Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोणी कार्यालय देतं का कार्यालय…

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपने अधिकाधिक सत्तापदे निर्माण करण्याचा सपाटा लावल्याने पालिका प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. तिजोरीत खडखडाट असतांना पालिकेत सत्ताधारी भाजपने शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांची स्थापना केली. या समित्यांवर सभापती व उपसभापतींचीही वर्णी लागली असली तरी, त्यांना अद्यापही कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे नवनियुक्तांना अक्षरशः कोणी कार्यालय देतं का कार्यालय, असं म्हणण्याची वेळी आली आहे.

महापालिकेत सत्तारोहण झाल्यापासून भाजपने निवडून आलेल्या नगरसेवकांचे विविध पदांवर पुर्नवसन सुरू केले आहे. पालिकेत सहा प्रभाग समित्या असतानाच, नव्याने तीन समित्यांची निर्मिती केली आहे. २४ जुलै रोजी या समित्यांसाठी सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. समित्यांवर वर्णी लागून चार दिवस उलटले तरी या सभापती व उपसभापतींना अद्यापही कार्यालय व प्रवासासाठी वाहनही उपलब्ध झालेले नाही. कार्यालयासांठी जागेचा शोध सुरू असून वाहनांची खरेदी ही जीएसटीत अडकली आहे. पालिकेत जागाच मिळत नसल्याने कार्यालयांची शोधाशोध महिनाभरापासून सुरू आहे. या सभापतींना कर्मचारीही उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. परंतु अगोदरच पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे या समित्यांचा खर्चच पालिकेसाठी डोईजड ठरला आहे. इतके प्रश्न असूनही सत्ताधाऱ्यांना समित्यांची घाई का केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरा मजल्यावरच सगळ्याची नजर

या तीन समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या कार्यालयांसाठी गेल्या महिनाभरापासून शोध सुरू आहे. पालिकेतील दुसऱ्या मजल्यावर सत्तेचे सर्व केंद्रे आहेत. त्यामुळे सुरूवातीला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा विस्तार कमी करून या समित्यांना जागा देण्याचा प्रस्ताव आला. त्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर मोर्चा सेनेच्या कार्यालयांकडे गेला. परंतु इथेही विरोध झाल्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर गंडातर टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु येथूनही नकारघंटा मिळाल्यानंतर आता प्रशासनच पेचात पडले आहे. तर दुसरीकडे या समित्यांच्या सभापतींनी दुसऱ्या मजल्यावरच केबीन मिळावे यासाठी अट्टाहास धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत रस्त्यातच वृक्षारोपण

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

वाडीवऱ्हे ते मुरंबी व मोडाळे, आहुर्ली, शेवंगेडांग हा रस्ता अवघ्या चार महिन्यात उखडला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे न बुजवता निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठ‌ीशी घालत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा मुंबई-नाशिक महामार्ग बंद करण्यात येईल, असा इशारा परिसरातील दहा रे बारा गावातील सरपंच, उपसरपंच सदस्यांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांनी दिला आहे. दरम्यान, या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी करीत खातळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यात वृक्षारोपण करण्यात आले.

इगतपुरी तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सततच्या अतिवृष्टीने रस्ते उखडले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असतांना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्य देखील दाखविले जात नाही. पर्यायाने आधीच त्रस्त असलेली जनता मेटाकुटीला आली आहे. सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा मुंबई नाशिक महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाडीवऱ्हे, मुरंबी, सांजेगाव, मोडाळे, कुशेगाव, शिरसाठे, नांदडगाव, आहुर्ली, शेवंगेडांग, धारगाव, नागोसली आदी भागातील कामगारांना औधोगिक क्षेत्रात रोजगारासाठी अपरात्री कामावरून या रस्त्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या रस्त्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी केशव येलमामे, अशोक शिंदे, दत्तू कातोरे, दत्तू हाडके, सरपंच संजय मते, समाधान सहाणे, कैलास राऊत, कैलास मते, योगेश गायकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभावरुन रंगला नगरसेवकांमध्ये श्रेयवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग १२ मधील तिडके कॉलनीतील साडेपाच कोटीच्या जलकुंभाच्या मंजुरीवरून स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे आणि काँग्रेस नगरसेवक समीर कांबळे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कांबळे यांनी आपल्या प्रयत्नाने जलकुंभ मंजूर केल्याचा दावा केला असला तरी, संबंधित जलकुंभा गेल्या पंचवर्षिकमध्ये मंजूर झाला आहे. त्यासाठी आता स्थायीने निधी मंजूर केल्याचा दावा शिवाजी गांगुर्डे यांनी केला आहे. जलकुंभाचे काम हे सार्वजनिक असून, या कामाचे श्रेय कुणी एका नगरसेवकांने घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तिडके कॉलनीत २० लाख लीटर क्षमतेचा नवीन जलकुंभ मंजूर करण्यात आला आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये पश्चिम प्रभागाचे सभापती असताना गांगुर्डे यांनी या जलकुंभासाठी प्रयत्न केले होते. आता स्थायी समिती सभापती होताच त्यासाठी निधीही मंजूर केला. परंतु समीर कांबळे यांनी आपल्या प्रयत्नातून हा जलकुंभ मंजूर केल्याचे छायाचित्र सोशल मीड‌यिावर प्रसिद्ध केले. त्यावर गांगुर्डे यांनी आक्षेप घेतला आहे. हे काम सार्वजनिक आहे. कुणा एकाचे श्रेय नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. कांबळे आता निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी काम कसे मंजूर केले, हा प्रश्नच आहे, असा युक्तीवाद गांगुर्डे यांनी केला आहे.


मोटकरींचाही दावा

याच जलकुंभासाठी आपणही प्रयत्न केले होते, असा दावा मनसेच्या माजी नगरसेविका सुनिता मोटकरी यांनी केला आहे. माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोटकरींसह गांगुर्डे यांनी डॉ. गेडाम यांना पत्र दिल्यानंतर हे काम पुढे सरकले, असा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला बस स्थानकात सापडेना वाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेली अनेक वर्षे अनेक समस्यांसह अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेले येवला बस स्थानक यंदाच्या पावसाळ्यातही त्याच समस्यांनी घेरले गेले आहे. भव्य आवार लाभलेल्या या बस स्थानकात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे डबके साचले आहेत.

येवला बस स्थानकात जागोजागी मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. बस जेव्हा स्थानकात प्रवेश करते तेव्हा प्रवाशांना खूप मोठ्या धक्यांचा सामना करावा लागतो. उतरण्याच्या तयारीत असलेले प्रवाशी या अनपेक्षीत धक्क्यांमुळे एकमेकांच्या अंगावरही जावून पडतात. चालकांना देखील या स्थानकातून बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जो काही पाऊस झाला आहे तो अगदी असमाधानकारक. अशातही येवला बस स्थानकात झालेल्या पावसाच्या पाण्यात डबके साचले आहे. येत्या काळात अधिक पाऊस झाला तर बसस्थानकात बसची चाके खड्ड्यांतच रुतून बसतील, इतकी वाईट अवस्था सध्या आहे. परिवहन महामंडळ याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल प्रवाशी उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या डिक्कीतून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एटीएममधून पैसे काढून मेडिकल स्टोअर्सवर औषधे घेण्यासाठी थांबलेल्या ग्राहकाच्या दुचाकीतील डिक्कीतून ६० हजार रुपयांची रोकड काढून, चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना पेठ फाटा परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, ही घटना मेडिकल स्टोअर्स बाहेर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अमोल शिवलाल घोडे (रा. मनोली-दरी ता. जि. नाशिक) या युवकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मंगळवारी शेती कामासाठी पैसे काढण्यासाठी अमोल पेठ फाटा परिसरात आला होता. एसबीआय एटीएममधून ६० हजाराची रोकड काढून तो समोरील आराधना मेडिकल स्टोअर्समध्ये गेला. मेडिकलसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तिघा तरुणांपैकी एकाने रोकड लांबविली. अन्य दोघांनी मेडिकलमध्ये अमोलला बोलण्यात गुंतवून ठेवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या विनयभंगप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ओळखीच्या माध्यमातून महिलेस बोलावून घेत सिडकोतील तरुणाने विनयभंग केल्याची घटना पिनॅकल मॉल भागात घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर तरूणास असून तरूणास अटक करण्यात आली आहे.
सुनील मधूकर शेळके (२५, रा. सुभाषचंद गार्डन, सावतानगर, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. महिला व तरुण एकमेकांचे ओळखीचे आहेत. याचाच फायदा घेत तरुणाने महिलेस मंगळवारी सकाळी त्र्यंबक रोडवरील पिनॅकल मॉल परिसरात बोलावले होते. संशयिताने तिथे तिचा विनयभंग केला. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितास अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दिघे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल कामगाराची हॉटेलमधून मुक्तता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चाइल्ड लाइन सदस्यांच्या जागरुकतेने नाशिकरोड पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमधून पश्चिम बंगालमधील १३ वर्षीय बालकामगाराची नुकतीच सुटका केली.

‘मुस्कान’ अभियानांतर्गत झालेल्या कारवाईत नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल रामकृष्णामध्ये तपासणी केली असता बालकामगार आढळून आला. या प्रकरणी संबधित हॉटेलचालकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात चाइल्ड लाइनचे सदस्य निखिल काकुळते यांनी सहबालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७९ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे. संबंधित १३ वर्षीय मुलगा मूळचा लागराडांगा, (जि. बिरभूमी, पश्चिम बंगाल) येथील आहे. अडीचशे रुपये प्रतिदिन मजुरीवर त्याला हॉटेलमध्ये कामास ठेवण्यात आले होते.

हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुस्कान मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत चाइल्ड लाइनचे सदस्य निखील काकुळते, भूषण राजभोज यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक एस. हांडोरे यांच्या पथकाने नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मुलांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील बालकामगारांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरारी पथकाद्वारे रुग्णसेवा

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com
नाशिक : आदिवासी व दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (झेडपी) आरोग्य विभागाने भरारी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच जिल्ह्यात ५३ चारचाकी गाड्या भाड्याने घेण्यात येणार आहेत. या भागात सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेने मानवसेवी वैद्यकीय अधिकारी नेमले असले तरी त्यांना थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात जाता यावे, यासाठी या गाड्या त्यांना देण्यात येणार आहेत.
‘झेडपी’च्या वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा दिली जाते. नाशिक जिल्ह्यात आठ तालुके हे आदिवासी भागात मोडतात. या भागातील वैद्यकीय सेवेबाबत आदिवासी बांधवांमध्ये फारसे समाधान नाही. त्यामुळे त्यांना थेट सेवा मिळावी, यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी बऱ्याच डॉक्टरांकडे वाहन नसल्यामुळे अनेक तक्रारी आहेत. डॉक्टरांना वाहन उपलब्ध करून सेवा दिली जाणार आहे.
मानवसेवी वैद्यकीय अधिकारी यांची मानधनावर नेमणूक होते. त्यामुळे त्यांना वाहन घेऊन जाणे कामावर शक्य नसते, यासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने वाहन उपलब्ध करून दिल्यानंतर या सेवेत सुधारणा होणार आहे. आदिवासी व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पोहचावी, यासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहे. पण त्यासाठी असणारी यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने थेट वाहन देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सात तालुक्यात भाडेतत्वावर घेतलेली ही वाहने दिली जाणार आहे. वैद्यकीय सेवा देणारे हे भरारी पथक असून त्यांना वाहन उपलब्ध करून दिल्यानंतर दुर्गम भागात ते सहज पोहचू शकणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो, स्कॉर्पियो, एन्ट्रिगा, तवेरा या गाड्यांसाठी निविदा काढली आहे.

अशी उपलब्ध असणार वाहने
तालुका...........वाहने
सुरगाणा- १४
पेठ - ११
त्र्यंबकेश्वर - १०
बागलाण - ५
दिंडोरी - ५
इगतपुरी - ४
कळवण - ४

आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा सर्वांना मिळाव्या यासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यात ५३ वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉक्टारंना रुग्णांना सेवा देण्यास ही वाहने उपयोगी पडणार आहे.
- डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२३ पदांसाठी ४५९ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मविप्र’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल गुरूवारी खऱ्या अर्थाने वाजला. सुमारे ११ हजार सभासदांच्या या शैक्षणिक संस्थेतील मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज आता भरले. २३ पदांसाठी एकूण ४५९ अर्ज दाखल झाले आहेत. लगेचच अर्जांची छाननी सुरू झाली आहे.

‘मविप्र’ची निवडणूक आता मुख्य वळणावर येऊन ठेपल्याने शैक्षणिक वर्तुळासह जिल्हाभराचे लक्ष या निवडणुकीने वेधले आहे. गुरुवारी सकाळपासूनच संभाव्य दोन्हीही प्रतिस्पर्धी पॅनलमधील इच्छुक व त्यांच्या समर्थकांची वर्दळ दिसून आली. दुपारपर्यंत अर्ज भरण्याच्या या अखेरच्या दिवशी सरचिटणीस, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती या महत्त्वाच्या पदांसाठी संभाव्य मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अखेरच्या काही तासांमध्ये अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केल्याने मविप्रच्या मध्यवर्ती कॅम्पसला यात्रेचे स्वरूप आले होते. इच्छुक उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत शुल्क म्हणून जमा करण्यात आले. सरचिटणीसपदासाठी समर्थकांसह उपस्थित राहत अॅड. नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनवणे, नीलिमा पवार, रवींद्र निरगुडे, सुरेश दाते यांनी अर्ज सादर केले.

प्रमुख पाच पदांसाठी १५८ अर्ज
मविप्रच्या अध्यक्ष, सभापती, उपसभापती, सरचिटणीस आणि चिटणीस या प्रमुख पाच पदांसाठी एकूण १५८ अर्ज दाखल झाले. अध्यक्षपदासाठी २५ अर्ज, सभापतीपदासाठी २६ अर्ज, उपसभापतीसाठी एकूण ४४ अर्ज, सरचिटणीसपदासाठी एकूण २३ अर्ज तर चिटणीसपदासाठी एकूण ३६ अर्ज दाखल झाले.

कसमादे अन् निफाडचा जोर
आतापर्यंत या निवडणुकीसाठी एकूण ४५९ अर्ज दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे निफाड खालोखाल कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा (कसमादे) या पट्ट्यामधून असल्याने या तालुक्यांवर संभाव्य दोन्हीही पॅनल्सचे विशेष लक्ष आहे. या पट्ट्यामधून इच्छुकांची मने न दुखावता संभाव्य पॅनलवर त्यांना स्थान देण्याचा अन् संधी न मिळणाऱ्यांना आश्वस्त करण्याचा मार्ग दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी अवलंबिला आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यातून एकूण ५४ अर्ज दाखल झाले आहेत. गुरूवारी यात २३ अर्जांची भर पडली होती. तर सटाण्यामधून दाखल अर्जांची संख्या ३६ होती.

तालुका सदस्यपदासाठी दाखल अर्ज

निफाड : ५४
सटाणा : ३६
सिन्नर : २८
येवला : २६
नाशिक ग्रामीण : २४
कळवण / सुरगाणा : २१
सेवक प्राथमिक व माध्यमिक : १९
नांदगाव : १८
देवळा : १६
इगतपुरी : १५
चांदवड : ११
महाविद्यालयीन सेवक पदा : ११
दिंडोरी व पेठ : १०
नाशिक शहर : ९
मालेगाव : ७
एकूण : ४५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपिलासाठी लवादाकडे उद्यापर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मविप्र’ निवडणुकीसाठी अर्ज माघारीपर्यंत शह-काटशहाचा खेळ रंगणार आहे. शुक्रवार (दि. २८) दिवसभर अर्ज छाननी सुरू राहणार आहे. दरम्यान शुक्रवार आणि शनिवार (दि. २९) लवादाकडे अपिल करण्याची मुदत आहे.

या दाखल होणाऱ्या अपिलांवर ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत लवाद निर्णय देणार आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली असून, १३ ऑगस्ट रोजी मतदान आणि १४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचार प्रणालीद्वारे व्यूहरचनेस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या रचनेत निवडणूक मंडळाच्या अध्यक्षस्थानी अॅड. भास्करराव चौरे, सचिवपदी डॉ. डी. डी. काजळे, सदस्य अॅड. बाकेराव बस्ते आणि सदस्य अॅड. रामदास खांदवे यांचा समावेश आहे. संस्थेचे १० हजार १७६ सभासद आहेत. निवडणूक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मतदार याद्या अंतिम करण्यासंदर्भात चर्चा झाली. तर ३ ऑगस्ट रोजी अर्ज माघारी होऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान १३ ऑगस्ट रोजी होऊन १४ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे.

यांनी केले अर्ज दाखल
सरचिटणीसपद : नीलिमा पवार, प्रतापदादा सोनवणे, नितीन ठाकरे, सुरेश दाते, रवींद्र निरगुडे.
अध्यक्षपद : माणिकराव बोरस्ते, प्रल्हाद सोनवणे, भास्करराव पवार, डॉ. सुनील ढिकले, राघो आहिरे, तुषार शेवाळे, प्रशांत देवरे, जयवंत पाटील, रवींद्र पगार, प्रतापदादा सोनवणे.
सभापतीपद : माणिकराव बोरस्ते, बाळासाहेब जाधव, डॉ. सुनील ढिकले, राघो अहिरे, सुरेश दाते, प्रल्हाद सोनवणे, तुषार शेवाळे, प्रतापदादा सोनवणे, रवींद्र पगार
चिटणीसपद : नारायण पवार, डॉ. सुनील ढिकले, राघो अहिरे, संजय मोरे, पांडूरंग सोनवणे, भास्कर भामरे, प्रशांत देवरे, गजेंद्र चव्हाण, संपतराव गावले, तुषार शेवाळे, डॉ. विश्राम निकम, दिलीप दळवी, नारायण कोर, रवींद्र पगार, नामदेव महाले, बाळासाहेब कोल्हे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरीची वाट दोन वर्षांत खिळखिळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाणाऱ्या पायऱ्यांचा अवघ्या दोन वर्षांत नादुरुस्त झाला आहे. सिंहस्थ नियोजनात केलेले कोट्यवधींचे ‘दर्जेदार’ काम पावसाने धुऊन टाकले आहे. वनखात्याने दुर्लक्ष केल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप या परिसरातील पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

बारा वर्षांनी आलेली विकासाची ‘पर्वणी’ साधण्यासाठी वनखात्याने पायऱ्याची दुरुस्ती करून दीड कि.मी. पायऱ्यांचा रस्ता बांधला. याकरिता वनविभागाने ४ कोटी २१ लाख रुपयांची कामे पहिल्या टप्प्यांत आणि एक कोटी १० लाख रुपयांची कामे दुसऱ्या टप्प्यात केली. मात्र अवघ्या २४ माहिन्यांत या कामांची पोलखोल झाली आहे. प्रकाशासाठी बसविलेल्या सोलर दिव्यांची बॅटरी चोरीस गेल्यानेसोलर लॅम्प केवळ शोभेचे ठेरताहेत. या पायऱ्यांवरील कठडे निखळण्यास सुरवात झाली तेव्हा जागरूक नागरिकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले होते. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाविक, पर्यटकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या कामांची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून कामांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची विक्रमी झेप

$
0
0

टीम मटा

उन्हाळी कांद्याच्या भावाने यंदा विक्रमी झेप घेतली असून, कनाशी उपबाजार समितीत गुरुवारी कांद्याला क्विंटलमागे १६५१ रुपयांचा भाव मिळाला. त्याखालोखाल अभोणा उपबाजार समितीत १६०० रुपये, तर लासलगाव बाजार समितीत १४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याला यंदाच्या हंगामात मिळालेला हा उच्चांकी भाव आहे.

लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी १२५० रुपये, तर किमान ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. पावसामुळे कांदा लागवडीवर झालेल्या परिणामासह अन्य कारणे भाववाढीमागे आहेत. मध्य प्रदेशातील सरकारने ८० लाख क्विंटल कांदा आठ रुपये हमी भावाने खरेदी करून सव्वा महिन्यात निकास केल्याने अन्य राज्यांतील मागणीत वाढ झाली. ही भाववाढ मंगळवारच्या तुलनेने साडेतीनशेपेक्षा अधिक आहे. कळवण येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची गुरुवारी सुमारे १४ हजार क्विंटल आवक झाली. येथेही कांद्याला या हंगामातील सर्वोच्च १४२० रुपयांचा भाव मिळाला. सरासरी भाव १३५० रुपयांच्या आसपास राहिला. मात्र, उपबाजार समित्यांमध्ये सर्वाधिक भावाची नोंद झाली. अभोणा उपबाजार समितीत १६०० रुपये, तर कनाशी उपबाजार समितीमध्ये १६५१ रुपये विक्रमी भावाची नोंद झाली आहे. सटाणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १४२४ रुपये भावाची नोंद झाली. बाजार समितीत सरासरी क्विंटलमागे ११०० रुपये, तर कमीत कमी ७०० रुपये भाव होता.

मालेगाव तालुक्यातील मुंगसे उपबाजार समितीत कांद्याला ८१०० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल जास्तीत जास्त १४७५ रुपये भाव होता. कमीत कमी ४०० रुपये, तर सरासरी १२७५ रुपये भावाची नोंदी झाली.


भाववाढीस कारण की...

- दक्षिणेकडील राज्यात साधारण ऑगस्टमध्ये कांदा येतो. यंदा तेथे कांद्याची लागवड कमी झाली. त्यामुळे या राज्यांची मागणी वाढली.

- मध्य प्रदेश सरकारने तेथील ८० लाख क्विंटल कांदा लगेच विक्री करून टाकला, जो कांदा यापूर्वी चार महिने टिकत असतो. त्यामुळे कांद्याचा सव्वा महिन्यात निकास झाला.

- पावसामुळे गुजरातसह इतर राज्यांत कांदा लागवडीवर परिणाम. पूर परिस्थितीमुळे कांदा लागवड क्षेत्राचे नुकसान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना पालिकेचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने गाळेधारकांकडून नव्या दराप्रमाणे भाडेवाढ वसुली सुरू केली आहे. भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांकडून वसुलीसाठी गाळे जप्तीची कारवाई केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मोहिमेत चार विभागात ८१ गाळे जप्त कारण्यात आले आहेत. तर २५८ गाळेधारकांकडून एक कोटी ७१ लाख ११ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५० हजारांपेक्षा थकबाकी असलेल्या गाळेधारकांकडून वसुलीची कारवाई केली जात आहे.

महापालिकेने गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार भाडेवाढ केली आहे. मात्र वसुलीच्या कारवाईला गाळेधारकांचा तीव्र विरोध होत आहे. तरीही पालिकेने वसुली मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गाळेधारक हवालदिल झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे या गाळ्यांच्या दराबाबत फेरविचार करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. परंतु महापालिकेने गाळेधारकांवरील कारवाई न थांबवता वसुली

सुरू केली आहे. २१ तारखेपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत चार विभागात ८१ गाळे थकबाकीपोटी जप्त करण्यात आले. तर २५८ गाळेधारकांकडून एक कोटी ७१ लाख ११ हजारांची वसुली करण्यात आली आहे.


अशी केली वसुली

पश्चिम विभाग - एक कोटी ३४ लाख वसूल, ७ गाळे जप्त
सातपूर विभाग- १२ लाख १८ हजार वसूल, १६ गाळे जप्त
नाशिकरोड विभाग- १२ लाख वसूल, ३७ गाळे जप्त
पंचवटी विभाग - १२ लाख २६ हजार वसूल, ३१ गाळे जप्त


पश्चिम विभागात अजूनही कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या गाळेधारकांकडून वसुली केली जात असून, दुसऱ्या टप्प्यात ५० हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्यांकडून वसुली केली जाणार.

- रोहिदास बहिरम, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदान बनले ट्रक टर्मिनस

$
0
0

चेहेडी पंपिंग स्टेशनजवळील क्रीडांगणावर अवजड वाहनांची पार्किंग

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चेहेडी पंपिंग स्टेशन येथे नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या पालिकेच्या मैदानाचा वापर अवजड वाहने पार्क करण्यासाठी केला जात असल्याने पालिकेचे क्रीडांगण चक्क ट्रक टर्मिनस बनले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात असलेल्या या मैदानाचा वापर खेळांव्यतिरिक्त बेकायदेशीरपणे अवजड वाहने पार्क करण्यासाठी होऊ लागल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खेळासाठी मैदानच उरलेले नसून त्याठिकाणी अवजड वाहने सर्रास उभे करण्यात येत आहेत.

नाशिक महापालिकेचे चेहेडी पंपिंग स्टेशन येथे क्रीडांगण आहे. माजी नगरसेविका शोभा आवारे यांच्या प्रयत्नांतून या क्रीडांगणाला संरक्षक भिंत उभारण्यात आली. या क्रीडांगणाला दोन प्रवेशद्वारही आहेत. मात्र या दोन्हीही प्रवेशद्वारांचे लोखंडी गेट गायब झाल्याने या क्रीडांगणाचा वापर महामार्गावरील अवजड वाहनांना पार्किंगसाठी वाहनचालक करताना दिसत आहेत. त्यामुळे येथील पालिकेचे क्रीडांगण जणू काही ट्रक टर्मिनस झाले आहे.

नगरसेवकांचे दुर्लक्ष

महापालिकेच्या या मैदानाचा वापर महामार्गावरील अवजड वाहने पार्क करण्यासाठी होऊ लागल्याने पालिका प्रशासनाच्या परवानगीशिवाय होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराकडे स्थानिक नगरसेवकांचेही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही सर्रास दादागिरी थांबवावी, तसेच क्रीडा प्रेमींना मैदान खेळासाठी उपलब्ध करून द्यावे.

या मैदानावर अवजड वाहने पार्क करण्यास परवानगी नसतानाही अवजड वाहने पार्क केली जातात. याची माहिती अधिकाऱ्यांना देत त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. येथे मोठे प्रवेशद्वार बसविण्याची मागणी केली आहे.

-पंडित आवारे,

नगरसेवक, प्रभाग क्र. १९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणबारी ओव्हर फ्लो

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी असले तरी तालुक्यतील हरणबारी धरण ओव्हर फ्लो झाल्याने मोसम परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जुलैच्या पहिल्या पावसानंतर दडी मारून बसलेला पाऊस थेट गत आठवड्यातच परतला. यामुळे दुबारचे संकट टळले असले, तरी अजूनही तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून रिपरिप सुरू आहे. हरणबारी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण भरले आहे.

कोनांबे भरले काठोकाठ

सिन्नर ः तालुक्यातील कोनांबे, उंबरदरी, बोरखिंड, सरदवाडीसह भोजापूर धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. या पावसामुळे सिन्नरचा कोकण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव परिसरातील धबधबा ओसंडून वाहत आहे.

ठाणगाव येथील उंबरदरी धरण ओव्हर फ्लो झाल्याने म्हाळुंगी नदीच्या प्रवाहात भर पडली आहे. त्यामुळे भोजापूर धरण ओसंडून वाहत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने दुष्काळाच्या संकटांना सामोरे जाणाऱ्या तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील मुख्य पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि सिंचनाखालील क्षेत्रास थेट लाभ होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. कोनांबे, सरदवाडी धरण ओव्हर फ्लो झाल्याने शिवनदीचे पाणी देवनदीमध्ये येवून ही नदी अधिक प्रवाही झाली आहे.

तळवाडे तलाव ओसंडला

मालेगाव ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ४० टक्के तर तळवाडे साठवण तलाव शंभर टक्के भरल्याने शहराचा पाणीप्रश्न सुटला आहे.
मालेगाव शहर व तालुक्यात पावसाची दमदार हजेरी लागलेली नसली, तरी गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. चणकापूर धरणात ६३ टक्के पाणीसाठा असून, नदीक्षेत्रात झालेल्या पावसाने गिरणानदीला पूर आला आहे. त्यामुळे गिरणा धरणक्षेत्रात ७ हजार ४०८ दलघफू इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जुलैअखेरच्या तुलनेत तब्बल ३४ टक्के पाणीसाठा अधिक झाला आहे. मागीलवर्षी याच कालावधीत गिरणा धरण क्षेत्रात केवळ ६ टक्के इतका पाणीसाठा होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावही ओव्हर फ्लो झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ चारचाकींची तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील औद्योगिक परिसराला लागून असलेल्या कामगारनगर भागात बुधवारी मध्यरात्री टवाळखोरांना आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. यासंदर्भातील तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी येथे गुरुवारी दिवसभर ठाण मांडून अनेक संशयितांची चौकशी केल्यानंतर रात्री तीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची परिसरातून धिंडदेखील काढली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

या घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश सोनावणे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी स्थानिक महिलांनी टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी केल्यावर अधिकाऱ्यांनी येथे ठाण मांडून धडक कारवाई केली.

--

वर्गणीवरून तोडफोडीचा संशय

कामगारनगरला लागून असलेल्या एमआयडीसीच्या रस्त्यावर भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. परंतु, स्थानिक रहिवाशांनी त्यासाठी वर्गणी नाकारल्यानेच वाहनांची तोडफोड केली असल्याचा संशय परिसरातून व्यक्त केला जात आहे. पोलिसदेखील भंडारा भरणारे नक्की कोण व कुठले आहेत, याच्या तपासाला लागले आहेत. रहिवाशांनीदेखील टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याची गरज असल्याचे उपायुक्त कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

--

‘ते’ संशयित मोकाटच

सातपूर कॉलनीच्या कामगार वस्तीत दोन वर्षांपूर्वी बाराहून अधिक चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळाले होते. परंतु, त्यात टवाळखोरांचा चेहेराच न दिसल्याने संशयित मोकाटच राहिले. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पुन्हा कामगारनगर भागात आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

--

महिला कामगारांची छेडछाड

कामगारनगर भागात काही महिन्यांपासून काही स्थानिक व स्लम भागातील टवाळखोर एमआयडीसीला लागून असलेल्या भिंतीलगत मद्य प्राशन करून कारखान्यांतून घरी जाणाऱ्या महिलांची छेड काढीत असल्याचे पोलिस उपायुक्त कोकाटे यांना महिलांनी यावेळी सांगितले. परप्रांतीय कामगारांना टवाळखोर भरदिवसा लुटत असल्याच्या तक्रारींनंतर पोलिस उपायुक्त कोकाटे यांनी टवाळखोरांची माहिती नाव न सांगता पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले.

--

माहिती देणाऱ्यांना मारहाण

कामगारनगर भागात पोलिसांनी रहिवाशांकडून टवाळखोरांची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, टवाळखोरांची माहिती देणाऱ्यांनाच मारहाण होत असल्याचे अनेकांनी सांगितले. पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन, तुमच्या नातेवाइकाचा अपघात झाला आहे, असे सांगून बाहेर बोलावले जाते. त्यानंतर टवाळखोर संबंधितांना मारहाण करीत मोबाइल व खिशातील वस्तू घेऊन पोबारा करीत असल्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी महिलांनी पोलिसांकडे केल्या.

--

दहा दिवसांपूर्वीच जुनी मारुती व्हॅन घेतली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास टवाळखोरांकडून गाडीच्या काच फोडण्यात आल्याने नुकसान झाले. येथे नेहमीच टवाळखोरांकडून त्रास होत असून, पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

-विठ्ठल चव्हाण, स्थानिक रहिवासी

००

सर्व्हिस स्टेशनची आनंदनगरला नासधूस

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील मुक्तिधाममागील आनंदनगर परिसरात समाजकंटकांनी सर्व्हिस स्टेशनची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, समाजकंटकांचा जाच संपविण्याची मागणी परिसरातून होते आहे.

या प्रकरणी उपनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आनंदनगर परिसरात आतिक इस्लाम शेख यांचे तरणतलाव रोडवरील कदम लॉन्सच्या बाजूला कृष्णा आनंद सोसायटीसमोर सर्व्हिस स्टेशन आहे. बुधवारी (दि. २६) सायंकाळी शेख सर्व्हिस स्टेशन बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री समाजकंटकांनी सर्व्हिस स्टेशनची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्या ठिकाणी असलेला पाण्याचा ड्रम रस्त्यावर फेकून दिला. गुरुवारी सकाळी ही घटना नागरिक व शेख यांना समजली. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार करून या समाजकंटकांवर कारवाईची मागणी केली.


विद्यार्थिनींची छेडछाड

या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुंड व टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, टवाळखोर शाळा व कॉलेजमधील विद्यार्थिनींची छेडछाड करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी मिळाले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी बंधारे भरून दयावेत या मागणीसाठी उपोषणे, रास्ता रोको, जेलभरो आंदोलन अशा अनेक मार्गांचा अवलंब करूनही हाती काहीच न पडलेल्या येवला तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील अंदरसूल गावांसह परिसरातील अनेक गावांना आता पालखेडचे पाणी मिळाले आहे. पालखेड धरण क्षेत्रात होत असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे हे पाणी मिळाले आहे. विसर्गातून अंदरसूलसह परिसरातील असंख्य बंधारे भरून मिळत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अंदरसूल गावाला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा ‘आधार’ असल्याने या गावात नळाद्वारे पाणी मिळत असले तरी नजीकच्या वाडया अन् वस्त्यावर पाण्याची मोठी वानवाच. याच पूर्व पट्ट्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव या गावांची तर सलग चार महिन्यांपासून शासकीय टँकरद्वारे तहान भागविण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच या पूर्व पट्ट्यातील पालखेड डाव्या कालव्यावरील अनेक ठिकाणचे बंधारे पालखेडच्या पाण्याने भरून देण्याची मागणी होती. पालखेड डाव्या कालव्यामार्फत अंदरसूलसह परिसरातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी अंदरसूलच्या सरपंच विनिता अमोल सोनवणे यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठड्याविना पूल धोकादायक

$
0
0

कपिला संगमावरील पूलाला कचरा अडकला

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील कपिला संगमावर असलेल्या लोखंडी पुलाला पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा अडकला आहे. या पूलाला बसविण्यात आलेल्या बल्ल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पुलाच्या दक्षिण बाजूला बल्ल्याच राहिल्या नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अशा धोकादायक पुलावरून भाविक आणि पर्यटक जात असल्याने ते पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कपिला-गोदावरी संगमावर खडकाळ असलेल्या भागात गोदावरीच्या पात्रात मोठी खळगी आहे. त्यातून पाणी प्रचंड वेगाने वाहते. या संगमाच्या पलिकडे पात्र ओलांडून जाणे शक्य नसल्यामुळे या जागेवर अर्धचंद्राकृतीच्या आकाराचा लोखंडी पूल बसविण्यात आला आहे. हा पूल दरवर्षी पुराच्या पाण्याचा शिकार होत असतो. या पुलाची रचना पुराच्या पाण्याचा विचार करून करण्यात आलेली नसल्यामुळे या पुलावरील लोखंडी पाइप, लाकडी बल्ल्या, पत्रे हे दरवर्षी वाहून जातात. पुन्हा ते बसविण्याची तसदी महापालिका घेत नाही. त्यामुळे हा पूल धोकादायक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संख्याबळानुसारच जागा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने स्थापन झालेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांच्या कार्यालयांचा वनवास संपण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी या तीन समित्यांना दुसऱ्या मजल्यावरच कार्यालये देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांच्या कार्यालयांचा आकार ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या समित्यांसाठी आता रिपाईं, मनसे, राष्ट्रवादींच्या कार्यालयांचा आकार कमी केला जाणार आहे. त्यासाठी नगरससचिव विभागाने कारवाईही सुरू केली आहे.

पालिकेत सहा प्रभाग समित्या असताना सत्ताधाऱ्यांनी नव्याने तीन समित्यांची निर्मिती केली. २४ जुलै रोजी या समित्यांसाठी सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. समित्यांवर वर्णी लागून चार दिवस उलटले तरी या सभापती व उपसभापतींना कार्यालये मिळाले नाहीत. सध्या दुसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांना आल‌िशान कार्यालये दिली आहेत. त्यात सत्ताधारी भाजपसह शिवसेना तसेच कमी संख्या असलेल्या रिपाई, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या तीन समित्यांना कार्यालये देण्यासाठी नगरसचिव विभागाने काही पक्षांची कार्यालये कमी करण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्याला सत्ताधारी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेनेही विरोध केला आहे. त्यामुळे या समित्यांच्या सभातींनाच कार्यालयासाठी वणवण करावी लागत आहे.

समित्यांच्या कार्यालयाचा त‌िढा सोडविण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. पालिकेत सदस्य संख्येनुसार कार्यालये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. भाजपचे संख्याबळ ६६ तर शिवेसेनेचे संख्याबळ ३५ आहे. त्यामुळे या दोन पक्षांनाच मोठी कार्यालये दिली जाणार असून, रिपाईं, मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आलिशान कार्यालयांचा आकार कमी केला जाणार आहे. या तीन समित्यांना आता दुसऱ्या मजल्यावरच रिपाई, राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यालयांमध्येच नव्याने कार्यालय तयार करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यालयांचा अलिशान आकार आता आपोआप कमी होणार आहे.

वाहन खरेदी अडकली जीएसटीत

या नवीन सभापतींना प्रवासासाठी वाहनही उपलब्ध झालेले नाही. वाहनांची खरेदी जीएसटीत अडकली आहे. पालिकेत जागाच मिळत नसल्याने कार्यालयांची शोधाशोध सुरू आहे. या सभापतींना कर्मचारीही उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या समित्यांचा खर्चच पालिकेसाठी डोईजड ठरला आहे. इतके प्रश्न असूनही सत्ताधाऱ्यांना समित्यांची घाई का केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला मिळेना पोलिसांची साथ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड लिंक रोडवर नव्याने वसलेला अनधिकृत भंगार बाजार पुन्हा काढण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले असले तरी, या प्रयत्नांना पोलिसांची साथ मिळली नाही. पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिस आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. पावसाळा संपल्यानंतर भंगार बाजार हटव‌िण्यासाठी बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल, असे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे तुर्तास दोन महीने अनधिकृत भंगार बाजाराला एकप्रकारे संरक्षणच मिळणार आहे.

महापालिकेने जानेवारी महिन्यात शहरातील गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या अंबड लिंक रोडवरील भंगार बाजारावर हातोडा चालविला होता. जवळपास आठशेच्या वर दुकाने तोडण्यात आली होती. दोन दिवस ही कारवाई सुरू होती. परंतु दोन महिन्यांपासून हा अनधिकृत भंगार बाजार पुन्हा वसू लागला आहे. या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के व्यावसायिकांनी नव्याने दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित जागा खासगी मालकांची आहेत. त्यामुळे पालिका हतबल झाली असून, त्यांनी हा भंगार बाजार हटवण्यासाठी जुलै अखेरची मुहूर्त निवडला होता. त्यासाठी पोलिसांना पुन्हा पत्र लिहून बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु पोलिसांना तुर्तास बंदोबस्त देण्यास नकार दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंदोबस्त दिला जाणार आहे. दरम्यान नगरसेवक दिलीप दातीर यांनाही पोलिस आयुक्तांना पत्र देवून हा भंगार बाजार हटवण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images