Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मविप्रत `प्रगती`लाच कौल

$
0
0

सर्व जागांवर विजय; समाजविकासचा धुव्वा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेत अखेर सत्ताधारी प्रगती पॅनललाच सभासदांनी कौल दिला. जिल्ह्यातील संचालकांच्या १३ पैकी १३ जागांवर अटीतटीच्या परिस्थितीत विजयश्री खेचून आणत प्रगतीने संस्थेवरील वर्चस्व सिध्द केले. याशिवाय अध्यक्ष , सभापती , उपसभापती , चिटणीस आणि घटनेतील सर्वोच्च पद असलेल्या सरचिटणीस या पदाधिकाऱ्यांच्या जागांवरही निर्विवाद वर्चस्व मिळवित विजयाचे निशाण रोवले आहे. नीलिमा पवार यांच्या कार्यकाळातील हा सर्वांत मोठा विजय मविप्रमध्ये मानला जात आहे.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसमोर अत्यंत ताकदीचे आव्हान उभे केल्यानंतरही सत्ताधारी प्रगती पॅनलने विरोधी समाज विकास पॅनलचा पूर्ण धुव्वा उडविला. तरीही, सेवक पदाच्या तीन जागांवर समाज विकास पॅनलला अनुकूल असणाऱ्या त्रिकूटाने विजय मिळवत काही अंशी संघर्षाचे अस्तित्व कायम राखले. २१ जागांसाठी अंतिमत: ४९ उमेदवारांमध्ये लढत झाली. सरचिटणीसपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे यांच्यावर १४५ मतांनी विजय मिळविला. अध्यक्षपदासाठीही चुरशीची लढत झाली. यात विद्यमान प्रतापदादा सोनवणे यांच्यावर डॉ. तुषार शेवाळे यांनी विजय मिळविला. सभापतिपदासाठी दिलीपराव बोरस्ते यांच्यावर माणिकराव बोरस्ते यांनी विजय मिळविला. चिटणीसपदासाठी डॉ. सुनिल ढिकले यांनी नानासाहेब बोरस्ते यांचा पराभव केला.

मविप्रच्या विजयी उमेदवारांना मिळालेली एकूण मते

अध्यक्ष : डॉ. तुषार शेवाळे : ४९७०, सभापती : माणिकराव बोरस्ते : ४८३८, उपसभापती : राघो आहिरे : ४५३८, सरचिटणीस : नीलिमा पवार : ४७४६,
चिटणीस : डॉ. सुनिल ढिकले ७२४४, इगतपुरी : भाऊ खताळे : ५००८, कळवण व सुरगाणा : अशोक पवार : ५१४०, चांदवड : उत्तम भालेराव : ४८८१,
दिंडोरी व पेठ : दत्तात्रय पाटील : ४७६७, नाशिक : नाना महाले : ४९३०, निफाड : प्रल्हाद गडाख : ४७१२, नांदगांव : दिलीप पाटील : ४९४१,
सटाणा : डॉ. प्रशांत देवरे : ४९५४, मालेगांव डॉ. जयंत पवार : ५२०७, येवला : रायभान काळे : ----, सिन्नर : हेमंत वाजे : ५१६७, देवळा : डॉ. विश्राम निकम : ५०५१, नाशिक ग्रामिण : सचिन पिंगळे : ५२१३


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृष्णजन्म सोहळा उत्साहात साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोपाल बोलो.., जय कन्हैया लाल की.., अशा आर्त भावनेने भगवान श्रीकृष्णाची आळवणी करत नाशिककरांनी कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. घराघरात आणि कृष्णमंदिरांमध्ये कीर्तन, भजनांचे आयोजन करण्यात आल्याने शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. सोमवारी रात्री बारा वाजता बालकृष्णाची गाणी म्हणत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. टाळ, मृदंगांचा ध्वनी, भक्तांचा उत्साह यामुळे येथील वातावरण चैतन्य पसरले होते. अनेकांनी कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन फुगडी खेळत तालही धरला.
श्रीकृष्णाची मोहिनी लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत पसरलेली असते. भारतीय संस्कृतीत बालपणापासूनच श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकतच मूल मोठे होत असते. त्याच्या प्रत्येक लीला लहान मुलांमध्ये मोठे अप्रुप निर्माण करत असते. त्यामुळेच श्रीकृष्ण सर्वांसाठीच आकर्षणाचा ठरतो. नाशिकमध्येही श्रीकृष्णाच्या मंदिरांमध्ये हा दिवस चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी पताकांनी मंदिरे सजवण्यात आली आहेत. कापड बाजारातील मुरलीधर मंदिर, इस्कॉन अशा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भजने, भक्तिगीते, बासरीवादन, किर्तन, अभंगवाणी, प्रवचन, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. मुरलीधर मंदिरात कृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्णाची विविध रुपे रोज बघण्याचे सुख नाशिककरांना मिळत असते. यंदाही हे पुण्य नाशिककरांना लाभले. तर इस्कॉनमध्येही सुवर्णमहोत्सवोत्तर जन्माष्टमी साजरी करण्यात आली. आज (१५ ऑगस्ट) गोपालकाल्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी वेगवेगळे संगीतमय कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अप्सरांच्या’ अदाकारीने घातली भुरळ

$
0
0

सौरभ बेंडाळे, नाशिक

मराठमोळी लावणी, पारंपरिक नृत्यकला, कथ्थक, भरतनाट्यम, अभिनय, वेस्टर्न डान्स अन् जोडीला कलाकौशल्यांचा नजराणा... अशा धमाकेदार परफॉर्मन्सच्या सादरीकरणाने परीक्षकांना मोहित केले. स्पर्धकांच्या बहारदार अदाकारीनं प्रेक्षकांनीही भुरळ घातली होती. ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतले ‘एक से बढकर एक’ परफॉर्मन्स उपस्थितांची दाद मिळवत होते. टॅलेंट राउंडमध्ये अंतिम फेरीतील अप्सरांनी स्टेजवर येत आत्मविश्वासाने स्वतःला सिध्द केलं.

‘सिंथेसायझर आणि गाणं’ ही भन्नाट कन्सेप्ट घेत मधुरा जोशीने ‘पहेला नशा’ अन् ‘झूम बाबा झूम’ गायलं. या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांनी जल्लोष केला. ‘द्रौपदी वस्त्रहरण’चा क्षण अभिनयातून हुबेहुब सादर करत नित्या पुराणिकने अभिनय कौशल्य दाखवले. तर ‘सेव्ह गर्ल’ या विषयावर ग्रेस पारगे हिने एका मिन‌िटात रेखाटलेल्या अप्रतिम चित्राविष्काराने परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली. ‘राजमाता जिजाऊ’ यांचा अभिनय करत करिश्मा चव्हाणने स्वराज्य काळाची आठवण सर्वांना करुन देत वातावरण स्तब्ध केलं. पायल वारे हिने ‘बोल ना माही बोल ना...’ या गाण्यावर कथ्थक नृत्याचा नजराणा सादर केला. ‘शिव हर शंकर...’ म्हणत प्राजक्ता इखरनकरने शिवतांडव करत सर्वांना भुरळ घातली. अनेक बहारदार परफॉर्मन्सनी कार्यक्रमाची रंगत वाढत होती. टॅलेंट राउंडमध्ये स्वतःला सिद्ध करत झळाळत्या मुकुटाची मानकरी होण्याची आस प्रत्येकीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. टॅलेंट राउंडमध्ये स्पर्धकांनी सौंदर्यासोबतच कलागुण, बुध्द‌िमत्ता यांची योग्य सांगड घातली होती. अंकिता चेवलेने हिंदी सिनेमातील अभिनेत्रींची स्टॅण्डअप कॉमेडी करत टॅलेंट राउंडमध्ये परीक्षकांवर प्रभाव टाकला. तर निधी किशोरने ‘डेस्पॅसिटो’ अन् ‘तू ही मेरा राबता’ ही गाणी गात उपस्थितांना थिरकवलं. ग्रामीण महिलेची व्यक्त‌िरेखा साकारत एकताने सर्वांचीच दाद मिळवली. ‘सँवार लू...’ गाणं गात श्रुती पिसोळकरने टॅलेंट राउंडची शोभा वाढवली. अनेकांनी शिट्ट्या टाळ्यांची दर्दी दाद यावेळी दिली. सोबतच या गाण्यावर अभिनेत्री पल्लवी पाटील हिनेदेखील ठेका धरला. ‘काहे छेड छेड मोहे...’ या गाण्यावर आपला कथ्थक नृत्याचा कलविष्कार तन्वी खर्डेने सादर केला. याला प्रेक्षकांमधून कमालीची दाद मिळाली. टॅलेंट राउंडचा हा परफॉर्मन्स कळसाध्याय ठरला. फोक लावणी ही कन्सेप्ट घेत पूजा चंद हीने ‘झिंगाट’ गाण्यावर आपल्यातली सगळी ऊर्जा ओतून लावणीचा मराठमोळा ठसका सादर केला. यावेळी उपस्थितांमधल्या अनेकांनी ठेका धरला होता. अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि दिग्दर्शक अजय पाटील यांनीही या गाण्यावर धम्माल डान्स सादर करत प्रेक्षकांची मन जिंकली. 'धूम मचाले...' या गण्यावर अदिती काकडेने वेस्टर्न, हिपहॉप, कंटेम्पररी नृत्याविष्कारांचा जलवा सादर केला. तर श्रावणबाळ ही कन्सेप्ट घेत वृद्धापकाळात आई-वड‌िलांची साथ सोडणाऱ्या तरुणाईच्या वास्तवावर गंभीर भाष्य करणारा अभिनय सादर करत आपल्यातली अभिनेत्री चैताली टिपरेने रंगमंचावर उतरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्त्रोचा प्रकल्प ठरेल पथदर्शी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इस्त्रोने कृत्रिम उपग्रह संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरी व संशोधनाचा नागरी क्षेत्रासाठी वापर करण्याचे पाऊल उचलले आहे. उपग्रहांच्या प्राप्त माहितीवर आधारीत विशेष तंत्रज्ञान विकस‌ित करुन त्याचा वैविध्यपूर्ण वापर देशाच्या प्रगतीसाठी करण्यात सुरुवात केली आहे. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासाठी तयार होणारा प्रकल्प इतरांसाठी पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. दिवाकरन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘इस्त्रो’ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत आयोजित नियोजन आणि विकास कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) शास्त्रज्ञ डॉ. उदय राज, डॉ. गिरीशकुमार, श्रीनिवासन, डॉ. यशवंत राव, डॉ. मंजुनाथन, डॉ. सुरेश राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, उप वनसंरक्षक रामानुजन, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर तसेच सर्व प्रमुख शासकिय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवाकरन म्हणाले, इस्त्रोच्या अंतराळ संशोधनाचे योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विविध राज्यांतील विकासासाठी नियोजनामध्ये इस्त्रोच्या संशोधनाचा वापर परिणामकारक ठरला आहे. भारतीय पुरातत्व विभाग, तेलंगाना, कर्नाटक राज्यांसाठी केलेल्या कामांमध्ये या वापराचा मोठा आवाका दिसून आला आहे. जिल्हास्तरावर प्रथमच हे काम नाशिक येथे होत आहे. या विशेष प्रकल्पासाठी डॉ. सुरेश राव व डॉ. उदय राज यांच्यासह शास्त्रज्ञांची टीम जिल्हा प्रशासनासमवेत काम करेल असे ते म्हणाले.

प्राधान्यक्रम निश्चित होईल

जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यावेळी म्हणाले, इस्रोच्या सहाय्याने प्रशासन व नागरिकांच्या उपयोगासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक परिणामकारक वापर केला जाईल. नाशिकच्या विकासासाठी इस्त्रोसमवेत काम करण्यासाठी विषयांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील. प्रशासन विविध विभागांच्या सहाय्याने ‘भुवन’ या पोर्टलच्या वापरासाठी ‘जिओ’ टॅगींग, कृषी, जलसंपदा, जंगल, जम‌िनींचे क्षेत्र- मालकी आदी माहिती देईल.

विकासाला मिळेल गती

खासदार हेमंत गोडसे म्हणाले, विकासासाठी विज्ञानावर आधारीत प्रयत्न व्हावेत यासाठी इस्त्रो या संस्थेच्या संशोधनाचा वापर होईल. शास्त्रीय पद्धतीने माहितीचे एकत्रीकरण व विश्लेषण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व इस्त्रो यांच्या समन्वयातून नाशिकच्या नियोजन व विकासाला गती मिळेल. जलसंपदा, रस्ते विकास, आपत्कालीन परिस्थिती यासह अनेक कामांसाठी याद्वारे शास्त्रीय माहिती उपलब्ध होईल याचा उपयोग शासन आणि नागरिक दोघांना होईल.

खासदार गोडसे यांचे प्रयत्न

नाशिकच्या विकासामध्ये इस्त्रोच्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी खासदार गोडसे यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत. नियोजन व विकासामध्ये त्यांच्या संकल्पनांचा वापर केला जाईल, असा उल्लेख डॉ. दिवाकरन व जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केला. याप्रसंगी डॉ. उदय राज, डॉ. सुरेश राव आदींनी ‘भुवन’ च्या ‘भुवन-पंचायत’, ‘भुवन ३ डी’, ‘भुवन (डॉट) एनआरएससी’ आदी अॅप्ल‌िकेशनन्सचे उपग्रहाद्वारे प्राप्त नकाशे, प्रतिमा आदींचे थेट सादरीकरण केले.

दुपारच्या सत्रात विद्यार्थी

कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात महाविद्यालये, शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरीकांसाठी इस्त्रोच्या उपग्रह तंत्रज्ञानाच्या नागरी उपयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ रोड होणार स्मार्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेला अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रोड स्मार्ट होणार आहे. तसे शिवधनुष्य स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उचलण्याचे स्मार्ट सिटी प्राधिकरणाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. सायकल ट्रॅक, पादचाऱ्यांची सुरक्षा, सीसीटीव्ही अशा विविध बाबींचा समावेश या रस्त्यावर असेल.

स्मार्ट सिटी प्राधिकरणाची चौथी बैठक अध्यक्ष तथा नगररचना विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. शहरातील सर्वाधिक रहदारीचा असलेला अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रोड स्मार्ट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोर्ट, जुने सीबीएस, विविध बँका, शाळा यांसह विविध ऑफिसेस या रस्त्यालगत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वाधिक वर्दळ या रोडवर असते. दिवसाकाठी हजारो वाहने या रोडवरुन धावतात. त्यामुळे स्मार्ट रोडच्या संकल्पनेसाठी याच रोडचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे हे एकप्रकारे शिवधनुष्य आहे. या रोडच्या विकासासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या बैठकीला महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, प्राधिकरणाचे अन्य सदस्य तसेच नगरसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या विकसीत केल्या जाणाऱ्या विविध आरोग्यविषयक अॅपबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

अन्य निर्णय असे

या बैठकीत अन्य प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. नेहरू गार्डनच्या प्रस्तावित विकास प्रस्तावाच्या टेंडरिंगला मान्यता, महात्मा फुले कलादालन आर्ट गॅलरी, कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणालाही स्मार्ट सिटी अंतर्गत सुरुवात झाली आहे. शहरातील अमरधामचा विकास केला जाणार असून, त्याच्या पुनर्टेंडर प्रक्रियेला बैठकीत मान्यता देण्यात आली.


या सुविधा असणार

या रोडवर सायकलीसाठी स्वतंत्र मार्ग, पादचाऱ्यांसाठी विविध सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, चौकांचा सुसंबद्ध विकास, स्मार्ट पोल, स्मार्ट सिग्नल आदी बाबी विकस‌ित केल्या जाणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले. हा रोड १.१ किलोमीटर अंतराचा आहे. या रोडवर अशोक स्तंभ, मेहेर चौक, जुने सीबीएस चौक आणि त्र्यंबक नाका हे प्रमुख चार चौक आहेत. २४ मीटर रुंद असलेला हा रोड स्मार्ट करणे मोठे आव्हान आहे. स्मार्ट रोडचा हा पायलट प्रोजेक्ट राहणार असून त्याच्या विकासानंतर अन्य रोडचा विचार केला जाणार असल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’वर नाशिककरांची मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकच्या सायकल‌स्टिने जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला आहे. लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’ ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण करत विक्रम केला आहे. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले असून, नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टिलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एअरोनॉटिकल इंजिनीअर असून, ब्रेवेट उपक्रमातून ते रॅन्डोनर सायकलीस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकल‌स्टि असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरीनिमित्ताने ते बंगळूरू येथे असतात. ‘टीम इंस्पायर इंडिया’चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किमीची शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना ‘टीम इंस्पायर इंडिया’ने केवळ १०० तासात ही स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्यांचे प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.
कशी आहे स्पर्ध?
रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा आहे. ऑस्ट्रियाच्या सीमेजवळून जाणाऱ्या रस्त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. समुद्रसपाटीपासून जास्तीतजास्त १७ हजार ५०० फूट चढ-उतार असलेला रस्ता असून ग्रॉसग्लॉकनेरसारख्या उंच ठिकाणाचाही यात समावेश आहे. रस्ता कोणत्याही वाहनांसाठी बंद करण्यात येत नाही. ही स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक ‘रॅम’ स्पर्धेसाठी पात्र ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना

$
0
0

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा बॅरेजमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली असून, आगामी काळात शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तापी नदीवरून मंजूर झालेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व कलशपूजन, सार्वजनिक वाचनालयाचे उद्‍घाटन सोमवारी (दि. १४)‌ पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. भामरे बोलत होते.

मुंबई-दिल्ली कॉरिडॉरमध्ये धुळे जिल्हा

या परिसरात आता रस्ते, रेल्वे, पाणी, मनुष्यबळ उपलब्ध असून, या भागाच्या औद्योगिक विकासाला आता वेळ लागणार नाही, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले. विविध विकास कामांसाठी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २५ हजार कोटी रुपयांचा निधी आला आहे. सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी ५० गावांचा पाणी व सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई- दिल्ली कॉरिडॉरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.

विकासकामांचे लोकार्पण

रोजगार हमी योजना मंत्री रावल म्हणाले, दळण-वळणाची उपलब्ध झालेली साधने, पायाभूत सोयीसुविधांमुळे नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. वारूड गावासाठी तापी नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. त्यामुळे गावाला आगामी काळात शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या योजनेची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवीत आगामी उन्हाळ्यात वारूड गावाला पाणीटंचाई भासणार नाही, असे नियोजन प्रशासनाने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यानंतर नरडाणा रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे व रोजगार हमी योजना मंत्री रावल यांच्या हस्ते ५५ कोटी रुपये खर्चून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा झाला. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यावर भर द्यावा. कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, असे निर्देश यावेळी मंत्रीद्वयांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मंत्रीद्वयांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, वारूडचे सरपंच संदीप निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, संजीवनी शिसोदे, बबनराव चौधरी, परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्य महोत्सवाची पर्वणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दर वर्षी ऑगस्टमध्ये होणारा नटराज पंडित गोपीकृष्ण तीनदिवसीय नृत्य महोत्सव यंदा दि. १८, १९ आणि २० ऑगस्ट रोजी शहरात रंगणार आहे. १९९४ पासून दर वर्षी नवनवीन संकल्पनांनी सजणारा हा महोत्सव आहे. आजवर सृजन, मल्हार-एक राग अनेक अाविष्कार, आम्ही मराठी, बंदिश, भैरवीचे अंतरंग, नायक, नूपुर रंग, कृष्मधुरी, रुद्र, मेट्रोनोम, देस, मेघ, कृष्णायन अशा अनेकाविध नृत्यप्रस्तुती नाशिककरांनी अनुभवल्या आहेत.

या महोत्सवात देशातील अनेक उदयोन्मुख आणि बुजुर्ग कलावंतांनी हजेरी लावली असून, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सर्व शैलींचा आस्वादही नाशिककरांनी घेतला आहे. तीनही दिवस दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार असून, त्याच्या प्रवेशपत्रिका ९८२३०६२३६६ या क्रमांकावर एसएमएसद्वारे निश्चित कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महोत्सवाचा प्रारंभ दि. १८ ऑगस्ट रोजी अदिती नाडगौडा-पानसे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या ‘द रिदमिक पॉइस’ या नृत्याविष्काराने होणार आहे. वंदना, ताल प्रस्तुती, अभिनयपक्ष आणि पदन्यास अशा नृत्य आणि नाट्य या दोन्हींच्या सादरीकरणात ‘जोड बंदिशींची लडी’ अशी संकल्पना निर्धारित आहे. बंदिशींच्या आकृतिबंधानुरूप त्यांची गती आणि स्थिती यांचा सुरेख संयोग पाहायला मिळणार आहे. ‘द रिदमिक पॉइस’ची प्रस्तुती शुभारंभाला कीर्ती कलामंदिरच्या नृत्यांगना करणार आहेत. नृत्य दिग्दर्शन अदिती नाडगौडा-पानसे, संगीत डॉ. अविराज तायडे, वाद्यवृंद संचलन पं. जयंत नाईक यांचे आहे. गायन आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर सोनार, तबला बल्लाळ चव्हाण, ओंकार अपस्तंभ, संवादिनी सुभाष दसककर, पढंत आदित्य कुलकर्णी आणि सिंथेसायझर ईश्वरी दसककर यांची साथसंगत लाभणार आहे.


नृत्यांजलीद्वारे खुलणार ठुमरी

ठुमरी हा ललित गायनाचा प्रकार जेवढा गायनाच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे तेवढाच तो कथक नृत्यशैलीचाही एक अविभाज्य घटक बनला आहे. ठुमरीच्या अदाकारीतील ठोस अगर सूक्ष्म अंदाज, नफासत, नाजूक मिजाजी, ती व्यक्त करण्याची आगळी स्वस्थता, लोच, लालित्य पाहताना ठुमरीला ‘भावोंका आईना’ का म्हणतात याचे उत्तर मिळते. ठुमरी सादरीकरणातला ‘बैठके ठुमरी’ हा अनोखा प्रकार बनारस घराण्याचे गुरू पं. अशोक कृष्णा आणि जयपूर घराण्याच्या पं. नंदिनी सिंग या दि. १९ ऑगस्टचे द्वितीय पुष्प नृत्यांजलीतून साकारणार आहेत.

‘द रेसोनान्स विथिन’ने समारोप

महोत्सवाची सांगता दि. २० ऑगस्ट रोजी भरतनाट्यम आणि कथक या दोन भिन्न नृत्यशैलींतून साकारणाऱ्या ‘द रेसोनान्स विथिन’ने होणार आहे. नृत्य ही दृक्-श्राव्य कला आहे. या नृत्याच्या सादरीकरणात वापरल्या जाणाऱ्या संज्ञा, संकल्पना, तंत्र आणि मांडणी म्हणजे ‘नेमकं काय?’ आणि मग यात नृत्याच्या वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा दोन्ही दृष्टिकोनांचा कसा समन्वय घातला जातो, हे नृत्यप्रेमींना आणि नृत्याभ्यासकांना अनुभवता येणार आहे. गुरू पंडिता शमाताई भाटे आणि गुरू पं. दीपक मुजुमदार या दोन श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नर्तकांच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सुंदर नारायण’चा होणार जीर्णोद्धार

$
0
0

Satish.kale@timesgroup.com

Tweet : SatishkaleMT

मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधे विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यामुळे नाशिकची ही मंदिरे प्रसिद्ध झाली असून, अन्य मंदिरांसह श्री सुंदर नारायण मंदिराचाही त्यात प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून, त्यादृष्टीने कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.

नाशिकमधील अनेक पुरातन मंदिरांनी वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे वेगळेपण जपले आहे. श्री सुंदर नारायण मंदिर हे त्यापैकीच एक असून, नाशिकच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्यासाठी या मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून साडेबारा कोटींचा निधी मंजूर झाला असून, हा निधी पुरातत्त्व खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात असलेल्या सुंदर नारायणाची मूर्ती येथून हलविण्यासाठी विधिवत कलाकर्षण विधी-पूजा नुकतीच करण्यात आली. पुरातत्त्व खात्याच्या नियोजनानुसार लवकरच येथील मूर्ती हलविण्यात येणार आहेत.

येथील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा कालवधी पुरातत्त्व खात्याला देण्यात आला आहे. या कालावधीत काम पूर्ण झाल्यास नव्या रूपात पुरातन श्री सुंदर नारायण मंदिराचे दर्शन भाविकांना होणार आहे.

--

वेगळेपण टिकून

अहिल्यादेवी होळकर पुलाला लागूनच असलेले श्री सुंदर नारायण मंदिर सन १७५६ च्या सुमारास बांधले गेले आहे. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी हे मंदिर त्या काळात जवळपास १० लाखांत बांधले आहे. उत्तम बांधणी आणि विविध शिल्पकृतीमुळे हे मंदिर वेगळेपण टिकवून आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड, चुना, शिसव, नवसागर आदी साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेल कर्मचाऱ्याचे उपोषण अखेर मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड मध्यवर्ती जेलमधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून उपोषण करण्यास अनिल बुरकूल यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
बुरकूल हे सध्या धुळे कारागृहात कर्मचारी असून ते नाशिकरोडचे रहिवासी आहेत. ते नाशिक येथे उपोषण करणार होते. राज्याचे जेल महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी त्यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवले आहे. जेल नियमावली १९७९ च्या कलम १३ नुसार पोलिस यंत्रणेतील कर्मचाऱ्यास उपोषण करता येत नाही, असे सांगून प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली आहे. नियमाचा भंग होऊ नये म्हणून उपोषण मागे घेत असल्याचे बुरकूल यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकरोड जेलचे तत्कालीन अधीक्षक रमेश कांबळे आणि विद्यमान उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी, अशी बुरकूल यांची मागणी आहे. कारागृहाच्या नियमावलीचा आणि राज्यघटनेचा सन्मान करून मी जेल महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार उपोषण स्थगित करत आहे. मात्र, जेलमधील भ्रष्ट अधिकारीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. या पुढेही कायदेशीर मार्गाने माझा लढा सुरू ठेवेन, असे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीसंदर्भात सर्टिफिकेट कोर्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अचुकपणे सामान्यांपर्यंत पोहोचवा यासाठी सात दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स आता शिकविला जाणार आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
सातपूरमधील नामको बँकेसमोरील नाईस संकुलातील नाईस सभागृहात १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते साडेआठ या वेळेत जीएसटी पार्टीसिपेशन सर्टिफिकेट कोर्स घेतला जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर व टॅ्नस प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिक यांच्यातर्फे या कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला जीएसटीपीएम, मुंबई व एआयएफओटी, वेस्ट झोन, मुंबई आणि नाशिक ओझर चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटन्टस् यांचे सहकार्य आहे.

जीएसटी या विषयावरील या कोर्समध्ये मुंबईचे प्रख्यात सनदी लेखापाल सीए असित शहा, अ‍ॅड. रतन समळ, सीए रजत तलाठी, नाशिकचे सीजीएसटी सल्लागार सीएमए आर. के. देवधर, सीए चेतन बंब, सीए प्रज्ञा चांदोरकर, कर सल्लागार प्रदीप क्षत्रिय, सीए अदित्य क्षत्रिय हे जीएसटीच्या विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

यामध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन, इन्व्हॉइस, डेबीटनोट-क्रेडीट नोट, पेमेंट, टीडीएस, टीसीएस, सप्लाय, इनपुट टॅनस क्रेडीट, जीएसटी रिटर्न या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी राज्य कर विभागाचे उपायुक्त व अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. लाभार्थींना जीएसटीवरील मार्गदर्शन पुस्तकाही मिळणार आहे. तरी सर्वांनी या सात दिवसीय कोर्समध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोढा, कर समितीचे अध्यक्ष सतीश बुब तसेच टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश गिरासे तसेच सचिव प्रदीप क्षत्रिय यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र चेंबर्समध्ये किंवा २५७७७०४, ९६८९७५८०५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन सेवांचा आज मनपात प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या विविध ४५ नागरी सेवा ऑनलाइन केल्या असून त्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येणार आहेत. या ऑनलाइन कार्यप्रणालीमुळे बहुतांश सेवांचा लाभ नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

स्मार्ट कार्डचे अनावरण व ऑनलाइन ४५ सेवांचे उद्‍घाटन मंगळवारी (दि. १५) सकाळी ९.१५ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका व येस बँकेच्या संयुक्त विद्यमाने प्रीपेड स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. या कार्डद्वारे नागरिकांना महापालिकेच्या सर्व करांचा भरणा करता येणार आहे. तसेच हे कार्ड इतर कोणत्याही कार्ड प्रमाणे सर्व ठिकाणी (मॉल्स, शॉपिंग सेंटर्स) वापरता येणार आहे. महापालिकेचा नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना हे कार्ड कोणतेही शुल्क न आकारता मोफत देण्यात येणार आहे. केवायसी डॉक्युमेंटची पूर्तता संबंधित नागरिकांनी केल्यानंतर हे कार्ड दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांचे आज ‘जलआंदोलन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रशासनाकडून अद्याप पैसे न मिळाल्याने काश्यपी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी (दि. १५) जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच धरणावर जात पाणी सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर देवरगावच्या सरपंचासह १०० हून अधिक जणांच्या सह्या आहे.

जिल्ह्यात काश्यपी धरणाचे काम सुमारे २५ वर्षापूर्वी पूर्ण झाले. पण धरणग्रस्तांना अजूनही त्यांच्या संपादित जम‌िनींचा मोबदला मिळालेला नाही. या धरणातील पाण्याचा सर्वाधिक लाभ नाशिक महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना होतो. मात्र, अपेक्षित मोबदला न मिळाल्याने धरणग्रस्तांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बळावली आहे. स्थानिकांना दरवर्षी ३० टक्के पाणीसाठा राखून ठेवण्यात यावा, महापालिका व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे केलेला काश्यपी धरणासंबंधीचा करारनामा पूर्ण करण्यात यावा, धरणग्रस्तांना धरणावर मत्स्य व्यवसाय करण्याचे अधिकार मिळावेत, त्यासाठी ठेक्या संबंधीचे शुल्क व अनामत रक्कमदेखील माफ करण्यात यावी आदी मागण्या सरकारदरबारी अनेक वर्ष प्रलंबित आहेत.

संपादित जमिनीचा विनाअट व विनाविलंब चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, त्यांचे पूनर्वसन करावे अशा मागण्यासांठी काश्यपी धरणग्रस्तांनी वारंवार आंदोलने करूनही सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही आंदोलन
काश्यपी धरणग्रस्तांनी यापूर्वी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेत धरणात उड्या मारल्या होत्या. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून धरणग्रस्तांचे बोलणे करून दिले. आश्वसानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. बैठकाही झाल्या पण निर्णय एकही झाला नाही त्यामुळे पुन्हा हे आंदोलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला वाढला भाविकांचा ओघ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकनगरीत श्रावण सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी कोसळत्या पावसात भाविकांचा पूर अनुभवास आला. सलग सुट्या आणि तिसऱ्या सोमवारी निर्माण होणारी अडथळ्यांची शर्यत टाळून भाविकांनी चौथ्या सोमवारला चांगली पसंती दिली.
शहरात शनिवारपासूनच (दि. १२) भाविकांचा ओघ सुरू झाला. सोमवारी गर्दीने उच्चांक गाठला. रात्री नऊ वाजेपासूनच भाविक प्रदक्षिणेस निघालेले होते. पहाटेदेखील शहर ‘बम बम भोले’ने दणाणले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रदक्षिणा करणारे भाविक होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. त्र्यंबकच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देवस्थान ट्रस्टने पूर्व दरवाजास वॉटरप्रुफ मंडप टाकल्याने भाविकांची सोय झाली. ट्रस्टने दोन दिवसांपासून देणगी दर्शन बंद केले आहे. सर्व भाविक पूर्व दरवाजाच्या रांगेतूनच दर्शनास जात होते. मात्र, दर्शनसाठी तीन ते चार तास थांबावे लागल्याचे काही भाविकांनी सांग‌ितले आहे.

प्रदक्षिणेसह ब्रह्मगिरी पर्वतावर गंगेच्या उगमस्थानी दर्शनास जाणाऱ्या भाविकांची सख्या लक्षणीय होती. सोमवारी शहरी तसेच ग्रामीण भागातील भाविक अधिक प्रमाणात होते. पुढच्या आणि शेवटच्या सोमवारी पोळा असल्याने भाविकांनी याच सोमवारचा पर्वकाल साधला आहे. कुशावर्तावर रविवार रात्रीपासून सोमवार दुपारपर्यंत स्नानासाठी रिघ लागली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर आली. स्नान आरतीनंतर पालखी मंदिरात पोहचली तेव्हा गर्दी काहीशी कमी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन दलाच्या सात जणांना शौर्य पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलातील सात अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपतीतर्फे अग्निशमन सेवा शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारात दीपक गायकवाड (सब ऑफिसर), देविदास इंगळे (वाहनचालक), शिवाजी खुळगे, शिवाजी फुगट, हेमंत बेळगांवकर, बाळासाहेब लहांगे, अविनाश सोनवणे या फायरमनचा समावेश आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, कादवा व अन्य नद्यांना महापूर आला होता. त्यावेळी दिंडोरी तालुक्यातील खडक सुकणे येथील पालखेड धरणामध्ये सात व्यक्ती अडकले. या धरणावरील छोट्याशा भूखंडावरून बाहेर काढणे स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करूनही जमले नाही. धरणामध्ये मोठ्या लाटा उसळत होत्या. या घटनेची माहिती मिळताच नाशिक महापालिकेचे रेस्क्यू व्हॅन व रबर बोटीसह घटनास्थळी पाहचले. त्यांनी सात तसाच्या अथक प्रयत्नाने सर्वांना बाहेर काढले. तसेच कुंदेवाडी (ता. निफाड) येथे तीन व्यक्तींना अंधाराचा सामना करून वाचवले. त्यामुळे त्यांच्या या शौर्याची दखल घेत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना हे शौर्य पदक मिळाले आहे. या पुरस्कारार्थींचे महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अनिल महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कड, सय्यद यांना राष्ट्रपती पदक जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि सहायक निरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. दिल्लीत मंगळवारी (दि. १५) होणाऱ्या सोहळ्यात या दोघांना राष्ट्रपतींच्या हस्ते ही पदके प्रदान केली जातील. नाशिक पोलिसांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांना गुड न्यूज मिळाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावे घोषित केली जातात. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यंदा नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील दोन जणांचा त्यात समावेश आहे. अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना प्रशंसनीय सेवेबद्दल (मेडिटोरिअस सर्व्हिस) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते पोलिस सेवेत आहेत. प्रदीर्घ आणि कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांचा हा गौरव होणार आहे. तर, विशेष शाखेतील सहायक निरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना प्रतिष्ठित सेवेबद्दल (डिस्टिंग्विश सर्व्हिस) पदक जाहीर झाले आहे. सय्यद यांनी कुंभमेळ्याच्या काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याची दखल या पदकासाठी घेण्यात आली आहे. शहरातील दोन पोलिसांना पदक जाहीर झाल्यामुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचे दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी/ मालेगाव
मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेजसमोर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कारने टँकरला मागील बाजूस जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहनचालकासह महिला जागीच ठार झाले. मृतांमध्ये मालेगावमधील प्रसिद्ध व्यापारी देवकिसन गगराणी यांच्या पत्नी पुष्पा (५८) यांचा समावेश आहे.
विदेशात जाणाऱ्या मुलगा वैभव आणि सून भावना यांना मुंबई विमानतळावर सोडून परतत असताना हा अपघात झाला. यात पुष्पा गगराणी यांच्यासह गोरख लक्ष्मण पवार (३९, रा. मालेगाव) या वाहनचालकही ठार झाला. जखमी झालेल्या गगराणी दाम्पत्याला नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यापैकी पुष्पा गगराणी यांना तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर झालेल्या देवकिसन गगराणी यांना आडगाव नाक्याजवळील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईहून मालेगावी परतत असताना गगराणी यांच्या तवेरा कारने (एमएच ४१ एएम ९१९१) टँकरला (केए १ एजी २०६६) मागील बाजूस जारदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की कारचा पुढील आणि डावीकडील भाग पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाला. चालक पवार याचा कारवरील ताबा सुटल्याने गंभीर अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. के. के. वाघ कॉलेजसमोर असलेल्या गतिरोधकजवळ वाहनांचा अनेकदा अपघात होतो. अपघातांमध्ये आतापर्यंत दहापेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक अशोक सरोदे करीत आहेत.

आज होणार अंत्यसंस्कार
मालेगाव : मालेगावच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या देवकिसन गगराणी यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ते दोघी काही वर्षापासून अमेरिकेत स्थानिक आहेत. मुलगा वैभव अमेरिकेतील बड्या कंपनीत असिस्टंट डायरेक्टरपदावर कार्यरत आहे. याच महिन्यात त्याचा ३५ वा वाढदिवस गगराणी कुटुंबाने मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. वैभवला मुंबईला विमानतळावर निरोप देऊन परतत असताना काळाने घाला घातला. हवाई प्रवासात असलेल्या वैभवला अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कुवेत येथून त्यास परत बोलावले असून मुलगी मंगळवारी येणार आहे. त्यानंतर पुष्पा गगराणी यांच्यावर मालेगावी अंत्यसंस्कार होतील, असे देवकिसन यांचे बंधू ओमप्रकाश गगराणी यांनी ‘मटा’ला सांगितले. गगराणी परिवारावर झालेल्या या आघाताने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओटीपी’द्वारे ४५ हजाराचा गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
एटीएम कार्डाची माहिती घेऊन आणि ओटीपी क्रमांकाद्वारे अज्ञात व्यक्तीने ४५ हजार रुपयांची रक्कम बँकेतून परस्पर काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएम कार्डची माहिती आणि ओटीपी क्रमांक विचारून संशयिताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ४५ हजार २३६ रुपये काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी जगन्नाथसिंह किशोरसिंह यादव (५६, रा. वडनेर दुमाला, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. यादव यांना ४ जुलैला ७३६२८८०७३६ या मोबाइलवरून फोन आला. संशयिताने यादव यांच्याकडील एसबीआयच्या एटीएम कार्डची माहिती विचारली. तसेच यादव यांना मोबाइलवर आलेला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारला. यादव यांनी ओटीपी सांगताच संशयिताने त्यांच्या बँक खात्यातून ४५ हजार २३६ रुपये काढून घेत यादव यांची फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे तपास करीत आहेत.

तरुणावर प्राणघातक हल्ला

शतपावली करणाऱ्या तरुणीचा विनयभंग होत असल्याते पाहून तिच्या मदतीस धावून जाणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली आहे. गंगापूर रोडवरील संत कबीर नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित पप्पू मुरलीधर नरवडे (२६, रा. संतकबीर नगर) याच्याविरोधात विनयभंग तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील २८ वर्षीय तरुणी शनिवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास शतपावली करीत होती. त्यावेळी संशयित पप्पू नरवडे याने तरुणीचा विनयभंग केला. हे पाहून तेथून जाणाऱ्या संतोष कांबळे या तरुणाने नरवडे याच्या तावडीतून तरुणीस वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने संतोषवरच कोयत्याने वार केला. तसेच परिसरातील इतर नागरिकांनाही मारहाण करून पप्पूने पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बुराडे हे तपास करीत आहेत.

विजेच्या धक्क्याने मजूर ठार

सातपूरमधील अशोकनगर परिसरात सेंट्रिंगचे काम करणाऱ्या मजुराचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला आहे. अनिल शिवाजी चौधरी (४०, रा. अशोकनगर, सातपूर) असे संबंधित मजुराचे नाव आहे. चौधरी हे अशोकनगर येथे सेट्रिंगचे काम करत होते. स्टील कापत असताना विजेच्या वायरीचा धक्का त्यांना लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लाखाचा ऐवज लंपास

ओळखीचा गैरफायदा घेत वेळोवेळी महिलेच्या घरी जाऊन घरातून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज तरुणीने चोरल्याचा गुन्हा उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. प्रज्ञा प्रसन्न जाधव (रा. रामदास स्वामीनगर, टाकळी रोड) यांनी फिर्याद दिली. जाधव यांची एस. के. भगुरे (रा. जयभवानी रोड) या तरुणीसोबत ओळख होती. संशयित तरुणी १३ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान, भेटण्याच्या बहाण्याने घरी येत होत्या. याच भेटीत त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ९६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाकले हे तपास करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

इमारतीत कार पार्क करणाऱ्या महिलेचा दुसऱ्या कारचालकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कुलकर्णी रोड परिसरात महिला तिच्या पतीसह कारमधून घरी आली. दाम्पत्य इमारतीत गाडी पार्क करत असताना एमएच १२ एमआर ०७५० या क्रमांकाच्या कारमधून आलेल्या संशयिताने महिलेच्या कारपुढे कार लावून वाद घातला. तसेच महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देणे’ होणार सुंदर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन ज्यांनी दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश मिळवून दाखविले त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात, योग्य दिशा, भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिक भरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरीत करण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉलेजरोडवरील आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज, सेमिनार हॉल, तिसरा मजला येथे शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांची तर अध्यक्ष म्हणून सर डॉ. मो. स. गोसावी यांची उपस्थिती राहणार आहे. गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव हेच ते ‘मटा’ने हेरलेले दहा हिरे आहेत.
‘मटा’ने हे दहाजण हेरलेत, आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना ‘त्यांनी’ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर येण्यासाठी ‘ते’ प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे. पण त्यासाठी त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे अशांसाठी ‘मटा’तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपुर्व असे यशही लाभले. नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखविली, कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू असे सांगितले.

नाशिककरांचे स्वागत
मटा हेल्पलाइन उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातून ओढला जावा, असा हेतू होता. नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णही झाला आहे. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच; पण नाशिककरांनीही या हृदय सोहळ्याला उपस्थित राहावे, अशी विनंती. चेक स्वीकारण्याची अंतिम मुदत आज, १५ ऑगस्टपर्यंतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
शहरातील बस स्थानकाजवळ किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या मारहाणीत पोटात रक्तस्त्राव होऊन युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी येवला शहर पोल‌िस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोल‌िसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला बस स्थानकाजवळ धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आदील जाकीर पठाण (१७, रा. पिंजारगल्ली, येवला) या युवकास मनोज राजू सोनवणे (१९, रा. जुनी पंचायत समिती मागे, येवला) तसेच त्याच्या अन्य काही सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात पठाण याच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात त्याचा मृत्यू झाला. अकील चांद पठाण यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मनोज सोनवणे यास अटक केली असून या घटनेत त्याचे आणखी इतर कोण कोण साथीदार आहेत, याचाही पोल‌िस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images