Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पोर्तुगाल विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू

$
0
0

सपकाळ नॉलेज हबमध्ये सुविधा; स्कॉलरशीपही देणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगाच्या सोबत स्पर्धा करणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने सपकाळ नॉलेज हब व सीईएसपीयू या पोर्तुगाल विद्यापीठासोबत काही महिन्यांपूर्वी झालेल्या करारानुसार त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम नाशिकमध्ये सुरू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. फार्मसी विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक पालक बैठकीत नुकतीच ही माहिती देण्यात आली.

कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे पालक शिक्षक मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी फार्मसी विद्या शाखेच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. मेळाव्यासाठी पालक व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या व त्यातून पाल्याचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. अविनाश दरेकर यांनी पालकांना कॉलेजतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. आर. बी. सौदागर यांनी कॉलेजमध्ये होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेची नियमावली व फार्मसी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी या नात्याने डॉ. आदिनाथ मोरे यांनी आपल्या भाषणात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा बद्दल आभार मानले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी ट्रस्ट मार्फत हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना २१ हजार रुपये व शिष्यवृत्ती, ब्लू क्रॉस लॅब, मुंबई, गीता इस्त्राणी स्कॉलरशीपमार्फत पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, कॅम्पस प्रमुख प्रा. ए. के. मन्सुरी, प्रा. डॉ. एस.बी. धांडे, प्रा. डॉ. व्ही. जे. गोंड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्कर्षा कोशिरे यांनी केले तर प्रा. एस. बी. गोंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. जी. उमाळकर, डॉ. आर. एस. बच्छाव, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालदिनानिमित्त पोलिस ठाण्याला भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

माजी पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड परिसरात बालदिन सोमवारी (दि. १४) उत्साहात साजरा झाला. उपनगर पोलिस ठाण्याला शाळेच्या मुलांनी भेट देऊन माहिती घेतली.

उपनगर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, युवराज बोरसे व सहकाऱ्यांच्या मदतीने उपेक्षित मुलांना मिठाई वाटप केले. पोलिस ठाण्याचे कामकाज कसे चालते याची उत्सुकता बालकांना असते. त्यासाठी सेंट फिलिमेना, सेंट झेवियर्स, बार्न्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपनगर पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिसकाका कसा तपास करतात, त्यांची दैनंदिनी व कामकाजाची माहिती घेतली. या वेळी पोलिस निरीक्षक अशोक भगत, युवराज बोरसे, उपनिरीक्षक इंगळे, पाटील, पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

राजगर्जनाचा उपक्रम

जेलरोड येथील राजगर्जना सामाजिक संघटनेतर्फे परिसरातील बाळ गोपाळांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. जेलरोडला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चॉकलेट, बिस्किट,पेन व पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी नितीन धानापुणे, सागर दाणी, गुड्डू शेख, संदीप आंबेकर उपस्थित होते.

वस्तुसंग्रहालयाची सफर

सिन्नर फाटा : विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षणदलांबाबत माहिती व्हावी या उद्देशाने या संवर्धन बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना आर्टिलरी सेंटर येथील तोफखाना वस्तुसंग्रहालयाची सफर घडवून आणली. या बालमहोत्सवात चेहेडी, पंपिंग, सिन्नर फाटा, चाडेगाव, गोरेवाडी, सामनगाव, अराठा कॉलनी, भोर मळा या भागातील ४५० विद्यार्थ्यांनी सहभागी होत तोफखाना वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी या विद्यार्थ्यांनी सैन्यदलातील विविध युद्धसाहित्य, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टर्स, चित्रप्रदर्शन व युद्धाच्या प्रसंगावर आधारित ३० मिनिटांचा लघुपटाचा आनंद लुटला.

विभागीय आयुक्तालय

सिन्नर फाटा : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस बालदिनी येथील विभागीय आयुक्तालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी, तहसीलदार विजय सोनार, सुभाष गायकर आदींसह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी विद्यालय

सातपूर : शिवाजीनगरच्या इंदिरा गांधी विद्यालयात पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अरूण नवले यांनी बालदिनाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

बालकांची धमाल

नाशिक : डी फोर डान्स अकॅडमी आणि सेंट्रल मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन साजरा करण्यात आला. नाशिक येथील पिनॅकल मॉलमध्ये बालदिनानिमित्त विविध गेम्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. केक कापून बालदिनाला सुरुवात करण्यात आली. डीजेवर लहानग्यांनी मनसोक्त डान्सचा आनंद घेतला. डी फोर अकॅडमी, पोद्दार स्कूल, पेठे शाळा आणि इसपोनियल या शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीची सुटी संपली; आजपासून शाळा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फराळ, फटाके, सहली, दिवाळीच्या सुट्यांची अशी धमाल लुटल्यानंतर आजपासून (दि.१५) माध्यमिकच्या शाळा उघडणार आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुक्या झालेल्या शाळेच्या भिंती त्यामुळे आता पुन्हा खुलणार आहे. मागील आठवड्यात प्राथमिक शाळा उघडल्या असून त्यापाठोपाठ आता माध्यमिक शाळा दिवाळीची सुटीनंतर आजपासून सुरू होणार आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर नवीन अभ्यासक्रम, नवे शिक्षक यामध्ये जुळवून घेईपर्यंतच विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा दिवाळीदरम्यान येऊन ठेपते. विद्यार्थ्यांच्या या व्यग्र शेड्युलमध्ये आराम मिळण्यास व पुन्हा वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी दिवाळीची सुटी मोलाची ठरते. २०१६-१७ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या विविध प्रश्नांमुळे सुट्या देण्यास आल्या होत्या. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्येही यंदा घट करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्यानंतर १६ नोव्हेंबरला शाळा उघडणार, असे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र, द्वितीय सत्र १७ नोव्हेंबर ते १ मे २०१७ असे असल्याचे विभागाला कळविण्यात आल्यानंतर एक दिवसाची सुटी रद्द करुन १५ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’च्या अर्जांसाठी उद्या अंतिम मुदत

$
0
0

२२ जानेवारीला होणार परीक्षा; नाशिकमध्ये परीक्षा केंद्राची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावर अधिव्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट (नॅशनल इलीजिबीलीटी टेस्ट) या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास बुधवार (दि. १६) अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही परीक्षा २२ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून यूजीसीने या परीक्षेच्या समन्वयाचे काम सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ) कडे दिले आहे. सीबीएसईच्या वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी http://www.cbsenet.nic.in या वेबसाईटवर लॉगइन करावे.

या परीक्षेसाठी जनरल गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये , ओबीसी गटासाठी ३०० रुपये तर एससी, एसटी गटासाठी १५० रुपये फी आकारण्यात येईल. ऑनलाइन माध्यमातून हे चलन स्वीकारण्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरण्यात येणार आहे.



उत्तर महाराष्ट्रात जळगाव एकमेव केंद्र

नेट (नॅशनल इलीजिबीलीटी टेस्ट) ही परीक्षा राज्यात ८ केंद्रांवर पार पडेल. यात नाशिकचा समावेश नाही. राज्यात केवळ अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे या शहरांमधील केंद्रांवर परीक्षा पार पडेल. उत्तर महाराष्ट्रासाठी जळगाव हे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. प्रत्यक्षात नाशिक व जळगाव यातील अंतरही मोठे आहे व या परीक्षार्थींची नाशिकमधील संख्याही लक्षणीय आहे. याशिवाय नाशिक हे उत्तर महाराष्ट्रास मध्यवर्ती ठिकाण पडते. यादृष्टीने उत्तर महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी युजीसी व सीबीएसईने आणखी एक परीक्षा केंद्र द्यावे, अशा जुन्या मागणीने या निमित्ताने पुन्हा डोके वर काढले आहे.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

नेटचा अर्ज भरण्यास सीबीएसईने सुमारे महिनाभराचा अवधी उमेदवारांना दिला होता. ती मुदत बुधवारी संपणार आहे. उमेदवारांना २१ डिसेंबरला अ‍ॅडमिट कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. तर २२ जानेवारी २०१७ रोजी ही परीक्षा पार पडेल. यानंतर मार्च २०१७ मध्ये उत्तरपत्रिका आणि ओएमआरशीट जाहीर करण्यात येईल. तर या परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्या पैशांअभावी मधुर फळे झाली कडू...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरकारने ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा भारतीय चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असले, तरी सामान्य नागरिक व व्यावसायिक मात्र या निर्णयामुळे काकुळतीला आले आहेत. शहरातील फळ बाजारातील किरकोळ विक्री या निर्णयानंतर जवळपास ठप्प पडल्याने मोठ्या प्रमाणात फळे खराब होऊन फळविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सुट्या पैशांअभावी मधुर फळांची चवही कडू झाली आहे.

सरकारने भारतीय चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्यापासून सामान्य नागरिकांकडे सुट्या पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम फळांच्या खरेदी व विक्रीवरही झाला आहे. बुधवारपासून शहरातील फळविक्रेत्यांकडील किरकोळ विक्रीला पूर्णतः ब्रेक लागला आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती अजून दोन ते तीन दिवस राहिली, तर फळविक्रेत्यांकडील सर्व फळे खराब झाल्याने फेकून द्यावी लागणार आहेत.

विक्रीअभावी फळे खराब

फळ बाजारात काही दिवसांपासून फळांची किरकोळ विक्री संपूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे नाशवंत फळे सडली आहेत. अनेक विक्रेत्यांवर सडलेली फळे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय काही फळे सुकू लागली आहेत. पपई, सीताफळ, अननस, आयात द्राक्षे, संत्रा, आलूबुखार, केळी यांसारखी फळे सडल्याने असंख्य विक्रेत्यांनी ती फेकण्यास सुरुवात केली आहे.

उधारीने विक्री

काही ठिकाणी ओळखीमुळे उधारीवर फळांची विक्री केली जात आहे. नेहमीप्रमाणे सकाळी फळांच्या खरेदीला बाजारात होणारी गर्दी काही दिवसांपासून दिसून येत नाही. त्यामुळे फळविक्रेते हातावर हात ठेवून ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत. सुट्या पैशांच्या टंचाईमुळे सामान्य नागरिकांना फळांची मधुर चव चाखणे अवघड झाले आहे.त्यामुळे एरवी फळांची मधुर असलेली चव आता कडवट झाली आहे.

काही दिवसांपासून फळांची किरकोळ विक्री बंदच आहे. आयात केलेली महागडी फळे सुकली आहेत. पपई, सीताफळ, खरबूज, सफरचंद, केळी, संत्रा यांसारखी फळे फेकण्याची वेळ आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

-लियाकत सय्यद, फळविक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, धान्य लिलाव आजपासून बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बाजार समितीत कांदा, धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पुरेसे चलन नसल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा आणि धान्य लिलाव मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.

लासलगाव बाजार समितीसोबतच विंचुर उपबाजार अवरताही कांदा, धान्य लिलाव होणार नसल्याने लासलगाव व्यापारी असोसिएशनने बाजार समितीला पत्र दिले आहे. बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांकडे लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार रोख स्वरूपात देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. नाशवंत प‌िकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. लासलगाव बाजार समिती बंद राहिल्याने कांदा विक्री करता येईना आणि दुसरीकडे हा कांदा साठवला तर खराब होण्याची भीती असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादुई काठीच्या स्पर्शानेच गारद होतील गुन्हेगार

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : @jitendra.tartemt

काळासोबत अद्ययावत होत जाणाऱ्या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनांही तितकेच अद्ययावत व्हावे लागणार, ही गरज लक्षात घेत संदीप फाऊंडेशन इन्स्ट‌िट्यूट आणि रिसर्च सेंटरच्या एका विद्यार्थ्याने जादूई काठी अर्थात, मल्टी फंक्शनल स्ट‌िक विकसित केली आहे. या स्ट‌िकमध्ये समाविष्ट विशेष पाच वैशिष्ठांच्या आधारावर गुन्हेगाराला घटनास्थळी कोंडीत पकडण्यासोबतच काही क्षणांसाठी बेशुद्ध करण्याची क्षमताही, या जादुई काठीमध्ये दडली आहे.

येथील संदीप फाऊंडेशन या शिक्षण संस्थेत हा चेतन नंदाणे हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (इ अँड टीसी) या शाखेत तृतीय वर्षात पॉल‌िटेक्नीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट तयार करावे लागतात. या प्रोजेक्टपासून प्रेरणा घेत चेतन याने वैयक्तिक स्तरावर मल्टी फंक्शनल स्टीकचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पास कॉलेजनेही वेळोवेळी गरजेनुसार मदत व मार्गदर्शन केले.

काय आहे मल्टी

फंक्शनल स्ट‌िक?

एक पाच मेगापिक्सेल कॅमेरा, एक व्हॉईस रेकॉर्डर, पाच एलईडी (लाईट इमिटींग डायोड), एक मेटल डिटेक्टर आणि एक जीपीएस ट्रॅकर (ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम) आणि त्या सोबत १२ व्होल्ट क्षमतेच्या लो इंटेनसिटी शॉक देण्याची क्षमता या स्टीकमध्ये असल्याची माहिती चेतन याच्या मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. गायत्री फडे यांनी दिली.

तीन तासांच्या बॅटरी बॅकअपसह यातील एलईडीची पोहोच ४५ अंश कोनात व २० ते ४० मीटर दूरपर्यंत असणार आहे. तर यातील कॅमेरा आणि व्हॉईस रेकॉर्डरमुळे घटनस्थळाहून संशयिताविरोधात पुरावे जमा करण्यास पोलिसांना मदतच होईल, असा संशोधकाचा दावा आहे. शिवाय ज्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती ही काठी राहील त्यावर त्याचे नाव, पत्ता, रक्तगट आणि महत्वाचा तपशील त्या काठीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.

पोलिस महासंचालकांसमोरही सादरीकरण

चेतन नंदाणे याने हा प्रयोग माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमोरही सादर केला असल्याची माहिती, मार्गदर्शक प्रा. गायत्री फडे यांनी दिली. सुरूवातीच्या टप्प्यावर या स्टीकमध्ये केवळ दीवे बसविण्यात आले होते. मात्र दीक्षित यांनी काही बदल सुचविल्यानंतर यावर गांभीर्याने काम करत चेतन याने ‘मल्टी फंक्शनल स्टीक’ आकारास आणली.

प्रयोग पोहचेल मोठ्या स्तरावर

या धर्तीवर परदेशामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या स्टीक्स पुरविल्या जातात. आपल्या देशात मात्र अद्याप पोलिस दलात तसा ट्रेंड नाही. रात्री पेट्रोलिंगसाठी कार्यरत असणाऱ्या किंवा एखाद्या अपघाती प्रसंगांमध्ये कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती असे साधन उपलब्ध झाल्यास घटनेच्या तपासात महत्वाचे सहकार्य होईल. भविष्यात या प्रयोगाची दखल राज्यात मोठ्या स्तरावर घेण्याची अपेक्षा असल्याची माहिती संस्थेतील प्राध्यापकांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये अमाप उर्जा आणि बुध्दीमत्ता दडली आहे. अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट सादरीकरणातून अनेक विद्यार्थी चांगली प्रेरणा घेतात. ‘मल्टी फंक्शनींग स्टीक’ चा प्रयोगही विद्यार्थ्यांची उर्जा सकारात्मक दिशेने घेऊन जाणारा आहे.

डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य,

संदीप फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्ग आळेफाटामार्गे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नाशिक जिल्ह्यात विरोध होऊ लागल्याने हा महामार्ग अन्य मार्गाने वळविता येईल का, याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केला आहे. घोटी, सिन्नरऐवजी आळेफाटा, अहमदनगरमार्गे हा प्रकल्प घेऊन जाण्याची चाचपणी सुरू झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्पही पळविला गेल्यास नाशिकचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

नागपूर आणि मुंबई अशा दोन महानगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या रूपाने साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ९६ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. इगतपुरी तालुक्यातील २०, तर सिन्नर तालुक्यातील २६ गावांचा या प्रकल्पात समावेश आहे. त्यासाठी साधारणत: १८५१ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल, असा प्रशासनाचा अंदाज होता. सरकारने जमिनींच्या मोबदल्यात मुबलक मोबदल्याची ग्वाही दिली असली तरी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकल्पात वडिलोपार्जित जमिनी, घरे, विहिरी जातील या भीतीपोटी काही भागात शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे, तर या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीवर प्रशासनाने भर दिला आहे. या महामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी जिल्ह्यातील दहाहून अधिक गावांमधील २८ किलोमीटरहून अधिक क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.

अन्यथा पर्यायी मार्ग

नेमकी कुठली आणि किती जमीन महामार्गात जाणार, याचा अचूक अंदाज येण्यासाठी डीमार्केशनचे कामही प्रशासनाने हाती घेतले. मात्र, प्रशासनाकडून हे प्रयत्न होत असताना या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचाही विरोध होऊ लागला आहे. हा विरोध मावळावा यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोध मावळला नाहीच तर पर्यायी मार्गांचा विचारही सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केला आहे. नगर ते कल्याण मार्गाचा हा समृद्धी महामार्ग साकारण्यासाठी विचार होऊ शकतो. कल्याण, माळशेज घाट, आळेफाटा आणि अहमदनगरमार्गे औरंगाबादपर्यंत हा महामार्ग घेऊन जाता येईल का, याचा विचार सुरू करण्यात आला आहे. सिन्नर, घोटीमार्गे औरंगाबादपर्यंतचा हा महामार्ग ३३५ किलोमीटर लांबीचा आहे. आळेफाट्यामार्गे औरंगाबादपर्यंत हे अंतर ३१ ‌किलोमीटरने वाढले असून, हा महामार्ग ३६६ किलोमीटर लांबीचा होणार आहे. यापूर्वी नाशिक- मुंबई द्रुतगती महामार्गालाही नाशिकमधून विरोध झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाशिकमध्ये जाहीर केले. त्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग विकसित करण्यात आला. त्यानंतर दिल्ली- मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्येही नाशिक सहभागी होऊ शकले नाही. शेतकऱ्यांचा विरोधही रास्त असला तरी आता हा महामार्ग नाशिकमधून जाणार की आळेफाट्यावरून, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

असा आहे महामार्ग

९६ किलोमीटरचा महामार्ग
४६ गावे जाणार प्रकल्पात
१८५१ हेक्टर जमीन लागण्याची शक्यता
२८ किलोमीटरहून अधिक क्षेत्राचे सर्वेक्षण

का आहे विरोध?

प्रकल्पात वडिलोपार्जित जमिनी, घरे, विहिरी जातील या भीतीपोटी काही भागांत शेतकऱ्यांचा विरोध.

सरकार, प्रशासनाचे प्रयत्न

- मुबलक मोबदला देण्याची ग्वाही
- शेतकऱ्यांच्या समुपदेशनावर भर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओ मालामाल; दिवसभरात ५८ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांवरील थकीत टॅक्स वसूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय चांगलाच पथ्यावर पडला. दिवसभरात नाशिक आरटीओ कार्यालयात ३८ लाख रुपये जमा झाले. नाशिक विभागातील श्रीरामपूल, अहमदनगर आणि मालेगावचा विचार करता हा आकडा ५८ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

देशात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यापासून थकीत कर भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. महापालिका, महसूल, नगरपालिका, वीज मंडळाकडे थकबाकीदारांच्या रांगा लागल्या आहेत. थकीत कर भरताना चलनातून बाद झालेल्या हजार व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने थकबाकीदारांच्या दृष्टीने ही बाब सोयीची ठरली आहे. याच पद्धतीने वाहनावरील थकीत टॅक्स संकलित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारी सुटीच्या दिवशी आपली कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. ट्रक, बसेस व इतर व्यावसायिक वाहनांना दर तीन महिन्यांनी किंवा वार्षिक पद्धतीने आरटीओ कार्यालयात टॅक्स जमा करावा लागतो. यात परमिट टॅक्स, पर्यावरण टॅक्स, रिपासिंग टॅक्स अशा अनेक टॅक्सचा समावेश होतो. दरवर्षी या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारदरबारी जमा होतो. मात्र, अनेकदा वाहनचालक असा टॅक्स भरण्यास काही कारणांमुळे चालढकल करतात. अशा वाहनचालकांनी सोमवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर आपल्याकडील थकीत टॅक्स आरटीओ कार्यालयात जमा केला. नाशिक प्रादेशिक कार्यालयात दिवसभरात ३४ लाख ९१ हजार ५७५ रुपयांचा महसूल याद्वारे जमा झाला. गस्ती पथकाने केलेल्या कारवाईत ४ लाख ६४ हजार ८४१ रुपयांचा दंड वसूल केला. नाशिकमध्ये जवळपास ३९ लाखांचा महसूल जमा झाला. नाशिक विभागातील मालेगाव, श्रीरामपूर आणि अहमदनगर या कार्यालयांतदेखील थकीत टॅक्स भरण्यासाठी वाहनमालकांची गर्दी होती. नाशिक व इतर तीन उपप्रादेशिक कार्यालये मिळून दिवसभरात तब्बल ५८ लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

नाशिक
३४,९१,५७५ रुपये

गस्ती पथक
४,६४,८६१ रुपये

मालेगाव
८,६७,१२७ रुपये

श्रीरामपूर
५,०६,७५१ रुपये

अहमदनगर
४,९४,६७३ रुपये

एकूण
५८,२४,९९८ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आश्रमशाळांना बायोमेट्र‌िक, आधारशिवाय अनुदान नाही

$
0
0

अनुदान हवंय? बायोमेट्रीकचा ‘आधार’ घ्या!

vinod.patil@timesgroup.com
Tweet : @VinodPatilMT

नाशिक : आदिवासी विभागातर्फे चालणाऱ्या खासगी आश्रमशाळांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागाने आता या आश्रमशाळांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. खासगी आश्रमशाळांमधील काही संस्थाचालक विभागाचे अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवत असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे आदिवासी विभागाने राज्यातील ५५६ खासगी अनुदानीत आश्रमशाळांना विद्यार्थी अनुदानासाठी आता आधारकार्ड, तसेच बायोमेट्र‌िक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आता आधारकार्डशिवाय दिले जाणार नसल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले असून, दररोज बायोमेट्र‌िक हजेरी सादर करण्याची जबाबदारीही या संस्थाचालकांवर असणार आहे. त्यामुळे खासगी आश्रमशाळांमधील बनवेगिरीला लगाम लागणार आहे.

बुलढणा जिल्ह्यातील पाळा येथील खासगी आश्रमशाळेमध्ये लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासी विकासमंत्र्यांसह आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या खासगी आश्रमशाळा संस्थाचालकांकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांनाच आता चाप लावला जाणार आहे. ५५६ खासगी आश्रमशाळांमध्ये जवळपास २ लाख ४० हजारांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु यातील बहुसंख्य आश्रमशाळांमध्ये बनावट विद्यार्थी असल्याचे अनेकदा केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी व शाळा सुरू ठेवण्यासाठी मराठी शाळांचे विद्यार्थीही काही ठिकाणी आश्रमशाळांमध्ये दाखवले जातात. विभागाकडून प्रतिविद्यार्थी दरमहा ९०० रुपये दिले जातात. तर दरवर्षी संस्था चालवण्यासाठी ५ लाख ते २५ लाखांपर्यंतची विविध अनुदाने दिली जातात. त्यामुळे या आश्रमशांळावर दरवर्षी साधारणत: दीडशे कोटींच्या आसपास खर्च होतो.

आश्रमशाळा संस्थाचालकांना आतापर्यंत खातरजमा केल्याशिवायच अनुदान दिले जात होते. परंतु आता डोळेझाक करून अनुदान दिले जाणार नसून, या अनुदानाला चाळणी लागणार आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अनुदान आवश्यक असेल तर आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

आश्रमशाळांचे अनुदान थेट आधार नंबरशी जोडले जाणार आहे. विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल तरच संबंधित शाळेला अनुदान वितर‌ित करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या संस्थाचालकांना सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आदिवासी आयुक्तालयाकडे सादर करावे लागणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांकडून बनावट विद्यार्थी उभे करून अनुदान लाटण्याचे प्रकार थांबणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला ‘बीओटी’मुक्त करणार

$
0
0

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहराचा विकास केला असं ते म्हणतात. मात्र शहराची आजची खरी परिस्थिती बघता शहरात त्यांनी नेमका कुठे कुठे विकास केला आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. ‘बांधा, वापरा अन् हस्तांतरीत करा’ (बीओटी) या योजनेंतर्गत शहराचा विकास राष्ट्रवादीने केला असेल, तर पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर शहर बीओटीमुक्त करू, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येवला नगरपालिका निवडणुकीसाठीचा शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज्यमंत्री भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुहास सामंत, विधानसभा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आदींच्या प्रमुख उपस्थित फोडण्यात आला.

शहरातील बाजारतळावरील सिध्दिविनायक गणेश मंदिरात हा शुभारंभ झाल्यावर नजीकच्या शनिपटांगणावर युतीची छोटेखानी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तब्बल दहा वर्षांपेक्षा अधिक काळ येवला पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर आसूड ओढले. विकासाची कास धरणारी अन् तळमळ असलेली माणसे आम्ही पालिका निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या वतीने उमेदवार म्हणून दिली आहेत. येवला पालिकेवर युतीचा फगवा फडकेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नसल्याचेही भुसे यावेळी म्हणाले.

येवला ही इतिहास घडविणारी भूमी असल्याने पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवून जनता इतिहास केल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भाषणे झाली.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस बापू पाटील, शिवसेनेचे संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, जिल्हा उपप्रमुख वाल्मीक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपचे मंडळ प्रभारी दिनेश देवरे, राजेंद्र पवार, कुणाल दराडे, माणिक लोणारे, शिवसेनेचे मतदारसंघ प्रमुख अनिल कोकिळ आदींसह युतीचे उमेदवार उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी केले.

पाणीप्रश्नावर ठेवले बोट

उपस्थितांना शहराला किती दिवसाआड पाणी येते, असा सवाल भुसे यांनी यावेळी केला असता उपस्थितांतून तीन दिवसाआड असे उत्तर नागरिकांनी दिले. विकास झाला म्हणतात तर मग शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा का? असाही प्रश्‍न यावेळी भुसे यांनी केला. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना जनतेने आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी, अशी सादही भुसे यांनी घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावर मागणार मतांचा जोगवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात धरणांची संख्या मुबलक, तसेच पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणावर असूनही आजही नांदगावमध्ये २० ते २२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत पाण्याची वितरण व्यवस्था आणि नियोजन हा घटक कळीचा मुद्दा ठरेल, असे चित्र आहे.

धरणांचा तालुका असूनही नांदगावमध्ये जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नगरपालिका निवडणुकीत पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पक्षाला निवडणुकीत झुकते माप मिळेल, अशी नागरिकांची धारणा आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पाणीप्रश्नांसह मूलभूत सोयी सुविधा हेच मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

१७ जागा अन् ६१ उमेदवार

नांदगाव नगरपालिकच्या ८ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल ६१ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या जोडीने अपक्ष ही मोठ्या प्रमाणावर रिंगणात आहेत.

भाजप-सेना स्वबळावर

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघे स्वतंत्ररित्या निवडणूक लढवीत असून, त्यांची फारकत एकत्रित निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडेल का?, हाच नांदगावमध्ये कुतूहलाचा विषय आहे. मात्र शिवसेना व भाजप यांची युती नसली तरी स्वतंत्रपणे लढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास दोन्ही पक्षाचे नेते स्वतंत्ररित्या सांगत आहेत. मतांचे विभाजन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लाभदायी ठरेल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांच्यामुळे आघाडी भक्कम असल्याचा व त्याचा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे, तर नांदगावमध्ये सहकारमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्याने सेनेत आलेले चैतन्य या गोष्टी आज शिवसेनेसाठी तारक ठरतील, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊ, पाचशेच्या नोटा आणता का बदलून!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

उमेदवार मतदारांना भेटून त्यांच्या अपेक्षा विचारत आहेत. आम्ही काय केले पाहिजे. मतदारांना काय हवे आहे, असा एकूण त्यांच्या बोलण्यातील सूर आहे. एका उमेदवाराने एका महिला मतदाराला नमस्कार करीत मावशी काय अपेक्षा आहेत. काय करू तुमच्यासाठी सांगा, असे विचारले. लगेच ती महिला म्हणाली बँकेत गर्दी आहे, माझ्या पाचशेच्या नोटा बदलायच्या होत्या. देता का आणून? हे ऐकून सर्वांनाच हसू फुटले. तेव्हा तो उमेदवार मावशींना हळूच म्हणाला. अहो मलाच माझ्या नोटा बदलायच्या आहेत, पण रांगेत उभे राहायला वेळ नाही. प्रचार महत्त्वाचा असं म्हणत त्याने पुढची वाट धरली.

चिन्हाने केली पंचाईत

सटाणा शहर विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापासून, तर आघाडीच्या ११ नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकसमान चिन्ह नाकारल्याने वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळ आल्याने मोठी पंचाईत झाली आहे. सटाणा शहर विकास आघाडीने उमेदवारी अर्ज नामांकनात नारळ या चिन्हाला पसंती दिली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या अध्यादेशामुळे गैरसोय झाल्याने आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हामुळे मोठी पंचाईत झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवारांना जग हे चिन्ह मिळाले असून, प्रभागातील दोन उमेदवारांचे चिन्हदेखील वेगवेगळे असताना मतदारांपुढे तीन चिन्ह सांगतांना उमेदवारांची दमछाक होत आहे.

अहो, फौज कुठे आहे?

नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मनमाडमध्ये एका उमेदवाराने कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. त्याच्यासोबत पाच सहा कार्यकर्ते होते. ते पाहून एका ज्येष्ठ नागरिकाने विचारले का हो तुमच्याकडे एवढीच फौज? आणि तुमच्या घरातले तर कोणीच नाही का बरोबर तुमच्या?, मग घरचीच मते दिसत नाही मग आम्हाला का मत मागता? तेव्हा गडबडून तो उमेदवार उत्तरला अहो काका त्यांना दुसऱ्या गल्लीत पाठवले आहे. प्रचाराला हा प्रभाग मोठा आहे ना म्हणून.. यावर काकांनी काय सांगता? असं म्हणत असा चेहरा केला की उमेदवाराने तडक प्रचारासाठी शेजारचे घर गाठले.

उमेदवारांची कैफियत

कार्यकर्ते सांभाळताना उमेदवारांना खूप कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. प्रचाराला येणाऱ्या व उमेदवारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला किमान चहा-नाश्ता तरी मिळावा म्हणून उमेदवार ही काळजी घेत आहेत. पण काहींची नोटांमुळे अडचण झाली आहे. नगरपालिकेत एकमेकांना भेटलेले दोन उमेदवार चर्चा करीत असताना एकाने आपली कैफियत सांगितली. तो म्हणाला अहो पाचशेच्या नोटा होत्या तेव्हा ठीक होतं हो! आता इतका प्रॉब्लेम चालू आहे, की चहा-नाश्ता करण्यासाठी दोन हजाराची नोट द्यावी लागतेय आणि कार्यकर्ते पुन्हा पैसे परत आणतच नाहीत. जेवणच उरकून येत आहेत. आता सांगता कोणाला? शंभराच्या नोटा शोधतोय मी आता.. आणि हे ऐकून दुसरा म्हणाला माझेही हेच दुःख आहे दोस्ता... आणि असं म्हणत निवडणूक विषयसोडून दोघे नोटबंदीचे तोटे यावर बोलू लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिप्परच्या सहा सदस्यांवर मोक्का

$
0
0

उर्वरित सात जणांवर आयपीसीनुसार दोषारोपपत्र दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या १३ पैकी सहा टिप्पर गँगच्या सदस्यांवर मंगळवारी मोक्का विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. उर्वरित सात संशयितांमध्ये एक अल्पवयीन असून, त्याच्यासह इतरांवर आयपीसी कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पंचवटीच्या निर्णयावर शहर पोलिसांसाठी हा दिलासा मानला जात असून, यामुळे टिप्पर गँगचे कंबरडेच मोडल्याची भावना पोलिस व्यक्त करीत आहे.

सिडको परिसरासह शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये टिप्पर गँगच्या सदस्यांविरोधात हत्या, खंडणी, चेन स्नॅचिंग, लुटमार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. टिप्पर गँगचा प्रमुख सूत्रधार समीर पठाण उर्फ छोटा पठाण याच्यावर देखील २०१२ मध्ये मोक्कानुसार कारवाई झाली असून, तेव्हांपासून तो त्याच्या काही साथीदारांसह सेंट्रल जेलमध्ये आहे. मात्र, तरीही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया संपुष्टात आल्या नाहीत. छोटा पठण जेलमधून, तर मोठा पठाण जेलबाहेर आपले कृत्य करीत होते. ३१ जून २०१६ रोजी टिप्पर गँगमधील शाकीर पठाण उर्फ मोठा पठाण याने त्याच्या साथीदारासह शुभम विजय भावसार या फळविक्रेत्याला पाच लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात जास्त सदस्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळे, मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण, हेमंत बापू पवार उर्फ सोन्या यांना अटक केली. यानंतर वसीम शेख, साईद सय्यद, सिन्नर येथील अमोल जाधव आणि गोरख वसंत वऱ्हाडे, शासकीय ठेकेदार स्वप्नील हेमंत गोसावी तसेच एक अल्पवयीन संशयिताला अटक केली. या गुन्ह्यात गणेश चांगले हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, टिप्पर गँग सुनियोजित पध्दतीने गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोक्का हे वाढीव कलम लावण्यात आले. मोक्का कलमानुसार कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस. पी. यादव यांच्या मंजुरीसाठी शहर पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास यादव यांनी हिरवा कंदील दर्शवला. यातील, गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळे, मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण, हेमंत बापू पवार उर्फ सोन्या यांनी संघटितपणे गुन्हेगारी कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर मोक्का कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मंजुरी यादव यांनी दिली. कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने

पोलिसांनी पुढील कार्यवाही पूर्ण केली. एवढेच नव्हे तर, उर्वरित संशयितांविरोधात खंडणीच्या गुन्ह्यात आयपीएसी कलमानुसार दोषारोपपत्र दाखल झाले. तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, तपासाधिकारी अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड तसेच सरकारी वकील अजय मिसर यांनी यात उल्लेखनीय कामगिरी बजावली.

मंजुरीबाबत गोपनियता

पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील १८ जणांवर मोक्का कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश काही दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी दिले. त्याचवेळी टिप्पर गँगबाबत निर्णय देण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या निर्णयाबाबत कमालीची गुप्तता पाळली. सदर माहिती संशयितांना मिळून त्याचा फायदा होऊ नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

९७० पानी दोषारोपपत्र

खंडणी आणि नंतर मोक्का कलम वाढवण्यात आल्यानंतर पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे तपास केल्याचा उल्लेख अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी सदर मंजुरी देताना केला. पोलिसांच्या तपासामुळेच सहा मुख्य संशयितावर मोक्क्का कोर्टात खटला चालणार असून, उर्वरित संशयितांना देखील खंडणीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणी जवळपास ९७० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

संशयितांची नावे : गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या (मोक्का), किरण पेलमहाले (मोक्का), देवदत्त घाटोळे (मोक्का), मुकेश राजपूत (मोक्का), शाकीर नासीर पठाण (मोक्का), हेमंत बापू पवार (मोक्का), वसीम शेख (आयपीसी), साईद सय्यद (आयपीसी), अमोल जाधव (आयपीसी), गोरख वसंत वऱ्हाडे (आयपीसी), स्वप्नील हेमंत गोसावी (आयपीसी), एक अल्पवयीन संशयित (आयपीसी)

आमच्यासाठी ही फार मोठी बाब आहे. झालेल्या तपासाची प्रत्येक बाब तपासून पाहण्यात आली. त्यामुळेच सहा जणांवर मोक्का कलमानुसार खटला चालणार आहे. उर्वरित संशयितांपैकी एक फरार असून, त्यालाही लवकरच जेरबंद केले जाईल. यामुळे खंडणीखोरांचे मोठे रॅकेट उध्दवस्त झाले असून, त्यांना मदत करणाऱ्यांचे जाळेदेखील आम्ही शोधून काढले आहे.

- अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत १४ मंदिरांचे अतिक्रमण हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील १४ मंदिरांचे अतिक्रमण मंगळवारी हटविण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम केलेली मंदिरे काढून घेण्यासाठी महापालिकेने संबंधितांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यांच्या बैठका घेऊन आदेशाविषयी माहिती दिली तरी अतिक्रमण काढून घेतले नाही. यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

मखमलाबाद, म्हसरूळ, मुंबई-आग्रा महामार्ग, केवडीबन, तपोवन या परिसरातील तसेच मखमलाबाद, म्हसरुळ लिंकरोडवरील देवभूमी अपार्टमेंटजवळील देवीमंदिर, हॉटेल राऊ शेजारील साईबाबा मंदिर, मखमलाबाद येथील मानकर मळ्यातील दत्त मंदिर, मेहरधामजवळील म्हसोबा मंदिर, आरटीओ कॉर्नर, सूर्यवंशी मार्ग येथील दत्त मंदिर, राजमाता मंगलकार्यालय, पोकार कॉलनी येथील म्हसोबा महाराज मंदिर, मुंबई-आग्रा महामार्गावरील मरीमाता मंदिर, महादेव पिंड, सातीआसरा मंदिर, केवडीबन, चव्हाण मळा येथील मारुती मंदिर, विडी कामगारनगर येथील गजानन महाराज मंदिर या ठिकाणच्या मदिरांचे बांधकाम हटवले. पंचंवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, जयश्री सोनवणे, नितीन नेर, राजू गोसावी, डी, एस. वाडेकर यांनी राबवली. सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, म्हसरुळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सानप यांच्या बंदोबस्तात ही मोहीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांना प्रभागफेरीची सक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह स्वच्छता निरीक्षकांना महागात पडणार आहे. विशेष म्हणजे प्रभागातील नागरिकांनी समस्यांची तक्रार करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच करावी, अशी सक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागफेरी सक्ती करण्यात आली असून, दररोज दौरा करून तिथल्या समस्यांची माहिती वरिष्ठांकडे करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

प्रभागामध्ये खड्डे, रेलिंग तुटणे, पाइपलाइन लिकेजेस, सांडपणी अशा असंख्य समस्या असतात. या समस्यांसाठी नागरिक व नगरसेवक अनेकदा तक्रारी करतात. परंतु, अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. या समस्या सोडविण्याचे काम हे स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच असते. मात्र या तक्रारी विभागीय कार्यालयांकडून येतच नाहीत. येथील सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, आरोग्य व सांडपाणी विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन रिपोर्ट करीत नाही. यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ही जबाबदारी निश्चित केली आहे.

विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक ते स्थानिक कर्मचारी यांनी आपल्या नियुक्त केलेल्या प्रभागात फिरून तिथल्या समस्या दररोज वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच दिवशी सादर करणे आवश्यक आहे. तपासणीत संबंधित अभियंत्याने दुर्लक्ष केल्याचे लक्षात प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आता समस्यांसाठी दारोदार फिरणार आहेत.

अधिकारी जनतेच्या दारी

आतापर्यंत प्रभागातील नागरिक व नगरसेवक समस्यांसाठी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत होते. परंतु, आयुक्तांच्या या निर्णयाने कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक व तत्सम नियुक्त अधिकारी नागरिकांच्या दारी पोहचणार आहेत. त्यामुळे त्या त्या प्रभागातील समस्या शोधण्यासाठी या अधिकाऱ्यांना प्रभाग गाठावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक परिषदेत सूचनांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांतर्फे आयोजित वाहतूक परिषेदत नाशिककरांनी तक्रारी व सूचनांचा अक्षरशः पाऊस पाडला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल व वाहतूक विभागाने या सर्व सूचनांची दखल घेण्याचे आश्वासन दिले असून, यातून शहराची नवीन ओळख प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता वाहतूक परिषद झाली. यावेळी मंचावर आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त डॉ. सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त जयंत बजबळे आदी उपस्थित होते.

बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, शाळा कॉलेजेसमधील शिक्षक, राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक अशा अनेक वर्गातील नागरिक उपस्थित होते. या सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आपले मनोगत व्यक्त करीत वाहतूक सुधारण्याविषयी उपाययोजना मांडल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. सिंघल यांनी सांगितले, की अतिशय सुंदर असलेल्या नाशिकला बेशिस्त वाहतुकीमुळे गालबोट लागत आहे. शहरासाठी वाहतूक शिस्त महत्त्वाची आहे. ती निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जातील. लोकप्रतिनिधींनी आपापल्या परिसरातील प्रत्येक चौक विकसित केला आणि महापालिकेने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढून टाकले, तर फार चांगले होईल. यासाठी महापालिका आणि लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करून रुपरेषा ठरवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

‘ट्रॅफिक वॉर्डन’साठी हवा पुढाकार

ट्रॅफिक वॉर्डन ही संकल्पना चांगली असली तरी यात नागरिकांना लागलीच पैसे मिळत नाही. मात्र, कुठेतरी सुरुवात होण्याची गरज असून, जागरुक नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. सिंघल यांनी केले. प्रारंभी, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त जयंत बजबळे यांनी शहरातील वाहतुकीची समस्या, त्यावरील उपाययोजना, नियमावली, दंडात्मक कारवाई यांची सविस्तर माहिती दिली.

यांनी मांडल्या सूचना

नगरसेवक शशिकांत जाधव, विलास शिंदे, नगरसेविका योगिता आहेर, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक मंडालेश्‍वर काळे, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, भक्ती करंजकर, माधव भनगे, डॉ. सुभाष पवार, प्रदीप जोशी, भिवानंद काळे, राजेंद्र फड, चंद्रकांत शिंदे, भगवान पाठक, रोहित जाधव, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, जसबीर सिंग, मंगला खोठारे आदींनी आपल्या सूचना व उपाययोजना मांडल्या.

तपोवनातील जागेचा वापर करा

शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडण्यासाठी महापालिकेचा कारणीभूत असल्याची टीका आमदार बाळासाहेब सानप यांनी केली. शहर विकास आराखाड्यातील पार्किंगसाठीच्या जागा धनदांडग्यांनी संपवल्या. त्याचा फटका शहराला बसत आहे. शहरात वेळोवेळी विविध कार्यक्रम तसेच प्रासंगिक स्टॉल्स उभे केले जातात. यामुळे वाहतुकीचा फज्जा उडतो. सिंहस्थासाठी तपोवनात मुबलक जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील ५७ एकर जागेचा वापर अशा कामांसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांकडे अशा प्रकाराचे प्रस्ताव आल्यास त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र देताना वाहतुकीचा विचार करावा. दरम्यान, आमदार निधीतून वाहतूक शाखेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सानप यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचओआय’च्या तिघांना घोटाळ्याप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट प्रा. लिमिटेड (एचओआय) या कंपनीच्या संचालकांनी तब्बल ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केला. या प्रकरणी कंपनीच्या दोघा संचालकांना, तसेच मुख्य संशयिताच्या पत्नीला पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. न्यायालयाने तिघांना येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गंगापूररोडवरील मामामुंगी कार्यालयाशेजारी एचओआयचे कार्यालय होते. विनोद पाटील या संशयिताने तीन ते चार वर्षांपूर्वी एचओआयची स्थापना केली होती. कंपनीचे जवळपास ३० एजंट असून, त्यांच्यामार्फत तीन हजार २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारपासून एक कोटी रुपये उकळण्यात आल्याची बाब समोर आली. पाटील याने जमा झालेले पैसे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाऊस ऑफ बुलियन्स, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट, हाऊस ऑफ बिल्डकॉन, हाऊस ऑफ अॅग्रो कम्युनिटी या व इतर काही कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट तसेच बांधकाम व्यवसायात पैसा गुंतवला. मात्र, साधारणतः काही महिन्यांपूर्वी पाटील याने व्यवहारात अनियमितता सुरू केली. व्याज मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी मुद्दलाची रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. गंगापूररोडवरील कार्यालयही काही महिन्यांपासून बंद झाले. त्यानंतर यासंदर्भात नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. मुख्य संशयित पाटीलसह कंपनीचा संचालक सुशांत कोठुळे, विकास रवंदळे हे फरार आहेत. पाटील हा फरार असला तरी कंपनीच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी एचओआयचे संचालक भगवंत कोठुळे, महेश नेरकर, अनिल कोठुळे, रवींद्र दळवी, दर्शन शिरसाठ यांना यापूर्वीच अटक केल्याचे गुंतवणूकदार एकनाथ नागरे आणि गणेश काठे यांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी कंपनीचे संचालक सतीश कामे आणि विजय खुनकर यांच्यासह मुख्य संशयित विनोद पाटीलची पत्नी प्रियंका पाटील यांना मंगळवारी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार प्रकरणांचा आदिवासींकडून निषेध

$
0
0

कठोर कारवाईच्या मागणीसाठी काढला मोर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बुलडाणा जिल्ह्यातील निंबाजी कोकरे अनुदानित आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींवर पास्को कायद्याअंतर्गत कारवाई करून या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. कोपर्डी व तळेगाव प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

महादेव कोळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करीत, दोषींवर पास्को कायद्यांअतर्गत कारवाईची मागणी केली आहे. सदरील शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, आश्रमशाळेत दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील विद्यार्थीनांच प्रवेश देण्यात यावा, विद्यार्थ्यांची नियमित तपासणी व्हावी, नियमीत क व ड श्रेणीत येणाऱ्या आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, रिक्त पदे भरावीत अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्याता आल्या आहेत. सोबतच कोपर्डी व तळेगाव येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींनाही कडक शिक्षा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त आय़ुक्तांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला १७ कोटींचा जॅकपॉट

$
0
0

कर संकलनातून मिळाला निधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटांच्या रूपात पालिकेच्या तिजोरीत गेल्या सहा दिवसांत करदात्यांनी भरभरून दान टाकल्याने पालिकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी रुपये जमा झाले आहेत. सहा दिवसांच्या बॅकअपमुळे घरपट्टीच्या वसुलीने ५० कोटींचा आकडा ओलांडला असून, ही वसुली ५७ कोटींवर पोहचली आहे, तर पाणीपट्टीची वसुली १३ कोटींवर गेली आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मंगळवारपासून सुरू होणारी वॉरंट बजावण्याची मोहीम तूर्तास लांबली आहे. नोटाभरण्यासंदर्भात मुदत वाढल्याने पालिकेनेही कारवाईचा हात आखडता घेतला आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर म्हणून स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांचा भरणा करण्यासाठी हजार व पाचशेच्या नोटांचा पाऊस पाडला आहे. गेल्या सहा दिवसांत पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टीसह एमटीएस आणि विकास शुल्काच्या रूपात विक्रमी वसुली झाली आहे. दररोज तिजोरीत होणारी पंधरा ते वीस लाखांची वसुली थेट कोटींवर गेली आहे. गेल्या सहा दिवसांत पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीतून ९ कोटी ७० लाख, पाणीपट्टीतून २ कोटी १२ लाख, विकास शुल्कातून ३ कोटी १८ लाख व एमटीएसची भरणा एक कोटी ८७ लाखांपर्यंत गेला आहे. त्यामुळे सहा दिवसांत पालिकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटींचा भरणा झाल्याने पालिका मालामाल झाली आहे. घरपट्टीचे उद्दिष्टे ११५ कोटींचे होते. परंतु, पाचशे व हजाराच्या नोटांमुळे घरपट्टीची वसुली ५७ कोटींपर्यत पोहचली आहे. तर पाणीपट्टीचे उद्दिष्टे हे ५५ कोटी होते, या भरण्याने ही वसुली १३ कोटी १५ लाखांपर्यंत पोहचली आहे. मंगळवारी घरपट्टीतून पालिकेला ५६ लाख, तर पाणीपट्टीतून १५ लाखांची वसुली झाली आहे. आता केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पालिकेच्या कार्यालयांमध्ये नियमीत भरणा करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास शेवटचे तीन ते चार दिवस वेळ वाढवू, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

मतदार याद्यांचा खोळंबा

महापालिकेच्या विविध कर विभागाच्या कर्मचा-यांवर एकाच वेळी वसुली कऱण्यासह निवडणूक याद्या फोडण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे मूल्य निर्धारण व कर संकलन विभागाकडे जप्ती वॉरंट बजावण्यासाठी कर्मचारीच शिल्लक नाहीत. १० हजार रुपयांवरील थकबाकीधारकांची संख्या १७ हजारांच्या वर आहे. तर जवळपास ६० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे आजपासून जप्ती वॉरंट काढले जाणार होते. परंतु, कर्मचारीच नसल्याने जप्तीवॉरंट कोण बजावणार अशी स्थिती कर संकलन विभागाची असून कर्मचा-यांअभावी जप्ती वॉरंट मोहीम आता ऱखडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images