Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मजुराच्या मुलीला हवं आर्थिक पाठबळ

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

घरात अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांची मोलमजुरी तर आईचा शिवणकाम व्यवसाय. कुटुंबात शिक्षणाचे वातावरण नसताना दीपालीने इयत्ता दहावीत ९०.६० टक्के गुण मिळविले. पण, एवढे गुण मिळाल्यावरही पुढे करायचे काय, हा प्रश्न तिला सतावतो आहे. इंजिनी‌अरिंग बनण्याचे स्वप्न असले तरी शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा या प्रश्नाने वरघडे कुटुंब चिंतीत आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ तिच्यापाठी लाभले तरच हे शक्य होणार आहे.

त्र्यंबकेश्वररोडलगत असलेल्या तिरडशेत या छोट्याश्या आदिवासी गावात शासनाने दिलेल्या घरकुलात दीपालीचे कुटुंब वास्तव्य करीत आहे. शिकण्याची जिद्द असेल तर कुठेही शिक्षण घेऊन पुढे जाता याचे याचे उदाहरण म्हणजे दीपाली देवराम वरघडे हिचेच द्यावे लागेल. घरात कुणीही शिकले नसताना शाळेतील शिक्षकांच्या सांगण्यावरून दीपाली अभ्यासात आपली चुणूक दाखवू लागली. दीपालीला भरारी घ्यायची आहे. त्यासाठीच तिला समाजातील दातृत्वाची साथ हवी आहे.

दीपालीला बनायचंय इंजिनीअर

तिरडशेत गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची सोय होती. यानंतर दीपालीला कोणत्या शाळेत टाकायचे? असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या स्वाती वानखेडे या दीपालीच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी गंगापूररोडवरील नवरचना शाळेत दीपालीचा प्रवेश करून दिला. यानंतर शाळेतील होस्टेलमध्ये दीपालीच्या निवासाची सोय झाली.

होस्टेलच्या रेक्टर सीमा गायकवाड यांच्या सहकार्याने कुठलाही क्लास न लावता दीपालीने दहावीत ९०.६० टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी दीपालीला समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. भविष्यात दीपालीला इंजिनीअर बनण्याची इच्छा आहे.

आदिवासी गाव असलेल्या नाशिक तालुक्यातील तिरडशेतमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या केवळ बोटावर मोजण्याइतकीच आहे. शहराला लागून असलेल्या गावाचा समावेश महापालिकेत न झाल्याने गावात दारिद्रय पसरलेले आहे. अशा नकारात्मक परिस्थितीवर मात करीत दीपालीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. आई, वडील दोघेही अशिक्षित असताना शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे दीपालीला शिक्षणाची जिद्द निर्माण झाली. गावातील जिल्हा परिषद शाळेतही तिने चमकदार कामगिरी केली. दीपालीच्या घराची परिस्थिती बेताचीच. शासनाने दिलेल्या घरकुलात दीपालीचे कुटुंब वास्तव्यास आहे. वडील देवराम पाच वर्षांपूर्वी एका पायाने अधू झाले. मोलमजुरी करणाऱ्या दीपालीच्या आईने बचतगटाच्या माध्यमातून शिवणकाम शिकून घेतले. दीपालीही वेळ मिळेल तेव्हा आईला शिवणकामात मदत करते. तिची छोटी बहीण मयुरी नववीत तर भाऊ अभिषेकही सातवीत नवरचना विद्यालयात शिकत आहे.

आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या दीपालीच्या डोळ्यात इंजिनीअर होण्याची स्वप्ने आहे. मात्र, पुढील शिक्षण घ्यावे कसे, असा मोठा प्रश्न तिच्या कुटुंबासमोर आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सहाय्य केले तर तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शिक्षिका सीमा गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि मदत दीपालीला आजवर मोलाची ठरली आहे. घरात आई, वडील अशिक्षित असतांना शिक्षकांच्या मदतीने दीपाली व तिची भावंडे शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहेत. दीपालीला वेगळे करण्याची आस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवला वनविभागाने गाठले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वनमहोत्सवांतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यभरात तब्बल ४ कोटी वृक्ष लागवडीच्या राज्य शासनाच्या यंदाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांत येवला वनविभागाने मोहिमेच्या सहाव्या दिवशीच आपले उद्दिष्ट गाठले आहे. येवला वनविभागाच्या हद्दीत ठरवून देण्यात आलेल्या एकूण ७८ हजार १९३ वृक्षलागवडीच्या उद्दिष्ठातील ७७ हजार ७१० वृक्षांची लागवड बुधवारी सायंकाळपर्यंत झाल्याची माहिती येथील वनविभागाच्या सूत्रांनी दिली. उर्वरित अवघ्या ४८३ वृक्षलागवडीचे काम गुरुवारी करण्यात आले. येवला वन विभागाच्या वतीने आपल्या हद्दीतील कुळवाडी-श्रीरामनगर व बोकडदरे (तालुका निफाड), तसेच सावरगाव व राजापमर (येवला) या वनहद्दीतल एकूण ७१ हेक्टर क्षेत्रात ही वृक्षलागवड करण्यात आली आहे.

आयटीआयमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

येवला ः बाभूळगाव येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था व सामाजिक वनीकरण येवला उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय इमारत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसिलदार नरेशकुमार बहिरम, वनक्षेत्रपाल अनिल परब, निवृत्त सहाय्यक वन संरक्षक विजय चोंडेकर, प्राचार्य विजय बाविस्कर आदींच्या हस्ते विविध प्रकारच्या ७५ रोपांचे रोपण करण्यात आले. संस्थेच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचे नेहमीप्रमाणे गुलाबपुष्प देवुन नव्हे, तर प्लास्टिक कुंडीतील गुलाबाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.

वनमहोत्सवाचे औचित्य साधून येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात शाळेतील चिमुकल्यांनी वृक्ष लागवडीचा आनंद घेतला. मुक्तानंद कॉलेजमध्येही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोल‌िस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाला ५१ तालांचा विश्वविक्रमी ‘प्रसाद’

$
0
0

नाशिकचे शिवराय ढोल पथक विश्वविक्रमाला गवसणी घालणार असून, या पथकातील तीनशे वादक एकाच वेळी ५१ श्लोक ५१ कला, ५१ तालात, एका संकल्पनेवर सादर करून पाच विश्वविक्रम करणार आहेत. हे वादन ६ ऑगस्ट रोजी विश्वास लॉन्स येथे सादर केले जाणार आहे.

घराघरांमध्ये पूर्वी मुखोद्गत असणारे ५१ श्लोक नव्या पिढीपर्यंत पोहचावे यासाठी हा उपक्रम शिवराय ढोल पथक राबविणार आहे. श्लोक सादर करतानाच भारतीय पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहचाव्यात हा देखील या मागचा उद्देश आहे. या कला पोहचविण्यासाठी ५१ कलाकार एकाच वेळी ५१ कलांचे सादरीकरण करणार आहे. या कलांमध्ये पोर्ट्रेट, रांगोळी, लमसा, मधुबनी, वारली इत्यादी पारंपरिक कलांचा समावेश आहे. या ढोलवादनात भारतीय श्लोक ५१ तालात बांधले असून, एकावेळी तीनशे वादक ते सादर करणार आहेत. या उपक्रमाचा सराव रोज संध्याकाळी ठक्कर डोम येथे सुरू असून, जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे अवाहन शिवराय ढोल पथकाच्यावतीने करण्यात आले आहे. या ढोल पथकात ६० टक्के महिला असून ४० टक्के पुरुष आहेत. त्याचप्रमाणे यातील वादक हे इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील असे उच्च विद्याविभूषीत आहेत. याच कार्यक्रमाबरोबर गणेशोत्सवाच्या निमित्ताने ५१ तालांचा नैवेद्य बाप्पाला देण्याची यामागची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे डी. जे आणि ढेलपथक यांची अनोखी जुगलबंदी देखील यावेळी लोकांना पहायला मिळणार आहे. असा प्रयोग भारतात प्रथमच सादर केला जाणार आहे. त्याच बरोबर आपल्या पारंपरिक वाद्याबरोबर ढोल पथकाचा स्टेज शो देखील सादर करणार आहे.

गिनीज रेकॉर्डसाठीही प्रयत्न

या विश्व विक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वंडर बुक्स ऑफ रेकॉर्ड लंडन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंड‌िया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये देखील या उपक्रमाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाचा प्रस्ताव या संस्थांना पाठवल्यानंतर लगेचच या पाचही संस्थांच्या प्रतिनिधींनी हे वादन युनिक असल्याचे सांगून येण्याचे निश्चित केले आहे.


विश्वविक्रमी वादनासाठी वर्षभरापासून प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घोऊन कार्यदेशीर कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. वादनासाठी वादकही सराव करीत आहे.

शौनक गायधनी, संस्थापक

५१ ताल, ५१ कला याचा मिलाप पहाण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. महिलांची संख्या नेहमी प्रमाणे जास्त आहे.

- अमी छेडा, वादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न सुटणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपालिका प्रशासनाकडून सटाणा शहरात सध्या तब्बल दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने बुधवारी (दि. १२) ‘सटाणावासीयांची भागेना तहान’ या म‌थळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष सुनील मोरे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ७) गिरणा नदीपात्रात ४८० दलघफू इतके बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सटाणा शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

शहराला कळवण तालुक्यातील चणकापूर, पुनद व सटाणा तालुक्यातील केळझर धरणातून गिरणा नदीद्वारे आवर्तन मिळते. सटाणा शहराला खऱ्या अर्थाने जानेवारीपासून ते थेट जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने सटाण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

शहरातील चार जलकुंभावर आठ विभाग करण्यात आले होते. एका जलकुंभावरून दोन विभागांना तब्बल दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.

शहरवासीयांना बारमाही दररोज पाणीपुरवठा केल्यास ४५ लाख लिटर पाण्याची गरज असतांना पालिका प्रशासनाकडे इतके पाणी उपलब्ध होत नाही. किंबहुना पालिका प्रशासनाकडे पाणी साठविण्यासाठी पर्याय नसल्याने शहरवासीयांना एक दिवसाआड नियमित सुमारे २२ लक्ष लिटर पाणी वितरित करण्यात येत आहे. मात्र गत महिनाभरापासून गिरणा नदी व शहरातील आरम नदी पात्र कोरडेठाक असल्याने शहरातील नदीपात्रालगत असलेल्या विहिंरींच्या उद्भवावरून पालिका प्रशासन मोठ्या कसरतीने दहा दिवसाआड पाणी पुरवित आहे. अवघ्या ४ ते ४.५ लाख लिटर इतक्या कमी प्रमाणात पाणी जलकुंभाद्वारे पुरविले जाते. परिणामी शहरातील सुमारे ४० हजारांहून अधिक लोकसंख्येला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी जनतेला उन्हाळ्यापासून पावसाळा सुरू झाला तरी रस्त्यावर वणवण भटकावे लागत असल्याने स्थानिक नागरिक मेटाकुटीस आले होते. पावसाळा सुरू होवूनही पाण्याचे टँकर्स धावत होते. मात्र आता शहरात पाणीपुरवठा होणार आहे.

असे मिळाले शहरासाठी आवर्तन

१२ एप्रिल - केळझर धरणातून तिसरे व अखेरचे आवर्तन

३ मे - पुनद व चणकापूरचे एकत्रित आवर्तन. या दोन आवर्तनामुळे मे महिन्याचा पहिला पंधरवाडा पार पडला. मात्र नंतर पाणीटंचाई जाणवली.

२८ मे - पुन्हा पुनदचे आवर्तन मिळाले. हे आवर्तन मिळूनही शहरातील जनतेला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता.

८ जून - चणकापूरचे मालेगावसाठीचे आवर्तन लांबले. जूनमध्ये शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत होता.

६ जुलै - नगराध्यक्ष मोरे, आमदार आहेर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडले वास्तव

नागरिकांमधील संताप आणि ‘मटा’च्या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शहरातील पाणीप्रश्नाचे वास्तव मांडले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चणकापूरमधून आवर्तन सोडण्यासाठी परवानगी दिली. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी गटार योजनेला अखेर मान्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटार योजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांत यासाठी दीडशे कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. या योजनेमुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत भुसे बोलत होते. शहराच्या भुयारी गटार योजनेच्या मागणीसाठी भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला मालेगाव भुयारी गटारीचा कामाचा समावेश करून केंद्र शासनास प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली. लवकरच या संदर्भात शासन पातळीवरून किंवा महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रके, आराखडे तयार करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणार आहे. दरम्यान या योजनेचा प्रकल्प मार्गी लागत असताना मालेगाव महापालिका हद्दवाढ झालेल्या गावांचा समावेशसह ही योजना मार्गी लावावी व त्यासाठी जास्तीजास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती फडणवीस यांना केल्याचे भुसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्जासाठी वेटिंगच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात जून अखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतक-यांना अवघे ११.४१ टक्के म्हणजे ३२० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. या सर्व ३४ बँकांना २८०६ कोटींचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. पण, त्याची टक्केवारी खूपच कमी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गेल्या वेळेस खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ३ लाख ३ हजार ६९६ शेतकऱ्यांना २,७८३ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याने त्याची टक्केवारी ११८ टक्के झाली होती. त्यात जिल्हा बँकेने सर्वाधिक १७१९ कोटी १८ लाख कर्ज वाटप केले होते. यावर्षाच्या मे अखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी फक्त शेतकऱ्यांना १६८ कोटी १४ लाख रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यात जूनची १५२ कोटींची भर पडली आहे. आतापर्यंत १५ हजार ९४३ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांची संख्याच ८ लाखांच्या आसपास आहे. जे सभासद झाले अशा शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. इतकी मोठी संख्या असतांना केवळ सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे काहीसा फायदा झाला असला तरी त्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी अजून दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर त्यांना नवीन कर्ज मिळेल तोपर्यंत खरीप हंगाम संपलेला असेल. या सर्व परिस्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवाणी करून किंवा सावकाराकडून कर्ज घेवून खरीप हंगामाचे पीक घेतले आहे. पावसाळ्यात खरीप हंगामासाठी खरं तर मार्चनंतर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो. मात्र, यंदा नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले, तर कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाही परिणाम या कर्जवाटपावर झाला आहे.

पीक विम्यावर परिणाम
जिल्हयात खरीप पिकाचे कर्ज वाटप कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पीक विम्यावर झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणेला पीक विमा काढण्याचे निर्देश दिले आहे. बँकेतून कर्ज घेतल्यानंतर पीक विमाचे पैसे त्यातून कट होत होते. यावेळेस कर्ज नसल्यामुळे परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई येथे येत्या ९ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हा, तालुका, शहर अशा वेगवेगळ्या समित्यांच्या स्थापना करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी नांदूर येथे जिल्हास्तरीय बैठक झाली. यात जिल्हास्तरीय नियोजन कशा प्रकारे असावे यासाठी चर्चा करण्यात आली. गाव व तालुका पातळीवरील समित्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. समाज प्रबोधनासाठी वाहनांवर स्टिकर लावणे, गावागावात होर्डिंग, बॅनर लावणे, प्रसिध्दी समिती, वाहतूक समिती, स्वयंसेवक समिती यांच्या माध्यमातून कामकाज करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी ठराविक स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली. गावोगावी बैठका घेण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात होणाऱ्या बैठकांसाठी उमेश शिंदे व संतोष माळोदे यांच्याकडे तर शहरातील बैठकांसाठी योगेश नाटकर व विशाल कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईला होणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव कसे सहभागी होतील याविषयीचे चर्चा करण्यात आली. त्यामध्ये करण गायकर, मधुकर कासार, शिवाजी मोरे, अमोल वाजे, शरद तुंगार, मच्छिंद्र निमसे, सागर माळोदे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणाने गावांचा विकास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिका हद्दीबाहेरील गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास प्राधिकरणाने गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर नाशिकचा क्रमांक आहे. रस्ते जोडणीसह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न आवश्यक आहे. नाशिक हे गुंतवणूकीसाठी अग्रेसर झाले पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी केले.

निमा आणि क्रेडाई यांच्यातर्फे विकास प्राधिकरण नियोजनाबाबत चर्चासत्र झाले. यावेळी झगडे बोलत होते. कार्यक्रमास यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्‌, नगरविकास विभागाच्या प्रतीभा भदाणे, ‘क्रेडाई’चे राजूभाई ठक्कर, ‘निमा’चे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी उपस्थित होते. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे, नागपूर आणि आता नाशिक प्राधिकरण स्थापन झाले आहे. यामुळे गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. नाशिकला ही संधी मिळाली आहे. नाशिकची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरासह लगतच्या गावांचा विकास झाला पाहिजे. शहराची देखभाल करण्यासाठी महापालिका सक्षम आहे, परंतु लगतच्या सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबक व निफाड ही गावे एकमेकांना जोडले जाणार आहे, अशी माहिती झगडे यांनी दिली.

मुंबई आणि पुण्याचा विकास झाला असला तरी नाशिक अद्याप मागे आहे. नाशिक हे संपूर्ण भारताचे गुंतवणूकीचे केंद्र झाले पाहिजे. त्यासाठी याठिकाणी सुरुवातीला रस्त्यांची जोडणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसेच रोजगाराचे साधन उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे आहे. भविष्यातील चांगली शहरे विकसित करण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना झाल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे मते जाणून घेतली.

नाशिकमध्ये ‘मेक इन नाशिक’ची संकल्पना राबविण्यात येत असून त्याद्वारे संरक्षण, कृषी या क्षेत्रातून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेजारी-शेजारी असणारे गावे एकमेकांना जवळची व वाहतुकीला सुरळीत वाटली पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचेही झगडे यांनी सांगितले. यावेळी ‘नाईस’चे विक्रम सारडा, दिग्विजय कापडिया, अनुप मोहबंसी, जितूभाई ठक्कर, किरण चव्हाण, धनंजय बेळे, नरेश कारडा आदी उपस्थित होते.

विकास प्राधिकरण जादू नाही
विकास प्राधिकरण सुरू होणार म्हणजे खूपच विकास लगेच होणार असेही नाही. त्यासाठी काही अवधी लागेल. प्राधिकरण हे सर्वांच्या सूचना विचारात घेऊनच काम करीत असते. कोणत्याही कायद्यात बदल करून प्राधिकरणाकडून विकास होत नाही. त्यामुळे प्राधिकरण आले म्हणजे लगेच उद्या विकास होईल, असेही मानू नका, याकडेही झगडे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्याकूळ नामपूरचा पाणीप्रश्न सुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने सटाणा तालुक्यातील नामपूर गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत १६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नामपूर गावात सटाणा, ताहराबाद, मालेगाव, साक्री गावातील शेतकरी कामानिमित्त येतात. तसेच मुलांच्या शिक्षणसाठी काही शेतकरी बांधव नामपूर येथे स्थायिक झाल्याने गावाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढत असताना गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

डॉ. भामरे यांनी प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने नामपूरसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २०१७-१८ च्या आराखड्यात १६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हरणबारी ते नामपूर अशा ३६ किलोमीटरच्या पाइपलाइनद्वारे २.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चार लाख लिटर आणि तीन लाख लिटरच्या अशा दोन टाक्या उभारण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ २० हजार लोकसंख्येला होणार असून वाढीव भागातील वितरण व्यवस्थेचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. येत्या काळात योजना पूर्ण होऊन जनतेचा पाणी आणि आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदीकुंडली एका क्लिकवर

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

कैद्याची सर्व माहिती म्हणजेच संपूर्ण कुंडली आता संगणकावर प्रशासनाला उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. संगणकावर आधारीत ही प्रिझम प्रणाली नाशिकरोडसह राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये कार्यान्वित झाली आहे. नाशिकमध्ये त्याचा तीन हजार कैद्यांना त्याचा लाभ होणार आहे.

प्रिझम प्रणाली ही इंटरनेट व संगणकाच्या सहाय्याने चालणारी आधुनिक प्रणाली आहे. सध्या राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहात ती लागू झाली असली तरी राज्यातील लहान कारागृहांमध्येही ती लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील कैद्यांची कुंडली एक क्लिकवर प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. प्रिझम प्रणालीत कैद्यांचा फोटो तसेच हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. कैद्याची संबंधित माहिती जेल कर्मचारी संगणकात फीड करतात. कैद्याची शिक्षेची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली जातात. ही माहिती जेलचे वरिष्ठ अधिकारी चेक करतात. या माहितीत कैद्यावर कोणते गुन्हे आहेत? त्याला शिक्षा काय झाली? कधी झाली? तो जेलमध्ये कधी आला? त्याची सुटका कधी होणार? तो रजेवर आहे का? सध्याचे स्टेटस काय आदी माहिती या प्रणालीत मिळते.

नियंत्रण पुण्याहून

राज्यात नऊ सेंट्रल जेल (मध्यवर्ती कारागृह) आहेत. येरवडा, मुंबई, ठाणे, नागपूर, तळोजा, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक येथेच सेंट्रल जेल आहेत. नाशिकबरोबरच या जेलमध्येही प्रिझम प्रणाली सुरू झाली आहे. पुण्यात कारागृह महानिरीक्षक कार्यालय आहे. तेथून प्रिझम प्रणालीवर नियंत्रण ठेवले जाईल. राज्यातील अन्य छोट्या जेलमध्येही ही प्रणाली सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. नाशिक जेलमध्ये सव्वातीन हजार कैदी आहेत. त्यांची माहिती प्रिझम प्रणालीत भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नाशिकरोड जेलमध्ये मोबाइल सापडण्याच्या घटना नियमित घडत असतात. कैदी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोबाइल मिळवत असतात. कारागृहातून खंडणीसाठी फोन केल्याचीही घटना घडली होती. या सर्वांना प्रतिबंध करण्यासाठी कारागृह व परिसरात २७ नवीन व जास्त क्षमतेचे जॅमर आले असून ते बसविण्याचे काम सुरू आहे.

सर्वानांच फायदा

प्रिझम प्रणालीद्वारे कैद्याची माहिती नेटवर उपलब्ध केली जाते. नाशिकच्या जेलमधील एखाद्या कैद्याची माहिती राज्यातील अन्य कारागृहाला हवी असेल तर कैद्याचे नाव व सीआर नंबर टाकला की लगेच उपलब्ध होईल. एखाद्या कोर्टाला ही माहिती पाहिजे असेल ती लगेच मिळेल. एखादा कैदी अन्य गुन्ह्यांमध्येही अडकलेला असतो. त्यामुळे पोलिसांना कैद्याचे स्टेटस पाहिजे असेल तर प्रिझम ते उपलब्ध करेल. ही माहिती नेटवर असल्याने इतर राज्यातील कारागृहांना मदत मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीय तरुण ठार

$
0
0

सातपूर : त्र्यंबकरोडवर गुरूवारी (दि. ६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तिरडशेत गावाच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सुदीपकुमार विश्वरंजन माहेती (२४, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. रस्त्यालगत असलेल्या खांबाला धडक दिल्याने अपघात झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

ईमेल अकाउंट हॅक
मनमाड : चांदवड येथे एका व्यावसायिकाचे ईमेल अकाउंट हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. चांदवड येथील संगणकविक्री आणि दुरुस्ती करणारे सागर निकम यांचा ई-मेल हॅक झाला आहे. ते दोन वर्षांपासून ई-मेलचा व्यावसायिक कामासाठी वापर करतात. परंतु, दोन दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने आपले ई-मेल अकाउंट हॅक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आरोपी ताब्यात
सातपूर : सातपूर कॉलनीत २००९ मध्ये झालेल्या जबरी चोरीतील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. नईम फईम शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे. चोरीनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत नईम फरार झाला होता. सातपूर पोलिस स्टेशनचे हवलदार एस. बी. तुपे पेट्रोलिंग करत असतांना चोरीच्या गुन्हातील आरोपी नईम दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तरुणाची आत्महत्या
नाशिक : नीलगिरी बाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्ता संतोष सूर्यवंशी असे तरुणाचे नाव आहे.

त्र्यंबकला दारू जप्त
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन ठिकाणी छापे टाकून ५१ हजार ४४८ रुपयाचा माल जप्त केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील मुरंबी या गावात ज्ञानेश्वर फुपाणे याच्यावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना कस्तुरबा झोपडपट्टीत घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित रामबाबू मिश्रा (१९, रा.कस्तुरबा झोपडपट्टी, शरणपूररोड) या तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी रात्री सुमित झोपडपट्टीतील एकनाथ अभंग यांच्या घराजवळ मित्रांसमवेत गप्पा मारत बसलेला असतांना हा प्रकार घडला. परिसरातील वैभव जवंजाळे आणि समीर कांबळे या युवकांनी सुमीतला गाठून पैशांची मागणी केली. सुमितने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त वैभवने शिवीगाळ करीत जवळच असलेली लोखंडी खुर्ची उचलून सुमितच्या डोक्यात टाकली. तर, समीरने त्याच्यावर चाकू हल्ला केला. घटनेचा अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

गॅस चोरी करताना अटक

भरलेल्या सिलिंडरमधील गॅस चोरणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. दोघे संशयित गॅस एजन्सीच्या वितरण व्यवस्थेचे कर्मचारी आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अंबादास वाघामारे व अंकुश आप्पा तांबे (रा. भीमवाडी, गंजमाळ) अशी संशयितांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी सोमेश्वर कॉलनीत दोघांना सिलिंडरमधून गॅस चोरतांना रंगेहात पकडण्यात आले. घरपोहच गॅस वितरणाचे काम करणाऱ्या या संशयितांनी गॅसने भरलेल्या टाक्या सोमेश्वर कॉलनीत नेऊन तेथे लोखंडी पाइपच्या सहाय्याने रिकाम्या टाकीत भरण्याचे काम केले. सिल केलेल्या गॅस सिलिंडरचे वजन करून दिले जात नाही. असे प्रकार यापूर्वी अनेकदा उघडकीस आले असून, ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी पुरवठा विभागासह पोलिसांनी मोठी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

रोकडसह कपडे पळविले

चाकूचा धाक दाखवित तिघांनी दुकानातील रोकडसह कपडे पळवून नेल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये लुटीचा गुन्हा दाखल झाला आहे. इमरान रमजान अली (२० रा. मानिकपूर, जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश) या विक्रेत्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीचे पाथर्डी फाटा परिसरात बॉम्बे सेल नावाने कपड्याचे दुकान सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री इमरान व त्यांचे कामगार दुकानात असताना तीन तरुण आले. त्यांनी इमरान यांना चाकू लावत गल्यातील रोकड आणि दुकानातील कपडे काढून घेतली.

महिलेवर चाकू हल्ला
किरकोळ कारणातून चौघांच्या टोळक्याने महिलेच्या हातातील चाकू हिसकावून तिच्यावरच चाकू हल्ला केल्याची घटना देवळालीगावातील मालधक्का रोड परिसरात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाबाई सुरेश काठे (४७ रा. सरदार चाळ,मालधक्कारोड) या महिलेने सदर प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. महिलेचा नातू बुधवारी रात्री आपल्या अंगणात मोबाइलमध्ये गेम खेळत होता. करण गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे, रॉकी श्रीसुंदर व त्यांचा एक साथीदार आदींनी ‘आमचा फोटा काढतो काय?’ असे विचारत लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना लक्षात येताच भाजी कापत असलेली महिला आपल्या नातवाच्या बचावासाठी धावून आली. मात्र, संशयितांनी महिलेच्या हातातील चाकू हिसकावून त्यांच्या दोन्ही हातावर चाकूने वार केले.

दीड लाखांची चोरी
मदतीच्या बहाण्याने वृध्दाकडील एटीएम कार्डची आदलाबदल करून भामट्यांनी बँक खात्यातील एक लाख ६२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ देवराम उगलमुगले (७१ रा. सुंदरबन कॉलनी, लेखानगर) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास उगलमुगले स्टेट बँकेच्या सिडको शाखेतील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी तिथे आलेल्या आणि हेल्मेट घातलेल्या चोरट्याने उगलमुगले यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा केला. मात्र, आरोपीने उगलमुगले यांचे एटीएम स्वतःकडे ठेवत त्यांच्या हाती दुसरेच एटीएम ठेवून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रिंटर, स्कॅनरसह मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंभर रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्याद्वारे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या पोलिस कोठडीत १० जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. टिटवाळा येथील संशयिताच्या घरातून प्रिंटर स्कॅनर अशा साहित्यासह आणखी ७० बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या नोटांचे वितरण नेमके कोठे झाले याचा तपास अद्याप सुरू आहे.

आण्णा कुमावत (५०, रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे), प्रशांत विनायक खरात (आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (शहापूर जि. ठाणे), कांतीलाल यशवंत मोकाशी (खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने पाथर्डी फाटा येथे सापळा लावून १ जुलै रोजी रात्री अटक केली. टोळीतील सदस्यांकडे एक लाख ७० हजार रुपयांच्या आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या नोटा संशयित शहरात विक्री करणार होते.

एक लाखांच्या नोटा विकत घेणाऱ्याकडून या टोळीला ५० हजार रुपये मिळणार होते. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी कांतीलाल मोकाशी हा क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या कार्यालयातून पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यास इगतपुरी तालुक्यातून लागलीच जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा सामान्य व्यावसायिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चलनात आणणाऱ्या दोन तरुणांना आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या सहा बनावट नोटा तसेच स्कॅनर आणि प्रिंटर जप्त केले आहे.

आकाश भावसार आणि संतोष तमखाने अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माडसांगवी येथील हॉटेलचालक चंद्रभान नारायण गोडसे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आकाश भावसार (२३, रा. गंगापूररोड) याने दोन हजार रुपयांची बनावट नोट देऊन १०० वस्तूंची खरेदी केली होती. त्यावेळी त्याने व्यवहारातील उर्वरित पैसेही परत नेले होते. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. आकाश माडसांगवी येथील पानटपरी व्यावसायिक मंदाबाई गंगाराम साळवे यांच्याकडे सिगारेटचे पाकीट विकत घेण्यासाठी गेला. त्याने सिगारेटचे ७० रुपये देण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट दिली. साळवे यांनी ती नोट चंद्रभान गोडसे यांच्याकडे देत नोटेच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केली. गोडसे यांना आकाशने दिलेली नोट बनावट असल्याचे जाणवले. तसेच आकाशने आठवडाभरापूर्वी कटलरी व्यासायिक विजय पेखळे यांना बनावट नोट दिल्याचे लक्षात येताच गोडसे यांनी आडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ माडसांगवी येथे आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन हजाराच्या अजूनही काही नोटा आढळून आल्या. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आकाशने त्याचा साथीदार संतोष तमखाने (२०, रा. ध्रुवनगर, गंगापूर) याची माहिती दिली. पोलिसांनी संतोषला यांच्या घरी जाऊन अटक केली. पोलिसांनी संतोषकडून दोन हजार रुपयाच्या दोन बनावट नोटा आणि स्कॅनर प्रिंटिंग मशिन जप्त केले. आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणतेही संयुक्तिक कारण न देता विमा दावा नाकारणा-या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने विमा दाव्याचे ३ लाख ७६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीचा खर्च तीन हजार असा १० हजाराचा दंडही केला आहे.

लासलगाव येथील हरपालसिंग दलजितसिंग भल्ला यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. भल्ला यांच्या मालकीची टोयोटा इटियॉस काराचा वर्षभराचा विमा काढला. त्यानंतर ११ महिन्यानंतर त्यांच्या गाडीला इगतपुरीजवळ अपघात झाला. त्याची त्यांनी विमा कंपनीला तात्काळ सूचना दिली. त्यानंतर या कंपनीने सर्व्हेअरमार्फत वाहनाचा सर्व्हे केला. त्यानुसार ३ लाख ७७ हजार इतक्या रक्कमेत फुल अॅण्ड फायनल सेटलमेंट करून इंडिमि‌निटी बॉण्ड लिहून घेतला. पण त्यानंतर विम्याची रक्कम न देता दावा नामंजूर केल्याचे पत्र पाठवले. यात भल्ला यांना कोणतेही संयुक्तिक कारण देण्यात आले नाही.

या तक्रारीवर विमा कंपनीने युक्तिवाद करतांना सांगितले, की भल्ला यांनी मोटार वाहन १९८८ अन्वये केस दाखल करणे आवश्यक होते. वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला असल्याने वाहनाची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही. क्लेम फॉर्ममध्ये ड्रायव्हरच्या तपशिलातील माहिती चुकीची दिल्याने अटी व शर्तीचा भंग झालेला आहे, अशीही बाजू मांडण्यात आली. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना विमा दावा नाकारून सेवा देण्यात कमतरता केल्याचे सांगत विमा दाव्याचे ३ लाख ७६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे. या रकमेबरोबरच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीचा खर्च तीन हजार असा १० हजाराचा दंडही केला आहे. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला आहे. भल्ला यांच्याकडून अॅड. टी. एस. थेटे यांनी युक्तीवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इग्नुच्या सहकार्याने एमसीएफची सुविधा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु), नवी दिल्ली यांच्यात अलीकडेच शैक्षणिक सामंजस्य करार झाला. त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता चालू शैक्षणिक वर्षापासून मास्टर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन (एमसीए) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी हा शिक्षणक्रम सुरू करणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली करून देतानाच त्यांना काळानुरूप अद्ययावत शिक्षण देण्यासाठी कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यांच्यात महिनाभरापूर्वीच झालेल्या शैक्षणिक करारानंतर अल्पावधीतच जलद गतीने पाऊले टाकत विद्यापीठ आणि इन्गुमधील तज्ज्ञांची बैठक विद्यापीठात बोलविली होती. या बैठकीस इग्नुच्या स्कूल ऑफ कॉम्प्यूटर अॅन्ड इनफॉर्मेशन सायन्सेसचे संचालक डॉ. पी. वी. रमेश आणि तेथील एम.सी.ए. चे संयोजक प्रा. अक्षय कुमार उपस्थित होते. शिक्षणक्रमासंदर्भात आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या राज्यातील काही अभ्यासकेंद्रांवर याचे प्रवेश होणार असून, गुणवत्तेबाबत तडजोड न करता एमसीए सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस सतर्कतेने मिळाले दोन लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खात्याची फोनवरून घेतलेल्या माहितीच्या आधारे बँक खात्यातून काढलेले दोन लाख रुपये सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले आहे. यापूर्वी सायबर पोलिसांनी एका वृध्द महिलेची मोठी रक्कम ट्रान्सफर होण्याआधीच बँकेच्या मदतीने रोखली होती. सायबर पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी कॉलेजरोडवरील व्हाईट व्हिलो सोसायटीत राहणाऱ्या अनिल सुरेश बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बाविस्कर यांच्या खात्यातून २० ते २३ जून दरम्यान अज्ञात भामट्याने रक्कम काढली होती. बँक खात्यांची फोन करून घेतलेल्या माहितीच्या आधारे चोरट्याने चक्क दोन लाख तीन हजार रुपयांची परस्पर खरेदी करून काढली होती.

या प्रकरणी २ जुलै रोजी सायबर पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस आयुक्त अॅड. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली देवराज बोरसे यांनी तपास सुरू केला. सायबर पोलिस स्टेशनचे बँक सेलचे कर्मचारी कृष्णा राठोड तसेच प्रदीप वाघ यांनी लागलीच गुन्ह्याचे गांर्भीय ओळखून बाविस्कर यांचे खाते आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधला. या कर्मचाऱ्यांनी झालेल्या सर्व गैरव्यवहारांची माहिती बँकला कळवली. त्यानंतर बँकेने हालचाली करून दोन लाख तीन हजार १५२ रुपयांची रक्कम बाविस्कर यांच्या खात्यात पुन्हा वर्ग केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया सेल पोलिसांकडून कार्यान्वित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सोशल मी‌डिया हे सध्या माहितीचे देवाण घेवाण करण्याचे प्रभावी मध्यम आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून त्याचा आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनीही बदलत्या काळाची गरज ओळखून सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शुक्रवारी सोशल मीडिया सेलचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, अशोक करपे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक संजय दराडे म्हणाले, की नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे. सामान्य नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, प्रतिक्रिया ग्रामीण पोलिस दलाचे फेसबुक पेज Nashik Rural Police, ट्विटर अकाउंट Nashik Rural Police@SpRural आणि ९१६८५५११०० या व्हॉट्सअॅप नंबरवर करावे. नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्यात बाहेर असलेले नागरिकही या सेवेचा वापर करून तक्रारी व माहिती घेऊन पोलिसांच्या संपर्कात राहू शकतात.

तक्रार करण्यासाठी कार्यालयात येऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. नागरिकांच्या येण्या-जाण्याचा वेळही वाचेल. शिवाय सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारींवर स्वतः पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे लक्ष असेल. सोशल मीडियाचा गैरवापर, धार्मिक व जातीय भावना दुखावले जाणारे फोटो, क्लिप्स, मजकूर पोस्ट करणे, मोबाइल फोनद्वारे बँक अकाउंट / एटीएम कार्डची माहिती घेऊन होणारी ऑनलाइन फसवणूक अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालय सायबर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप हॅकर पुणे पोलिसांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करणाऱ्या राजस्थान येथील दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा या हॅकरच्या पोलिस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दीप्तेशच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, पुणे येथे दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुणे शहर पोलिसही दीप्तेशचा ताबा घेणार आहेत.

राजस्थानमधील बाडमेल जिल्ह्यातील पचपदारा तालुक्यातील जसोलगाव येथे राहणाऱ्या दीप्तेशला सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने १ जुलै रोजी अटक केली. अवघ्या टी. वाय. बीकॉमचे शिक्षण घेत असलेल्या संशयित दीप्तेशने वन टाइम पासवर्डच्या माध्यमातून नाशिक शहरासह मुंबई, पुणे येथे आणि गुजरातसह राजस्थान राज्यातील अनेक महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. नाशिक शहरात ३१ तक्रारदार पुढे आले. त्यात २९ महिलांचा समावेश होता.

राजस्थानसह गुजरात आणि राज्यातील पुणे येथील महिलांचे अकाउंट हॅक करून अश्लिल मॅसेज पाठवल्याची कबुली संशयित दीप्तेशने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, दीप्तेशने पुणे येथील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले असून, तसे चार गुन्हे पुणे शहर पोलिसांकडे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुणे शहर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी (दि. ७ जुलै) शहरात आले. संशयित दीप्तेशच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारीच संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दीप्तेशच्या पोलिस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की अद्याप आमचा तपास सुरू आहे. त्याचमुळे संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. शहर पोलिसांचा तपास संपला की कोर्टाच्या आदेशाने संशयितास पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.

आर्थिक फसवणूकही!

दीप्तेशने मोबाइल हॅक करून केवळ महिलांना त्रास दिला नाही; तर त्याने आर्थिक फसवणूकही केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईतील एक व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केल्यानंतर त्याने पेटीएम अॅपचा वापर करून सात हजार रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या तसा कोणताही पुरावा समोर आला नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे गेट बंद होते तेव्हा...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मध्ये रेल्वेच्या मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील निफाड स्टेशनपासून थोड्या अंतरावर असलेल्या रेल्वे गेटची तार तुटल्याने जवळपास दीड ते दोन रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. निफाड-पिंपळगाव मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे गुजरातहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसह परिसरात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीकांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
निफाड-पिंपळगाव मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील पोलची तार तुटल्यामुळे दोन्ही बाजूचे गेट बंद झाले. त्यामुळे गेटच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. काही वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने शाब्दीक वादही झाले. एरवी दहा मिन‌िटे गेट बंद झाले तरी लांबच लांब रांगा लागतात. त्यातच शुक्रवारी तर तब्बल दोन तास रेल्वे गेट बंद होते.
हा मार्ग साईभक्तांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गुजरातहून सापुतारा-वणी-पिंपळगाव-निफाडमार्गे भाविक शिर्डीला दर्शनासाठी येतात. शनिवार, रविवारची सुटी आल्यामुळे भाविकांची संख्या अधिक होती. मात्र रेल्वे गेट दोन तास बंद असल्यामुळे भाविकांचे हाल झाले.
शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निफाड स्टेशनजवळून रेल्वे गेली. तेव्हा कुंदेवाडी जवळील हे गेट बंद करण्यात आले. मात्र रेल्वे गेल्यानंतर गेटमनने जेव्हा रेल्वे गेट वर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गेटची तार तुटल्याचे निदर्शनास आले. तब्बल दोन तास अथक परिश्रमानंतर हे गेट सुरू झाले.
शिर्डीला गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने गुजरातच्या भाविकांच्या गाड्या गेटच्या पश्चिम बाजूला अडकून पडल्या होत्या. तसेच पिंपळगावला कांदा घेऊन जाणारे ट्रॅक्टर, पीकअप, शालेय बस, अपडाऊन करणारे विद्यार्थी, नागरिकांचे हाल झाले.
निफाड रेल्वे स्टेशनचे हे गेट अनेकदा अशाच प्रकारे तांत्रिक बिघाड होऊन बंद पडते. या मार्गावर वाहनांची संख्या खूप असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक लोक रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संताप व्यक्त करतात.
शिर्डी-सुरत असा हा महत्त्वाचा मार्ग आहे. वाहनांची गर्दी असलेला हा मार्ग असल्याने या रस्त्यावर रेल्वेकडून उड्डाणपूल बांधला जात आहे. उड्डाणपुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम कासवगतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images