Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नामकोसाठी.... टक्के मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ३१० मतदान केंद्रांवर ..... टक्के मतदान झाले. १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी .... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सर्वाधिक मतदान जिल्ह्यातच झाले. जिल्ह्याबाहेरील मतदान केंद्रांवर कमी मतदान झाल्याचे वृत्त आहे. राज्याबाहेर असलेल्या हैदराबाद व सुरत येथील मतदानाची टक्केवारी कमीच होती.

रविवारी सकाळी ८ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली. सकाळी बहुतांश केंद्रांवर मतदान संथगतीने सुरू होते. त्यानंतर टक्केवारी वाढत गेली. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर या निवडणुका होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये सर्वत्र उत्साह होता. नाशिकमध्ये ३१० मतदान केंद्रांपैकी १६२ केंद्रे असल्यामुळे मतदानासाठी चुरसही दिसत होती. कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे मतदान केंद्राजवळील रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे मतदार नसलेल्या नागरिकांचा संताप झाला.

या निवडणुकीत एका मतदाराला २१ मते देण्याचा हक्क असल्यामुळे काही ठिकाणी मतदारांचा गोंधळही उडत होता. सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी ७० उमेदवार असल्यामुळे या जम्बो मतपत्रिकेत १८ मते अपेक्षित होती. त्यापेक्षा जास्त मते दिल्यास ती मतपत्रिका बाद होणार असल्यामुळे मतदार काळजी घेत होते. काहींचा गोंधळ उडत होता. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी ७, तर राखीव गटाच्या एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथील मतदान करणे सोपे होते.

नंबरचा आधार

ज्या मतदारांना एकाच पॅनलला मते द्यायचे होते, त्यांचा गोंधळ कमी होता. पसंतीच्या पॅनलच्या एका चिन्हावर मत देणे सोपे होते. पण, ज्यांना क्रॉस वोटिंग करायचे होते, त्यांनी मात्र नंबरचा सहारा घेतला. सर्व उमेदवारांची नावे लक्षात ठेवणे अवघड असल्यामुळे त्यासाठी चिठ्ठ्या घेऊनच मतदार मतदान केंद्रात जात होते. एका मतदाराला २१ मते द्यायची असल्यामुळे ३ ते ५ मिनिटे वेळ लागत होता. मतदान केंद्रावर मतदानासाठी तीन कक्ष होते. त्याचप्रमाणे दोन पेट्या होत्या. मतदान केंद्रावर काही ठिकाणी वरच्या मजल्यावर मतदान केंद्र असल्यामुळे त्यांना जिने चढणे अवघड होते. त्याचप्रमाणे मतदानाची प्रक्रिया अवघड असल्यामुळे त्यांना मतदान करणे थोडे अवघड जात होते.

कडेकोट बंदोबस्त

नामकोच्या या निवडणुकीसाठी २२०० कर्मचाऱ्यांबरोबरच ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिस मतदान केंद्रावर मतदार जाताना त्याची चौकशी करून त्यांना सोडत होते. मतदान केंद्राच्या रस्त्यावरही बॅरिकेड्स टाकून रस्तेही बंद करण्यात आले होते. या निवडणुकीत सर्व पॅनलने मतदान केंद्राबाहेर बुथ लावल्यामुळे त्यांना मतदान यादीतून नंबर काढणे सोपे होत होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अॅपचा वापर करून मतदान कोणत्या ठिकाणी आहे, हे मतदारांना सांगितले जात होते. बँकेच्या निवडणुकीत मतदानासाठी पैसे मागत असल्याचे चित्र काही ठिकाणी होते. तर काही ठिकाणी पैशांचे वाटप केल्याचीही चर्चा होती.

नाशिकरोडला कमी प्रतिसाद

जेलरोड : नामको बँकेच्या निवडणुकीस नाशिकरोड येथे मतदारांचा कमी प्रतिसाद मिळाला. तीस टक्क्यांपेक्षीही कमी मतदान झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. नाशिकरोडला तीन ठिकाणी मतदान केंद्रे होती. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये दहा खोल्यांची व्यवस्था होती. येथे ५६५७ मतदान होते, पैकी १६४० मतदान झाले. उपनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४६ येथे दोन खोल्या होत्या. येथे १०५० पैकी ३२५ मतदान झाले. गांधीनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४४ येथे चार मतदान खोल्या होत्या. येथे २०५८ पैकी ५९२ मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोडला एकूण ८७६५ मतदान होते, पैकी २५५७ मतदान झाले. थंडीमुळे सकाळी मतदानाला प्रतिसाद कमी होता. त्यामुळे काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी वाहने पाठवून मतदारांना केंद्रावर आणले. सायंकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतपेट्या सील करण्यात आल्या. नंतर खासगी वाहनातून कडेकोड पोलिस बंदोबस्तात त्या मुख्यालयाकडे रवाना करण्यात आल्या.

सातपूरला ४५ टक्के

सातपूर : सातपूला छत्रपती शिवाजी विद्यालयात असलेल्या केंद्रात ४५ टक्के मतदान झाले. सातपूर भागात एकूण ४ हजार २०० मतदान होते. त्यातील पाचशेहून अधिक मतदार हयात नाहीत, तर ७०० हून अधिक मतदार इतर जिल्ह्यांत वास्तव्यास गेल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाली. सकाळी आठ वाजेपासूनच शिवाजी विद्यालयात चोख

पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. ३ हजार २०० मतदारांपैकी १४७१ मतदारांनी मतदान केले.

सटाण्यात ४१ टक्के

सटाणा : सटाणा केंद्रावर ४१ टक्के मतदान झाले. येथील जिजामाता विद्यालयात मतदान केंद्र होते. सटाण्याचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यात प्रगती पॅनलचे महेंद्र बुरड, रंजन ठाकरे व नम्रता पॅनलचे महेश भामरे यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात चुरस होती. सहकार पॅनलचे सचिन कोठावदे दिवसभर या मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी झाली. सटाणा येथील सर्व केंद्रेमिळून १६५४ मतदान झाले.

त्र्यंबकला ३० टक्के

त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक मर्चंटस बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. त्र्यंबकचे दोन उमेदवार रिंगणात होते. नम्रता पॅनलकडून सर्वसाधारण गटात दिलीप मनोहर पवार आणि सहकार पॅनलकडून महिला राखीव गटात रेखा कैलास भुतडा यांनी निवडणूक लढवली. नूतन त्र्यंबक विद्यालय इमारतीमध्ये पाच बुथ स्थापन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ३१५० पैकी ९४० जणांनी मतदान केले. केंद्र अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा आग्रह धरण्यात येत असल्याने वाद उद्भवत होता. बँकेने दिलेले ओळखपत्र अथवा खातेपुस्तक ओळखीचा पुरावा म्हणून नाकारण्यात येत असल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली.

मनमाडला १५९६ मतदान

मनमाड : मनमाडला शांततेत मतदान झाले. सकाळी मतदान प्रक्रिया संथ होती. थंडीचा परिणाम मतदानावर जाणवला. शिवाजी चौक येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्र असल्याने याठिकाणी उमेदवार समर्थकांची गर्दी होती. मनमाड येथील सुभाष नहार व दादा बंब या दोन स्थानिक उमेदवारांमुळे मनमाडमध्ये समर्थकांत उत्साह दिसून आला. मनमाडमध्ये ३५०० मतदार होते त्यापैकी पाच वाजेपर्यंत १५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदगावात व्ही. जे. हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते. एकूण २१४९ मतदारांपैकी ..... मतदान झाले. यावेळी माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदगावमध्ये स्थानिक उमेदवार खंडू दंडगव्हाळ व संजय सानप यांच्यात चुरस दिसून आली.

कळवणला ५३.२४ टक्के

कळवण : कळवण येथे १६६६ पैकी ८८७ म्हणजे ५३.२४ टक्के मतदारांनी हक्क बजावला, तर अभोण्यात ८५४ पैकी ३१६ म्हणजे मतदारांनी मतदान केले. सकाळी ८ वाजेपासून मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. सुरुवातीला थंडीचा परिणाम जाणवत होता. शासकीय ओळ्खपत्राव्यतिरिक्त कुठलेही अन्य ओळखपत्र अधिकारी वर्गाने स्वीकारले नाही. नामको बँक सभासद ओळखपत्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशमुख मराठा वधू-वर मेळावा उद्या

$
0
0

देशमुख मराठा वधू-वर मेळावा उद्या

नाशिक : नाशिक जिल्हा देशमुख मराठा समाजाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवारी (२५ डिसेंबर) सकाळी १० वाजता कालिका मंदिर सभागृह, मुंबई नाका येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजाचे अध्यक्ष फकीर देशमुख भुषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप-अधीक्षक हेमंत सोमवंशी, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शेखर सोमवंशी, नवनाथ हर्बल्सचे संचालक बाळासाहेब देशमुख, देशमुख समाज महिला मंडळ नाशिकच्या अध्यक्षा कामिनी तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातून कोट्यवधींची उलाढाल

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८'मध्ये अवघ्या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी खरेदी करण्यात आल्या असून, ग्राहकांनी प्लॅटसह रो हाऊसच्या खरेदीला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. शहरातील सर्व ठिकाणच्या प्रॉपर्टीला ग्राहकांकडून मागणी करण्यात आली असून, गृह खरेदीसाठी नाशिककरांनी प्रदर्शनातून तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळाले. शहराचे बदलते स्वरुप लक्षात घेता, वाढलेल्या किंमतीतही गृह खरेदीचा उत्साह कमालीचा असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर यांनी सांगितले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित तीन दिवसीय 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८'मध्ये ग्राहकांनी बजेट होमला पसंती दिली. २५ लाखांपासून १ बीएचके प्लॅट ते १ कोटीहून अधिक किमतीस असलेले ३ आणि ४ बीएचके प्लॅट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पसंती दिली आहे. क्रेडाईने या प्रदर्शनातून ५० कोटीहून अधिक रुपयांची प्रॉपर्टी विक्री होईल, असे उद्दिष्ट्य होते. यानुसार तीन दिवसांतच १०० हून अधिक प्लॅट आणि रो हाऊची विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली असून, यातून ५० कोटीहून अधिक किमतीची प्रॉपर्टी विक्री झाल्याचे प्रदर्शनाच्या समन्वयकांनी सांगितले. प्रदर्शनात ग्राहकांनी नाशिकमधील प्रॉपर्टीची माहिती घेत, कुटुंबीयांसह प्रॉपर्टीची पाहणी करत बुकिंग केली असून, उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांनीही यावेळी गृह खरेदीची पर्वणी साधल्याचे दिसून आले.

\B

योजनांचा घेतला लाभ\B

प्रदर्शनात प्रॉपर्टीची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना नो जीएसटी, स्टँप ड्यूटी, नोंदणी शुल्क वर सूट, स्क्रॅच कूपन, लकी ड्रॉ, सोन्याचे नाणे भेट, आकर्षक व्याज दर, लोन ट्रान्स्फर यासह इतर योजनाचा लाभ देण्यात आला. तसेच अनेक ग्राहकांनी प्रॉपर्टीची ऑनलाइन बुकिंग केली असून, प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या प्रॉपर्टींची विक्री करण्यात आली आहे.

\Bशहराबाहेरील ग्राहकांचाही प्रतिसाद\B

नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, पुणे या शहरातील ग्राहकांनी देखील गृहखरेदी केली असून, नाशिक शहराची इतर शहरांसोबतची वाढती कनेक्टिव्हिटी प्रॉपर्टी विक्रीसाठी लाभदायक ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहलगाम गोठले

$
0
0

पहलगाव गोठले…

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाव येथे रविवारी झालेल्या तुफान हिमवर्षामुळे परिसरातील वाहते ओढेही गोठले. गोठलेल्या ओढ्याची छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारठा झाला कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत आठवड्यात हुडहुडी भरविणारी थंडी गायब झाली असून ७.९ अंश सेल्सियसपर्यंत गेलेले किमान तापमान रविवारी ११.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे कमाल तापमानही ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, वातावरणातील गारवा कमी झाल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नाशिककर आरोग्यदायी हिवाळ्याचा अनुभव घेत आहेत. कधी हुडहुडी भरविणारा गारठा, तर कधी गुलाबी थंडीचा सामना नाशिककर करीत असून गत आठवड्यात १९ डिसेंबर रोजी यंदाच्या हंगामातील नीचांकी (७.९ अंश सेल्सियस) तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे थंडीचा कडाका कायम राहील असे वाटत असताना चारच दिवसांत हा कडाका कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी किमान तापमान ११.२ अंश सेल्सियस नोंदविले गेले. चारच दिवसांत किमान तापमान ३.३ अंश सेल्सियसने वाढले आहे तर कमाल तापमानही ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने हवेतील गारवाही गायब झाल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. पुढील आठवड्यातही थंडीचा जोर फारसा वाढणार नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

२४ डिसेंबर १२ ३०

२५ डिसेंबर १२ ३०

२६ डिसेंबर १० २८

२७ डिसेंबर १० २९

२८ डिसेंबर ११ २९

२९ डिसेंबर ११ २९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदाप्रश्न सोडविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करावेत

$
0
0

छगन भुजबळ यांचे मत; कृषि व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'जगात कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन होते तरीही जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.' असे मत माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे लासलगांव येथे प. पू. भगरीबाबा भव्य कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम, कलाकार हार्दिक जोशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, चांगदेवराव होळकर, मानसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे उपस्थित होते. हे प्रदर्शन २७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

भुजबळ म्हणाले,'शेतकऱ्यांनी डगमगून न जाता हिंमतीने काम करावे. कधीकाळी कांद्याने दिल्लीत शीला दिक्षित यांचे सरकार पाडले होते. कांद्याचे भाव वाढले तर सरकार पडते तर कांद्याचे भाव पडले तर सरकार पडू शकत नाही का?' असा सूचक सवाल त्यांनी उपस्थित केला. कांद्याला भाव मिळण्यासाठी निर्यात खुली करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी परदेशातील कांद्याशी स्पर्धा करण्यात सज्ज आहे. अमेरिकेत देखील शेतकऱ्यांना कोट्यवधीचे कर्ज दिले जाते. देशात सद्या अनेक अनुदान योजना बंद केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

'शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू, असे म्हटले जाते; मग त्याच्या शेतमालाला भाव मिळत का नाही.' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षाने एकत्र येण्याची गरज भुजबळ यांनी व्यक्त केली.

आमदार अनिल कदम म्हणाले,'नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि प्रदर्शन फायद्याचे ठरेल त्यामुळे शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. शेतीला जोडव्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होत नाही.'

यावेळी आयोजक सभापती जयदत्त होळकर म्हणाले,'शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्याचा सन्मान करावा या उद्देशाने कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.' यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. किशोर गोसावी यांनी केले.

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान घोषित केले आहे. सरकारची ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. २००० साली कांद्याचे भाव पडले तेव्हा आघाडी सरकारने ३५० रुपये क्विंटलने कांदा खरेदी केला होता, त्यावेळी कांद्याचा उत्पादन खर्च प्रती क्विंटल २०० ते २५० रुपये होता. आज कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये असताना २०० रुपये मदत ही अतिशय तुटपुंजी असून, ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा आहे.

- छगन भुजबळ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाजाला हवे महामंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्राह्मण समाज बुद्धिवंत असला तरी समाजातील अनेक बांधव हालअपेष्टांमध्ये जगत आहेत. अशा घटकांच्या उन्नतीसाठी सरकारने ब्राह्मण समाज विकास महामंडळाची स्थापना करावी, असा ठराव रविवारी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था समाज सहाय्य संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. समाजाला आरक्षण हवे की नको, याबाबतची मते खुलेपणाने मांडतानाच संरक्षण मात्र नक्कीच मिळायला हवे, अशी एकमुखी मागणीही यावेळी नोंदविण्यात आली.

ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी गुजरातमध्ये जोर धरीत असून, याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण आरक्षण हवे की नको, या विषयावर शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पुरोहीत संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, मुकुंदराव कुलकर्णी, धनंजय बेळे, दीपाली कुलकर्णी, शामला दीक्षित, अॅड. भानुदास शौचे, अॅड. नागनाथ गोरवाडकर, अॅड. अविनाश भिडे, अॅड. गणेश गोखले आदी उपस्थित होते. आरक्षण हा अत्यंत कळीचा मुद्दा असल्याने या महाचर्चेसाठी देशस्थ, ऋगवेदी, कोकणस्थ, चित्पावन यांसह सर्वच ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे की नको यावर मत मांडण्याची संधी यावेळी सहभागींना देण्यात आली. आरक्षणाअभावी ब्राह्मण समाज शिक्षण, नोकरी, पदोन्नती यांसारख्या संधींपासून वंचित राहतो. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. याकामी नेतृत्व करणाऱ्यांना पाठबळ देण्याची तयारीदेखील दर्शविण्यात आली. आरक्षणासाठी वेळप्रसंगी महामोर्चे काढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन यावेळी काही नागरिकांनी केले. कमी गुणवत्ता असणारे आरक्षणाच्या बळावर पुढे जातात व आपल्याकडे गुणवत्ता असूनही मागे राहावे लागते. त्यामुळे आपल्या समाजालाही आरक्षण मिळायलाच हवे अशी भावना रोहिणी कुलकर्णी, काशिनाथ गाडगीळ आदींनी व्यक्त केली. तर आरक्षणापेक्षाही समाजातील मुली आणि महिलांना संरक्षण पुरविणे गरजेचे आहे, असे मत विशाल शिखरे यांनी मांडले. देशातील सर्व ब्राह्मण बांधवांना एकत्रित आणून मोठे संमेलन घ्यावे, अशी मागणी करतानाच समाजाला सवलती मिळाल्या नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या संमेलनातून देऊन दबावगट निर्माण करावा असे मत शुक्ल यांनी नोंदविले. समाज बदलत असून, एकमेकांना मदत करीत पुढे जावे लागेल, असा सल्ला मुकुंद कुलकर्णी यांनी दिला. समाजाच्या विकासासाठी आरक्षण हाच ठोस पर्याय आहे का, यावर विचार करावा असे आवाहन बेळे यांनी केले. स्वागत सुभाष सबनीस यांनी, तर प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी केले.

महाचर्चेतील मुद्दे

- समाजाच्या उन्नतीसाठी हवे विकास महामंडळ

- आरक्षणासाठी मोर्चे काढा

- समाजातील एकी कायम ठेवावी

- समाजातून राजकीय नेतृत्व तयार व्हावे

- ग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्या

- आरक्षणापेक्षा महामंडळ व सुरक्षेला प्राधान्य द्यावे

- आरक्षणाचा कायदा रद्द होण्यासाठी लढा उभारा

- नोकरीऐवजी शिक्षणात आरक्षण असावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रस्त्यात पाय पसरुन बसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तिघांनी दोघांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नरफाटा येथील देवल गल्लीत शनिवारी (दि.२२) रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे सिन्नर फाटा भागात तणाव निर्माण झाल्याने पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नाशिकरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर आदींनी तत्काळ घटनास्थळी हजर होऊन हल्लेखोरांना ताब्यात घेत जमावाला पांगवले.

रविवारी दिवसभर सिन्नर फाटा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात होता. या घटनेत जखमी झालेल्या जावेद जहीर खान (वय २२, रा. विष्णूनगर, देवल गल्ली, सिन्नर फाटा) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दोन वाजता दिलेल्या फिर्यादीनुसार जखमी आझिम जहीर खान हा त्याच्या राहत्या घरासमोर बसलेला होता. त्यावेळी आरोपी सचिन अमरनाथ महाजन (वय ३६), नाना अमरनाथ महाजन (वय ४०) आणि राहुल ज्ञानेश्वर महाजन (वय २०, तिघेही रा. विष्णूनगर, देवल गल्ली, सिन्नर फाटा) घराकडे जात असताना त्यांनी आझिम जहीर खान यास रस्त्यात पाय पसरून का बसला, अशी विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रुपांतर काही क्षणातच जीवघेण्या हल्ल्यात झाले. आरोपी नाना व राहुल महाजन या दोघांनी घरी जाऊन एकाने लोखंडी रॉड व एकाने खेळण्याची बॅट आणली. नानाने लोखंडी रॉड सचिनच्या हातात दिला. सचिनने लोखंडी रॉडने आझिमच्या डोक्यावर व पायावर वार केला, तर राहुलने लाकडी बॅटने आझिमच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात आझिम गंभीर जखमी झाला. यावेळी हल्लेखोरांनी दगड-विटांचाही वापर केला. हल्लेखोरांच्या तावडीतून भावाला वाचविण्यासाठी आलेला जावेद हादेखील जखमी झाला. या हल्ल्याची माहिती समजताच सिन्नर फाटा येथे मोठा जमाव जमा झाल्याने परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण बनली होती. हल्ल्यानंतर तिघेही हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह नाशिकरोड पोलिसांचा मोठा ताफा सिन्नर फाटा येथे दाखल झाला. पोलिसांनी प्रथम जमाव पांगवला. जखमी आझिम व जावेद खान यांस प्रथम पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, आझिमची प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आझिम खान यास डॉक्टरांनी रविवारी पाच वाजता मृत घोषित केले. या हल्ल्यातील तिघाही हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या. रविवारी त्यांना नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता दि. २६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सिन्नर फाटा परिसरात रविवारीही तणावपूर्ण स्थिती होती.

हल्ल्याला व्यावसायिक वादाची पार्श्वभूमी?

या घटनेतील फिर्यादी व हल्लेखोर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर डाळींब व इतर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातील वर्चस्ववादातूनच शनिवारी रात्री हल्ल्याची घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेतील जखमी मूळचा बऱ्हाणपूर येथील आहे. याशिवाय एका हल्लेखोरावर यापूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांकडून मोटारसायकली जप्त

$
0
0

जेलरोड : मोटारसायकल व मोबाइल चोरून विकणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना उपनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोटारसायकल व दोन मोबाइल जप्त करण्यात आले. उपनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विशाल पाटील व प्रदीप ठाकूर हे शनिवारी रात्री जय भवानीरोडवर गस्तीवर होते. त्यावेळी दोन अट्टल चोरटे चोरीच्या मोटारसायकल व मोबाइल विकणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी खबर दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, जाधव, शिंदे, गोडसे, कोकाटे, निकम, टोपले, चंद्रमोरे, खांडबहाले आदींनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता रोशन रामदास पवार (१९ रा. चिंचोली, अंबड) व चाफा उर्फ प्रवीण निंबाजी काळे (२०, रा. आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड) अशी त्यांची नाव असल्याचे समजले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल व दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचवटी’वरून ‘ब्रॅण्ड वॉर’

$
0
0

मटा विशेष लोगो

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: ट्रेडमार्क नोंदणी न करता व्यवसायास नाव देणाऱ्या तिघा व्यावसायिकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला. या तिन्ही हॉटेलांसाठी वापरण्यात येणारे 'पंचवटी' हे नाव काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, यातील दोन हॉटेल नाशिक शहरातील, तर एक हॉटेल मुंबई-आग्रा हायवेवरील शहापूर येथील आहे.

शहरातील हॉटेल पंचवटी हे १९८३ पासून अस्तित्वात असून, हॉटेलचा ट्रेडमार्क नोंदविलेला आहे. मात्र, नाशिक शहरात दोन ठिकाणी, तर शहापूर येथे एका हॉटेलच्या नावामध्ये पंचवटी या शब्दाचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हॉटेल पंचवटीचे गौरव चांडक यांच्यातर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी एस. जी. काथावाला यांच्या कोर्टात दावा दाखल केला. शहरात नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळच सुरू असलेल्या हॉटेलला 'हॉटेल पंचवटी' असे नाव देण्यात आले होते. के. के. वाघ कॉलेजवळच एका व्यावसायिकाने 'पंचवटी भेळभत्ता' नावाने रजिस्ट्रेशनससाठी अर्ज केला असून, त्यामुळेच हा प्रकार उघड झाला. शहापूर येथील हॉटेल व्यावसायिकाने 'श्री पंचवटी' नावाचा वापर केला. या वादाबाबत शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस कामकाज चालले. 'पंचवटी भेळभत्ता' या दुकान मालकाच्यावतीने सुनावणीसाठी कोणीही हजर नव्हते. हॉटेल पंचवटीचे संचालक युनिस खान यांनी मात्र झालेली चूक मान्य करीत नाव हटविण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे कोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावत हे प्रकरण बंद केले. दंडाची रक्कम चॅरिटीसाठी देण्यास चांडक यांनी सहमती दर्शविल्याने कोर्टाने तसे आदेश दिले. शहापूर येथील हॉटेल मालकाने मात्र कोर्टाकडे युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार शनिवारी या खटल्याची सुनावणी झाली. २०१६ पासून पंचवटी या शब्दाचा वापर करतो, त्यामुळे हे नाव कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली. यास अॅड. कमोद यांनी अक्षेप घेतला. नाशिकमध्ये हॉटेल पंचवटी हे १९८३ पासून सुरू असून, हॉटेल पंचवटी गौरव या नावाने फ्रँचायजीचे काम होते. फक्त पंचवटी या शब्दामुळे ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, म्हणून या नावाचा वापर तत्काळ थांबवावा, असे कमोद यांनी स्पष्ट केले. या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती काथावाला यांनी हॉटेलच्या बिलावरील, कम्प्युटरमधील, मेनू कार्डवरील तसेच इतर ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या नावात बदल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. दरम्यान, रेस्टॉरंटबाबत पंचवटी हे नाव नोंदणीकृत असून, व्यावसायिकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे अॅड. कमोद यांनी स्पष्ट केले.

पंचवटी या नावाची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, याच नावासाठी आमच्या तीन पिढ्यांनी काम केले. पंचवटी या शब्दाच्या वापरामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. ग्राहकांची कोणत्याही स्वरुपाची फसवणूक होऊ नये, म्हणून दावा दाखल करण्यात आला होता.

- गौरव चांडक, भागीदार, हॉटेल पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिकतेने गाणं हरवत चाललंय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाणं रेकॉर्ड करताना पूर्वी वादक रिहर्सल करायचे, आता तांत्रिकतेने गाण्यात, ओळ नाही तर शब्दच बदलता येत असल्याने गाण्याचा आत्मा हरवत चालल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते संस्कृती वैभव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तीन दिवसांपासून संस्कृती वैभवच्यावतीने गोविंदनगर येथे त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. यावेळी नाशिकमधील संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे व ज्येष्ठ गीतकार व संगीतकार अशोक पत्की यांना 'संस्कृती वैभव' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शाल, तुळस, मानपत्र, पुरस्काराची मूर्ती, व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी पत्की म्हणाले की, पाच मिनिटाचे गाणे, एक मिनीटाचे शीर्षक गीत व १० सेकंदांची जिंगल करताना ते खणखणीतच असावे, असा माझा प्रयत्न असतो. मला जितेंद्र अभिषेकींनी सांगितले होते की, मुखडा असा खणखणीत बनवायचा की, त्यानंतर येणारे शब्द आपोआप सुरावटीत येतील. तेच आजतागायत पाळतो आहे. रफी, मन्ना डे, मुकेश यांच्याबरोबर काम करताना मजा असायची. तीन-तीन दिवस रिहर्सल व्हायच्या. आता त्या होत नाहीत. त्यामुळे गाण्याचा आत्मा हरवत चाललाय, असे वाटते. यावेळी त्यांनी शंकर महादेवन, लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगीतल्या. दुसरे सत्कारार्थी श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनीदेखील त्यांच्या संगीत कारकीर्दीविषयी रसिकांना सांगितले. यावेळी देशाविदेशात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. भरत केळकर, सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देणारे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कृषीक्षेत्रात क्रांती घडविणारे विलास शिंदे, तसेच शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे सचिन जोशी यांचा 'संस्कृती सन्मान' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्कृती वैभव पुरस्कारार्थींना ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी बोलते केले. सर्व सत्कारार्थींचा परिचय ध्वनिचित्रफितीतून करून देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी सांगीतिक गप्पा मारल्या. सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले.

प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

यावेळी राधाकृष्ण वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्राणी रुग्णवाहिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही रुग्णवाहिका नाशिककरांसाठी मोफत उपलब्ध असेल. एखादा प्राणी पक्षी, जखमी किंवा मृत आढळल्यास ९६७३३३२१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेही दिवस पालटतील!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम क्षेत्राला सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाल्याचे दिसते. अनेकदा प्रशासनाच्या मार्फत 'सर्व काही ठिक आहे, पण...', असे म्हणत बांधकाम व्यावसायिकांना अडचणींत ठेवण्यात येते. यातील 'पण' लवकरच दूर होऊन, बांधकाम व्यवसायाला भरारी प्राप्त होईल,' असा आशावाद माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो'च्या समारोप सोहळ्यात भुजबळ बोलत होते. क्रेडाईतर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात आयोजित 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो' या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा रविवारी संध्याकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांसह क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, उपाध्यक्ष रवी महाजन, प्रदर्शनाचे समन्वयक अनील आहेर आणि ऋषिकेश कोचे व्यासपीठावर होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, 'मन की बात' वर चर्चा करत सर्वजण अडचणींच्या फेऱ्यात अडकले असून, आता 'घर की बात' वर चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशात कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक महत्त्वाचे बांधकाम क्षेत्र असून, अनेक नियम आणि कायद्याच्या बंधनात हे व्यावसायिक अडकले आहेत. नाशिकच्या पर्यटनाचा विकास लक्षात घेता, बांधकाम व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत कोणत्याही पध्दतीचे राजकारण होऊ नये. तसेच प्रशासकीय कामकाजात बांधकाम व्यावसायिक अडकणार नाहीत, यासाठी महापालिका प्रशासनानेही सहकार्याचे धोरण राबवावे.' असे झाल्यास नाशिकच्या झपाट्याने विकास होण्याच वेळ लागणार नाही.' असेही ते म्हणाले.

यावेळी महापालिका आयुक्त गमे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या सर्व अडचणींवर योग्य तोडगा काढणार असल्याचे आश्वासन बांधकाम व्यावसायिकांना दिला. कार्यक्रमाला नाशिककर आणि बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी नाशिक संलग्न हवा होता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'खान्देशातील अनेक नागरिक शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाले असून, नाशिक आणि खान्देशची नाळ कित्येक वर्षांपासून आहे. खान्देशातील व्यक्तिंना नावलौकीक मिळवून देण्यातही नाशिकचा हातभार अधिक असून, नाशिक आणि खान्देश हे समीकरण अधिक दृढ झाले आहे. त्यामुळे जेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून कार्यरत होतो, तेव्हा नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असावा असे कायम वाटायचे.' असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी मांडले.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून ठक्कर डोम येथे आयोजिक नाशिककरांच्या खान्देश महोत्सवात शनिवारी संध्याकाळी ७ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खान्देशच्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे म्हणजे, आपल्या व्यक्तिंच्या कार्याचा सन्मान करणे होय. प्रत्येकातील गुण हेरून त्यांना सन्मानित करणे अतियश अवघड असून, खान्देश रत्न हा सन्मान विशेष आहे. गेल्या दोन वर्षांपासून खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून माणसे एकत्र येऊ लागली असून, संस्कृती आणि भाषेचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अहिराणी भाषा आणि संस्कृती आहे. त्यामुळे नाशिककरांच्या खान्देश महोत्सवातून खान्देशच्या संस्कृतीचा जागर असाच कायम सुरू ठेवणे गरजेचे आहे.'

यावेळी रश्मी हिरे यांनी आभार व्यक्त केले.

\Bहे आहेत खान्देश रत्न!

\Bराजेंद्र कलाल, विलास पाटील, सतीश सोनवणे, रेखा महाजन, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत कुलकर्णी, डी. एल. देवरे, अनिल जाधव, नागराज देवरे, शामदत्त विभांडीक, नितीन ठाकरे, गंगाराम सावळे, कौतिक जाधव, विवेक पाटे यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खवय्यांनी अनुभवली खान्देशी पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी खान्देश महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी नाशिककर खवय्यांनी गर्दी करत, खान्देशी पदार्थांचा आस्वाद घेतला. सकाळापासून महोत्सवात सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह, खान्देशातील ठसकेदार पदार्थांची चव घेण्यात नाशिककर दंग झाले होते. सुटी असल्याने रात्री उशिरापर्यंत नाशिककर खवय्यांची गर्दी महोत्सवात कायम होती.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवाचा चौथा दिवस उत्साहवर्धक ठरला. सकाळी ११ वाजेपासून शहरातील सर्व भागातून आलेल्या खवय्यांनी महोत्सवात गर्दी केल्याचे दिसले. चुलीवरील गरमा गरम मांडे, ठसकेदार भरीत भाकरी अन् ठेचा, भरलेली वांगी, भरलेले कारले, भाजणीचे थालीपीठ, मेथीचे पराठे, पिठलं, साजूक तुपातील उकडीचे मोदक, आप्पे यांसह काळ्या मसाल्याची आमटी, मटण, चिकन या पदार्थांवर खवय्यांनी भरपूर ताव मारला. पदार्थांची चव चाखण्यात व्यस्त खवय्यांच्या उत्साहात महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिक भर आणली. सकाळपासूनचा हा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम होता.

\Bमहोत्सवात भक्तीमय वातावरण\B

कानडा राजा पंढरीचा, वारियाने कुंडल हाले, ओलविला वेणू नाद, अबीर गुलाल उधळीत रंग, नको देव राया अशा अनेक एक भजनांनी व गवळणींच्या सादरीकरणाने महोत्सवाचे वातावरण भक्तीमय झाले. महोत्सवात आयोजित भजन स्पर्धेत शहरातील अनेक महिला भजनी मंडळांनी सहभागी होत, भजन आणि गवळण सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहील, अरबाजमुळे नाशिकचा नंदुरबारवर विजय

$
0
0

१४ वर्षांखालील आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमंत्रितांच्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा साहील पारेख याचे शतक व डावखुरा फिरकी गोलंदाज अरबाज साहाच्या सात बळींमुळे नाशिकने नंदुरबार संघावर निर्विवाद विजय मिळविला. सुयोजित क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली.

दोनदिवसीय या सामन्यामध्ये साहीलने शनिवारी केलेल्या १०६ धावांच्या जोरावर नाशिक संघाने सर्व बाद २८५ धावा केल्या. कर्णधार आयुष ठक्करने ५७ धावा करीत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नंदुरबारने ४ बाद ४९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा अरबाज साहाच्या भेदक माऱ्यापुढे नंदुरबारचा पहिला डाव ७२ धावांवर आटोपला. हर्ष सिंगने ही उत्कृष्ट गोलंदाजी करीत ३ बळी मिळविले. फॉलोऑन मिळाल्यानंतर नंदुरबार संघ दुसऱ्या डावात सर्व बाद ८२ धावा करू शकला. अरबाजने दुसऱ्या डावात ही उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ बळी मिळविले. या विजयासह नाशिकला ६ गुण मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेच्या मुक्कामाची होणार व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांना नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. अशावेळी शहरात आल्यानंतर मुक्कामाचा प्रश्न निर्माण होतो. राहण्याची कुठेच व्यवस्था नसल्याने काही वेळा रस्त्यावर रात्र काढून परीक्षेला सामोरे जावे लागते. अशावेळी त्याचा परिणाम परीक्षेवर होऊन पात्रता असूनही अपयश पदरी पडते. यासाठी खेड्यातून शहराकडे येणाऱ्या युवकांना एक-दोन दिवस मुक्काम करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात युवा वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात मुला-मुलींना नाममात्र दरात एक ते दोन दिवस राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चार मजली वसतिगृहात एकावेळी १०० युवक-युवती राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर जास्तीत जास्त तीन दिवस वास्तव्य करता येणार आहे. परीक्षेचा कालावधी जास्त असेल तर विद्यार्थ्यांकडे असलेली कागदपत्रे पाहून त्याचा मुक्काम वाढविण्यात येणार आहे. मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी येथे एक सुसज्ज लायब्ररीही उभारण्यात येणार असून, स्पर्धा परीक्षांबरोबरच विविध प्रकारची पुस्तके अभ्यासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागीय पातळीवर दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अशावेळी ग्रामीण भागातून खेळासाठी आलेल्या संघांना मुक्कामाची व्यवस्था नसल्याने या स्पर्धा एक दिवसात उरकाव्या लागतात. या वसतिगृहामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मुक्काम करता येऊन इतर खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी मिळणार आहे. या वसतिगृहात झोपण्यासाठी बेड, टेबल असे फर्निचर ठेवण्यात येणार असून, संपूर्ण खर्च ४ कोटी इतका असणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात या वसतिगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. एक वर्षाच्या कालावधीत हे वसतिगृह विद्यार्थ्यांना खुले होणार आहे. देखभालीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली असून, त्याद्वारे काम चालणार आहे. या समितीचे उपाध्यक्ष क्रीडा उपसंचालक राहणार असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त हे या समितीचे सभासद असणार आहेत.

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात प्रथमच या उपक्रमाची सुरुवात नाशिकपासून होत आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची व खेळाडूंची व्यवस्था होणार आहे. हा प्रकल्प जास्तीत जास्त चांगला कसा होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.

- जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भररस्त्यात दुचाकी सोडून आकांडतांडव

$
0
0

म. टा. खास, प्रतिनिधी, नाशिक

'नो एंट्री'मध्ये घुसून मोबाइलवर बोलत जाणाऱ्या युवकास वळून जाण्याबाबत वाहतूक पोलिसांनी निर्देश दिल्यानंतर त्या युवकाने चक्क आपली दुचाकीच रस्त्यावर सोडून देत वाहतुकीला अडथळा निर्माण केला. वाहतूक पोलिसाने विनंती करूनही युवकाने दुचाकी बाजूला न केल्याने नेहरू गार्डन ते एमजीरोड अशी वाहनांची मोठी रांग लागली होती. शेवटी भद्रकाली पोलिस स्टेशनच्या गस्ती पथकाने ही दुचाकी उचलून वाहतूक शाखेत जमा केली, तर युवकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजलअली असीफअली पिरजादे (रा. पिंजरघाट, जुने नाशिक) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नाशिक मर्चंट बँकेसाठी मतदान पार पडले. एक मतदान केंद्र सागरमल मोदी शाळेत होते. त्यामुळे पोलिसांनी आंबेडकर वसतिगृहासमोरच बॅरकेडिंग करून वाहतूक वळविली होती. संशयित आरोपी पिरजादे हा मर्चंट बँकेकडून विरूद्ध दिशेने सावनाकडे घुसत असताना तिथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्याने त्यास वळून जाण्यास सांगितले. याच परिसरात एका मोबाइल शॉपीमध्ये मोबाइल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या पिरजादेने लागलीच आपली दुचाकी भररस्त्यात सोडून दुचाकीला लाथा मारल्या. वाहतूक पोलिसाने दुचाकी बाजूला घेण्याबाबत विनंती करूनही पिरजादेने त्याकडे दुर्लक्ष केले.

वाहनधारकांना मनस्ताप

भररस्त्यात दुचाकी पडलेली असल्याने एमजीरोडसह रविवारकारंजाकडून येणाऱ्या वाहनांची मोठी रांगच या रस्त्यावर लागली. वाहतूक पोलिसाने लागलीच ही माहिती भद्रकाली पोलिस स्टेशनला कळविली. गस्ती पथक थोड्याच वेळात तिथे पोहचले. त्यांनी पिरजादेची दुचाकी उचलून वाहतूक शाखेत जमा केली तर पिरजादेला घेऊन हे पथक भद्रकाली पोलिस स्टेशनला हजर झाले. तिथे पोलिस कॉन्स्टेबल रमेश गोसावी (वाहतूक शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पिरजादे काम करतो ते मोबाइल शॉप याच भागात असून, दुचाकी चालवत असताना तो मोबाइलवर बोलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारंगखेड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

$
0
0

विविध स्पर्धांना पर्यटकांचा प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिव्हल यांच्या वतीने सारंगखेड्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सलग महिनाभर चालणार असून यात सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच अश्व स्पर्धांमध्ये नृत्य, चाल, अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. त्याचबरोबर नौका विहाराचीदेखील सोय तापीनदीवरील धरणात केली आहे. यात्रेत मुलांना मोफत घोडे सवारी करता येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

सारंगखेड्यातील यात्रेत गेल्या दोन दिवसांपासून भाविक, पर्यटकांसाठी मोफत घोडस्वारीचे आयोजन चेतक ग्राऊंडवर करण्यात आले होते. याचा अनेक पर्यटकांनी लाभ घेतला. प्रथमच घोड्यावर बसण्याचा आनंद अश्व सफारी करणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. यात लहान मुला-मुलीनींही अश्व सफारीचा आनंद घेतला. या वेळी मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत असून, विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तूही देण्यात येत आहेत.

यंदा सारंगखेड्यात यात्रेकरूंसाठी पर्यटन विभाग, चेतक फेस्टिव्हल, एल. जे. एस. ने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्याने याचा जास्त फायदा पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले आहे.

सहा जानेवारीपर्यंत कार्यक्रम
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यात महिलांसाठी पारंपरिक वेशभूषेचा कार्यक्रम महिला दालनात घेण्यात येणार असून, या स्पर्धेला महिलांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दररोज याठिकाणी कार्यक्रमांची धम्माल केली जात असून, मुलांसाठी जादुगार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळाच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पुण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २८ ते ३० डिसेंबरदरम्यान मातीवरील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फ्री स्टाइल प्रकारात ५७, ६५, ७४, ८६, ९७ व १२५ किलो वजनी गटात होणार आहे. नुकताच 'महाराष्ट्र केसरी' झालेला बालारफी शेख आणि उपविजेता अभिजित कटकेही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सोमाटणे फाटा येथे या स्पर्धेसाठी ५० फूट रुंद आणि १०० फूट लांब असे दोन मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेत ३२ राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत. सेनादल, रेल्वे, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांचे प्रत्येकी दोन संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्याचा सहा मल्लांचा संघ असेल. सत्यव्रत कोटियन, परवीन राणा, राहुल आवारे, उत्कर्ष काळे असे नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाचे सहयोगी उपाध्यक्ष विजय बराटे यांनी सांगितले. विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होत असताना मातीवरील कुस्ती स्पर्धा घेण्याचे प्रयोजन काय, याबाबत विजय बराटे म्हणाले, 'भारतीय कुस्तीतील गुणवत्ता शोधण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा मातीवर होत आहे. त्याचबरोबर पारंपरिक कुस्ती प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने हा निर्णय घेतला आहे. यातून विजयी मल्लांना राष्ट्रीय शिबिरात सहभागी करून घेतले जाणार आहे. हे शिबिर मॅटवर होईल. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी मल्लांना तयार करता येईल.' या वेळी काका पवार, हिंद केसरी अमोल बराटे, अमोल बुचडे उपस्थित होते.

'हिंद केसरी' हे नाव काढून टाकणार

संयोजकांनी या स्पर्धेच्या नावात 'हिंद केसरी' शब्द जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण कोर्टात असून, कोर्टाने 'हिंद केसरी' नाव न वापरता स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. तरीही संयोजकांनी या स्पर्धेला 'हिंद केसरी' हे नाव जोडण्याचा आग्रह धरला होता. त्यावर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, की न्यायालयाचा अवमान होईल, असे आम्ही काहीही करणार नाहीत. या स्पर्धेच्या नावातून 'हिंद केसरी' हा शब्द काढला जाईल. कोर्टाच्या निकालानंतर भविष्यात आता वर्षभरात अधिकृत एकच 'हिंद केसरी' स्पर्धा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणी अचूक करा

$
0
0

अश्विनी कुमार यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

दिव्यांग, चिन्हांकित मतदार त्याचप्रमाणे शंभर व त्यापेक्षा जास्त वयाच्या मतदारांची कटाक्षाने तपासणी करून अचूक मतदार नोंदणी करावी, अशी सूचना प्रधान सचिव व मुख्‍य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी आज नाशिकरोड येथे दिली. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक व्हावी यासाठी त्यांनी विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या मतदार यादी तसेच इव्हीएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती आढावा बैठक नाशिकरोड विभागीय कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., राहुल द्विवेदी, राहुल रेखावार, किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त तथा विभागीय समन्वयक रघुनाथ गावडे आणि पाचही जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. विभागातील पाच जिल्ह्यांच्या मतदारयादी बाबतचे कामकाज अतिशय चांगले असल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी समाधान व्यक्त केले.

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून त्यांना मार्गदर्शन केले.

विभागातील सर्व जिल्ह्यात मतदान यंत्र (इव्हीएम) व मतदान दर्शक नोंदणी यंत्र (व्हिव्हिपॅट) यांची प्रात्याक्षिके दाखविण्याबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. सर्व मतदारांमध्ये या यंत्राविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून मतदारांना ही यंत्रे

हाताळण्याची संधी दिली जात असून, त्याचा लाभ सर्व जागरुक मतदारांनी घ्यावा, असे आवाहन अश्विनी कुमार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images