Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉक्टरांनीच फसविले डॉक्टरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स (इएसआयसी) आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेबाबत करार झालेला असतांना चौघा डॉक्टरांनी मिळून एका डॉक्टरची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी सोहम हॉस्पिटलच्या चौघा डॉक्टरांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अजय चंदनसिंग परदेशी, डॉ. विजय मुरलीधर थोरात, डॉ. भरत पंढरीनाथ पाटील आणि डॉ. प्रशांत मोहिनीराज जोशी (रा. सर्व नाशिक) अशी फसवणुकीचा आरोप असलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. सुप्रिम किडनी केअर डायलिसिसचे संचालक डॉ. देवदत्त श्रीपाद चाफेकर (रा. सहजीवन कॉलनी, कॅनडा कॉर्नर ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. डॉ. चाफेकर यांच्या तक्रारीनुसार, सुप्रिम किडनी केअर डायलिसिस सेंटर आणि सोहम हॉस्पिटल यांच्यात डिसेंबर २०१४ ते ऑक्‍टोबर २०१५ या काळात करार झाला होता. या करारानुसार, सरकारच्या एम्पॉलईज स्टेट इन्श्‍युरन्स कॉपोर्रेशन (ईएसआयसी) आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेतील (एमपीकेवाय) पेशंटला सेवा देण्याचे ठरले होते. करारानुसार सुप्रिम किडनी केअर डायलिसिसचे संचालक डॉ. देवदत्त चाफेकर यांनी सोहम हॉस्पिटलमार्फेत आलेल्या पेशंटला सेवा दिली. उपरोक्त कालावधीत ईएसआयसी योजनेच्या पेशंटचे सुमारे १४ लाख ६३ हजार ५८१ रुपये तर पोलिस कुटुंब योजनेच्या लाभार्थींनुसार सात लाख ६१ हजार ८८८ रुपये अशी एकूण २२ लाख २५ हजार ४८९ रुपयांची बिले तयार झाली. डॉ. चाफेकर यांनी ही बिले सोहम हॉस्पिटलकडे दिली. डॉ. चाफेकरांच्या तक्रारीनुसार सरकारकडून सोहम हॉस्पिटलने सर्व बिल वसूल केली. मात्र, करारानुसार चाफेकर यांचा मोबदला देण्यात आला नाही. संशयितांनी परस्पर सर्व रकमेचा अपहार केला. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चाफेकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चारही संशयित डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्सारी हत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याच्या हत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आणखी तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. खूनाच्या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक झाली असून, आणखी तिघे पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, अटक केलेल्या सर्व सात संशयितांची गुरूवारी (दि. १५) मल्हारखान झोपडपट्टीत पोलिसांनी वरात काढली. संशयितांच्या घरांची तपासणी करीत पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे शोधून काढले.

जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखान झोपडपट्टी) आणि मनीष रेवर (रा. रामवाडी) अशी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. १९) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच गुन्ह्यात मंगळवारी (दि. १३) रोजी पोलिसांनी चेतन यशवंत इंगळे आणि अजिंक्य प्रकाश धुळे यांना अटक केली होती. या दोघांना आश्रय देणाऱ्या विशाल अशोक निकम (रा. दहावा मैल) आणि योगेश चंद्रकांत धांडे या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली. निकम आणि धांडे यांनी दोघांना आश्रय देत पोलिसांची चाहूल लागल्यानंतर पळवून लावले होते. या चौघांना कोर्टाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फुकट चष्मा घेण्याच्या वादातून वरील संशयितांनी आणखी काही साथिदारांसह चष्मा विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी (२३, रा. मेहबूबनगर, वडाळारोड) याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ शनिवारी (दि. १०) हा प्रकार घडला होता. उपचारा दरम्यान अन्सारी मृत्यूमुखी पडला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत इंगळे आणि धुळेसह त्यांना आश्रय देणाऱ्यांना अटक केली. आणखी काही हल्लेखोर चाळीसगाव येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे रवाना झाले. मात्र, तोपर्यंत काळे, साळवे व अन्य दोघे नाशिककडे निघाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, ठक्कर बाजार येथे पोलिसांनी सापळा रचला. बसमधून चौघे उतरताच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. या गुन्ह्यात आणखी काही संशयित अटक होण्याची शक्यता मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी सांगितले.


पोलिसांची ‘हाऊस सर्च’ मोहीम

या गुन्ह्यातील मूळ मल्हारखान झोपडपट्टीत दडले आहे. घटनेच्या दिवशी दोन ते तीन संशयितांचा फुकट चष्मा घेण्यावरून अन्सारीशी वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी इतरांना पाचारण केले. दुचाकी तसेच स्कॉर्पियोमध्ये आलेल्या संशयितांनी अन्सारीवर हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना घेऊन हाऊस सर्च केले. यावेळी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पोलिसांनी एक चारचाकी व दुचाकी जप्त केली. संशयितांची वरात पाहण्यासाठी नागरिकही गोळा झाले होते.

अन्सारी हत्या प्रकरणात आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे. संशयित गुन्हेगारांना आश्रय देणे हा देखील गुन्हा ठरतो. त्यामुळे या गुन्ह्यात दोघांना अटक झाली असून, इतरांबाबतही हाच नियम लागू पडणार आहे.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षीय बालकावर तरुणाचा लैंगिक अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १० वर्षीय बालकावर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लैंगिक अत्याचाराचा घृणास्पद प्रकार गुरूवारी (दि. १५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा फुलेनगर झोपडपट्टी परिसरात राहतो. गुरूवारी सकाळी तो परिसरात खेळत असताना २० ते २२ वयोगटातील दोघे तरुण दुचाकीवर तिथे आले. त्यांचा संबंधित बालकाचा परिचय होता. त्यांनी बालकाची विचारपूस केली. तसेच त्याला दुचाकीवर सोबत घेतले. हे तिघे मार्केट यार्ड परिसरात गेले. तिथे यातील एका तरुणाने १० वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घरी पोहचल्यानंतर त्याने आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बालकाच्या पालकांनी लागलीच पंचवटी पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. मात्र, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्याची कुणकुण लागल्यानंतर संशयित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित बालकाची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या अहवालानुसार पोलिस कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांना सक्तीची रजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत सचिव अरुण काळे यांच्या कामकाजावर संचालकांनी आक्षेप नोंदविला. गेल्या वर्षाच्या बाजार समितीच्या हिशोबाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा बजावल्या आहेत, कामकाजाविषयी सचिवांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. प्रभारी सभापती श्यामराव गावित यांनी सचिव काळे यांना आणखी दोन महिन्यांची मुदत द्यावी असा आग्रह धरला. संचालकांच्या रोष बघून सचिव काळे यांनी सभेतून काढता पाय घेतला.

बाजार समितीच्या कार्यालयात प्रभारी सभापती श्यामराव गावित यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना यांच्याकडील मार्केट फी ही नियमानुसार सुरू ठेवावी. पणन संचालक आणि राज्य सरकार यांच्या नियमांनुसार अंलबजावणी करावी, असे संचालक शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारातील साफसफाई कामाची मुदत ३० जूनला संपत असल्याने नवीन मक्त देण्याविषयी टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्नधान्य विभागात साखरेचे व्यापाऱ्यांकडील सेवा शुल्क हे शासन नियमाप्रमाणेच घ्यावे. पेठरोडच्या मार्केटमधील गटार व पाणी पुरवठाची दुरुस्ती करण्यावर मंजुरी देण्यात आली. बाजार समितीच्या आवारात मद्यप्राशन करून तेथील व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार संदीप पाटील यांनी केली. असे प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, असे ठरविण्यात आले.

नोकरभरतीच्या मुद्यावरून वादंग

फेब्रुवारी २०१६ मध्ये नेमणूक केलेल्या कनिष्ठ लिपीक, शिपाई, पहारेकरी यांची नेमणूक गरज नसताना केली आहे. ही भरती रद्द करावी, असा मुद्दा उपस्थितीत केल्याने श्यामराव गावित, तुकाराम पेखळे, शिवाजी चुंभळे यांनी ही नेमणूक रद्द करता येणार नाही, अशी भूमिका मांडल्याने सभेत गदारोळ माजला.


महत्त्वाचे मुद्दे

- नाशिकरोड, लाखलगाव येथील आठवडे बाजार सुरू करावेत.
- हरसूल येथील बाजाराच्या शेडची दुरुस्ती करावी.
- २९ एप्रिल २०१७ च्या सर्वसाधारण सभेत सचिवांच्या कामकाज समाधानकारक नसल्याबाबत लेखी अर्ज दिला होता. त्यावर संचालकांनी चर्चा करीत सचिव बदलण्याची भूमिका मांडली.
- निलंबित सेवकांचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तो विषय तहकूब करण्यात आला.
- कामाचे मूल्यमापन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाहतूक व महागाई भत्ता देण्यात यावा.
- चव्हाण ट्रेडिंग कंपनीचे लायसन्स रद्द करण्याचा आलेला अर्ज त्यांच्याकडील सर्व बाबींची माहिती घेऊन लायसन्स रद्द करावे.
- जय तुळजाभवानी व्हेजिटेबल कंपनीला लोखंडी शेडऐवजी त्यांना बांबूचे शेड उभारण्यास संचालकांनी मान्यता दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवप्रकाश योजनेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून ग्राहकांना प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीचा तपशील उपलब्ध करून दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आयडीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेतून जिल्हाभरातील शिक्षकांच्या वेतनाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यामुळे येत्या २७ जूनपर्यंत जिल्हाभरातील सुमारे १९ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आयडीबीआय बँकेत खाते उघडण्यास प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. १९) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या जिल्ह्यातील मुख्याध्यापक सभेत सर्व शाळांचे आयडीबीआय बँकेत काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व गुरुजींना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याच्या मागणीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मंजुरी दिल्याने राज्य शिक्षक परिषद, ग्रंथालय शिक्षक परिषद व मनसे शिक्षक सेनेच्या पदाधिकारी व प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासणी, आयडीबीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख अखिलेश शर्मा, माध्यमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर, प्राथमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक एस. आर. चव्हाण, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण निरिक्षक शिवाजी शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली. यात शिक्षकांचे आयडीबीआय या बँकेत वैयक्तिक खाते उघडणे, त्यांना बँकिंग विषयक विविध सुविधा देणे, त्याविषयीचे करार करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यवाह डी. यू. अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील, शंकर सांगळे, संजय सावंत, सचिन मेधने, संजय पवार, बी. बी. शेलार, हेमंत पाटील, शशिकांत पाटील, अमृतराव सांगळे, मनसे शिक्षक सेनेचे पुरुषोत्तम रकिबे, ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार आदी उपस्थित होते. बँकेशी करावयाच्या कराराचा नमुना तयार करण्याची जबाबदारी वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर व एस. आर. चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली.

या मुद्द्यांवर सहमती
- झिरो बॅलन्सवर उघडली जाणार शिक्षकांची खाती
- प्रत्येक कर्मचाऱ्यास मिळणार पाच लाखाचे अपघाती विमा संरक्षण
- निव्वळ वेतनाच्या पाच पटीचा ओव्हरड्राफ्ट
- मोफत आंतरराष्ट्रीय गोल्ड एटीएम सुविधा
- प्रती दिवसाला ७५ हजाराची रोख रक्कम काढता येणार
- गृहकर्जाच्या प्रोसेसिंग फिसह व्याजदरात विशेष सवलत
- १९ जूनला मुख्याध्यापक सभेत शाळांचे खाते काढली जाणार
- २७ जूनपर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची खाती काढणार
- बँक सुविधा शाळेच्या दारी उपक्रम राबविणार
- वेतन यादी इमेलवर पाठविण्याची सुविधा देणार
- प्रत्येक कर्मचाऱ्यास १२० चेक मिळणार मोफत
- खाते उघडल्यावर एटीएम कार्ड, पिन, चेकबुक, पासबुक तात्काळ मिळणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकबाह्य विद्यार्थ्यांनाही संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीसाठी ऑनलाइन व केंद्रीय पध्दतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून (दि. १६) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी २६ जूनपर्यंत त्यांचे प्रवेश अर्ज अचूकपणे भरावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे. याशिवाय नाशिक बाहेरील विद्यार्थ्यांनाही नाशिकमध्ये अकरावी प्रवेश घेण्याची इच्छा असल्यास त्यांच्यासाठीही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया खुली करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेची अंमलबजावणी अचूकपणे व्हावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को स्कूल येथे मुख्याध्यापक व प्राचार्यांसाठी कार्यशाळा गुरुवारी झाली. यात शिक्षण विभागाच्या उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जाधव बोलत होते. दोन टप्प्यात अकरावी प्रवेशाचा अर्ज भरायचा आहे. यापैकी ऑनलाइन प्रक्रियेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

अशी असेल शाळांची भूमिका

प्रवेश अर्जासाठी शाळांकडून प्रतिअर्ज १५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. २६ जूनपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. २७ जून रोजी विभाग प्रमुखांनी दिलेल्या वेळेत वेळापत्रकानुसार शिक्षण विभागाकडे प्रवेशाची आकडेवारी आणि हिशेब सादर करायचा आहे.

- ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्जाची भाग क्रमांक १ हा अप्रूव्ह झालेला असेल तेच विद्यार्थी भाग क्रमांक २ पूर्ण करू शकतील.
- माध्यमिक शाळांच्या ‘लॉग इन’ ला verified candidate list >>>view complete list या पाथवर आपल्या शाळेच्या इंडेक्स नंबरवर ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल.
- यानुसार आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग १ भरल्याची खात्री संबंधित शाळांनी करावी व अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
- कल्चर व स्पोर्टस कोट्यातील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन करण्यात यावे.
- जनरल कॅटेगिरीच्या ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ लागू नसेल तर त्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्याची आवश्याता नाही. मात्र त्याच्या required document status मध्ये काही कागदपत्रे नमूद असल्यास अशा विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरीफाय करावे.
- प्रवेश अर्जाच्या प्रिंटवरील Version हे केवळ Edit केल्यानंतरच बदलते.
- याशिवाय required document status मध्ये status : Approved हा पर्याय तपासावा.
- इन हाऊस, मॅनेजमेंट कोटा, बायफोकल, मायनॉरिटी कोटा अंतर्गत येणारे प्रवेश ज्युनिअर कॉलेजेसच्या स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग एक भरला आहे, अशाच विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे द्यावेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळणार शहरात प्रवेश

नाशिक महापालिका किंवा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बाहेरील विद्यार्थ्यांनाही शहरातील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी संधी खुली करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी व्ही. एन. नाईक कॉलेज (कॅनडा कॉर्नर), सीएमसीएस कॉलेज (गंगापूर रोड), भोसला कॉलेज (गंगापूर रोड), बीवायके कॉलेज (कॉलेजरोड), पंचवटी कॉलेज (औरंगाबाद रोड), श्रीराम विद्यालय (पंचवटी), केएसडब्ल्यू कॉलेज (सिडको), सुकदेव विद्यालय (इंदिरानगर), नाशिकरोड कॉलेज (नाशिकरोड), एसव्हीकेटी कॉलेज (देवळाली कॅम्प), नूतन विद्यामंदिर (भगूर) या केंद्रांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-शाळांत रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल दोन महिन्यांच्या सुटीनंतर गुरुवारी (दि. १५) शहर परिसरातील बहुसंख्य शाळांचे आवार चिमुकल्यांच्या लगबगीने गजबजून गेले होते. शाळांचे आवार चकाचक करून सजावटीसह नव्या-जुन्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वच शाळांनी केली होती. रंगेबेरंगी फुग्यांनी सजलेली शाळा, बोलके फळे, गुलाबपुष्प देत वेलकम म्हणणारे टीचर्स, तर काही ठिकाणी औक्षणही अशा वातावरणात एकीकडे अनेक चिमुकले मोठ्या उत्साहाने शाळाप्रवेश करताना दिसत होते, तर दुसरीकडे अनेक चिमुकल्यांना मात्र पालकांपासून दुरावताना रडू कोसळले होते. विविध शाळांच्या परिसरात गुरुवारी असा धम्माल माहोल दिसून आला…

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुभाष सोनवणे होते. प्रा. एन. जे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनील शेवाळे यांनी केले.

बिटको बॉइज हायस्कूल

येथे मुख्याध्यापिका रेखा काळे यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. परिसर रांगोळ्या काढून, फुले लावून सजविण्यात आला होता. संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले, उपमुख्याध्यापक पेंढारकर आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होता.

सागरमल मोदी प्राथमिक शाळा

शाळेचा पहिला दिवस येथे उत्साह साजरा झाला. करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या हस्ते सरस्वतीपूजन झाले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके देऊन व औक्षण करून स्वागत झाले. ज्येष्ठ शिक्षिका नेहा देशपांडे, अलका तुपे, मंगला बनकर, वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

केबीएच विद्यालय

येथे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांनी कॅनडा कॉर्नर, शरणपूर, विसे मळा, कॉलेजरोड परिसरातून प्रभात फेरी काढली. नंतर शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तक व गणवेशवाटप करण्यात झाले. ए. डी. पवार अध्यक्षस्थानी होते.

शिशुविहार व बालक मंदिर

मराठी माध्यम शाळेत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राम मंदिरात नेण्यात आले. नंतर पेढा देऊन औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. नवागतांनी आपला परिचय करून दिला. विद्यार्थ्यांना श्लोकांचे पुस्तक देण्यात आले.

जु. स. रुंग्टा हायस्कूल

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून करण्यात आली. शाळेत सकाळी ७ वाजता उपासनेला प्रारंभ झाला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले. मिलिंद काचोळे, प्रसाद कुलकर्णी यांचीप्रमुख उपस्थिती होती.

खदेव मराठी विद्यामंदिर

इंदिरानगरच्या शाळेत नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे व वर्गशिक्षिका मनीषा बोरसे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट, तसेच नवीन पाठ्यपुस्तके देऊन शाळेत स्वागत केले. चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल

नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे बँडच्या गजरात स्वागत करण्यात आले. वर्षारंभ उपासनेद्वारे विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोकांचे अर्थ समजावून सांगण्यात आले. पालकांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक प्रतापसिंग ठोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोडून पडला संसार तरी...

$
0
0

मोडून पडला संसार तरी...

नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात गंगेवरील आठवडेबाजार, तसेच शहरातील इतरही भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अर्ध्या तासातच अनेक विक्रेत्यांचा भाजीपाला वाहून गेला, सराफ बाजारातही पाणी शिरले, तर पावसापासून बचावासाठी थांबलेल्या ग्राहकांची कोंडी झाली. वीर सावरकर पथ, मधली होळी, बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकालीकडे जाणारे सर्वच रस्ते प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे जलमय झाल्याचे चित्र होते. पाऊस थांबल्यानंतर काळजीत गेलेली रात्र अन् गुरुवारची सकाळ डोळ्यात भरून आलेली दिसली. झालेले नुकसान सोसत दुकानांमध्ये साचलेला गाळ व पाणी काढण्यात व्यावसाय‌कि दंग झाले होते. दर वर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत दिवसभर व्यावसायिकांचे हात राबताना दिसले. समाजसेवकांनीही महापालिका प्रशासनाच्या कारभारावर कोरडे ओढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने देशाला लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

काँग्रेसने राज्य करताना केवळ देशाला लुटण्याचे काम केले आहे. मोदी सरकार जनतेच्या पैशाची राखण करणारे सरकार आहे. त्यामुळेच सामजिक सुरक्षेच्या योजना देशभरात राबविल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वामुळे भारताची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. बुधवारीच मालेगाव महापालिकेवर काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. भामरे यांनी काँग्रेसवर श‌ाब्द‌िक हल्ला केला.

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मालेगाव ये‌थे ‘सर्वांची साथ सर्वांचा विकास’ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अमेय लॉन्सवर हे संमेलन झाले. डॉ भामरे हे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा प्रभारी सुनील बागुल, आमदार डॉ. राहुल आहेर, सुरेश निकम, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, अद्वय हिरे, तालुकाध्यक्ष दीपक पवार, संदीप पाटील उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, देशातील भ्रष्टाचार संपव‌िण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. तसेच काही वेळा कठोर निर्णय देखील घेतले. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे ९२ योजनांचा थेट लाभ जनतेला होत आहे. भामरे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने देशावर ६५ वर्ष राज्य केले. मात्र विकासाच्या नावाने केवळ देशाला लुटण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले. भामरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले.

पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार आधीपासून सकारात्मक होते. मात्र कर्जमाफी ही केवळ मलमपट्टी असून, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच जे शेतकरी सक्षम आहेत त्यांनी स्वतःहून कर्जमाफी घेणार नाही, असे जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कर्जमाफीचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून, ते शेतकऱ्यांचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या कार्यक्रमात उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅस वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अद्वय हिरे यांनी नार-पार, जिल्हा बँक, मालेगाव जिल्हा निर्मिती, शेती हमीभाव आदी मुद्द्यांवर विचार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामदेवबाबांचा नाशिकमध्ये लवकरच प्रक्रिया उद्योग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष व टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकावर पतंजली योगपीठाचे योगगुरू रामदेवबाबा प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून, त्यासाठी जागा पाहिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. येत्या पंधरा दिवसांत याबाबत मुख्यमंत्री व मी नियोजन करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत येथे शिवार संवाद सभेत पालकमंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरी वर्गाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पिंपळगाव बसवंत येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप देशमाने यांच्या वस्तीवरील झाडाच्या पारावर या शिवार सभेचे आयोजन करण्यात आले. गिरीश महाजन यांचे सकाळी दहा वाजता आगमन झाले. ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार राहुल आहेर, माजी आमदार दिलीप बनकर, प्रांत महेश पाटील, तहसीलदार डॉ. विनोद भामरे, वैकुंठ पाटील, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

‘द्राक्ष उत्पादकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला’

कर्जमाफीबाबतीत सरकारने लावलेल्या निकषावर शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन यांच्याशी संवाद साधला. सोमनाथ मोरे यांनी, कर्जमाफीमध्ये सरकारने लावलेले अनेक निकष शेतकऱ्याला मान्य नसल्याचे सांगितले. आम्हाला जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येतो. आज बँकेची स्थिती खूपच बिकट झाली आहे. बँकेचे आम्ही कर्ज भरले आहे, तसेच अनेक शेतकरी वर्गाचे या बँकेत पैसे अडकले आहेत. पैसे असून मिळत नाहीत. बँकेच्या बाबतीत दोषींवर कठोर कारवाई करावी; पण आम्हाला वेठीस धरणे योग्य नाही, तसेच द्राक्ष उत्पादकाला कर्जमाफीबाबतीत वेगळी वागणूक मिळण्याचे संकेत आहेत. द्राक्ष उत्पादकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन मोरे यांनी केले. या वेळी संजय गोवर्धने, विनायक मोरे, कैलास कमोद, रावसाहेब चौधरी, सुरेश खोडे, दत्तू आथरे आदींनी कर्जमाफीबाबत लावलेले निकष हे शेतकरी वर्गाला बुचकळ्यात टाकणारे असल्याचे सांगितले.

पालकमंत्री महाजन म्हणाले, की यापुढे शेतकरी वर्गाला शाश्वत पद्धतीने शेती करण्याची आवश्यकता असून, पुढील काळात आधुनिक पद्धतीने शेती करणे काळाची गरज होणार आहे. शेतीमालाच्या भावाची चढ-उतार लक्षात घेता प्रक्रिया उद्योग गरजेचा आहे. कर्जमाफीच्या निकषावर महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले, की काही मोठे उद्योग करणारे व्यावसायिक निव्वळ कर वाचविण्यासाठी शेतीचा सहारा घेतात. उत्पन्न जास्त दाखवून कर चुकविण्यासाठी शेतीचा सहारा घेतात व शेतीवर लाखो रुपये कर्ज काढून ठेवतात. मग त्यांना का माफी द्यायची? महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. यासाठी सरसकट कर्ज माफ केले तर या लोकांना जास्त फायदा होईल. त्यासाठी काही निकष लावले गेले. शेतकरी वर्गाकडे चारचाकी वाहन असल्यास माफी नाही हा गैरसमज दूर केला पाहिजे. कारण चारचाकी वाहन ही गरज आहे. त्यात काही गैर नाही.

जिल्हा बँकेबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यातून योग्य मार्ग निश्चित काढला जाणार आहे. केवळ कर्जमाफीने अडचणी दूर होणार नाहीत, तर यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली तरच शेती व्यवसाय हा खरा व्यवसाय होईल, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निवृती धनवटे, सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, भाजपचे जिल्हा संघटक बापू पाटील, संजय गाजरे, संदीप आहेर, विष्णू खोडे, रामभाऊ माळोदे, प्रशांत घोडके, चिंधू काळे, बाळासाहेब बनकर, संपत विधाते, सतीश देशमाने, दिगंबर सूर्यवंशी, बबन बनकर, कांता बनकर, गणपत मोरे, संदीप बनकर, शंकर बनकर, शंकर गायखे, शिवाजी गायकवाड आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदत नव्हे, थट्टाच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत राज्य सरकारने तातडीची आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांसदर्भातील अध्यादेशही सहकार व पणन विभागाने काढला आहे. मात्र या पैशांसाठी लावलेले निकष पाहता जिल्ह्यातील शेतकरी या मदतीपासूनही वंच‌ित राहतील असेच दिसत आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा उत्पादकांचे दहा हजारात काहीच होत नसताना, त्यात अनेक अटी असल्यामुहे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या मदतीपासून वंचितच राहणार आहेत. त्यामुळे शासनाची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे.

जिल्हा बँक डबघाईस गेल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीपासूनच संकटात सापडला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अजून बराच वेळ आहे. कर्जमाफी होईपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दहा हजाराची तातडीची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत आदेश बुधवारी राज्याच्या सहकार व पणन विभागाने अध्यादेश जारी केला आहे. परंतु हा आदेश सरकारने मदतीसाठी बनवला की, शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी बनवला अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

या आदेशात आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य यांना वगळण्यात आले आहे. सोबतच शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. आयकर भरणारे, ठेकेदार व कंत्राटदार, विविध संस्थाच्या सदस्यांनाही या मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. सेवाकर भरण्यासह ज्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांनाही मदत नाकारली आहे. शेतकऱ्याचे दुकान असेल व त्याची नोंदणी शासनाकडे असेल तर त्यांनाही मदतीपासून वंच‌ित ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे शासनाने ही मदत न देण्यासाठीच जाहीर केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारच्या या अटींमुळे जवळपास ७० टक्के शेतकरी या मदतीपासून वंच‌ित राहण्याची शक्यता आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा या पिकांचा एकरी खर्चच मुळात तीस हजारांहून अधिक आहे. त्यातच शासन केवळ दहा हजार देत आहे. त्यासाठी लावलेल्या जाचक अटी पाहून शेतकऱ्यांनी ही मदत नकोच, अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अजून प्रतिज्ञापत्राची सक्ती करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दाखल्यांत नाशिक राज्यात दुसरे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाविद्यालयीन व शालेय प्रवेशासाठी लागणारे आवश्यक दाखल्याबरोबरच इतर विविध दाखले ऑनलाइन देण्यात अहमदनगर जिल्ह्याने राज्यात पहिल्या क्रमांक पटकाविला असून, नाशिक जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून महिन्यात शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सेतू व महा-ई-सेवा केंद्रावर दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होते. याकाळातच १ जून ते १४ जून पर्यंतची आकडेवारी शासनाने जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात या १४ दिवसात ६३ हजार ६२४ दाखले देण्यात आले आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची हीच आकडेवारी ७१ हजार ४१६ आहे.

जिल्ह्यात १५ तालुक्यात हे दाखले दिले जात असले तरी एकाच वेळीच दाखले घेण्याची गर्दी वाढल्यामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागत आहे. त्यात ऑनलाइन सेवेमध्ये गर्दी झाल्यामुळे वेबसाईट डाऊन होण्याचेही प्रकार वाढतात. त्यामुळे दाखले मिळण्यास उशीर होतो, अशा स्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त दाखले दिले आहे. सध्या महाविद्यालयीन प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी आवश्यक ते दाखले मिळविण्यासाठी पालक आणि त्यांच्या पाल्यांची सेतू कार्यालय व महा-ई-सेवा केंद्रामध्ये गर्दी होते आहे. उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॅशनॅलिटीचे दाखले यासह तब्बल १६ प्रकाराचे दाखले यात दिले जातात. जून महिन्यात तर शहरातील विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी दररोज हजारच्या आसपास अर्ज दाखल होतात. त्यात मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित राहण्याच्या तक्रारीही असतात. त्यामुळे दाखले देण्यात जिल्हा प्रशासनाने यावेळेस जास्तीत जास्त दाखले देण्याचे प्रयत्न केले आहे.

जिल्ह्यात १९ सेतू कार्यालये

जिल्ह्यात विविध दाखले देण्यासाठी १९ कार्यालय आहे. त्यात नाशिक शहरात चार तर तालुक्याची ठिकाणी एक कार्यालय आहेत. त्याचप्रमाणे महा-ई-सेवा केंद्र ३२४ असून, या सर्व ठिकाणाहून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे ग्रामीण भागातही अनेकांना त्याचा लाभ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवागतांनी गजबजल्या शाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरातील सर्वच उपनगरांतील शाळा गुरुवारी नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजल्या होत्या. शाळांतर्फे विविध उपक्रम राबवून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.

मेहता हायस्कूल

येथे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा झाला. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. प्राचार्या करुणा आव्हाड, भगीरथ घोटेकर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

र. ज. चौहान हायस्कूल

येथे इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका संजीवनी धामणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व पुस्तकांचे वाट्प करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्षारंभ उपासनाही केली.

के. एन. केला हायस्कूल

येथे योगा सप्ताहानिमित्त इंटरनॅशनल आर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशनतर्फे योगासने झाली. विद्यार्थ्यांनीही त्यात सहभाग घेतला. नगरसेविका सीमा ताजणे, मुख्याध्यापिका चैताली बिश्वास, योग शिक्षक शुभांगी रत्नपारखी, सुरेखा पगार, आरती साळवे आदी उपस्थित होते. होली फ्लावर स्कूल, अभिनव मराठी शाळा, जेलरोड टाकीवरील महापालिकेच्या तीन शाळा, उपनगरची इच्छामणी शाळा, महाराष्ट्र हायस्कूल, सेंट झेवियर आदी शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

पंचवटीत ग्रंथ दिंडी

पंचवटी ः परिसरातील शाळांमध्ये नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, मिठाई व पुस्तके देऊन विविध उपक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले. विडी कामगारनगर येथील महापालिका शाळा जनार्दन स्वामी विद्यालय क्रमांक ४५ व ६५ मध्ये ग्रंथ दिंडी काढून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गणेश आवनकर, नगरसेवक सुरेश खेताडे , पूनम सोनवणे, प्रकाश केकाणे, सुनील दराडे, दशरथ दिंडे आदी उपस्थित होते.

सीडीओ मेरी शाळा

येथे नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड, उपप्रमुख राजश्री वैशंपायन, सहसचिव दिलीप अहिरे, पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मुग्धा काळकर आदींच्या हस्ते पुस्तकावाटप झाले.

न्यू इंग्लिश स्कूल

आडगाव ः येथे मोफत पाठ्यपुस्तक वितरण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य भाई पुंजा माळोदे व माजी सैनिक दत्तात्रय मते होते. यावेळी पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे गंथपाल डी. के. नागमोते यांनी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. दहावीतील गुणवंतांचा सत्कार झाला.

सातपूरला विविध उपक्रम

सातपूर ः परिसरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले. गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिरात मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापिका गायधनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठपुस्तके वाटप करण्यात आली. सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापिका सुलोजना गांगुर्डे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. महापालिकेच्या जिजामाता शाळेतही नगरसेवक तथा मनसे गटनेता सलिम शेख, नगरसेवक योगेश शेवरे यांनी नवागतांचे स्वागत केले.


देवळाली कॅम्प परिसरात उत्साह

देवळाली कॅम्प : येथील शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन उत्सलाहात स्वागत करण्यात आले. परिसरातील कॅन्टोन्मेन्ट बोर्ड हायस्कूल, कॅन्टोन्मेन्ट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, देवळाली हायस्कूल, नूतन विद्यामंदिर आदी शैक्षणिक संस्थांमध्ये नव्याने आलेल्या व सुटी संपल्यानंतर प्रथमच शाळेत दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तके, वह्या कंपास आदी साहित्याचे वाटप केले.

चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण

देवळाली कॅम्प ः सर्व शिक्षण अभियानांतर्गत शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येऊन त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, मुख्याध्यापक कल्पना साळवे, शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणीजवळ अपघातात तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अहमदाबादहून अहमदनगरकडे जाणारी कार लखमापूर फाट्याजवळ झाडावर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाले. दोन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे हा अपघात झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील नवीन बबन कांडेकर (वय २२), मंगल बबन कांडेकर (वय ४२), आशा साहेबराव गावडे (वय ४५), छगन मांणकू कांडेकर (वय २५), चालक मानिष भाऊसाहेब गवळी (वय २३) हे सर्व कारने अहमदाबादहून अहमदनगर येण्यासाठी निघाले होते. दरम्यान लखमापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेच्या झाडावर कार आदळल्याने मंगल कांडेकर, आशा गावडे, छगन कांडेकर हे जागीच ठार झाले. चालक मनिष व नवीन कांडेकर हे दोघे जखमी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैद्याचे उपोषण; सिव्हिलमध्ये दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील उमेश भानुदास नागरे या कैद्याने दोन दिवसांपासून अन्नत्याग केल्याचा प्रकार घडल्याने अखेरीस त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कारागृह सुरक्षाव्यवस्थेकडून होणाऱ्या जाचाविरोधात आपण हे पाऊल उचलले असल्याचे या कैद्याचे म्हणणे असले तरी कारागृह प्रशासनाने त्याचा हा आरोप फेटाळून लावला आहे. उमेश नागरे या कैद्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गैरवर्तनाची तक्रार केली म्हणून थेट तुरुंगाधिकाऱ्यांवरच हल्ला केला होता. त्यानंतर त्याने इतर कैद्यांनाही शिवीगाळ करून त्यांच्यातही रोष निर्माण करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे उमेश नागरे याला कारागृह प्रशासनाने हाय सिक्युरिटी सेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर याचा राग आलेल्या नागरे याने दोन दिवसांपासून जेवण घेणे बंद केले होते. यावर जेल प्रशासनासह इतर कैद्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही तो आपल्या मागणीवर अडून बसला होता. अखेरीस कारागृह प्रशासनाने त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीचा वाद कृत्रिम’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र व कर्नाटक हद्द‌ीचा वाद हा कृत्रिम असून, आम्ही एकच आहोत. दोन्ही राज्यांतील साहित्यही हेच दर्शविते. या दोन्ही राज्यांत कितीतरी साम्यस्थळे आहेत. ती पाहता हद्दीचा वाद त्यापुढे गौण ठरतो. मराठी व कानडी या भाषा भगिनी आहेत व त्या दोन्हींमध्ये असंख्य साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्याचा ऊहापोह करता एकमेकींनी भाषांतराच्या माध्यमातून आदानप्रदान केले पाहिजे, अशी भावना प्रख्यात कन्नड साहित्यिक तथा कवी, नाटककार, समीक्षक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार डॉ. शिवप्रकाश यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. शिवप्रकाश पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे ऋणानुबंध खूप जुने असून, थेट विठ्ठलाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या दोन राज्यांत सीमारेषेचा वाद असूनही साहित्यात मात्र मराठी-कानडी असा कोणताही भेद नाही. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कानडीत भाषांतरीत झाल्या पाह‌िजेत. मराठीतील ज्ञानेश्वर कानडीत आले पाह‌िजे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कानडीत भाषांतर झाले पाह‌िजे. संत तुकाराम कानडीत आले पाह‌िजे व हे करतानाच आमचा हरिदास मराठीत आला पाह‌िजे, असेही शिवप्रकाश म्हणाले.

कुसुमाग्रज यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने आज माझ्या वाढदिवशी माझा पुनर्जन्म झाला आहे, असे भावनोत्कट उद््गार डॉ. शिवप्रकाश यांनी काढले. पसायदान हे विश्वाचे आर्त असून विश्वकवी ज्ञानेश्वरांनी ते ईश्वराकडे मागितले आहे. त्यामुळे हे मागणे दैवी ठरते असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासीपठावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, मेनका धुमाळे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या डॉ. विजया पाटील उपस्थित होते.

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार व बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबुराव बागूल कथालेखन पुरस्कार प्राप्त झाला.

सत्काराला उत्तर देताना मेनका धुमाळे म्हणाल्या, स्रियांचे दुःख, वेदना, संवेदना शब्दांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचे प्रयत्न माझ्या साहित्यातून केले आहे. विद्यापीठाने दिलेल्या पुरस्कारामुळे ग्रामीण साहित्याचा गौरव झाला आहे. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. जगणे व भोगणे यातील अंतर मी माझ्या लेखनातून व्यक्त करीत आहे. स्त्री व तिची दु:खे उमजण्याचा हा प्रवास आहे तो रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे, असेही धुमाळे म्हणाल्या.
कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, निवड समितीने अतिशय योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठी शिफारस केली याचा आनंद वाटतो. अमराठी साहित्यिकाच्या साहित्याचा सन्मान झाला याचा विशेष आनंद होत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.

कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते. विद्यापीठातर्फे दिला जाणारा हा आठवा पुरस्कार होता. तर बाबुराव बागूल कथालेखन पुरस्काराचे रुपये २१ हजार रोख असे स्वरूप होते. प्रारंभी कुसुमाग्रज अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

इंग्रजीचे आव्हान

डॉ. अक्षयकुमार काळे यावेळी म्हणाले, मराठीत अनेक दर्जेदार साहित्यकृती आहेत. मात्र त्यातील अनेक साहित्य दर्जेदार असूनही केवळ अनुवाद न झाल्याने सीमित राहिले. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीचे नातेसंबंधात दरी निर्माण झाल्याचे सांगून स्थानिक भाषांपुढे इंग्रजी भाषेचे मोठे आव्हान ठाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मृत्यूप्रकरणी सातजण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये बुधवारी दुपारी गरीब नवाज कॉलनीत पाणीवाटपावरून झालेल्या हाणामारीत नगरसेवकाच्या झालेल्या मृत्युप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक शेख मोहम्मद आणि नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविका पुत्र सैय्यद मुजफर अली, सैय्यद नासिर अली यांच्या गटात बुधवारी पाणीवाटपावरून तुफान हाणामारी झाली. यामध्ये सभापती सद्दाम तेलींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस अजून काही दंगलखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान मयत सद्दाम तेली यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले असून, आता शहरात शांतता व चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकांचा बाजार ‘बुडाला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या सराफ बाजारात बुधवारी सायंकाळी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक दुकानांत पाणी शिरल्याने सोनार, कापड व्यापारी, किराणा आणि इतर व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी येथे दिवसभर साफसफाई सुरू होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून आले. जोरदार पावसाने येथील व्यावसायिकांचा बाजारच बुडाल्याने या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अनेक व्यावसायिकांचे मागील वर्षी पुरामुळे झालेले नुकसान भरून येत नाही, तोच पुन्हा मोठे नुकसान पुन्हा मोठे नुकसान झाल्याने व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे. पण, यावर्षी मात्र नालेसफाईच्या कामात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी दिवसभर साफसफाई करून शिल्लक माल जमा करण्याचे काम येथे सुरू होते. ओली झालेली बिल बुके, कागदपत्र सुकण्यासाठी बाहेर टाकलेली होती. शिवाय काही ठिकाणी बेसमेंटमधील पाणी काढण्याचे काम अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू होते. स्मार्ट होणाऱ्या नाशिक शहरातील नालेसफाईचा बुधवारच्या पावसाने पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी तर नालेसफाई झालीच नसल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही त्यामुळे सीबीएस, एम. जी. रोड, रविवार कारंजा या परिसरातील पाणी उतार असल्याने सराफ बाजारात जमा होत असल्याची स्थिती आहे. सराफ बाजारातील शुक्ल गल्लीतील स्वच्छतागृह अडथळा ठरत असल्याचे येथील व्यावसायिक सांगत. पूर्वी स्वच्छतागृह छोटे होती, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजदेखील होते. पण, नवीन बांधकाम ड्रेनेजवर केल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे अगदी छोटी जागा शिल्लक आहे .



महापौरांची मॅरेथॉन भेट

महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी सराफ बाजाची पाहणी केली. सभागृह नेते दिनकर पाटील व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पण, ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले होते व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, त्या ठिकाणी महापौर गेल्याच नाहीत.

--


गोदाकाठावर कचऱ्याने दुर्गंधी

पंचवटी ः बुधवारच्या आठवडेबाजारातील कचरा पडून राहिल्याने व बुधवारच्या जोरदार पावसामुळे गोदाकाठी दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी सायंकाळीही हा कचरा पडून होता. महापालिकेच्या सफाई कामगारांनी या कचऱ्याचे ढिगारे घालून ठेवले असले, तरी ते उचलले नाहीत, त्यामुळे हा कचरा पडून आहे. म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, गणेशवाडी रस्स्यावर कचरा पडून आहे.

--


सरस्वती नाल्याची व्हावी सफाई

काही वर्षांपूर्वी सरस्वती नदी म्हणून ओळख असलेल्या या नदीचे नाल्यात रुपांतर झाले. पण, या नाल्याची २० ते २५ वर्षांत कधीही साफसफाई झालेली नाही. अनेक वेळा मागणी करूनदेखील प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्वरित या नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक करीत आहेत.

--

आमच्या कपड्याच्या दुकानांत पाणी शिरल्याने दुकानातील सर्व कपडे, फर्निचर ओले झाले. त्यामुळे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. येथे ड्रेनेज लाइनची साइज वाढवावी.

- कल्पेश भंडारी, कापड व्यावसायिक

--

मागील वर्षी महापुराने मोठे नुकसान झाले होते. फर्निचर नुकतेच नवीन बनवलेले होते. पण, आता पुन्हा दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. कागदपत्रे, जुनी बिले सर्व भिजगेले.

-बाबूलाल चौधरी, सुवर्ण व्यावसायिक

--

सिडकोत नालेसफाईचा देखावा
राजन जोशी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पावसाळ्यापूर्वी सिडको परिसरातील नाले किंवा पावसाळी गटारी दर वर्षी साधारणतः मे महिन्यांतच साफ केल्या जात होत्या. यंदा मात्र या नाल्यांची किंवा गटारींची सफाई केली असली, तरी ती देखाव्यापुरतीच ठरल्याचे बुधवारच्या पहिल्याच पावसात लक्षात आले आहे. दत्त चौक भागातील नाला तुडूंब भरून गेल्याने परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर सिडकोतील रस्त्यांच्या कामांचाही दर्जा या पावसाने जनतेसमोर आला असून, पहिल्याच मोठ्या पावसाने महापालिका प्रशासनाची कार्यतत्परता चव्हाट्यावर आली आहे.

अनेक ठिकाणी वाहून आलेला गाळा गुरुवारीसुद्धा प्रशासनाने हटविला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. घरात पाणी शिरल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना याबाबतची समस्या कळविली. मात्र, कोणीही घटनास्थळी न गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्यावर पडले भगदाड

कोकण भवनच्या मागे मटाले गोठयासमोर एक महिन्यापूर्वीच बनवलेल्या १०० फुटी रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध ५ ते ६ फूट रस्ता खचून मोठे भगदाड पडले आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांना कळविल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले.दरम्यान, सभापतींनी केवळ स्वतःच्याच प्रभागात दौरा केल्याचे समजते.

--


सातपूर प्रभाग सभेत खडाजंगी

सातपूर ः महापालिकेच्या सातपूर प्रभागाची मासिक सभा गुरुवारी सभापती माधुरी बोलकर यांच्या उपस्थित झाली. त्यात बुधवारच्या पहिल्याच मोठ्या पावसामुळे विभागात दाणादाण उडाल्याने कामचुकारपणाच्या मुद्यावरून नगरसेवक व अधिकाऱ्यांत खडाजंगी उडाली. स्वच्छता मोहीम राबवूनदेखील आरोग्य व ड्रेनेज विभागाचे अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यादेखील महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावार नियंत्रण ठेवत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेविका सीमा निगळ, गटनेता सलिम शेख, नगरसेविका हर्षदा गायकर, नगरसेवक भागवत आरोटे यांनी पावसाच्या पाण्यामुळे होत असलेल्या समस्येबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विभागीय कार्यालयात पहिल्याच झालेल्या प्रभाग सभेला नगरसेवक तथा शिवसेना गटनेता विलास शिंदे, शशिकांत जाधव, संतोष गायकवाड, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, नगरसेविका अलका आहिरे, पल्लवी पाटील, नयना गांगुर्डे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव, दीक्षा लोंढे यांच्यासह महापालिकेच्या सर्वच विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीसाठी साहित्यिकांच्या आंदोलनाची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अभिजात भाषेबाबतचे सर्व निकष पूर्ण करूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडून विलंब होत आहे. मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर तिच्या समृद्धीसाठी येणाऱ्या ३०० की ५०० कोटी रुपयांची फिकर आम्हाला नाही तर मराठी अभिजात होणे हा आमच्या अस्मितेचा मुद्दा झाला आहे. त्यासाठी सर्व साहित्यिकांनी एकत्र येत आंदोलन करण्याची गरज आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना काळे यांनी ‘मटा’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी साहित्याबाबतची मते परखडपणे मांडली.

प्राचीनत्व, दर्जेदार साहित्य, बहुभाषिकत्व हे सारेच निकष मराठी अभिजात होण्यासाठी गरजेचे सांगण्यात आले होते. हे निकष केव्हाच पूर्ण करण्यात आले असून, आता केंद्राकडून खीळ बसलेली आहे. ज्ञानेश्वरी ९०० वर्षांपूर्वी होती, त्याआधीदेखील मराठी साहित्य होतेच, असे दाखले मिळतात. त्याआधी दीड हजार वर्षांपूर्वी मराठी भाषा केवळ अस्तित्वात नव्हती तर समृद्ध होती. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळायलाच हवा, असेही काळे म्हणाले.

सकस साहित्य निर्माण होत नाही या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की साहित्यिक त्याच्या जाणिवांशी प्रामाणिक असला पाहिजे. त्याच्या अनुभवविश्वाशी तो प्रामाणिक असला तर त्याला लिहिणे अवघड जात नाही. अनुभवासोबतच त्या गोष्टीचे ज्ञानही गरजेचे असते. तो जोपर्यंत वेगळ्या साक्षात्काराबाबत लिहीत नाही, तोपर्यंत जीवनानुभूती प्रकट होणार नाही. साहित्य संमेलनात होणाऱ्या वादांबाबत ते म्हणाले, की वादाशिवाय सत्याकडे जाताच येत नाही. आपल्याला निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी वाद हा घालावा लागतो. दुसऱ्याशी वाद घालायचा नसेल तर स्वत:च्या मनाशी तरी वाद घातला पाहिजे. हल्ली समीक्षेकडे कुणी वळत नाही, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की त्यासाठी व्यासंग लागतो. ललित, कथा, कादंबरी लिहिणे सोपे असते. समीक्षा ही फार अवघड बाब आहे. त्यासाठी अभ्यासोनीच प्रगटावे लागते. त्यामुळे या प्रांतात येणाऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच समीक्षेकडे आजही एक प्रकारच्या तुच्छतेने पाहिले जाते. हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अभ्यासू समीक्षेकडे वळणार नाहीत.

समीक्षक कसा हवा, या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की समीक्षक परखडच असायला हवा. केवळ गुडीगुडी कौतुक कोणीही करेल आणि नको तितके ताशेरे कुणीही ओढेल; परंतु स्थिर समीक्षा करणारे आज कमी आहेत. एखाद्याला झोडायचे म्हणून झोडून काढतात आणि एखाद्याला डोक्यावर घ्यायचे म्हणून उचलून घेतात, असे न करता परखड भाष्य करता आले पाहिजे, असेही काळे म्हणाले.

साहित्यिक राजकीय लोकांच्या विरोधात बोलत का नाही, या मुद्द्यावर काळे यांचे मत विचारले असता, साहित्यिकाला असे वाटते, की त्याचे ज्या प्रश्नाशी नाते आहे, त्याचविषयी तो बोलतो. त्याला वाटले पाहिजे, की या देशातील प्रश्न त्याचे आहेत. ग्राम‌ीण, दलित, आदिवासी साहित्याने बऱ्यापैकी हा स्टँड घेतला आहे. लेखक नाटकी आहेत. त्यामुळे रटाळ साहित्य निर्माण होते आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे, असेही काळे म्हणाले.

‘कितीही खर्च होवोत, साहित्य संमेलन हवेच!’

विश्वसाहित्य संमेलन भरवायला हवीत का, या प्रश्नाचे उत्तर देताना काळे म्हणाले, की गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, प्रादेशिक पातळीवर आणि विश्व पातळीवर संमेलन कोणतेही असो, भरवायलाच हवे या मताचा मी आहे. खर्च होईल ना, होऊद्यात. इतर ठिकाणी खर्च होतोच आहे. ऑलिम्पिकला कोटी रुपये खर्च होतात, परंतु ते आपण बंद करतो का? आणि असेही संमेलनाचा खर्च अमेरिकेतील भारतीयांकडून उचलला जात असेल तर काय हरकत आहे संमेलने भरवायला? त्यामुळे मराठीचाच झेंडा सातासमुद्रापार जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images