Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अतिक्रमण निर्मूलन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी छतावर कोसळलेल्या टॉवरच्या घटनेपासून बोध घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने कोणती कारवाई किंवा नियोजन केले, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास स्थायीच्या सभेत धारेवर धरले.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शहरात सोसाट्याचा वारा सुटल्यास किंवा काही आत्पकालीन प्रसंग उद्भवल्यास नागरिकांना धोका पोहोचू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन विभागाच्या नियोजनावर शहाणे यांनी बोट ठेवले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने शहरातील होर्डिगबाजांची मनमानी प्रकाशझोतात आणली. दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून, अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

शहरात अनेक ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच शेकडो होर्डिंग्ज विनापरवाना लावले जातात, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी मांडली. परवानगी न घेता होर्डिंग लावले जात असल्याने महापालिकेचा मोठा महसूल बुडतो, असाही मुद्दा त्यांनी मांडला.

शहरातील होर्डिंग्जसंदर्भात परवानगीधारकांची माहिती मांडताना ६८८ जणांकडे होर्डिंगसाठी परवानगी असल्याची, तर १५८ जणांकडे परवानगी नसल्याची माहिती उघड झाली. शहरात एकूण ७० ठिकाणी दिशा पब्लिसिटीच्या ताब्यात होर्डिंगची ठिकाणे आहेत. दिशा पब्लिसिटीकडेही कराची सुमारे दीड कोटीची थकबाकी असताना त्यांना याबाबत विचारणा करणारी नोटीसही देण्यात आलेली नाही.

--

१५८ जणांना नोटीस

शहरात मोठ्या प्रमाणावर इमारतींवर होर्डिंग्ज लावलेले आढळून येतात. त्यासाठी इमारतीचे मालक मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. मात्र, महापालिकेला यातील रुपयाही दिला जात नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना आकडेवारीच्या मांडलेल्या तपशीलानुसार शहरात पूर्व भागात ११४, पश्चिम विभागात ३०६, पंचवटी विभागात ७७, नाशिकरोड विभागात ७४, तर सिडको विभागात ५१ ठिकाणी होर्डिंग्ज असून, यातील १५८ होर्डिंगधारकांना कर भरण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नोटीस देण्यात आलेल्या विभागांच्या विभागनिहाय माहितीनुसार पूर्व विभागात ९, पश्चिममध्ये ७०, पंचवटीत २८, नाशिकरोडला १९, सिडकोत १२, तर सातपूरमध्ये २० अशा सुमारे १५८ होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

--

आवाससाठी तांत्रिक सल्लागार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी नवनिर्माण महिला बहुद्देशीय संस्था, अकोला या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नाशिक महापालिकेने नियुक्ती केली आहे.

सोमवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय शहराच्या विविध भागांशी निगडित विषयही यावेळी सभेवर चर्चेसाठी मांडण्यात आले. यामध्ये अतिक्रमणे, सफाई कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या, बेकायदेशीर होर्डिंग्ज, वडाळा गावातील भंगार बाजाराचा प्रश्न आदी मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

आवास योजनेसंदर्भात महापालिका आयुक्तांशी संवाद साधला असता ते म्हणाले, की शहरात झोपडपट्ट्यांचे महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार शहरात सुमारे १४३ झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. यामध्ये एकूण ३६ हजार ४८९ झोपड्यांचा समावेश असून, सुमारे ४४ हजार ७८४ नागरिक यामध्ये निवासाला आहेत. याबाबत अहवाल लवकरच महापालिकेस सादर होणार असून, हा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

पंतप्रधान आवास योजना ही राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्व शहरे व सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये लागू करण्यात येणार आहे. राज्यात ५१ शहरांमध्ये हा निर्णय लागू होईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यात येणाऱ्या शहरांना यातून वगळण्यात आले आहे.

या योजनेकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारची वार्षिक उत्पन्न मर्यादा वार्षिक तीन लाख रुपये आहे. राज्य सरकारची ही मर्यादा अल्प उत्पन्न गट म्हणून १ लाख ८० हजार रुपये होती, तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींसाठी केंद्राची मर्यादा ३ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत आहे. या गटासाठी राज्य सरकारची मर्यादा १ लाख ८० हजार ते ४ लाख ८० हजार आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे या योजनेसाठी या उत्पन्न मर्यादा राज्याने सुधारून घेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला होता. नियोजित निकषांनुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक बेट दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

$
0
0

बिटको चौक, दत्तमंदिर चौकात होतेय कोंडी; नागरिक वैतागले

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील फेम सिनेमागृह चौकातील वाहतूक बेटाला काही दिवसांपूर्वी कंटेनर धडकला होता. त्याला तीन महिने झाले आहेत. तरीही वाहतूक बेटाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी असलेल्या बिटको चौक, दत्त मंदिर चौकातील वाहतूक बेटांचीही दुरवस्था झाली आहे. त्यांनाही अवकळा असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हायमास्ट लावून याठिकाणी होणारी वाहतूक कोंडीवरही तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पुणे महामार्ग हा वर्दळीचा रस्ता आहे. व्दारकापासून सिन्नरफाट्यापर्यंत वाहतुकीची कोंडी होत असते. बोधलेनगर जवळील फेम चौकात वाहतूक बेट आहे. तेथून समर्थ रामदासांच्या टाकळीकडे रस्ता जातो. त्यामुळे या बेटात समर्थांचा सुविचार व स्तंभ आहे. त्याभोवती लोखंडी कठडे करण्यात आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी ट्रक आणि कंटेनर यांचा विचित्र अपघात झाला. ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर वाहतूक बेटावर धडकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहतूक बेटाचे मोठे नुकसान झाले. कठडे तुटल्याने बेटाचे सौंदर्य गेले असून, या मार्गावरून परराज्यातील व जिल्ह्यातील भाविक, पर्यटक प्रवास करत असतात. चौकात सिग्नल असल्यावर त्यांची वाहने थांबतात तेव्हा तुटलेल्या वाहतूक बेटाचे दर्शन होते. त्यामुळे या बेटाची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

सुशोभीकरण गरजेचे

द्वारका ते नाशिकरोड दरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक बेटे आहेत. त्यांची दुरवस्था असून, काही बेटांमध्ये काटेरी झाडे वाढली आहेत. दत्त मंदिर चौकातील बेटात तर झाडांना पाणीच नाही. येथे नवीन झाडे लावण्याची गरज आहे. उपनगरच्या चौकातील बेटाचेही सुशोभीकरण गरजेचे असून, बिटको चौकातील बेटांचे सुशोभीकरण करून सौंदर्य खुलविण्यात आले आहे. तसेच अन्य बेटांचे करावे, अशीही मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात मान्सून ‘वर्षा’व

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर नाशकात दाखल झाला आहे. शहर परिसरात सोमवारी दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत. मात्र, विजेचा लपंडाव आणि ठिकठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला.

रविवारी सायंकाळपासूनच शहरात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरात पाऊस सुरू होता. रविवारी रात्रीच्या सुमारास शहर परिसरात ३९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र, लख्ख ऊन पडल्याने पावसाच्या आशा धूसर झाल्या. दुपारच्या सुमारास पुन्हा काळ्या मेघांनी गर्दी केली. त्यामुळे पावसाच्या आशा पल्लवित झाल्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरींचे आगमन झाले. उपनगरांमध्ये या पावसामुळे काहीशी धांदल उडाली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली. सायंकाळनंतर शहरात पावसाचा जोर वाढला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने काही क्षणातच शहरातील रस्ते सामसूम झाले. सायंकाळी घरी परतणाऱ्या नोकरदारांचे पावसाने हाल झाले. दरम्यान, येत्या गुरुवारी शाळा सुरू होणार असल्याने शहरातील शालेय बाजारपेठ ग्राहकांनी गजबजून गेली होती. पावसाच्या आगमनामुळे या ग्राहकांचीही मोठी धांदल उडाली. परिणामी काही वेळातच बाजारपेठेत शांतता निर्माण झाली.

--

दोघांचा मृत्यू

सिडकोतील हनुमान चौकात राहणाऱ्या अनिल भुजबळ यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तर नाशिकरोड भागात इलेक्ट्रिक पोलला हात लागल्याने शरद बाबू या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

--

रस्त्यांवर पाणी साचले

शहरातील अनेक चौकांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सातपूर विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी त्र्यंबकरोडवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जुने आणि नवीन सिडको परिसरात काही घरांमध्ये पावसाचे पाणी गेले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जुने नाशिकमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ऐन रमजान काळात मुस्लिम बांधवांची त्रेधातिरपीट उडाली.

--

विजेचा लपंडाव

पावसाचे आगमन होताच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रविवारी रात्री वीजपुरवठा ठप्प झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. सायंका‍ळी सगळीकडे अंधार असताना वीज उपलब्ध न झाल्याने शहरवासीयांना मेणबत्तीसह अन्य पर्यायांवर वेळ निभावून न्यावी लागली. सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील नागरिक विजेच्या सततच्या लपंडावाने कमालीचे त्रस्त झाले आहेत.

--

अनेक घरांचे नुकसान

शहराच्या सहा विभागांत महापालिकेला एकूण ३९७ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. या सर्व इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पण, केवळ नोटिसा देऊन पुढे काहीही झालेले नाही. अनेक घरे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही घरांमध्ये कुटुंबे राहत असल्याने तेथे मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शहरात जोरदार पाऊस झाल्याने सिडको, सातपूर, जुने नाशिकसह काही झोपडपट्टीच्या भागात घरांचे नुकसान झाले.

--

जिल्ह्यातही जोरदार हजेरी

जिल्ह्यात कळवण, नांदगाव, सटाणा, चांदवड आणि त्र्यंबकेश्वरसह विविध भागात पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. कळवण तालुक्यात सप्तश्रृंगीगडावर भगवती मंदिर परिसरात पावसाच्या आगमनापूर्वी लहान-मोठे दगड कोसळले. संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही. मनमाड व चांदवड शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस शेतीसाठी चांगला असल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रविवारी दिवसभरात ६० मिलिमीटर पाऊस झाला.

--

विद्युत विभागातर्फे दक्षतेचे आवाहन

पावसाळ्यामध्ये शहरातील विविध ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवून नागरिकांच्या जिवास धोका होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे. गेल्या काही वर्षांतील या प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण पाहता नागरकांनी अगोदरच सतर्क राहून संभाव्य आपत्ती टाळावी, यासाठी विद्युत विभागाने काही सूचनाही नागरिकांना दिल्या आहेत. पथदीपांच्या खांबांना पाळीव प्राणी बांधू नयेत, कपडे वाळत घालण्यासारख्या कारणांसाठी दोऱ्या बांधू नयेत, या पथदीपांजवळ साहित्य साठवून ठेवू नये, खांबांभोवतीचे पत्रे त्वरित हटवावेत, त्यावरील जाहिरातींचे बॅनर्स हटवावेत आदी प्रकारची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या चुकांमुळे अपघात घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराही विद्युत विभागाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज मिळणे अवघड

$
0
0

नाशिक जिल्हा बँकेकडे पैशांची चणचण

नाशिक : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईत सरसकट कर्जमाफी व सोमवारपासूनच तातडीने नवीन पीककर्ज देण्याची घोषणा केली असली तरी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून नवीन कर्ज मिळणे अवघड आहे. सरकारने माफ केलेल्या कर्जाचे पैसे किंवा नाबार्डने दोन हजार कोटींचे फेरकर्ज दिल्यानंतरच बँकेकडे पैसे उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर बँकेला पीककर्ज देता येणे शक्य होईल. रविवारी सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा झाली. या सरसकट कर्जमाफीत जर अल्प, मध्यम, बहूभूधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले तर जिल्हा बँकेच्या ३ लाख ६० शेतकरी सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत २०० कोटी रुपये कर्ज वसूल झाले आहेत. त्यामुळे नवीन पीककर्ज देणे बँकेला सरकारच्या मदतीशिवाय शक्य नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फायदा होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

जिल्हा बँक थकबाकी - २४०८ कोटी, विविध कार्यकारी सोसायटी - २०० कोटी, एकूण शेतकरी सभासद - ३ लाख ८८ हजार, कर्जफेड केलेल सभासद - २५ हजार, कर्ज न घेतलेले सभासद - ९१ हजार, २०१६-१७ मध्ये वाटप केलेले पीककर्ज - १७१९ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा मार्केट पुन्हा गजबजले

$
0
0

टीम मटा

शेतकरी संपामुळे गेल्या अकरा दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारी सुरू झाल्या. आवक वाढूनही कांद्याच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. कांद्यासह इतर शेतमालाचेही जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले.

निफाड ः लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून ठप्प असलेली बाजार समिती परिसर व लासलगाव व्यापार पेठ गजबजली होती. पहिल्याच दिवशी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक आली होती. विशेष म्हणजे संप कालावधीनंतर सोमवारी झालेल्या लिलावात कांदाभाव १०० रुपयांनी वधारले होते.

शेतकरी संपाच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्यामुळे हा फटका बाजार समितीसह स्थानिक दुकानदारांनाही बसला. बाजार समित्यामध्ये होणारी रोजची कोट्यावधींची उलाढाल थांबलेली असल्याने संपकाळाच्या दहा दिवसात दीडशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. आता बाजार समित्या सुरू असल्याने बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरीवर्गावर अवलंबून असलेले इतर व्यावसायिकही आनंदात आहेत.

या संप काळात कांदा निर्यातही थांबलेली असल्याने आता बाजारात कांद्याची एकच गर्दी होऊन कांदा दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कांद्याला अनुदान तसेच हमीभाव देण्याची मागणी शेतकरीवर्ग करत आहे. सोमवारी ७०० वाहने भरून कांदा लासलगाव बाजार समिती आवारात दाखल झाला होता. अधूनमधून पाऊस सुरू असल्याने कांदा लिलावात खंड पडत होता. त्यामुळे लिलावालाही उशीर होत होता. कमीत कमी अडीचशे आणि जास्तीत जास्त ६८७ तर सरासरी ५७० रुपये दर कांदा लिलावात निघाले होते. मात्र मे महिन्याच्या तुलनेत १०० रुपये कांदा वधारला होता. कांद्याची आवक वाढली तर दर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सटाण्यात कांद्याचे नुकसान

सटाणा : गेल्या अकरा दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. पावसामुळे कांदा ओला झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजार समिती आवारात तब्बल ७०० हून अधिक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे दर ३०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल इतके होते.

देवळा, उमराणाही लिलाव सुरळीत

कळवण ः देवळा व उमराणा बाजार समितीतील कांद्याचे लिलाव सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. देवळा बाजार समितीत २०० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली होती. उमराणा बाजार समितीत ४२५ ट्रॅक्टर कांद्यांची आवक झाली. देवळा बाजार समितीत सामेवारी २०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. कांद्याला ३०० ते ६५० प्रमाणे व सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती देवळा बाजार समितीचे सचिव दौलतराव शिंदे यांनी दिली. उमराणा बाजार समितीत ४२५ ट्रॅक्टर कांद्यांची आवक होती. तेथे कांद्याला ४०० ते ७०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सचिव नितीन जाधव यांनी दिली.

पिंपळगावात १४ हजार क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत ः शेतकरी संपामुळे तब्बल सलग अकरा दिवस बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. सोमवारी येथील बाजार आवारावर ३७५ ट्रॅक्टर व १६६ जीपमधून १४ हजार ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारभाव किमान ३००, कमाल ७११ तर सरासरी ६११ रुपये क्विंटल इतका होता.

दरम्यान गत अकरा दिवसांपासून कांद्यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्यामुळे येथील बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकरी संप मागे घेतल्यामुळे पिंपळगाव बाजार आवारावर पुन्हा एकदा कांद्याचा आवाज दणाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डागडुजीच्या प्रतीक्षेत ‘मेनरोड’

$
0
0

दीपक महाजन, कळवण

शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून परिचित असलेला ‘मेनरोड’ अनेक समस्यांना तोंड देत आहे. लाखोंच्या खर्चाची झळ सोसूनही बारमाही तुंबलेल्या गटारी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, सर्वत्र साचलेली धूळ आणि कचऱ्यामुळे मेनरोडची अक्षरशः ‘वाट’ लागली आहे.

स्थानिक आमदारांनी मेनरोडसाठी सुमारे दीड कोटीच्या कामाचे थाटात उद‌्घाटन केले. मात्र नगरपंचायत व स्थानिक आमदारांच्या समन्वयाअभावी या रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याचे बोलले जात आहे. जर रस्त्याच्या कामाला प्रारंभच करायचा नव्हता तर उद‌्घाटन का केले, असा सवाल आता कळवणकर विचारत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागकडून केवळ टेंडर प्रक्रियातच अडकलेले असेल तर ह्या समस्येतून सुटका कधी होणार, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

शहरातील पोल‌िसही मेनरोडवरील रहदारीच्या समस्येकडे लक्ष देत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला राजरोसपणे वाहने उभी केली जातात. अवैध व वैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा कोणताही अंकुश नाही. गणेशनगर भागात स्टेट बँकेजवळ वाहतूक कोंडी होते. कालीपिली व ट्रॅक्टर चालकांची अरेरावी नित्याची बनली आहे. दुभाजक असूनही वाहनधारकांना शिस्त नाही. रस्त्यावरील फेरीवाले, फळविक्रेत्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोठी वाहने यांच्या येण्याजाण्याची गैरसोय होत असते. पर्यायाने धूळ वाढते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडथळे अशा अप्रिय व आरोग्यास घातक घटनांचा सामना करावा लागत आहे. मेनरोडच्या दुरुस्तीचे अथवा रस्त्याचे सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामाला गती मिळणार तरी कधी? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धुळीचा प्रश्न बिकट

शहराचा मुख्य आत्मा असलेल्या मेनरोडची अवस्था बिकट झाली आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने धूळ मोठ्या प्रमाणात उडते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिकांनाही या धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

गटारींमुळे दुर्गंधी

रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या गटारींची अवस्था अत्यंत भयावह आहे. बारामहिने या गटारी तुंबलेल्याच असतात. असे असूनही बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. पाणी तुंबलेले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर अधूनमधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र मेनरोडला समस्यांपासून मुक्त करण्यासाठी कोणताही विभाग धजावत नाही.

कळवण-वणी रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. डागडुजी आणि इतर कामांना लवकरच सुरुवात होईल.

- ए. व्ही. भोसले, अभियंता,

सा. बां. विभाग, कळवण

कळवण मेनरोडवरील धुळीमुळे रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. धुळीमुळे व्यावसायिकांना दिवसभरात दहा वेळा दुकान स्वच्छ करावे लागते. हॉटेल व्यावसायिक जास्त त्रस्त आहेत.

- चेतन शिंदे, व्यावसायिक, कळवण

कळवणच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत असतो. मात्र बहुतांशी निधी प्रस्तावित कामांवर खर्च होत नाही. याबाबतीत लोकप्रतिनिधींना दोष द्यायचा की अधिकारी वर्गाला, हा प्रश्न आहे.

- प्रवीण रौंदळ,

रा. यु. कॉ. तालुकाध्यक्ष, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0

टीम मटा

कर्जमाफीच्या वृत्ताने आनंदित झालेला बळीराजा सोमवारी पावसाच्या आगमनानेही सुखावला आहे. निफाडसह, सटाणा, मनमाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

निफाड ः तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने कहर केला. भरवस फाटा, वाहेगाव, विंचूर व परिसरातील गावांना मुसळधार पावसाने झोडपल्याने शेतामध्ये तळे साचले होते. तर रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. गेल्या तीन दिवसांपासून निफाड तालुक्यात ढगाळ वातावरण तसेच प्रचंड उष्मा जाणवत होता. मात्र पाहिजे तसा पाऊस झालेला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान भरवस फाटा, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा या गावांना मुसळधार पावसाने झोडपण्यास प्रारंभ केला. जवळजवळ दोन तास पाऊस सुरू होता.

पश्चिम भागात दावचवाडी, लोणवाडी, रौळस, पिंपरी या गावांसह तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी व परिसरातील गावांनाही पावसाने झोडपले. पिंपरी ते कोठुरे रस्त्यावर झाड कोसळल्याने हा रस्ता बंद पडला होता. या पावसाने भरवस फाट्याजवळ शेतात पाऊस पाणी वाहत होते. लासलगाव, पिंपळगावमध्येही सायंकाळी पाऊस झाला.

सटाण्यातही दमदार

शहरासह परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मूसळधार पावसाने आगमन झालेे. सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर संपूर्ण शहरासह परिसरात ढगाळ वातावरण तयार होवून अडीच ते तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अर्धा तास पाऊस सुरू होता.

मनमाड, चांदवडमध्ये हजेरी

मनमाड : मनमाड व चांदवड शहरात सोमवारी दुपारनंतर वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपारी साडेचार पाच दरम्यान वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारक व पादचारी यांची मोठी गैरसोय झाली. चांदवड शहर व परिसरात सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. यावेळी जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अर्धा तास चांगला पाऊस झाला त्यामुळे हवेतील उकाडा कमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौस्तुभ, निकाल तरी पहायचा होतास...!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिक्षण हेच सर्वकाही आहे, असे समजून त्याचं नको इतकं ओझं मुलं मनावर वागवतात. काही कमकुवत मुलांना कधी कधी हे ओझं इतकं असह्य होतं की, ते परिस्थितीचा सामना करण्यास घाबरतात. अशातूनच अगदी टोकाचे निर्णय घेतले जातात. अशीच कथा कौस्तुभ मुंगेकर या विद्यार्थ्याची. व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या निकालाच्या अफवेचे ओझे मनावर बाळगत, आपण नापास होऊ की काय या भीतीने त्याने निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कौस्तुभ ६९ टक्के इतक्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. थोडा धीर धरून कौस्तुभने आजचा निकाल पाहिला असता तर...अशी हळहळ त्याच्या मित्रांसह नातेवाईकही व्यक्त करीत आहेत.

मागील आठवड्यापासून सोशल मीड‌ियावर दहावीच्या निकालाची बातमी फिरत होती. याच बातमीचा धसका कौस्तुभने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कौस्तुभला तब्बल ६९ टक्‍के गुण मिळाल्याचे उघड झाले. निकालापूर्वीच आत्महत्या केल्याने व चांगला निकाल लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्‍त होत आहे. केवळ निकालाच्या बातमीच्या भितीने हा प्रकार घडल्याने सोशल मीड‌ियावरील चुकीच्या वृत्ताने एकाचा जीव गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पाटीलनगर येथे राहणाऱ्या कौस्तुभ मुंगेकरला सोमवारी दहावीचा निकाल लागणार, असे सोशल मीड‌ियावरुन समजले होते. त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत कौस्तुभ व त्याचे पालक गप्पा मारीत बसले होते. आईवडील झोपी गेल्याचे लक्षात आल्यानंतर कौस्तुभ याने निकालाची धास्ती घेवून आत्महत्या केली. मात्र, सोमवारी निकाल लागलाच नाही. कौस्तुभने मात्र निकालाच्या भीतीने स्वतःचे जीवन संपवले. मंगळवारी त्यास ६९ टक्के मार्क मिळाल्याचे समजले. हा निकाल त्याच्या घरच्यांना सुखावणारा होता. हे यश बघण्यास कौस्तुभ स्वतःच या जगात नाही. निकालाचे वृत्त समजताच त्याचे नातेवाईक, शाळेतील मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दहावी- बारावीसारख्या शैक्षणिक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांवर पालकांनी दडपण टाकू नये. जीवनात अभ्यासाबरोबर अपयश आणि आव्हाने पचविण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. सकारात्मकतेने पाहण्याची सवय पालकांनी विद्यार्थ्यांना लावली पाहिजे.
- राज सिन्नरकर, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृगाच्या हजेरीने बळीराजाला दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मृग नक्षत्राला सुरुवात होवून चारपाच दिवस उलटले तरीही तालुक्याला हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने मंगळवारी मध्यरात्री दमदार हजेरी लावत तालुकावासियांच्या झोळीत पावसाचे दान टाकले. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपाचा श्रीगणेशा करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाळ्यात बळीराजाचे लक्ष असते ते मृग नक्षत्राकडे. यंदा गेल्या ८ तारखेला ‘मेंढा’ वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते झालेल्या या मृगाने पाच दिवस उलटूनही कृपादृष्टी न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. आकाशात मळभ दाटून येते न येते तोच वाहता उनाड वारा आलेल्या काळ्याभोर मेघांना हुसकावून लावत होतो. मात्र पाच दिवसांच्या या खेळानंतर सोमवारी सायंकाळी तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्री बारानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. जोरदार सरींनिशी कुठे एक तास तर कुठे दीड तास हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे.

सोमवाररात्रीपासून मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत येवला तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या येवला मंडळात ८ मिलीमीटर, अंदरसूल २५.२, नगरसूल २१, सावरगाव १०, पाटोदा १९, तर जळगाव नेऊर मंडळात १६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस तालुक्यातील उत्तरपूर्व पट्ट्याला दिलासा देणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी अनोखी युती

$
0
0

मालेगावात काँग्रेस-शिवसेना एकत्र; आज निवड

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक आज, बुधवारी (दि. १४ ) होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेना अशी अनोखी युती झाल्याने महापौरपदासाठी भिवंडी पॅटर्नची पुनरावृत्ती होते का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एमआयएमची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

मनपा सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे माजी आमदार शेख रशीद, मालेगाव महागठबंधन आघाडीचे नबी अहमदुल्ला, बुलंद इक्बाल यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड तर मालेगाव महागठबंधन आघाडीचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल केले आहेत.

निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जवळपास समसमान बलाबल असल्याने १३ जागी विजयी झालेल्या शिवसेना तसेच एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांशी दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू होती.
एमआयएमची भूमिका निर्णायक

सत्तास्थापनेसाठी ४३ इतके संख्याबळ गरजेचे आहे. काँग्रेस व शिवसेना यांच्यात युती होऊन देखील दोन नगरसेवकांची गरज असल्याने नऊ जागी विजयी झालेल्या एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास काँग्रेस व सेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे एमआयएम नेत्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस-शिवसेनेने प्रयत्न सुरू आहेत. एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज हे सभागृहात काय भूमिका घेतात यावर काँग्रेस व शिवसेनेच्या सत्तास्थापनेचे गणित ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरडीने जीव टांगणीला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटघर किल्ला वस्तीवर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने लोकवस्तीचे स्थलांतर करून पुनर्वसन करण्याचे आव्हान शासनापुढे उभे राहिले आहे. गत आठवड्यात विनायक खिंड या वस्तीतील तरुणाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनला जाग आली आहे.

सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण घटना घडल्यानंतर शासन यंत्रणांनी डोंगराच्या कुशीत असलेल्या वस्त्यांचे मान्सूनपूर्व काळात सर्वेक्षण सुरू केले. धोकादायक स्थितीत असलेल्या वस्ती सुरक्ष‌ित जागी स्थालंतरीत करण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि विनायक खिंड येथील दुर्घटना घडली तोपर्यंत प्रशासनाला या संभाव्य आपत्तीबाबत पुरेशी कल्पना नव्हती. ४ जून २०१७ रोजी विनायक खिंड येथे दरड कोसळल्याने एका युवकाचा त्यात बळी गेला. त्यानंतर ग्रामपंचायतीने हालचाली सुरू केल्या. तहसीलदारांनीही येथे भेट देऊन पुनर्वसनाबाबत अश्वासन दिले.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुपलीची मेट, गंगाद्वार, जावाची वाडी, विनायक खिंड, पठारवाडी व महादरवाजा मेट या वस्त्या आहेत. हे सर्व पाडे मिळून ३२५ मिळकतदार आहेत. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने याबाबत विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मेटघर किल्ला ग्रामपंचायत लोकवस्तीचे विस्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र मान्सून तोंडावर असल्यामुळे जवळपास दोन हजार लोकवस्तीचे विस्थापन करणे अवघड आहे.

जागेचा प्रश्न

पावसाळ्यात दरडींचा धोका पत्करत शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधव येथे तग धरून आहेत. येथे नागली, वरईची शेती केली जाते. बहुतेकांकडे पशुधन आहे. काही ग्रामस्थ भाविक पर्यटकांना चहापान, प्रसाद आदी सेवा पुरवितात. या सर्वांच्या उपजीविकेचे काय? अशा अडचणी निर्माण होणार आहेत. विस्थापनासाठी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

प्रशासनाचा ढिसाळपणा उघड

वास्तव‌िक ४ जूनची दुर्घटना घडण्यापूर्वी १ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैकठीस बहुतांश अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. तेव्हाच हा विषय चर्चेला आला असता, तर अधिक सोयीचे झाले असते. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अशा प्रकारे दरड कोसळणे, डोंगररांगा ढासळणे, जमीन खचणे, पूर परिस्थिती निर्माण होणे आदींबाबत रहिवाशांनी काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभूतांची कामे गोठवणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही, महासभेत नगरसेवकांचा निधी ७५ लाख रुपये करण्याची घोषणा करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी आता घोषणेच्या पूर्ततेसाठी जुन्या नगरसेवकांच्या निधीवर गंडांतर आणण्याची तयारी सुरू केली आहे. नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या ७५ लाखांच्या निधीचा ताळमेळ जमवण्यासाठी पराभूत झालेल्या सर्व नगरसेवकांची कामे ब्रेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गत नगरसेवकांच्या शिलकी रकमेतून विद्यमान नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी देता येईल, असा दावा महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. त्यामुळे जवळपास ४९ पराभूत नगरसेवकांना त्याचा फटका बसणार आहे. या निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अजूनही करवाढीचा विचार असून, त्यासाठी नगरसेवकांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.

महापौर भानसी यांनी गेल्या महासभेत नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी मंजूर केला आहे. स्थायी समितीने ४० लाखांची शिफारस केली होती. त्यात महापौरांनी ३५ लाखांनी वाढ केली होती. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना नगरसेवकांना एवढा निधी दिल्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होते. एकीकडे करवाढ नाकारली असताना नगरसेवकांना निधी कसा द्यायचा, या पेचात प्रशासन पडले होते. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकच्या पदरात सरकारकडून निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे नगरसेवकांना ७५ लाख निधीचा जुगाड कसा लावायचा, यावरून सत्ताधारी पेचात आहे. १२२ नगरसेवकांना तब्बल ९३ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, तर दुसरीकडे भांडवली कामांसाठी केवळ १३० कोटींचा निधी शिल्लक आहे. यात नगरसेवकांना निधी देताना तारेवरची कसरत होणार आहे.

महापौर रंजना भानसी यांनी यातून मधला मार्ग काढला आहे. मनसेच्या सत्ताकाळात प्रतिनगरसेवकाला ६० लाखांचा निधी दिला होता. शेवटच्या सत्रात हा निधी मिळाल्यानंतर कामांसाठी नगरसेवकांनी घाई केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून हा निधीच गोठवला होता. त्यामुळे जवळपास निम्म्या नगरसेवकांचा हा निधी निवडणुकीमुळे अडकला होता. निवडणुका झाल्यानंतर ही कामे मार्गी लावण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले होते. आता महापौरांनी केवळ विद्यमान नगरसेवकांच्याच कामांना प्राधान्य देत, माजी नगरसेवकांच्या कामांच्या फाइल्सना ब्रेक लावला आहे. जवळपास ४२ नगरसेवक पराभूत झाले आहेत, तर २२ नगरसेवकांनी निवडणूकच लढवली नाही. त्यामुळे या लोकांची पाइपलाइनमध्ये असलेली २५ कोटींची कामे थांबवून हा निधी विद्यमान नगरसेवकांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळेल, असा दावा केला जात आहे.

जुना-नवा वाद

दरम्यान, महापौरांच्या या निर्णयावरून जुन्या आणि नवीन नगरसेवकांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एखाद्या माजी नगरसेवकाची फाइल मंजुरीच्या अंतिम टप्यात असेल आणि त्याच प्रभागातील नवीन नगरसेवकाने पुन्हा तीच फाइल टाकल्यास त्यावरून वाद निर्माण होणार आहे. पराभूत नगरसेवकांची कामे गोठवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यावरून भाजपविरोधात पुन्हा वातावरण तापवले जाण्याची शक्यता असून, या निर्णयाला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

करवाढीचे पुन्हा संकेत

दरम्यान, महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने करवाढ करणे गरजेचे असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी करवाढीला विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळला जाईल अशी चर्चा होती. मात्र, महापौरांनी पुन्हा करवाढीचे संकेत दिले आहेत. नगरसेवक व गटनेत्यांशी चर्चा करून करवाढीचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे करवाढीची टांगती तलवार नाशिककरांवर कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंबाने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांना रोजच्या धावपळीत आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. व्यायामालाही वेळ देता येत नाही. वेळ मिळाला तरीही व्यायाम करणे कंटाळवाणे होते. या सर्वांवर उपाय म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केवळ महिलांसाठी मंगळवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहाव्या वर्धापन दिनाननिमित्त झुम्बा वर्कशॉपचे आयोजन केले होते.

वर्कशॉपमध्ये नामवंत तज्ज्ञ प्रतीक हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. हिंगमिरे सर्टिफाइड तज्ज्ञ आहेत. या वर्कशॉपसाठी अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था (ए. पी. कॅटरर्स) हे व्हेन्यू पार्टनर होते. अनेक महिलांना वाटते, आपण बारीक असावे, सुडौल बांधा असावा. अशा महिलांसाठी या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, ज्या महिलांना आपण अत्यंत बारीक आहोत, आपला प्रभाव पडत नाही असे वाटते, अशा महिलांसाठीदेखील या वर्कशॉपमध्ये टिप्स देण्यात आल्या. केवळ बारीक होणे आणि जाड होणे म्हणजे शरीर सुदृढ करणे असे होत नाही. व्यायामाचा कंटाळा येणार नाही, अशा पद्धतीने विविध गाण्यांच्या चालींवर कसा व्यायाम करायचा, अवयवांची हालचाल किती करायची, किती वेळ करायची, पोट कमी करण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, त्याचप्रमाणे आहार, विहार, विचार कसे असावेत हेदेखील या वर्कशॉपमधून नागरिकांना सांगण्यात आले. झुंबाच्या प्रात्यक्षिकाबरोबरच त्यांनी आहाराच्यादेखील टिप्स दिल्या.

ते म्हणाले, की रोज सकाळी उठल्याबरोबर लिंबू-पाणी पिणे आवश्यक आहे. त्यात काय गोष्टी असाव्यात हेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात काय असावे, दोन जेवणामधील अंतर किती असावे, रात्रीचे जेवण किती घ्यावे, कोणत्या वेळेला घ्यावे, त्यात कसला समावेश असला पाहिजे, याबद्दल त्यांनी माहिती दिली. या वेळी त्यांनी झुंबा म्हणजे काय, याविषयीही माहिती दिली. ते म्हणाले, की झुंबा म्हणजे म्युझिकल एक्सरसाइझ. पाश्चात्त्य देशात या प्रकाराला खूप महत्त्व असून, भारतातही या प्रकाराने चांगला जम धरला आहे. या प्रकाराने शरीराच्या केसापासून नखापर्यंत सर्वच अवयवांचा व्यायाम होत असल्याचे सांगितले. हिंगमिरे यांना मनीषा हिंगमिरे व मानसी महाजन यांनी साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के, तर जिल्ह्याचा निकाल ८७.७६ टक्के लागला आहे. राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिक सहाव्या स्थानावर असून, शहरातून रचना विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता पाटील ‌हिने ९९.८० टक्के गुण मिळविले आहेत. ऑनलाइन पध्दतीने जाहीर झालेल्या या निकालाच्या गुणपत्रिका आगामी आठ दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात येतील. याबाबतची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून ९१ हजार १७९ विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ७१० विद्यार्थ्यांनी यश मिळविले. धुळे जिल्ह्यातून २८ हजार ७३२ पैकी २५ हजार ७९९ जणांनी यश ‌मिळविले. जळगावमधून ६१ हजार ८२५ पैकी ५४ हजार २६७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नंदुरबारमधून २० हजार ७४२ पैकी १७ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी यश ‌मिळविले. नाशिक विभागात एकूण २ लाख २ हजार ४७८ पैकी १ लाख ७७ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

विभागात धुळे अव्वल

धुळे : ८९.७९ टक्के, जळगाव : ८७.७८ टक्के, नाशिक : ८७.४२ टक्के, नंदुरबार : ८६.३८ टक्के

नाशिक विभागाच्या निकालात यंदा दोन टक्क्यांची घट दिसून येत असली तरीही या विभागात मुली मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे.

- राजेंद्र गोधने, विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्क्यांना नव्हे, जिद्दीला सलाम!

$
0
0

नाशिक: समोर आलेल्या नकारत्मक परिस्थितीला कवटाळायचे की त्यास लाथ मारून चांगले शोधायचे, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृहातील पाच अनाथ मुलींचे आयुष्य हाच धडा देणारे. यशाचे मोजमाप कागदावरील आकडे नाही तर आपली जिद्द करणार आहे, याची जाणीव त्यांना नक्कीच आहे.

इयत्ता १० वी किंवा १२ वीचा अभ्यास म्हटले की पालकांच्या पोटात गोळा येतो. पाल्यासाठी काय करू अन काय नाही, या मानसिकतेपर्यंत पालक पोहचतात. पालकांकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत मुले आपल्या भविष्याच्या पुस्तकावर धडा गिरवण्याचा प्रयत्न करतात. पण, घरच्यांची अशी साथच नसेल तर! क्षणभर विचार केला तरी समोर अंधार दिसतो. नुकतेच १२वीचे निकाल घोष‌ित झाले. त्यात उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृहातील मुलींनी प्रयत्नाअंती चांगले यश मिळवले. कोणाला पोलिस खात्यात जायचे, तर कोणाला वकील व्हायचे. मात्र, १८ वर्षांच्या मुला-मुलींना कायद्यानुसार निरीक्षण गृह सोडावे लागतेच!

जन्म देऊन सतत जगण्याची परीक्षा घेणारी नियती कमी म्हणून की काय असे माणूसकीशून्य कायदेही या मुलांसाठी अडचणी निर्माण करतात. या मुलींच्या यशोगाथेबाबत बोलताना बालनिरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले की, यंदा पूनम गरूड (६९ टक्के), पूजा जाधव (६६ टक्के), माधुरी व्यवहारे (६२. ३० टक्के), रुपाली जाधव (६१.६८ टक्के) आणि योगेश्वरी देशपांडे (५६ टक्के) या मुली उत्तीर्ण झाल्यात. यातील प्रत्येक मुलीचे एक स्वप्न आहे. मात्र, कायदेशीर बाबींमुळे या मुलींची रवानगी अनुरक्षण गृहात करण्यात आली आहे. येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते. मात्र, मनाप्रमाणे शिक्षणाची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाच ते सहा दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले. पूनमला पोलिस व्हायचे आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच तिने प्रॅक्ट‌िस सुरू केली. तिच्या मदतीला एक ट्रेनरदेखील धावून आल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. योगेश्वरीला एका ब्युटी पार्लर कोर्ससाठी पाठवले असून, इतर मुलींना त्यांच्या आवडीनुसार करियर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कोणतेही क्लास नाही. पालकांची मायेची ऊब नाही. मात्र, या मुलांची जिद्द प्रचंड असून, त्यांच्या यशासाठी टक्क्यांची स्पर्धा कधी आडवी येण्याची शक्यता देखील नाही.

यातील काही मुली ११ वर्षांपासून निरीक्षण गृहात राहतात. अनाथ या शब्दाची जाणीव अनाथ झाल्याशिवाय येत नाही. ही मुले विपरीत परिस्थिती सतत नशिब लिहीण्याचा प्रयत्न करतात. येथे शिकलेल्यांपैकी काही पोलिस झाले, तर काही अधिकारी. या मुलीही जिद्दीने आपले नशीब नक्कीच घडवतील.

- चंदूलाल शहा, मानद सचिव, निरीक्षण गृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरी सेवा केंद्रांना प्रतिसाद वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू केलेल्या नागरी सेवा केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने या केंद्रांवरील गर्दी आता वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिकेने सहा विभागांत सुरू केलेल्या २२ नागरी सुविधा केंद्रांचा लाभ ६७ हजार ५०१ नागरिकांनी घेतला आहे. यात ४८ हजार ६२८ नागरिकांनी या केंद्रांमधून मालमत्ता कराचा भरणा केला आहे. त्यापाठोपाठ ९ हजार ५३५ नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा केला आहे. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांना चांगले दिन आले आहेत.

महापालिकेतील ४५ सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी शहरात जवळपास २२ नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली होती. यात मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरण्यासह झोन बदल, जन्म व मृत्यू दाखला, बांधकाम परवानग्या, पूर्णत्वाचा दाखला, नळजोडणी, मालमत्ता हस्तांतरण, जाहिरात परवानग्यांचा समावेश होता. येस बँकेने ही नागरी सुविधा केंद्रे चालविण्यासाठी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. या केंद्रांमध्ये येस बॅँकेमार्फत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता बॅँकेमार्फत डेबिट व क्रेडिट कार्डाद्वारे नागरिकांना कर भरणा करण्यासाठी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशीन उपलब्ध करून दिले आहे. राजीव गांधी भवनसह सहा विभागांत ही केंद्रे ५ एप्रिल रोजी सुरू झाली होती. पहिल्या महिन्यात या केंद्रांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता या केंद्रांना प्रतिसाद वाढला आहे. सहा महीने एस बँकेच्या वतीने ही केंद्रे चालविली जाणार आहेत.

लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या

मालमत्ताकर भरणा ः ४८,५०१, पाणीपट्टी कर भरणा ः ९,५३५, अग्निशमन विभाग ः ९१, बांधकाम परवाना ः ७७०, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ः ८४९, नळजोडणी ः ४६०, मालमत्ता कर उतारा ः ३६८, मालमत्ता हस्तांतरण ः ६०३, मृत्यू दाखला ः १३९९, सुधारित बांधकाम परवानग्या ः १२४, डॉग लायसन्स ः ७१, विवाह नोंदणी ः २८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना लिपिकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध कर विभागाने लावलेला जाहिरात कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पूर्व विभागातील वरिष्ठ लिपिकास अॅन्‍टी करप्शन ब्युरोने पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) संध्याकाळी मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयाच्या दक्षिण बाजूच्या दरवाजाजवळील बोळीतील झेरॉक्स दुकानासमोर करण्यात आली.

रमाकांत प्रभार क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एसीबीकडे तक्रारदाराने शहरात सुयश क्लासेस नावाचे बॅनर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर विविध कर विभागातील वरिष्ठ लिपिक क्षीरसागरने तक्रारदारास जाहिरात करापोटी ११ हजार ५०० रुपये भरण्याबाबत नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर तक्रारदाराने पूर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष क्षीरसागरची भेट घेतली. मात्र, कर कमी करण्यासाठी क्षीरसागरने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने पडताळणी केली असता क्षीरसागरने पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने लागलीच मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयाजवळच्या झेरॉक्स दुकानासमोर सापळा रचला. तेथे तक्रारदाराकडून लाचेच पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या क्षीरसागरला रंगेहाथ पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल चित्रकारांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.१२) नंदनवन लॉन्स येथे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.१३) ‘मटा’च्या कार्यालयात ज्येष्ठ चित्रकार द. वा. मुळे यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

‘मटा’तर्फे सोमवारी तीन गटांत झालेल्या चित्रकला स्पर्धेत बच्चेकंपनीने आपल्या कल्पनेतील ‘स्मार्ट सिटी’ चितारून कल्पनाशक्तीची चुणूकच दाखवून दिली. ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बच्चेकंपनीला खास स्थान देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहानग्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील शाळांचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी नंदनवन लॉन्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

बक्षिस वितरणप्रसंगी चित्रकार मुळे म्हणाले, कला ही मानवाला मिळालेली देणगी आहे ती मानवाने जोपासली पाहिजे. कला सर्वांना साध्य होत नाही. तुम्हाला ती अवगत झाली हे तुमचे भाग्य आहे. देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे. मुलांच्या प्रगतीत पालकांचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी यावेळी विविध मान्यवर चित्रकारांची उदाहरणे दिली. नाशिक शहराला अनेक मोठ्या चित्रकारांची परंपरा आहे.

ही परंपरा आपल्याला जोपासायची आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त चित्र रेखाटून मोठे चित्रकार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ चित्रकार अशोक धिवरे म्हणाले की, प्रत्येक मुलाने काढलेले चित्र वेगळे होते. त्याच्यातील आपल्या शहरा बद्दलच्या कल्पना वाखाणण्यासारख्या होत्या.

प्रत्येक चित्रकाराची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे बक्षीसासाठी निवड करतानाही परिक्षकांचा कस लागला. परीक्षक म्हणून मुळे यांच्यासह अशोक धिवरे, राहुल मुळे, सुनील गवळी, विनोद जांभोरे, मिलिंद टिळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्यापक संघाचे पदाधिकारी महादेव जगताप, चेतना बैरागी आदींनी प्रयत्न केले.

यांना मिळाले पारितोष‌िक

पहिला गट - ५ वी ते ६ वी

प्रथम : सिद्धी साहेबराव गुंजाळ, इयत्ता सहावी, मराठा हायस्कूल

द्वितीय : सुजल सुनील धोत्रे, इयत्ता पाचवी

तृतीय : हिमानी विजय माळी, इयत्ता सहावी, सेंट फ्रान्सीस हायस्कूल

उत्तेजनार्थ : पूर्वा महाजन, इयत्ता पाचवी.

उत्तेजनार्थ : आत्मजा भालचंद्र पवार, इयत्ता सहावी, होरायझन अकॅडमी

दुसरा गट - सातवी ते आठवी

प्रथम : भूषण वसंत गायकवाड, इयत्ता आठवी, गुरू गोविंदसिंग हायस्कूल

द्वितीय : कृष्णा दीपक गिरमे, इयत्ता आठवी, न्यू इरा इंग्लीश स्कूल

तृतीय क्रमांक : सृष्टी नरेंद्र नेरकर, इयत्ता आठवी, रचना विद्यालय.

उत्तेजनार्थ : रिद्धी अतुल कुकेकर, इयत्ता आठवी, उत्तेजनार्थ

उत्तेजनार्थ : अनुष्का रवीकुमार गोसावी, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल

तिसरा गट - नववी ते दहावी

प्रथम : श्रृती संजय बागूल, इयत्ता नववी, केंद्रीय विद्यालय, आयएसपी, नाशिकरोड.

द्वितीय : आदिती अशोक फोफीलीया, इयत्ता नववी, बॉईज टाऊन पब्लिक स्कूल

तृतीय क्रमांक : प्रियंका दत्तात्रय कोठुळे, इयत्ता दहावी, श्रीराम विद्यालय.

उत्तेजनार्थ : ऋषिकेश पाटील, इयत्ता दहावी, पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव बसवंत

उत्तेजनार्थ : अंकीता देवीदास बाविसकर, इयत्ता दहावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा गानतंत्र’मधून गाण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘वर्ल्ड म्युझिक डे’निमित्त (दि. २१ जून) ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आहे वाचकांमधील गायकांसाठी. तुम्ही बाथरूम सिंगर असा किंवा गृहिणी...गाणं हे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनात येत असते. कुणी गुणगुणते, तर कुणी कट्ट्यावरच्या मित्रांमध्ये ही हौस भागवते. ‘गानतंत्र’च्या निमित्ताने तुमच्यातील गायकाला सर्वांसमोर आणण्याची नामी संधी आहे.

आपल्याकडील सांग‌ितिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा आहे.
आपला आवाज मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचावा आणि उत्तमोत्तम तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी स्वतःच्या आवाजातील एकच गाणे रेकॉर्ड करून mtgaantantra.nsk@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ई-मेलवर ध्वनीमुद्रण पाठवण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ध्वनीमुद्रण एमपी ३ व एमपी ४ या फॉर्ममध्येच असावे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गायकांना १९ जून रोजी स्टुड‌िओत गाण्याची संधी मिळणार आहे. त्यातून निवडलेल्या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे रेड‌िओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. स्पर्धेचे परीक्षण प्रथितयश गायक-गायिका करणार आहेत. विजेत्या गायकांना पारितोषिक देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग्यश्री गितेचे ‘डोळस’ यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

येथील एमआरपीएच कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री गिते या अंध विद्यार्थिनीने ८० टक्के गुण मिळवून दहावीचा गड सर केला आहे. अंध-अपंग विद्यार्थांमध्ये तिचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला असल्याचे शाळेने सांगितले. भाग्यश्री जन्मांध आहे. तिने जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत ब्रेल लिपी आत्मसात केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण आदिवासी सेवा समितीच्या एमआरपीएचकन्या विद्यालयात पूर्ण केले. तिला मुख्याध्यापिका उज्ज्वला पवार यांचे खास मार्गदर्शन लाभले. तिने रायटरच्या मदतीने पेपर सोडवले. गोड गळ्याने गाणाऱ्या भाग्यश्रीची परिस्थिती बेताची अाहे. परंतु, परिस्थितीवर जिद्दीने मात करीत तिने पुढे शिकण्याची जिद्द मनी बाळगली आहे. शिक्षणाधिकारी कनोजे यांनी तिचा सत्कार करीत अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>