Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अॅड. ठाकरे, सोनवणे रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीसाठी बुधवारी विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनी सरचिटणीस पदासाठी तर विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी सभापती व सरचिटणीसपदासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान प्रगती पॅनलच्या वतीने विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार या गुरुवारी (दि. २७) अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी अर्ज सादर करणार आहेत.

‘मविप्र’च्या अर्जस्वीकृतीसाठी गुरुवारी दिवस अखेरपर्यंत दिग्गज इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. मविप्रच्या निवडणूक आखाड्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीतील चित्र बघता ही लढत विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार आणि विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे, विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांच्या पॅनलमध्ये रंगणार आहे. अर्जभरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ७०६ अर्जांची विक्री झाली. पवारांच्या प्रगती पॅनलचे विरोधक ठाकरे व सोनवणेंकडून अर्ज दाखल करून आव्हान प्रत्यक्षात आव्हान उभे केले गेले आहे.

प्रगत‌ी पॅनलतर्फे इच्छुकांच्या मुलाखती

प्रगती पॅनलतर्फे चोपडा लॉन्सच्या बॅक्वेट हॉल येथे मेळावा होऊन गुरुवारपासून (दि. २७) पॅनलसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. यासाठी त्यांचा तालुकानिहाय दौरा होणार असून प्रगती पॅनलच्या वतीने मुलाखती घेण्यासाठी पवार यांच्यासमवेत वनाधिपती विनायकदादा पाटील, रामचंद्रबापू पाटील, अॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे यांचा सहभाग असणार आहे. कळवण, देवळा, सटाणा या पट्ट्यात शुक्रवारी (दि. २८), येवला, नांदगाव आणि चांदवड पट्ट्यात शनिवारी (दि. २९) तर दिंडोरी, निफाड या पट्ट्यात रविवारी (दि. ३०) तसेच नाशिक शहर आणि ग्रामीणसह सिन्नर, इगतपुरी पट्टयात सोमवारी (दि. ३१) या मुलाखती होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरचिटणीसपदासाठी १५ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत घटनेतील महत्त्वाच्या पाचही पदांसाठी प्रत्येकी किमान दहापेक्षा अधिक संख्येने असे ८१ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण २३ पदांसाठी आतापर्यंत एकूण ७०६ अर्जाची विक्री झाली आहे.

उमेदवारी अर्ज स्वीकृतीचा गुरुवारी (दि. २७) अखेरचा दिवस असल्याने दिग्गज उमेदवारांचे अर्ज दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. सरचिटणीसपदासाठी आतापर्यत १५, अध्यक्षपदासाठी ११, सभापतीपदासाठी १६, उपसभापतीपदासाठी २१, सरचिटणीसपदासाठी १५ तर चिटणीसपदासाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्जस्वीकृतीच्या पूर्वसंध्येपर्यंत एकूण ७०६ अर्ज विविध पदांसाठी जमा झाले. बुधवारी सायंकाळपर्यंत ६४ अर्जांची विक्री झाली. बुधवारी दिवसभर विविध अर्जांच्या दाखल होण्याचा ओघ इतर दिवसांच्या तुलनेत जास्त होता. सरचिटणीसपदासाठी बुधवारी आणखी नऊ अर्ज दाखल झाले. अध्यक्षपदासाठी ६, सभापतीसाठी ८, उपसभापतीसाठी ९ तर चिटणीससाठी १० अर्ज बुधवारच्या दिवशी दाखल झाले. आठवडाभराच्या तुलनेत बुधवारी अर्ज दाखल होण्याचा ओघ जास्त होता. तालुका सदस्यपदांसाठी १५ तालुक्यांमधून बुधवारी दिवसभरात १३५ अर्ज दाखल झाले. तालुका सदस्यपदांसाठी आतापर्यंत २७० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये निफाडमधून सर्वाधिक ३१ अर्ज, सटाण्यातून २२ तर सिन्नरमधून २३ अर्ज दाखल आहेत. याशिवाय इगतपुरीतून ११, कळवण आणि सुरगाण्यातून १३, चांदवडमधून ७, दिंडोरी व पेठमधून ६, नाशिकमधून ४, नांदगांवमधून ११, मालेगांवमधून २, येवल्यातून १९, देवळ्यातून ८ तर नाशिक ग्रामीण मधून १५ अर्ज दाखल झाले. प्राथमिक व माध्यमिक सेवकपदासाठी १२ तर महाविद्यालयीन सेवक पदासाठी ५ असे तालुका सदस्य पदासाठी एकूण २७० अर्ज जमा झाले.


असे आहेत उमेदवार
- अध्यक्षपद : विजय पवार, यशवंत अहिरे, डॉ. विजयकुमार निकुंभ, दिलीप मोरे, अॅड. गंगाधर शिंदे, कोंडाजी चौधरी, नानाजी दळवी, रवींद्र पगार, नानासाहेब बोरस्ते.

- सरचिटणीसपद : विजय पवार, भाऊसाहेब गडाख, अॅड. नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनवणे, अॅड. गंगाधर शिंदे, चंद्रभान बोरस्ते, सुनील देवरे, जयराम शिंदे, नानासाहेब जाधव, संदीप वाघ, भगवंतराव बोराडे, कुमुदिनी पवार, शरद पाटील.

- सभापतीपद : विजय पवार, यशवंत ‌अहिरे, माणिकराव बोरस्ते, दिलीपराव मोरे, प्रतापदादा सोनवणे, अॅड. गंगाधर शिंदे, नानासाहेब जाधव, नानाजी दळवी, रवींद्र पगार, भास्कर पाटील, नानासाहेब बोरस्ते, देवराम मोगल.

- उपसभापतीपद : विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप दळवी, उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, डॉ. भाऊसाहेब मोरे, पांडूरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीप मोरे, पंडितराव भदाणे, शैलेश सूर्यवंशी, नानाजी दळवी, रवींद्र पगार, संदीप वाघ, नानासहेब बोरस्ते, प्रतापराव मोरे, भास्कर भामरे, देवराम मोगल.

- चिटणीसपद : विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप मोरे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. भाऊसाहेब मोरे, दत्तात्रय ढिकले, उद्धव निरगुडे, शैलेश सूर्यवंशी, सुनील देवरे, नानाजी दळवी, रवींद्र पगार, देवराम मोगल, प्रतापराव मोरे, नानासाहेब बोरस्ते, नारायण शिंदे, डॉ. बाजीराव रकिबे, संदीप वाघ, संजय पाळेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडचे नगराध्यक्ष शेलार यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढील नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे निफाडवासीयांचे लक्ष लागले आहे.

निफाड नगरपंचायतीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. पाहिले नगराध्यक्ष होण्याचा मान भाजपचे राजाभाऊ शेलार यांना मिळाला. २० महिन्यापूर्वी त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. युतीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार आवर्तन पद्धतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपद वाटून घेण्यात आलेले आहे. अशाच समझोत्यानुसार उपनगराध्यक्षपदी भाजप चारुशीला कर्डिले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेला द्यावे लागेल, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेची कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक-पुणे महामार्गालगत एकलहरे टी पॉईंटवरील दोन अनधिकृत लोखंडी होर्डिंग काढून पाच ट्रक भरून लोखंडी अँगलसह गर्डर व इतर साहित्य जप्त केले.

संबधित दोन्ही होर्डिंग मालकाकडे आठ लाख रुपये महापालिकेची थकबाकी असल्याने अशी कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विविध कर विभागाचे उदय धोंगडे यांच्या पथकाने सिन्नर फाटा येथील खर्जुल मळा येथे कारवाई केली. या कारवाईप्रसंगी अतिक्रमण विभागाकडील चार अतिक्रमण पथक, पोलिस पथक उपस्थित होते. गॅसकटरद्वारे लोखंडी अँगल तोडून हायड्रो क्रेनद्वारे ट्रकमध्ये भरून परत नेले.

आतापर्यंत मेहरबान का?
गेल्या काही वर्षांपासून खर्जुल मळा येथे दोन लोखंडी होर्डिग उभे होते. स्थानिक नगरसेवकांसह, आमदार, खासदारांच्या छबी त्यावर झळकत असत. काही बड्या शिक्षण संस्थांच्या जाहिरातीही तेथे नियमितपणे लागत होत्या. आताआतापर्यंत या होर्डिंगचा खुलेआम वापर केला जात होता. महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत या होर्डिंगकडे दुर्लक्ष केले गेल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे सलीम अन्वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सभापत‌िपदाची निवड बुधवारी पार पडली. स्थायी सभापती म्हणून काँग्रेसचे सलीम अन्वर तर महिला बालकल्याण सभापती म्हणून शिवसेनेच्या आशाबाई आहिरे यांची निवड करण्यात आली. महापौर निवडीप्रमाणे या निवडीत काँग्रेस आणि शिवसेना अशी युती दिसून आली.

पालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी ज्योतिबा पाटील, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीतीत निवड प्रक्रिया सुरू झाली. प्रारंभी स्थायी समिती सभापती निवड झाली. स्थायीसाठी काँग्रेसचे सलीम अन्वर व महागठबंधन आघाडीचे नाबी अहमद यांच्यात सरळ लढत झाली. १६ सदस्यी सदस्य असलेल्या या समितीत काँग्रेस व आघाडीचे प्रत्येकी ५ तर सेना ३, भाजप २, एमआयएम १ असे संख्याबळ आहे. अर्ज माघारीनंतर दोघांचे अर्ज कायम राहिल्याने मतदान झाले. यात सलीम अन्वर यांना काँग्रेस, सेना, एमआयएम मिळून ९ मते मिळाली. तर नाबी अहमद यांना केवळ आघाडीची ५ मते मिळाली. भाजपचे संजय काळे, सुवर्णा शेलार हे दोन सदस्य गैरहजर होते. दरम्यान निवडीआधी आघाडीच्या सदस्य शान ए हिंद यांनी अन्वर यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी ती फेटाळली.

पुन्हा एकदा काँग्रेस-शिवसेना

महिला बालकल्याण समितीच्या सभापती निवड पार पडली. या पदासाठी सेनेच्या आशाबाई आहिरे व आघाडीच्या अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब यांचा अर्ज होता. ९ सदस्य असलेल्या या समितीच्या सभापती निवडणुकीत दोन सदस्य गैरहजर होते. सेनेच्या आहिरे याना ४ तर अन्सारी साजेदा यांना २ मते मिळाली. एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेना-काँग्रेसने एकेमकांना हात दिला असून, पालिकेवर वर्चस्व कायम राखले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विपिंग मशिन खरेदीचे वेध

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छतेत नाशिकचा क्रमांक घसरल्यानंतर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आता स्विप‌िंग मश‌नि खरेदीचे वेध लागले आहेत. ठेकेदाराच्या आग्रहामुळे नाशिकच्या सत्ताधाऱ्यांनी हे मश‌नि पाहण्यासाठी औरंगाबाद पालिकेला भेट दिली. त्यानंतर नाशिकमध्ये प्रत्येक विभागात एक या प्रमाणे सहा मश‌निची खरेदी करण्याचा मानस महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला आहे.

देशपातळीवर स्वच्छतेसंदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेत नाशिकचा क्रंमाक घसरला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनीही स्वच्छतेत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीवर प्रतिंबध असल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांच्या सफाईकरिता स्विप‌िंग मश‌नि खरेदी करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, अजय बोरस्ते, संभाजी मोरुस्कर, सलिम शेख, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील यांनी औरंगाबादचा दौरा केला. औरंगाबाद महापालिकेने ६५ लाख रुपये खर्च करून हे मश‌नि खरेदी केले आहे.

महासभेत प्रस्ताव ठेवणार

मश‌निसाठी महासभेवर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. निधीची अडचण आल्यास स्मार्ट सिटीतून खरेदी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे.

असाही आदर्श

नाशिक महापालिका ही स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबाद पेक्षा पुढारलेली आहे. औंरगाबाद पालिका क, तर नाशिक ब वर्ग श्रेणीत आहे. त्यामुळे पालिकेने निदान अ वर्ग पालिकांचा अभ्यास करणे अपेक्षित असतांना औरंगाबादचा आदर्श घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असे आहे मश‌नि

एका मश‌निची किंमत ७० लाख

रस्ता सफाईसाठी मश‌निचा वापर

सहा मश‌निसाठी चार कोंटींचा खर्च अपेक्षित

मश‌नि दररोज माती, दगड, कचराही उचलणार

एक मशिन करणार दहा कर्मचाऱ्यांचे काम

मश‌निला चालव‌ण्यिासाठी दररोज सुमारे एक लाखाचा खर्च

सहा मश‌निसाठी दररोज सहा लाखांचा खर्च होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सायन्स एक्स्प्रेस'ची धुळेकरांना भुरळ

$
0
0

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून लिंकद्वारे सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही वर्षांत पर्यावरणात मोठे बदल घडून आले आहे. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांवर होतांना दिसत आहे. त्यामुळे मानवासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊन सामूहिकपणे जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला.

सायन्स एक्स्प्रेस जल वायू विशेष परिवर्तन धुळे रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. २६) सकाळी १० वाजता पोहचली. सायन्स एक्स्प्रेसचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद््घाटन करून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेली सायन्स एक्स्प्रेस बुधवारी दिवसभर शहरातील विज्ञानप्रेमी व विद्यार्थ्यासाठी खुली होती. यावेळी महापौर कल्पना महाले यांनी फित कापून उद््घाटन केले. प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, रेल्वेचे अधिकारी आर. के. यादव, व्ही. पी. जाट आदी यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाचा शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. स्थानकात मालगाडी उभी राहण्याच्या ठिकाणी सायन्स

रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात

चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले की, सायन्स एक्सप्रेस धुळ्याकडे नेण्याचे ठरविले नसतांनाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या आग्रहाने ती धुळ्यात आणण्यात आली. एक चांगला खासदार धुळेकरांनी लोकसभेत पाठविला असल्याने धुळेकरांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे विभागात आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे धुळेकरांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे असलेले स्वप्न मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास येणार आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी सांगितले. शनिवारी (दि. २९) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे धुळ्यात येणार आहेत. याशिवाय धुळे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासह प्रमुख कामे मार्गी लागणार आहेत, असेही डॉ. भामरे यांनी संवाद साधताना सांगितले.

सायन्स एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये

सायन्स एक्स्प्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे

विद्यार्थी, शिक्षकांसह प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क

आतापर्यंत एक लाख ५६ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

आतापर्यंत आठ वेळेस देशाचा प्रवास पूर्ण केला

५१० रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन

आतापर्यंत १७५० प्रदर्शन दिवसांमध्ये १.७० कोटी दर्शकांचा प्रतिसाद

सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन म्हणून बारा वेळेस लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ असुरक्षितच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील विमानतळाच्या सुरक्षेला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडलला (एचएएल) वर्षभरात मुहूर्त सापडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेळ्यांच्या निर्यातीसाठीचे कार्गो विमान धावपट्टीवर बुधवारी उभे असतानाच स्थानिक रहिवासी विमानतळाचे सुरक्षा कुंपण खुलेआम ओलांडत असल्याचे दिसून आले.

मिग, सुखोई यासारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या एचएएलचा कारखाना ओझर येथे आहे. याचठिकाणी विमानतळही साकारण्यात आले आहे. प्रवासी विमान वाहतूक सध्या येथून होत नसली, तरी कार्गो सेवा मात्र कार्यरत आहे. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी शेळी निर्यातीसाठीचे कार्गो विमान धावपट्टीवर उभे असताना या विमानतळाच्या सुरक्षा कुंपणाला पडलेल्या भगदाडाचे सचित्र वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या एचएएल प्रशासनाने तातडीने या भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेला नोटिसही बजावण्यात आली. यानंतर दगडी सुरक्षा कुंपणाला पडलेले भगदाड बुजविण्यात आले. मात्र, या कुंपणावरील तारेचे संरक्षक कुंपण ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. या साऱ्या प्रकाराचा ‘मटा’ने वर्षभरानंतर मागोवा घेतल्याने एचएएलच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे समोर आले आहेत.

गेल्या वर्षी शेळ्यांची दुबईतील निर्यात यशस्वी ठरल्यानंतर यंदाही ओझर विमानतळावरुन शेळ्यांची निर्यात केली जात आहे. बुधवारी (२६ जुलै) दुपारी युक्रेनचे आयएल ७६ हे कार्गो विमान ओझरच्या धावपट्टीवर दाखल झाले. याचवेळी एचएएलच्या तकलादू सुरक्षा कुंपणावरून स्थानिक महिला एचएएलच्या आवारात बिनधिक्कत जात असल्याचे दिसून आले.

चिंताजनक बाब

दहशतवाद्यांनी नाशकात रेकी केल्याचा प्रकार घडला असतानाही एचएएलने सुरक्षा व्यवस्थाच कमजोर ठेवणे चिंताजनक असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


…म्हणे प्रवेश निष‌‌िद्ध

विशेष म्हणजे, तारेचे कुंपण तुटलेल्या या दगडी कुंपणावरच एचएएलने एक बोर्ड लावला आहे. ‘भारतीय सरकारी गोपनियता अधिनियम १९२३ कलम २(८), (अ) (ब) (क) (ड) नुसार प्रतिबंधित क्षेत्र. प्रवेश निषिद्ध. कुत्र्यांपासून सावधान’ अशा स्वरुपाचा इशारा देणारा हा बोर्डही फुकाचाच असल्याचे निष्पन्न झाले. धावपट्टीवरून अगदी हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडत असल्याने विमानतळ, कार्गो विमान आणि एचएएलचा प्रकल्प या सगळ्याच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठूरायाची भेट घेऊन गावी परतले ‘निवृत्तिनाथ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आषाढवारीस पंढरपुरास गेलेली श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांची पालखी बुधवारी त्र्यंबकनगरीत परतली. त्र्यंबक ये‌थून ९ जूनला पालखीचे प्रस्थान झाले होते. २६ दिवसांचा प्रवास करून पंढरपूर येथे आषाढी वारी केली. त्यानंतर १८ दिवसांचा प‌रतीचा प्रवास करून ही पालखी शहरात पोहचली आणि निवृत्त‌िनाथ महाराज अन् त्र्यंबकराजांची पुन्हा एकदा भेट झाली. दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरूण राजानेही या भेटीप्रसंगी हजेरी लावल्यामुळे परतीच्या प्रवासाने शिणलेले वारकरीही तृप्त झाले.

बुधवारी त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारी ढोलताशांचा गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे, भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, आरपीआय तालुका अध्यक्ष शांताराम बागुल, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, देवस्थान मुख्यकार्यकारी अधिकारी राधाकृष्ण जोशी विश्वस्त जयंत गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय धोंगडे, पुंडलीक थेटे, दिंडी सोहळा अध्यक्ष पंड‌ित कोल्हे, त्र्यंबकराव गायकवाड, जिजाबाई लांडे, रामभाऊ मुळाणे आदी विश्वस्तांसह वसंतराव घुले, रवींद्र सोनवणे, सुरेश गंगापुत्र, विजय शिखरे उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी पावसानेही जोरदार हजेरी लावली. पंढरीस विठुरायाच्या भेटीस गेलेले संत निवृत्त‌िनाथ पुन्हा त्र्यंबकराजास भेटले. कुशावर्तावर स्नान आटोपल्यानंतर निवृत्त‌िनाथ मंदिरात आरती करण्यात आली. पालखी सोहळ्यात सहभागी ९ विणेकरी आणि ५ तुळशीधारी महिला वारकरींचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजच्याच रडगाण्याला वैतागले मनमाडकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

तब्बल एक लाखाची लोकसंख्या असलेले मनमाड शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न हल्ली प्रत्येक नागरिकाला पडला नाही तर नवल. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे रस्त्या रस्त्यांवर पाणी साचले, चिखल झाला. त्यात खड्ड्यांची भर पडल्यामुळे हे रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजव‌िण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्रशासनाकडून कोरडे आश्वासन

शहरात एवढी रस्त्यांची चाळण झालेली असताना पालिका प्रशासन, नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी यांना हे खड्डे दिस नाही का, असा सवाल आता मनमाडकर विचारत आहेत. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांनी रस्त्यांचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होणार याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

येथे आहेत खड्डे

रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्या

डॉ. आंबेडकर चौकाकडून इंडियन हायस्कूलकडे जाणारा रस्ता

रेल्वे उड्डाणपुलाजवळील चौकात

पालिकेच्या परिसरातही खड्डे

मनमाड नगरपालिकेकडे जाणारा रस्ता

स्टेशन कडून महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता

शिवाजी चौकातील पालिका प्राथमिक शाळे समोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे शहर झाले हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारच्या समितीतर्फे धुळे शहरात पाहणी करण्यात आली होती. यात तपासणीनंतर धुळे शहरास समितीने हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील केवळ चार महापालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या असून, त्यात धुळे महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. धुळे शहर व महापालिका हागणदारीमुक्त घोषित झाल्याने अमृत अभियानातील विविध योजनांचा लाभ महापालिकेला मिळणार आहे.

राज्य सरकारतर्फे यापूर्वीच शहराची पाहणी करण्यात आली होती. त्यासोबतच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छतेविषयी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या आधारावर समितीने शहराला हागणदारीमुक्त घोषित केले आहे. केंद्रीय समितीतर्फे शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शहराचा १२४ वा क्रमांक मिळाला होता. यानंतर केंद्र सरकारच्या समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक मयूर उदारे यांची समिती गेल्या आठवड्यात शहरात आली होती. या समितीने महापालिकेच्या कामांची पाहणी करून तपासणी केली.

या तपासणीत गलिच्छ वस्ती, व्यापारी क्षेत्र, रहिवाशी विभाग, वैयक्तिक शौचालय, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तसेच विविध पातळीवर महापालिकेची कामेही तपासून पाहण्यात आली. आजपर्यंतच्या महापालिकेने अवलंबिलेल्या व केलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. या सर्व तपासणीअंती केंद्र सरकारतर्फे धुळे शहरासह महापालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली. याविषयीचा तपासणी अहवाल महापालिकेला नुकताच प्राप्त झाला आहे.

धुळे 'स्मार्ट' होण्यास हातभार

धुळे शहर हागणदारीमुक्त घोषित केल्यानंतर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होण्यास हातभार लागणार आहे. शहरांत विविध योजना येण्यास सुरुवात होऊन धुळेकरांना सोयीसुविधा उपलब्ध होतील. यासाठी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, अभिजित कदम, अनुर डूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत ओगले, आरोग्याधिकारी महेश मोरे, रत्नाकर माळी व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी यांचे योगदान आहे. घोषणा झाल्यावर महापौर कल्पना महाले यांच्या दालनात त्यांनी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

नांदूर मनपा शाळेत स्वच्छतागृहाची समस्या कायम

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

नांदूर गावात महापालिकेच्या शाळेमध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र तरीही या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या समस्या आहेत. या मुलभूत समस्यांनी ग्रासलेल्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या समस्यांसंदर्भात गेल्यावर्षी 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संरक्षक भिंत आणि पाण्याची व्यवस्था केली गेली होती. मात्र शाळेच्या स्वच्छतागृहांची समस्या वर्षभरानंतरही जैसे थे आहे.

नांदूर गावात मुलींची मनपा शाळा क्रमांक ३४, मुलांची शाळा क्रमांक ८० आणि गुरु माऊली अण्णासाहेब मोरे माध्यमिक विद्यालय अशा एकूण महापालिकेच्या तीन शाळा आहेत. या शाळांमध्ये सकाळ आणि दुपार या दोन सत्रात यामध्ये एक हजार विद्यार्थी शिकतात. मात्र या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा त्यांना दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. वर्षभरानंतरही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता याबाबतच्या समस्या कायम आहे.

शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळेला लागून मुख्य महामार्गांना जोडणारा रस्ता असल्याने कायम वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मुलांना पाणी पिण्यासाठी शेजारी असलेल्या घरात जावे लागते. याबाबत 'मटा'ने बातमी प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शाळेला सुरक्षा भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पण तरीही याठिकाणी स्वच्छता राखली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसातही सिडकोच्या घशाला कोरड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
मागील आठवड्यापासून शहरात मुसळधार पाऊस पडून धरण भरल्याने पाणी सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, शहरातील प्रभाग ३१ मधील नागरिक भरपावसातही चेतनानगर व परिसरातील म्हणजेच प्रभाग ३१ मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच सत्ताधारी असलेल्या भाजपच्याच नगरसेविकेला महिलांसह थेट मोर्चा काढण्याची वेळ येत असल्याचे विदारक चित्र आहे. पावसाळा अर्धा होऊनही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधील चेतनानगर व परिसरात पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी होत्या. मागील तीन ते चार महिन्यांपासून येथील नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत असून, आता पाऊस चांगला झालेला असतानाही पाणी का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत येथील महिलांनी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. अनेक दिवसांपासूनची ही समस्या सुटत नसल्याने नगरसेविकेने प्रभागातील महिलांसह थेट विभागीय कार्यालयात धाव घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा न होण्याविषयी जाब विचारला.
यावेळी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचा गोंधळ अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शिवाय पाण्याची वेळ निश्चित नाही. अनेक वेळा गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील पाणी समस्या एक गंभीर प्रश्न बनला आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली तरी अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी साहेबराव आव्हाड, मेघल भार्गव, दीपिका सोनवणे, निशा रायकर, कलावती दुसाने, अरुणा बोरसे, प्रतिभा पाटील, अरुणा अवतारे, सुनीता पवार, सुगंधा भोये, वंदना काळे उपस्थित होत्या.

प्रभाग ३१ मधील पाणी प्रश्न हा केवळ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होत आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे सर्व कारभार रामभरोसे आहे. प्रभागातील पाणीसमस्या सुटली नाही तर आंदोलन करू
- पुष्पा आव्हाड, नगरसेविका, प्रभाग ३१

चेतनानगर सह परिसरात काय अडचण आहे, याची पाहणी करणार आहोत. दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल.- संजीव बच्छाव, पाणीपुरवठा अधिकारी

प्रभाग २५ मध्ये दूषित पाणी
एकीकडे पाणी येत नाही म्हणून आंदोलनाची भूमिका घेतली जात असतानाच दुसरीकडे प्रभाग २५मध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.
प्रभाग क्रमांक २५मधील त्रिमूर्ती चौक भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. त्यानुसार नागरिकांनी बुधवारी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक बडगुजर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता महिलांनी त्यांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी दाखविले. यावेळी बडगुजर यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली असता, दोन दिवसांपासून काही कारणास्तव दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे मान्य केले. दोनच दिवसांत हा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी पवन मटाले, गोपीनाथ सोनवणे, चित्रकला नांद्रे, सुजाता औटी, गिरीजा शिंदे, सोनाली गुजराथी, भाग्यश्री गायकवाड, वैशाली महाले, मंदाकिनी भापकर यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

गढूळ पाणीपुरवठा हा संपूर्ण शहराची समस्या आहे. या दूषित पाण्याचे नमुने विभागवार घेऊन त्यात क्लोरीनचा डोस किती आहे व ते पिण्यास योग्य आहे का ते पाहण्याची गरज आहे. प्रभाग २५ मध्ये दुषित पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने याबाबत वेळावेळी माहिती ही आयुक्तांना दिली जाते.
- सुधाकर बडगुजर,
नगरसेवक, प्रभाग २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चारशे इमारती धोकादायक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा एकदा शहरातील धोकेदायक वाडे व इमारतींना नोटीसा देण्याचा सोपस्कार पार पाडले आहेत. शहरात जवळपास ४१० इमारती व वाडे हे धोकादायक असून, त्यांना पुन्हा नव्याने नोट‌िसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींना स्ट्रक्चरल ऑड‌िट करून देण्याचेही फर्मान काढले आहे.

शहरात सहा विभागांत जवळपास साडेआठशेच्या आसपास जुन्या इमारती व वाडे आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे, मुंब्रा व मुंबई भागात इमारती कोसळून जीवितहानी झाल्याचे प्रकार घडल्यानंतर नाशिक महापालिकेनेही सर्वेक्षण करून शहरात धोकादायक इमारती व वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोट‌िसा देऊन स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी घाटकोपरमध्ये इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने पुन्हा घाई-गडबडीत शहरातील ४१० इमारती व वाड्यांना नोट‌िसा बजावल्या आहे. त्यात पूर्व विभागात २०९, पश्‍चिम विभाग ११, पंचवटी विभाग ७७, नाशिक रोड ६३, सिडको २७, तर सातपूर विभागात २३ धोकादायक इमारती व वाड्यांचा समावेश आहे. सोबतच ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑड‌िट करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

भाडेकरू-मालक वाद

शहरातील जुन्या वाड्यांमध्ये बहुतांश ठिकाणी घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद आहेत. वाड्यांचे भाडे अजूनही जुन्या पद्धतीने लागू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने वाडे खाली करण्यास भाडेकरू तयार होत नाहीत. भाडेकरूंनी या वाड्यांवर मालकीचा दावा केला असून, अनेक वाड्यांचा वाद कोर्टात गेला आहे. या वादामुळे घरमालकही हतबल झाले असून, पालिकेलाही केवळ नोट‌िसा देण्याचे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…अन्यथा खड्ड्यांंतच झाडे लावणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील शांतीनगर त्रिफुली ते गणपतदादा मोरे महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे येत्या एक ऑगस्टपर्यंत बुजले नाही तर या खड्ड्यांमध्ये झाडे लावू, असा इशारा नगरसेवक जावेद शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

काही वर्षांपूर्वी निफाड शहरातून जाणाऱ्या निफाड-पिंपळगांव रस्त्यावरील शांतीनगर त्रिफुली ते वैनतेय विद्यालय या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदीकरण करण्यात आले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या, रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहने चालवितांना कसरत करावी लागते, कधीकधी अपघातही झाले आहेत. या सिमेंटच्या रस्त्याचे लोखंडी गज उघडे पडले असून, या गजांमुळे किरकोळ अपघात झाले आहेत.

वैनतेय विद्यालय ते मोरे महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होत असते. पिंपळगांव बसवंत, वणी, येवला, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरून जाते. हा रस्ता निफाड शहराचा मुख्य रस्ता आहे. या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे वाहनधारकांना मुश्किल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर निरीक्षकास रंगेहाथ अटक

$
0
0

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी लागलेले पैसे तक्रारदाराकडून पोलिस निरीक्षकाने मागितले. या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी पंधराशे रुपये खर्च न देता तक्रारदाराने एसीबीला तक्रार केली. त्यावर कारवाई करीत धुळे एसीबीने बुधवारी (दि. २६) दुपारी पोलिस निरीक्षक देविदास भोज यांच्यावर रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांचा ‘खडतर’ प्रवास

$
0
0

नाशिक-पुणे महामार्गावर खड्डे दुरुस्तीसाठी दगडांचा वापर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

संततधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्ग ठिकठिकाणी उखडलेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने सिमेंटसह खडी व दगडांचा वापर केल्याने आता वाहनचालकांना अक्षरशः जीवघेणा आणि खडतर प्रवास करण्याची वेळ आली आहे. महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी योजलेल्या या अघोरी उपायामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे म्हणत वाहनचालकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे चित्र महामार्गावर दिसून येत आहे. काही ठिकाणी तर वाहनचालकांना अपघात झाल्याचेही प्रकार घडून आले.

गेल्या संपूर्ण आठवडाभर नाशिक शहर परिसरात संततधार पाऊस झाला. या पावसाने नाशिक-पुणे महामार्गावर थेट द्वारका ते चेहेडीदरम्यान ठिकठिकाणी खड्ड्यांची मालिकाच तयार झाली. या जीवघेण्या खड्ड्यांचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध होताच मंगळवारी (दि. २५) महामार्गाचे नूतनीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेल्या चेतक एंटरप्रायजेस प्रा. लि. या कंपनीने या खड्ड्यांची दुरुस्ती केली. मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कंपनीने सिमेंट व खडीचे मिश्रण वापरल्याने यातील संपूर्ण खडी अवघ्या काही तासांतच महामार्गावर पसरली. परिणामी, अगोदरच्या खड्ड्यांपेक्षा बिकट परिस्थिती आता निर्माण झाली आहे. या खडीवरून वाहने चालवताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

दुरूस्तीला दगड, फरशीचे तुकडे

नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक, शिवाजी पुतळा, एकलहरे टी पॉईंट, सिन्नर फाटा, सिन्नर फाटा पोलिस चौकी, निसर्ग लॉन्स, चेहेडी शीव, उपनगर या ठिकाणी खड्डे मंगळवारी बुजवून दुरुस्ती करण्यात आली. सुरुवातीला वाहनचालकांनाही या दुरुस्तीचे हायसे वाटले. परंतु, वाहनचालकांचा हा आनंद अवघ्या काही तासांतच पुन्हा मावळला. खड्डे दुरुस्तीसाठी काही ठिकाणी दगडांसह चक्क फरशीचे तुकडे टाकण्यात आल्याने या खड्ड्यांवरून काही वाहने पंक्चरही झाली. या खड्ड्यांतील खडी महामार्गावर पसरल्याने काही दुचाकी वाहने घसरून पडल्याचेही प्रकार घडले.

खाली खडी वर धूळ

खड्डे दुरुस्तीसाठी चक्क सिमेंटमिश्रित जाड खडीचे मटेरिअल वापरण्यात आल्याने सकाळी खड्ड्यातून सुरू असलेला प्रवास काही काळासाठी संपला. मात्र खड्ड्यांत भरलेले मटेरिअल दुपारनंतर महामार्गावर पसरल्याने संपूर्ण महामार्गावर धुळीने वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले. यामुळे महामार्गावर पसरलेली खडी व उडणारी धूळ येजा करणारे वाहनचालक प्रचंड बेजार झाले होते.

नाशिक-पुणे महामार्गावरील खड्डे ठेकेदाराने बुजवले आहेत. त्यासाठी सिमेंट ट्रिटेड बेस्ड मटेरिअलचा वापर केला असून, पावसाच्या पाण्यामुळे डांबराच्या मटेरिअलने खड्डे दुरुस्ती करता येत नाही. आता पाऊस थांबल्यास तत्काळ डांबराच्या मटेरिअलने महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल.

- वाय. ए. पाटील, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

या महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी अत्यंत घातक मटेरिअल वापरण्यात आल्याने या ठिकाणाहून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी तर दगड वापरण्यात आल्याने त्यापेक्षा अगोदरचे खड्डे बरे होते असे वाटत आहे.

- नितीन फडोळ, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका, सरकारी कार्यालयांत मिळणार ‘आधार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधारकार्ड वितरण प्रक्र‌ियेतील त्रुटी दूर व्हाव्यात, तसेच गैरप्रकार थांबावेत यासाठी यूआयडीने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडिया) डी-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. आधारकार्ड वितरीत करणारी सेंटर्स रद्द करण्यासारख्या कठोर कारवायाही नाशिकमध्ये झाल्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरच राष्ट्रीयीकृत बँका, सरकारी कार्यालये, सरकारी दवाखाने, शाळा अशा ‘सरकारी’ ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. प्रत्येक विभागात किमान पाच ठिकाणी आधार नोंदणी होऊ शकेल. परंतु, तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा. यूआयडीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आधार नोंदणी किंवा त्यामध्ये अपेक्षित बदल करवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रत्येक भागात पाच सेंटर देणार

२०११ च्या जणगणनेनुसार आम्ही बहुतांश लोकांची आधार नोंदणी पूर्ण केली आहे. त्यानंतरची लोकसंख्या आधारनोंदणीमध्ये कव्हर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शालेय विद्यार्थी, कामगार अशा वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांचे आधारकार्ड काढले असून, ९८ टक्के विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळाली आहेत. जन्मतारीख, पॅन किंवा मोबाइल लिंक‌िंगसाठी यूसीए हे सॉफ्टवेअर सुरू केले असून, तीन दिवसांत हे बदल अपडेट होतात. आधार नंबर यापुढील काळात प्रत्येक भारतीयाची विशेष आणि स्वतंत्र ओळख असणार आहे. त्यामुळेच त्यातील माहिती लिक होणार नाही, याची पुरेपूर काळजी यूआयडीकडून घेतली जात आहे. अपडेशन ही‌ किचकट प्रक्रिया असल्यानेच नागरिकांना काही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यूआयडीची परीक्षा पास झाल्याशिवाय कोणालाही आधारचे काम सुरू करता येत नाही. या परीक्षेत ७५ गुण मिळणे आवश्यक आहे. हे लोक प्रशिक्षित असतात. तांत्रिक अडचणींना मानवी मर्यादेची बंधने असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात १४० सेंटर्स असून, शहरात १४ तर जिल्ह्यात ५० आधार केंद्रे सुरू आहेत. प्रत्येक भागात आधार नोंदणीची क‌िमान पाच सेंटर्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल. लोकांनी केंद्रांवर गर्दी करण्याऐवजी ऑनलाइन प्रक्रियेचा आधार घेऊन आपली गैरसोय टाळावी. व्हॉटस अॅप वापरणारी प्रत्येक व्यक्ती ऑनलाइनद्वारे आधार नोंदणी किंवा त्यामध्ये इतर बदल करवून घेऊ शकते.

- ‍चेतन सोनजे, ई- डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर, जिल्हा प्रशासन

आधार कार्ड निःशुल्क

नवीन आधारकार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. कोणी त्यासाठी शुल्क आकारत असेल, तर जिल्हा प्रशासनाला त्याबाबत माहिती द्यावी. अशा सेंटर्सवर निश्च‌ितपणे कारवाई होईल. गेल्या आठ महिन्यांत अशा काही केंद्रांवर आम्ही कारवाई केली आहे. यूआयडी स्वत:च आधार कार्ड वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी आग्रही आहे. क्रॉसचेक करून ते सेंटरची मान्यताही रद्द करतात. भ्रष्टाचाराला लोकांनीदेखील विरोध करायला हवा. आधार कार्डमधील जन्मतारीख, पत्ता बदलणे, मोबाइल तसेच पॅन कार्ड लिंक करणे अशा काही बदलांसाठी माफक शुल्क आकारले जाते. तसे दरपत्रक आधार केंद्रांवर लावणे सक्तीचे केले आहे. ज्येष्ठ नागरिक, नवजात बालके यांना सहजतेने आधारकार्ड मिळावे यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. तसेच सरकारी कार्यालयांमधूनही आधारची नोंदणी होऊ शकणार आहे. १५ ते ४१ दिवसांत आधार मिळायलाच हवे. सेंटर्सची संख्या वाढली की हा कालावधी अधिक कमी होईल. भ्रष्टाचाराला लोकांनीच विरोध करायला हवा. सरकारी बँका, शाळा, सरकारी कार्यालये येथे आधार केंद्रे सुरू केले जातील. ३१ ऑगस्टपर्यंत आराखडा सादर करावयाचा असून, त्यानंतर अंमलबजावणी होईल.

- चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार, सामान्य शाखा

‘आधार’ची सत्यता तपासणारी यंत्रणा हवी

आधार कार्ड नव्याने काढण्यासाठी तसेच दुरुस्ती व अपडेशनसाठी असणारी आधार केंद्रे कायम बंद असल्याचे दिसून येते. शहरात सध्या सुरू असणाऱ्या काही तुटपुंज्या आधार केंद्रांवरील सर्व्हर कायम डाऊन असल्याचे कारण नागरिकांना देण्यात येते. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे नाहक हाल होत आहेत. सर्वप्रथम सरकारने शहरातील आधार केंद्रे सुसज्ज आणि डिज‌िटली अपडेट करायला हवीत. अनेकदा काही आधार केंद्रांवर आधार कार्ड काढून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. आधारच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी सरकारने कठोरात कठोर कारवाई करायला हवी. तसेच आता पॅन कार्ड, रेशनकार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस व बँक अकाउंट, तसेच इतर कागदपत्रांना आधार लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यावेळी आधार लिंक करताना आधार कार्ड काढतेवेळी घेण्यात आलेले हातांच्या बोटांचे ठसेदेखील आता अवैध दाखवले जात आहेत. हा प्रकार जुना डेटाबेस, तसेच अपडेट न झालेले सॉफ्टवेअर यांमुळे उद्भवत आहे. नागरिकांची यात चूक नसतानाही नाहक अत्यावश्यक सुविधांपासून त्यांना दूर ठेवले जात आहे. अनेकदा पहिल्या फेजमध्ये काढलेले आधार अपुऱ्या माहितीअभावी काही ठिकाणी अवैध दर्शविले जाते. पण पुन्हा आधार कार्ड अपडेट करायला शहरात सेंटर्सच सुरू नसल्याने अडचणींत वाढ होत आहे. काही ठिकाणी बोगस आधार कार्ड बनवण्याचे काम आधार सेंटरच्या नावाखाली सुरू आहे. हे प्रकार थांबण्यासाठी आधार खरे की खोटे हे तपासण्याची यंत्रणा यायला हवी. भविष्यात आधार कार्ड हीच भारतीय नागरिकाची एकमेव आयडेंटिटी असणार आहे. यामुळे आधारच्या योग्य सुविधा, डिज‌िटालायजेशन, सुसज्जता व पारदर्शकता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवादल


लिंकिंगची समस्या नित्याचीच

आयकर तसेच जीएसटी भरताना आधार कार्ड अनिवार्य आहे. ३१ जुलै २०१७ ही टॅक्स भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, जीएसटी व आयकर भरण्यासाठी आधार लिंक करताना खूप अडचणी येत आहेत. मुख्यत्वे आधार कार्ड तयार करताना एजन्सीकडून सिटिझन्सची माहिती चुकीच्या तसेच अपुऱ्या प्रमाणात अपलोड करण्यात आली आहे. यामुळे सध्या टॅक्स रिटर्न भरतेवळी आधार कार्ड अपुऱ्या माहितीअभावी लिंक होत नसल्याने टॅक्स रिटर्न भरणे अवघड झाले आहे. तसेच आधारची माहिती अपडेट करण्यासाठी शहरात सेंटर्स चालू नाहीत. जे आहेत, तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. व्यापारी, कामगार, नोकरदार व विद्यार्थी यांना या सेंटर्सवर सकाळपासून रांग लावून उभे राहणे शक्य होत नसल्याने आधारच्या अडचणी वाढत आहेत. तसेच आधार कार्ड लिंक होण्यास सात ते आठ दिवसांचा अवधी लागत असून, त्वरित रिटर्न भरायचे असल्यास डिज‌िटल स्वाक्षरी अनिवार्य आहे. मात्र, डिज‌िटल स्वाक्षरीसाठी येणारा खर्च खूप आहे. यामुळे आधार लिंक करणे आणि त्यात उद्भवणाऱ्या त्रुटी त्रासदायक ठरत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना नाहक भुर्दंड पडत आहे. विशेष म्हणजे, अद्याप शहरातील अनेक व्यापाऱ्यांना टॅक्स सिस्ट‌िमबाबत हवी ती माहिती मिळालेली नाही. व्यापारी व नोकरदार वर्गात अनेक संभ्रम आहेत. हे मिटवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने पुढाकार घ्यायला हवा. आधार लिंक होत नसल्याचा प्रॉब्लेम कायमचाच असल्याने आयटी रिटर्न व जीएसटी भरण्याची मुदत वाढवून द्यायला हवी.

- राजेंद्र बकरे, कर सल्लागार


डिज‌िटलायजेशनचा फायदा घ्या

आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक केल्यास कोणतीही अडचण येत नाही. आधार कार्डमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची असल्यास यूआयडीच्या वेबसाइटवर आपला आधार क्रमांक टाकून करता येते. यानंतर मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून यूजर्स तुम्हीच असल्याची खात्री झाल्यावर आधारमध्ये अपडेट करता येतात. पत्ता आणि इतर माहिती याच सिस्ट‌िममधून अपडेट केली आहे. मात्र, अजूनही अनेकांचे मोबाइल क्रमांक आधारला लिंक नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या अनेकांचे मोबाइल क्रमांक लिंक नाहीत, बदलले आहेत अशा समस्या आहेत. तसेच आधार कार्डची ऑनलाइन सिस्ट‌िम वापरण्यास सोपी असून, त्याची जागृती जनसामान्यांत होणे गरजेचे आहे. अजूनही ऑनलाइन सिस्ट‌िमबाबत नागरिकांना योग्य माहिती नसल्याने सेंटर्सला जाण्याची अडचण निर्णाण होत आहे. या समस्यांच्या निवारणासाठी सरकारी कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. डिज‌िटालयजेशनचा योग्य तो फायदा करून घेणे सर्वांच्या हिताचे आहे.

- प्रकाश चौधरी, सामान्य नागरिक


आधारची प्रक्रिया अपडेट करा

आधार कार्डच्या अनेक समस्या सध्या नागरिकांना भेडसावत आहेत. आधार काढतेवेळी दिलेला मोबाइल नंबर चुकीचा अपलोड झाल्याने माहिती अपडेट करताना अडचणी येत आहेत. काही नागरिकांनी आधार काढतेवेळी मोबाइल क्रमांक देऊनही त्यांचा मोबाइल क्रमांक रजिस्टर नसल्याचे सांगण्यात येत आहे. यातच आधार अपडेट करायला शहरात सेंटर्स नसल्याने समस्यांमध्ये आणखीन भर पडत आहे. विशेष म्हणजे, मनपा विभागीय कार्यलयांत आधार केंद्र असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष ही सेंटर्स बंद असल्याचे निदर्शनास येते. खासगी सेंटर्सवर पहाटेपासून नागरिक आधारसाठी गर्दी करतात आणि येथेही दिवसाकाठी ३० नागरिकांनाच टोकन देण्यात येते. यामुळे आधार अपडेट करावे तरी कसे, हा गंभीर प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. याची रीतसर नोटीस सर्व आधार केंद्रांवर नसल्याने नागरिकांना अपडेटेशन करताना नेमका किती खर्च येणार आहे, याची माहिती मिळत नाही. आधार केंद्रावरील कर्मचारीदेखील नागरिकांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. आधार हे देशभरात सर्वत्र ग्राह्य असणारे व भारतीय नागरिकाची खरी ओळख असणारे कार्ड आहे. तरीही याबाबतच्या अनेक अडचणी वारंवार समोर येत असतात. याकडे सरकारने प्रथम लक्ष द्यावे, मग आधार लिंक करावे आणि अपडेटेशनची प्रक्रिया राबवावी.

- पद्माकर इंगळे, सामाजिक कार्यकर्ता

तक्रारींचे निवारण करा

आधार केंद्रावर गेल्यावर नागरिकांच्या पदरी कायम निराशाच पडते. शहरात सुरू असलेल्या आधार केंद्रांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतपत असून, मनपा विभागीय कार्यालयातील आधार केंद्रांवर एकाचवेळी आधार कार्ड बनवणे, दुरुस्ती, आधार लिंक, आधार अपडेटेशन, पॅनकार्ड बनवणे तसेच इतर सरकारी दाखले बनविण्याचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांचा वाढता ओघ असून, सर्व्हर डाऊन असल्याचे कारण अनेकदा देण्यात येते. बहुतांशवेळा सरकारी अधिकारी तसेच खासगी आधार केंद्रावरील लोक कार्यलयीन वेळेपेक्षा उश‌िरा येतात आणि त्यानंतर आपले काम अगदी धीम्या गतीने करतात. हा प्रकार थांबायला हवा. आधार कार्डमध्ये अपडेटेशन करण्यासाठी व नव्या आधारसाठी स्वतंत्र खिडकी किंवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायला हवी. सर्व आधार केंद्रांवर आधार संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधत तक्रार केल्यास त्याचे निवारण अधिकाऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे.

- योगेश कापसे, सामाजिक कार्यकर्ता


ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा द्यावी

शहरात सध्या आधार केंद्रे मुबलक आहेत. मात्र तिथे होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण व तक्रार निवारणासाठीही डिज‌िटलायजेशन महत्त्वाचे आहे. आरटीओच्या कार्यप्रणालीप्रमाणे ज्यांना आधार कार्ड काढायचे किंवा अपडेट करायचे करायचे आहे, अशांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा सुरू करण्यात यावी. या सुविधेअंतर्गत नागरिक आपल्या जवळच्या आधार केंद्राची ठराविक वेळेची अपॉइंटमेंट ऑनलाइन स्वरुपातच घेतील. यामुळे केंद्रावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच या ऑनलाइन प्रणालीमुळे आधार केंद्रांच्या कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता येईलच; याबरोबरच नागरिकांची पायपीटही थांबेल. आधार आत्ता सर्वत्र अनिवार्य झाल्याने त्याचे मोल दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकही सजग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आधार केंद्रांची संख्या वाढवत आधार कार्डच्या कामासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंटची सोय उपलब्ध झाल्यास या कार्याला गती प्राप्त होईल.

- आशिष कुलकर्णी, विद्यार्थी

कॉलेजमध्ये आधार सेंटर द्या

कॉलेजमध्ये सर्व फॅकल्टीजच्या कोणत्याही वर्गात प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड नसल्यास प्रवेश नाकारला जाईल, असे कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. आधार कार्डवर असणारी जन्मतारीख, पत्ता, फोटो ही माहिती बघून विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज सर्व कॉलेजांमध्ये तपासले जात आहेत. मात्र, आधार कार्डवर जन्मतारीख अपुरी असून, काहींच्या आधार कार्डवर जन्मतारीखच नसल्याचे दिसून येते. अनेकदा पत्ता चुकीचा असतो, तर कधी फोटो अस्पष्ट असतो. यामुळे आधारवरील माहिती खरी असल्याचे लेखी हमीपत्र द्या, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. काही कॉलेजेसमध्ये आधार कार्डवरची माहिती अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना अपडेट आधार कार्डसाठी अर्ज करा, तरच अंतिम परिक्षेत बसू दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, शहरात आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना आधार अपडेट करताना त्रास होत आहे. यासाठी कॉलेजमध्ये काही दिवसांचा आधार कार्ड कॅम्प किंवा आधार सेंटर द्यायला हवे.

- आसावरी कुलकर्णी, विद्यार्थिनी

लिंकिंगची मुदत वाढवा

आधारकार्ड काढण्यासाठी जाणाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची सक्ती सरकारकडून केली जात आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. असे असताना अनेक लोकांना अद्याप आधारकार्ड मिळालेलीच नाहीत. त्यामुळे ते ३१ जुलैपर्यंत लिंकींग कसे करू शकतील? ही मुदत वाढवायला हवी. अनेकांचे आधारकार्ड आहेत. परंतु, त्याचे फिंगर प्र‌िंट्स मॅच होत नाहीत. अशा नागरिकांनी काय करायला हवे, याचे अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे लोक अधिकच अस्वस्थ होतात.

ज्ञानेश्वर काळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुड्ड्या हत्याप्रकरणी दोघे अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळ्यातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या हत्ये प्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरातून भीमा देवरे आणि योगेश जगताप या दोन जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबआय) पथकाने बुधवारी अटक केली आहे.

गुड्ड्याचा गेल्या मंगळवारी (दि. १८) जुना आग्रा रोडवरील चहाच्या दुकानासमोर बंदुकीच्या गोळ्या घालून आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपींपैकी विक्की गोयर याला मोबाइल आणि पैसे पुरविल्याप्रकरणी फागणे (त‌ा. धुळे) गावातून भूषण ठाकरे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेतील फरार आरोपींच्याबाबत या तिघांकडून महत्त्वपूर्ण माहिती पोलीसांच्या हाती येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, गुड्ड्यावर प्र‍त्यक्ष खुनी हल्ला करणारे ११ मुख्य संशयित आरोपी अजुनही पेालिसांच्या हाती लागलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांना घरबसल्या ‘आधार’

$
0
0

नवजात बालकांनाही हॉस्प‌िटलमध्येच मिळणार आधार

नाशिक : ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांची आधारकार्ड काढण्याकरिता फरफट होऊ नये, यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरिटी ऑफ इंडियाने (युआयएडी) आश्वासक पावले उचलली आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी पोहोचून तर नवजात अर्भकांची हॉस्प‌िटल्समध्येच आधार नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या असून, लवकरच कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आधारकार्डसाठी हेलपाटे मारणारे ज्येष्ठ नागरिक तसेच चिमुकल्यांच्या पालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड काढणे सक्तीचे केले आहे. आधारकार्ड हाच भारतीय असल्याचा सर्वात मोठा आणि सबळ पुरावा ठरणार आहे. म्हणूनच ते प्राधान्याने काढून घ्यावे, असे आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार केले जाते आहे. परंतु, यंत्रणेतील दोष आणि सर्व्हर डाऊनसारख्या तांत्रिक अडचणींमुळे आधारकार्ड मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वारंवार हेलपाटे मारूनही आधारकार्ड मिळत नाही. या एकेका समस्येचा समाचार घेण्याचे काम युआयडीकडून सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना सहजतेने आधारकार्ड मिळावे यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

हॉस्प‌िटल्स, अंगणवाड्यांत होणार आधारनोंदणी

सरकारी हॉस्प‌िटलमध्ये जन्मणाऱ्या बालकांचीही तेथेच आधार नोंदणी करवून घेण्यात येणार आहे. त्यासाठी हॉस्प‌िटल्सला टॅब पुरविण्यात येणार आहेत. या बालकांचे फिंगर प्र‌िंट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आईचा आणि बाळाचा एकत्रित फोटो आणि आईच्या नावाने हे आधारकार्ड बनविले जाईल. बाळ पाच वर्षांचे झाले की हे आधारकार्ड अपडेट करता येईल. त्यावेळी त्याचे नाव तसेच फिंगर प्र‌िंट्स त्यावर घेणे शक्य होईल. अंगणवाडी सेविकांनाही टॅब दिले जाणार असून, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांची आधार नोंदणी त्याद्वारे होऊ शकणार आहे.

अशी मिळणार सेवा

युआयडीच्या वेबसाईटवर आधारकार्डसाठी ऑनलाइन रिक्वेस्ट टाकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सेवा दिली जाणार आहे. युआयडीला रिक्वेस्ट प्राप्त होताच संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या निवासाचा पत्ता व संपर्क क्रमांकासारखे तपशील जवळच्या आधार केंद्रातील यंत्रणेला मेलद्वारे प्राप्त होतील. संबंधित केंद्रातील व्यक्ती ज्येष्ठ नागरिकाच्या घरी पोहोचून त्याची आधार नोंदणी करतील. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला सर्व्ह‌िस चार्ज अर्थात येण्या-जाण्याचे प्रवासभाडे त्याला द्यावे लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच याबाबत बैठक झाली. त्यामध्ये पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images