सुलभ हप्त्याने प्लॉट देण्याच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार अंबड पोलिसांना देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी प्राथमिक चौकशी सुरू केल्याचे अंबड पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्लॉट खरेदीच्या आमिषाने फसवणूक
↧
↧
गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या
गारपीटीच्या संकटाने सोमवारी बागलाण तालुक्यात दुसरा बळी घेतला. १०८ रुपये किलोने सौदा झालेली डाळिंब बाग एक रुपये किलोने विकावी लागल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे ६२ वर्षीय शेतकरी बापू रामचंद्र पवार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
↧
आम्हाला गृहीत धरू नका
ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणा ऱ्या ज्येष्ठांकडे ऐवढे दुर्लक्ष का? यामुळे ज्येष्ठांनी मतदानाला अवश्य जायचे पण मतदार यादीतील यापैकी कोणीही उमेदवार आम्हाला मत देण्यास योग्य वाटत नाही. असे मतदान करायचे.
↧
उताविळाची तऱ्हा!
उतावळ्या मंडळींना आपल्या वागण्याचा कधी ना कधी जाहीरपणे फटका बसतोच. परवा एका महाशयांनाही असाच फटका सहन करावा लागला. शहरात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात हे महाशय पोहोचले.
↧
‘केअरटेकर’ व्हायची संधी !
वयानुसार येणारे विविध आजार आणि थकलेल्या शरीरामुळे दैनंदिन कामे पूर्ण न करू शकणाऱ्या ‘आजी-आजोबां’ची काळजी यापुढे प्रशिक्षित केअरटेकर घेणार आहेत.
↧
↧
विद्यार्थ्यांनी साकारली ‘टू व्हीलर अॅम्ब्युलन्स’
आपत्कालीन परिस्थितीत जखमी अथवा गंभीर पेशंटला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात अॅम्ब्युलन्स जीवनदायीची भूमिका बजावते. मात्र, अनेकदा अडी-अडचणींमुळे अॅम्ब्युलन्स घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
↧
‘निफ’ फिल्म फेस्टीव्हल उद्यापासून
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मेट्रो फाउंडेशन ऑफ इंडिया व कलावैभव संस्थेतर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
↧
तहान भागेल पण आरोग्याचं काय ?
घामाच्या धारा, तापलेलं शरीर आणि तहानेनं घशाला पडलेली कोरड अशी अवस्था झाली की ‘किती वाढलाय उन्हाचा तडाखा’, असे शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडतात.
↧
पिंपळगाव बसवंतमध्ये गायीचे तांडव
पिंपळगाव बसवंत शहरात एका मोकाट गायीच्या तांडवाने मंगळवारी अवघ्या शहराला वेठीस धरले. गायीच्या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर जखमी झाले तर किमान पंधरा ते वीस नागरिक किरकोळ जखमी झाले.
↧
↧
शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई द्या
अस्मानी संकटाने बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने भरीव मदत दिली नाही तर शिवसैनिक रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी मालेगावला सरकारविरोधी धरणे आंदोलन करताना दिला.
↧
गारपिटीने फुटले फळ अन् नशीबही
गवंड्याकडे मोलमजुरी करून टँकरच्या पाण्यावर दीड बिगे डाळिंब बाग फुलविणाऱ्या बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील पवार बंधूंवर अस्मानीने जो भयानक हल्ला केला तो पाहिल्यावर मनही हादरून जाते.
↧
त्र्यंबकेश्वरला गंगामाता झाली प्रकट !
त्र्यंबकेश्वर येथे गंगाद्वार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या म्हाळसादेवी मंदिराजवळ जलस्त्रोत आढळला आहे. यामुळे एकूणच गंगामाता प्रकट झाली या चर्चेने जोर धरला असून दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत.
↧
पालकांनीही व्हावे भावनिक साक्षर
‘मुलांचा स्वत:च्या विश्वाभोवती फिरणारा मी अधिक विशाल करून त्याला सामाजिक आयाम कसा देता येइल, या प्रश्नाचे उत्तर शोधत बालकांचे संगोपन करायला हवे.
↧
↧
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेकर शेतीचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील सिन्नर, सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण, येवला, निफाड तालुक्यांचा समावेश आहे.
↧
जाहिरातींची वसुली कागदावरच
जाहिरात फलकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने नुकतेच जाहिरात धोरण आखले. महासभेने जाहिरात धोरणास मान्यता दिली असून, राज्य सरकार यासंबंधी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
↧
‘आप’चा भर ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर
विजयावर दावा सांगणाऱ्या बड्या पक्षांनी हाय टेक प्रचार तंत्राद्वारे पक्षाच्या भुजांमध्ये बळ भरण्याची स्ट्रॅटेजी बाळगली असली तरी ‘आम आदमी’ला लक्ष मानणाऱ्या ‘आप’ ने डोअर टू डोअर प्रचारावर जोर दिला आहे. प्
↧
देव पावो... देव पावो...
गेल्या पंधरवड्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, सिन्नर, निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपिटीनंतर इतके दिवस उलटूनही राज्य सरकार किंवा प्रशासन मदतीसाठी ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन व धरणे आंदोलन केले.
↧
↧
मंदिर प्रकरणाची चौकशी करणार
सातपूर येथील प्रभाग १७ मध्ये झालेल्या पायाभरणीच्या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.
↧
शिवाजी महाराजांना देणार ५१ तोफांची मानवंदना
शिवसेना, मनसे व अन्य संघटनांतर्फे आज (ता.१९) शिवजयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिकरोड आणि जेलरोड येथील शिव पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नाशिकरोड परिसर भगवामय झाला आहे.
↧
आसवांच्या पिकांना मातीमोल भाव
फळबागांना गारपिटीने झोडपले, सरकारने उपेक्षिले, व्यापाऱ्यांनी नागवले, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. फळबागांची व रब्बीची पिके उद्ध्वस्त झाल्यानंतर भाजीपालाही मातीमोल भावात विकला जात आहे. यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
↧
More Pages to Explore .....