Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओव्हरफ्लो भावलीचे जलपूजन

$
0
0

म. टा. वृतसेवा, इगतपुरी

इगतपुरी तालुक्याची मदार अवलंबून असलेले भावली धरण पाच दिवसांपूर्वी पूर्ण क्षमेतेने भरल्याने शनिवारी आमदार निर्मला गाव‌ित यांनी धरणाचे विधिवत जलपूजन केले.

यावेळी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेऊन पाण्याचा संपूर्ण तालुक्याला लाभ होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना गावित यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. या धरणाला पर्यटकांचीही पसंती असल्याने परिसर सुशोभित करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता रमेश गावीत, शाखा अभियंता सुहास पाटील, कचरू डुकरे आदी उपस्थित होते.

जलसंपदा हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. संपूर्ण जनतेला या पाण्याचा लाभ होवो, तालुक्यातील व मतदारसंघातील जनता सुखी समाधानी होवो, अर्ध्या महाराष्ट्राला पिण्याचे व शेतीचे पाणी पुरविणाऱ्या दारणा, मुकणे, कडवा, वाकी व वैतरणा धरणेही लवकर भरोत अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

भावलीसह दारणा, कडवातून विसर्ग

इगतपुरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार असून, धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. इगतपुरीचा पश्चिम परिसर जलमय झाला आहे. इगतपुरी तालुक्यात ४८ तासांत ३०० मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात तालुक्यात २१८३ मिमी पाऊस झाला असून, ही सरासरी ६३ टक्क्यांवर गेली आहे. दारणा, कडवा या धरणांतून मोठ्या प्रमाणात जलविसर्ग सुरू असून, वैतरणा व मुकणे धरणातही जलसाठा वाढला आहे. भावली धरण चार दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, दारणा ८० तर कडवा ८५ टक्के भरले आहे. दारणा धरणातून १३ हजार क्यूसेस, तर कडवा धरणातून ७ हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. भावली धरणातून १६०० क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. वैतरणा ७२ टक्के, मुकणे ३६ टक्के तर वाकी धरण ३५ टक्के भरले आहे.

निफाडला रिमझिम

निफाड ः निफाड व परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अर्धा तास चांगला पाऊस झाला. दुपारी रिमझिम पाऊस बरसत होता. दारणा व गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने सायखेडा-चांदोरी परिसरात पूरसदृश स्थिती आहे. गोदाकाठ परिसरातील वीटभट्ट्या तसेच शेती पाण्याखाली गेली आहे.

चांदवड, नांदगावला भिजपाऊस

मनमाड ः मनमाड शहर परिसरात तसेच चांदवड तालुक्यात शनिवारी रिमझिम पावसाने जनजीवन विस्कळीत केले. शुक्रवार रात्रीपासून मनमाड शहरात संततधार पाऊस सुरू होता शनिवारी मनमाडसह चांदवड व नांदगाव तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसाने रस्त्यावर दुकाने मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांची धांदल उडाली. या भिजपावसाने शेतकरी वर्गात समाधान पसरल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी अपव्यय टळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंत्रिमंडळाने उसाच्या पिकासाठी ठिंबक वापरण्याचा निर्णय घेतला. जलचिंतन संस्थेने १२ एप्रिल २०१२ रोजी केलेल्या उपोषणात उसासाठी ठिंबकाचा कायदा करण्याची मागणी केली होती. उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतला असल्याने पाण्याचा अपव्यय टळणार असल्याची प्रतिक्रिया जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.

सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात उसाचे क्षेत्र अमर्याद झाले होते. त्यास जास्तीचे पाणी देऊन पाण्याचा अपव्यय होत होता व जमिनीसुद्धा खराब झाल्या. वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी वसूल होत नव्हती. हा राष्ट्रीय संपत्तीचा नाश होता. एकीकडे दुष्काळी भागात पिण्याचे पाणी नाही त्यासाठी टँकर लावले जातात त्या उलट कालवा लाभक्षेत्रात पाण्याचा अमर्याद वापर केला जात असल्याचे दिसून येत होते. हे समन्यायी तत्वाचे अगदी विरुद्ध होते. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देऊ नये याबरोबरच इतर अनेक मागण्या या उपोषणात जलचिंतन संस्थेने केल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयानुसार उसाला ठिंबक सिंचन केलेले नसल्यास पाणी मिळणार नाही. तसेच सिंचन प्रकल्पाच्या कालवा लाभ क्षेत्रात उसाचे पिक किती असावे याबाबतचे नियम ठरवणे आवश्यक झाले आहे. कारण साखर दरवर्षी देशाच्या गरजेनुसार पिकवली तरच तिचे भाव स्थिर राहतील व साखर कारखानदारी अडचणीत येणार नाही. तसेच तयार साखर ठेवण्यास पुरेसे गोडाऊन सुद्धा नाहीत जागतिक बाजारपेठेची व आपल्या लोकसंखेची गरज यानुसारच ऊस पिक क्षेत्रावर नियंत्रण आणणे क्रमप्राप्त झाले आहे, असे मत जलचिंतन संस्थेने व्यक्त केले आहे.

अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्या
सरकारची पावले आता शेतीतील पाणीबचतीच्या दिशेने पडणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, त्या संबंधीचे निर्णय घेणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने सरकारकडून उशीर होतो. जनतेला शिस्त लावणे हे सरकारचे काम असून या देशात स्वयंस्फूर्तीने फार गोष्टी घडत नाही. ठिंबकमधून निर्माण होणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्यावे, अशी मागणी जलसंस्थेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी अर्जात खोडा

$
0
0

नाशिक : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना उलटल्यानंतर राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांच्या संपामुळे असे अर्ज भरणे शेतकऱ्यांना अवघड आहे. या अर्जात शेतकरी इतर माहिती भरू शकतात. पण, त्यांना कर्जाचा तपशील भरतांना अडचण येणार आहे. या अर्जाच्या ९ क्रमांकावर पीक किंवा मुदत कर्जाचा तपशील हा कॉलम आहे. यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांची माहिती महत्त्वाची आहे.
राज्य सरकारने हे ऑनलाइन अर्ज राज्यातील २५ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमधून भरून देण्यासाठी आवाहन केले आहे. त्यात अर्जाचा नमुनाही जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्रावरही असे अर्ज असणार आहे. पण या अर्जावरील माहिती भरण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्जाचा तपशील मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र ही अडचण येणार नाही. पण त्यांची संख्या कमी आहे.

याद्या रखडल्या
राज्यात शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या घोषणेला सोमवारी २४ तारखेला महिना पूर्ण होणार आहे. पण सरकारकडे आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे रखडली आहे. तब्बल २७ दिवसांपासून राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायटीचे ६५०० हून अधिक सचिव संपावर आहेत. त्यामुळे खरा आकडा पोहचत नसल्यामुळे शासनाचाही गोंधळ उडाला आहे. केवळ ढोबळ माहितीद्वारे शासन आकडेमोड करीत आहे. त्यातच हा ऑनलाइन अर्जाचा घोळ आता नव्याने वाढला आहे.

माहिती मिळणे झाले अवघड
शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ९५ टक्के कर्ज या संस्थेमार्फतच वाटप केले जाते. त्यामुळे या कर्जाचा तपशीलही या संस्थेकडे आहे. या सोसायट्यांच्या सचिवांनी २७ जूनपासून आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे शासनाला अचूक माहिती मिळणे अवघड झाली आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सोमवारपासून (दि. २४) भरण्याचे आवाहन केले आहे. या अर्जावरील इतर माहिती शेतकरी भरू शकतात. कर्जाचा तपशील भरण्यासाठी आमच्याकडून माहिती घ्यावी लागणार आहे. सरकारने आमच्या मागण्या मंजूर कराव्या. त्यानंतर ही सर्व कामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
- विश्वनाथ निकम,
अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकर्षक नोंदणीची चारचाकींसाठी मालिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील चारचाकी खासगी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. असा आकर्षक क्रमांक घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज २५ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जमा करणे आवश्यक आहे.
ज्यांचे नावे असेल त्याने अर्ज करावा. अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या किंवा शेड्युल बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे भरावा लागेल.

एकदा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद पाकिटात सादर करावा. अर्जदार विहित शुल्कापेक्षा सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक दिला जाईल.

आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथील बोर्डवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बूथ तिथे शाखा; शाखा तिथे झाड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसकडून ‘गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा’ या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिकमधील पक्षाच्या संघटनेकडून ‘बूथ तिथे शाखा व शाखा तिथे झाड’ असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या सर्व नवीन शाखांचे उद्‍घाटन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ‘राष्ट्रवादी युवक’चे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता संघटनेतर्फे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच अभियाना अंतर्गत युवक संघटनेतर्फे ‘बूथ तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा आणि शाखा तिथे एक झाड’ असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

वृक्षसंवर्धनाची जबाबदारी शाखाप्रमुखाकडे
उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे पक्षबांधणीसोबतच शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावली जाणार आहे. शहरातील प्रत्येक शाखेजवळ झाड लावून त्याची वाढ व रक्षण करण्याची जबाबदारी तेथील शाखा प्रमुखाची असणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून नाशिक शहरात शेकडो झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती अंबादास खैरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना पडला नाशिककरांचा विसर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची केलेली घोषणा फसवी ठरली आहे. नाशिककरांच्या विश्वासाला भाजपने तडा दिला आहे. शहराकडे समस्यांकडे मुख्यमंत्र्यानी लक्ष घालावे व शहराचा विकास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना नाशिककरांचा विसर पडल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंचवार्षिक सत्तेत अनेक महिने महापालिका आयुक्त नव्हते. परंतु, शहराचा विकास हा राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू होता. महापालिका निवडणुकीनिमित्त सुरू असलेल्या जाहीर प्रचार सभेत नाशिककर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फसव्या घोषणांना बळी पडले. नाशिक दत्तक घेणार अशी घोषणा करून मुख्यमंत्री मोकळे झाले. यानंतर ना‌शिकमधील मतदारांनी भाजपला एक हाती सत्ता दिली. नाशिक शहराचा कायापालट होईल, असे त्यांना वाटले. मात्र, मुख्यमंत्र्यानाच या घोषणेचा विसर पडल्याचा आरोप सरपोतदार यांनी केला आहे. शहर दत्तक घेऊन सहा महिने उलटले शहरात पहिल्याच पावसात पावसामुळे नालेसफाई न झाल्याने गटारी तुंबल्या. त्यामुळे जुन्या नाशिक व शहरातील अनेक भागामध्ये दुर्गंधी पसरली. कचरा, डास यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. परिसरातील अनेक नागरिक, लहान मुले साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. डास प्रतिबंध होण्यासाठी धूर फवारणी व नाल्यावर औषध फवारणी केली गेली नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, असेही सरपोतदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपाच्या पेरण्यांवर ‘दुबार’चे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
खरीप हंगामाचा दीड महिना उलटल्यानंतरही पावसाअभावी नाशिक विभागात अद्याप १०० टक्के पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर काही तालुक्यांमधील खरीप पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

नाशिक विभागातील ५४ पैकी काही तालुक्यांचा अपवाद वगळता यंदा समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. यातून विभागात ७७.४४ क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अर्थात, ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधान देणारी असली तरी काही तालुक्यांना अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा तालुक्यांमधील पेरण्या खोळंबलेल्या आहेत.
नाशिक विभागातील २२ हजार ९३ हेक्टर इतक्या प्रस्तावित क्षेत्रापैकी १७ हजार ४६९ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. अद्यापही प्रस्तावित क्षेत्रापैकी चार हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. असमान पावसामुळे अद्याप काही तालुके पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये येत्या आठवडाभरात दमदार पाऊस न झाल्यास तेथील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक, नंदुरबार पिछाडीवर
विभागात नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्राच्या ७२.१३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात मका, तूर, उडीद, भूईमूग, सोयाबीन व भात या पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात तर बाजरीची पेरणी कमी प्रमाणात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तर केवळ ५९.५० टक्के इतकीच पेरणी झाली आहे. मका, ज्वारी, उडीद व तूर या पिकांचा पेरा या जिल्ह्यात चांगला झाला आहे.

जळगाव-धुळे अव्वल
विभागातील जळगावसह धुळे जिल्ह्यातील पेरण्या १०० टक्केच्या जवळपास पोहचल्या आहेत. जळगावमध्ये सुमारे ८१ तर धुळे जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील पेरण्यांनी वेग घेतला होता. धुळे जिल्ह्यात मूग, सोयाबीन व कापूस या पिकांच्या तर जळगावमध्ये मका, भूईमूग व सोयाबीन या पिकांच्या पेरण्या प्रस्तावित क्षेत्रापेक्षा जास्त झाल्या आहेत.

विभागातील पेरणी स्थिती
जिल्हा.........प्रस्तावित क्षेत्र (हे).........प्रत्यक्ष पेरणी (हे).........पेरणी टक्केवारी
नाशिक.........६,०८०.८०..................४,८९२.२०.........७२.१३
जळगाव.........७,८००..................६,८४९.४८.........८०.८९
धुळे.........४,५८१...........................४,०९९.८४.........८९.६५
नंदुरबार .........२,८५१..................१,६२७.८२.........५९.५०
एकूण.........२२,०९२.८०..................१७,४६९.३४.........७७.४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0

नाशिक : प्राप्तिकर दिनानिमित्त नाशिक विभागातर्फे सोमवारी (दि. २४) आयसीए हॉल, अशोक मार्ग येथे दुपारी ३ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स, संयुक्त आयकर आयुक्त मोहित मृणाल यांनी दिली. यानिमित्त आयकर परिवारातील सदस्यासाठी ‘राष्ट्रउभारणीत प्राप्तिकराचा वाटा’ या विषयावर निबंध लेखन, घोषवाक्य लेखन, मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे.

आजपासून व्याख्यान
नाशिक : श्री कालिकादेवी मंदिर संस्थान श्री कालिकादेवी मंदिर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने २४ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री कालिकादेवी मंदिर सभागृह, जुना मुंबई-आग्रारोड येथे ज्ञानेश्वरीवर प्रा. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

उद्या गुणगौरव सोहळा
नाशिक : नाएसो संचलित सारडा कन्या विद्यामंदिरचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजता प. सा. नाट्यमंदिरात होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर रंजना भानसी यांची उपस्थिती राहणार आहे.

जेलरोडला टिळक जयंती
नाशिकरोड : जेलरोड येथील अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विभागप्रमुख जयश्री सरोदे यांनी टिळकांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षिका शुभांगी खैरनार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी टिळकांविषयी मनोगत व्यक्त केले.


व्हिडीओचालकावर गुन्हा
नाशिक : भद्रकालीतील व्हिडीओ गल्लीत अश्लिल चित्रफीत दाखवणाऱ्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल बन्सीलाल जैन (४८, रा. काठेगल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. भद्रकाली पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई जावेद अताउल्ला खान यांनी शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तलावडी परिसरात छापा मारून अनिल यांच्या व्हिडीओ हॉलची पाहणी केली. त्यावेळी संशयित तेथे अश्लिल चित्रफीत दाखविली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

बाजार समितीची आज सुनावणी
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी काढलेल्या नोटीसांवर सोमवारी (दि. २४) सुनावणी होणार आहे.
गेल्या ३ जूनला या नोटीसा काढल्यानंतर संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर या सुनावणीसाठी पुढच्या तारखा देण्यात येत होत्या. त्याच कालावधीत सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव संचालकांच्या सभेत मंजूर करण्यात आला. सभापतीच्या निवडीत शिवाजी चुंभळे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आता ही सुनावणी होत आहे.

बिटकोमधून रुग्ण बेपत्ता
सिन्नर फाटा : महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेला जेतवननगर येथील सुरेश उमाकांत गांगुर्डे (४७) हा रुग्ण बेपत्ता झाला आहे. अनिल उमाकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात सुरेश गांगुर्डे हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यास कळविण्याचे आवाहन नाशिकरोड पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाप्रश्नी कार्यवाही करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गोदावरी प्रदूषणासंदर्भात होत असलेल्या चालढकलीची दखल हायकोर्टाने घेतली असून, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात नाझरे यांनी सांगितले, की केंद्र सरकारच्या ‘निरी’ या संस्थेने गोदावरी रक्षणाबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाताना दिसत नाही. नदीच्या प्रवाहाला अडथळा करता कामा नये, ही प्रमुख सूचना असतानाही गंगापूररोडला क्रीडा संकुलाच्या कामाचे डबर नदीत टाकले जात आहे. नदीकाठची झाडे तोडण्यास हायकोर्टाची मनाई आहेत, तरी झाडे तोडली जात आहेत. ‘निरी’ची मनाई असतानाही नदीत कचरा टाकला जात आहे.

प्रतिबंध असूनही बांधकाम

नदीच्या निळ्या (नदीचा काठ) व पांढऱ्या रेषेत (नदीचा प्रवाह) बांधकामास प्रतिबंध असतानाही या रेषांमध्ये इमारती, हॉटेल्सचे बांधकाम सुरू आहे. तसेच, गोदापार्कदेखील त्यातच आहे. नदीकाठी आलेली नैसर्गिक झाडे, गवत न काढण्याच्या सूचना आहेत. मात्र, ते काढून परदेशी झाडे लावण्यात येत आहेत. नदीतील पाणी शेतीलाही वापरण्याची परवानगी नाही. ते फक्त पिण्यासाठी वापरण्याचे निर्देश आहेत. परंतु, नदीकाठी सुरू असलेल्या बांधकामासाठी अनेक भागात नदीत पंप टाकून पाणी खेचले जात आहे. नदीच्या बाजूला ठेवलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्याएेवजी कचरा टाकला जात आहे. निर्माल्याला जागा नसल्याने ते नदीत टाकावे लागत आहे. वरील बाबी नाझरे यांनी याचिकेद्वारे कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर कोर्टाने प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारअभावी खुंटणार संभाषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशान्वये ३० जुलैच्या आत मोबाइल कार्ड व आधार कार्ड एकमेकांना लिंक करुन न घेतल्यास स‌िम कार्ड बंद करण्याचा इशारा ट्रायने दिला आहे. परंतु, आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे बोटांचे ठसे फिंगर प्रिंट रीडर यंत्रावर जुळत होत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मोबाइलच्या सिम कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने मोबाईल सीम कार्ड व आधारकार्ड एकमेकांना लिंक करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने भारतातील सर्व दूरसंचार कंपन्यांना आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले. ज्या ग्राहकांनी नवीन कार्ड घेतले, त्यांना व्हेरिफिकेशन करुनच कार्ड वितरित करण्यात आले. परंतु, ज्या ग्राहकांकडे जुनी कार्ड आहेत, अशांना ३० जुलै ही मुदत देण्यात आली. सर्व कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना तसे मेसेजही पाठवले. मात्र, ग्राहक मोबाइल कार्ड लिंक करण्यासाठी मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर अनेकांचे फिंगरप्रिंट आधार कार्डशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले. आधार कार्ड लिंक न होणे ही टेलिफोन कंपन्यांची चूक नाही तर ती प्रशासनाची चूक असल्याचे सांगितले जात आहे.

बायोमेट्रिक अपडेशन नाही

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१४ या कालावधीत ज्या व्यक्तींनी आधार कार्ड काढले आहे, अशा ग्राहकांचे बायोमेट्रिक अपडेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड त्याच व्यक्तीचे आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नाही. आतापर्यंत केवळ वीस टक्के ग्राहकांनीच आपले स‌िमकार्ड आधारकार्डशी लिंक केलेले आहेत. ८० टक्के ग्राहकांनी अद्याप लिंक केलेले नाही. अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहे. हे कार्ड दिलेल्या मुदतीत लिंक न झाल्यास सिमकार्ड कायमस्वरुपी रद्द केले जाईल, असे ट्रायने म्हटले आहे. एकीकडे ट्रायची सक्ती तर दुसरीकडे आधार काढताना प्रशासनाची चूक, त्यामुळे काय करावे अशा कचाट्यात ग्राहक सापडले आहे.

एकत्र काढलेल्या आधारमध्येही दोष

अनेक कुटूंबांनी एकत्रितरित्या आधार कार्ड काढले आहेत. त्यातील पुरुषांचे आधारकार्डचे व्हेरिफिकेशन होत असून, काही महिलांच्या कार्डबाबत तक्रारी आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण इमारतीमध्ये असलेल्या लोकांचे व्हेरिफिकेशन होत नसल्याचे दिसून आले आहे.


दुसऱ्याच्या नावावर सिम घेण्याचा सल्ला

नवीन सीम कार्ड घेणाऱ्या ज्या ग्राहकांचे आधार कार्ड फिंगर प्रिंटशी मॅच होत नाही, अशा ग्राहकांना ज्यांचे कार्ड आणि फिंगर प्रिंट दोन्ही मॅच होतील, अशा व्यक्तींच्या नावार कार्ड घेण्याचा सल्ला टेलिफोन कंपन्यांकडून दिला जात आहे. मात्र, हे बेकायदेशीर असून, या सिमकार्डचा गैरवापर झाल्यास त्याचा आधारधारकाला मनस्ताप होऊ शकतो.


अनेक ‘आधार’ बंद

अनेक ग्राहकांकडे अद्याप आधारकार्ड नाही. ज्या ग्राहकांना कार्ड काढायचे आहे अशांसाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. नाशिक शहरात व उपनगरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आधार कार्ड केंद्रे सुरू केली होती, त्यातील बहुतांश बंद झाली आहेत. त्यामुळे आधार कार्डसाठी अनेक ग्राहकांना वणवण फिरावे लागत आहे. अनेक ग्राहकांनी महापालिकेत व जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता पत्ते देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात तेथे आधारकार्ड केंद्रच सुरू नसल्याचे आढळून आले आहे.


अपडेशेनची पर्यायी व्यवस्था नाही

बोटांचे ठसे दर दहा वर्षांनी कमी अधिक प्रमाणात बदलू शकतात. परंतु, डोळ्यांचे आयडेंट‌िफिकेशन बदलत नाही. शहरातील सर्वच मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयांत, दुकानांमध्ये बोटांचे ठसे तपासणी यंत्रणा आहे. या ठिकाणी डोळ्यांचे आयडेंट‌िफिकेशन करणारी यंत्रणा नाही. ती बसवल्यास आधारकार्ड कमी प्रमाणात रद्द होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


आधारकार्ड नंबर टाकल्यास अनेक कार्डधारकांचे व्हेरिफिकेशन होत नसल्याचे आढळून आले आहे. आधार कार्ड तयार करताना चूक कोणाची आहे, हे आता तरी सांगता येणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून अपडेशन करुन घ्यावे व आपला आधार नंबर मोबाइल स‌िमकार्डशी संलग्न करुन घ्यावा

- तुषार शहाणे, स‌िमकार्ड डीलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरांना पाण्याचा वेढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रविवारी सकाळी काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारापासून चांगलाच जोर धरला. गंगापूर धरणातून दहा हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या पाण्याने रामकुंड परिसरासह गोदापात्रानजीक असलेल्या शिव मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारी येथील दर्शनापासून भाविकांना वंचित राहावे लागणार आहे.

त्र्यंबकेश्वरपासून उगम पावून निघालेल्या गोदावरी नदीच्या पात्रात असंख्य शिव मंदिरे आहेत. नाशिक शहराच्या भागात विशेषतः रामकुंडाच्या परिसरात शिव मंदिरांची सर्वांत जास्त संख्या आहे. सध्या गोदावरी नदीला आलेल्या पुराने गोदापात्रातील सर्वच मंदिरे पाण्यात गेली आहेत. त्यात बाणेश्वर, सिद्धपाताळेश्वर, टाळकुटेश्वर, नारोशंकर, नीलकंठेश्वर अशा अनेक मंदिरांचा समावेश आहे. पुराच्या पाण्याचा वेढा या मंदिरांना बसला असल्याने आज (दि. २४) पहिल्या श्रावणी सोमवारी या मंदिरात भाविकांना दर्शन घेणे, तसेच पूजा करणे शक्य होणार नाही. पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास कपालेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराने मंदिराकडे जाणेही अवघड होणार आहे. कपालेश्वर मंदिरातून दर सोमवारी सायंकाळी कपालेश्वरांची पालखी काढण्यात येते. श्रावणी सोमवारी या पालखीला जास्त महत्त्व असते.

प्रत्येक श्रावणी सोमवारच्या पूजेला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. मंदिरांमध्ये जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला जातो. भाविकांची दिवसभर गर्दी असते. मात्र, यंदा पुरामुळे अनेक मंदिरांत असे विधी न होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रविवारी दशक्रिया विधीसह अन्य विधींसाठीच्या जागा पाण्याखाली गेल्याने हे विधी अन्य ठिकाणी करावे लागले.


आजपासून श्रावणमासारंभ

व्रतवैकल्यांचा श्रावणमास सोमवार (दि. २४)पासून सुरू होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी अशा सणांची मालिका घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. शहरातील शिव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलावर्गाकडूनही व्रतवैकल्यांचे नियोजन सुरू झाले आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनेच या महिन्याच्या व्रताला सुरुवात होणार आहे. दि. २७ जुलैला नागपंचमी असून, कृष्ण जन्माष्टमी, राखीपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, पोळा अादी सण-उत्सवांची चाहूल श्रावणामुळे लागली आहे.


पंचवटीत वाहतूक मार्गात बदल

श्रावणानिमित्त पंचवटीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील काही रस्ते दर सोमवारी, तसेच शनिवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतुकीला व्यत्यय येऊ नये म्हणून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

श्रावणाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने दर शनिवारी आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन आखले आहे. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता, खांदवे सभागृहाकडून कपालेश्वराकडे येणारा रस्ता आणि सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे. श्रावणातील सर्व सोमवारी आणि शनिवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. वाहनांची संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामसेतूवरून फिरले पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीला पूर आलेला आहे. पूराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी आले होते. रामसेतू पुलावरून पाणी फिरले होते. गोदापात्राच्या कडेच्या घरांच्या पायऱ्यांना तसेच व्यावसायिकांच्या दुकानांपर्यंत पाणी पोहचण्याचा अंदाज लक्षात घेऊन त्यांनी दुकानातील महत्त्वाचे साहित्य इतरत्र हलविले. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे अगोदरच कळविण्यात आल्याने नदीकाठच्या व्यावसायिकांनी अगोदर आपल्या दुकानातील साहित्य काढून घेतल्याने फारशे नुकसान झालेले नाही. सकाळपासून गंगाघाट रस्त्यावरील टपऱ्या हलविण्याची लगबग सुरू होती. गेल्या आठवड्यापासून गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती, त्यात रविवारी सकाळी धरणातून साडेबारा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने या पातळीत आणखी वाढ झाली.

पाण्याची पातळी वाढत असल्याने मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंडाकडील उतार, खांदवे सभागृहाकडील उतार, सरदार चौक, शनीचौक या कडील रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहनांसाठी हे मार्ग बंद करण्यात आले होते. पोलिस आणि महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्तही या भागात लावण्यात आला होता. रामकुंडाचा मैदान परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपूरथळा पाण्याखाली आला आहे. गंगाघाटाच्या रस्त्यावरून तसेच नव्या सिंहस्थ मार्गावरूनही पाणी होते. गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, सिद्धपाताळेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, खंडेराय महाराज मंदिर ही मंदिरे पाण्यात बुडाली होती. नारोशंकर मंदिर, सांडव्यावरची देवी, देवमाललेदार मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. वाघाडी नाला, रामवाडी नाला, सरस्वती नाला हे नालेदेखील दुथडी भरून वाहत असल्याने त्यांच्या पाण्याची गोदावरीत आणखी भर पडत आहे. रामकुंड परिसरात होणारे दशक्रिया विधी आणि श्राद्धविधी या कपालेश्वर मंदिराकडील पुरिया रस्त्यावर करण्यात येत होते.

रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने गोदाकाठावर पूर बघण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. होळकर पूल, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, रामवाडी पूल यांच्यावर पूर बघण्यासाठी आणि पुरासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुलावरच वाहने थांबवत असल्याने होळकर पुलावर वाहनांची कोंडी झाली होती. छत्र्या, रेनकोट घेऊन पायी चालत येणाऱ्यांच्या गर्दीमुळेही वाहतुकीची कोंडी झाली होती. होळकर पुलाच्या दोन्ही बाजूला अशीच स्थिती दिसत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मी धरणे भरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या बहुतांश भागात सुरू असलेला संततधार पाऊस धरणांसाठी वरदान ठरला आहे. धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांच्या वर पोहोचला असून, आजमितीस धरणांमध्ये ३५ हजार ५७२ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.

जून पाठोपाठ जुलैमध्येही पावसाने सरासरी ओलांडली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणे भरण्यासही मोठी हातभार लागला आहे. त्यामुळे जिल्हावासियांची पाण्याबाबतची चिंता काहीशी मिटली आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत. मध्यम आकाराची १७ तर मोठ्या आकाराची सात धरणे आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. या धरणांमधील पाण्यावरच शेती, उद्योग अवलंबून आहेत. नाशिक शहरासह आसपासच्या परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये ७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी अशा सर्व धरणांमध्ये मिळून सात हजार ८५७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड धरण समूहात ६५ तर गिरणा धरण समूहात ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सहा धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

२४ पैकी १६ धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक आहे. भावली धरणात १०० टक्के पाणीसाठा असून, वालदेवीतील पाणीसाठाही ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणांसह पालखेड, दारणा, वाघाड, पुणेगाव, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, पूनद या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्यावर आहे. तर करंजवण, ओझरखेड, तिसगाव, मुकणे, केळझर, गिरणा या धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या व्हा कल्चर क्लबचे सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सने घरबसल्या उपलब्ध करुन दिली आहे. खास तुमच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव मटा कल्चर क्लबचे फॉर्म तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत.

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. मग ते हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा नाटक. त्याचबरोबर झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, सहल, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद तुम्हाला वर्षभर घेता येतो. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’ व्यासपीठही उपलब्ध करून देते. नाटकांसारख्या कार्यक्रमांमध्ये ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर आजच ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.

फक्त इतकेच करायचे...

तुम्हाला घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL च्या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्या. चेकमागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमचा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. तेव्हा आजच तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा आणि ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरजवळ जीवघेणा सेल्फी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गोदावरी व दारणा नदीचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून ४९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असतानाही सेल्फीच्या प्रेमात पडलेली तरुणाई पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा आत्मघातकी खेळ करीत आहेत.

मुंबई, नाशिक प्रमाणे पुराचे पाणी पाहण्यासाठी अनेक तरुण, तरुणी आपल्या कुटुंबासह, मित्रांसह नांदूरमध्यमेशवेरच्या धरणावर गेल्या आठ दिवसांपासून गर्दी करीत आहेत. शनिवार व रविवार सुटी असल्याने यात आणखी वाढ झाली आहे. शनिवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तेव्हा धरणाच्या खालच्या पुलावर मोठी गर्दी होती. त्यातील अनेक नागरिक हे फोटो काढण्यात मग्न होते. पाण्याचा प्रवाह वाढला आणि दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उप‌िस्थत होत आहे. गेल्या वर्षी एका तरुणाने धरणाच्या गेटवर बसून स्टंटबाजी केल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले होते. त्यामुळे या परिसरात स्टंटबाजी करणाऱ्यासह आणि सेल्फीप्रेमींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरीसह उपनद्यांचा पूर कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने मुक्काम ठोकला असून, गंगापूर आणि दारणा धरणांमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी, दारणासह उपनद्यांनाही पूर आला आहे. रामकुंडासह गोदाघाट परिसरातील बहुतांश मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी आणि दारणामधील पाण्याचा प्रवाह पुढे जावा यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, ६१ हजार १३८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथील नदीकाठच्या ४० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आली.

जिल्ह्यात पावसाने दमदार फटकेबाजी सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळपासून रविवारी दिवसभरात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. गेल्या ४८ तासांत येथे सातत्याने अतिवृष्टी सुरू आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात ७१३.२ मिलीमीटर पाऊस झाला. गंगापूर धरण समुहातील पाणीसाठा वाढविणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात १५० मिमी एवढा पाऊस झाला. इगतपुरीत १३८ मिमी, सुरगाण्यात १२०.४ मिमी पावसाची नोंद झाली. पेठ तालुक्यातही ९५ मिमी पाऊस पडला. विशेष म्हणजे मध्यरात्री झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हजेरी लावली. रविवारी दिवसभरही पावसाचा चांगला जोर होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांमध्ये जिल्ह्यात २८४.२ मिलीमीटर पाऊस पडला.

पावसामूळे धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढतो आहे. धरणांमधून होणारा विसर्ग आणि त्यामध्ये मिसळणारे पावसाचे पाणी यांमुळे गोदावरी, दारणासह उपनद्यांमधील पाणी पातळी वाढली असून नद्यांना पूर आला आहे. गंगापूर धरणातुन सकाळपांसून १२ हजार ५२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. सायंकाळी तो १४ हजार ९४९ क्युसेकने करण्यात आला. दारणा, कडवा, भावली, वालदेवी या धरणांमधूनही विसर्ग करण्यात आला आहे.

मंदिरे पाण्याखाली

गोदाघाट परिसरातील गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिर, सिंहस्थ गोदावरी मंदिर,पाताळेश्वर मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, तसेच अन्य छोटी-मोठी सुमारे ५० हून अधिक मंदिरे दुकाने, नदीकाठच्या परिसरातील घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिक तसेच धार्मिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गोदाघाटावरील दुतोंड्या मारूतीच्या हनुवटीपर्यंत गोदेचे पाणी पोहोचले आहे.

शहरात ४७.९ मिमी पाऊस

नाशिक शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४७.९ मिमी पावसाची रविवारी सकाळी नोंद झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत २७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. नदीपात्रावरील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. केवळ होळकर पूल व कन्नमवार पुलावरून वाहतूक सुरू होती. बघ्यांच्या गर्दीमुळे रविवारी कारंजा, अशोक स्तंभ, मालेगाव स्टॅण्डपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइनचा विळखा शहरी भागात

$
0
0

नाशिक: स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी ते १८ जुलै या कालावधीत तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला. यात, शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडलेल्या २५ जणांचा समावेश आहे. तर, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वर्षात ५८ हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात जवळपास २११ जणांना स्वाइन फ्लू असल्याचे आढळून आले.

गत वर्षाच्या तुलनेत स्वाइन फ्लूचा फैलाव यंदा जास्त झाल्याचे दिसून येत आहे. शहर आणि जिल्हा मिळून ३८ पेशंटचा बळी स्वाइन फ्लूने घेतला आहे. बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहराचा क्रमांक प्रथम आहे. विशेष म्हणजे ३८ पैकी २५ पेशंटचा मृत्यू शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये झाला. ग्रामीण भागातदेखील पेशंटची संख्या वाढते आहे. प्रामुख्याने निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांतील पेशंटना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे. गत साडेसहा महिन्यांच्या काळात सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी मिळून ५८ हजार ३२७ पेशंट्सची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. यापैकी एक हजार ५९९ पेशंटला टॅमी फ्लू गोळ्या देऊन उपचार करण्यात आले. जिल्ह्यामध्ये मागील महिन्यापर्यंत स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव कमीच होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्षही काही महिने बंद राहिला. मात्र, पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूने हातपाय पसरले. सर्दी, ताप समजून नागरिक दुर्लक्ष करतात. स्वाइन फ्लू पेशंटला वेळीच आणि योग्य उपचार मिळाले नाहीत, तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. दरम्यान, मालेगावसह काही तालुक्यांमध्ये हा आजार अद्याप आटोक्यात असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गत वर्षापेक्षा प्रमाण वाढले

शहरासह जिल्ह्यात २०१६मध्ये अवघ्या १६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर, चार जणांचा मृत्यू झाला होता. २०१७ मध्ये स्वाइन फ्लू संशयितांची संख्या २११ च्या घरात पोहचली असून, मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३८ पर्यंत पोहचला आहे. स्वाइन फ्लू टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, तसेच फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

स्वाइन फ्लूचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश मिळते आहे. स्वाइन फ्लूसाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असून, आवश्यकतेनुसार सरकार औषधांचा साठा उपलब्ध करून देते. नागरिकांनी सतर्क होऊन वेळीच औषधोपचार घ्यावेत.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन


वर्ष...स्वाइन फ्लू पॉझ‌िट‌िव्ह...मृत्यू

२००९- १२२-२२

२०१०-२५४-३९

२०११-१६-१

२०१२-३७-२१

२०१३-३४-१९

२०१४-२२-१०

२०१५-५०८-८७

२०१६-१६-४

२०१७-२११-३८


हॉस्पिटल-पॉझ‌िट‌िव्ह-मृत्यू

सिव्ह‌िल -३१-१३

जाकीर हुसेन-३-०

खासगी हॉस्पिटल-१७७-२५

एकूण-२११-३८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलैची सरासरी ओलांडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकवर मेहेरबान झालेल्या पावसाने जिल्ह्यात जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जुलैचा शेवटचा आठवडा बाकी असताना नऊ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १८५ टक्के पाऊस झाला असून, मालेगाव तालुक्यात सर्वात कमी ४८.१ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस असाच सुरू राहीला तर येत्या आठ दिवसात सर्वच तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. मात्र दिंडोरी, कळवण, देवळा, निफाड आणि येवला या पाच तालुक्यांमध्ये पाऊस सरासरी गाठू शकला नाही. जुलैमध्ये मात्र दिंडोरी, कळवण आणि निफाडमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. जुलै हा धुवांधार पावसाचा महिना समजला जातो. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरी पाच हजार ६७१ मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतच जिल्ह्यात सहा हजार १३५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच ४६४ मिलीमीटर अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी ४०९ मिमी पाऊस पडला आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक एक हजार ३३९ मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा एक हजार ४९६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पेठ तालुक्यात ९३६ मिमी पाऊस पडत असला तरी यंदा एक हजार ८० मिमी पाऊस झाला आहे.

मालेगाव, चांदवडची पावसाकडून निराशा

जिल्ह्यात नाशिक इगतपुरी, दिंडोरी, पेठ, कळवण, बागलाण, सुरगाणा, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांवर यंदा पावसाने कृपादृष्टी केली आहे. या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मात्र मालेगावात सरासरीच्या निम्मेही पाऊस होऊ शकलेला नाही. चांदवड आणि देवळा तालुक्यात जेमतेम सरासरीएवढा पाऊस झाला आहे. येवला आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही अद्याप पावसाने सरासरी गाठलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाधी सोहळ्यानिमित्त नेत्रदानाचा संकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिकरोड परिसरातील ७० शिंपी समाजबांधवांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त नेत्रदानाचा संकल्प करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. शिंपी समाजबांधवांनी डोळसपणे हा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याने संत नामदेवांना ही अनोखी आदरांजली ठरली आहे.

नाशिकरोडच्या शिंपी व शीख बांधवांच्या वतीने राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी सुमारे ७० जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तुलसी आय हॉस्पिलच्या सहकार्याने भविष्यात १४० जणांना दृष्टी प्रदान करण्याकामी केलेले कार्य निश्चितच अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन आर्टिलरी सेंटर येथील गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा संतोखसिंगजी महाराज यांनी केले. संत नामदेवांनी पंजाबमधील केलेल्या कार्यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वासंती राहाणे, रमेश चांडोले, रमेश नवले उपस्थित होते.

अध्यक्षस्थानाहून बोलताना राजेंद्र बकरे यांनी सांगितले, की समाजातील तरुणपिढीने नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या विविध योजनांद्वारे निधी मिळवून स्वतःचा व्यवसाय करीत आपला उत्कर्ष साधावा. आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेऊन समाजकार्यासाठी वेळोवेळी साहाय्य करावे.

दत्ता वावधने, रुपाली बकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संतोष निखळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल खांबेकर, वामनराव कौटकर, कांती गणोरे, रमेश बकरे, मंगेश बगाडे, शरद नवले, कैलास निरगुडे, अनंता बोढार्इ, संतोष देव्हारे आदी प्रयत्नशील होते.


शोभायात्रा अन् सत्कार

या सोहळ्यादरम्यान संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. त्याचप्रमाणे तेरावर्षीय सानिया बकरे हिने नेत्रदानाचा संकल्प केल्याने तिचा, तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञानावर आधारित शेती करणे गरजेचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

परदेशातील प्रक्रिया उद्योगासह वीज, पाणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेली शेती विरूद्व भारतातील परंपरागत जिरायती शेती असे युद्ध आहे. खडतर शेतीचा प्रवास करणारा आपला शेतकरी निराशेतून आत्महत्या करीत आहे. मात्र महात्मा फुलेंनी दिलेला विज्ञानावर आधारित शेतीचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

ओझर कॅनॉल बागार्इतदार संघाच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात कांबळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील होते. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, यशवंत हप्पे, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, उत्तम भालेराव, चांगेदव होळकर, प्रतापराव मोरे, दिलीप पाटील अंबादास बनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, निव्वळ कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. आत्महत्येचे कारण कर्जापलीकडचे आहे. शेतकरी विज्ञानाकडे पाठ फिरवतो. विज्ञान वापरायला वेळ लागल्यामुळे शेतकरी जगापेक्षा शंभर वर्षांनी मागे आहे. त्यामुळे केवळ मरणाने प्रश्न सुटणार नाही, तर मरणाकडे पाठ फिरवून लढायला शिकले पाहिजे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली होती. ज्ञानाचे डोळे मिळावे म्हणून त्यांनी आयुष्य खर्च केले. विनाअनुदानित शिक्षण संस्था ही वसंतदादा पाटील यांचीच संकल्पना. कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते यांनी सहकार शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळेच सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची शक्ती त्यांच्या विचारात असल्याचे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले. नीलीमा पवार, कर्मवीर काकासाहेब, तात्यासाहेब यांचा गौरवशाली इतिहास असून, सहकार शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. त्यांचा वारसा जपणे, त्यांच्या विचाराने काम करणे हे आपले कर्तव्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images