Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भोंदू बाबांच्या समर्थकांवर संशय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास बेपत्ता होऊन ११ दिवस उलटले. मात्र, अद्याप त्यांच्याबाबत माहिती घेण्यास सरकारला अपयश येत असल्याचे पाहून साधू- महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या यादीतील भोंदू बाबांच्या समर्थकांवर संशय व्यक्त केला जात आहे. आखाडा परिषदेने दुसरी यादीही जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. कदाचित आपले नाव जाहीर होईल म्हणून अशा संभाव्य संशयित भोंदूंचा हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असावा, अशी चर्चा साधूंमध्ये होत आहे.

साधूंचे आखाडे भारतभर आहेत आणि साधू नेहमीच रेल्वेने प्रवास करीत असतात. आता हा रेल्वेप्रवासच धोक्याचा झाल्याने साधूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आखाडा परिषद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून, त्यावर साधू- महंतांमध्ये चर्चा होत आहे. रेल्वेच्या आरक्षित बोगीतून एखादा प्रवासी अचानक नाहीसा होतोच कसा, ही रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. हरिद्वार ते भोपाळ या प्रवासादरम्यान किती स्थानके आहेत आणि तेथे सीसीटीव्ही असेल तर त्याची तपासणी करावी. थांबा नसलेल्या ठिकाणी रेल्वे थांबवण्यात आली असेल तर साखळी ओढल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. देशभरात साधू-संतांमध्ये खळबळ उडविणारी घटना असताना याबाबत सरकार यंत्रणा निश्चल असल्याचे पाहून साधूंचा पारा चढला आहे.

दरम्यान, साधूंशी चर्चा केली असता, काही साधूंना यादी जाहीर झाल्यानंतर रेल्वे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी वादावादीस सामोरे जावे लागण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत. यामध्ये भोंदू बाबांचे समर्थक असल्याचेही लक्षात आले. राम रहीम प्रकरणात साधू बदनाम होत असल्याने आखाडा परिषदेने भोंदू बाबांची यादीच जाहीर केली होती. त्र्यंबकेश्वर येथे साधूंचे दहा आखाडे आहेत. या दहा आखाड्यांतील साधूंपैकी महंत मोहनदास यांच्या बेपत्ता होण्याचा विषय केंद्रस्थानी आहे.

महंत मोहनदास बेपत्ता होण्याच्या घटनेत निश्चितच भोंदू बाबांच्या समर्थकांचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सरकारने तातडीने चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सरकारने रेल्वेसुरक्षा यंत्रणेकडून सखोल माहिती घेऊन याबाबत छडा लावला पाहिजे, असे डॉ. बिंदूजी महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​देवाणघेवाणीचे `कौशल्य` शिक्षण!

$
0
0

आयटीआय अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही आयटीआय संस्थांकडून सेमिस्टरच्या अगोदर पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती एका प्रकरणाद्वारे उघड झाली आहे. दिंडोरीमधील हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यातील इतर संस्थांमध्येही असेच प्रकार सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. दिंडोरीमधील प्रकाराची विद्यार्थ्यांनी संचालनालयाकडे दिलेली लेखी माहिती आणि मुख्यमंत्री व मंत्रालयांपर्यंत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे या प्रकरणाची कोंडी फुटली आहे.


‘मेक इन इंडिया’ सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळू इच्छिणाऱ्या केंद्र सरकारचे उद्देशच पायदळी तुडविण्याचे प्रकार काही आयटीआय संस्थांकडून सुरू आहेत. असेच धक्कादायक वास्तव एका माहितीद्वारे उघड झाले आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून अभ्यासक्रमातला टप्पा पूर्ण करू पाहणाऱ्या आयटीआयच्या प्रति विद्यार्थ्यामागे चक्क दोनशे ते पाचशे रुपये उकळून‘अर्थ’पूर्ण मागणी काही ठिकाणी झाल्याचा लेखी आरोपच विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात केला गेला. मात्र चौकशीअंती अशा आर्थिक मागणीत तथ्यता आढळून येत नसून अशाप्रकारचा आरोपच निराधार असल्याची व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची बाजू या विभागाचे सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी‘मटा’शी बोलताना मांडली.

दिंडोरी आयटीआयमध्ये असाच अनुभव आल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी नाशिक विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर, कौशल्य विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, विभागाचे संचालक, मुख्य सचिव, उपसचिव यांच्याकडेही तक्रार अर्जांच्या प्रती पाठविल्या आहेत.

कौशल्य शिक्षणाची ऐसीतैशी

‘मेक इन इंडिया’सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे कौशल्य विकसनासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे ग्रामीण भागात कौशल्य विकसनाची मदार असलेल्या आयटीआयसारख्या संस्थेवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच करण्यात आलेला हा आरोप गंभीरच आहे. चौकशीअंती हे आरोप तथ्यहीन असल्याचा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचलनालयाचा दावा असला तरीही अशाप्रकारच्या लेखी तक्रारी उपस्थित होणे, या प्रकरणाची संचालनालयास चौकशी लावणे भाग पडण्याचा प्रकार व्यवसाय शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरावा.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

परीक्षेच्या अगोदर प्रॅक्टिकलच्या गुणदानासाठी किंवा परीक्षेत उत्तरे सांगण्यासाठी संस्थेतीलच काही घटकांकडून बेकायदेशीर आर्थिक मागणी होत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप होते. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाला दिल्यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली. मात्र, तीन महिने उलटूनही त्या चौकशीचे काय झाले याबाबत तक्रारकर्ते अनभिज्ञ आहेत. या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

इंजिनीअरिंग किंवा मेडिकल विद्याशाखांच्या प्रवेशांपासून प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र कौशल्याधिष्ठीत आयटीआयसारख्या अभ्यासक्रमांबाबतीत असे फारसे प्रकार ऐकण्यात नाहीत. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेतील अशा अनुभवांसंदर्भात प्रशिक्षणार्थींनी २१ एप्रिल २०१७ रोजी सहसंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. यावर सहसंचालनालयाने कारवाई करत ९ जून २०१७ रोजी प्रशिक्षणार्थी तक्रारकर्त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात घेतले होते. तर २३ जून २०१७ रोजी नियमित प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणले लेखी स्वरूपात घेतले होते.

असे आहे प्रकरण...

आयटीआयचा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. यात विविध ट्रेड्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक मुलींचा आणि दुसरा मुलांचा असे दोन आयटीआय कार्यरत आहेत. या आयटीआय संस्थांमध्ये प्रामुख्याने मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, मशिनिस्ट आदी ट्रेड्सना मागणी विद्यार्थ्यांची पसंती असते. या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट आहेत. यापैकी पहिल्या गटात नियमित प्रशिक्षणार्थी येतात, तर दुसऱ्या गटात बीटीआरआय अंतर्गत अॅप्रेंटेसशीप करणारे प्रशिक्षणार्थी येतात. हा सर्व प्रकार बहुतांशी ऑटोमोबाइल ट्रेड संदर्भात घडल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा आहे. जिल्ह्यातील विविध आयटीआयमधून या ट्रेडमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षेसाठी दिंडोरी आयटीआय गाठावा लागतो. जानेवारी २०१७ आणि जुलै २०१७ या दोन गत सेमिस्टरपासून बहुतांश प्रशिक्षणार्थींनी या प्रकाराला विरोध सुरू केला आहे. या सेमिस्टर्समध्ये अनेक प्रशिक्षणार्थींनी अशा प्रकारच्या सूचनांना प्रतिसाद देणेच बंद केले आहे. असाच प्रकार जिल्ह्यासह राज्यभरात इतरत्र प्रकार सुरू असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांचा दावा आहे. या धर्तीवर जिल्ह्यातील दिंडोरी येथे सुरू असणाऱ्या एका प्रकाराला वाचा फोडण्याचा जोरदार प्रयत्न तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी

केला होता. यावर चौकशीला सुरुवात होऊन लेखी विद्यार्थ्यांचे जवाबही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात नोंदविण्यात आले. या जवाबांमध्ये संस्थेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी किंवा गुणदानासाठी आर्थिक मागणी होत असल्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी सहसंचालकांकडील लेखी जबाबात दिली आहेत. इतकी स्पष्ट उत्तरे देऊनही या चौकशीचे पुढे काय झाले. का, तक्रारीनंतर चौकशीचा फार्स उभारून नंतरचा अहवाल बासनात गुंडाळला गेला. याबाबतही तक्रारकर्ते विद्यार्थी अद्याप अनभिज्ञच आहेत.

... तर कारणे दाखवा नोटीस

आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर अगोदर पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सहसंचालक कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर चौकशी समिती नेमण्यात येऊन चौकशीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या तक्रारींमधील आर्थिक मागणीच्या मुद्द्यात तथ्य आढळत नाहीत. लेक्चर्सची अनियमितता किंवा शैक्षणिक दर्जा संदर्भात इतर ढिलाई असणाऱ्या बाबी काही प्रकरणात आढळल्या असून, लवकरच संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल.

-एस. आर. सूर्यवंशी

सहसंचालक, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग

बीटीआरआय प्रॅक्टिकल परीक्षेबाबतही तक्रार

२१ एप्रिल २०१७ रोजी पार पडलेल्या ऑटोमोबाइल बीटीआरआय प्रॅक्टिकल परीक्षेत दिंडोरी आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांकडून ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाच्या धमक्याही देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कृती समितीच्या पुढाकाराने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे सहसंचालकांकडे तक्रार केली होती. याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या प्रकाराबाबत ९ जून रोजी सहसंचालक कार्यालयाने लेखी विचारणा केली असता सत्य घटनाक्रम विद्यार्थ्यांनी लिहून दिला आहे.

प्राचार्य ‘आऊट ऑफ कव्हरेज’

या प्रकरणी माहितीसाठी दिंडोरी आयटीआयच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल क्रमांक‘आऊट ऑफ कव्हरेज असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे सहसंचालकांशी संपर्क साधून व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न‘मटा’ने केला. यानंतर तक्रार दाखल होताच चौकशी समितीच्या माध्यमातून तक्रारींमधील तथ्यांश पडताळण्याचे काम संचलनालयाने केले असल्याची माहिती सहसंचालकांनी दिली. तक्रारदारांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून लेखी जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी समितीला आर्थिक आरोपांत तथ्य आढळले नसल्याचे सहसंचालकांनी सांगितले. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांची संघटना, तिची विश्वासार्हता आणि तक्रारदारांची पार्श्वभूमी या संदर्भातही पाहणी चौकशीसोबतच गरजेची असल्याचेही सहसंचालक सूर्यवंशी यांनी‘मटा’ला सांगितले.



काही विषयांच्या तासिका वेळेवर होत नाहीत. परिणामी अभ्यासक्रम अपूर्ण राहतात. अशावेळी मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपुढे उत्तीर्ण होण्यासाठी पैसे जमा करण्याचे प्रकार प्रस्ताव ठेवले जातात. मी स्वत: पैसे दिले नाहीत मात्र इतरांनी दिल्याचे माहिती आहे. हे प्रकार बंद व्हावे.

माजी प्रशिक्षणार्थी, आयटीआय

------------------------

कौशल्याधारित शिक्षण असल्याने मध्यमवर्गीय व अतिसामान्य वर्गातील विद्यार्थी या अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. लवकरच जॉब करण्याचे उद्दिष्ट असल्याने यातील तक्रारी व पाठपुराव्याला विद्यार्थी टाळाटाळ करतात. सद्यस्थितीतही आमचे स्पष्ट म्हणणे आम्ही यंत्रणेस लेखी दिले आहे. यंत्रणेने योग्य ती कारवाई करावी. सध्या मी जॉब करतो. याशिवाय अधिक काहीही सांगायचे नाही.

माजी प्रशिक्षणार्थी, आयटीआय

संकलन : जितेंद्र तरटे

Jitendra.tarte@timesgroup.com / Twitter : jitendra@mt

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन विवाहितांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला. नांदगाव तालुक्यातील चांदोरा व खिरडी येथे या घटना घडल्या. चांदोरा येथील विवाहिता शशिकला मच्छिंद्र चव्हाण (वय ४२) शेतातील विहिरीत पाणी काढत असताना त्या पाय घसरून पडल्या. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. खिरडी येथील मनीषा विजय पठाडे (वय २२) पहाटे पाच वाजता शेतातील पाणी काढत असताना विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलिव्हरी बॉयकडून गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू ग्राहकांनी परत दिल्यास त्या वस्तू काढून त्यात इतर साहित्य भरून कंपनीला पाठवणाऱ्या डिलिव्हरी बॉयने संबंधित कंपनीला तब्बल ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत उपनगर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल अाहे.

यासंदर्भातील फिर्यादीनुसार, जय भवानीरोड परिसरात इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. सदर कंपनी फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग साइट्ससाठी काम करते. ग्राहकांनी वेबसाइटवर खरेदी केली, की त्या वस्तू जय भवानीरोडवरील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत येतात. तेथून डिलिव्हरी बॉइज ते पार्सल शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. अनेकदा ग्राहकांना वस्तू पसंत पडत नाही किंवा वस्तूमध्ये दोष असतो, तसेच खरेदीच्या वेळी दाखविलेली किंमत आणि प्रत्यक्ष द्यावी लागणारी किंमत यात तफावत असल्याने ग्राहक त्या वस्तू परत पाठवतात. अशा तब्बल ६४ लाख ५५ हजार ४०२ रुपये किमतीच्या वस्तू परस्पर लंपास करण्याचा प्रताप संबंधित डिलिव्हरी बॉयने केला आहे.

ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. कंपनीच्या वतीने किरण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या अज्ञात डिलिव्हरी बॉयविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करीत आहेत.

--

या वस्तूंवर मारला हात

इन्स्टाकार्ट कंपनीच्या अज्ञात डिलिव्हरी बॉयने तब्बल ६४ लाख ५५ हजार ४०२ रुपये किमतीच्या वस्तू परस्पर काढून घेतल्या. ग्राहकांनी दिलेल्या वस्तू कंपनीला न देता त्या बॉक्समध्ये इतर साहित्य भरून त्या परत कंपनीकडे पाठविण्यात आल्या. दि. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल १२ कॅमेरे, एक लॅपटॉप, तसेच एक प्ले स्टेशन अशा १५ किमती वस्तू काढून घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरेत परिवर्तन की ग्रामविकास?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिन्नर फाटा

संपूर्ण नाशिक तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२६) शांततेत ६३.२० टक्के इतके मतदान झाले. विद्यमान सरपंच राजाराम धनवटे व जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनल व भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांचे राजकिय भवितव्य बुधवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

मंगळवारी एकलहरे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. सहा वॉर्डांतून एकूण १७ सदस्य व सरपंच पदाच्या एका जागेसाठी दोन उमेदार उभे होते. या निवडणुकीत ७ हजार ४६८ मतदारांपैकी ४ हजार ७२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकलहरे कॉलनीतील माध्यमिक विद्यालयात ७ तर एकलहरे गावातील जिल्हा परिषद शाळेत २ बुथवर मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली एकूण ३२ निवडणूक कर्मचाऱ्यांनी कामकाज केले. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केल्याने मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एकलहरे कॉलनीतील माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर दोन्हीही पॅनल प्रमुख व सरपंचपदाचे उमेदवार सकाळपासूनच हजर होते.

प्रथमच सरपंच थेट जनतेतून

राज्यातील ग्रामपंचायतीत सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने घेतला. त्यानुसार एकहलरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच सरपंच निवड थेट जनतेतून होणार आहे. एकलहरे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद अनुसुचित जाती महिला संवर्गासाठी राखिव असून या पदासाठी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव व परिवर्तन विकास पॅनलच्या सुजाता दिलीप पगारे यांच्यापैकी एकलहरेतील मतदार सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याचा फैसलाही बुधवारी दुपारपर्यंत होणार आहे. मतमोजणी नाशिक तहसील कार्यालयात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे पडतोय वास्तव जगाचा विसर

$
0
0

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

व्हर्च्युअल जगाच्या आकर्षणामुळे आजच्या युवा पिढीला वास्तविक जगाचा विसर पडला असून, पिढीत एकाकीपणा वाढला आहे. त्यामुळे खरे प्रश्न दुर्लक्षित होत त्यातून नैराश्य येत आहे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. सोशल मिडीयाच्या आहारी गेलेली आजच्या युवा पिढीकडून नकळतपणे कायद्यांचे उल्लंघन होत असल्यानेच सोशल मीडिया हाताळण्यासंबंधीचे कायदेशीर ज्ञान असेल तर त्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर पोलिस आयुक्तालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या युवा रक्षा जागर अभियानांतर्गत येथील के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सिंगल बोलत होते. या कार्यक्रमास साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, प्राचार्या करुणा आव्हाड, विद्या जोशी आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त सिंगल म्हणाले की, आजचे विद्यार्थी भावी भारत देशाचे भविष्य आहेत. म्हणून करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करा. आईवडील व शिक्षकांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, विद्यार्थ्यांना यश मिळाले की आईवडील व शिक्षकांना अभिमान वाटतो. म्हणून त्यांना अभिमानाची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांना मदत करणे नागरिकाचे कर्तव्य असते. एक दिवस जरी सर्व पोलिस संपावर गेले तर काय होईल, असा प्रश्न विचारून आपल्या पालकांना हेल्मेटचा आग्रह धरा, असे आवाहनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई विद्यापीठाच्या घोळामुळे रखडले ‘लॉ’चे प्रवेश

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendra.tarte@MT

नाशिक ः मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या पेपर तपासणीसंदर्भातील घोळामुळे राज्यभरातच ‘लॉ’ विद्याशाखेचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल पाच महिने उशिरा हे प्रवेश सुरू होणार आहेत. परिणामी, या विद्याशाखेचे विद्यार्थी प्रवेश घेतील त्याच दिवशी त्यांचा एका सेमिस्टरचा कालावधी संपलेला असेल.

दरवर्षी प्रवेशाला विलंब होणाऱ्या शाखांमध्ये मेडिकल किंवा इंजिनीअरिंगसारख्या विद्याशाखांचा समावेश असतो. यंदाही २१ जुलै रोजी या विद्याशाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केंद्रीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आला. मात्र, मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या घोळामुळे या प्रवेशप्रक्रियेत मोठा अडसर उभा राहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पदवीचा निकाल नसल्याने हे विद्यार्थी सीईटीमध्ये उत्तीर्ण असूनसुद्धा त्यांच्या डोक्यावर पदवी निकालातील विलंबामुळे टांगती तलवार होती. मुंबई विभागातील लॉ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, या गोष्टीचा परिणाम एकूणच लॉ विद्याशाखेच्या प्रवेशप्रक्रियेवर झाला आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली गेली.

राज्यात १८१ कॉलेज

लॉ विद्याशाखेचे शिक्षण देणारे राज्यभरात एकूण १८१ लॉ कॉलेज आहेत. या कॉलेजांमध्ये सुमारे १५,२२० जागा आहेत. यंदा २१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत २७,३४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या संख्येचे प्रमाण लक्षात घेता, सर्व जागांवर प्रवेश होणे अपेक्षित आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात या विद्याशाखेचे एकूण चार कॉलेज आहेत. यातील अभ्यासक्रमांमध्ये सुमारे ६०० जागा उपलब्ध आहेत. या विलंबामुळे जिल्ह्यातील सुमारे ६०० जागांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे. यंदा विलंबित प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया ९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. याबाबतची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

एका सेमिस्टरला बसला फटका

गेल्या शैक्षणिक वर्षात ऑगस्टमध्ये लॉ विद्याशाखेची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. यामुळे या विद्यार्थ्यांची पहिली सेमिस्टर परीक्षा जानेवारीमध्ये पार पडली होती, तर दुसरी सेमिस्टर मेमध्ये होऊन वर्ष विनाअडथळा पूर्ण झाले होते. यंदा ९ ऑक्टोबरला ही प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने पहिली सेमिस्टरची प्रक्रियाही आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. या सर्व बाबींबा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण होण्यावरही होणार आहे. यातच या विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच परीक्षेची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यंदा लांबलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यसेवा सलाइनवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळूनही भिजत पडलेले शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे घोंगडे, तर दुसऱ्या बाजूला कार्यान्वित असलेल्या तीस खाटांच्या तालुका ग्रामीण रुग्णालयातील रिक्तपदांची समस्या यामुळे येवला ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेचा गाडा अंधरूणाला खिळला आहे. मोठ्या प्रमाणातील रिक्तपदांमुळे रुग्णांना आरोग्यसेवा देताना कार्यरत असलेल्या डॉक्टरांची चांगलीच दमछाक होत आहे. दिवसेंदिवस या ग्रामीण रुग्णालयात वाढत चाललेली बाह्यरुग्णांची संख्या अन् परिसरातील अपघातांचे वाढते प्रमाण हे सर्व काही लक्षात घेता रुग्णशय्येवर पडलेल्या येवला ग्रामीण रुग्णालयास रिक्तपदे भरतीच्या बुस्टर डोसची नितांत गरज आहे.

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून २००९ मध्ये शहरातील हुतात्मा स्मारकानजीक तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. येवला ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गेल्यावर्षी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या उपजिल्हा रुग्णालयासाठी आर्थिक निधीची पुरेशी तरतूद झालेली नसल्याने त्याचे काम रखडले आहे. त्यातच सध्या कार्यान्वित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा गाडा अपुऱ्या स्टाफमुळे कसातरी ओढला जात असल्याचे दिसत आहे. या रुग्णालयातील असंख्य पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने आरोग्यसेवेचा गाडाच रुग्णशय्येवर पडण्याची वेळ आली आहे. या रिक्तपदांमुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह इतरांवर मोठा ताण आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर ३ पदांपैकी २ पडे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहेत. परिमाणी वैद्यकीय अधीक्षकांसह एका वैदयकीय अधिकाऱ्यांनाच मोठी जबाबदारी पेलावी लागत आहे. लेखापाल, एक्सरे तंत्रज्ञ, शिपाईचे पद रिक्त आहे. कक्ष सेवकांच्या चार मंजूर पदांपैकी दोन पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. सफाई कामगारांच्या दोन पदांपैकी एक पद तीन वर्षांपासून रिक्त असल्याने कामावर असलेल्या एकालाच स्वच्छतेचा मोठा भार उचलावा लागत आहे. लसीकरण परिचारिकेच्या ४ मंजूर पदांमधील २ पदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहेत.

आरोग्यसेवेचे ज्ञान

असलेले पालिकेत

येवला नगरपालिकेच्या सेवेतील ३ अधिपरिचारिका, १ औषधनिर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व १ कुटुंबकल्याण समन्वयक असे येवला ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले एकूण सहा कर्मचारी येवला पालिकेने वर्षभरापूर्वी ग्रामीण रुग्णालयातून काढून घेतलेले आहेत. आरोग्यसेवेचे ज्ञान असलेले हे कर्मचारी सध्या मात्र येवला नगरपालिका कार्यालयात काम करत आहेत. याबाबत येवला पालिका व शासनाच्या आरोग्य विभागाने एकविचाराने तोडगा काढल्यास अपुऱ्या कर्मचारी संख्येचा भेडसावणारा प्रश्न काही अंशी सध्यापुरता तरी मार्गी लागू शकतो.

भिजत घोंगडे

शंभर खाटांचे उपजिल्हा श्रेणीचे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. सध्याच्या ३० खाटांच्या येवल्यातील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांच्या बांधकामास राज्य शासनाने गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र अजूनही त्याचे काम सुरू झालेल नाही.

आरोग्य उपकेंद्राची मागणी

तालुक्यातील गवंडगाव, रहाडी, कोळगाव येथे नव्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करून ते कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दराडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. राजापूरच्या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा आरोग्य उपचाराचा गाडा सुरळीत होणार असला तरी भविष्यातील या केंद्रावर पडणारा मोठा ताण लक्षात घेता गवंडगाव, रहाडी, कोळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावाना वार्षिक सभेत जुन्नरेंची उचलबांगडी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिकची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या सभेत जुन्नरे यांची उचलबांगडी होणार असल्याचे सभेच्या सूचनेवरून स्पष्ट होत आहे.

जुन्नरे यांचे एकरकमी सभासद यादीतून नाव कमी करण्याच्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर विचार विनिमय करणे व निर्णय घेणे हा महत्त्वाचा विषय या सभेत होणार आहे. संस्थेची बदनामी केल्याच्या कारणावरून सावानाचे माजी कार्यवाह आणि आजीव सभासद रमेश जुन्नरे यांचे सभासदत्त्व रद्द का करू नये, वार्षिक सर्वसाधारण सभेने त्यांच्या अधिकारात निर्णय घ्यावा, असा ठराव सार्वजनिक वाचनालय नाशिक कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला होता.

सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या सहीने आजीव सभासद रमेश जुन्नरे यांना कारणे दाखवा नोटीसवजा पत्र देण्यात आले होते. वर्गणीदार सभासदांच्या यादीतून नाव कमी का करू नये याविषयी कार्यकारी मंडळासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडावी असे या पत्रात नमूद केले होते. मात्र या बैठकीसाठी रमेश जुन्नरे उपस्थित राहीले नाही. त्यांनी अध्यक्ष व प्रमुख सचिवांना पत्र पाठवून सविस्तर उत्तर दिले आणि गुंडागर्दी करणाऱ्यांसमोर उभे राहून उत्तर देण्याची इच्छा नाही, असे सांगत बैठकीला हजर राहणे टाळले. मात्र जुन्नरे यांच्या सभासदत्व रद्द करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा असा ठराव कार्यकारी मंडळात करण्यात आला असून तो अध्यक्षांकडे पाठविण्यात आला होता. तो विषय आता वार्षिक सर्वसाधारण सभेवर घेण्यात आला आहे.

याशिवाय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०१६-१७ चा अहवाल मंजूर करणे, लेखापरीक्षण झालेला ताळेबंद व जमाखर्च चर्चा करून मंजूर करणे, २०१८-१९ चे अंदाजपत्रक मंजूर करणे, २०१८-१९ वर्षासाठी सनदी लेखापाल यांची नियुक्ती करणे, २०१८-१९ करीता अंतर्गत हिशोब तपासनीस यांची निवड करणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय या सभेत अंतर्भूत राहतील.

ही सभा गणसंख्येच्याअभावी तहकूब झाल्यास सभा त्याच दिवशी अर्धा तासानंतर होईल. तिला गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही. संस्थेचा अहवाल, जमाखर्च वाचनालयात पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आयत्या वेळेचे प्रश्न सभेपूर्वी तीन दिवस अगोदर लेखी स्वरूपात आल्यास सभेत त्यावर विचार होईल, अन्य विषयांचा विचार होणार नाही असे सावानातर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस अडकली कन्सल्टंट अन् समितीत!

$
0
0

नाशिक ः शहराच्या २० लाख लोकसंख्येची जीवनवाहिनी होण्याऐवजी सिटी बस ही सध्या अखेरची घटका मोजत आहे. सिटी बसचा तिढा तातडीने सोडविण्याची आवश्यकता असताना महापालिकेने बससेवेबाबत निर्णय घेण्यासाठी कन्सल्टंट नियुक्तीचा फार्स केला आहे, तर राज्य परिवहन महामंडळाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे कन्सल्टंट अन् समितीच्या वेळकाढू बैठकांमध्ये सिटी बसचा प्रश्न लटकण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २०३६ पर्यंत तीन हजार कोटींची आवश्यकता आहे.

राज्य परिवहन विभागाकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या सिटी बसचे घोंगडे झटकण्यासाठी महामंडळ आणि महापालिकेत सध्या स्पर्धा सुरू आहे. महामंडळाने १२५ कोटींचा आर्थिक तोटा झाल्याचे सांगत महापालिकेनेच आता ही सेवा चालवावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेने आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत थंड प्रतिसाद दिला. हा नूर पाहून महामंडळाने थेट सिटी बसची संख्या व फेऱ्यांमध्येच तब्बल निम्म्याने कपात केल्याने विद्यार्थी व नागरिकांची परवड होत आहे. औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे या शहरांमध्ये महापालिकाच बससेवा चालवीत असल्याने नाशिकमध्येही महापालिकेवर सिटी बस चालविण्यासाठी दबाव वाढला आहे. दिल्लीस्थित यूएमटीसी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करण्यावर भर देण्यात आला असून, महापालिकेने पीपीपी तत्त्वावर बससेवा चालवावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सिटी बसचा तिढा सोडविण्यासाठी कन्सल्टंटची नियुक्ती केली आहे. या कन्सल्टंटकडून बससेवेची व्यवहार्यता तपासून महापालिकेला अहवाल दिला जाणार आहे. त्यास जवळपास सहा महिन्यांचा कालावधी तरी लागणार असल्याने तोपर्यंत महापालिकेने आपला ताप टाळला असला, तरी प्रवाशांच्या त्रासात मात्र भरच पडणार आहे.

महापालिकेनेने कन्सल्टंट नियुक्त करून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असतानाच एसटी महामंडळानेसुद्धा परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, नगरविकास विभागाचे उपसचिव असे या समितीचे सदस्य राहणार असून, ही समिती नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये महामंडळाकडून सुरू असलेल्या बससेवेबाबतचा अहवाल तयार करणार आहे. बससेवेची स्थिती, आवश्यकता आणि आर्थिक भार यासंदर्भातील सखोल अभ्यासानंतर ही समिती आपला अहवाल परिवहन मंत्र्यांना देणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला किमान सहा ते आठ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी सिटी बसचा तिढा कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांसह विद्यार्थ्यांचा प्रवास हा धक्के खातच होणार आहे.

---

डॉ. गेडाम, कृष्णांकडून अपेक्षा

शहर बससेवेचे भवितव्य हे सध्या परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि सध्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हातात आहे. डॉ. गेडाम यांनी महापालिकेत काम केले असून, त्यांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची पूर्ण जाणीव आहे, तसेच शहराचा अभ्यासही आहे. अभिषेक कृष्णांवर महापालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. बससेवा महापालिकेच्या ताब्यात घेणे शक्य नसल्याची जाणीव दोन्ही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बससेवेचा योग्य तोडगा डॉ. गेडाम आणि कृष्णा यांनाच काढावा लागणार असून, त्यांच्याकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा आहेत.

--

२९६१ कोटींची गरज

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी सन २०२१ पर्यंत तातडीने ७२६ कोटी रुपयांची गरज आहे. सध्याच्या बसेसची संख्या ६९८ वर नेऊन ती सन २०३६ मध्ये १३२९ पर्यंत वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी एक कृती आराखडा दिल्लीस्थित ‘यूएमटीसी’ने महापालिकेला सादर केला असून, शहराच्या वाढीव लोकसंख्येचा अंदाज गृहित धरून पुढील वीस वर्षांत बससेवेसाठी २९६१ कोटी रुपये खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सन २०३६ मध्ये नाशिकची लोकसंख्या ३४ लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक खर्चाची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना एक दिवसाची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मित्रास कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यातील दोन मुली टीवाय बी. एस्सी.त शिक्षण घेत असून, संशयित मुलगाही त्यांच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

कॉलेजरोडवरील आरवायके कॉलेजमधून १० ऑगस्ट रोजी वाहनचोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना क्राइम ब्रँचच्या पथकाने कुणाल माळी या विद्यार्थ्यास २५ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता वाहनचोरी त्याच्या दोन मैत्रिणींनी केल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर चोरीची दुचाकी विकण्याची जबाबदारी संशयित मुलाकडे देण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी लागलीच दोन्ही विद्यार्थिनींना अटक करून गंगापूररोड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. मंगळवारी या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांचे पालक व्यावसायिक असून, मुलांना पैशांची गरज असल्याचे दिसत नाही. मात्र, तरीही शिक्षण सोडून मुलांनी चोरी केल्याची बाब समोर आली आहे.

--

पोलिसही चक्रावले

कॉलेजेसमधून वाहने चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून, या गुन्ह्यात अशी विद्यार्थिनींना अटक होईल, याचा विचारही पोलिसांनी केला नव्हता. विद्यार्थिनींचे पालक व्यावसायिक असून, त्यातील एकीचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या विद्यार्थिनींनी केवळ मजा करण्यासाठी, तसेच पैशांच्या हव्यासापोटी हे कृत्य केले. त्या सराईत गुन्हेगार नसून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारांअभावी अर्भकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभर गाजल्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन सुधारण्यास तयार नसल्याची लाजिरवाणीबाब समोर आली आहे. केवळ जागा नाही म्हणून उपचारास नकार मिळाल्याने नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारासच अपंग मातेवर डिलेव्हरीनंतर बाळाला वाचविण्यासाठी भटकावे लागल्याचा संतापजनक प्रकारही यानिमित्ताने घडला आहे. या प्रसंगाची आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

तब्बल दोन तास उपचारच न मिळाल्याने या अर्भकाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत यामुळे चर्चेत आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

हेमलता जगदीश कहांडोळे (वय २३, रा. घनशेत, पो. कुळवंडी, ता. पेठ) या महिलेने मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हरसूल हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचे वजन एकच किलो भरल्यामुळे त्यास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठव‌िण्यात आले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हेमलता काही नातेवाईकांसह येथे पोहचल्या. मात्र, नवजात बालकांच्या कक्षात (एनएससीयु) जागा नसल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले नाहीत.

त्यानंतर त्यांना आडगाव येथील मेड‌िकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगण्यात आले. तेथे संपर्क साधून बालकास अॅडमीट करण्याबाबत विचारणा केली. मात्र, जागा नसल्याचे सांगण्यात आले. दोन ते अडीच तासांनंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास नवजात बालकाचा खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून बालकास मृत घोष‌ित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्यापूर्वीच दिवाळी गोड!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून आपल्या नियमित पाच हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षक, अंगणवाडी सेवक आणि वैद्यकीय कर्मचारी अशा साडेसात हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे गिफ्ट मिळाले असून, त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ११ कोटी ३४ लाखांचा बोजा पडणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत महापालिकेने सानुग्रह अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. महापालिकेच्या कायम पाच हजार १७० कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. दरम्यान, सानुग्रह अनुदानाचा ठराव तातडीने प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याने यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी दसऱ्यापूर्वीच गोड झाली आहे.

महापालिकेकडून दर वर्षी दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी यंदा २० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. तसेच, भाजपचे गटनेेते संभाजी मोरुस्कर यांनीही महासभेत ठराव केला होता. परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्याबाबत महापौरांसह आयुक्तांनी कानावर हात ठेवले होते. मंगळवारी ‘रामायण’वर महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेत्यांसह गटनेत्यांची बैठक झाली. त्यात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, मनसे गटनेते सलिम शेख, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसे गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेवक उद्धव निमसे, प्रवीण तिदमे यांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान द्यायचे, यावर चर्चा करण्यात आली.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापौरांसह गटनेत्यांनी गेल्या वर्षीच्या सानुग्रह अनुदानात एक हजाराची वाढ करून सानुग्रह अनुदान १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला, तसेच महापालिकेच्या पाच हजार कायम कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्यासाठी अतिरिक्त एक हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. याचा लाभ अास्थापनेवरील ५ हजार १७० कर्मचाऱ्यांना, तसेच एक हजार ३७४ अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एक हजार ५९ शिक्षकांसह मानधन व रोजंदारीवर असलेल्या एकूण सात हजार ५६३ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

--

यंदा एक हजारांची वाढ

गेल्या वर्षी महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यात यावर्षी प्रत्येकी एक हजाराची वाढ केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ११ कोटी ३४ लाखांचा बोजा पडणार आहे. महापालिकेने सानुग्रह अनुदानासाठी बजेटमध्ये १० कोटींची तरतूद केली आहे, तसेच शिक्षण विभागाच्या बजेटमध्येसुद्धा १ कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीनंतर महापौरांनी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करीत हा ठराव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी दसऱ्यापूर्वीच गोड झाली आहे.

--

महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय हा सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. तातडीने या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार असून, दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

-रंजना भानसी, महापौर

--

शिवसेनेची २० हजारांची मागणी होती. परंतु, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने १५ हजारांवर सर्वांनी शिक्कामोर्तब केले असले, तरी कर्मचाऱ्यांचा विमा एक लाखावरून दोन लाख होणे अपेक्षित आहे. त्याचा भार महापालिकेने उचलला पाहिजे.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस मिनिटांत २० मिली पाऊस!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांवर परतीच्या पावसानेही कृपावर्षाव सुरूच ठेवला असून, मंगळवारी (दि. २६) शहरात रेकॉर्डब्रेक पाऊ‌स झाला. शहरात अवघ्या २० मिन‌िटांमध्ये २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे काही ठिकाणी कडक ऊन, तर अवघ्या काही अंतरावर धुव्वाधार पाऊस असा वेगळाच नजारा शहरवासीयांनी अनुभवला.

यंदा जूनपासूनच नाशिककरांवर पाऊस मेहेरबान राहिला. जुलै आणि ऑगस्टमध्येही पावसाने सरासरी ओलांडली. सप्टेंबरमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने आपले अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची चिन्हे नसतानाही सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊ लागला. कॉलेजरोड, गंगापूर रोड, महात्मानगर अशा काही भागात लख्ख ऊन पडले असतानाही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सीबीएस, शालिमारसह मध्यवर्ती भागावर पाऊस तुटून पडल्याचे नागरिकांनी अनुभवले. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पंचवटी, जुने नाशिक, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड परिसरातही पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अवघ्या २० मिनिटांत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस रेकॉर्डब्रेक ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. कालिकामाता यात्रोत्सवात सहभागी सर्वांनाच या पावसामुळे फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परावलंबित्वाच्या कोषातून बाहेर पडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना सतत समोर येतात. अशावेळी पोलिस मदतीला येतात. मात्र, अनेकदा महिलाही आपल्या कर्तव्यापासून दूर राहतात. स्वसंरक्षणकडे दुर्लक्ष तर परावलंबित्वाची मानसिकता यामुळे महिला स्वत:ला कमजोर बनवितात. या कोषातून बाहेर पडण्याची गरज असून, त्यासाठी पोल‌िसांना सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले.

भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये ग्रामीण पोलिस दलातर्फे आयोज‌ित ‘पोल‌िस सखी मेळावा’प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, सिनेअभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, डॉ. निवेदिता पवार, नगरसेविका अश्विनी बोरस्ते, रोहिणी दराडे, पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे, सायबरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कदम आदी उपस्थित होते. स्त्री अद्याप पूर्ण सक्षम नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कायदा सोबत आहे. मात्र, यासाठी महिलांनीही आपला परालांबित्वाचा कोष मोडून काढावा, असे महापौरांनी स्पष्ट केले.

शीतल सांगळे यांनी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. मोबाइल व इतर तंत्रज्ञानामुळे समाजाला गती मिळाली. मात्र, त्याचा परिणाम कौटुंबिक संवादावर झाला. मुले मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यातूनच गंभीरस्वरुपाच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पालकाचा मुलांशी संवाद असायलाच हवा, असा दृष्टीकोन सांगळे यांनी मांडला. रोहिणी दराडे यांनी पोलिस दलाच्या अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. महिलांनी मानसिक धैर्य कणखर करण्याची आवश्यकता असून, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठेकर यांनी केले. तर प्रास्ताविक पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी मांडले.

दामिनी पथकाच्या वाहनांचे अनावरण

जिल्ह्यातील महिलांना संरक्षण पुरवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या दामिनी पथकांच्या वाहनांचे अनावरण करण्यात आले. प्रत्येक वाहनावर एक महिला पोलिस अधिकारी व चार महिला पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. महिला अत्याचारसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा यामुळे जलद करणे शक्य होणार आहे. अशा तक्रारींसाठी पीडित महिलांनी महिला हेल्पलाइन व ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संस्कार-संस्कृतीची रासेयोतून जोपासना’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक हा देशाचा भावी नागरिक आहे आणि देशाची सर्व जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव व ती जबाबदारी पेलण्याची ताकद, शक्ती, प्रेरणा रासेयो देते. राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्कार आणि संस्कृतीची जोपासना होते, असे प्रतिपादन मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार यांनी केले.

येथील मसगा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कनिज लोधी, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. डी. राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. लोधी यांनी महाविद्यालयातील रासेयोच्या स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. रासायो स्वयंसेवक जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो आपला वेगळा ठसा उमटवतो, असे सांगितले. रासेयो स्थापना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पाककला, रांगोळी, मेंदी, गीतगायन, नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध महाविद्यालयातील रासायोच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.


विज्ञान मंडळाचे उद‌्घाटन

महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद‌्घाटनही यावेळी करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शल्यचिकित्सक डॉ. विक्रम वैद्य यांनी विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार हे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये सरकारची प्रतिकात्मक तिरडी

$
0
0

म. ट. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

इंधनाच्या दरात झालेली भाववाढ सर्वसामान्यांची पिळवणूक करणारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातून शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंधनदरातील जीवघेणी वाढ जर कमी केली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील पुरुषोत्तम कडलग यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्र हाती घेताच शासनाच्या इंधन दरवाढीवर टिकास्त्र सोडत अंदोलन छेडले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी येथे सरकारची प्रतिकात्मक त‌रिडी यात्रा काढली. या अंत्ययात्रेला खांदा देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष अरूण मेढे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, पद्मा पवार, सायरा शेख, कोमल निकाळे, खेमराज कौर आदी जिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहीले.

दिनकर काळे, देवीदास जोशी, विवेक खैरनार, वाळू बदादे, भास्कर मेढे, उल्हास तुंगार, बाळु बोडके, कैलास मोरे, स्वप्नील बागडे, विजय गांगुर्डे, राजेंद्र जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालवर ही तीरडी यात्रा नेण्यात आली. तेथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलाटावरील आगीचे खापर उंदरांच्या माथी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात दोन दिवसांपूर्वी पहाटे अडीचला आग लागून झालेल्या स्फोटांनी रेल्वे प्रशासन आणि प्रवासी हादरले. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही एरणीवर आला आहे. आज कीटकनाशकांची फवारणी करून चाळीस उंदरांचे बळी घेण्यात आले आणि हे प्रकरण उंदरांवर शेकविण्यात आले. प्रत्यक्षात स्टेशनवरील वायरिंग जुने झाले असून, ते तातडीने बदलण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास प्लॅटफार्म क्रमांक एकवर शार्टसर्किट होऊन तीन-चार स्फोट झाले. आगीच्या ज्वाळा चोहीकडे पसरल्या. यावेळी प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हमाल व कर्मचा-यांनी धावाधाव करून आग विझवली. आगीत फारशी हानी झाली नाही. मात्र, हीच आग गर्दीच्यावेळी लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

रेल्वे थांबवल्यावरही प्रवासी डब्यातील शौचालयाचा वापर करतात. या मलावर तसेच प्रवाशांनी टाकलेल्या खाद्यपदार्थांवर जगणाऱ्या गलेलठ्ठ उंदरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. ते रूळांखालील जमीन पोखरतात. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता उंदरांनी विजेच्या वायर्स कुरतडल्याने शार्टसर्किट झाल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मालधक्का ते देवीचौकातील उड्डाणपुलापर्यंत वरिष्ठांच्या उपस्थितीत औषध फवारणी करण्यात आली. त्यात साठ उंदरांचा बळी गेला. उंदीर रुळांलगत राहतात. ते वरच्या वायरीपर्यंत जात नाहीत. गेलेच तर पाईपतोडून जाड वायरी कुरतडू शकत नाहीत. त्यामुळे उंदरांवर हे प्रकरण शेकवून प्रशासन मोकळे झाल्याचा आरोप होत आहे.

वरिष्ठांना अहवाल

आगीची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. रेल्वेचे भुसावळ विभागीय व्यवस्थापकांना तसेच भुसावळचे विभागीय वरिष्ठ वीज अभियंता एन. के. अग्रवाल यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. भुसावळचे रेल्वे अधिकारी आनंद भगत, नाशिकरोडचे रेल्वेचे वरिष्ठ वीज अभियंता गणेश पाटील यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार वायर्स बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

अजूनही जीव धोक्यात

नाशिकरोड रेल्वे स्थानकात आगीची घटना घडूनही प्रशासन जागे झालेले नाही. आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. फ्लॅटफार्म क्रमांक एकवर फाटलेल्या पत्र्यातून दोन ठिकाणी धबधबे वाहत होते. स्थानकात पाणी वाहत होते. या पाण्यात वीजप्रवाह उतरला तर शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. स्थानकात अनेक ठिकाणी वायरिंग जुने झाले आहे. अनेक ठिकाणी त्यांना पाईप नाही. जुन्या वायरिंग बदलण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सुरक्षा ऑडिट

रेल्वे वीज अभियंता गणेश पाटील यांनी सांगितले, की रेल्वेच्या वीज विभागातर्फे दरवर्षी मान्सूनमध्ये विजेच्या वायरिंगचे आडिट केले जाते. तीन जणांची समिती हे ऑडिट करते. खराब वायरी त्वरित बदलल्या जातात. साहित्याची गरज भासल्यास वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला जातो. या वायरी पीव्हीसीच्या असून साडेतीन कोअरच्या ७० स्क्वे.मि.मी. च्या आहेत. त्यांचे आयुष्य ३० वर्षांचे आहे. सध्याच्या वायर्सना आठ वर्षे झाली आहेत. महावितरणकडून रेल्वे वीज घेते. ही वीज देवी चौकातील उपकेंद्रात घेऊन रेल्वेस्टेशनला पुरवठा केला जातो. तसेच वीज गेल्यास १६० के.व्ही.चा अॅटोजनरेटर सुरू होतो.

घंटी वाजली होती

प्रवाशांनी सांगितले की, प्लॅटफार्म काल आग लागण्याआधी प्लॅटफार्म एकवरील सपना कॅन्टीनजवळ चार दिवसांपूर्वी आग लागली होती. तेव्हाच वायरिंगची तपासणी केली असती तर दुर्घटना टळली असती. तसेच दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा समितीने पंधरा दिवसांपूर्वी स्थानकाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी उंदरांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. त्याकडे दुर्लक्ष झाले आणि याच उदरांनी वायर्स कुरतडल्याने शॉर्टसर्किट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटलेले ढापे धोकादायक

$
0
0

बाजार समितीत वाहने अडकण्याची भीती

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिवस-रात्र गजबजलेल्या बाजार समितीच्या आवाराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्या सोडविण्याच्या दृष्टीने बाजार समिती प्रयत्न करीत नसल्यामुळे येथील सर्वच घटकांना त्रास सहन करावा लागत आहे. सेल हॉलजवळील गटारीचे तुटलेले ढापे धोकादायक ठरत आहे. या ढाप्यात वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली कित्येक दिवसांपासून अशी परिस्थिती असताना त्यात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बाजार समित्या विक्रीसाठी आणलेला भाजीपाला हा सेल हॉलमध्ये उतरवताना येथे वाहने थेट जवळ आणावे लागतात. या हॉलजवळ असलेल्या भूमिगत गटारीवर टाकण्यात आलेले ढापे तुटलेल्या अवस्थेत आहेत. या तुटलेल्या ढाप्यांच्या भागात गटारीत दगड, माती, भाजीपाल्याचे अंश, सडका भाजीपाला यांचा थर साचला आहे. त्यामुळे येथे गटारी तुंबल्या आहेत तसेच त्याची दुर्गंधीही पसरली आहे. याचा त्रास येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस उत्पादकांना देणार एफआरपीपेक्षा जास्त भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

कादवा सहकारी साखर कारखान्याची विस्तारीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी प्रयत्नशील असून, गेल्या वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देणार असल्याचे आवासन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिले.

जिल्ह्यात सहकार तत्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

शेटे यांनी कामकाजाचा लेखाजोखा मांडला. गेल्या तीन वर्षांपासून साखर धंदा अडचणीत आला आहे. सरकार साखर उद्योगाबाबत उदासीन असून गेल्या वर्षी दुष्काळामुळे साखर उत्पादन कमी झाले. मात्र सरकारने साखरेचे भाव वाढू न देण्यासाठी कारखान्यांवर साखर विक्रीचे बंधन घालत कमी भावात साखर विक्री करायला भाग पाडले. त्यामुळे कारखाने अजून अडचणीत सापडले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवाने उसाला सर्वाधिक भाव दिला आहे. गत हंगामाचे गाळप उसाला एफआरपी पेक्षा १८७ रुपये जास्त देणार असून शासनाकडे त्याबाबत परवानगी प्रलंबित आहे. शासन परवानगी मिळताच उसाचे अंतिम पेमेंट दिले जाईल असे सांगितले.

कादवाने उसाचे गळीत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून मशिनरी दुरुस्ती करताना वाढीव गाळप क्षमतेची अत्याधुनिक मशिनरी बसवली जाणार आहे. त्यासाठी कोणतेही

कर्ज न काढता आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असून यंदा कमी वेळेत जास्त गाळप होणार असल्याचा विश्वास शेटे यांनी व्यक्त केला.

यावेळी सुरेश डोखळे, तानाजी पगार, सचिन बर्डे, माजी संचालक जे. डी. केदार, गंगाधर निखाडे, सदाशिव शेळके, जयराम डोखळे, तानाजी पगार, संपत कावळे, बाळासाहेब नाठे, प्रमोद अपसुंदे, सोमवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, संचालक मधुकर गटकळ, सभासद, कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images