रस्ते कामांना प्राधान्य? सत्ताधाऱ्यांनी या अखर्चित निधीतून रस्ते कामांचाही बार उडवण्याची तयारी केली आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात नगरसेवकांना खुश करण्यासाठी २५७ कोटींची रस्ते योजना मार्गी लावली होती. परंतु, मुंढेंनी या रस्ते योजनेला ब्रेक लावून सर्व कामे गुंडाळून ठेवली होती. याउलट नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिले होते. परंतु, आता पुन्हा निधी शिल्लक असल्याचे सांगत, भाजपकडून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची चाल खेळली जात आहे. रस्त्यांचे प्रस्तावही तयार आहेत, तर नगरसेवकांचीही मागणी असल्याचे सांगत, हा विषय पुढे रेटला जाणार आहे. त्यासाठी नगरसेवकांकडून पुन्हा रस्ते कामांचे प्रस्ताव मागवले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना कामे दाखवावी लागणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेतून गेलेले रस्त्याचे प्रस्तावच मदतीला धावणार आहेत. गेले दोन वर्षे महापालिकेत सत्ता येऊनही नगरसेवकांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा डाव असून त्यासाठीची तयारी केली जात आहे. परंतु, याला प्रशासन किती प्रतिसाद देईल यावरच भाजपच्या रस्ते योजनेला यश येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट