धुळे-मालेगाव रस्त्यावर धुळे शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या अवधान एमआयडीसीमधील वर्षा इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीस लागलेली आग साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्णपणे आटोक्यात आली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कयास आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
↧