Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बिबळ्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू

$
0
0

लासलगाव : शिंगवे (ता. निफाड) येथे मंगळवारी सायंकाळी बिबळ्याने पुन्हा एका मुलीवर हल्ला करून ठार केले. शनिवारीच बिबळ्याने हल्ला करून एक दहा वर्षीय मुलाचा बळी घेतला होता. चार दिवसातली ही दुसरी घटना आहे. शिंगवे गावात पाटील मळा परिसरात राहणारे माणिक नामदेव मोगल यांच्या शेतावर मजुरी करणाऱ्या कामगाराची सहा वर्षांची मुलगी दीपाली रामकृष्‍ण कोठे ही घराबाहेर खेळत असताना तिच्यावर दबा धरून बसलेल्या बिबळ्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


LED स्क्रीन वर्तविणार अचूक दर्शन घटिका

$
0
0

पर्वणी दरम्यान त्र्यंबकराजाच्या दरबारी नियोजन

प्रवीण बिडवे, नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य पर्वणीवेळी येणाऱ्या प्रत्येकालाच कुशावर्तात डुबकी मारून पापक्षालन करण्याची आणि त्र्यंबकेश्वरचरणी माथा टेकविण्याची ओढ असेल. दर्शनबारीत थांबल्यानंतर मंदिर अथवा कुशावर्तापर्यंत पोहोचण्यास नेमका ‌किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज एलईडी स्क्रीन सिस्टमद्वारे भाविकांना दिला जाणार आहे. त्यामुळे दर्शनबारीत थांबावे की, दुरूनच दंडवत करून परतीच्या प्रवासाला लागावे याचा निर्णय घेणे भाविकांना घेणे सोपे होणार आहे.

मोठमोठाल्या रांगांमुळे दर्शनासाठी नेमकी किती प्रतीक्षा करावी लागेल याचा अंदाजच येत नाही. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यात काही तास निघून जातात. सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वरमध्ये जनसागर लोटणार असल्याने काही किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागू शकतात, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे याचा अंदाज भाविकांना यावा यासाठी बसस्थान, रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला २० तर नाशिकमध्ये ५२ एलईडी स्क्रीन बसविले आहेत. २९ ऑगस्टची पर्वणी असली तरी दुसऱ्या दिवशीही कुशावर्तावर स्नान सुरू राहण्याची शक्यता असल्याने भाविकांनाही रांगेत थांबावे की, पुढच्या मार्गाला लागावे याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.

भाविकांची गैरसोय टाळणे त्यांना दृश्य माहिती देत राहणे हा एलईडी स्क्रीन बसविण्यामागील उद्देश आहे. अनेक भाविकांचे रेल्वेचे, बसेसचे आरक्षण असेल. रांगेत थांबावे की, नाही याचा अंदाज त्यामुळे भाविकांना येईल. मात्र रामुकंडावर येण्यासाठी अनेक रस्ते असल्याने असा अंदाज येणे कठीण आहे. - दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FM च्या शर्यतीत नाशिकचा वरचष्मा

$
0
0

दहा कोटींची बोली; इतर १३ शहरांना प्रतिसाद नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगाने विकसीत होणाऱ्या नाशिक शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खासगी रेडिओस्टेशन्स (एफएम)साठी नाशिकला मोठी पसंती असल्याचे पुढे आले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेत नाशिकच्या एफएम स्टेशनसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर नाशिककडे अनेकांच्या नजरा आहेत. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटन अशा विविध टप्प्यांवर नाशिकचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात नाशिकच्या आधुनिक जीवनशैलीची दखल खासगी कंपन्यांनीही घेतली आहे. त्यामुळेच नवीन खासगी एफएम स्टेशन्स नाशिकला येऊ घातली आहेत. यंदाच्या वर्षी नाशिककरांना दोन एफएम स्टेशन्सची मेजवानी मिळणार असल्याचे वृत्त 'मटा' मध्ये १ जानेवारीलाच देण्यात आले होते.

केंद्र सरकारने खासगी एफएम स्टेशनला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्टेशन्सला आवश्यक ती फ्रिक्वेन्सी (वारंवारता) देण्याच्या प्रक्रियेत संबंधित कंपन्यांकडून बोली लावली जात आहे. नाशिकच्या स्टेशनसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली आहे. विशेष म्हणजे, आसनसोल, गुलबर्गा, मंगळुरु, म्हैसूर, पुडुच्चेरी, राजमुंद्री, सिलिगुडी, तिरुची, तिरुनवेली, तिरुपती, तुटीकोरीन, विजयवाडा आणि वारंगल या १३ शहरांना कंपन्यांचा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. जयपूरसाठी २५ कोटी, चेन्नईसाठी ४४ कोटी, पुण्यासाठी ३६ कोटी, चंदीगडसाठी १७ कोटी, कोचिनसाठी ११ कोटी तर नाशिकसाठी १० कोटी २० लाख ५१ हजार ७५६ रुपयांची बोली लावण्यात आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या एफएम स्टेशनसाठी गेल्यावेळी झालेल्या बोलीच्या कित्येक पट यंदा अधिक बोली लागत असल्याने नाशिकचे महत्त्व वाढल्याचे अधोरेखित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट लॉरेन्सची फीवाढ मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट लॉरेन्स शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्षात केलेली फी वाढ पूर्णत: मागे घेण्यात आली आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

शांततेच्या वातावरणात ही चर्चा पार पडली. या बैठकीत नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी मागील वर्षाप्रमाणेच फी घेतली जाईल, असे संचालिका नलिनी दत्ता यांनी मान्य केले. पुढील वर्षासाठी शुल्क नियमन कायद्यातील तरतुदींनुसार फी निश्चित केली जाईल, असेही दत्ता यांनी म्हटले आहे. या चर्चेला शाळा व्यवस्थापनातर्फे शाळेच्या विश्वस्त नलिनी दत्ता व मुख्याध्यापिका माधुरी कसबे, मंचातर्फे अध्यक्ष श्रीधर देशपांडे, उपाध्यक्षा छाया देव, सचिव डॉ. मिलिंद वाघ, दीनानाथ चौधरी व सचिन मालेगांवकर उपस्थित होते. पालकांचे प्रतिनिधित्व राजेंद्र आव्हाड, शरद जोंधळे, मनिषा देवरे, रुपाली बच्छाव, विद्या वाकचौरे यांनी केले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून सेंट लॉरेन्स ही शाळा अवास्तव फीवाढ करीत होती. सन् २०१५-१६ साठी शाळेने १९० रुपये (मागील वर्षाच्या तुलनेत १३%) फीवाढ जाहीर केली होती. पालकांनी त्याविरुद्ध

मनपा शिक्षणमंडळाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर शाळेने फीवाढ ४० रुपयांनी कमी करण्याची तयारी दाखवली. पण पालकांना हे मान्य नव्हते. यापुढे शाळेला पालकांकडून सकारात्मक गोष्टीसाठी नेहमीच सहकार्य केले जाईल आशी ग्वाही पालकांच्या वतीने राजेंद्र आव्हाड, संदीप जोंधळे, देवेंद्र कुलकर्णी व काळू बच्छाव यांनी दिली. शिक्षणाधिका ऱ्यांनी या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका पार पाडल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

२८५० पालकांना दिलासा

आंदोलनाद्वारे फी वाढ कमी झाल्यामुळे या शाळेतील सुमारे २८५० पालकांचा एकूण सुमारे ८० लाख रुपयांची आर्थिक बोजा कमी झाला आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनेकांचा हातभार लागला. भावना जाधव, संगीता विसपुते, सौ. जोंधळे, सौ. परिहार, अनिता बडगुजर, आंधळे आदी पालकांनी प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता मायको हॉल येथे पालकांचा विजय मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्याला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय-लेकाच्या भेटीने सारेच गहिवरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दोन्ही बछडे पिंजऱ्यात अडकल्याने मादी बिबट्याची अन् त्या पिलांची घालमेल सुरू होती. एका बछड्याने पळ काढल्यानंतर ते आईजवळ पोहोचले. अखेर दुसऱ्या पिलाच्या शोधात मादी बिबट्या दुसऱ्या बछड्यासह पिंजऱ्यात बंदिस्त झाले. पिंजऱ्यातील बछडे जवळ येताच बिबट्याने त्याला चाटत अंगावर खेळविले. दूध पाजून त्याला कुशीत घेतले. आई शेवटी आई असते मग, ती खुल्या जगात असो किंवा बंदिस्त पिंजऱ्यात. तिला आपली पिलं भेटल्यावर आनंद तर वाटणारच. हे दृश्य पाहून उपस्थित वन विभाग कर्मचारी व नागरिकांनाही गहिवरून आले.

एका पिलाला सुरक्षित ठिकाणी ठेऊन दुसऱ्याला नेण्यासाठी गेल्यानंतर स्वतःच पिलासह मादी बिबटा पिंजऱ्यात अडकला. आठ दहा दिवसाच्या विरहानंतर आपली पिलं समोर पाहिल्यावर तिच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळून आले. बछड जवळ टाकताच सुमारे एक तास तिने बछड्याला अक्षरशः चाटून अंगावर खेळविले. एरवी उपाशी असलेले पिल्लू पकडल्यानंतर शांत होते. मात्र आई जवळ जाताच तेही गुर गुरायला लागले.

करंजवन येथे आठ ते दहा दिवसांपूर्वी पकडलेल्या मादी बिबट्याने गेल्या पाच महिन्यापासून लखमापूर, करंजवन, दहेगाव, वागलूद, करंजवन धरण परिसर, अवनखेड, कादवा नदी परिसरात अक्षरशः धुमाळूक घातला होता. वागलूद येथील एका तरुणाला जखमी करून, अनेकांना दर्शन देवून व पायाचे ठसे मिळूनही हा बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने नागरिक दहशतीखाली होते. करंजवन येथील दिलीप शार्दुल यांच्या शेतातील कारंजी नाल्यात मादी जातीच्या बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिला. यावेळी शेतातील कामगार विजय पवार यांनी बिबट्या व पिलांना पाहताच ही बातमी गावातील तरुणांना दिली. यावेळी विजय पवार, प्रमोद शार्दुल, अनिल पिंगळ व गावातील तरुणांनी फटाके व लोखंडी दबडे वाजवत बिबट्याला पळविले. पोत्याच्या साह्याने दोन्ही बछडे पकडून वनविभाग, पोलिस निरीक्षक खोडवे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व पंचायत समिती सदस्य गणेश शार्दुल यांच्याकडे दिले. यावेळी रात्री तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचे दोन्ही बछडे पिंजऱ्यात ठेवून बिबट्या पकडण्यासाठी त्याच्याच बछड्यांचा वापर केला. यातील एका बछड्याने पिंजऱ्यातील फटीतून पोबारा करीत बिबट्याकडे गेला. मात्र, पिंजऱ्यातील दुसऱ्या बछड्यांला नेण्यासाठी आलेला बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वनविभाग व नागरिकांना भयभीत करणारा व अनेक शेळ्या, कुत्रे फस्त करणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी करंजवन येथील तरुणांनी अक्षरशः प्राणाची बाजी लावली. मात्र, वन विभागातील एकाही अधिकाऱ्याने या तरुणांचे कौतुक केले नाही. फक्त आयते पकडून दिलेल्या बिबट्याला आम्ही पकडले आस आव आणत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलर पार्कमध्ये महाराष्ट्राला ठेंगा

$
0
0

देशभरातील १५ राज्यांमधील २० पार्कला केंद्र सरकारचे ब‍ळ

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

विविध आघाड्यांवर आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राला सोलर पार्कच्या प्रकल्पामध्ये चक्क ठेंगा मिळाला आहे. सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून प्रस्तावच दाखल झाला नसल्याने देशभरातील १५ राज्यात एकूण २० सोलर पार्क उभारण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

विजेची प्रचंड मागणी आणि त्या तुलनेत अत्यल्प पुरवठा या समस्येला तोंड देतानाच पारंपरिक ऊर्जासाधनांद्वारे होणाऱ्या वीज निर्मितीतून उदभवलेली प्रदूषणाची समस्या अतिशय चिंताजनक आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या वापराला अधिक चालना दिली जात आहे. यासाठीच केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने जवाहरलाल नेहरू सौर मोहिमेअंतर्गत देशात विविध ठिकाणी सोलर पार्क साकारण्याचे निश्चित केले. त्यासाठीच्या मार्गदर्शक तत्व प्रसारित करून प्रस्ताव मागविले. त्यात देशभरातील १५ राज्यांनी स्वारस्य दाखविले. मात्र, राज्य सरकारच्या डुलक्यांमुळे या पार्कसाठी कुठलाही प्रस्ताव गेला नाही. परिणामी, केंद्र सरकारने देशातील २१ सोलर पार्कची यादी जाहीर केली आहे. त्यात गुजरातमध्ये ७०० मेगावॉट, आंध्र प्रदेशमध्ये १५०० आणि १ हजार, उत्तर प्रदेशमध्ये ६००, मेघालयात २०, राजस्थानात ६८० आणि एक हजार मेगावॉटचे दोन, मध्य प्रदेशमध्ये ७५० मेगावॉटचे दोन, कर्नाटकात २ हजार, तामिळनाडूत ५००, पंजाबमध्ये ५०० मेगावॉटचे दोन, तेलंगाणामध्ये एक हजार, केरळात २००, उत्तराखंडमध्ये ३९, अरुणाचल प्रदेशमध्ये १००, नागालँडमध्ये ६० आणि अंदमान निकोबार मध्ये १०० मेगावॉटच्या पार्कचा समावेश आहे. याद्वारे १५ राज्यातील २० सोलर पार्कमधून एकूण १२ हजार ९९९ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार असून या पार्कच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे.

मेडाची अनास्था

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी (मेडा) कार्य करते. पण, मेडाच्याच अनास्थेमुळे केंद्राकडे प्रस्ताव गेला नसल्याचे ऊर्जा क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ सुरक्षेवर ‘स्निपर डॉग्जचा वॉच’

$
0
0

नाशिक व त्र्यंबकमध्ये बॉम्ब तसेच अंमली पदार्थांचा घेणार शोध

प्रवीण बिडवे, नाशिक

सिंहस्थात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांप्रमाणेच डॉग्जची (प्रशिक्षित श्वानांची) फौजही रस्त्यावर उतरणार आहे. राज्यातील विविध शहरांतून तब्बल २५ स्निपर डॉग्ज लवकरच शहरात दाखल होणार आहेत. स्फोटक वस्तू तसेच अंमली पदार्थांचा माग घेण्यासाठी या डॉग्जची पोलिसांना मदत होणार आहे.

सदैव दक्ष असणाऱ्या व इमाने इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या श्वानांचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. संशयास्पद वस्तू हुंगण्याची श्वानांची क्षमता कमालीची असते. त्यांच्या याच वैशिष्ट्याचा फायदा पोलिस खात्याला होतो. म्हणूनच पोलिस दलातील या श्वानांनाही पर्मनंट कर्मचाऱ्यांसारख्याच सेवा, सुविधा पुरविल्या जातात. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी वेगळे तसेच स्फोटके आणि अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वानांची मदत घेण्यात येते. सिंहस्थावर दहशतवादाचे सावट असल्याने पोलिस आतापासूनच विशेष सतर्कता बाळगत आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पर्वणीला ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे नियोजन पोलिसांकडून सुरू आहे. या काळात दहशतवादी हल्ला तसेच घातपाती कारवाया घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. नाशिकच्या बीडीडीएस पथकाकडे दोन श्वान आहेत. मात्र, एकाचवेळी वेगवेगळ्या भागात बेवारस वस्तू आढळल्यास या पथकाची धांदल उडू शकते. म्हणूनच राज्यातून ११ बीडीडीएस पथके बोलावण्यात आली आहेत. त्यामध्ये वाशिम, हिंगोली, ठाणे, अहमदननगर, मुंबई, औरंगाबाद येथील बीडीडीएस पथकांना पाचारण केले आहे. त्यांच्यासमवेत सुमारे २५ श्वान असणार आहेत. ते २४ तास ऑनड्यूटी असणार आहेत. स्फोटकांप्रमाणेच गांजा व तत्सम अंमली पदार्थ शहरात आणली जाऊ नयेत याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात असताना तपासणीसाठी या श्वानांची मदत होणार आहे. पुण्यातील श्वान अकादम‌ीमध्ये त्यांनी नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे.

राज्यातील ११ आणि आपल्याकडील एक अशी १२ बीडीडीएस पथके सिंहस्थात मदतीला असतील. ही पथके अत्याधुनिक सामग्रीने अद्ययावत असणार आहेत. याखेरीज सुमारे २५ स्निपर डॉग्जही आमच्या मदतीला असतील. २० प्रकारची स्फोटके, तेवढ्याच प्रकारचे अंमली पदार्थ ते शोधू शकतात. सुरक्षेसाठी या डॉग्जची मोठी मदत होणार आहे. - सचिन गोरे, एसीपी क्राईम ब्रॅन्च, स्नीपर डॉग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवाई अन् ध्वजारोहणाची उत्कंठा शिगेला

$
0
0

त्र्यंबकमध्ये पंधरा ऑगस्टपासून सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

या आठवड्यात आखाड्यांच्या ध्वजारोहणास प्रारंभ होत आहे. त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांचे ध्वजारोहण तसेच पेशवाई मिरवणूक हे पहिले शाहीस्नानापूर्वीचे खास आकर्षण ठरते. सिंहस्थात स्नान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हेच खरे सिंहस्थाचे दर्शन ठरणार आहे.

प्रत्येक आखाड्यात शासनाने ध्वजस्तंभ दिला आहे. त्याकरिता काँक्रिटीकरण केले आहे. आखाड्याच्या या ध्वजास धर्मध्वजा असे म्हणतात. परकीय आक्रमणांमुळे जर्जर झालेल्या क्षत्रिय राजांचा ध्वज आखाड्यांनी हातात शस्त्र घेवून संरक्षित केला. त्या ध्वजाची स्थापना प्रत्येक कुंभात करून आखाडे पूजन करतात. ध्वज उभारल्यावर आजही आखाडे आवाहन करतात की, कुणी राजा या धर्मध्वजाचे संरक्षण करण्यास समर्थ असेल त्याने हा धर्मध्वज सांभाळावा.

ध्वजारोहणानंतरच आखाड्याच्या कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. आखाड्यांमधील ध्वजारोहणाचा विधीचा प्रयोग त्या त्या आखाड्याच्या पुरोहितांकडे परंपरेने करण्याची प्रथा आहे. त्या प्रयोगात विशिष्ट मंत्रांचे उच्चार करून सर्व प्रयोग आखाड्याच्या श्रीमहंतांच्या अनुमतीने पुरोहित अतिशय काळजीपूर्वक करतात. ध्वज उभा झाल्यापासून लाखो साधू-महंत उपस्थिती लावतात. नित्य पूजाअर्चा सुरू होतात. ध्वजारक्षण करणे, त्याचे पावित्र जपणे हे खास काम असते. सिंहस्थातील अखेरचे शाहीस्नान आटोपले की आखाडे आपल्या धर्मध्वजा उतरवून घेतात. अर्थात तीर्थराज कुशावर्तावर पुरोहित संघाने उभारलेला धर्मध्वज पर्वकाल अखेरपर्यंत म्हणजे साधरणत: तेरा महिने असेल. त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रा स्वतंत्र होत असते. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रेसाठी त्या त्या आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्वर, सचिव आदी सर्व उपस्थित राहतील. मोठ्या संख्येने साधूंचे आगमन शहरात होईल.

येथे सर्वप्रथम श्री तपोनिधी आनंद आखाड्याचे ध्वजारोहण १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याच दिवशी श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचे ध्वजारोहण होत आहे. ध्वजारोहण आखाड्यात धार्मिक विधींनी होत असते. पेशवाई हे सिंहस्थाचे खास आकर्षण आहे. शंखध्वनी आणि तुताऱ्या, भरजरी वस्त्रतील बँड पथक, छत्र, चामरे सोने चांदीच्या अंबाऱ्या आणि धर्मदंड असलेले महात्मा हे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे दर्शन घडविते.

पेशवाईत नागा संन्याशी आखाड्यांचे साधू सामील होत असतात. शाही पर्वणी कालावधीत रस्त्यांची नाकाबंदी तशात भल्या पहाटेची वेळ स्नानासाठी आलेली अलोट गर्दी या कारणांनी सर्वांनाच नागा साधूंचे दर्शन होत नाही. मात्र, पेशवाई दिवसा असते व आखाड्यापासून कुशावर्त तसेच मंदिर असे प्रमुख मार्गावरून मिरवणूक होत असते. भाविकांना साधूंचे दर्शन होते.

ध्वजदंडाची उंची ५२ हस्त

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातून मिळालेल्या माहितीनुसार ध्वजदंडाची उंची ५२ हस्त (हात) आहे. कारण आखाड्यात एकूण ५२ मढ्या (मठ) आहेत. ध्वजाची लांबीचे माप हे अंगुलाच्या परिमाणात असून, प्रचलित परिमाणात ते एकतीस फूट इतके आहे. त्याची उंची दहा फूट आहे. ध्वजपूजन आणी आरोहण हे आखाड्याच्या चारही मढींच्या श्री महंतांच्या हस्ते होत असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मिनिटात मिळणार मदत

$
0
0

सिंहस्थासाठी सहा कायम व चार तात्पुरती अग्निशमन केंद्रे सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे. आपत्तीप्रसंगी किमान दोन ते तीन मिनिटातच तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि वाहनांसह अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी विशिष्ट प्रकारच्या वाहनांची निर्मिती करण्यात आली असून, गल्लीबोळात जाऊन ते परिस्थितीचा सामना करू शकणार आहेत.

दुर्घटनांच्या वेळी सर्वात जलद कृतीची जबाबदारी ही अग्निशामक विभागाची असते. त्यासाठी महापालिकेचा अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे. नाशिक शहरातील सहा अग्निशमन केंद्र तसेच साधुग्राममधील चार तात्पुरत्या अग्निशामक केंद्रांसह विविध भागात दोन पथके कार्यन्वित करण्यात येणार आहेत. फायर इंजिनीअरिंगचा एक वर्षाचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांनाही या कुंभमेळ्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निशामक दलामध्ये क्विक रिस्पॉन्स व्हेईकल्स, ब्रिदिंग ऑपरेटस व्हॅन, रेस्क्यू उपकरणे, अॅडव्हान्स्ड इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन, फ्लड रेस्क्यू व्हॅन आदी वाहने व उपकरणे अग्निशामक दलाच्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत.

नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून ते इतरत्र वळविण्याबरोबरच घाट आणि नदीकाठी पोहणाऱ्यांचे जीवरक्षक पथक फ्लड रेस्क्यू लाँचर, लाईफ रिंग्ज, लाईफ जॅकेट्स, फायबर व रबर बोटस् आदी आवश्यक जीवरक्षक साहित्यासह तैनात ठेवले जाणार आहे. अशा आपत्तीच्या वेळी नागरिकांना एका ठिकाणी जमविण्यासाठी जागेची आणि नंतर पुनर्वसनासाठी स्थळेही निश्चित केली आहेत. गर्दीच्या वेळी अग्निशमन बंब तत्काळ पोहोचण्यासाठी प्रशासकीय राखीव मार्गाचा वापर केला जाणार आहे. शहरातील सहा अग्निशमन केंद्रांबरोबरच कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राम, बाह्य वाहनतळे, अंतर्गत वाहनतळे, भाविक थांबणारे क्षेत्र (स्टेजिंग एरिया) आदी ठिकाणी तात्पुरती अग्निशमन केंद्रे प्रस्तावित केली आहेत. त्र्यंबकेश्वर येथेही अग्निशमन दलाची आठ पथके व एक रेस्क्यू व्हॅन कार्यन्वित करण्यात येणार असून, वाहनतळांवर देखील पथके ठेवण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथील अग्निशामक दलाची सहजबाबदारी एमआयडीसीचे विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

डायल करा १०१ किंवा १०७७

कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली असून, अनेक ठिकाणी या यंत्रणेने मॉकड्रिल घेतले आहे. २१ वर्ष पूर्ण झालेल्या युवा-युवतींना 'स्वयंसेवक' म्हणून एकदिवसीय प्रशिक्षण दिले आहे. आपत्तीच्या काळात अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालिन कक्षात १०७७ या क्रमांकावर हेल्पलाईनवर देखील नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. कुंभमेळा काळात नाशिक अग्निशामक दलाच्या सहाय्यासाठी पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, जळगाव, धुळे, मालेगाव आदी महानगरपालिकांचे तसेच एमआयडीसी, सिडको या प्राधिकरणाचे अग्निशमन बंब त्यांच्या पथकासह उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला सौरधोरणाचा विसर!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

प्रगतीशील म्हटल्या जाणाऱ्या राज्य सरकारकडे सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरणच नसल्याची बाब पुढे आली आहे. इतर राज्यांनी मात्र स्वतंत्र धोरण तयार करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी ठोस कार्यवाही सुरू केली आहे.

देशात औद्योगिक आणि इतर आघाड्यांवर अग्रेसर असलेला महाराष्ट्र मात्र राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीअभावी पिछाडीवर पडतो की काय, अशी साशंकता उपस्थित होत आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील सर्वाधिक क्षमता असलेल्या आणि महाराष्ट्रासाठी अनुकुल असलेल्या सौर ऊर्जेच्या निर्मितीबाबत राज्य सरकारची मोठीच निराशा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारला यासंदर्भात अद्याप धोरण साकारता आलेले नाही. इतर राज्य मात्र धोरण जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करण्यात गुंतल्यामुळे या राज्यांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. केंद्र सरकारने देशात विविध ठिकाणी

सोलर पार्क साकारण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. मात्र, राज्य सरकारकडून त्यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, राज्य सरकारची सौर ऊर्जेबाबतची उदासिनता यातून दिसून येत आहे.

अपारंपरिकचे धोरण जाहीर

राज्य सरकारला आतापर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व कळाले नव्हते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने गेल्या महिन्यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठीचे धोरण जाहीर केले आहे. त्यात पवन, सौर, जल विद्युत, बायोगॅस यांचा समावेश आहे. मात्र, या धोरणात सौर ऊर्जेला तुरळकच स्थान देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारबाबत अपारंपरिक ऊर्जेबाबत सातत्याने चर्चा झाली. मराठवाडा आणि विदर्भात सौर ऊर्जेला प्रचंड वाव आहे. मात्र, हे महत्त्व राज्य सरकारने ओळखलेले नाही.

इतर राज्यांची केवळ सौर ऊर्जेसाठीही धोरण असल्याने अनेक गुंतवणूकदार तिकडे जात आहेत. - डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, सौर तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये जात पडताळणीचे धडे

$
0
0

नाशिक समितीच्या वतीने आजपासून उपक्रमास होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरवर्षी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील कॉलेजेसमधून हजारो जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे समितीकडे येत असली तरीही त्रुटींची पूर्तता करताना या प्रक्रियेत दिरंगाई होते. ही दिरंगाई व पालकांची धावपळ टाळण्यासाठी नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आज (दि. १३) शिबिर होणार आहे. सकाळी ११ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या उपस्थितीत शिबिर होणारआहे. तर मालेगावमधील एम. एस. जी. कॉलेज येथे उद्या (दि.१४) सकाळी ११ वाजता तर ए. टी. डी. हायस्कूल, मालेगाव येथे दुपारी ३ वाजता शिबिर होणार आहे. १२ वी सायन्सच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन नाशिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सायन्स शाखेतून बारावीच्या विद्यार्थ्यांचे सुमारे २० हजार अर्ज वर्षाकाठी प्राप्त होतात. नाशिकसह नगर जिल्ह्याचा यात समावेश आहे. यातील काही विद्यार्थी उशिरानेही अर्ज सादर करतात. यातील अनेक अर्जांमध्ये आढळून येणाऱ्या त्रुटींच्या परिणामी वेळेत निर्णय घेण्यासाठी समितीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येला मुळापासून संपविण्यासाठी शहर आणि तालुकास्तरावर प्रबोधन गरजेचे असल्याचा मुद्दा नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मांडण्यात आला होता. या अडचणींवर मात करण्यासाठी आता जगजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एजंट्सच्या साखळीला ब्रेक?

जात पडताळणीच्या प्रक्रियेत होणारा विलंब लक्षात घेता मोठ्या प्रमाणात एजंट्ससाठी नफेखोरी उकळण्याचा धंदा बनला आहे. यामुळे सामान्य अतिसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांनाही एजंट्सच्या हाती हजारो रुपयांची रक्कम थोपवूनही वारंवार खेट्या घालाव्या लागतात. विद्यार्थ्यांची होणारी ही लूट थांबविण्यासाठी नाशिक समितीने हाती घेतलेली प्रबोधन मोहीम फायदेशीर ठरेल, असा आशावादही विद्यार्थ्यांमधून व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थी हितासाठी सकारात्मक पाऊल

दरवर्षी जात पडताळणीच्या प्रलंबित कामांचा मुद्दा चर्चेत येतो. अनावश्यक कागदपत्रांची जोडणी, आवश्यक त्या कागदपत्रांची अनुपलब्धता आणि अपूर्ण असणाऱ्या त्रुटी या कारणांमुळे बारावी सायन्सनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा अडसर उभा राहतो आहे. हजारो विद्यार्थ्यांची दरवेळी होणारी ही अडचण लक्षात घेऊन सुरू होत असलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने उपायुक्तांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी बल्बचे निकष कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एलईडी बल्बच्या निर्मितीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) निकष जाहीर केले असले तरी हे नियम कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच दर्जाहीन आणि हलक्या गुणवत्तेच्या एलईडी बल्बची बाजारात चलती असल्याचे दिसून येत आहे.

बीआयएसने एलईडी बल्ब उत्पादकांसाठी नियमावली तयार केली आहे. तसेच, केंद्रीय दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ३० उत्पादनांसाठीचे निकषही जाहीर केले आहेत. याअंतर्गत एलईडी बल्बचाही समावेश आहे. तसेच, एलईडी बल्बच्या उत्पादकांना नोंदणी करतेवेळीच हे निकष आणि नियमावली दिली जात आहे, असे बीआयएसने म्हटले आहे. मात्र, हे सारेच नियम केवळ कागदावर राहत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सीएफएल बल्बनंतर आता बाजारात एलईडी बल्बची मोठी खरेदी-विक्री होत आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एलईडी बल्बचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात होते. मात्र, परदेशातून मोठ्या प्रमाणात हे बल्ब विक्रीसाठी येतात. त्यात चीनच्या बल्बचे प्रमाण लक्षणीय आहे. याच बल्बमध्ये बीआयएसचे कुठलेही निकष पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. एलईडी बल्ब हे महागडे असून त्यात फसवणूक झाल्यामुळे काही ग्राहकांनी एलईडीचा पर्याय नाकारला आहे. त्यामुळे बाजारात सध्या विक्रीस असलेल्या एलईडी बल्बच्या विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत टीव्ही आणि विविध माध्यमांद्वारे एलईडी बल्बच्या जाहिराती संबंधित कंपन्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, बीआयएस किंवा सरकारी विभागांच्या कुठल्याही प्रकारच्या निकषांची माहिती यात दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनाही आयएसआय किंवा कुठल्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करायच्या याबद्दल संदिग्धता आहे.

एलईडी बल्बच्या उत्पादकांसाठी आम्ही निकष जारी केले आहेत. त्यांची नोंदणी करतेवेळीच आम्ही ते संबंधितांना सांगतो. आयात होणाऱ्या उत्पादनांबाबत आमच्या दिल्ली ऑफिसकडूनच योग्य ती कार्यवाही केली जाते. - स्मिता नायर, जनसंपर्क अधिकारी, बीआयएस

उत्पादकांसाठी निकष असले तरी त्याचे पालन होते आहे की नाही, याबाबत संभ्रमच आहे. ग्राहकांना अद्यापही कुठल्या मानांकनाचे बल्ब घ्यायचे हे माहित नाही. चीनमधून येणाऱ्या आणि तकलादू गुणवत्तेच्या बल्बचा काय, हा प्रश्न आहेच. - अमित कुलकर्णी, ऊर्जा तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधीचे भंगार जाते कुठे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह यांत्रिकी व विद्युत विभागात तयार होणाऱ्या कोट्यवधीच्या भंगाराचा कधीच लिलाव होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. दरवर्षी कोट्यवधीची विकासकामे करताना निघणाऱ्या साहित्याचा लिलाव कधीच होत नसल्याचे आढळून आले असून, प्रशासनाकडून या लिलावांची माहिती मागवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या विविध विभागांकडून दरवर्षी कोट्यवधीची कामे केली जातात. त्यात यांत्रिकी विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभागमामार्फत ही कामे केली जातात. भूमिगत गटार योजनेचाही यात समावेश आहे. विद्युत विभागामार्फत नवीन पोल बसवतांना जुने पोल काढले जातात. भूमिगत तारा टाकल्या जात आहेत. त्यामुळे पोल व जुन्या तारांचा लिलाव कधीच झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नवीन पाइपलाइन टाकताना काढले जाणारे जुने पाइप कुठे जातात असा सवालही त्यांनी केला. कोट्यवधीची सामग्री भंगारात काढली जात असताना त्याचा जाहीर लिलाव झाल्याचे कधीच ऐकले नाही. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व विभागनिहाय गेल्या तीन वर्षांत निघालेल्या भंगाराची माहिती आपण मागवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास बुधवारी (दि.१२) न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मोहन पांडू गारे (३०, रा. मांडणपाडा, ता. पेठ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी घराजवळ राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस त्याने पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीने तिला हट्टीपाडा, धनशेत, पिंपळद, जानोरी, ननाशी येथे त्याच्या नातेवाइकांच्या घरी नेले होते. या प्रकरणी ९ जून २०१४ रोजी पेठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. गारेसह गोविंद भीमा डगळे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. डगळेने मुलीस लग्न लावून देतो, असे सांगत मोहनसोबत जाण्यास सांगितल्याचा आरोप होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. सुनीता साळवे यांनी आठ साक्षीदार तपासले. सर्व सुनावणीत गारे हा दोषी आढळला, तर डगळे विरोधात पुरावे मिळाले नाही. न्यायालयाने गारे यास १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. डगळे यास पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजाचे देणे’ आज गुणवंतांच्या हाती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या परंतु पुढील शिक्षणासाठी आर्थिकदृष्टया कमी पडत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिकभरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरीत करण्यासाठी आज गुरूवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री मुक्ता बर्वे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांची उपस्थिती राहील. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कविता रंजवे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे हेच ते 'मटा'ने हेरलेले नऊ हिरे आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन यांनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून दाखविले, त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात, योग्य दिशा, भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

'मटा'ने हेरलेल्या या नऊजणांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत, भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे, त्यामुळे 'मटा'तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपूर्व असे यशही लाभले. नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखविली, कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू असे सांगितले. हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे तो वाचकांच्या हातून ओढला जावा असा हेतू होता नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णदेखील झाला आहे.

हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच पण नाशिककरांनीही या हृदय सोहळ्याला उपस्थित राहावे अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ट्रेकिंग’चा गड होईना सर!

$
0
0

अंजनेरीतील प्रकल्पाबाबत पर्यटन विभागाची चालढकल

फणिंद्र मंडलिक, नाशिक

राज्यातील पहिल्या अंजनेरी येथील ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटरचा गड दोन कोटी रुपये खर्चानंतरही विविध अडथळ्यांमुळे दोन वर्षांपासून सर होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. सेंटरचे काम कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे.

महाराष्ट्रात साहसी खेळांना चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला. यासाठी अंजनेरी येथे ६ एकर जागा निश्चित करण्यात आली. यातील ३ एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी व ३ एकर जागा ट्रेकिंग सेंटरसाठी आरक्षित करण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. या क्रीडा संकुलात ऑड‌िटोरियम, म्युझियम, प्रशिक्षणासाठी आलेल्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, उपहार गृह अशी दालने बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र २०१३ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्याला अजुनही मुहूर्त लागलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे सेंटर पर्यटन विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर क्रीडा विभागामार्फत तेथे प्रशिक्षण सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या सेंटरचे काम रडतखडतच सुरु आहे. सेंटरचे काम पूर्ण होण्यास आणखी किती वर्ष लागणार याबाबत प्रश्न निर्माण झाला असून, क्रीडा संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे ‘मिशन महापालिका’

$
0
0

पंधरा दिवसात नवे संघटनात्मक फेरबदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने फेरबदलाला सुरुवात करताच शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी रणनिती आखली असून, प्रथमच मुंबईच्या धर्तीवर शिवसेना निवडणुकीचा सामना करणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील चारही मतदारसंघासह लोकसभा क्षेत्रातील सहा मतदारसंघासाठी नवीन सहसंपर्कप्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. तसेच नवीन वॉर्ड रचनेनुसार प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करून त्यांना शाखा क्रमांकही दिले जाणार आहेत. निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग तयार असल्याची माहिती महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजपने दगा दिल्याने सावध झालेल्या शिवसेनेने मुंबई प्रमाणेच नाशिक महापालिकाही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबईतल्या वॉर्डांमध्ये राबविण्यात येत असलेली रणनितीच नाशिकमध्ये राबविण्याची तयारी संपर्कप्रमुख अजय चौधरींनी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघामध्ये आता सहसंपर्क प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. या बाहेरील सहसंपर्क प्रमुखांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाईल. त्यांची नियुक्ती मातोश्रीवरूनच केली जाणार आहे.

शाखा बनणार शक्तीकेंद्र

मुंबईच्या धर्तीवर शाखा अधिक सशक्त केल्या जाणार आहेत. त्यासाठी वॉर्डनुसार शाखाप्रमुख नियुक्त करून त्यांना क्रमांक दिले जातील. त्या वार्डातच उपशाखाही असतील.कॉलनी प्रमुखही नियुक्त केले जाणार आहेत. तीन शाखा प्रमुखांवर एक उपविभाग प्रमुख, सहा शाखा प्रमुखांमिळून एक विभाग प्रमुख असणार आहे. विधानसभा मतदारसंघात दोन उपमहानगर प्रमुख असणार आहेत. अशा पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून थेट मित्र पक्षांसह विरोधकांचा सामना करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्ड विद्यार्थ्यांसाठी अनिवार्यच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अनिवार्य नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी, शालेय विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्यच असणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिली.

एलपीजी गॅस, स्वस्त धान्य, निवृत्तीवेतन, व्यवहाराच्या नोंदी आदींसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले होते. या निर्णयामुळे सरकारी पातळीवर कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवण्यात येईल, असा सरकारी हेतू होता. मात्र, ही पद्धत देशातील नागरिकांना त्रासदायक ठरल्याने सुप्रीम कोर्टाने यावरील सक्ती बाजूला सारली. या निर्णयानुसार आता शालेय विद्यार्थ्यांचीदेखील आधारकार्ड नोंदणीपासून सुटका मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र शालेय पातळीवर हा निर्णय 'जैसे थे'च राखण्यात आला असल्याने लवकरात लवकर आधार कार्ड काढण्याशिवाय कोणताही पर्याय शाळा, विद्यार्थी व पालक यांच्याकडे उरलेला नाही.

शाळांमध्ये बोगस पट पडताळणीची प्रकरणे अनेकदा उघड झाले आहेत. सरकारी अनुदान लाटण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवत होत्या. तसेच शाळा टिकविण्यासाठीही ते बोगस आकडेवारी सादर करण्याला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढत होते. यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला होता. भारतातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्र या एकमेव राज्यात शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

आधारकार्ड जरी वारंवार सांगितली जात असली तरी अद्यापही सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून पूर्ण झालेले नाही. अद्याप केवळ ५० ते ५५ टक्के विद्यार्थ्यांच्याच आधारकार्डची पूर्तता झालेली आहे. शाळांमध्ये आधारकार्ड काढण्याची सोय करून देण्यात आली असली तरी हे काम संथगतीनेच सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शाळा व प्रशासन खरेच राज्य सरकारच्या निर्णय कितपत गंभीर सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ ऑगस्टपर्यंत आधारकार्ड काढणेचे गरजेचे होते. मात्र अजून एक ते दीड महिना ही प्रक्रिया लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कासवगतीने चाललेल्या या मोहिमेला गती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. इतर कोणत्याही बाबतीत आधार कार्ड अनिवार्य नसले तरी शाळेसाठी ते अनिवार्यच असणार आहे, असे शिक्षणमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शाळेच्या पटसंख्येत पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्डशिवाय पर्याय नाही. सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षणमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयांच्या वस्तूंची वापरापूर्वीच चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिहंस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुविधेसाठी त्र्यंबक रोडलगत एक्स्लो कंपनीच्या भूखंडावर महापालिकेने शौचालयांची उभारणी केली. मात्र, वापर होण्यापूर्वीच या शौचालयातील वस्तूंची चोरी होत आहे. यामुळे पहिल्या पर्वणीपर्यंत तरी शौचालय राहतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकात येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी सुविधा महापालिका उपलब्ध करून देत आहे. सिडको, सातपूरला पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी शौचालये तयार केली गेली. मात्र, या शौचालयांचा वापर होण्यापूर्वीच चोरी होऊ लागली आहे. सातपूर एमआयडीसीतील एक्स्लो कंपनी भूखंडावर महापालिकेने उभारलेल्या ५० शौचालयांच्या प्लॅस्टिकच्या पाईपांची अल्पवयीन मुलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली. पोलिसांनी चोरी करणाऱ्या मुलांनाकडून पाईप जमा केले आहेत. यानंतर अल्पवयीन चोरी करणाऱ्या मुलांच्या आई, वडिलांना बोलावून समज देऊन सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात डेंग्यूचे २४ संशयित रुग्ण

$
0
0

११ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह; स्वाइन फ्ल्यूचीही भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात स्वाइन फ्ल्यू पाठोपाठ डेंग्यूनेही डोक वर काढायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच दहा दिवसातच शहरात २४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यात बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे डेंग्यूचेही संकट गडद होत चालले आहे. सद्यस्थित स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण असून, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले होते. डेंग्यूने तर जिल्ह्यात तब्बल ३३ जणांचा बळी गेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊनही आरोग्य विभाग मात्र कागदावर उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जुलैत शहरात डेंग्यूचे ७७ संशयित रुग्ण आढळून आले होते. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. ऑगस्टमध्ये यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहरात डेंग्यूचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात ११ पॉझिटीव्ह रुग्णांचे अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक रुग्ण वगळता उर्वरित १० रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहे. त्यामुळे डेंग्यू डोके वर काढत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र धूर फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचेही ढिग तयार होत आहेत. त्यामुळे धूर फवारणीवर होणारा खर्च कुठे जातो असा सवाल विरोधी पक्ष करीत आहेत. सिंहस्थात मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने डास प्रतिबंधक फवारणी वाढवण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण

महापालिका हद्दीत गेल्या आठवड्यात स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोबतच या रुग्णांच्या शोधासाठी आरोग्य विभागाने पथकांची स्थापना केली आहे. सिंहस्थात स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढण्याची भिती असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images