बागलाण तालुक्यातील काटवन परिसरात सलग चार वर्षांपासून अपुऱ्या पाऊस पडत असून यंदा तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अखेर टेंभे वरचे येथील संतप्त महिलांनी टँकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
↧