Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी

$
0
0

अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक लागले कामाला

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

मकरसंक्रांतपूर्वी अवकाशात झेपावणाऱ्या पतंगांची काटाकाटी सुरू व्हावी, तशी येथे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी इच्छुकांनी परस्परांचे दोर कापण्यास प्रारंभ केला आहे. स्वत:साठी मोर्चेबांधणी करीत असताना इतरांचे दोर कसे कापले जातील याची व्यूहरचनादेखील आखली जात आहे. खरोखरच योग्य व्यक्ती विश्वस्त म्हणून संस्थेवर नियुक्त झाली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा काहींच्या अर्जामागे आहे, तर त्याचसोबत कुरघोडीच्या राजकारणात यापूर्वीचे हिशेब चुकते करण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न होत आहेत.

विद्यमान विश्वस्तांची निवड ४ जून २०१३ रोजी झालेली आहे. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यास अद्याप ४० दिवसांचा अवधी आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची याबाबतची अद्याप कोणतीही सूचना जाहीर झालेली नाही. गतवेळी मे २०१३ मध्ये जाहीर सूचना प्रसिध्द झाली होती. अर्थात गतवेळेस झालेली निवड ही प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेने विश्वस्त मंडळाचा आराखडा निश्चित झाला. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. संबंधित विभागाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वीच विश्वस्त कामाला लागले आहेत.

या पाच वर्षात विश्वस्तपदाला फारच महत्त्व आले आणि अनेकांना त्याचे आकर्षण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाने वेळोवेळी घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. त्यातून आपणही विश्वस्त का होऊ नये? अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. येथे विश्वस्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या सर्व घटकांचा विचार झाला तरच येथील अर्थकारणास गती प्राप्त होण्याची आशा आहे. त्र्यंबकेश्वर येथील नगरपरिषद या संस्थेच्या कारभाऱ्यांनी येथील अर्थव्यवस्थेस सकारात्मक परिणाम साधेल असे नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टनेदेखील दर्शनाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजमितीस २०० रुपये देणगी शुल्क आकारून देवस्थान आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. परंतु, या उत्पन्नवाढीचा शहरातील बेरोजगार घटकांना कितपत फायदा होतो? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना भेडसावतो. फूल, प्रसाद, नारळ आदी साहित्य विक्रीतून येथे व्यावसायिक उदरनिर्वाह करीत असताना मध्यंतरी फुलबंदी आणि आतापर्यंत नारळबंदी करून नेमके काय साध्य केले जाते? अशा एक ना अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या मालिका या पाच वर्षात निर्माण झाल्या आहेत. त्यातूनच यापुढे विश्वस्त नेमणूक होताना काय निकष बाळगावेत याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये काही सामाजिक संघटनादेखील उतरल्या असून, यपुढील कालावधीत अर्ज आणि निवेदनांचे युध्द सुरू झाल्यास नवल वाटायला नको.

सुविधा पुरवण्यास अपयशी

वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न दानाच्या स्वरूपात मिळविणारे देवस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उभे राहण्याची सुखदायी सुविधा देण्यास असफल ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या सेवा-सुविधांबाबत अशाच प्रकारची उदासीनता कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांना विश्वस्त कोण होणार याची काळजी नाही. मात्र भाविकांच्या सेवा-सुविधांची जाण असलेल्यांनीच तेथे जावे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दररोज चौघांची घराला ‘सोडचिट्टी’

$
0
0

पाच वर्षात शहरातून साडेसात हजार जण बेपत्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरगुती भांडणे आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण विकृती अशा एक ना अनेक कारणांमुळे शहरात दररोज चौघे जण घर सोडून पळून जातात. मागील पाच वर्षांच्या काळात शहरातून सात हजार ५२९ नागरिक बेपत्ता झाले. त्यातील सहा हजार ४३१ जणांना पोलिसांनी शोधून परत आणले. मात्र, तरीही अकराशे नागरिक बेपत्ता असून, यात महिलांचे प्रमाण अधिक आहे, हे विशेष चिंतेची बाब.

अल्पवयीन मुलां-मुलींसोबत १९ ते ३५ वयोगटातील महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे मुख्य कारण प्रेमविवाहाला घरातून होणारा विरोध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर लहान मुलींना लग्नाची फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी टीव्ही, इंटरनेट आणि बदलेली सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केवळ मौजमजा करायची म्हणून अल्पवयीन मुलं, मुली घरातून निघून जातात. तसेच आई-वडील रागावले म्हणून घरातून पलायन केलेल्या मुलांची संख्याही कमी नाही. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढल्याने बेपत्ता झालेल्यांच्या तक्रारींचा ओघ वर्षागणिक वाढत आहे. पळून गेलेल्यांपैकी काही जणांचे अपहरण झाले असल्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्तीची कहाणी वेगळी असते. मागील काही वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करता पळून जाणाऱ्यांचा शोध लागलीच घेतला जातो हे स्पष्ट होते. अनेकदा काही व्यक्ती पुन्हा यायचेच नाही म्हणून घरातून निघून जातात. अशा व्यक्तींचा शोध घेणे एक आव्हानच असते.

बऱ्याचदा व्यक्ती बेपत्ता झाली की नातलग पोलिस स्टेशनला येऊन तक्रार देतात. मात्र, बेपत्ता व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर तशी माहिती पोलिसांना कळवित नाही. यामुळे बेपत्ता व्यक्तींचा आकडा वाढलेला दिसतो. याबाबत एक विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

बेपत्ता झालेल्यांची माहिती (प्रौढ व्यक्ती)

वर्ष....महिला....(सापडल्या)....पुरुष....(सापडले)

२०१३....६०९....(५७९)........५१४........(४५५)

२०१४....६१९....(५७७)........५१९........(४४५)

२०१५....६०१....(५२७)........६४३........(५२२)

२०१६....६७३....(५४९)........६०८........(५०९)

२०१७....७३०....(५८४)........६२३........(४९१)

२०१८....१८३....(१४२)........१४२........(१०७)

(आकडेवारी मार्च २०१८ पर्यंतची)

बेपत्ता व्यक्ती (लहान मुले-मुली)

वर्ष........मुले....(सापडले)....मुली....(सापडल्या)

२०१३....११५....(११४)........२०९....(२०६)

२०१४.....९८........(९७)........२००....(१९८)

२०१५....५०........(४८)........१०९....(१०४)

२०१६....४६........(४५)........६३.......(५८)

२०१७....४६........(३०)........८३........(६४)

२०१८....१६........(११)........३३........(१२)

(आकडेवारी मार्च २०१८ पर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस

$
0
0

देवळा, मनमाड, उमराणे, येवला व मालेगावचा समावेश

ही आहेत कारणे

- शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अनियमितता

- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करणे

- कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून कसूर करणे

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अनियमितता, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करणे, आपली कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून कसूर करणे अशा विविध कारणांमुळे देवळा व उमराणा बाजार समिती रद्द करून प्रशासक का नेमू नये, अशा आशयाची नोटीस जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. यासह सहकार विभागाने मनमाड, येवला व मालेगाव या बाजार समित्यांनाही बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे.

बाजार समितीत व्यापाऱ्यांनी आपली हेकेखोरी सुरू ठेवत शेतकऱ्यांना योग्यवेळी शेतमालाची रक्कम परत न केल्याचे निदर्शनास आले आहे. एका व्यापाऱ्याच्या लाखो रुपयांच्या देणीवरून ही नोटीस बजावण्याची नामुष्की देवळा बाजार समितीवर ओढवली आहे. संबंधित व्यापाऱ्याकडून येत्या दोन दिवसात थकीत येणी वसूल केली जाण्याची शक्यता असून, निर्धारित वेळेत ज्या कारणांमुळे नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांची पूर्तता होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नुकतीच कळवण बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट देण्यास सुरुवात केली असून, दोन लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट रोख देताना वित्तीय संस्था व व्यापारी बांधव यांना सध्यातरी कुठलीही अडचण निर्माण होत नाही. शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट उपलब्ध झाल्यास बाजारपेठा गजबजून जातात. मात्र, नोटबंदीपासून शासन कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असल्याने त्यातच वित्तीय संस्थांमध्ये होणारा चलन तुटवडा यामुळे शेतकरी, व्यापारी हतबल ठरत आहेत.

देवळा बाजार समितीला ११ मेपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ दिला असून, त्याआधी सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहकार खात्याच्या या नोटिशीवर अपेक्षित पूर्तता होऊ शकली नाही, तर १४ मे रोजी सुनावणी घेण्यात येईल.

- संजय गिते, सहाय्यक उपनिबंधक, देवळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी ‘वेटिंग’वर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात प्रतिष्ठानतर्फे २००७ पासून अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि शांतचित्ताने होणारा अभ्यास यासाठी ही अभ्यासिका प्रसिद्ध असून, विद्यार्थ्यांना प्रवेश संपले आहेत असे सांगण्याची वेळ येते. येथे विद्यार्थी वेटिंगवर असतात अशी स्थिती आहे.

या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी २०० रुपये महिना असे शुल्क आकारले जाते. सकाळी ९ ते रात्री ९ अशी येथील वेळ असून, अनेक जण या अभ्यासिकेला प्राधान्य देतात. पार्टिशनसह टेबल, खुर्ची, लाइट, फॅन अशा सर्वच सुस्थितीतील सुविधा या अभ्यासिकेत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळावा म्हणून बराच कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असलेली चांगली व्यवस्था, तसेच दोन अत्याधुनिक स्वच्छतागृहे येथे असल्याने प्राधान्यक्रमाने कुसुमाग्रज अभ्यासिकेचे नाव विद्यार्थ्यांसमोर असते. स्मारकात सहा सेवकवृंद असून, येथील काम अत्यंत सुरळीत चालते. अभ्यासिकेची, तसेच वाचनालयाची देखभाल हा सेवकवर्ग करतो. येथे नियमित साफसफाई केली जाते, तसेच अतिशय शांततापूर्ण वातावरण असल्याने अभ्यासाला वाव मिळतो.

व्याख्याने, उपक्रम लाभदायक

या ठिकाणी शहरातील मान्यवर संस्थांतर्फे व्याख्याने, संगीत मैफली, नृत्याचे कार्यक्रम, चित्रकलेचे डेमो, शिल्पकलेचे डेमो असे विविध कार्यक्रम नियमितपणे होत असल्याने विद्यार्थी विरंगुळ्यासाठी येथे येतात. व्याख्यानांमध्ये अनेक विषय असल्याने त्याचा एमपीएससी, यूपीएससी, तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला उपयोग होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

किरकोळ दुरुस्तीची गरज

दरम्यान, बरीच वर्षे झालेली असल्याने आता या अभ्यासिकेला रंग देण्याची गरज असून, काही ठिकाणी पाण्यामुळे ओल येऊन भिंतींचे पोपडे निघालेले आहेत, तेथेही दुरुस्तीची गरज आहे. इतर सुविधा मात्र मनासारख्या असल्याचे विद्यार्थी सांगतात. येथील विद्यार्थी अनेकदा गॅलरीत येऊनही अभ्यास करतात, तसेच पार्किंगमध्ये, सायंकाळच्या वेळी लॉन्सवरही अभ्यासाला बसतात. परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत असल्याने विद्यार्थिनींना सुरक्षित वाटते.

या अभ्यासिकेतील असंख्य विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रांत मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. असे पूर्वीचे, परंतु नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले विद्यार्थी येथे अधूनमधून आवर्जून भेट देऊन समाधान व्यक्त करतात. असे विद्यार्थी आताच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.

-रामदास जगताप, व्यवस्थापक

--

अभ्यासासाठी वेळ सोयीची आहे. परिसरात लॉन असल्यामुळे कंटाळा आल्यास फिरून येता येते. साफसफाई वेळेवर होते. अभ्यासास पूरक वातावरण आहे. वाचनालय असल्यामुळे वर्तमानपत्रे, तसेच मासिके, साप्ताहिके वाचनासाठी उपलब्ध असतात.

-प्रांजली निकम, विद्यार्थिनी

--

ही आभ्यासिका गंगापूररोडलगत असल्याने येणे-जाणे सोयीचे होते. पार्किंगसाठी उत्तम सोय आहे. वाचनालयाचा उपयोग करता येतो. सीसीटीव्हींमुळे सुरक्षितता असते. येथे होणारी विविध व्याख्याने, तसेच इतर कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. सेवकांचे सहकार्य मिळते.

-स्वप्निल ठाणगे, विद्यार्थी

---

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

कुसुमाग्रज अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी पोलिसांकडून १०९ मोबाइल जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहरासह ग्रामीण भागात धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाइल हिसकावणारे तसेच जबरी लूट करणाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख ४६ हजार रुपयांचे १०९ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पंचवटी परिसरात सुनील उर्फ गटऱ्या नागू गायकवाड (रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॅनडा कॉर्नर),  संपत लक्ष्मण वाघ (रा. वडगाव, ता. जि. नाशिक) आणि त्यांचा एक साथीदार तसेच विकी उर्फ गट्ट्या संजय जाधव (रा. अवधूतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी) आणि याचे दोन साथीदार यांनी नाशिक शहरासह सायखेडा, दिंडोरी, वणी, आडगाव, निफाड, पिंपळगाव आदी भागात दुचाकीवरून फिरून अंधाराचा फायदा घेत निर्जन स्थळी लोकांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतले होते. तसेच हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी व लूट केली आहे. भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइलही त्यांनी हातचलाखीने लंपास केले आहेत, अशी त्यांनी कबुली दिली आहे. या संशयितांकडून ५ लाख ४६ हजार रुपयांचे १०९ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल हॅण्डसेट जप्त केले आहेत. पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, बाळनाथ ठाकरे, विलास बस्ते आदींनी हा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर भागात भारनियमाचा फटका

$
0
0

इंदिरानगर भागात भारनियमाचा फटका

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असतानाच वीज वितरण कंपनीने इंदिरानगरसह सिडकोतील काही भागात अचानकपणे भारनियमन सुरू केल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. भारनियमनमुक्‍तीची घोषणा केली जात असली, तरी शनिवारी इंदिरानगरसह सिडको परिसरात किमान चार ते पाच तास वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. इंदिरानगर भागात सकाळी दहा वाजता वीजपुरवठा बंद करण्यात आला तो थेट दुपारी दोन वाजताच सुरू करण्यात आला. याबाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून विचारले असता दुरुस्तीच्या कामासाठी हे भारनियमन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐन उन्हाळ्यात भारनियमन करण्याची गरजच काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. गत आठवड्यापासून इंदिरानगर भागातील राजीवनगर व परिसरात दररोज वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे भारनियमन करू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. कामटवाडे व अन्य भागातही अनेकदा अशा प्रकारे अचानकपणे वीजपुरवठा खंडित होत असून, हे भारनियमन थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टची आज विशेष सभा

$
0
0

मालेगाव : येथील मालेगाव केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन आज (२९ एप्रिल) करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता टेहरे चौफुली येथील अमेय लॉन्स येथे ही सभा होणार आहे. अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे या सभेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व आमदार असिफ शेख हे देखील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व अनिल नावंदर यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रमोदभाई मेहता यांच्या स्मरणार्थ होतकरू गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच २०२५ मध्ये टीबीमुक्त भारत व मुलगी वाचवा याविषयी देखील जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. तसेच केमिस्ट ग्रंथालय व केमिस्ट पुस्तिकेचे लोकार्पण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगलद्वारे शोधणार अतिक्रमण

$
0
0

वनविभागाचा निर्णय; 'सॅटेलाइट इमॅजिनरी'चा होणार वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पश्चिम क्षेत्रातील वन विभागाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणाचा शोध आता गुगलद्वारे घेतला जाणार आहे. गुगल अर्थ आणि सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टिमच्या माध्यमातून अतिक्रमणांचा छडा लावला जाणार आहे. त्यासाठी सेवानिवृत्त वनाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

महाराष्ट्रात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने मूळ आदिवासी असलेल्या व्यक्तींच्या अधिवासाला धोका उत्पन्न झाला आहे. त्यातच वन जमिनीच्या आसपास राहणारे नागरिक वनजमिनीवर अतिक्रमण करीत असल्याचे जंगलाचा ऱ्हास होत असल्याचे निर्दशनास आले होते. जंगलातील अतिक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमच्या आधारे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. या शोध मोहिमेत नाशिक पश्चिम विभागातील अनेक गावांचा समावेश आहे. जंगलांचा विस्तार मोठा असल्याने अतिक्रमण शोधण्यास अडचण येत होती. ती आता या सिस्टीममुळे शोधणे सोयीचे होणार आहे. नाशिक पश्चिम विभागात २० अति संवेदनशील क्षेत्रे आहेत तेथे बहुतांश वेळा अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी या अगोदर प्राप्त झाल्या होत्या. झालेले अतिक्रमण लगेच समजल्याने त्यावर कारवाई करणे लगेचच शक्य होणार आहे.

या भागात अधिक अतिक्रमण

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसूल, बाऱ्हे, त्र्यंबकेश्वर, ननाशी, इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात वनजमिनी आहेत त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण प्रत्यक्ष जाऊन शोधणे कठीण असल्याने ते शोधण्यासाठी गुगुल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमचा आधार घेतला जाणार असून त्यामुळे जंगलाच्या कोणत्या भागात अतिक्रमण झाले हे कळण्यास मदत होणार आहे.

सेवानिवृत्तांना प्राधान्य

पश्चिम भाग, नाशिक विभागांर्तगत अतिक्रमणाची पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमचे ज्ञान असलेल्या एका व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पश्चिम नाशिक

वनपरिक्षेत्रांची संख्या : ८

वनपरिक्षेत्र : हरसूल, पेठ, बाऱ्हे, ननाशी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक

परिमंडळांची संख्या : ३६

नियतक्षेत्र संख्या : १२६

साधारण क्षेत्र : ८७

संवेदनशील क्षेत्र : १९

अतिसंवेदनशील क्षेत्र : २०

एकूण वनक्षेत्र : ८९,७२३ हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कर्तव्य पालनावर प्रत्येकाने भर द्यावा’

$
0
0

कळवण : भारतातील नौदलाचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. देशात केवळ हक्क गाजविण्यापेक्षा कर्तव्य पालनावर जर प्रत्येकाने भर दिला तर भारत जगावर राज्य करेल, असे मत भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी व्यक्त केले.

कळवण येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष डॉ. पी. एच. कोठावदे होते. यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे तसेच, खान्देशरत्न पुरस्कार प्राप्त राजेश कोठावदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष भाग्यश्री पगार, मीनाक्षी मालपुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रतीभा जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार

$
0
0

निफाड : लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान कॉलेजच्या प्रा. डॉ. प्रतीभा जाधव यांना सन २०१६-१७ चा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी (३० एप्रिल) सकाळी अकरा वाजता भालचंद्र ब्लड बँक हॉल, लातूर येथे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस व लातूर जि. प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, खासदार सुनील नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहारतील एमआयडीसीसाठी शेतजमिनी देणाऱ्यांच्या मागण्यांकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गतवर्षी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीतर्फे आयमा या औद्योगिक संघटनेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसीने प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जाईल, असे सांगितले होते. परंतु, आजही स्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे. मागण्या मान्य न झाल्याने लवकरच उद्योग भवनाला घेराव घालत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला आहे.

नाशिक शहरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावर हजारो एकर शेतजमिनी सातपूर व अंबड एमआयडीसीतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी दिल्या. परंतु, त्याच शेतकऱ्यांच्या मुलांना कारखान्यांमध्ये काम मिळविण्यासाठी आजही झटावे लागत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना किमान छोटा व्यवसाय करण्यासाठी भूखंड मिळावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात येते. मात्र, त्याकडे एमआयडीसीकडून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी आमच्यावर अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच औद्योगिक संघटनेत काम करणाऱ्यांना एमआयडीसीकडून भूखंड मिळतातच कसे, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी आयमा या औद्योगिक संघटनेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा अंबड गावातून काढली होती. मात्र, त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता उद्योग भवनालाच घेराव घालण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

सातपूर व अंबड गावांतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या अथवा व्यवसायासाठी जागा देण्यात येईल, असे एमआय़डीसीकडून सांगण्यात आले होते. परंतु, आजही शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीकडून काहीही मिळाले नसल्याने लवकरच उद्योग भवनाला घेराव घालून आंदोलन करणार आहोत.

-साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिरावणीत रंगला गहिनीनाथ यात्रोत्सव

$
0
0

महिरावणीत रंगला गहिनीनाथ यात्रोत्सव

सातपूर : त्र्यंबकेश्वररोडवरील महिरावणी गावात गहिनीनाथ यात्रोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध धार्मिक कार्यक्रमांसह ग्रामस्थांसाठी लोकसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आनंद पंचक्रोशीतील रहिवाशांनी लुटला. यात्रेनिमित्त विरंगुळा म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनादेखील उतस्फूर्त प्रतिसाद लाभला. उपसरपंच रमेश खांडबहाले , तसेच परिसरातील रहिवाशांनी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

--

उन्हाळी वर्गाचा समारोप (फोटो)

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या उंटवाडी शाळेत झालेल्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा नुकताच समारोप झाला. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर अध्यक्षस्थानी होते. रणजीपटू अमित पाटील, प्रशिक्षक अमित झडप, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे, निमंत्रक राजेंद्र कापसे, मंगल मुसळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण वर्गात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले.

--

विवाहात रोपवाटप (फोटो)

पंचवटी : विवाहाप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे प्रकाश बर्वे यांनी कडुनिंबाच्या रोपांचे वाटप केले. ही रोपे लावण्याचा आग्रह धरून पर्यावरणांचे संरक्षण करण्याची विनंतीही केली. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्याने होणारे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेण्याबाबतही त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना एस. के. आर्टसचे कलाकार चेतन भांडारकर, अविनाश दळवी, आकाश मुर्तडक, गौरव तांबोळी आदींचे सहकार्य लाभत आहे.

--

जिमखान्यावर गर्दी

जेलरोड : नाशिकरोड प्रेसच्या जिमखान्यावर सकाळी व सायंकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिमखाना परिसरात घनदाट झाडी आहेत. प्रेसच्या आवारात जुन्या काळातील बंगले आहेत. झाडांमुळे हवाही थंड असते. त्यामुळे येथे व्यायामप्रेमींची गर्दी होत आहे. लहान मुलेदेखील येथे विविध क्रीडाप्रकारांचा आनंद लुटताना दिसत आहेत. येथील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट सुस्थितीत; कर्मचारी अपूरेच

$
0
0

अग्निशमनच्या आपत्कालीन विभागाची परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात सुट्यांमध्ये फेरफटका मारण्यासाठी तरुण जात असतात. यात अनेकदा धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी कामात येणाऱ्या आपात्कालीन बोटी या सध्या चांगल्या अवस्थेत असून, त्यांची वर्षभरापूर्वीची अवस्था सुधारली आहे. मात्र, नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीची अपेक्षा करण्यात येत आहे.

निर्सगाचा आनंद घेण्यासाठी गंगापूर धरण परिसरात पर्यटकांची उन्हाळ्यात गर्दी होत असते. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने निर्सगाचा आस्वाद घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांना धरणाच्या पाण्याचा अंदाच येत नसतो. यात तरुण पाण्यात उतरण्याचा मोह आवरता येत नसल्याने अनेकवेळा त्यांना प्राणही गमवावे लागले आहेत. अशावेळी कामाला येणाऱ्या अग्निशमन दलाकडे आपत्कालीन बोटी देण्यात आल्या होत्या. त्यांची सज्जता असल्यास बुडणाऱ्यांना तातडीने वाचवता येऊ शकते. मात्र, अशावेळीच जर कर्मचारी संख्या कमी असेल तर त्यामध्ये कसूर राहू शकते. ही संख्या वाढवल्यास कार्य तत्परतेने होईल.

महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे

गंगापूर धरणात पाण्यात बुडालेल्यांना शोधण्यासाठी अग्निशमन दलाकडे आपत्कालीन बोटी आहेत. त्या गेल्यावर्षी धूळ खात पडून असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु, सद्यस्थितीत या आपत्कालीन बोटींची सुस्थिती असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये चार रबरी आपत्कालीन बोट शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्रावर तैनात आहेत. त्यामधील एक लाकडी असलेल्या बोट आपत्कालीन घटनेत नेण्यासाठी अवजड असल्याने ट्रकचा सहारा घ्यावा लागतो. त्यातच तिला उचलण्यासाठी तब्बल पंधराहून अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासते. यामुळे लाकडी बोट सातपूरच्या अग्निशमन केंद्रात आजही पडून आहे. अग्निशमन दलाकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रबरी चार बोटी तयार असताना कर्मचारी संख्या मात्र आजही अपुरीच असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलात नव्याने भरती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये जल जनजागृती रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे नगरविकास दिनाचे औचित्य साधत कुशावर्तावर गंगापूजन करून जल जनजागृती रॅली काढण्यात आली. गोदावरीच्या पुनरुज्जीवनासाठी उगमस्थानापासून नदीला मिळालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम त्र्यंबकेश्वर नगरपालिका व नमानी गोदा फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे जल जनजागृती रॅलीसोबत कुशावर्त येथे मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज, नमानी गोदाचे राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, लक्ष्मण सावजी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे उपस्थित होते.

जलजागृती रॅलीच्या समारोप शिवनेरी चौकात करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी आपले विचारधन प्रकट केले. देशाच्या विकासात गोदावरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यात गोदावरी नदीचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी तसेच नदी बारमाही होण्यासाठी ब्रह्मगिरी पर्वत सुजलाम सुफलाम करणे आपली जबाबदारी आहे. त्याची जाणीव ठेवत गोदावरी पुनर्जिवित करण्यासाठी सर्वांनी सोबत येण्याचे ऐतिहासिक कार्य केले असून, आता नमानी गोदा प्रकल्प लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरविकास दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गोदावरी पुनर्जिवित करण्यासाठी मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा तसेच, नगरपालिकेत उत्कर्ष कार्य करणारे कर्मचारी अमोल दोंदे, विनय गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेती चिन्मय उदगीरकर व पोलिस अधीक्षक संजय दराडे, लक्ष्णम सावजी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. गटनेता समीर पाटणकर यांनी प्रस्तावनेतून गेल्या चार महिन्यांत गोदावरी पूर्वजीवित करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी नगरसेवक श्याम गंगापुत्र, सागर उजे, विष्णू दोबाडे, श्रीकांत गायधनी यांच्यासह सर्व नगरसेवक, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीसह सासच्यांनी जाळल्याची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्टोव्हच्या भडक्याने नव्हे तर पतीसह सासू व नंणदेने रॉकेल टाकून पेटवून देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद ज्योती दीपक साठे (रा. चंदनवाडी, देवळालीगाव) या महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधित महिला स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचे प्रकरण फेब्रुवारीमध्ये दाखल होते.

पती दीपक अशोक साठे याने प्लास्टिकच्या बाटलीतील रॉकेल टाकून २५ फेब्रुवारीस रात्री साडेदहाच्या सुमारास ज्योतीला पेटवले. त्यावेळी सासू मुक्ताबाई साठे हिने तिला पकडून ठेवले. याशिवाय नणंद राणी साठे हिने घराच्या दरवाजाला कडी लावली. या तिघांनी ज्योतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्योतीने आराडाओरड केल्याने परिसरातील लोक जमा झाल्याने दीपकने तिला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेनंतर खरा जबाब दिल्यास पती, सासू व नातेवाइकांनी दोन्ही मुलींना मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिस व न्याय दंडाधिकाऱ्यांना दिलेला जबाब दोन्ही मुलींना वाचविण्यासाठी खोटा दिला होता, अशी फिर्याद ज्योती साठे यांनी दिली आहे.

प्रकरणाला कलाटणी

विशेष म्हणजे या प्रकरणातील पीडित महिलेचा पती इगतपुरी न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो मोबाइलद्वारे मोरे नावाच्या तरुणीशी वारंवार चॅटिंग करीत असे. हा प्रकार लक्षात आल्यावर ज्योतीने याबाबत विचारणा केली. यानंतर दीपकने मारहाण करून रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे ज्योतीने नव्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरे महाविद्यालयात ‘एनसीसी’तर्फे स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा परिसर स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान राबविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी परिसरातील कन्नमवार पूल ते कॉलेज परिसरात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी उत्स्फूर्त योगदान दिले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. रवींद्र देवरे, प्रा. डी. एस. शिंदे, एनसीसी विभागाचे प्रमुख प्रा. सचिन सोनवणे यांच्या उपस्थितीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिर समाजाची आज सभा

$
0
0

अहिर समाजाची वार्षिक सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड देवळाली येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, रविवारी (दि. २९) आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जेलरोडवरील दसक गाव येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने राहणार आहेत.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजाचे नियोजित मंगल कार्यालय बांधकाम, त्यासाठी लागणारा निधी, समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण निधी उभारणे त्यासाठी तज्ज्ञांची शिक्षण समिती स्थापन करणे यांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. संस्थेच्या आजीव सभासदांसह सर्व समाजबांधवानी या सभेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने, उपाध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव संतोष सोनार, खजिनदार विनोद खरोटे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी मोबदला हा प्रशासनाच भंपकपणा

$
0
0

शेतकरी संघर्ष समितीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

भूसंपादन कायद्याद्वारे जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या चारपट आणि रेडिरेकनरच्या पाचपट मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे थेट भूसंपादन कायद्याद्वारे जमीन संपादित केल्याने शेतकऱ्यांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होईल, हा जिल्हा प्रशासनाचा भंपकपणा असल्याचा दावा समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीने शनिवारी केला.

समृद्धी महामार्गासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले. या दुरुस्तीमुळे थेट खरेदीने जमिनी देण्यास शेतकरी तयार नसतील तर भूसंपादन कायद्यान्वये प्रशासनाला जमिनी घेता येणार आहेत. थेट खरेदीने पाचपट मोबदला दिला जात असून या कायद्यान्वये चारपटच मोबदला मिळेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आर्थिक मोबदल्याचा लाभ पदरात पाडून घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाचा समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला आहे. भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या कायद्यान्वये शेतकऱ्यांना अधिक मोबदला आणि अधिक फायदे मिळावेत, अशी मागणी आहे. मात्र, ७० टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय सरकारला आणि प्रशासनालाही कामे अॅलॉट करणे शक्य होत नाही. त्यामुळेच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप राजू देसले यांनी केला आहे. या कायद्यान्वये बाजारभावाच्या चारपट आणि रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला मिळू शकतो. असे असताना शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान सहन करावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगणे हा भंपकपणा असल्याचा दावाही देसले यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराने लांबविले साडेतीन लाख रुपये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले तब्बल साडेतीन लाख रुपयांचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये एका नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सतिश हरिश्चंद्र तावडे यांनी फिर्याद दिली आहे.

अबिद साहेबखान पठाण (रा. पखालरोड, साईदर्शन अपार्ट. वडाळागाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिद अबिद कॉलेजरोडवरील एका शूज विक्री दुकानात कामाला असून, त्याच्याकडे दुकानातील पैसे बँकेत जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अबिद २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुकानातून पैसे घेऊन बाहेर पडला. मात्र, त्याने ही रक्कम बँकेत भरलीच नाही. अबिद परत न आल्याने तावडे यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो पळून गेल्याचे समोर आले. त्यानुसार, तावडे यांनी गंगापूर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पीएसआय कोल्हे करीत आहेत.

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक

सरकारी नोकरीला असल्याचे सांगत विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात पंचवटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिली असून, सासरच्यांनी कौटुंबिक छळ केल्याचेही विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. फसवणुकीचा प्रकार दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडला.

या प्रकरणी स्वाती प्रवीण गांगुर्डे (२९, रा. गणेश अपार्टमेंट, पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. विवाहापूर्वी प्रवीण हिरामण गांगुर्डे हा सरकारी नोकरीस असल्याचे खोटे सांगून संशयित हिरामण रामजी गांगुर्डे (सासरे), लिलाबाई हिरामण गांगुर्डे (सासू), सागर हिरामण गांगुर्डे (दीर), संतोष वाघ, निर्मला राजेंद्र भडांगे यांनी स्वाती यांचा प्रवीणशी विवाह लावून दिला. मात्र, विवाहानंतर पती व संशयितांनी १ एप्रिल २०१५ त २६ मार्च २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरून दिलेले स्त्रीधन काढून घेतले, स्वाती यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पिस्तुलांसह चौघे ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी पिस्तुलांसह चौघा सराईत गुन्हेगारांना नाशिकरोड पोलिसांनी वॉस्को चौकात सापळा रचून ताब्यात घेण्यात यश मिळवले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई झाली असून, या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेला एकजण शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकाचा पुतण्या आहे. याशिवाय यातील एका संशयिताकडे सहा दिवसांपूर्वीच नाशिकरोडमधील सत्कार पॉइंट येथे दोन पिस्तुले आणि ११ जिवंत काडतुसे आढळून आली होती. या गुन्हेगारांनी काही पिस्तुले पिंपळगाव बसवंत येथे विक्री केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाल्याने हे रॅकेट जिल्हाभर पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नाशिकरोड येथील वॉस्को चौकात शंकर गोवर्धन वाडेकर (वय ३२, रा. चौण्डेश्वरी नगर, नांदूर शिवार, पंचवटी) याला गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नाशिकरोड पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. शनिवारी सायंकाळी सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, विशाल कुंवर, समाधान वाजे, राजेंद्र जाधव, मच्छिंद्र पवार, अविनाश जुंद्रे यांच्या पथकाने वॉस्को चौकात सापळा लावला. सात वाजेच्या सुमारास एमएच १५, ईझेड १०२८ या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींची संशयास्पद हालचाल दिसून येताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पळून जपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले व झडती घेतली असता आदेश चंद्रकांत लवटे (वय २५, रा. आनंदनगर, नाशिकरोड) व संग्राम बिंदूमाधव फडके (वय ३०, रा. शिवआराधना सोसायटी, गंधर्वनगरी) या दोघांच्या कमरेला एकएक गावठी पिस्तूल आढळून आले. याशिवाय सुमित अविनाश निरभवणे (वय २३, रा. डायनास्टिक अपार्टमेंट, तरण तलावाजवळ, नाशिकरोड) याच्या ताब्यातील पल्सर मोटारसायकलवर दोन तलवारी आढळून आल्या. या तिघांसोबत असलेला शंकर गोवर्धन वाडेकर (वय ३२, रा. चौण्डेश्वरी नगर, नांदूर शिवार, पंचवटी) याच्यासह पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. रविवारी या चौघांना पोलिसांनी नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता त्यांना २ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जामिनावर असतानाच दुसरा गुन्हा

या संशयितांपैकी संग्राम फडके याच्यावर दोन गावठी कट्टे व अकरा काडतुसे बाळगल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळताच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. त्याने काही दिवसांपूर्वीच गंधर्वनगरी येथे एका लग्नाच्या वरातीतही पिस्तुलामधून गोळी फायर केल्याची घटना घडली होती. फडके आणि आदेश लवटे यांच्यावर यापूर्वी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुमित निरभवणे याच्यावर नाशिकरोड आणि संगमनेर पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

पिस्तुलांचे मध्यप्रदेश कनेक्शन

या सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलांचा पुरवठा मध्यप्रदेश राज्यातील उंबरठी, जिल्हा सेंधवा या गावातून होतो, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या ठिकाणी विकत घेतलेले गावठी पिस्तूल धुळेमार्गे नाशिकमध्ये आणून इतर गुन्हेगारांना विक्री केली जात असल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images