Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘देशासाठी झटणाऱ्या सैनिकांना सलाम करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
विरमातांमुळे शूर सैनिक जन्माला येतात. प्रतिकूल वातावरणात ते देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावतात. अशा सैनिकांच्या कुटुंबीयांना आपण मान सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. सैनिक दिसल्यावर त्यास मानाने सलाम करा, असे प्रतिपादन पत्रकार अजित चव्हाण यांनी निफाड येथे शारदोत्सव व्याख्यानमालेत केले.
मंचावर आमदार अनिल कदम, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, प्रभाकर अहिरराव, प्रवीण तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, की सीमेवर देशासाठी लढणाऱ्या त्यागी जवानांमुळेच भारतात लोकशाही बळकट आहे. भारतीय सैनिक जात, धर्म विसरत केवळ देशासाठी लढतात. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सैनिकांना लढण्याची उर्मी मिळते. ज्या कुटुंबीयांच्या रक्तात प्रखर राष्ट्रभक्ती असते, त्यांचीच मुले सैन्यदलात दाखल होतात, असेही चव्हाण म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमास निफाडचे नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, प्रल्हाद कराड, अॅड. त्र्यंबकराव गुंजाळ, अॅड. ना. भा. ठाकरे, रतन वडघुले, राजाभाऊ राठी, नगरसेवक अनिल कुंदे, संपतराव व्यवहारे, विक्रम रंधवे, संपतराव डुंबरे, पंढरीनाथ शिंदे आदी उपस्थित होते. विक्रम रंधवे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोतया पोलिसाकडून दोन लाख जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस असल्याचे सांगत वृद्धांना गंडा घालणाऱ्या भिवंडी येथील इकबाल सैफुल्ला बेग उर्फ जाफरी या संशयिताकडून गुन्हे शाखेने दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयिताने शहरात केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिस असल्याचे सांगत वृद्धेचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचने सुरू केला. निरीक्षक एन. एस. न्याहाळदे यांनी तपासाची चक्र फिरवत इकबाल सैफुल्ला बेग उर्फ जाफरी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, मुद्देमालही काढून दिला आहे. अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीतही असे प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

चोरटा गजाआड
नाशिक : दुचाकीच्या डिक्कीतून रोकड पळविणाऱ्या मयूर दिनेश बजरंगे आणि श्रीकांत मनोज गुमाने (दोघेही रा. अहमदाबाद) या संशयितांना पोलिसांना गजाआड केले. त्यांच्याकडील ४७ हजाराची रोकड व दुचाकी जप्त करण्यात आली. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील आनंदनगर भागात घडली होती. यात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची रोकड चोरी केली होती. आनंदनगरमधील तरणतलावासमोर उदय मनसुख भगत यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास करुन चोरटे फरार झाले होते. या प्रकरणाचा उपनगर पोलिसांनी तपास करीत थेट गुजरात गाठले.

वाहन चोरटे अटकेत
नाशिक : सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. भाऊसाहेब रामराव जाधव (रा. रचना कॉलनी, जयभवानी रोड) आणि राहुल चंद्रकांत अग्रवाल (रा. जयभवानी रोड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी दुचाकीही हस्तगत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कत्तलखाने बंद करा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील पवारवाडी व दरेगाव भागातील अवैध कत्तलखाने (स्लॉटर हाऊस) बंद करण्याचे, हाडके उकळविण्याचे कारखाने तसेच साबण बनविण्याचे कारखाने तोडण्याचे आदेश लोकायुक्त एम. एल. टहिलांनी यांनी मालेगाव महपालिकेसह पवारवाडी पोलिस ठाण्यास ‌सोमवारी दिले.
अवैध कत्तलखान्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे अवैध कत्तलखाने बंद करण्यात यावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. यावर मुंबई येथे सोमवारी सुनावणी झाली. यात लोकायुक्तांनी आदेश दिल्याची माहिती पवार यांनी दिली. पवार यांच्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे वेळोवेळी सुनावणी झाली. दरम्यान, या परिसरातील अवैध कत्तलखाने तसेच हाडके उकळणे व साबण तयार करण्याचे कारखान्यांबाबत महापालिका व पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबाबत ताशेरे ओढले. त्याबाबत योग्य ती कारवाई झाली नव्हती. तसेच साबण कारखानदार यांनी स्थानिक कोर्टातून याबाबत मनाई हुकुम मिळवले होते. त्यामुळे करवाई थांबली होती. लोकायुक्त टहलियानी यांनी १९ जुलै २०१६ रोजीच्या सुनावणीत स्थानिक कोर्टाचा मनाई हुकूम रद्द करीत सर्व अवैध कारखाने तोडावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यावर करवाई समाधानकारक कारवाई न झाल्यास पुनः लोकायुक्त कार्यालयास अर्ज करण्याचे आदेश तक्रारदार पवार यांना दिले. त्यानुसार निखिल पवार यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली. याबाबत झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी २७ नोव्हेंबरपर्यंत कार्यपूर्ती अहवाल लोकायुक्त कार्यालयात सादर करावा, असे आदेश दिले. यावेळी तक्रारदार पवार, महापालिका नगररचनाकार संजय जाधव, संकीर्ण कर अधीक्षक इकलाख अहमद, इमारत निरीक्षक चौरे, पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गांगुर्डे उपस्थित होते.

प्रशासनाची परवानगी नाहीच
साबण बनविणाऱ्या कारखान्यांनी स्थानिक कोर्टात दाखल केलेला दावा फेटाळला गेला असल्याची माहिती महापालिकेचे नगररचनाकार संजय जाधव यांनी लोकायुक्त टहलियानी यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिली. मात्र, महापालिकेतर्फे कत्तलखान्यांना परवानगी दिली गेली आहे का? अशी लोकायुक्तांनी विचारणा केली असता संकीर्ण कर अधीक्षक इकलाख अहमद यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यांना दरेगाव ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिली होती. मात्र, यावर लोकायुक्त टहलियानी यांनी सांगितले, की कोणत्याही कारखान्याला ‘ना हरकत दाखला’ परवानगी होत नाही, महापालिकेची बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र नाही. त्यामुळे हे अवैध स्लॉटर हाउस बंद करावेत, असे आदेश दिले.

दरेगाव तसेच पवारवाडी परिसरातील अवैध कत्तलखान्यामुळे नागरिकांसह नदीपत्रातील जीव, पशु, पक्षी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. याविरोधात लढा सुरू असून आता लोकायुक्तांच्या आदेशानंतर तरी महापालिका व पोलिस कारवाई करतील अशी अशा आहे. महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. अवैध कत्तलखाने पूर्णतः बंद करावेत.
- निखील पवार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाल्मीकी क्रीडांगणाचा वनवास संपणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील आययूडीपी परिसरातील नगरपालिकेच्या महर्षी वाल्मीकी क्रीडांगणाचा वनवास संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांच्या उपस्थितीत क्रीडांगणाच्या नूतनीकरण कार्यास प्रारंभ करण्यात आल्याने क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

क्रीडांगणाच्या नूतनीकरणाच्या कामात नगराध्यक्षा धात्रक यांच्यासह गटनेते गणेश धात्रक, नगरसेविका उषा तेजवाणी, दिलीप तेजवाणी या लक्ष घातले होते, अशी माहिती निमंत्रक डॉ. सुहास जाधव व देवेंद्र चुनियान यांनी दिली. या नूतनीकरणामध्ये स्टेडियमला तीनला गेट बसवणे आणि इतर गेट बंद करण्याच्या कामाचे उद्‍घाटन गणेश धात्रक यांचे हस्ते झाले. सदर काम २५ वर्षांपासून प्रलंबित होते. क्रीडांगणाची दुरवस्था झाल्याने सायंकाळनंतर तेथे अनेक अनिष्ठ गोष्टी घडत होत्या. याबद्दल क्रीडाप्रेमींसह नागरिकांची नाराजी होती. याबाबत सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला लक्षात आणून देण्यात आले. यानंतर या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेण्यात आली आणि क्रीडांगणाच्या नूतनीकरणाचा पर्याय पुढे आला.

दिलीप तेजवाणी यांनी कामाची जबाबदारी घेतली असून यातून कामाला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. येत्या आठवडाभरात काम पूर्ण होणार असून त्यासाठी पाच लाखापर्यंत निधी खर्च अपेक्षित आहे. स्टेडियमवर तरुण, ज्येष्ठ नागरिक यांची व्यायामासाठी गर्दी वाढत आहे. अनेक वर्षे रखडलेले स्टेडियमचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी नूतनीकरण प्रकल्पाचे स्वागत केले आहे. नूतनीकरण सोहळ्यास उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, मुख्याधिकारी मेनकर गटनेते, दिलीप तेजवानी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

पालिकेच्या स्टेडियमबाबत अनेक तक्रारी होत्या. नूतनीकरणाची जुनी मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्यासह सर्व नगरसेवकांची या कामात निश्चित साथ मिळणार आहे. क्रीडाप्रेमींची गैरसोय दूर होईल.
- गणेश धात्रक,
गटनेते, मनमाड पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडला भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूररोडवरील मामामूंगी मंगल कार्यालय परिसरात चोरट्यांनी दिवसा घर फोडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भाग्यश्री कुणाल देवरे (रा. सिंधू पॅलेस, गंगापूररोड) यांच्या तक्रारीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या कालावधीत देवरे कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी संधी साधली. त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोर स्नॅचर्स गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. महिलेने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप उर्फ अशोक दादा पालवे (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे. तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर भागात राहणाऱ्या पुष्पा पोपटलाल मथुरे (६०) या रविवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुंबई नाक्याकडून आपल्या घराकडे पायी जात असताना स्नॅचिंगचा प्रकार घडला होता. तुपसाखरे लॉन्स समोरून जाणाऱ्या मथुरे यांना संशयित पालवेने अडवले. एका हताने त्यांची हनुवटी धरून दुसऱ्या हाताने गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबडले. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर पहिल्या झटक्यात मंगळसूत्र हाती न आल्याने संशयित पालवेने मथुरे यांच्या छातीवर हल्ला केला. मात्र, मथुरे यांनी आरडाओरड केला. नवरात्रोत्सवामुळे या भागात पोलिस बंदोबस्त तैनात असून, लागलीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मथुरे यांच्या वर्णनावरून चारच तासात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक डी.पी.पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची बॅग पळविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थीनीच्या हातातील बॅग दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार केटीएचएम कॉलेज परिसरात घडली. बॅगमध्ये शालेय दप्तर आणि १५ हजार रुपयांचा मोबाइल होता. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. गायत्री मकवाना (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) या विद्यार्थिनीने फिर्याद दिली.

शिकवणीला जाण्यासाठी ती रविवारी कॉलेजमध्ये आली. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ती घराकडे परतण्यासाठी उड्डाणपूलाखालील कॉलेज प्रवेशद्वारावर बसची प्रतीक्षा करीत होती. यावेळी सर्व्हिस रोडने आलेल्या दुचाकीस्वाराने बॅग तिच्या हातातील बॅग ओढून धूम ठोकली. बॅगमध्ये शालेय पुस्तके आणि दोन मोबाइल असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज होता. घटनेचा अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून टॅबची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कारची काच फोडून चोरट्यांनी मोबाइल टॅब आणि इतर वस्तू लंपास केल्या. ही घटना ठक्करडोम परिसरात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोफिया अंद्रादे कपाडिया (रा. गडकरी चौक, नाशिक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कपाडिया या कुटुंबीयांसह शनिवारी (दि. २३) रात्री आठ वाजेच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमध्ये गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी आपली कार (एमएच १५ एफएफ ०७२९) ठक्कर डोमजवळ, एबीबी सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्क केली. याचा फायदा घेत चोरट्यांनी काच फोडून कारमध्ये ठेवलेला मोबाइल टॅब, स्पोर्ट शूज, सनग्लासेस तसेच पाकिट असा सुमारे तीन हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पाकिटामध्ये डेबिट कार्ड होते. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देशमुख करीत आहेत.

तडीपारास अटक
तडीपार असताना शहरात वावर असलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वीच संशयितावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
सतीश बबन माने (२२ रा. माऊली चौक दत्तनगर, अंबड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे त्यास शहरातून ४ सप्टेंबर रोजी हद्दपार करण्यात आले. मात्र, हद्दीपारीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत माने शहरातच वास्तव्य करीत होता. पोलिसांनी शनिवारी (दि. २३) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यास पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळा भागात सापळा लावून अटक केली. घटनेचा अधिक तपास हवालदार मल्ले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदूबाबांची नावे जाहीर करणारे महंत बेपत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देशातील चौदा भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास गेल्या दहा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे, भोंदूबाबांची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ते गायब झाले आहेत. यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. सरकारने त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे.

महंत मोहनदास हे आखाडा परिषदेचे प्रवक्ता आहेत आणि बडा उदासीन आखाड्याचे कनखल येथे कोठारी महंत आहेत. दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री त्यांनी हरिद्वार येथून मुंबई जाण्यासाठी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी भोपाळ स्टेशनवर त्यांचा एक शिष्य त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेला असता, ते त्यांच्या राखीव सीटवर आढळले नाहीत. दरम्यान, रात्री मेरठ येथपर्यंत ते प्रवासात होते असे सहप्रवाशांची माहिती घेतली असता समजते. त्यानंतर झोप लागल्याने महंत मोहनदास उतरून गेले, की त्यांचे काही बरेवाईट झाले हे कोणीही सांगू शकलेले नाही. त्यांच्या सीटजवळ त्यांचे कपडे आदी साहित्य आढळून आले. मात्र, साधूंजवळ बटवा असतो, तो मात्र नव्हता. या बटव्यात रोख रक्कम आणि त्यांच्या अंगावर काही दागिनेदेखील आहेत.

अर्थात महंत मोहनदास यांच्याजवळ असलेल्या रोकडमुळे काही दगाफटका झाला आहे, की काही दिवस अगोदर आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीने दुखावलेल्या एखाद्या भोंदूबाबाच्या समर्थकाने घातपात केला याबद्दल संशय व्यक्त होत आहे. महंत मोहनदास यांचे अपहरण झाले, की ती स्वतःच निघून गेले आहेत, याबाबत संभ्रमावस्था आहे. रेल्वे प्रशासनाने देखील याबाबत दखल घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे.

संरक्षणाची मागणी

साधूंना त्रास देणाऱ्या भोंदूबाबांच्या समर्थकांपासून संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे. आखाडा परिषदेच्या बैठकीस स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंत्री महंत हरिगिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषद प्रवक्ता डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद महाराज, अभयानंद ब्रह्मचारी, राजेंद्रसिंह महाराज, विचारदास महाराज, बालकमुनी महाराज, आनंदपुरी महाराज आदींसह विविध आखाड्यांचे साधू, महंत, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपासंदर्भात मंगळवारी (दि. २६) मुंबई येथे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. यात काय निर्णय घेतला जातो यानंतर आंदोलनाची भावी दिशा ठरणार आहे. दरम्यान, राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस बुधवारी २७ सप्टेंबरला आझाद मैदानावर एकवटून मागण्यांची मांडणी करणार असल्याची माहिती आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिली आहे.
वेळेवर मानधन न मिळणे, मानधनवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी न होणे, प्रवास भत्ता थकीत राहणे अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतीनीसांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला राज्यव्यापी संप पंधरा दिवसांनंतरही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ४०० सेविका व मदतनीसांचा या संपात सहभाग आहे. राज्यातील सुमारे ९७ हजार अंगणवाड्यांचे कामकाज या संपामुळे बंद आहे. सेविकांना अवघे पाच हजार तर मदतनीसांना अडीच हजार रुपयांवर काम करावे लागते. अनेक सेविका, मदतनीसांची कुटुंबे यावरच अवलंबून असून दरमहा हे वेतनही वेळेत मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीसांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. मानधनवाढीचा निर्णय होऊनही त्यावर कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये दुर्लक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या भावनेतून एकत्र येत ११ सप्टेंबरपासून राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संप पुकारला आहे. यावर उपाय काढत आशा कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांचे कामे करण्याचे परिपत्रक काढून हा संप फोडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याने या वर्गात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. मात्र, आशा कर्मचाऱ्यांनीही त्यास नकार देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याने या संपाला नवीन वळण लागले आहे. तर महापालिकेच्या सुमारे दोनशे अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीसांचा या संपात सहभाग असल्याची माहिती राजश्री पानसरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा संपात मोठा सहभाग आहे. वेळोवेळी देण्यात आलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने अन्यायाची भावना या वर्गात निर्माण झाली आहे. आझाद मैदानावर बुधवारी (दि. २७) राज्यातील अंगणवाडी कर्मचारी एकवटणार असून पन्नास हजारांहून अधिक सेविका, मदतनीस यावेळी एकत्र जमून मागण्या मांडणार आहेत.
- राजू देसले, राज्य अध्यक्ष, आयटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आजपासून धार्मिक उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
आर्ट ऑफ लिव्हिंग, वैदिक धर्म संस्थान परिवाराच्या वतीने मंगळवारपासून (दि. २६) तीन दिवसीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड परिसरातील श्रीकृष्णा लॉन्स येथे हे उपक्रम होणार आहेत.
या धार्मिक उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २६) सकाळी गणेश होम व नवग्रह होम, सायंकाळी ५ ते ९ या काळात नवचंडी होम व सत्संग होणार आहे. बुधवारी (दि. २७) सकाळी ७ ते १२ या वेळेत महारूद्र होम होणार आहे. सायंकाळी ५ ते १० या वेळेत महासुदर्शन होम आणि सत्संग होणार आहे. तर गुरुवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता महाचंडी होम होणार आहे. या सोहळ्याची पुर्णाहूती दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. याच दिवशी १००८ कन्या पूजनाचा संकल्प घेण्यात आला असून देशभरात २६ ठिकाणी पूजा होणार आहे. याशिवाय सामाजिक उद्दिष्टाने नागरिकांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजता ‘फ्री लिगल सेल’चे उद्‍घाटन केले जाणार आहे. गरजू व्यक्तींनी आर्ट ऑफ लिव्हिंगशी संपर्क साधल्यास त्यांना नामांकित वकिलांमार्फत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलातर्फे आज सखी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने महिला सुरक्षितता आणि जनजागृती यासाठी मंगळवारी (दि. २६) पोलिस सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ११ वाजता मेळावा होईल. यावेळी दामिनी पथकाच्या वाहनाचा अनावरण सोहळाही पार पडणार आहे.
कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर आदींसह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहे. महिलांवर बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, हुंडाबळी आदी मार्गाने अत्याचार होतात. कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शारिरीक शोषण, अश्लिल शेरेबाजी हा प्रकारही सुरू आहे. काही दुकानांसह शोरूमच्या चेंजिंगरूममध्ये छुपा कॅमेरा ठेवून व्हिडिओ क्लिप्स काढण्याचे प्रकार केले जातात. याबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाच्या वाहनाचे अनावरणही यावेळी होणार आहे. मेळाव्यासाठी महिलांसह कॉलेज युवती, विविध महिला बचत गट, महिला मंडळांच्या पदाधिकारी आणि महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेसा’ जमिनींबाबत मागविले मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे’च्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात करण्याचा सरकारचा मानस असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे इगतपुरीत भूसंपादनाचा वेग मंदावला आहे. ‘पेसा’क्षेत्रामध्ये जमीन संपादनात कायद्याचा अडसर निर्माण झाला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागव‌िले आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी जमीन संपादनाच्या कामास सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून १००.६१ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. त्यासाठी ४९ गावांतील १२९०.८ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सद्यस्थ‌ितीत जिल्ह्यात ८० हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. इगतपुरीमध्ये भारत पेट्रोलियमच्या इंधन पाइपलाइनचाही समृद्धी भूसंपादनाला अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पात जमिनी गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांवर कर्ज आहे. त्यामुळे आधी कर्जमाफी होऊ द्या, मग बघू अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. इगतपुरी हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे आदिवासींच्या जमिनी आदिवासींनाच खरेदी करता येतात. हाच कायदा जमीन संपादनाच्या कामकाजात डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागव‌िले आहे.

लक्ष्य मुदतीत कार्यपूर्तीचे
समृद्धीसाठी तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. अडीच ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परंतु, एक ना अनेक अडचणींमुळे ही कामे मुदतीत पूर्ण होऊ शकणार की नाही? असा सवालही उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाच्या पत्नीस कॅन्टोन्मेंट सेवेत घ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
लामरोड येथील सहा नंबर नाका परिसरात १५ दिवसांपूर्वी अपघातात बळी गेलेल्या लष्करी जवान योगेश गवळी यांच्या पत्नीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सेवेत रुजू करून घेण्याची मागणी मनसेने केली आहे. या संदर्भातील लेखी निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास देण्यात आले.
लामरोडवरील ६ नंबर नाका ते भगूर दरम्यान १२ हून अधिक गतिरोधक आहेत. त्यावर कुठेही रिफ्लेक्टर नाही. तसेच आखण्यात आलेले झेब्रा क्रॉसिंग पट्टेही रात्री नजरेस पडत नाही. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बांधकाम विभागासह संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये? यापूर्वीही लामरोडवरच अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत असल्याचा संतप्त सवाल असा सवाल मनसे शहराध्यक्ष गोकुळ जाधव यांनी निवेदनातून केला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर यांना निवेदन देतेवेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष गोडसे, माजी शहराध्यक्ष भास्कर चौधरी, संजय गीते, नितीन काळे, संदीप चौधरी, सुधीर वाजे, विजय गव्हाणे, राहुल वाडेकर, ऋषिकेश घोलप, अशोक ताजने, अजय मुसळे आदींसह मनसेचे कार्यकतें उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरात दोन चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरात ठिकठिकाणी शहर पोलिसांकडून नाकाबंदी व वाहनतपासणी सुरू असतानाही उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. मोटवाणी रोडवरील साईबाबा सोसायटी तसेच पुणे महामार्गावरील गुरुद्वारासमोरील एलआयसी बिल्डींग रोडवरील गुरुआशिष इमारतीजवळ या घटना घडल्या.

नवरात्रीनिमित्ताने आयोजित श्रीदुर्गा सप्तशती पाठासाठी जाणाऱ्या नंदिनी आहिरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन असे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मोटवाणीरोड येथे घडली. तसेच गुरु आशिष इमारतीजवळ महाजन (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने दुचाकीस्वाराने खेचन नेले. मात्र या महिलेने इमिटेशन ज्वेलरी घातलेली होती. मोटवाणी रोडवरील नंदिनी अहिरे या महिलेचे दागिने खेघून पळ काढलेल्या दुचाकीस्वारांनीच पुढे जाऊन एलआयसी बिल्डींग परिसरात पुन्हा चेन स्नॅचिंग केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजधानी चौक परिसरात गतिमंद मुलांची शाळा आहे. तेथेही एका महिलेची चेन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी खेचून पोबारा केल्याची घटना घडल्याची माहिती या भागात सीसीटीव्ही बसविण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी दिली आहे. देवळाली गावातील सत्कार पॉईंट येथेही एक चेन स्नॅचिंगची घटना घडल्याची माहिती समजते. उपनर पोलिस ठाण्यात मात्र या घटनांची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी मार्केटला बूम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्री, तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीला महत्त्व असल्याने हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत आहे. अष्टमी, नवमी अन् दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहन घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये बूम आल्याची स्थिती आहे.

शहरात विविध भागातील दुचाकींच्या दालनात अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. काहींनी डाऊन पेमेंट अदा केले आहे, तर अनेकांची बँकेची कर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे तीन हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी गेली असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. काहींनी आवडता क्रमांक मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दसऱ्याच्या अगोदर आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होण्यासाठी काहींची धावपळ सुरू आहे.

वाहन विक्रीच्या दालनांत ग्राहकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे, तर त्यांना विविध वित्त संस्थांचे कर्ज उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अंबड, सातपूर येथील कामागारांनी एकत्र येऊन वाहन खरेदीचे बेत आखले आहेत. येत्या दसऱ्याला आपल्या घरात दुचाकी आलीच पाहिजे, अशी व्यवस्था करण्यात कामगार व्यस्त आहेत. दुचाकी घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्या विश्वासू मेकॅनिकचा सल्ला घेतला आहे. जास्त अॅव्हरेज देण्याबरोबरच तिच्यातील ड्युरॅबिलिटीकडे आणि अन्य सोयी-सुविधा तपासून दुचाकींचे बुकिंग केले जात आहे.

--

बहुसंख्य शोरूम्सकडून सूट

गणेशोत्सवानंतर दुचाकी खरेदीचा वेग काहीसा मंदावला होता. पितृपक्षात फार कमी प्रमाणात या व्यवसायात उलाढाल झाली. मात्र, घटस्थापनेपासून वाहन खरेदीला तेजी आली असून, अनेकांकडून दुचाकींचे बुकिंग केले जात आहे. दुचाकी घेणारा ग्राहक आपल्याकडेच यावा यासाठी बहुसंख्य शोरुम्स चालकांनी मोठ्या प्रमाणत सवलती जाहीर केल्या आहेत. आपल्याकडेच ग्राहक कसे वळतील यासाठी अनेकांनी आपली मार्केटिंगची टीम कामाला लावली आहे.

--

जुन्या दुचाकींसाठी गर्दी

अनेकांना काही कारणास्तव नवीन दुचाकी घेणे परवडत नाही. अशा ग्राहकांकडूनदेखील जुन्या बाजारपेठेत चांगल्या दुचाकींचा शोध सुरू केला आहे. अनेकांनी सिडको, सातपूर ओझर येथे असलेल्या दुकानांमध्ये माहिती घेतली असून, टोकन देऊन आपली वाहने बुक केली आहेत.

--

नुकतीच मी ज्युपीटर गाडी खरेदी केली. दुकानात गर्दी असतानाही मला चांगली सर्व्हिस मिळाली व गाडीदेखील मिळाली. दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलो नाही.

-प्रवीण शिरुडे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पवृक्षाची सावली रेणुका माऊली

$
0
0

विजय गोळेसर

--

‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ असे जिचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, त्या रेणुकादेवीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आहे. रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.

--

रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी-

रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परमपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची, एवढे तिचे पावित्र्य कठोर होते. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनांत कामवासना जागृत झाली. तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला. जमदग्नींची देवपूजा खोळंबून राहिली. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलाला, परशुरामाला दिली.

परशुराम परमपितृभक्त होता. वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. आजही माहूरला रेणुकादेवीच्या फक्त पादुका, तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते.

--

दररोज त्रिविध रुपांत दर्शन

रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.

चांदवडची रेणुकादेवी स्वयंभू असून, मूर्ती पाषाणाची आहे. रेणुकामातेची मूर्ती मनुष्याकृती नसून, तिथे एक तांदळा आहे. शेंदूरचर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय. त्याला डोळे, नाक, तोंड आहेत, तसेच नथ व मुकुट घातलेले असतात. रेणुकादेवीलाच कर्नाटकात ‘यल्लमा’, तर महाराष्ट्रात ‘यमाई आणि ‘एकवीरा’ असेही म्हणतात. या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात, की गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपांत दिसते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी, पादुका, नाग वगैरेंच्या दगडी प्रतिमा आहेत तिथेच भुयाराचे बंद केलेले दार आहे, असे सांगितले जाते. यावर्षी पुरातत्त्व विभागाकडून मंदिर परिसरात सुधारणा करण्यात आली आहे. मंदिराचे दरवाजे व गाभारा मोठा करण्यात आल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. दर वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हजारहून अधिक महिला देवी मंदिरात घटी बसल्या आहेत. त्यांच्यासाठी चार प्रशस्त हॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शनरांगेत भाविकांना बसण्यासाठी बेंचेस, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, दर्शनासाठी दोन स्वतंत्र जिने इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

--

देवीचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने

रेणुकादेवीच्या मंदिराची व देवीची सर्व व्यवस्था येथील कुंभार व गुरव पाहतात. चांदवडच्या रेणुकादेवीला भरपूर दागिने आहेत. देवीचा मुखवटा सोन्याचा असून, तो जवळजवळ दोन किलो वजनाचा आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवशी सकाळी एक पालखी रंगमहालातून निघते. तिच्यात देवीचा मुखवटा व दागदागिने असतात. अतिशय कडक बंदोबस्तात ही पालखी डोंगरातील देवीच्या मंदिरात जाते. दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात. रात्रीआठ वाजता ही पालखी पुन्हा पोलिस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते. देवीचे मंदिर गावापासून तीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे इतर वेळी गाभाऱ्यात देवीची चांदीची प्रतिमा ठेवलेली असते. रेणुकादेवीची आरती सकाळी व सायंकाळी नियमितपणे केली जाते. नवरात्रीत सकाळी साडेआठ वाजता, तर रात्रीची आरती देवीची पालखी निघून गेल्यावर रात्री साडेनऊ वाजता करण्यात येते. नवरात्रीत दररोज देवीची पालखी, महाभिषेक, आरती आदी उपक्रम होत आहेत.

--

जुन्या दगडी बांधणीचे मंदिर

देवीचे मंदिर जुन्या दगडी बांधणीचे आहे. आतमध्ये फरशी व शेड वगळता सगळे बांधकाम अहिल्यादेवींच्याच काळातले आहे. दगडी प्रवेशद्वार, ५० पायऱ्या, मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी दीपमाला ही सगळी दौलत अभिमानाने मिरवत रेणुकामातेचे मंदिर चांदवडमध्ये डौलाने उभे आहे. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराचे वैभव आहे आहे. या मंदिराशिवाय चांदवड येथे कालिका, तसेच दशाश्री माळी समाजाची महालक्ष्मी अशी दोन मंदिरे असून, नवरात्रीत या दोन्ही ठिकाणीही भाविकांची गर्दी दिसून येते.

--

जिल्ह्यातली मोठी यात्रा

नवरात्रीत नऊ दिवस आणि चैत्री पौर्णिमेला एक दिवस चांदवडच्या रेणुकादेवीची यात्रा भरते. सप्तशृंगगडानंतरची मोठी यात्रा म्हणून येथील यात्रेचा उल्लेख करावा लागेल. यात्रेच्या काळात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर दूरदूरच्या ठिकाणांहून भाविक देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येतात. यात्राकाळात विविध खेळणी, गृहोपयोगी वस्तूंच्या शेकडो दुकानांचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. चांदवडच्या देवीची ही यात्रा पंचक्रोशीतीलच नव्हे, तर नाशिक जिल्ह्यातील मोठी यात्रा आहे. अर्थचक्राला गती देणारी ही यात्रा गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून प्रसिद्ध आहे. लहान विक्रेत्यांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच या यात्रेमुळे आर्थिक फायदा होतो. पूर्वी देवीच्या मंदिराजवळ फुलांची एक-दोन दुकानं असायची. हल्ली देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, ओटी भरण्याचे साहित्य, हिरवी साडी, चोळी, चुडा, हळद-कुंकू, प्रसाद, नारळ, देवीचे फोटो, पुस्तके आदींचा २५-३० दुकाने वर्षभर लागलेली असतात. यात्राकाळात तर हजारो भाविकांच्या वर्दळीने रेणुकादेवीचा परिसर फुलून जातो. यंदाही रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवाने परिसरात चैतन्य अवतरले आहे. राज्यातील व परराज्यांतील हजारो भाविकांच्या गर्दीने चांदवड आणि रेणुकामातेचा मंदिर परिसर फुलून गेला आहे.

--

हरवला निसर्गरम्य परिसर

एकेकाळी देवीचे मंदिर जिथे आहे तो सर्व परिसर घनदाट झाडीने बहरलेला होता. रेणुका देवीच्या मंदिराबाहेरच्या पटांगणातून डाव्या बाजूला चंद्रेश्वराचा डोंगर आहे. तिथे पाण्याचा एक मोठा धबधबा सर्वांनाच आकर्षित करीत असे. उजव्या बाजूला डोंगराचे अतिसुंदर इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण दिसते. चित्रपट निर्मात्यांनाही हा निसर्गरम्य परिसर आवडल्यास नवल नाही. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘जय रेणुका’ या चित्रपटात चांदवडच्या देवीजवळील या दोन्ही डोंगरांच्या परिसरात चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र, हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता केवळ चित्रपटातच पाहता येतील. कारण, रेणुकादेवी मंदिराभोवतालचा निसर्ग मंदिरावरून जाणाऱ्या आग्रारोडच्या रुंदीकरणात नष्ट झाला. एकेकाळी निसर्गसंपन्न असलेला रेणुका मंदिराचा परिसरही आता उघडा-बोडका झाला आहे.

--

नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये

यंदा नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात दररोज महाअभिषेक, पालखी मिरवणूक, महाआरती होत आहे. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या माथ्यावरून व पायथ्यापासून येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाने यंदा मंदिराचे दरवाजे व गाभारा मोठा केल्याने मंदिरात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. भाविकांना सुलभ दर्शनासाठी शिर्डीसारखे स्टीलचे बॅरिकेडिंग केले आहे. घटी बसलेल्या हजारावर महिलांची स्वतंत्र व्यवस्था भक्त निवासातील चार हॉलमध्ये करण्यात आली आहे. श्री रेणुकादेवी ट्रस्टकडून भाविकांसाठी वाहनतळ, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, विजेचे दिवे व आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात येत आहेत. श्री रेणुकादेवी ट्रस्टमध्ये मधुकर पवार (व्यवस्थापक), सुभाष पवार (सहायक व्यवस्थापक) यांचा समावेश असून, मुख्य पुजारी तानाजी अहिरराव, तर पुरोहित प्रकाश वैद्य, विजय जोशी, हरेंद्र वैद्य, नंदकुमार वैद्य हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश बँकेचे पाच सभासद ठरणार अपात्र!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

महेश को-ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या निकषांची पूर्तता न केल्याने निवडून आलेल्या पाच उमेदवारांना अपात्र ठरविण्याची शिफारस सहकारी संस्थांच्या तालुका उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या निर्णयामुळे माहेश्वरी समाजात खळबळ उडाली आह. महेश बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नही करण्यात आले. परंतु देवेंद्र भूतडा यांनी माघार न घेतल्यामुळे नियमानुसार निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत भुतडा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडून आलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठीच्या निकषांची पूर्तताच केली नसल्याचा दावा भुतडा यांनी सहकारी संस्थांच्या तालुका उपनिबंधकांकडे केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुजराथी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही त्यामध्ये नोंदविण्यात आला. तालुका उपनिबंधकांनी भुतडा यांच्यासह निवडणूक अधिकारी गुजराथी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते.

निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांनी संचालकांना त्रास देण्यासाठी चुकीचे अर्ज केल्याची बाजू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावतीने वकीलांकडून मांडण्यात आली. तर अर्ज छाननीवेळी भुतडा प्रत्यक्ष उपस्थ‌ित असतानाही त्यांनी तोंडी किंवा लेखी आक्षेप नोंदविला नसल्याची बाजू गुजराथी यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित ठेवण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. काही उमेदवारांनी बँकेचे मंजुर उपविधी क्र. ४० चे पालन केले नसल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे वल्लभदास जाखोटीया, ओंकारनाथ मणियार, हिरा जाजू, मंगला कलंत्री, विकास साळवे यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करण्याबाबतची शिफारस नाशिक तालुका सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगगडावरील अनिष्ट प्रथेला अखेर मूठमाती

$
0
0

दीपक महाजन, कळवण

कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगड मंदिर परिसरात नवरात्रीत बोकडबळीची वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा महसूल प्रशासनाने यंदापासून बंद केली आहे. या निर्णयामुळे श्रद्धा असलेल्या भाविकांची निराशा झाली असली, तरी इतिहासजमा झालेली सतीची प्रथा हीदेखील काळानुरूप बंद झालीच, असा दाखला प्रशासनाने दिला आहे. तुळजापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांमध्येही अशा प्रथांना बंदी आहे. कुठल्याही पशूंची अशी हत्या करणे कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र, रुढी व परंपरेचा दाखला देत आजपर्यंत येथे ही प्रथा सुरू होती.

पशुहत्या होऊ नये, तसेच गेल्या वर्षी नवरात्रीत ही प्रथा सुरू असताना हवेत फायरिंगद्वारे दिल्या जाणाऱ्या मानवंदनेप्रसंगी गर्दीत बुलेटचे छर्रे उडाल्याने १२ जण जखमी झाले होते. भविष्यात या प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेत महसूल प्रशासनाने अर्थात, कळवणचे प्रांत अर्जुन श्रीनिवासन व तहसीलदार कैलास चावडे यांनी हा निर्णय घेतला व ही परंपरा बंद केल्याचे फर्मान काढले. नवरात्रोत्सवयाच्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याला नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही मोठे पाठबळ दिले. मात्र, भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा भाग असलेली नवसपूर्ती, कारण व विविध प्रकारच्या विधीनिमित्त केले जाणारे बोकड अथवा अन्य बळीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या हद्दीबाहेरच्या जागेची अट घातली आहे. थोडक्यात काय, तर प्रशासनाने देवस्थान ट्रस्टमार्फत दसऱ्याच्या दिवशी होणारी बोकडबळीची प्रथा बंद केली आहे. अन्य ठिकाणचे कुठलेही विधी भाविक करू शकतात.

--

अशी दिली जायची आहुती

श्री सप्तशृंग देवीचे हे स्वयंभू प्रकारातील जागृत देवस्थान आहे. नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी येथे सहस्रचंडी यज्ञाच्या आहुतीसाठी बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून रुढी व परंपरेने ही प्रथा सुरू आहे. गडावरील शिवालयापासून वाजत-गाजत बोकडाची मिरवणूक काढण्यात येऊन ट्रस्ट कार्यालयात त्याची विधिवत पूजा होत होती. तेथून पहिल्या पायरीजवळ महिषासुरदर्शनानंतर श्री दत्तात्रेय मंदिराजवळ असलेल्या उंबराच्या झाडाखाली दसरा टप्पा नावाच्या जागेत शेकडो ग्रामस्थ, भाविक, पर्यटक यांच्यासमोर धारदार शस्त्राने बोकडाचे मस्तक उडविले जायचे. या मस्तकाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत भगवतीसमोरील यज्ञकुंडात आहुती दिली जात होती. यादरम्यान मानवंदना म्हणून हवेत फायरिंग केली जायची. बोकडबळीची परंपरा कधी सुरू झाली व कोणी सुरू केली याची नोंद कुठेही नाही. मात्र, सप्तशृंग देवस्थान ट्रस्टच्या तत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेकडून सन १९७५ पासून हवेत गोळीबार करण्याची प्रथा सुरू करण्यात आल्याचे आढळते. या विधीप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, भाविक व देवस्थानच्या कर्मचारीवर्गाची झुंबड उडायची. या आहुतीनंतर नवरात्र व दसरा महोत्सवाची सांगता व्हायची, असे सांगितले जाते.

--

अनेक समाजधुरिणांकडून प्रबोधन

पुरोगामी महाराष्ट्रात व डिजिटल इंडियाच्या माहोलमध्ये पशुहत्या करण्याचे कर्म देवस्थान ट्रस्टच्याच माध्यमातून होत होते. १९५५ च्या सुमारास संत गाडगेबाबांसारख्या अनेक समाजधुरिणांनी या कृतीला विरोध केला होता. नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर एम. आर. यार्दी यांनी याविरोधाची दखल घेत जाहीर पत्रक काढून या प्रथेला व पशुहत्येला विरोध करीत समाजप्रबोधन केले होते. त्यांनी ११ मार्च १९५५ रोजी काढलेल्या जाहीर पत्रकाचा आशय असा होता, की पशूचे बलिदान देऊन देवी कधीच प्रसन्न होणार नाही. याउलट त्यास जीवदान दिल्याने ती खूश होईल. अनेक भाविकांना ही प्रथा बंद व्हावी असेच वाटत होते. मात्र, या परंपरेत आतापर्यंत कधीही व्यत्यय आला नव्हता.

--

प्रशासनाचे कारवाईचे संकेत

यंदा ही प्रथा अचानकपणे बंद करण्यात आल्याने गडावरील काही ग्रामस्थ व काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, देवस्थान ट्रस्टने हा प्रयोग बंद न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत. ही प्रथा ट्रस्टने बंद केल्याचा समज ग्रामस्थांचा झालेला आहे. तशा रोषाचा सामना देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला करावा लागत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत स्पष्टपणे या प्रथेला बंदी घालण्याचीच री ओढल्याने या निर्णयामुळे एका पशूची हत्या अखेर थांबली, हे मात्र नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्दम्य इच्छाशक्तीची ‘वंदना’

$
0
0

कोणतेही आव्हान असो किंवा आजार, त्याला तोंड देण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. फक्त या क्षमतेचा शोध त्या व्यक्तीला लागलेला नसतो. आपल्या क्षमतांचा आपण विचारही करीत नाही. ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांनी मात्र आपल्यातील क्षमता ओळखल्या. त्या बळावरच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला गेल्या दहा वर्षांत एक-दोनदा नव्हे, तर तीन वेळा त्या हसतमुखाने सामोऱ्या गेल्या. आजारपणामुळे खचून जाणाऱ्यांसाठी प्रा. वंदना अत्रे या अत्यंत आदर्शवत उदाहरण ठरल्या आहेत.

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आपल्याला होईल असा विचारही अत्रे यांनी कधी केला नव्हता. तोही वेगवेगळ्या वेळी आणि शरीरात वेगवेगळ्या ठ‌िकाणी. कॅन्सर होण्यासाठी कोणतेच निश्च‌ित कारण नाही. तो कुणालाही होऊ शकतो, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यामधून सहजासहजी सावरणेही शक्य नव्हते. मात्र, तरीही त्या डगमगल्या नाहीत. मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांची त्यासाठी त्यांना खूप मदत झाली. मनाची ताकद कल्पनेपेक्षाही अफाट असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. ‘अपंग माणूस पर्वत चढून जाऊ शकतो’ अशा आशयाची एक म्हण आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती पाहावयास मिळतात. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जाताना अत्रे यांनीही मनाचे बळ एकवटले. इच्छाशक्ती जागी केली. वेद-उपनिषदांमध्ये सांगितलेल्या प्राणायामाची त्यासाठी खूप मदत झाली. आपल्याच बाबतीत असे का घडले, असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपल्याला भविष्यात काय हवे आणि त्यासाठी आपण वर्तमानात काय करू शकतो, याचे चिंतन करण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घेतली.

जीवनात आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या. त्या आपल्यालाच का मिळाल्या, असा प्रश्न आपण स्वत:ला कधी विचारत नाही. त्यामुळे आपल्याच बाबतीत वाईट का घडते, असा विचार करण्याचा अधिकारही आपल्याकडे राहत नाही. या आजाराकडे त्यांनी खूप सकारात्मकतेने पाहिले. शरीर आणि मनाशी संवाद साधण्याची संधी त्यामुळे मिळाल्याचे त्या सांगतात. कुठलाही आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला संकेत देत असते. शरीर काय सांगतेय हे ऐकायलाच हवे. शरीरासाठी दररोज १५ मिनिटे वेळ द्यायलाच हवा. सकारात्मक विचार, इच्छाशक्ती, छंद आणि चांगल्या माणसांची सोबत यामुळे कुठल्याही संकटावर मात करता येते, असा संदेश अत्रे देतात.

--

नकारात्मकतेवर केली मात

त्या सकारात्मक विचाराकडे जात असतानाच आजारपणात नकारात्मक विचार अधिक प्रबळ होत. त्यामुळे त्या काहीशा खचल्या. अशावेळी त्यांनी आवडीच्या गोष्टी करण्यास प्राधान्य दिले. लेखन, संगीत आणि वाचनात स्वत:ला गुंतविले. पुस्तके वाचली. आवर्जून चांगल्या फिल्म्स पाहिल्या. स्वत:ला सतत बिझी ठेवले. त्यामुळेच त्या नकारात्मकेतेचे दरवाजे बंद करू शकल्या. या आव्हानात्मक काळात त्यांच्या अवतीभवती असलेल्या माणसांचीही त्यांना खूप मदत झाली. आफ्रिकन भाषेत एक म्हण आहे ‘एक मूल वाढविण्यासाठी चांगल्या गावाची गरज असते!’ म्हणजेच एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी अवतीभवती धीर देणारी, आपल्यातील उमेद जागविणारी चांगली माणसेही असायला हवीत. सुदैवाने अशी अनेक माणसे त्यांना भेटत गेली.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images