Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अक्षता पाटील @ ९९.८०%

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या परीक्षेत येथील रचना विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता देवेंद्र पाटील हिने ९९.८० टक्के मिळवून शहरातून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या यशाचे श्रेय अक्षताने आई-वडिलांकडून मिळालेल्या पाठबळाला दिले आहे. अक्षताच्या सोबतच तिची जुळी बहीण ऋतुजा शिकते. तिनेही या परीक्षेत रचना विद्यालयातून घवघवीत यश मिळवित ९३.२० टक्के मिळविले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावर अक्षता हिची आई स्वाती पाटील आणि वडील देवेंद्र पाटील हे जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून सेवा बजावतात. पाटील कुटुंब नाशिक शहरात निवासाला असले, तरीही आई-वडिलांच्या नोकरीच्या दुर्गम ठिकाणामुळे त्यांना शिक्षक असूनही मुलींच्या शिक्षणासाठी वैयक्तिक अन् पुरेसा वेळ देणे शक्य होत नव्हते.

अक्षता आणि ऋतुजा या दोघीही दहाव्या इयत्तेत आल्यानंतर घरात पहिला घडलेला बदल म्हणजे घरातला बंद झालेला टीव्ही. मुलींच्या अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी दिवसभरातील कुठल्याही टीव्ही कार्यक्रमाचा अपवाद न ठेवता पाटील कुटुंबीयांनी दहावीची परीक्षा होईपर्यंत टीव्हीचे कनेक्शनच काढून ठेवले. शाळा, गरजेपुरता क्लास यातील जाणारा वेळ वगळता दिवसभरातून अक्षताने सुमारे पाच तास अभ्यासाला दिले. बाजारातील तयार नोट्सवर अवलंबून न राहता स्वत: काढलेल्या अभ्यासविषयांच्या नोट्सची सवय तिला आत्मविश्वास देऊन गेली. या मुलींच्या वडिलांनाही नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

अक्षता हिला ५०० पैकी एकूण ५९९ गुण पडले. यातील १५ गुण हे क्रीडा आणि कला विषयातील सहभागाबद्दल देण्यात येणारे अधिकचे गुण आहेत, तर या १५ गुणांशिवाय तिला पडलेल्या गुणांची एकूण बेरीज ४८४ होते.

_ _ _ _

शिस्तीच्या शिरस्त्याचा उपयोग

अभ्यासासाठी आई-वडिलांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, लावलेली शिस्त दहावीच्या यशात उपयोगी आली. दिवसाकाठी सुमारे पाच तासांचा अभ्यास, स्वत:च्या नोट्स काढण्याची सवय फायद्याची ठरली. भविष्यात एमबीबीएसचे शिक्षण घेऊन प्रशासनात अधिकारी बनायचे स्वप्न आहे.

-अक्षता पाटील, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशमंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी नाशिककर भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरात जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. वर्षभरातून दोन अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. ठिकठिकाणी बेल, दुर्वा, नारळ यांच्यासह पेढ्यांचा नैवेद्य बाप्पांना दाखविण्यात आला.
नाशिक शहरात बाराहून अधिक गणपतीची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये अंगारकी चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शहरातील ढोल्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, शहराबाहेरील नवश्या गणपती या ठिकाणी भाविकांनी हजेरी लावली. रविवार कारंजावरील गणपती मंदिरांत दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. येथे संध्याकाळच्या वेळी गणपतीची आरती होत असल्याने परिसरातील अनेकजण येथे नित्यनेमाने आरतीसाठी येतात. गणपती अथर्वशीर्ष दिवसभर येथे सुरू असते. नवश्या गणपतीला तर यात्रेचेच स्वरूप आले होते. नवश्या गणपती हा पिकनिक स्पॉट झाला असल्याने चतुर्थीच्या दिवशी येथे भाविक मोठ्या उत्साहाने दर्शनला येतात, तसेच दर्शन झाल्यावर येथील निसर्गरम्य परिसरात काही काळ विश्रांती घेतात. आनंदवली येथील नवश्या गणपती हे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भाविक येथे नवस बोलण्यासाठी येतात. नवस फेडण्यासाठीही येथे गर्दी असते. नवश्या गणपतीला दोरे तसेच घंटी बांधण्याचा नवस बोलला जातो. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था असल्याने नाशिककरांसाठी संकष्टी चतुर्थी तसेच अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर यात्राच भरते.
नाशिकरोडच्या इच्छामणी गणेश मंदिरातदेखील भाविकांनी हजेरी लावली. अंगारकी चतुर्थीचा योग साधत मुक्त‌िधाम येथेदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दर्शनासाठी गर्दी

नाशिकरोड : नाशिकरोडच्या गणेश मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून रात्री उश‌िरापर्यंत दर्शनासाठी रीघ लागली होती. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात सर्वात जास्त गर्दी होते. येथे अंगारकीला जत्रा भरते. फुल हार, नारळाबरोबरच पेढे, घरगुती वस्तू, खेळणी आदी विक्रेत्यांची दुकाने लागलेली असतात. मंदिराचे बांधकाम सुंदर असून मूर्तीही मनोहारी आहे. तसेच आवारात सभामंडप व हिरवळ असल्याने भाविकांचा ओढा या मंदिराकडे असतो. देवळालीगावातील गणेश मंदिरातही भाविकांची गर्दी होती. रोकडोबावाडीतील अण्णा नवग्रह मंदिराचा परिसर औषधी व विविध फुलांच्या रोपांनी बहरला आहे. स्वच्छता व शिस्त वाखण्याजोगी आहे. येथे गणेशाची तीन मुखांची बसलेली प्रचंड मोठी मूर्ती आहे. नवग्रह देवतांची मंदिरे दाक्षिणात्य शैलीत बांधलेली आहेत. नदीकाठचा व शांत परिसर असल्याने भाविकांची येथेही गर्दी होत आहे. चेहेडी, जेलरोडचे चंद्रेश्वरनगर, माडेल कालनी, आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर आदी ठिकाणच्या गणेश मंदिरातही भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्तीतील मृतांच्या कुटुंबीयांना ३२ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ११ व्यक्ती दगावल्या असून, त्यापैकी आठ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. याशिवाय ४३ जनावरे (जित्राब) मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी २२ जनावरांसाठी ५ लाख ६७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात तीन जून ते १३ जून या कालावधीत अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. वीज अंगावर पडून १० जणांचा, तर दरड कोसळून एक जणाचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक तीन घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडल्या. मालेगाव आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी दोन, तर बागलाण, चांदवड आणि नांदगाव तालुक्यात प्रत्येकी एक घटना घडली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत ११ पैकी आठ जणांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित तीन जणांच्या कुटुंबीयांनाही येत्या दोन- तीन दिवसांत मदत मंजूर केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४४) आणि मयूर रघुनाथ मवाळ (वय १८, दोघेही रा. चोंढी, सिन्नर) आणि विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी) यांना मदत मिळणे बाकी आहे.

मृत जनावरांसाठी ५.६७ लाख

गाय आणि म्हैस यांसारखी दुधाळ जनावरे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडली तर त्यासाठीही सरकार आर्थिक मदत करते. अशी सात जनावरे मृत्युमुखी पडली असून, प्रतिजनावर ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यानुसार मृत जनावरांच्या मालकांना दोन लाख १० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे, तर शेळीसारखी चार लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, त्यांच्या मालकांना अद्याप मदत देण्यात आली नाही. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये एवढी मदत केली जाते. अशा १९ जनावरांचा मृत्यू झाला असून, १३ जनावरांच्या मालकांना तीन लाख २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी १६ हजार रुपये याप्रमाणे ३२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

आपत्तीतील मृतांची नावे

विठोबा कमू उघडे (वय २५, रा. खेड देवाचीवाडी, इगतपुरी), सोनीबाई पुंडलिक आंबेकर (४५, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), अरुण पुंडलिक आंबेकर (२२, रा. वायघेळपाडा, त्र्यंबकेश्वर), आनंदा पुंडलिक गमे (२४, रा. मेटघर किल्ला), समाधान बहादूरसिंग सुमराव (३०, रा. टोकडे, मालेगाव), सुनंदा दिनकर गायकवाड (३२, रा. गरबड, मालेगाव), जागृती हिरामण बच्छाव (१४, रा. देवळाणे, बागलाण), कविता बापू ठाकरे (३२, रा. उर्धूळ, चांदवड), रामदास पोपट राठोड (३०, रा. कसाबखेडा, नांदगाव), रघुनाथ कोंडाजी मवाळ (४४, रा. चोंढी, सिन्नर), मयूर रघुनाथ मवाळ (१८, रा. चोंढी, सिन्नर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव

$
0
0

टीम मटा
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच अचानक व्होल्टेज वाढल्याने ठिकठिकाणी विद्युत उपकरणे जळाली आहेत. सातपूरमध्ये दीडशेवर सेटटॉप बॉक्स यामुळे निकामी झाले आहेत.
सातपूर भागात गेल्या महिन्याभरापासून महावितरणकडून ‌विद्युत पुरवठा अनियमित आहे. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. विजेच्या झटक्याने डेन, पीएमसीएम व हॅथवे कंपनीचे शेकडो सेटटॉप बॉक्सचे नुकसान झाले आहे. अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यावर विद्युत उपकरणांची हानी होत आहे. या विद्युत उपकरणांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. वेळेवर विज बिल अदा करूनदेखील अखंडित विज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने सातपूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रोजच अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दीड हजारांहून अधिक ड‌िज‌िटल सेटटॉप बॉक्सचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक विद्युत उपकरणेही अचानक आलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे जळाली आहेत.

नादुरूस्त फिडरचा फटका
सातपूर भागात विद्युत पुरवठा करणारे फिडरच नादुरूस्त असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, महिनाभरापासून फिडरचे काम का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पंचवटीत खेळखंडोबा
पंचवटी ः सोमवारी पडलेल्या जोरदार पावसानंतर पंचवटी परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला. मंगळवारीही हीच स्थिती होती. सोमवारी पावसाच्या वेळी फारसा वारा नसतानाही विजेचा पुरवठा बंद करण्यात आला. पाऊस थांबल्यानंतरही विजपुरवठा सुरळीत झाला नाही. मंगळवारीही विजेचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दिवसभर सतत विजेपुरवठा खंडित होत होता. या प्रकाराने नागरिकांचे हाल झाले.

सिडकोतही विजेची ये-जा
सिडको ः वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात वीज पुरवठ्यामुळे उत्तमनगर येथे लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळून गेली होती. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. सिडको व इंदिरानगर भागात असे प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यातच ब‌िलांचे वाटपही चुकीच्या पद्धतीने होत असून, उशिराने वाटप होत आहे.

डीपीत स्फोटानंतर जेलरोड अंधारात

नाशिकरोड ः जोरदार पावसामुळे जेलरोड परिसरातील वीज पुरवठा खंड‌ित झाला. त्यातच शिवाजीनगर येथील डीपीजवळ प्रचंड मोठा जाळ होऊन स्फोट झाल्यामुळे नागरिकांना किमान पाच तास अंधारात रहावे लागले. जेलरोडच्या शिवाजीनगर येथील परेश सोसायटीसमोर व‌िजेची डीपी आहे. सहाच्या सुमारास येथे प्रचंड मोठा स्फोट होऊन जाळ झाला. त्यामुळे दोन ठिकाणी तारांचे तुकडे झाले. परिसरातील वीजपुरवठा खंड‌ित झाला. रात्री साडेनऊला वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, एका मिन‌िटातच खंड‌ित झाला. कर्मचाऱ्यांनी भरपावसात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ४०७ शौचालयांचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्वच्छ व सुंदर शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये नाशिक शहर आणण्यासाठी आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छतेसाठी अॅक्शन प्लॅन तयार करत सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठीही काम सुरू केले आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरात सध्या एकूण ४०७ शौचालये आहेत. त्यात सुलभ इंटरनॅशनल ८६, सार्वजनिक शौचालय १३२ आणि पे अँड यूजची १८९ शौचालये आहेत. या सर्व शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात या शौचालयांची स्थिती तपासली जाणार असून, अस्वच्छता आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पे अँड यूज शौचालयांमध्ये पैसे घेऊनही सुविधा दिल्या जात नाहीत. त्यात प्रचंड दुर्गंधी असते. त्यामुळे सर्वेक्षणात आढळलेल्या त्रुटींवर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत बचत गटांचे खाद्यपदार्थ

$
0
0

सुरेश प्रभूंच्या निर्णयामुळे महिलांना होणार फायदा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांमुळे महिला बचत गटांना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्गातील दोन व देशातील दहा बचत गटांतर्फे रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. सुरेश प्रभू यांच्या दूरदृष्टी व गतिमान निर्णय क्षमतेमुळे रेल्वेने महिला आर्थिक सबलीकरणासाठी टाकलेल्या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत होत आहे.
रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता व किमती याबाबत अनेकदा वाद झडत असतात. पंधरा रुपये किमत असलेली पाण्याची बाटली सर्रास वीस रुपयांना विकली जाते. जेवणाचे पदार्थ बऱ्याचदा कच्चेच असतात. या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना चांगली मागणी मिळू शकते. सामान्य प्रवाशांनाही हे पदार्थ परवडू शकतात. या पार्श्वभूमीवर बचत गटनिर्मित खाद्यपदार्थांची विक्री रेल्वेमध्ये जोमाने सुरू करण्यासाठी गेल्या ११ मे रोजी हिरवळ प्रतिष्ठानने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली व त्यांना संकल्पना समजावून सांगितली. तसेच उपयुक्त सूचनाही केल्या. प्रभू यांनी त्याच दिवशी सूचनांसंदर्भात चर्चा करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. ८ जूनला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) चेअरमनच्या अध्यक्षतेखाली देशातील महिला बचतगट प्रतिनिधी व हस्तकला संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन चर्चा झाली. ९ जूनला स्वतः सुरेश प्रभू यांनी या विषयासंदर्भात चर्चा करुन बचतगटांना खाद्यपदार्थ विक्रीची संधी देण्याचे निर्देश दिले.

भारतात महिला बचतगटांची संख्या वाढतच आहे. त्यातून महिलांना रोजगार मिळून आर्थिक उन्नती होत आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये वस्तूंची विक्री करण्याची सुरेश प्रभू यांची योजना ही खऱ्या अर्थाने महिला गृहउद्योगास चालना देणारी आहे. सुरेश प्रभूंचे रेल्वे मंत्रालयातील निर्णय रेल्वेक्रांती घडवत असून राष्ट्र उभारणीचे काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया महिला बचत गटांनी व्यक्त केली आहे. इच्छुक बचतगटांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्याचा ८९.७९ टक्के निकाल

$
0
0

धुळे : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ७३२ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, धुळे जिल्ह्याचा एकूण ८९.७९ टक्के निकाल लागला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात परीक्षेसाठी २० हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १७ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नंदुरबार जिल्ह्याचा एकूण ८६.३८ टक्के निकाल लागला आहे. मात्र गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धुळे व नंदुरबारमधील दहावीच्या निकाल चार ते पाच टक्क्यांनी घसरला आहे. तरीही गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीवापरावर शहरात अधिभार लावावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी धरणांमधील आपल्या हक्काचे पाणी महानगरांना दिले. मात्र, मोबदल्यात त्यांना काही मिळाले नाही. बस प्रवाशांवर प्रत्येक तिकिटामागे पाच ते दहा पैसे अधिभार लावतात. तसाच अधिभार धरणांतील प्रतिलिटर पाण्यामागे लावावा. हा अधिभार शेतकरी रिलीफ फंड नावाने जमा करून त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरावा, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ल. रा. गव्हाणे यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे ते यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी परिचित आहे. तालुक्यातील शेकडो एकर जमिनी अनेक प्रकल्पांसाठी सरकारने संपादित केल्या. मात्र, येथील शेतकऱ्यांच्या भावी आयुष्याचा, त्यांच्या पिढ्यांचा किंचितही विचार झाला नाही. येथील धरणांमधून नाशिकसह मुंबई, अहमदनगर आणि मराठवाड्याला पाणी पुरविले जाते. भूमिपुत्र मात्र पाण्यासाठी वणवण करतात. ही परिस्थ‌िती केवळ इगतपुरी तालुक्यातील नाही. जेथे जेथे अन्य विभागांना पाण्याचे वाटप केले जाते, तेथील लोक उपेक्षित राहिले आहेत. म्हणूनच शेतकरी रिलीफ फंडाची मागणी त्यांनी केली आहे.

गेली नऊ वर्षे यासह आणखी एका मागणीसाठी गव्हाणे पाठपुरावा करीत आहेत. राज्यातील जमिनीची मोजणी होऊन शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानुसार जिल्हा, तालुका भूमापन कार्यालयातील नकाशे बनविण्यात आले. गेल्या १०० वर्षांत वाटणीपत्रे, खरेदी-विक्री, तुकडेबंदी असे बरेचसे फेरफार झाले आहेत. शेतांच्या हद्दी निश्च‌ित नसल्यामुळे गैरसमजातून शेतकऱ्यांची आपापसांत भांडणे, मारामाऱ्या होतात. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना भूमिअभ‌िलेख कार्यालयाकडून मोजणी करवून घेण्यासाठी नाहक वेळ, पैसा आणि शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. या सर्व खटाटोपात भ्रष्टाचारही बोकाळत असून, ग्राहक संरक्षण परिषदेकडे तक्रारींचा ओघही वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक तीस वर्षांनी राज्यातील जम‌िनीची जमाबंदी होणे गरजेचे आहे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. सरकार स्तरावरील उदासीनतेमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. मात्र, ही मोजणी झाली तर कोर्टात दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

दखल घेतली जात नसल्याची खंत

सरकारी यंत्रणा दाद देत नसली तरी गव्हाणे यांनी पाठपुरावा करणे सोडलेले नाही. त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही या मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. काही यंत्रणांनी त्यास प्रतिसाद दिला, तर काहींनी पत्राला उत्तर देणेही टाळले, अशी कैफियत गव्हाणे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेस्क्यू टीमची गडावर प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात सोमवारी झालेल्या पावसामुळे लहान, मोठे दगड कोसळले. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र संरक्षक जाळ्यांमुळे मोठी दुर्घटना टळही. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध‌िकारी, जाळी बसवणाऱ्या मेकॅबरी कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कोसळलेल्या दगडांना बाजुला काढण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असून, या कामासाठी सप्तशृंगी देवीचे मंदिर चार दिवस दर्शनासाठी बंद ठेवावे लागणार आहे. याबाबत देवस्थान प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

उत्तराखंड येथून रेस्क्यू यंत्रणा येण्यासाठी चार दिवस लागणार असून, ती येताच या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांनी दिली. त्यानंतर पुढील चार दिवस मंदिर बंद राहणार आहे.

वर्षभर व विशेषतः पावसाळ्यात गड परिसरात दरड कोसळत असतात. यामुळे संरक्षक जाळ्या ठिकठिकाणी बसव‌िण्यात आल्या आहेत. सोमवारी मंदिर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ काही दगड अचानक कोसळले. मात्र त्यामुळे कुणालाही काहीही दुखापत झाली नाही.

जाळी बसविण्याचा दुसरा टप्पा कधी?

संरक्षण जाळ्या बसवण्याचा दुसरा टप्पा अद्याप बाकी आहे. त्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र पर्यटन विभागाने ती रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान गडावर दरड कोसळली असे वृत्त पसरताच व्यावसायिक व भाविकांची मोठी तारांबळ उडाली. पर्यटन विभागाने जाळी बसवण्याचा दुसऱ्या टप्प्यातील कामाला मंजुरी द्यावी व गडावरील हा धोका कायमस्वरूपी थांबवावा, अशी मागणी माजी सरपंच संदीप बेनके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तिनाथांच्या पालखीत रमले सिन्नरकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे सिन्नर येथे मंगळवारी सकाळी आगमन झाले. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.

हरिनामाचा गजर करत टाळ मृदंगांच्या निनादात गावठा, नवापूल, गणेशपेठ, शिवाजीचौक, कालभैरवनाथ मंदिरावरून लोंढे गल्लीतून निघालेली पालखी भद्रकाली मंदिरासमोर भाविकांच्या दर्शनासाठी थांबविण्यात आली. वारकऱ्यांना उपयोगी वस्तू, विविध प्रकारचा नाश्ता, फळे, चहापान देण्यात आले. सिन्नर शहरातून अनेक वारकरी दिंडी सहभागी झाले. दिंडीत अबाल वृद्ध टाळ-मृदंगाच्या गजरात भजनाच्या तालावर तल्लीन होत नाचत होते.

यंदा प्रथमच दातली ग्रामस्थांनी रिंगण आखून जय्यत तयारी केली. दुपारी चार वाजेच्या सुमारास या रिंगण सोहळ्याने वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणची तहान टँकरवरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जूनचा पंधरवडा उलटत आला तरीही शहरासह तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सटाणा शहरात आजही पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाभरात सर्वाधिक १२ पाण्याचे टँकर्स तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होऊन पाणीटंचाईचे संकट टळावे, अशी आशा तालुकावासीयांना लागली आहे.

दुष्काळ हा बागलाण तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र गत वर्षी अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले वाहू लागले होते. तसेच विहिरींना देखील पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात बहुतांश भागात पाणी टंचाईने डोकेवर काढले. अखेरच्या टप्प्यात तर टँकरच्या पाण्यावरच भीस्त होती.

मे अखेर पुनदचे आवर्तन देवूनही शहरात पाणी टंचाई जाणवत होती. जून महिना सुरू होऊनही शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील परिस्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिरो पेन्डन्सी’साठी एकवटले प्रशासन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय ‘शून्य प्रलंबितता कार्यालय’ (झिरो पेंडेसी) करण्याच्या हेतूने येत्या २० जून रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. स्वामी म्हणाले, लोकाभिमुख शासन ही संकल्पना राबविण्यासाठी तसेच सामान्य माणसांचा वेळ, पैसा, श्रम वाया जावू नये व कामे वेळत व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्या अनुषंगाने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करीत आहोत. या निमित्ताने अपर जिल्हाधिकारी कार्यालय हे शून्य प्रलंबितता कार्यालय करण्याचा मानस स्वामी यांनी बोलून दाखवला.

यापूर्वीच स्वामी यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या कार्यालयातील महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचे निवारण केले आहे. तीन दिवसांत सुमारे १०२ न्यायालयीन प्रकरणेही निकाली काढण्याचा विभागातील विक्रम देखील केला आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालय शून्य प्रलंबितता कार्यालयाचे उद्दिष्टच्या जवळ असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या २० जून प्रलंबित अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात काँग्रेस-सेना युती, रशीद शेख महापौर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मालेगाव

मालेगाव महापालिकेत शिवसेनेचं 'धनुष्य' आपल्या 'हाता'त घेऊन काँग्रेसनं महापौरपदाचं लक्ष्य साध्य केलं आहे. माजी आमदार रशीद शेख यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली आहे. शेख यांनी ४१ मतं मिळवून मालेगाव महागठबंधन आघाडीचे नबी अहमदुल्ला यांचा चार मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयात एमआयएमचाही मोठा वाटा आहे.

मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेसनं सर्वाधिक २८ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी २० जागांसह दुसऱ्या स्थानावर होती. स्वाभाविकच, सत्तास्थापनेसाठी या दोघांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यात काँग्रेस नेते यशस्वी ठरले. शिवसेनेच्या १३ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून त्यांनी ४१चा आकडा गाठला. बहुमतासाठी आवश्यक असलेली ४३ ही 'मॅजिक फिगर' त्यांना गाठता आली नाही. परंतु, एमआयएमचे सात नगरसेवक तटस्थ राहिल्यानं रशीद शेख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. भाजपचे दोन नगरसेवक या निवडणुकीला अनुपस्थित राहिले.

मालेगाव महागठबंधन आघाडीचे नबी अहमदुल्ला यांना ३७ मतं मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय आयुक्त कार्यालयही होणार डिजिटल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभर डिजिटलचे वारे वाहत असतांना संथ काराभारामुळे प्रसिध्द असलेल्या धर्मादाय आयुक्त कार्यालय सुध्दा आता डिजिटल होणार आहे. या कामाची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये ‘डिजिटल धर्मादाय आयुक्त कार्यालय : एक मुक्त संवाद’ या एक दिवशीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्त व अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे १८ जून रोजी त्र्यंबक रोडवरील, सिबल हॉटेल शेजारील अभ्यंकर सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे. या परिषदेत धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांच्यासह मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेला नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील धर्मादाय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. धर्मादाय आयुक्त धर्मादाय विश्‍वस्त संस्थामधील सर्व व्यवहार आणि प्रशासन पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी डिजिटायलेशन आवश्‍यक आहे. देशातत एकूण ३५ लाख विश्‍वस्त संस्था आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडे आठ लाख संस्था आहेत. त्यांचे ई-रेकॉर्ड, सुची एक डाटा एन्ट्री, चेंज रिपोर्ट, लेखापरिक्षण, स्थावर, जंगम मालमत्ता संरक्षण, अनोंदणीकरण अशा सुविधा वेबसाइटवर करणे बंधनकारक आहे. धर्मादाय संस्था केवळ निधीसंकलनापुरती मर्यादित नसून याला औद्योगिकतेचे स्वरुप येत आहे. यातून रोजगार निर्मिती, वैद्यकीय उपचार अशा संधी निर्माण होत आहेत. त्यासाठी या परिषदेत प्रत्यक्ष संगणकावर सर्व ऑनलाइन प्रक्रियेचे सादरीकरण केले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ए, बी, सी, डी, ई व एफ अशा वेगवेगळ्या प्रकारांत संस्था नोंदणी करण्यात आल्या असून, त्यात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सांस्कृतिक व क्रीडा मंडळांसह अनेक संस्था आहेत. या संस्था घटनेप्रमाणे वेळोवेळी बदल करतात; पण या बदलाला धर्मादाय आयुक्त कार्यालय थेट मंजुरी देत नसल्यामुळे हे पदाधिकारी मंजुरीपर्यंत बेकायदा कामकाज करतात. आता या बदललाल मंजुरी देणे सोपे होणार आहे.

संस्थांसाठी शंका निरसनाची संधी

धर्मदाय संस्थांना आपले प्रश्न, अडी अडचणी व त्यांच्या शंकांची उत्तरे या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्यातील परस्परसंबध सुधारावे, दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी, कामात दिरंगाई टळावी यासाठी या डिजिटल करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी सर्वांना या परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त प्रदीप घुगे व ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अॅड. गणेश गोखले यांनी केले आहे.

कामाला मिळणार गती
धर्मादाय आयुक्त कार्यालयात अनेक वर्षे धूळ खात पडलेली कागदपत्रे, जळमटे लागलेल्या फाईल्स आणि किरकोळ स्वरुपाच्या अर्जामुळे कार्यालयात काम करणे सर्वांनाच अवघड होते. आता या डिजिटल प्रक्रियेमुळे या विभागाला गती मिळणार आहे. या परिषदेसाठी नाशिक धर्मादाय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व धर्मादाय कार्यालयांचे सहआयुक्त तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशत माजविणारे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोड परिसरात हातात चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत रिक्षासह धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले. संशयितांवर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुशील राजेश पाशी (१९), शाहब साजिद खान (२१, दोघे रा. स्वारबाबानगर, सातपूर), शुभम अनिल मिश्रा (२०) आणि विकास शंभू पंडित (रा. जगतापवाडी, सातपूर) अशी त्या संशय‌तिांची नावे आहेत. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काही युवक रिक्षात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक महेश देविकर यांनी ही बाब लक्षात येताच सिध्दार्थनगर ते कॉलेजरोड दरम्यान संशयितांना ताब्यात घेतले.

क्रेनची खांबास धडक

भरधाव क्रेनने धडक दिल्याने महावितरण कंपनीच्या वीज खांबाचे नुकसान झाले. महामार्गावरील एक्स्लो पॉईंटजवळ ही घटना घडली. याप्रकरणी क्रेन चालकाविरूध्द अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. औद्योग‌कि वसाहतीकडून महामार्गाकडे जाणाऱ्या भरधाव क्रेनने हार्डी स्पायर कंपनीजवळील महावितरणच्या ११ केव्ही वीज खांबास धडक दिली. त्यामुळे हा खांब वाकून महावितरणचे सुमारे ४५ हजार ५९७ रुपयांचे नुकसान झाले.

अवैध व्यवसायांवर कारवाई

सातपूर ः सातपूर गावात मुख्य रस्त्यावर असलेला अवैध दारू अड्डा शहर पोलिसांनी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १३) रात्री जमीनदोस्त केला. याप्रकरणी १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने अखेर पोलिस उपायुक्तांनीच थेट कारवाई केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

शहर पोलिस दलातील उपायुक्त कोकाटे यांनी अवैध व्यवसायांवर धडक कारवाईला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात त्यांनी सातपूर एमआयडीसीतील अवैध देशी दारूचा अड्डा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला होता. आता सातपूर गावात कारवाई करण्यात आली. अवैध असलेले ताडी दुकान जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईने अनेकांची धावाधाव झाली.

दोघे जुगारी जेरबंद

महात्मा फुले मच्छी बाजार परिसरात मटका खेळणाऱ्या दोघा जुगारींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितांकडून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. दत्तू एकनाथ घुंगटे (रा. दरी मातोरी) आणि समीर विजय यादव (रा. रमाबाई आंबेडकरनगर, खडकाळी) अशी संशय‌तिांची नावे आहेत. मंगळवारी रात्री संशय‌ति महात्मा फुले मच्छी बाजार परिसरात मटका खेळतांना आढळले. त्यांच्या ताब्यातून दोन हजार ७१० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

जेलरोड घरफोडी

सिन्नर फाटा : उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या शाम सुभाष पानसरे (रा. प्रथमेश सोसायटी, त्रिवेणी पार्क, जेलरोड) या कर्मचाऱ्याच्या घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख १० हजार रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला. ही घटना मंगळवारी दिवसा घडली. शाम पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत शाम पानसरे यांच्या घरातील सोन्याच्या चार अंगठ्या, पेंडल, चेन, ओमपान, बाळ्या असे दोन तोळे तीन ग्रॅमच्या दागिन्यांसह दहा हजाराची रोकड लंपास झाली आहे. मंगळवारी सकाळी शाम पानसरे यांची पत्नी कविता माहेरी गेली असता ही घरफोडी झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास कविता माहेरुन आपल्या घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

जन्मदात्याकडून मुलीचा विनयभंग

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथे नराधम बापाने स्वतःच्याच मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पित्याकडून जवळपास १० वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून मुलीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील काशिनाथ बागुल (५६, रा. सिन्नर फाटा) असे या नराधम बापाचे नाव आहे. तो एकलहरे येथील वीजनिर्मिती केंद्रात नोकरीस आहे. तो २००७ पासून आपल्या मुलीशी वारंवार अंगलट करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा शाळेत शिकणाऱ्या या पीडित मुलीला बापाच्या अशा वागण्याचा अर्थ समजत नव्हता. त्यामुळे तिच्या बापाची हिंमत वाढत गेली. आता वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या मुलीने डिसेंबरमध्ये अंगलट करणाऱ्या बापाला झिडकारण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या बापाने तिच्यासह तिच्या आईला मारहाण करीत घराबाहेर काढले. हतबल झालेल्या मायलेकींनी आपल्या काकाच्या घरी आश्रय घेतला. असे प्रकार वारंवार घडत असतांनाही केवळ घराची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये तसेच बापाच्या वर्तनात सुधारणा होईल या आशेने पीडितेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. पीडित मुलगी शनिवारी (दि. १०) रात्री घरी परतली असता ‌तिच्या बापाने उपरोधिकपणे बोलून तिला बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावठी पिस्तुल विकणाऱ्या तीन तरुणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर पोलिसांनी बुधवारी दत्तमंदिर चौकात गावठी पिस्तुल विकणाऱ्या टोळीला सापळा रचून शिताफीने अटक केली. या प्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्कर्ष मधुकर मुरकुटे (२१, रा. सौभाग्यनगर, नाशिकरोड), सागर दीपक जाधव (२२, रिक्षाचालक, रा. विहितगाव, राजवाडा, नाशिकरोड), राहुल विलास ठोकळ (२१, रा. न्यू बसस्टॉपजवळ, देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौगात काही व्यक्ती गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक गणेश जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली. जाधव यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप कांबळे, गुन्हे शोधपथकाचे गवांदे, ठाकूर, के. टी. गोडसे, के. के. देशमुख, गिते, काकड, भावले, महेंद्र जाधव आदींनी चौकात सापळा रचला. साध्या गणवेशात पोलिस लक्ष ठेऊन होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इनोव्हा गाडी आली. त्यात काही व्यक्ती आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन झडती केली असता गावठी पिस्तुल आढळले. या सर्वांविरुध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आल्याची माहिती बाजीराव जाधव यांनी दिली.

मद्यधुंद चालकाची चार वाहनांना धडक
सिडको : भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद चालकाने उंटवाडी येथे चार वाहनांना बुधवारी जोरदार धडक दिली. यात चारही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समाधान भास्कर चव्हाण (३५, रा. महालक्ष्मी मंदिराजवळ, विजयनगर) असे धडक देणाऱ्या चालकाचे नाव आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत इटियॉस कारने (एम. एच. १५ इएफ ०३०५) भरधाव वेगाने जात उंटवाडी बसथांब्याजवळ एकामागे एक चार वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. परिसरात काही काळा तणाव निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाप्रश्नी पंतप्रधानांशी बोलणार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नदींच्या प्रश्नांच्याबाबतीत सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. गोदावरीचे अस्तित्व टिकविण्याचे जबाबदारी सरकारने उचलावी यासाठी मी पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे गोवर्धन मठ पुरी पीठाधिश्वर जगतगुरू शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांनी सांगितले.

गोदावरी नदीची आणि रामकुंडाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रामकुंड येथे त्यांच्या हस्ते गोदावरी पूजन करण्यात आले. गोदाप्रेमी देवांग जानी, लक्ष्मण मंडाले, सतीश शुक्ल, नंदकिशोर मुठे, पद्माकर पाटील, सचिन डोंगरे आदी उपस्थित होते.

अधोक्षजानंद महाराज म्हणाले, की नदीपात्रात केलेल्या काँक्रिटीकरणामुळे नदीचे अस्तित्व समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. नद्यांमधील हजारो वर्षांची जीवसृष्टी समाप्त होईल. नद्यामध्ये झालेल्या प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायू रोखला गेला आहे. त्यामुळे अनेक प्राणी धोक्यात आलेले आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी तिच्यातील प्राचीन कुंड पुनर्जिवत करण्यासाठी, मूळ पाण्याचे स्त्रोत जिवीत करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही एका कुणाच्या हिताची लढाई नाही तर ही सर्व प्राणीमात्रांची लढाई आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर असंख्य जीवजंतू नष्ट होतील. गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी खूप कष्ट पडलेले आहेत. ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आहे. तिच्या संरक्षणासाठी लढाई करावी लागणार आहे. पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

राममंदिर होणारच

अयोध्यातील राममंदिराविषयी ते म्हणाले, धार्मिक विषय आणि धार्मिक स्थान याबाबतीत राजकारण यायला नको. राममंदिराचे निर्माण होईल, योगी सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असल्याने मंदिर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदत ठेवी देण्याची जबाबदारी संचालकांची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील विनायक अर्बन नागरी सहकारी पतसंस्थेच्या १२ ठेवीदारांना जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे ठेवी परत करण्यासाठी संयुक्तपणे केलेल्या तक्रारीत दिलासा मिळाला आहे.

न्यायमंचाने या ठेवीदारांचे ७ लाख ६७ हजार ७२ रुपये परत करण्याचे आदेश चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरींसह ११ संचालकांना दिले आहे. विशेष म्हणजे या संचालकांबरोबरच तालुका सहकारी निबंधक कार्यालयातील सहाय्यक अधिकारी लक्ष्मण गमे यांच्यावरही हे पैसे देण्याची जबाबदारी टाकली आहे. या जबाबदारीसह न्यायमंचाने ७ हजाराचा दंडही ठोठावला तर व्यवस्थापकाची या प्रकणातून मुक्तता केली आहे.

विनायक अर्बन पतसंस्थेचे शांतारामा चिंधू बडगुजर यांच्यासह १२ ठेवीदारांनी संयुक्तपणे ही तक्रार केली आहे. संबंधित ठेवीदारांनी मुदत ठेवीत रक्कमा ठेवल्या होत्या. मुदत पूर्ण झाल्यानंतर वारंवार मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. संचालक व व्यवस्थापकांनी केलेल्या अपहाराने संस्था डबघाईस येऊन त्यावर अभिहस्तांकीतीची नियुक्ती झाली. संचालक मंडळाच्या वतीने तक्रारदारांनी ठेवीतील रक्कमेची मागणी केली नाही. संस्थेत कोणतीही अफरातफर झाली नाही. पतसंस्थेची विनोंदणी झाल्यामुळे आम्ही संचालक नाही. संचालकांबरोबरच सहाय्यक अधिकारी गमे यांनी सुध्दा तक्रारदारांनी त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.

युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमंचाने उपस्थित सर्व मुद्यावर आपले मत स्पष्ट केले. संचालक मंडळांची जबाबदारी काय यावरही कायदेशीर मुद्दे मांडले. पतसंस्थेमध्ये संचालक मंडळाने केलेल्या अफरातफरी, गैरव्यवहार व घोटाळे यामुळे प्रशासक नियुक्तीची वेळ येत असेल आणि ठेवीदारांना त्यांचे हक्काचे ठेवींचे पैसे मुदत उलटल्यानंतरही परत मिळत नसतील तर त्यास संचालक मंडळ जबाबदार ठरते. त्यामुळे मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत न केल्यामुळे सेवेत कमतरता केली आहे. उपनिबंधक कार्यालयाने प्राधिकृत अधिकारी नेमणूक केल्यानंतर संस्थेची जंगम मालमत्ता विक्री अगर संचालकांकडून कायदेशीर कारवाई करून ठेवीदारांच्या रक्कमा व्याजासह परत करण्याची जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक शाखाही हायटेक

$
0
0

नाशिक : सोशल मीडिया हा आयुष्याचा भाग बनलेल्या यंगर्स्टरचा मतदान प्रक्रियेविषयीचा दृष्टीकोन सकारात्मक आणि व्यापक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जागरुक मतदारांची नवी पिढी घडविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखा फेसबुकपासून ट्विटरपर्यंत आणि व्हॉट्सअॅपपासून यू-ट्यूबपर्यंत सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे मतदानाबाबत जनजागृतीचे हे प्रभावी साधन ठरत

असून त्यास तरुणाईचा प्रतिसादही वाढू लागला आहे.

ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सुरुवातीपासूनच आग्रही राहिला आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असले तरी अजूनही या टक्केवाढीमध्ये फारशी वाढ झाल्याचे पहावयास मिळत नाही. मतदान हे आद्य कर्तव्य असून ते पार पाडण्याची जागरुकता अलिकडे नागरिकांमध्ये येऊ लागली आहे. परंतु, अजूनही बरेचसे नागरिक मतदान प्रक्रियेपासून चार हात दूरच राहतात.

वयाची १८ वर्ष पूर्ण करून तारुण्यावस्थेत प्रवेशणाऱ्या पिढीला मतदानाचे महत्त्व त्यांच्याच प्रिय साधनांद्वारे पटवून देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक विभागाने व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल म‌ीडियाचा मतदार जनजागृतीसाठी वापर करून घ्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने निवडणूक शाखांना केले होते. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने सोशल म‌ीडियाच्या वापरात आघाडी घेतली आहे.

फेसबुक पेजची निर्मिती
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डीवायडीइओ’ या नावाने फेसबुक पेज सुरू केले आहे. चार महिन्यांत या पेजला अनेकांनी भेट दिली आहे. निवडणूक विभागाशी संबंधित चालू घडामोडींची माहितीही या पेजवर मिळते. विशेष म्हणजे इव्हीएम मशिनचा वापर कसा होतो आणि त्यामध्ये फेरफार होणे का अशक्य आहे हे दर्शविणारा व्हिडिओही निवडणूक शाखेने फेसबुकसह यूट्यूबरही अपलोड केला आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या शंकांचे निरसन त्यांना आवडेल अशा माध्यमातूनच होणे शक्य होऊ लागले आहे.

कामात गतिमानता
निवडणूक कार्यक्रमासह निवडणूक शाखेशी संबंधित कामकाजाच्या सूचना बीएलओंपासून तहसीलदारांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून अन्य सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप करण्यात आले आहेत. एकाचवेळी अनेकांपर्यंत माहिती पोहाचविणे शक्य होत असून कामात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठीही त्याची मदत होऊ लागली आहे.

फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि व्हॉट्सअॅप या सर्व सोशल माध्यमांचा उपयोग आम्ही अलिकडेच सुरू केला आहे. नवीन पिढीशी संवाद साधण्याचे हे प्रभावी व्यासपीठ ठरते आहे. फेसबुक पेजवर मतदान प्रक्रियेविषयीच्या लिंक मतदारांना उपलब्ध होत असून त्याद्वारे तरुणाईला माहिती मिळते आहे.
- गणेश राठोड, तहसीलदार, निवडणूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘…तर पुन्हा आंदोलन करणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी संप पुकारला होता. मात्र सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यानुसार २५ जुलैपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही तर २६ जुलैपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी सुकाणू समिती सदस्य तथा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे संघटक कॉ. किशोर ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी रवी देवांग, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. वंजी गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी कॉ. किशोर ढमाले यांनी, शेतकरी सुकाणू समितीची मंत्रिगटासोबत मुंबईत चर्चा झाली. यावेळी कर्जमाफी, दुधाच्या दरासह तूर, ऊस खरेदी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सरकारने विविध मागण्यांसह कर्जमाफीला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. कर्जमाफीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करून अधिवेशनात अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे शासनाने २५ जुलैपर्यंत कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर २६ जुलैला राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी शेतकरी संघटनेतर्फे मंत्रिगटाला निवेदन देण्यात आले. त्यापैकी महत्त्वाच्या मागण्यांवर निर्णय झाला आहे. इतर मागण्यांविषयी सरकारकडून लेखी माहिती दिली जाणार असल्याची माहिती रवी देवांग यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images