Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोदेची स्वच्छता हातानेच! कोट्यवधींचे रोबोटिक मशिन ठरले फोल

$
0
0

कोट्यवधींचे रोबोटिक मशिन ठरले फोल; नदीवर प्रदूषण मापक बसवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह उपनद्यांची स्वच्छता करून त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून विकत घेतलेले रोबोटिक मशिन फोल ठरल्याची कबुली आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीच दिली आहे. त्यामुळे नदीतील पाणवेली काढण्यासाठी आता मनुष्यबळाचा वापर केला जाणार असून, त्यासाठी छोटे-छोटे ठेके दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाणवेलीच्या एकाही ठेक्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रोबोटिक मशिनच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नुकताच मंजूर केलेला अडीच कोटींचा प्रस्तावही वादात सापडला आहे.


गोदावरीची स्वच्छता करण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्या काळात पाच कोटी रुपये खर्चून परदेशातून रोबोटिक मशिन खरेदी करण्यात आले होते. ही मशिन खरेदी चांगलीच वादग्रस्त ठरली होती. परंतु, तरीही ती खरेदी करण्यात आली होती. आता या मशिनद्वारे पाणवेली काढणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. या मशिनकडून केवळ नदीतील गाळच काढला जात आहे. नदीची स्वच्छता करता येत नाही. नुकतेच मशिनची देखभाल व दुरूस्तीसाठी अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. परंतु आयुक्तांनीच रोबोटिक मशिनद्वारे स्वच्छता होत नसल्याची कबुली आता दिली आहे. पाणवेली काढण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या पाणी संथ असल्याने पाणवेलींसाठी हा पोषक काळ आहे. त्यामुळे वेली काढण्यासाठी आता वेगवेगळी कामे दिली जाणार आहेत. सध्याच्या १९ किलोमीटर अंतरावरील टेंडरचे तीन ते चार तुकडे केले जाणार असून, मनुष्यबळातर्फे हे काम केले जाणार आहे. शक्य झाल्यास पूर्वीप्रमाणेच मजूर संस्थांना हे काम दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकताच मंजूर केलेला देखभाल व दुरूस्तीचा प्रस्तावही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

वायू प्रदूषणाप्रमाणेच गोदावरी नदीचे प्रदूषण दररोज कळावे यासाठी गोदावरीत आनंदवल्ली, रामकुंड व दसकपंचक या ठिकाणी हे प्रदूषण मापक यंत्र बसविले जाणार आहेत. अशा प्रकारच्या यंत्राचा शोध घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दररोज नदीतील पाण्याचे प्रदूषण किती, याची अपडेट माहिती पालिकेसह नागरिकांना व्हावी यासाठी हे यंत्र बसविले जाणार आहे. गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात दररोज आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु, हे यंत्र बसवल्यानंतर रोजची स्थिती समजणार आहे.


नंदिनी, वाघाडीसाठी यंत्राचा वापर

महापालिकेने पाच कोटी रुपये देवून खरेदी केलेले रोबोटिक मशिनच्या मदतीने गोदावरीप्रमाणेच नंदिनी व वाघाडीचा गाळ काढला जाणार आहे. या दोन उपनद्यांमध्येही गाळ साचला आहे. हा गाळ या रोबोटिक मशिनच्या मदतीने काढला जाणार आहे. मशिनद्वारे स्वच्छता करता येत नसली तरी ते गाळ काढण्यासाठी उपयुक्त असून, त्याचा योग्य वापर केला जाणार असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आश्रमशाळांची आजपासून तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या तपासणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आठवडाभरात ही तपासणी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत. सुमारे ३० पथकांच्या मदतीने ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ८२ आणि खासगी अनुदानित ७९ आश्रमशाळा आहेत. या सर्व आश्रमशाळांसाठी सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते. मात्र तरीही मुलींना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो, अशा तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ही तपासणी अतिशय पारदर्शकपणे व्हावी आणि आश्रमशाळांची वास्तव स्थिती पुढे यावी, या उद्देशाने ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ही तपासणी लवकरात लवकर करून सरकारला अहवाल सादर करावा लागणार असल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अधिकारी उपस्थित होते.

३० पथकांवर जबाबदारी

नाशिक आणि कळवण अशा दोन विभागांत ३० पथकांवर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये चार ते पाच सदस्य असणार आहेत. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस व जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

तपास पथकाला केलेल्या सूचना

आश्रमशाळातील विद्यार्थिनींशी अगोदर मैत्री करा, त्यांना विश्वासात घ्या, जमले तर त्यांच्यासोबत जेवणही करून त्यांना आपलेसे करा. अधिकाधिक वास्तवदर्शी माहिती काढून ती सादर करा असे आदेश या पथकांना देण्यात आले आहेत. आठवडाभरात तपासणीचे काम पूर्ण करून २२ नोव्हेंबरपर्यंत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अशासकीय सदस्य हवा

या पथकामध्ये सर्वच सरकारी नोकरदार असल्याने पाहणी वस्तुनिष्ठपणे होईल का?, याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. आश्रमशाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट झाले आहे. नेमणूक केलेली पथके तपासणी करणार असले तरी त्यातून कितपत सत्यता बाहेर येईल याबाबत साशंकता आहे. वास्तव सरकारपर्यंत जावे यासाठी या पथकांमध्ये अशासकीय सदस्याचाही समावेश असायला हवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटांची छपाई करणारेच नोटांपासून वंचित

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पाचशे आणि हजारांच्या चलनी नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा छापणाऱ्या प्रेस कर्मचाऱ्यांचाही नोटा मिळविण्यासाठी आटापिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. दररोज समोर नोटा असतानाही नोटा छापणाऱ्या प्रेस कर्मचाऱ्यांनाही पैशांसाठी प्रेसमधील एटीएम व पोस्टात रांगा लावाव्या लागत आहेत. प्रेस कामगारांनाही रांगेत पाहून सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नाशिकरोड येथे देशाच्या चलनी नोटा छापण्याची प्रेस आहे. याशिवाय पासपोर्ट, स्टॅम्पचीही छपाई येथील प्रेसमध्ये होते. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने देशाच्या चलनातुन ५०० व १००० रुपये मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गुरूवारपासून सामान्य नागरिकांची ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकेत भरुन पुन्हा पैसे काढताना चांगलीच दमछाक झाली आहे. विशेष म्हणजे या चलनी नोटा छापण्यासाठी ज्यांना घाम गाळावा लागत असतो त्या नाशिकरोड प्रेसमधील कामगारांनाही नोटा मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. काही दिवसांपर्यंत मर्यादीत प्रमाणातच रक्कम काढता येणार असल्याने प्रेस कामगारांच्या एटीएम सेंटरवर दररोज लांबच लांब रांगा लागत आहेत. स्वतः नोटा छापण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्यांचा नोटा प्राप्त करण्यासाठी सुरू असलेला आटापिटा बघून सामान्य नागरिक आश्चर्य करत आहेत.

दरम्यान, सकाळी लवकर कामावर हजर राहणारे प्रेस कामगार जेवणाच्या सुटीचा वापर एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी करीत आहेत. मात्र अनेकदा खूपवेळ रांगेत उभे राहूनही कामगारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. प्रेसच्या ग्रीन गेटजवळ असलेल्या पोस्टातही ठराव‌िक रक्कमच उपलब्ध होत असल्याने प्रेस कामगारांना पुरेशी रक्कम मिळत नसल्याचे प्रेस कामगारांनी सांगितले.

छोट्या नोटांची छपाई जोरात

नाशिकरोड : सरकारने सुट्या नोटांची लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आपले धोरण बदलले आहे. नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये कमी किमतीच्या नोटांच्या छपाईवर भर दिला आहे. नाशिकरोड प्रेसमध्ये युध्द पातळीवर काम सुरु असून, आठवडाभरात एक कोटी नोटा पाठविल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत ३७ दशलक्ष नोटा पाठविण्यात आल्या. देशातील देवास, म्हैसूर व सालबोनी येथील प्रेसमधून अशाच प्रकारे छोट्या नोटा छपाईवर भर दिला जात आहे, अशी माहिती जगदीश गोडेसे व ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूबाधितेवर उपचारास डॉक्टरचा नकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील एका बालरोगतज्ज्ञाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नाकारून डेंग्यूबाधित एका रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. हातात सुटे पैसेच नसल्याने वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रुग्णाला अन्य दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले.

जुने धुळे परिसरातील निकिता खैरनार (वय १०) या बालिकेला गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने तिला तिचे वडील विश्वनाथ पंडित खैरनार यांनी उपचारासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील रुग्णालयात नेले होते. या रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवार १४ रोजी, निकिताला उपाचारासाठी दाखल करून घेतले आणि सातशे रूपये भरण्यास सांगितले. मात्र, तिच्या नातेवाईकांकडे पाचशे व हजाराच्याच नोटा असल्याने डॉक्टरांनी या नोटा घेतल्या नाहीत. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकिताच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आवश्यक खर्चाची रक्कम डॉक्टरांनी पाचशे व हजाराच्या नोटामध्ये न स्वीकारता मुलीच्या नातेवाईकांना रुग्णालयातून हाकलून दिल्याचे सांगण्यात आले. अखेर मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रुग्ण मुलीला अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, तक्रार अर्जावर चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन‍् ‘झोपी गेलेला जागा झाला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रत्येक माणसाला दोन रुप असतात. त्यात एक मन वाईट गोष्टींकडे तर दुसरे चांगल्या गोष्टींकडे झुकत असते. दैनंदिन जीवनात समाजात वावरणाऱ्या माणसांच्या काही सुप्त इच्छा असतात. ज्या कायम त्याने दडवून ठेवलेल्या असतात. आपल्या इच्छेनुसार जगण्याची तो हिमंतच करू शकत नाही. मात्र अशा वेळी संमोहनशास्त्राचा वापर करून ते दडलेलं व्यक्तिमत्त्व आणि इच्छा जागृत झाल्या आणि त्यानुसार तो जगू लागला तर नक्कीच त्याच्या दैनंदिन जीवनावर, कुटूंबावर त्याचा परिणाम होणार. पण जर त्यांची दोन व्यक्त‌िमत्त्व जर सतत त्यांच्यात डोकावू लागली तर त्याची उडणारी तारांबळ ही कशी मजेदार होऊ शकते हे ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकातून दाखविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनाच्या वतीने आयोजित ५६ व्या राज्य नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत बुधवारी बबन प्रभू लिखीत झोपी गेलेला जागा झाला हे नाटक सादर झाले. हे नाटक धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेतर्फे प्रस्तुत करण्यात आले. मुकेश काळे यांनी दिग्दर्शन केले.

दिनेश नाडकर्णी हा बँकेत वरिष्ठ कॅशिअर म्हणून काम करीत असतो. दिल ए जलाल हा त्याला संमोहीत करतो. तेव्हा त्याचे दडलेले व्यक्त‌िमत्त्व आणि इच्छा जागृत होतात. त्याच्यात झालेल्या बदलामुळे त्याच्या पत्नीला त्रास होतो. त्याच्यात झालेला बदलामुळे तो बँकेत दुपारच्या जेवणासाठी बसलेला असताना त्याल बँकेची तिजोरी उघडी दिसते. त्या उघड्या तिजोरीतील दहा हजार रुपये घेण्यासाठी त्याचे एक मन तयार होते. दुसरे मन नाही म्हणते. या द्वद्व मनस्थितीत हे पैसे घेऊ नये असे त्याला वाटते. त्यानुसार तो ते पैसे पुन्हा तिजोरीत ठेवतो असे त्याला वाटते. मात्र घरी आल्यानंतर त्याच्या बॅगेत दहा हजार रुपये निघतात. तेव्हा त्याच्या लक्षात येते की तिजोरीत पैशांऐवजी चपात्या ठेवण्याचे लक्षात येते त्याच्या या चुकीमुळे उडणाऱ्या गोंधळाचा फार्स या नाटकातून दिसतो.

अक्षय जाधव, संदीप पाचंगे, अक्षय ताकटे, राहुल मंगळे, सिद्धांत मंगळे, कार्तिक डोंगरे, कुणाल खैरनार, शुभम शिंपी, श्रुती जोशी, प्रियंका पाचंगे, सोनाली साळुंखे, किर्ती पाटील, शितल पाटील, हितेश भामरे यांनी भूमिका केल्या. मुकेश काळे यांनी प्रकाशयोजना केली. सुजय भालेराव यांनी नेपथ्य केले. रजत परदेशी यांनी संगीत दिले. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषा केली. विनोद फरताडे यांची वेशभूषा होती. रुपाली शिंदे, राकेश वाडेकर, चैतन्य मोरे, संजय विसपुते, नीलेश खैरनार, प्रसाद पाटील, अन्सारी अब्दुल, किरण पिसे, नेहा परदेशी यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली.

.....

आजचे नाटक

महेश डोकफोडे लिखित ‘गांधी हत्या आणि मी’

परशुराम साईखेडकर नाटयगृह

सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा बदलण्याबाबतचा निर्णय अर्थमंत्री घेणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकांना पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर राज्यातील जिल्हा बँक अध्यक्षांची तातडीची बैठक मुंबईत प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर जिल्हा बँकांसदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून, मुख्यमंत्री याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. दरम्यान ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा बँकेत ३१२ कोटींची गंगाजळी जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जिल्हा बँकाना पाचशे व हजाराच्या नोटा स्वहकारण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकाच्या अध्यक्षांची तातडीची बैठक मुंबईत झाली. त्यात या बंदीसंदर्भात आक्षेप नोंदव‌िण्यात आले. तसेच दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. फडणवीस यांनी याबाबत आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पाचशे व हजारच्या नोटांचा निर्णय आता अर्थमंत्र्यांकडेच होणार असल्याने राज्यसरकारने आपली जबाबदारी झटकली आहे. जिल्हा बँकाना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. नागरी व जिल्हा बँकाना आरबीआयकडूनच परवानगी मिळते. पंरतु नागरी बँकाना वेगळा न्याय व जिल्हा बँकाना वेगळा न्याय का असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

३१२ कोटी जमा

जिल्हा बँकाना नोटा स्वीकारण्यास मनाई केली असली तरी, नाशिक जिल्हा बँकेत ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान ३१२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील ३०४ कोटी बचत खाते व ठेवी, ४ कोटी पीक कर्ज, ४ कोटी पीक कर्जाचे मुद्दल जमा झाल्याची माहिती दराडे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दोन डस्टब‌िनची सक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात नव्याने घंटागाडी धावण्याची प्रक्रिया एक डिसेंबरपासून सुरू होणार असून, आता कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे दोन भाग करण्यात आले आहे. ओला व सुका कचऱ्यासंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी आता ठेकेदारांवर सोपवण्यात आली आहे. पंधरा दिवसात त्यांनी घरोघरी जनजागृती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान प्रत्येक घरात आता कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार असून, घरात आणि सोसायटीत आता दोन डसबीनची सक्ती कऱण्यात येणार आहे. सहा महिन्यात या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

नवा घंटागाडीचा ठेका दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात ६० घंटागाड्या महापालिकेच्या सेवेत आल्या आहेत. एक डिसेंबरपर्यंत सर्व नवीन घंटागाड्या येणार आहेत. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा असे दोन पार्ट केले आहेत. त्यामुळे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण आता नागरिकांना करावे लागणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी ठेकेदाराने प्रत्येक घरात पत्रक वाटावे अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे. येत्या एक डिसेंबरपर्यंत ही जनजागृती मोहीम राबवावी लागणार आहे.

तसेच ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये दोन स्वतंत्र डसबीन नागरिकांना ठेवावी लागणार असल्यामुळे घरात एक व सोसायटीत एका अशा दोन डसबीन नव्याने विकत घेण्याची जबबादारी नागरिकांवर आली आहे. सहा महिन्यांपर्यत नागरिकांना जनजागृती करून ठेकेदार ओला व सुका कचऱ्याचे स्वतःच वर्गीकरण करणार आहे. परंतु सहा महिन्यानंतर ओला व सुका कचराच घंटागाडी ठेकेदार स्वीकारणार असल्याचे आरोग्य विभागाने स्प्ष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्त कर्मचारी बँकांच्या मदतीला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्यामुळे अचानक वाढलेल्या गर्दीचा बँकांच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकांनी आता नवा फंडा वापरत निवृत्त कर्मचाऱ्यांना मदतीला बोलावले आहे. या कर्मचाऱ्यांचा अनुभव व बँकांविषयी असलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यावर मात करण्यात बँका यशस्वी होत आहेत.

काही बँकांनी आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकत गर्दीवर उपाय शोधला आहे. या कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी नोटा बदलण्याचे काम दिले असून, काही ठिकाणी त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. नव्या तरुणांना तात्पुरते घेऊन त्यांना बँकेची कामाची पध्दत समजावणे व त्यानंतर त्यांना काम करायला सांगणे या स्थितीत शक्य नसल्यामुळे बँकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फोन करुन बोलावले आहे. या कर्मचाऱ्यांना मात्र कामाचा मोबदला म्हणून मानधन दिले जाईल का, याबद्दल माहिती नाही. पण आपल्या बँकेत पुन्हा आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद या सेवानिवृत्तांमध्ये आहे. आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांवर येणारा ताण आपल्यामुळे कमी होत आहे, याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. बँकेने अगोदरच खूप दिले. त्यामुळे अडचणीच्या काळात थोडे काम केले तर काय बिघडले अशी कृतज्ञताही हे कर्मचारी व्यक्त करतात.


गेल्या वर्षी मे महिन्यात मी बँकेतून निवृत्त झालो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता बँकेने मला बोलावून घेतले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सेवेसाठी रुजू झालो आहे.
अशोक बागडे, सेवानिवृत्त मॅनेजर, देना बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर येणार

$
0
0

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर येत हॅटट्रिक साजरा करेन. यात आपणास तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. राज्यात विरोधी पक्ष सत्तेवर असला तरीही आपण सटाणा पालिकेस भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


सटाणा नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदळ व २१ नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दीपीका चव्हाण होत्या. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष मौलाना अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.


तटकरे म्हणाले, सटाणा नगरपालिका व आपले ऋणानुबंध अनेक वर्षांपासून असून मी मंत्री असताना कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी दिला. यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल उभे राहून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. शहराचा मोठा विकास साधत असताना आपणास जाणीव आहे की सटाणावासीय निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


आगामी काळात राज्यातील रोहा, सटाणा, येवला या नगरपालिका राज्यात आदर्श नगरपालिका म्हणून ओळख निर्माण करतील, असे ते म्हणाले. पक्षाने आगामी काळात या शहरात घरकुल योजना साकारण्याचे बघितलेले स्वप्न आपण प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण दिलेल्या या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील यावेळी तटकरे यांनी दिली.


याप्रसंगी सुनील तटकरे यांच्या हस्ते गत पाच वर्षाच्या कार्यकाळात शहरात केलेल्या विकास कामांच्या लेखाजोखा पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आमदार दीप‌िका चव्हाण यांनी आपल्या भाषणात सटाणा शहराचा आगामी काळात विकास करित असताना आपण पालिकेचे पालकत्व घेत असून शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदळ यांनी यांनी आपल्या भाषणात सटाणा शहराचा चेहरामोहरा बदलण्याची आपल्यात क्षमता असून एकवेळ आपणास संधी देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शैलेश सूर्यवंशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनेखरेदीचा मेसेज व्हायरल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयाची नोट चलनातून रद्द झाल्यानंतरही अनेकांना आकर्षित करण्यासाठी सध्या काही मेसेजेस फिरत आहेत. पाचशे आणि हजाराच्या नोटा देऊन सोन्यात चांगली गुंतवणूक करा असे मेसेज फिरत आहेत. या अवैध व्यापाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नोटा बंदीनंतर ज्वेलर्सचा व्यवसाय वाढला आहे. आपला काळा पैसा सोन्यात बदलून घ्या असा मेसेज पाठवून ते जाहिरात करत असल्याचे सांगत माकचे नेते सीताराम येचुरी यांनी संसदेत सरकारवर टीकेचे झोड उठवली. असेच मेसेज नाशिकमध्येही पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या मेसेजेसमध्ये ‘बाय गोल्ड अॅण्ड मेक गुड इन्वेस्टमेंट फॉर युअर फ्युचर’ असे म्हटले आहे. त्यातच पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे आमिष दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात allgold0001@gmail.com हा मेल अॅड्रेसही देण्यात आला आहे.

नोटा रद्द झाल्यानंतर सर्वत्र मोठया प्रमाणात सोने खरेदी करण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र झळकले त्यानंतर याबाबत आयकर विभागाने सर्व्हे सुरू केला. असे असतानाही अशा जाहिराती कोण करत आहे, या जाहिराती फेक तर नाहीत ना, असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना पडले आहेत. त्यामुळे यावर पोलिसांनी सायबर सेलमार्फत चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. नोटा रद्द झाल्याचा अनेकांना फायदाही घेतला. काळा पैसा पांढरा करण्याचा व्यवसायही सर्वत्र तेजीत सुरू आहेत. यात सोन्याच्या काही व्यापाऱ्यांची नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे हा मेसेजची चौकशी केली तर त्यातून बरीच माहिती हाती लागणार आहे.


चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारणे गैर आहे. विविध प्रकारचे आमिष देणारे मेसेज सध्या येत आहेत. या साऱ्या प्रकाराची पोलिसांनी तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे. तेव्हाच या अवैध बाबींना आळा बसेल.

मेजर पी एम भगत, ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता नगररचनाच जबाबदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याच्या पहिल्या टप्प्यात ७३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कारवाईत केवळ नाशिकरोड विभाग शिल्लक असून, उर्वरीत अनधिकृत धार्मिक स्थळांना नोट‌िसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळ काढल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होवून धार्मिक स्थळ उभे राहिल्यास त्याची जबाबदारी नगररचना विभागावर टाकण्यात आली आहे. नगररचना विभागाने या ठिकाणी पुन्हा धार्मिक स्थळ उभे राहू नये याची काळजी घ्यावी, असे आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत.

हायकोर्टाच्या आदेशानुसार सध्या शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालवला जात आहे. शहरातील १२६९ धार्मिक स्थळांपैकी सन २००९ नंतरची ३१४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर डिसेंबरपर्यंत कारवाई करायची आहे. रस्त्यावर असलेल्या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवली जाणार असून, त्यापैकी ७३ स्थळे हटवण्यातही आली आहे. बुधवारी २० धार्मिक स्थळे हटवण्यात आली. त्यामुळे आता केवळ नाशिकरोडची कारवाई शिल्लक आहे.

गुरुवारी नाशिकरोड येथे कारवाई केली जाणार आहे. तसेच सिडकोचीही स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची कारवाई लगेच सुरू केली जाणार आहे. त्या अंतर्गत उर्वरित धार्मिक स्थळांनाही नोट‌िसा देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होवून धार्मिक स्थळ उभे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पुन्हा धार्मिक स्थळ उभे राहू नये याची जबाबदारी आता नगररचना विभागावर सोपवण्यात आली आहे. त्या संदर्भातील आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले असून, नगरररचना विभागाला आता या ठिकाणींवर वॉच ठेवावा लागणार आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा काही उभे राहिल्यास नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत धार्मिक स्थळे उभे राहण्याची शक्यता आता कमी आहे. तसेच सिडकोचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार महापालिकेकडे आल्याने पालिका आता सिडकोतील अनधिकृत धार्मिक स्थळांवरही हातोडा चालविणार आहे.


‘बालाजी’चा दावा फेटाळला

नाशिकरोड येथील बालाजी मंद‌िराचा अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भातील याचिकाकर्ते कैलास मुदलीयार यांचा दावा जिल्हा कोर्टाने फेटाळला असल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली आहे. त्यामुळे महापालिकेकडून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई गुरुवारी केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित धार्मिक स्थळ रस्त्यावरच उभारण्यात आले होते. त्यांसदर्भात महापालिकेने नोटीस दिल्यानंतर विश्वस्तांनी जिल्हा कोर्टात धाव घेतली होती. परंतु जिल्हा कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळावरही हातोडा पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर द्यावी पार्किंग फी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंग फी म्हणून दोन रुपये आकारण्याचा प्रस्ताव कळवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सर्व पूर्तता होऊन पार्किंग फी आकारली जाणार असल्याने गड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक विकासकामांना चालना मिळू शकेल.

राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंग फी आकारण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली असली तरी हा प्रस्ताव तांत्रिकदृष्टा अडचणीत सापडला. ग्रामपंचायतीने थेट प्रस्ताव पाठविण्याऐवजी गट विकास अधिकाऱ्यांच्या अधिकृत पत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आल्याने ग्रामपंचायतीचा पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव पंचायत समिती, जिल्हा परिषद व पुन्हा पंचायत समितीच्या घेऱ्यात सापडला होता.

गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्याच लाखो भाविकांवर प्रतिमाणसी दोन रुपये याप्रमाणे टोल आकारणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. मात्र गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने ग्रामपंचायतीने संबंधित प्रस्तावात सुधारणा करून पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव सादर केला.

मध्यंतरी स्थायी समितीने वाहनातून येणाऱ्या प्रतिव्यक्तीप्रमाणे दोन रुपये आकारण्यास मान्यताही दिली होती. या ठरावाच्या आधारे ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या सुधारित प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मोहोरही उमटविली आहे. मात्र, अंतिम मंजुरी देताना ग्रामपंचायत विभागाने थेट प्रस्ताव घेण्यास नकार देत गट विकास अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत पत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

जिल्हा परिषदेची आणि गटविकास अधिकाऱ्यांची मान्यता घेतली असताना फेरप्रस्ताव सादर करण्याची गरजच काय? असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा तांत्रिक मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश न आल्याने पुन्हा एकदा गट विकास अधिकाऱ्यांच्या अधिकृत पत्रासह ग्रामपंचायतीला फेरप्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर भाविकांना पार्किंग कर लागू होण्याची शक्यता आहे.

सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचा पार्किंग फी आकारण्याबाबतचा फेरप्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याची सर्व पूर्तता ग्रामपंचायतीने केलेली आहे. पंचायत समिती व आपल्या स्तरावर पत्र तयार करीत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्या शिष्टमंडळाला तो देण्यात आला असून, सप्तशृंग गड ग्रामपंचायत मार्फत तो जिल्हा परिषदेला प्राप्त होईल. व पुढील दिशा ठरेल.--तुकाराम सोनवणे, गटविकास अधिकारी, कळवण

----

सप्तशृंग गड ग्रामपंचायतीमार्फत फेरप्रस्तावाची सर्व पूर्तता करण्यात आली असून, पार्कींग फी आकारणी करण्यास मिळाल्याने भाविकांना केवळ प्रतिमानसी दोन रुपये फी द्यावी लागेल. मात्र यामुळे गड ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढीचा फायदा होईल व स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या सेवा सुविधा उपलब्द करून देणे शक्य होईल.-गिरीश गवळी, उपसरपंच, सप्तशृंग गड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा ठेवायच्या कुठं?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीमुळे ग्राहकांकडून स्वीकारण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांनी बँकांच्या तिजोऱ्या भरल्या असून, आता या रद्द झालेल्या नोटा ठेवायच्या कुठे असा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या ५२५ शाखांना या प्रश्नाने ग्रासले आहे. तसेच, ही रक्कम सुरक्षित राहण्यासाठीही त्यांचे अथक प्रयत्न सुरू झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्र‌ियीकृत व खासगी बँकांसमोर रद्द झालेल्या नोटा ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून बँकांत कोट्यवधी रुपयांच्या पाचशे व हजारांच्या नोटा जमा करण्यात आल्या. पण त्या नंतर कोठे पाठवायच्या याचे नियोजन नसल्यामुळे बँकांपुढे पेच निर्माण झाला आहे.

बुधवारी बहुतांश बँकांचे अधिकारी या नोटांचे काय करायचे यासाठी फोनाफोनी व ई-मेल करुन विचारणा करत होते. त्यामुळे त्यांच्यासमोर हा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. येत्या काही दिवसांत त्यातून मोठी वाढ होणार असल्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे जुन्या नोटा व त्यात येणाऱ्या नवीन नोटा यामुळे हा प्रश्न आता गंभीर झाला आहे. स्टेट बँकेच्या जिल्ह्यात ७० हून अधिक शाखा आहेत. नाशिक व इगतपुरी या भागात ३५ शाखा असून त्यांची नोटा साठवणुकीची क्षमता ४०० कोटींच्या आसपास आहे. आज या बँकांमध्ये ७१२ कोटी जमा आहेत. नाशिक शहर व इगतपुरी वगळता ग्रामीण भागातही स्टेट बँकेच्या ३५ शाखा आहेत. येथे ८५० कोटींची क्षमता आहे तर नोटा १३२२ कोटी आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँकेत ८०० कोटींच्या आसपास नोटा आहेत. या बँकांबरोबरच देना बँक, युनियन बँक व इतर राष्ट्र‌ियीकृत बँकांसमोरही हाच प्रश्न आहे. एकाच वेळी पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेकांनी आपल्या खात्यात नोटा भरल्या तर काहींनी त्या बदलून घेतल्या. या नोटांबरोबरच सहकारी बँकांतूनही मोठा भरणा बँकेत झाला. त्यामुळे राष्ट्र‌ियीकृत बँकांसमोरच्या या अडचणी अधिक आहेत. यातून वेळीच जर मार्ग काढला नाही तर बँकेपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

नोटांची काळजी

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्या असल्या तरी त्या सांभाळण्याची मोठी जबाबदारी बँकांसमोर आहे. त्यामुळे या नोटा कुठे ठेवायच्या, त्यांचे बॉक्स करुन त्या कुठे पाठवायच्या असे एक ना अनेक प्रश्न बँक अधिकाऱ्यापुढे आहेत. या नोटांचा हिशोब ठेवून त्या पाठवाव्या लागत असल्यामुळे या नोटांची काळजीही वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट क्रीडा संस्थांचे शहरात पेव!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT

नाशिक : विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग म्हणजे खेळाडू तयार करण्याचा कारखाना, असे समीकरण शहरात फोफावलेल्या बनावट क्रीडा संस्थांमुळे निर्माण व्हायला लागले आहे. देशविदेशातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची उंचावलेली कामगिरीचा सकारात्मक परिणाम पालकांवर झाल्याने त्यांचा ओढा मुलांना क्रीडा प्रशिक्षण देण्याकडे वाढला आहे. मात्र, याचा फायदा घेत शहर परिसरात अनेक बनावट क्रीडा संस्था उदयाला आल्या असून, यांच्यावर कारवाई होत नसल्याने पालकांची लूट सुरु असल्याचे दिसते.

बनावट क्रीडा संघटनांकडून शहरात विविध प्रकारचे सामने भरवून पालकांना राजरोस फसवण्याचा धंदा सुरू झाला आहे. मुलांनी खेळात करिअर करावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र सध्या इन्स्टंटचा जमाना असल्याने अल्पकाळात यश मिळविण्याच्या फंदात पडलेल्या पालकांच्या पाल्यांचे भविष्य टांगणीला लागला आहे. शहरातील बनावट क्रीडा संस्थांकडून शाळांच्या सुट्या संपताच भल्या मोठ्या जाहिराती करून मुलांना अशा शिबिरांकडे आकर्षित केले जाते. शिबिराला प्रवेश घेतल्यास प्रमाणपत्र, मेडल, खेळाचे कीट असे प्रलोभन दिले जात आहे. मात्र प्रशिक्षण देणाऱ्यालाच खेळाचे ज्ञान नसल्याने प्रवेश घेताच मुलांच्या हाती निराशा पडते. आपण फसलो हे इतरांना सांगताही येत नसल्याने याचा गाजावाजाही होत नाही. शहरात अनेक बनावट क्रीडा संघटना तयार झाल्या आहेत त्यांच्याकडून कधीही न ऐकलेल्या खेळांचे प्रशिक्षण आयोज‌ित केले जात आहे. मात्र पालकांमध्ये जास्त पैसे घेऊन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे ग्लॅमर वाढल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

अनेक बनावट क्रीडा संस्थांनी सिडको, सातपूर, अंबड अशा उपनगरांमध्ये आपला विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा घेणाऱ्याला क्रीडा अधिकारी असे संबोधण्यात येत असून, मध्यंतरी एका क्रीडा संस्थेने ‘ऑलिम्पिक’ या शब्दाचा खुबीने वापर करुन स्पर्धांचे आयोजन केले. त्यावेळीही पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले.

(क्रमशः)

सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू

खेळाडूने खेळाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्याला राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. मध्यंतरी नेपाळमधील एका छोट्या संस्थेने क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धासाठी नाशिकचा संघ हा राज्याचा संघ म्हणून निवडण्यात आला होता. या खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा फी घेण्यात आली. तेथून परतल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्यक्षात वर्षानूवर्ष शहरात काम करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थेला याचा थांगपत्ताही लागला नाही.

ऑलिंम्पिक हा शब्दच फार मोठा आहे. काही लोकांना त्याची गहनता समजत नाही. कुणी काहीही शब्द वापरून खेळाच्या स्पर्धा भरवत आहेत. शहरातील बनावट क्रीडा संस्थांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

राजन जोशी, अॅथलेटीक्स कोच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतापर्यंत ६५० कोटींचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर आतापर्यंत नाशिकमध्ये तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांच्या नवीन नोटांचे वाटप करण्यात आले आहे. आज रिझर्व्ह बँकेकडून ३२५ कोटी रुपये मिळणार असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्येही आर्थिक घडी विस्कटली आहे. ही घडी व्यवस्थित बसावी आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६५० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गुरुवारी आणखी ३२५ कोटी रूपये जिल्ह्यासाठी प्राप्त होणार असून त्यांचेही वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही बॅंकांबाहेर नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. हातातील होते नव्हते ते पैसे संपल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी नागरिकांना पैशांची आवश्यकता भासत आहे. पैसे मिळावेत यासाठी लोक अनेक तास बॅंकांबाहेर ताटकळत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते आहे.

जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवरही या निर्णयाचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजार समित्या, बाजारपेठा, मॉल्स अशा सर्वच ठिकाणी सुट्या पैशांअभावी व्यवहार मंदावले आहेत. हे व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चलन पुरवठ्याचे कामही युध्दपातळीवर सुरू आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आतापर्यंत ६५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, या सर्व रकमेचे गेल्या सहा दिवसांमध्ये वितरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जिल्ह्यातील राष्ट्र‌ियीकृत व खासगी अशा ५२५ शाखांमध्ये व पोस्टाच्या ९७ कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जात असून, बदलूनही दिल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील बॅंकांसाठी रिझर्व्ह बॅंकेने आणखी ३२५ कोटी रुपये वितरीत केले असून, गुरुवारपासून या रकमेचे वितरण सुरू होणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांअभावी ठप्प झालेले दैनंद‌िन व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाडमध्ये सापडली ७३ लाखांची रोकड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान निफाड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन कारमध्ये ७३ लाख रूपयांची चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा हाती आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले होते.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असून, निफाड येथील शांतीनगर चौफुली येथील नाकाबंदीत वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी नाशिकहून कोपरगावकडे जाणाऱ्या करोला अल्टीस या कारच्या झडतीत ३२ लाख ९९ हजार च्या पाचशेच्या नोटा तर गुजरातकडून वैजापूरकडे जाणाऱ्या इर्टिका कारमध्ये ४० लाख रूपये झडतीत मिळाले. दोन्ही कारमध्ये एकूण ७२ लाख ९९ हजार रूपयांच्या ५०० च्या नोटांचे बंडल मिळाले आहेत. याबाबत निफाड पोलिसांनी आयकर विभागाला कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी काही दिवसांसाठी पळाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात निर्माण झालेला थंडीचा कडाकाही काहीसा दूर झाला आहे. गेल्या आठवड्यात शहरातील किमान तापमान ९ अंशांजवळ गेले होते. तेच तापमान आता १५ अंशांवर गेले आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार कोल्हापूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्याच्या स्थितीत हवेतील आर्द्रता वाढत असून रात्रीच्या तापमानामध्ये वाढ होत आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. नाशिकमध्ये गेल्या गुरुवारी (१० नोव्हेंबर) ९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. थंडीचा कडाका आणखी वाढून तापमान ५ अंशांपर्यंत जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र, त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पारा अचानक वाढला आहे. रविवारपासून किमान तापमानात लक्षणीयरित्या वाढ होत आहे. बुधवारी नाशिक शहरात १५.६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आगामी एक-दोन दिवस तपमान असेच राहण्याची शक्यता आहे.

गारठे परतणार
पुढील दोन दिवसांमध्ये वायव्येकडून येणारे वारे सक्रिय होऊन तापमान पुन्हा कमी होण्याची शक्यता होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नाशकातील थंडीची लाट पुन्हा येण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे-नाशिक रेल्वेमार्गावर विचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे आणि नाशिक ही औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची शहरे रेल्वेमार्गाद्वारा एकमेकांना जोडण्यावर केंद्रीय मंत्र्यांच्या पातळीवर विचार सुरू झाला आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारताना धुळे ते नाशिक हा रेल्वेमार्ग देखील मार्गी लागू शकतो, अशी आशा आहे.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांत भूमिपूजन करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत दिले होते. त्याबद्दल गडकरींचे आभार मानण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. भामरे यांनी धुळे आणि नाशिक ही शहरे रेल्वेने जोडण्याकडे लक्ष वेधले. त्यावर गडकरी यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगत धुळे-नाशिक यांनाही रेल्वेने जोडण्याचा मानस व्यक्त केला.जेएनपीटी बंदराच्या विकासाबरोबरच तेथून होणार असलेल्या वाहतुकीला सहायभूत ठरेल, असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्याजवळ तयार केले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या ड्रायपोर्टवरील वाहतुकीला उपयुक्त ठरेल या दृष्टीने धुळे-नाशिक ही दोन शहरे रेल्वेद्वारे जोडण्याची नवीन संकल्पना नितीन गडकरी यांनी मांडली आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारांसमोर ‘लेखाजोखा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

‘हा घ्या विकासकामांचा लेखाजोखा’ या पुस्तिकेची सुंपूर्ण सटाणा शहरात चर्चा सुरू आहे. सटाणा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गत पाच वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा असणारा संपूर्ण अहवाल या पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे शहरवासीयांकडून किती प्रमाणात मतांचे दान राष्ट्रवादीच्या पारड्यात पडेल हे येणारा काळच ठरविणार आहे.

सटाणा नगरपरिषदेच्या माध्यमातून सलग तब्बल दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेची सुत्रे हाकली आहेत. यामुळे दहा वर्षांचा कार्यकाळ हा एका पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतो. यामुळे पालिकेतील सत्तेची परंपरा अखंड ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रकाशित केलेला ‘हा घ्या विकास कामांचा लेखाजोखा’ मतदारांच्या किती पसंतीस उतरणार आहे. हे येणारा काळच ठरविणार.

या पुस्तिकेत गत पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्यशासनाच्या माध्यमातून रस्ता अनुदान, १२ वा वित्त आयोग, १३ वा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, नाविन्यपूर्ण योजना, अल्पसंख्याक, सुजल निर्मल, आमदार निधी, अग्शिशामक अभियान, खासदार निधी यांच्या माध्यमातून शहरात केलेल्या विकास कामांचा निधीसह लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. तर विकासकामांच्या छायाचित्र व कात्रणांची रेलचेल आहे. नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, तसेच थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदळ यांचे मनोगत देण्यात येवून जनतेचे लक्ष वेधण्यात आले आहे. राष्टवादीने या पुस्तिकेद्वारे केलेल्या विकास कामांचा ऊहापोह केला असतांना विरोधक आता आपला निशाणा कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षांवर साधणार आहेत याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात रंगली तुल्यबळ लढत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिका निवडणुकीच्या प्रभागातील तुल्यबळ लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. ५ हा अत्यंत प्रतिष्ठेचा ठरणार आहे. या प्रभागात माजी नगराध्यक्षांना पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी व सर्वसामान्य भाजपा पदाधिकाऱ्यांशी लढत द्यावी लागणार आहे.

शहरातील प्रभाग ५ अ हा अनुसुचित जमाती महिला व ५ ब हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरातील अत्यंत मध्यवर्ती परिसरातील नववसाहतींमधील परिसराचा या ठिकाणी समावेश होतो. या प्रभागात सुमारे २६७२ इतके मतदार आहे. त्यात पुरूष मतदार १६०० तर महिला मतदार १६३७ आहेत.

५ अ या अनुसुचित जमाती महिला राखीव प्रवर्गातून राष्ट्रवादीकडून ज्योती कैलास साळुंके, भाजपकडून लता अशोक सोनवणे व विकास आघाडीकडून नर्मदा सुरेश सोनवणे या उमेदवारी करित आहेत. यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना रंगणार आहे. तर ५ ब या पुरूष सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष पांडुरंग काशिराम सोनवणे, काँग्रेसकडून पालिकेतील सेवानिवृत्त अग्निशामक वाहनचालक दिनकर रघुनाथ सोनवणे, भाजपकडून शिवाजी प्रभाकर सोनवणे यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. भास्कर सोनवणे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ऐनवेळीस विकास आघाडीकडून उमेदवारी मिळविली आहे. तर नंदकिशोर सुभाष सोनवणे हे या ठिकाणी अपक्ष उमेदवार लढत देत आहेत.

या प्रभागात मराठा समाजाबरोबरच मराठेतर आदिवासी समाजाची एकगठ्ठा मते मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे कोण उमेदवार या ठिकाणी सरस ठरणार हे सांगणे कठीण आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसोबत भाजप या ठिकाणी तुल्यबळ लढत देत आहेत. पुरूष प्रवर्गातील सर्वच उमेदवार मराठा समाजाची असल्याने मत विभागणीदेखील होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी या प्रभागातून कोण डार्क हॉर्स ठरणार आहे हे काळच ठरविणार आहे. पुरूष गटातील सर्वच उमेदवारांचा या ठिकाणी जनसंपर्क दांडगा असून, तुल्यबळ लढती या प्रभागत असल्याने सटाणा शहरवासियांचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images