Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘ज्ञानेश्वरीतून मूल्यांची शिकवण’

$
0
0
चारशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलेले विचार आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागते. ज्ञानेश्वरीतील विचारांचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होतो.

‘उत्सव समकालीन साहित्याचा’

$
0
0
समकालीन प्रकाशन आणि एचडीएफसी होमलोन्सच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘उत्सव समकालीन साहित्याचा’ हा तीन दिवसांचा साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

$
0
0
नाशिकरोड उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेला खड्डा चुकविताना एक महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. तीचा पती गंभीर जखमी झाला आहे.

ब्रिटीशकालीन बंगल्यास आग

$
0
0
देवळाली कॅम्प येथील उद्योजक आणि शिवानंदा कंपनीचे मालक एम. के. बिरमानी उर्फ महाराज यांच्या लॅमरोडवरील बंगल्याला मंगळवारी सकाळी शार्टसर्किटमुळे आग लागली. जिवीतहानी झाली नसली तर कंपनीच्या इलेक्ट्रानिक मालाचे व बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ईद मुबारक हो!

$
0
0
विश्वात शांती नांदो, एकमेकांमध्ये बंधुभाव जागृत होवो अशी प्रार्थना करीत शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा पावासामुळे इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण न झाल्याने परिसरातील मशिदींमध्येच सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

संजीवकुमार रेसमधून बाहेर?

$
0
0
महापालिकेत कायमस्वरूपी आयुक्तांच्या नियुक्तीबाबत येत्या १ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आयुक्तपदासाठी प्रयत्न करणाऱ्या दिपक कासार यांना आयएएस लॉबीने धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे.

वाइन कॅपिटलची टुरिझमकडे झेप

$
0
0
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकने केवळ द्राक्षनिर्मितीच्या जोरावर उद्योगाची वेगळी वाट चोखाळत वाइन उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली. येथे मोठ्या प्रमाणावर होणारे वाइनचे उत्पादन, वाइनची दर्जात्मक गुणवत्ता आणि सातासमुद्रापार मिळविलेली पसंती यांमुळे नाशिकला ‘वाइन कॅपिटल’ हा सन्मान मिळाला.

वाइन उद्योगापुढील आव्हाने

$
0
0
मुंबई (३९ टक्के), दिल्ली (२३ टक्के), बंगळुरू (९ टक्के) आणि गोवा (९ टक्के) या देशातील चार प्रमुख शहरांमध्ये सुमारे ८० टक्के वाइन रिचवली जाते. उष्णकटिबंध हवामान असल्याने साठवणुकीची कमतरता आणि वाहतुकीच्या सुविधेचा अभाव वाइन मार्केटिंगमधील मोठा अडसर ठरत आहे.

वाइनप्रेमींसाठी खास संशोधन

$
0
0
वाइनप्रेमींना महत्तम आनंद मिळावा आणि वाइनरी टुरिझम वाढीलाही मदत व्हावी यासाठी वाइनचे नवनवीन प्रकार विकसित करण्यावर वाइनरी उद्योगांनी भर दिला आहे. काहीशी गोडसर असलेली दिया रेड वाइन आणि ओक टच असणारी रिजर्व शेनीन ब्लॉक या व्हाईट वाइनचा पर्याय वाइनप्रेमी पर्यटकांसाठी खुला होणार आहे.

आमदार ओवेसीची नाशकात चाचपणी

$
0
0
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुसलमीन पक्षाचे (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गेल्या शुक्रवारी पहाटे जुन्या नाशिकला भेट दिली.

पाण्याचे समान आरक्षण टाका

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण सम प्रमाणात असायला हवे. त्यामुळे सर्वांना सारखे पाणी मिळेल, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी महाराष्ट्र जलप्राधिकरणाकडे दाखल केले आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्राधिकरणापुढे सुनावणी सुरू आहे.

नाशकात धुँवाधार...

$
0
0
श्रावण महिन्याला प्रारंभ होताच पावसानेही जिल्ह्याच्या सर्व भागात धुंवाधार हजेरी कायम ठेवली असून, बुधवारी दिवसभरही हा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरणांची पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढत आहे. मंगळवारी दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पैठणीची दुनिया होणार खुली

$
0
0
विविध प्रकारच्या पैठणी एकाच दालनात असे वैशिष्ट असणारे येवला ग्रामीण पर्यटन केंद्र लवकरच पर्यटकांच्या सेवेत रूजू होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचा शुभारंभ होणार असून, पैठणी क्लस्टरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

गिरणा काठावर सतर्कतेचा इशारा

$
0
0
ठेंगोडा, पुनद, चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा नदीवरील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मालेगावचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संदीप पाटील यांनी केले आहे.

घोटी परिसर जलमय

$
0
0
मंगळवारी रात्रभर आभाळ कोसळल्यागत पावसामुळे घोटी शहर परिसर जलमय झाल्याचे जाणवत होते. मायाबाजार, विजयराज मार्केट, जुने भाजीमार्केट या भागात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने जवळपास ६० ते ७० दुकांनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याची प्रतीक्षाच

$
0
0
निधीअभावी मांजरपाडा प्रकल्पाचे काम दोन वर्षापासून बंद असल्याने येत्या दोन तीन वर्षात तिथून पाण्याचा थेंब जनतेला कसा मिळणार, असा सवाल नांदगाव तालुका जलहक्क संग्राम परिषद व मनमाड बचाव कृती समितीने केला आहे.

हरसूलमध्ये पावसाचा जोर कायम

$
0
0
उशिरा पण जोरदार मुसंडी मारत जुलै अखेर वरूणराजा चांगलाच प्रसन्न झाल्याने हरसूलसह परिसरातील बळीराजा सुखावला आहे. रविवार दुपारपासून शिरू झालेल्या पावसाने बुधवार सायंकाळपर्यंत ५७८ मिमीची नोंद केली. एकाच दिवसात ९४.० मिमी पावसाची नोंद झाली.

मनमाडला ये रे ये रे पावसा

$
0
0
राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असताना आणि अक्षरशः नको नको रे पावसा अशी त्याला विनवणी करण्याची वेळ आलेली असताना मनमाड शहरावर मात्र अपमर्जी दाखविण्याची परंपरा जपत पावसाने पुन्हा मनमाडकरांवर ये रे ये रे पावसा म्हणण्याची वेळ आणली आहे.

सटाणा तालुक्यात बळीराजा सुखावला

$
0
0
सटाणा शहरासह तालुक्यात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात रात्रीपासून संततधार झालेल्या पावसाची ४३.२ मि.मी पावासाची नोंद झाली.

सायखेडा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

$
0
0
आठवड्याभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदीला पूर आला आहे. यामुळे चांदोरी-सायखेडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>