासीय अश्विन बाळासाहेब झळके हे कामानिमित्त नाशिक-पुणे रोडवरून जात असताना आंबेडकरनगर येथे गाडी घसरून त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली. ब्रेन डेड झाल्याने अश्विन यांचे अवयव दान करण्याचा नातेवाइकांना समजविण्यात आले. त्यांची पत्नी विजया व त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या परवानगीमुळेच अश्विन यांचे अवयवदान करणे शक्य झाले.

अपघात झाल्यानंतर त्यांना बोधलेनगरमधील सुविचार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे त्यांचा ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाल्याची कल्पना त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. अशा अवस्थेत ते कितीही वर्षे राहू शकतात, असे त्यांना सागण्यात आले. यावर त्यांचे अवयव काही लोकांच्या कामाला येऊ शकतील, अशी कल्पना त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. नातेवाइकांनाही आपल्या घरातील व्यक्तीच्या स्मृती अवयव रुपाने जतन रहाव्यात यासाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाचा निर्णय झाल्यानंतर झळके यांचा देह गंगापूर रोडवरील ऋषिकेश हॉस्पिटल येथे आणण्यात आला. तेथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कोणत्या रुग्णालयाला कोणत्या अवयवांची गरज आहे हे पाहून त्या ठिकाणी ते अवयव पाठवण्यात आले. त्याची त्वचा ही नाशिकच्याच राजेद्र नेहते यांच्या हॉस्पिटलला देण्यात आली. त्याचे हृदय हे रुबी हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमधून प्रथमच एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून हृदय पाठवण्याची मोहीम राबविण्यात आली. मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विद्यापीठात मालेगावचे तिघे टॉपर

$
0
0

नाशिक ः मालेगावच्या कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट संचलित बांद्रा येथील बी. व्ही. हिरे आर्किटेक्चर कॉलेजचे तीन विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विद्याशाखेत अव्वल आले आहेत.

एकाच आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांकावर मुंबई विद्यापीठात झेप घेण्याची अभिमानास्पद घटना विद्यापीठाच्या इतिहासात अपवादानेच असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आर्किटेक्चर विद्याशाखेची पदवी परीक्षा एप्रिल २०१७ मध्ये झाली. यात डॉ. हिरे कॉलेजचे विद्यार्थी प्रणील विलास चित्रे (९.४ सीजीपीए) , स्वरूपा सतीश गोडबोले (९.१ सीजीपीए) आणि निनाद संजय संसारे (८.९८ सीजीपीए) यांनी विद्यापीठात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’कासवगतीने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची नाशिक विभागातील कामे कासवगतीने सुरू आहेत. विभागातील निवड झालेल्या ९०० पैकी सुमारे साडेतिनशे गावांमध्ये योजनेतील ५० टक्केही कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. विभागातील पाचही जिल्ह्यांमधील पूर्ण झालेली एकत्रित २२५ गावांमध्ये मात्र या योजनेला फळ आल्याचे दिसत आहे.

जलयुक्त शिवाय अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी आलेल्या कामांचा विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात झालेल्या गाव आर्थिक विकास आराखडा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागात झालेल्या कामांची माहिती सादर करण्यात आली. २०१९ पर्यंत सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र या उद्देशाने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी उपाययोजनांवर खर्च केला जात आहे. प्रत्येक वर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या अभियानाला प्रशासकियदृष्ट्याही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाशिक विभागात गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानासाठी ९०० गावांची निवड झाली. विभागीय आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. जलयुक्त शिवारच्या कामांच्या पूर्णत्वासाठी ३० जूनचा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र, तरीही सन २०१६-१७ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या सर्व ९०० गावांतील जलयुक्तची कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त या प्रश्नावर काय निर्णय घेतात, याकडे प्रशासकीय यंत्रणांचेही लक्ष लागलेले आहे. जलयुक्तची विभागातील ३४५ गावांमध्ये सुमारे ८० टक्के तर २६७ गावांमध्ये ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. विभागातील ६३ गावांमध्ये तर या योजनेची अगदीच प्राथमिक स्वरुपाची म्हणजे केवळ ३० टक्के कामे झाल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात घ्या बाइकची काळजी

$
0
0


‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने वर्कशॉपचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी या विषयावर महाराष्ट्र टाइम्सतर्फे वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप शनिवार १५ जुलै रोजी त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये होणार आहे. शनिवारी ११ ते १ या वेळेत होणारे हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. बाइक म्हणजे तरुणांचा जीव की प्राण. बाइक पावसात भिजल्यावर सर्वात जास्त अडचण निर्माण होते ती बाइक स्टार्ट करताना. कधी गाडी स्ल‌िप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाटी कारणीभूत ठरतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही. गाडी गॅरेजला नेण्याशिवाय पर्याय नसतो. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी बाइक मेन्टेनन्सचे वर्कशॉप. यात तुम्हाला जाणून घेता येईल की पावसाळ्यात आपल्या बाइकची देखभाल कशी करायची? हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र, या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यामाहा बाइकसाठी ऑफर

जर तुमची यामाहाची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला रेग्युलर बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंट्रल एक्साइज’चा घोळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीसाठी शहरातील कामटवाडे परिसरातील सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व कस्टम कार्यालयने गेले काही महिने जोरदार तयारी केली. मात्र, या कार्यालयाचे जुने फलक अजूनही जैसे थे आहेत. या आयुक्त कार्यालयाने चार मजली इमारतीवर वस्तू एवं सेवा कर आयुक्त कार्यालय असा मोठा फलक लावलेला असला, तरी या कार्यालयाच्या मुख्य गेटवर जुन्या बोधचिन्हासह असलेला फलक अजूनही कायम आहे. त्याचप्रमाणे लिफ्टजवळ असलेले फलकही, तसेच असल्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे फलकावरील काही अधिकाऱ्यांचे दालनही बदलले आहे.

गेले काही दिवस या कार्यालयात सॉफ्टवेअर अपडेट करण्यापासून विविध साहित्याचे शिफ्टिंग करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे जीएसटीचे ट्रेनिंग, विविध क्षेत्रांतील व्यापारी, उद्योजकांच्या कार्यशाळा या कार्यालयात अजूनही सुरू आहेत. नाशिकमध्ये असलेल्या कार्यालयात एका आयुक्तांसोबत ऑड‌टि व अपिल विभागाच्या आयुक्तांनी आपला पदभार सांभाळत कामाला सुरुवात केली आहे. पण, कार्यालयाने जीएसटीच्या तयारीत आपल्या फलकाकडेच दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही बदलाची सुरुवात ही फलकापासून करणे आवश्यक असताना या कार्यालयाने त्याकडे कसे दुर्लक्ष केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कामटवाडे येथे सेंट्रल एक्साइजचे कार्यालय असून, त्यात ४० दालने आहेत. त्यातील सर्व कार्यालये बदलली आहेत. या कार्यालयात आयुक्तांसह विविध अधिकारी, कर्मचारी आहेत. वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम या कार्यालयात सुरू आहे. मात्र, येथील फलकांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिव्हिल इंजिनीअर्सतर्फे कार्यशाळा

दरम्यान, नव्या आर्थिक वर्षात सुरू झालेल्या जीएसटी व महारेरा या दोन विषयांवर असोसिएशन अॉफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स, नाशिक शाखेतर्फे नुकतीच कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सीए विशाल पोतदार यांनी जीएसटीवर व सीए परेश बागरेचा यांनी महारेरावर मार्गदर्शन केले. तिडके कॉलनीत झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व नरेश कारडा यांच्यासह अभियंते, बिल्डर, ठेकेदार, आर्किटेक्ट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या अडचणींविषयी उपस्थितांनी प्रश्न विचारले. दोन्ही वक्त्यांनी संबंधितांचे शंकानिरसन केले. चेअरमन पुनित राय यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास एसीसीईचे विजय सानप, ज्ञानेश्वर गोडसे, संदीप जाधव, सचिन भागवत, समाधान गायकवाड, हर्षद भामरे, जयेश घिया, हर्षल धांडे आदी उपस्थित होते. मॅनेजिंग कमिटी सदस्य अमित अलई यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अनिल कडभाने यांनी आभार मानले.


गोंधळ टा‍ळण्याची निकड

केंद्राचा व राज्याचा जीएसटी यामुळे अगोदरच गोंधळ अाहे. त्यात दोघांची कार्यालये वेगवेगळी आहेत. त्यामुळे वन नेशन वन टॅक्स असे जरी सांगण्यात येत असले, तरी दोन टॅक्सचा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे अगोदरच गोंधळात असलेल्या व्यापारी व उद्योजकांचा गोंधळ फलकाद्वारे होऊ नये यासाठी हे फलक बदलण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांचे वाहनसौख्य लांबणीवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांची खरेदी जीएसटीच्या गणितामुळे बिघडली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पाऊण कोटींची वाहने खरेदी करायला मंजुरी मिळाली असली तरी, जीएसटीमुळे या वाहनांच्या किमती बदलल्याने खरेदी थांबली आहे. जीएसटीसंदर्भात शासनाचे नवीन कॉन्ट्रक्ट येण्यास अवधी असल्याने या वाहनांची खरेदी सध्या तरी करता येणार नाही. त्यामुळे सभागृहनेत्यांसह, स्थायी समिती अध्यक्ष व समित्यांच्या सभापतींना नव्या वाहनांच्या हौसेसाठी थोडावेळ अजून वाट पहावी लागणार आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सत्ताधाऱ्यांनी नव्याने निवडून आलेल्या दहा पदाधिकाऱ्यांसाठी दहा नव्या गाड्या खरेदीला मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेत्यांसाठी ‘मारुती सियाझ’ ही महागडी कार खरेदी केली जाणार आहे, तर इतर सभापतींना स्विफ्ट डिजायर ही गाडी खरेदी केली जाणार आहे. त्यात शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन नव्या समित्यांसह चार प्रभाग समित्यांनाही वाहने दिली जाणार आहेत. त्यासाठी ७४ लाखांच्या खर्चाला मंजुरीही दिली आहे. प्रशासनाकडून या गाड्या खरेदीची तयारीही सुरू झाली आहे. परंतु, एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने या गाड्या खरेदीचे बजेट बदलले आहे. जीएसटीमुळे स्विफ्ट डिजायर स्वस्त झाल्या असल्या तरी, सियाझ ही गाडी एक लाखाने महागली आहे. त्यामुळे खरेदीसाठी वाढीव खर्च येणार असल्याने प्रशासनाने खरेदीला तूर्तास ब्रेक दिला आहे.

नव्याने प्रस्ताव

दहा वाहनांसाठी मंजूर झालेला पाऊण कोटींचा निधी जीएसटीच्या बदललेल्या पार्श्वभूमीवर पुरेसा नाही. त्यामुळे नव्याने वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर करून तो महासभा आणि स्थायी समितीवर सादर करावा लागणार आहे. या प्रक्रियेला पुन्हा दोन ते तीन मह‌िने लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत-इस्त्रायल मैत्री फायदेशीर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत जगासमोर दहशतवादाचे खडतर आव्हान आहे. संरक्षण वा भौगोलिकदृष्टया भारत आणि इस्त्रायल या देशांसमोरील प्रश्नही बऱ्याच अंशी समान आहेत. भारताची बुध्दिमत्ता आणि इस्त्रायलचे तंत्रज्ञान नव्या मैत्रीपर्वात हातात हात घालत आहे. याचा सर्वाधिक फायदा दोन्ही देशांमधील लोकशाही आणि संस्कृती संवर्धनासाठी होईल, असा विश्वास इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल डेव्हीड अकोव यांनी व्यक्त केला.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘भारत इस्त्रायल आंतरराष्ट्रीय संबंधांची आगामी दिशा’ या विषयावर त्यांनी मत मांडले. अकोव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीमुळे सहकार्य आणि मैत्रीच्या नव्या पर्वास सुरूवात झाली आहे. यावेळी व्यासपीठावर इस्रायल वकिलातीतील अनय जोगळेकर, संस्थेचे नाशिकचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर उपस्थित होते.

ते म्हणाले, संरक्षणासारख्या मुख्य विषयासोबतच अन्नसुरक्षा, जलसुरक्षा आणि उद्योजकतेच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांना चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतासमोरही पाणीटंचाई , कृषी, दहशवादाचे आव्हान आणि दुसरीकडे स्टार्ट अप उद्योजकतेचे वाढलेले महत्त्व अशी स्थिती आहे. काही अंशी या प्रश्नांमधील साम्य दोन्ही देशांमध्ये असल्याने सोबत काम करण्यास दोन्हीही देशांना वाव आहे. ठिबक सिंचन, हरितगृह आणि विद्राव्य खते यातील इस्रायली तंत्रज्ञान भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरीही भविष्यात त्यादृष्टीने अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. यावेळी भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, संस्थेचे पदाधीकारी उपस्थित होते.

संरक्षणावर मांडले मत

अकोव म्हणाले, संरक्षणात देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. दोन्ही देशांच्या संबंधामुळे चारित्र्य निर्माण, तंत्रज्ञानातील प्रगती आणि आर्थिक समृद्धी याला हातभार लागणार आहे. जे नागरिक अत्यंत कठीण परिस्थितीत देशाच्या संरक्षण सेवेत जबाबदारी पार पाडतात ते लोकशाही प्रक्रियेसह सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. माझे सपूर्ण कुटूंब हे लष्करी सेवेचा भाग आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतंत्र महिला कारागृह

$
0
0

नाशिकरोडला उभारणी सुरू

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांसाठी स्वतंत्र कारागृह उभारण्यात येत आहे. तटाचे काम बाकी आहे. महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टर व मानसोपचार तज्ज्ञही लवकरच उपलब्ध केला जाईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी म. टा. ला दिली.

मुंबईच्या महिला कारागृहातील मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकरोड कारागृहातील स्थितीबाबत अधीक्षक साळी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील माहिती दिली. नाशिकरोड कारागृहात ३२३५ बंदी आहेत. त्यामध्ये १२८ महिला आहेत. या १२८ पैकी ६८ पक्के (शिक्षा सुनावलेले) तर ६० कच्चे महिला बंदी आहेत.

महिला डॉक्टर हवा

या कारागृहात महिला बराकींची क्षमता ६० बंद्याची आहे. परंतु, दुप्पट महिला कैदी असल्याने नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. सव्वातीन हजार कैद्यांसाठी दोन पुरूष डॉक्टर आहेत. रात्रपाळीला डॉक्टर नसतो. राज्य सरकारकडे महिला तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाने महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सतर्क महिला रक्षक

कारागृहाच्या भिंतीवरून मोबाइल आत फेकण्याचे तसेच कैद्यांच्या नातेवाईकांकडून मोबाइल आत जाण्याचे प्रमाण वाढल्याने महिला कर्मचाऱ्यांना गेट आणि मुख्य जागी नियुक्त करण्यात आले आहे. कारागृहाचे मनोरे आणि भिंतीवर त्यांना तैनात करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातांचे ग्रहण सुटेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वररोड हा शहरातील वर्दळीच्या रस्त्यांपैकी प्रमुख रस्ता मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकरोडला अपघातांचे जूण ग्रहणच लागल्याची स्थिती दिसून येत आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातांत जायबंदी होण्यासह अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. त्यातच महापालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्याला अनेक ठिकाणी पंक्चर ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी रोजच अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह सातपूरकरांनी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी पुढाकार घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

महापालिकेने सन २००२ मधील सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वररोडचे रुंदीकरण केले होते. त्यानंतर गेल्या कुंभमेळ्यातदेखील दुभाजकांसह डांबरीकरणाचे काम महापालिकेने केले. या रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरला भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांची रोजच मोठी वर्दळ असते. त्यातच एज्युकेशन हब म्हणूनही त्र्यंबकरोडची ओळख झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, त्यामुळे त्र्यंबकेश्वररोडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रोजच एकतरी अपघात त्र्यंबकरोडवर होतच असल्याची स्थिती आहे. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांसह रहिवाशांकडून अनेकदा केली जात आहे. परंतु, त्याकडे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या हद्दीत केवळ सात किलोमीटर असलेल्या रस्त्यावर तब्बल ३६ पंक्चर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांना पंक्चरमुळे अडथळा निर्माण होत अाहे. यात अनेकदा अपघातही झाले आहेत. रोजच किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येते. नुकत्याच झालेल्या एका अपघातात चारचाकीने दुचाकीला उडविले. परंतु, सुदैवाने दुचाकीस्वारास केवळ मुका मार लागला. अशा अपघातांमुळे पंक्चरच्या ठिकाणी रोजच अपघात होत असल्याने गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.


दुभाजक टाकणार कोण?

त्र्यंबकरोडवर पवार पेट्रोलपंपासमोर नेहमीच अपघात होत असल्याने रहिवाशांच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी पोलिसांच्या लोखंडी जाळ्यांचे दुभाजक टाकण्यात आले होते. त्यानंतर रहिवाशांनी कायमस्वरूपी दुभाजक व गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याकडे स्थानिक नगरसेवकांसह महापालिकेने दुर्लक्षच केले आहे. दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या दुभाजकातील जाळ्या नेहमीच पेट्रोलपंपावरील कर्मचारी हटवत असल्याने अपघातांना आमंत्रणच दिले जात आहे. स्थानिक नगरसेवकांनी दुभाजकांसह गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


महापालिकेच्या हद्दीत असलेल्या त्र्यंबकेश्वररोडवर रोजच अपघात होत आहेत. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकले पाहिजेत. सात किलोमीटर अंतरासाठी ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले पंक्चरही कमी करण्याची गरज आहे.

- गणेश निगळ, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाला मिळणार जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई हाय कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीत असलेली अडीच एकर जागा जिल्हा कोर्टाच्या विस्तारासाठी देण्याबाबत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हाय कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस विभागाच्या मालकीची अडीच एकर जागेची मोजणी करण्यात आली आहे. ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने कोर्टासाठी देण्याची तरतूद करावी, असे दाखील आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

जनहीत याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. यामुळे जिल्हा कोर्टाच्या विस्तारीकरणाला मदत मिळणार आहे. जुने सीबीएसच्या लगत असलेल्या जिल्हा कोर्टाच्या विस्तारीकरणासाठी जागा मिळावी, अशी मागणी नाशिक, मुंबई व महाराष्ट्र बार असोसिएशनने राज्य सरकारकडे केली. गेल्या १५ वर्षांपासून त्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. २००२ मध्ये शिष्टमंडळाने तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेत न्यायालयाच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला हेता. याची दखल घेत कोर्टासाठी पोलिस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले. परंतु तत्कालिन अधिकाऱ्यांनी त्याचे पालन न केल्याने कोर्टासाठी जागा मिळू शकली नाही.

याचिकेची घेतली दखल

१८८५ सालापासून या कोर्टाला जागा मिळू शकलेली नाही. आता कोर्टाचे कामकाज वाढले आहे. जिल्हा कोर्टात सध्या तीन हजाराहून अधिक वकील कार्यरत आहेत. कोर्टाच्या आवारात विविध प्रकारची ३५ न्यायालये आहेत. या सर्व बाबींची दखल घेत अॅड. का. का. घुगे यांनी जनहित याचिका दाखल केली.

असा केला युक्त‌िवाद

कोर्टाच्या जागेच्या प्रश्नावर समिती नेमण्यात आली. त्या समितीनेही कोर्टाला पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीतील जागा देवू नये अशी भूमिका घेतली. कोर्टासाठी त्र्यंबकरोडवरील दूध डेअरीची ११ एकर जागा देण्यास राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी मान्यता दर्शविली. पण, हा प्रस्ताव गैरसोयीचा ठरेल, अशी भूमिका अॅड. घुगे यांनी मांडली. सद्यस्थितीत पोलिस मुख्यालयाची जागा पडून आहे. तेथील नाशिक ग्रामीण मुख्यालय आडगाव येथे हलविले आहे. नाशिक शहर पोलिसांना या जागेची सध्या गरज नाही, असा युक्तिवाद अॅड. संदीप शिंदे यांनी केला. अखेरीस याचिकाकर्त्यांनी विस्तृत आराखडा सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार तो सादर करण्यात आला. न्यायमूर्ती अभय ओक आणि सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने ही अडीच एकर जागा विस्तारीकरणासाठी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
कोर्टाच्या आवारात न्यायाधिशांनाही बसायला जागा नव्हती. या निर्णयामुळे सर्व प्रश्न मार्गी लागतील. नाशिक वकील संघ व त्यांचे पदाध‌िकारी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. विस्तारीकरण झाल्यामुळे शहराच्या विविध भागात असलेली एकूण ५० हून अधिक कोर्ट एकाच ठिकाणी येतील. त्यात कामगार, औद्योगिक, कौटुंबिक अशा विविध कोर्टाचा समावेश असेल.

-अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, वकील संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुसंस्कारांसाठी केंद्रे गरजेची’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सध्याची परिस्थिती पाहता समाजात सुसंस्कार रुजविण्यासाठी संस्कार केंद्रांची आवश्यकता असून, २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या विचारांत परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श पिढी व नागरिक घडवावेत, हा संस्कार केंद्रांचा मूळ उद्देश आहे, असे मत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ केंद्र सुशोभीकरण व बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शांतीनगर, मखमलाबाद येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वामी दरबार, सभामंडप, पारायण सभामंडप व इतर सुविधांसाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्याअंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर परिसरातील महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. यावेळी साधकांनी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते.

महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक, भाजपचे विजय साने, नगरसेवक पुंडलिक खोडे, नगरसेविका भिकूबाई बागुल, सुनीता पिंगळे, पंचवटीच्या प्रभाग सभापती प्रियंका माने, नगरसेवक जगदीश पाटील, उद्धव निमसे, गणेश गिते, सुरेश खेताडे आदी उपस्थित होते. ऋषिकेश आहेर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगचे नवे फंडे

$
0
0

ओटीपीशिवायही होऊ शकते हॅक

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : व्हॉट्सअ‍ॅप हॅक होत असल्याचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, ओटीपीशिवाय व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकते. गुगल प्लेवर असणाऱ्या काही अ‍ॅप्सच्या मदतीने कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणीतीही व्यक्ती सहजपणे जॉइन होऊ शकेल, असे अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. हे अ‍ॅप्स मुख्यत्वे हॅकिंग विश्वातले छुपे फंडे असल्याचा संशय आहे.

आता व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुप्स देखील असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही ओटीपी किंवा पासवर्डशिवाय मोफत काही अ‍ॅप्स चालवले जात असून, हजारो व्हॉट्सअ‍ॅप्सच्या ग्रुप्सची लिंकही या अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत. किंबहुना या लिंकच्या माध्यमातून पर्सनल नंबर्स, डाटा अप्रत्यक्षरित्या हॅक केला जात असल्याचे दिसते. व्हॉट्स अ‍ॅप्स युजर्सने देखील मोफत अ‍ॅप्सला बळी न पडता मोबाइलमध्ये अॅन्‍टी व्हायरस अपलोड करीत अगदी महत्त्वाच्या ग्रुप्सलाच जॉइन असायला हवे. या सगळ्या अ‍ॅप्समुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगचे प्रकार आणखी वाढू शकतात. आता हॅकर्स सोबतच कोणत्याही परवानगीशिवाय ग्रुपच्या लिंक अपलोड करणाऱ्या या अ‍ॅप्सच्या चालकांवरही पोलिसांनी कठोर व तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

इथून ऑपरेट होतात जॉइन ग्रुप अ‍ॅप्स

तुर्की, गुजरात, सांताक्रूझ यासोबतच देशांतर्गत व परदेशांतून हे अ‍ॅप्स चालवले जात आहेत. तसेच प्रत्येक अ‍ॅप्सचे दोन ते पाच लाखांहून अधिक युजर्स असून यात भारतीयांची संख्या अधिक आहे. या अ‍ॅप्सवरील ग्रुप्समध्ये भारतातील अनेक ग्रुप्सच्या लिंक्स असून, या लिंक्सवर परदेशातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर जॉइन झाल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅडमिन्सनी वेळीच काळजी घेत ओळखीचे नसलेल्या युजर्सला रिमूव्ह करणे सुरक्षित असेल.

असे ‌केले जाते हॅकिंग

‘ग्रुप्स फॉर व्हॉट्सअ‍ॅप, जॉइन ग्रुप ऑन व्हॉट्सअ‍ॅप’ यांसारखे अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेवर उपलब्ध. हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर यात ‘आर्ट अॅण्ड फोटोग्राफी, बिझनेस, कम्युनिटी, फन क्लब, फूड, गेम्स, फनी, अॅडल्ट’असे ग्रुप्सचे ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन्समध्ये लाखो ग्रुप्सच्या लिंक असून, या लिंकवर क्लिक केल्यास जॉइन ग्रुप असा ऑप्शन देण्यात येतो. जॉइन ग्रुपवर क्लिक केल्यानंतर कोणत्याही ओटीपी किंवा युजर्सच्या खात्रीशिवाय तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट या ग्रुपमध्ये समाविष्ट होते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यास किंवा या अ‍ॅपच्या माध्यमातून यूजर कोणत्याही ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करतो तेव्हा त्याच्या ट्सअ‍ॅपचा सर्व डाटा हा अ‍ॅप्स कंपनीकडे आपोआप सेव्ह केला जातो. या अ‍ॅप्सवर ‘अ‍ॅड व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’असाही ऑप्शन आहे. कोणताही युजर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची लिंक परवानगीशिवाय अपलोड करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो खातोय भाव; किलोला शंभरीची धाव!

$
0
0

टोमॅटो खातोय भाव; किलोला शंभरीची धाव!


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात सिंचनाचा प्रश्न असल्याने टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात झाली. पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाच्या सततच्या सरींमुळे टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्याचा परिणाम उत्पादन घटण्यावर झाला. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर प्रचंड वाढले आहेत. वीस किलोच्या टोमॅटोच्या क्रेटला कृषी उत्पन्न बाजार समितीत ८०० ते १२०० रुपयांचा दर मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारात टमाट्यांचे भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे दैनंदिन भाज्यांच्या नियोजनातून टोमॅटो गायब होणार आहे.

का घटले उत्पादन?

-उन्हाळ्यात पीक असेल तर फुले कोमेजतात

- उन्हाळ्यात पुरेसे पाणी नसते

- वळवाचा पाऊस, वाऱ्याने फुले, फळे झडतात

- सततच्या पावसाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

- ‌पावसामुळे फळे सडू लागतात

आवक कधी वाढेल?

-दोन महिने आवक कमीच

- पावसाळ्यातील टोमॅटो ऑगस्टनंतर बाजारात


पिंपळगावला आवक घटली

टोमॅटोचे मोठे मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक होत नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामात पाच ते सात हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत असते. गुरुवारी फक्त ४४६ क्विंटल आवक झाली आहे. या बाजारात प्रतिक्रेट सरासरी ९५० रुपये असा भाव मिळाला. त्यातही चांगल्या दर्जाचा टोमॅटो दुर्मिळ झाला आहे.

यंदा उत्पादन कमी..

टोमॅटोची लागवड होण्यास सुरुवात झाली असली, तरी श्रावणात मोठ्या प्रमाणात लागवडी होतात. हा टोमॅटो निर्यात होत असल्याने त्याला चांगले दर मिळतात. मात्र, गतवर्षी टोमॅटोच्या निर्यातीला अडचणी आल्यामुळे भाव घसरले होते. शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागल्याने त्याचा परिणाम होऊन यंदा टोमॅटोचे उत्पादन कमी राहील की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.


नवीन वाणांची लागवड

टोमॅटोचे नवी विकसित वाण दरवर्षी येत असल्यामुळे काही वाण चांगले निघतात, तर काही बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूकही होत असते. त्यामुळे नव्या वाणाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी धजावत नाही. प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेले टोमॅटोचे शेत बघितल्यानंतर खात्री करूनच अशा नव्या वाणांची लागवड करण्यात येते. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या दर्जेदार वाणांची शेतकरी पारखून लागवड करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी मार्क्स, नंतर परीक्षा!

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर
कॉलेजरोडवरील एनबीटी लॉ कॉलेजमध्ये एलएलएमच्या विद्यार्थ्यांना इंटर्नलचे मार्क्स आधी देण्यात आले आणि त्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

सध्या विविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबई विद्यापीठापाठोपाठ आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणांमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे. भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य ग‌िते यांनी केलेल्या तक्रारीनुसार, एनबीटी लॉ कॉलेजमध्ये सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात एलएलएमच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याची तारीख उलटली, त्यापूर्वीच कॉलेजने मार्क्स विद्यापीठाला कळविले. ही तारीख उलटल्यानंतर कॉलेजने इंटर्नल परीक्षा घेतल्याचे म्हटले आहे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेता परस्पर गुण पुणे विद्यापीठाला पाठवले. परीक्षेची तारीख निघून गेल्यावर विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. तसेच तोंडी परीक्षेअंतर्गत कॉलेजच्या प्राचार्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही भाजयुमोने केला आहे. कॉलेजांच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे नाव आणि तोंड पाहून गुण दिल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. सन २०१४-१५ मध्येही प्राचार्यांना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे गुण प्रक्रियेपासून दूर ठेवले होते, असा संदर्भही पत्रात देण्यात आला आहे. तसेच बीएलएल आणि एलएलबी या अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षाचे गुण देतानाही कॉलेजमध्ये अधिकाराचा गैरवापर झाल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची योग्य चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोने पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षलागवडीत नाशिक ठरणार अव्वल

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकारतर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमात पहिल्या पाच दिवसांतच नाशिक विभागाने ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्द‌िष्ट्य पार केले असून, आतापर्यंत नाशिक विभागात ८२ लाख ७२ हजार ८० रोपांची लागवड झाली आहे. या मोहिमेच्या उर्वरित कालावधीत लागवड केलेल्या रोपांची संख्या सव्वा कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याने राज्यातील सहा महसूल विभागांत सर्वाधिक रोपे लागवडीचा मुकूट नाशिक विभागाला मिळणार आहे.

नाशिक विभागात १ जुलै रोजी वृक्ष लागवड मोहिमेस विभागातील पाचही जिल्ह्यांत प्रारंभ झाला. या मोहिमेत विभागातील सर्व जिल्ह्यांत शासकिय यंत्रणांसह स्वयंसेवी व शैक्षणिक संस्थांसह, ग्रीन आर्मी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रोपांची लागवड केली. यंदा राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य ठेवलेले आहे. त्यापैकी नाशिक विभागात ७६ लाख ४३ हजार रोपे लागवड केली जाणार होती. परंतु या वृक्षलागवडीच्या मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांतच नाशिक विभागात तब्बल ८२ लाख ७२ हजार ८० इतक्या रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. आतापर्यंत उद्द‌िष्टाच्या सुमारे १०८ टक्के रोपांची लागवड झाली आहे.

या मोहिमेच्या उर्वरीत कालावधीत १ कोटी २५ लाख पेक्षा जास्त रोपांची लागवड होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचा मान नाशिक विभागाला मिळणार आहे. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी होत मोहाडी (ता दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म्स येथे व बोरटेंभे (ता. इगतपुरी) येथे वृक्षलागवड केली. यावेळी दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी वीकएण्डचा बदलता ट्रेंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गेल्या काही वर्षांत शहराची लोकवस्ती चोहोबाजूंनी झपाट्याने वाढली आहे. राज्यातूनच नव्हे, तर देश-विदेशांतून कामानिमित्ताने नागरिक नाशिकला वास्तव्यास आले आहेत. अशा असंख्य सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यटनप्रेमी नागरिकांत सुटीचा दिवस निर्सगाच्या ठिकाणी घालविण्याचा ट्रेंड वाढीस लागत असून, पावसाळी वीकएण्ड निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

त्र्यंबकेश्वर व गिरणारे परिसरात निर्सगाच्या ठिकाणी सुटीच्या दिवशी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. सुटीचा एक दिवस पूर्णपणे कुटुंबासह चाकरमाने देत असल्याने डोंगर भागात रस्ते वाहनांनी हाउसफुल्ल झालेले पाहायला मिळत आहेत. डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात मिळेल त्या ठिकाणी भिजत पर्यटक सुटीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

रोजच कामाच्या दगदगीतून सुटका करणारा सुटीचा दिवस घालवावा कुठे, असा प्रश्न उभा राहतो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चाकरमाने वीकएण्डचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबासह घालविताना दिसून येत आहेत. नाशिक शहराला लागून असलेल्या त्र्यंबकेश्वर व गिरणारे परिसरात डोंगर भागात पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्यांमध्ये मिळेल त्या ठिकाणी पर्यटक कुटुंबासह निसर्गस्नान करण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्र्यंबकेश्वररोडवर डोंगरावरून पडणाऱ्या झऱ्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी चिमुकल्यांसह अबालवृद्धही मजा घेत आहेत.

दरम्यान, सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक निर्सगाच्या ठिकाणी जात असल्याने प्रशासनाकडून मात्र पाहिजे त्याप्रमाणात काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. अनेकदा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीवही गमवावा लागला आहे. माहिती नसलेल्या पाण्याच्या ठिकाणी प्रशासनाने नोटीस फलक लावले पाहिजेत, असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे.

--

सुटीचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. यात त्र्यंबकेश्वर व गिरणारे रस्त्यावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. चिमुकल्यांसह अबालवद्ध भरपावसात डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्यात ओलेचिंब होत आहेत.

-दिगंबर निगळ, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीला आक्षेप घेणाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

झाडे तोडण्याआधी महापालिकेची परवानगी घ्या, असे सांगणाऱ्या पर्यावरणप्रेमी ऋष‌िकेश नाझरे यांना समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पर्यावरणप्रेमींनी याचा निषेध केला आहे.

नाझरे हे अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. महापालिकेने गंगापूररोडसह शहरात विविध ठिकाणी केलेली चुकीची वृक्षतोड त्यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास वेळोवेळी याचिकेद्वारे आणून दिली आहे. त्यांच्या याचिकेमुळेच सध्या नाशिकमधील वृक्षतोडीस हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. गंगापूररोडवर रस्त्याला अडथळा न ठरणारी गुलमोहराची बारा झाडे तोडली जात असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नाझरे यांना कळवले. त्याची माहिती घेण्यासाठी नाझरे गेले असता एका नेत्याच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. हायकोर्टाची स्थगिती असतानाही झाडे तोडल्याचे सांगून नाझरे म्हणाले की, पर्यावरण रक्षण करणे हे घटनेनुसार माझे कर्तव्य व हक्क आहे. हायकोर्टाची स्थगिती असताना झाडे तोडून कोर्टाचा अवमान करू नका, इमर्जन्सी बाब असेल तर महापालिकेची परवानगी घ्या, एवढेच आपण सांगितले, तरी बारा झाडे तोडण्यात आली व मला मारहाण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विन झळकेने दिले १३ व्यक्तींना जीवदान!

$
0
0

नाशिकमधून आठव्यांदा ग्रीन कॉरिडॉर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण आता अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तामुळे एका जणाला जीवदान मिळते, तर अवयवदानाने अनेक जणांना. नाशिकमध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या अश्विन झळके या युवकाचे अवयव दान करण्याचा, त्याच्या नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे तब्‍ल १३ लोकांना जीवदान मिळाले आहे.

जेलरोड येथील अश्विन झळके अपघातात ब्रेन डेड झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांच्‍या परवानगीनंतर अवयव दानाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ऋषिकेष हॉस्पिटलच्या १४ डॉक्टरांची टीम मेहनत घेत होती. ऋषिकेष हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

किडनी रस्तामार्गे

दुपारी १२ वाजता त्यांची किडनी रस्त्याच्या मार्गाने पुण्याला पाठविण्यात आली. तर दुसरी किडनी ऋषिकेश हॉस्पिटल येथे असलेल्या एका रुग्णाला देण्यात आली. पुण्याला पाठवलेली किडनी ३ वाजून १५ मिनिटांनी पुण्याला पोहचली.

हृदय एअर अॅम्ब्युलन्सने प्रथमच रवाना

सकाळी १० वाजता : ऋषिकेश हॉस्पिटलहून अॅम्ब्युलन्स निघाली. १०.३० वाजता : अॅम्ब्युलन्स ओझर विमानतळावर पोहचली.
११.३० वाजता : ओझरहून एअर अॅम्ब्युलन्स पुण्यात पोहचली. ११.४५ वाजता : हृदय रुबी हॉस्पिटलला पोहचले. लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात गढूळ पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर आणि दारणा धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दिलासा मिळाला असतानाच, शहरात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. शहरातील पंचवटी, नाशिकरोड, सिडको, द्वारका आणि जुने नाशिक परिसरात गढूळ पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने लोकप्रतिनिधीही त्रस्त झाले आहेत. अगोदरच साथीच्या आजारांचे थैमान शहरात सुरू असताना गढूळ पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी गढूळ पाणीपुरवठ्याची गंभीर दखल घेतली असून, दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गढूळ पाणीपुरवठा टाळण्यासाठी पालिकेने खरेदी केलेले कोट्यवधीचे अॅलम कुठे गेले, असा प्रश्नही या निम‌ित्ताने उपस्थित होत आहे.

गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून, गंगापूर धरणाचा साठा हा ४१ टक्क्यांच्या वर गेला आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत येत आहे. परंतु, जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची शुद्धता पुरेशी होत नसल्याने गढूळ पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः पंचवटी, नाशिकरोड, सिडकोतील काही भाग, जुने नाशिक, द्वारका, इंद‌िरानगर या भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांकडून पालिकेच्या अॅपवरही तक्रारी करण्यात आल्या असून लोकप्रतिनिधीही त्रस्त झाले आहेत.


अॅलमचा योग्य वापर नाही

शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असताना पाणीपुरवठा विभाग मात्र सुस्त आहे. गढूळ पाणीपुरवठा थांबवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फिल्टर बॅकवॉश आणि फिल्टर वॉशिंगचे प्रमाण वाढवलेले नाही. तसेच अॅलमचा योग्य प्रमाणात वापरही होताना दिसत नाही. पाणीपुरवठा नियंत्र‌ित करणाऱ्या पथकात तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा बेभरवशावर होत आहे. या प्रकाराची महापौरांनी गंभीर दखल घेतली असून, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना पाचारण करत, त्यांना जाब विचारला आहे. तसेच दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे शहरात साथीचे आजार वाढण्याची भीती असून, तातडीने फिल्टरेशन प्लान्टमधील बिघाड दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोट्यवधींची औषधे गेली कुठे?

पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य गढूळ पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण केंद्रासाठी कोट्यवधींचे अॅलम आणि औषधे खरेदी केली जातात. परंतु, तीन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असताना या औषधांचाही वापर झालेला दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधीची औषधखरेदी जाते कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नवीन खरेदीसाठी विभागाकडून हा पुरवठा मुद्दाम गढूळ केला जात असावा असा संशयही व्यक्त केला जात आहे.


गढूळ पाणीपुरवठा का होतोय याची माहिती घेऊन पाणीपुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी. साथीचे आजार वाढू नयेत याची दक्षता घ्यावी.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images