Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुंबई-लखनौ एक्स्प्रेसची धूळफेक?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेने नव्याने सुरू केलेली एलटीटी मुंबई-लखनौ ही गाडी म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका रेल्वे प्रवाशांनी केली आहे. या गाडीला नुकताच हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला असला तरी ही गाडी २०१३ सालापासून स्पेशल एसी एक्स्प्रेस म्हणून लखनौसाठी दर शनिवारी मध्य रेल्वे चालवत होती. त्यामुळे रेल्वेने तीच गाडी केवळ रेक बदलून नवीन गाडी सुरू केल्याचे चित्र असल्याची रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

२०१३ च्या नोव्हेंबरमध्ये राजधानीच्या धर्तीवर मध्य रेल्वेने (कल्याण-नाशिक मार्गे) नाशिककरांची मागणी म्हणून लोकमान्य ठिळक टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन (दिल्ली) एक्स्प्रेस चालू केली. या गाडीचे डबे व रचना पूर्णतः राजधानीसारखी असून, फक्त राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा नाही. एलटीटी मुंबई-लखनौ ही गाडी ताशी सरासरी ८० किलोमीटर वेगाने धावते. ती दर मंगळवारी सायंकाळी नाशिकहून साडेपाचला सुटते आणि केवळ पाच थांबे घेऊन दिल्लीला सकाळी साडेदहाला पोहोचते. त्याच दिवशी दुपारी परतीच्या प्रवासास रवाना होऊन शुक्रवारी पुन्हा मुंबईला पोहोचते.

ही नवीन गाडी सुरू झाली तेव्हा प्रतिसाद पाहून ती नियमित करण्याचे आश्वासन तत्कालीन खासदारांनी दिले होते. गाडी सुरू झाल्यापासून फुल्ल होऊन धावत आहे. परंतु, रेक शेअरिंग आणि उरलेल्या दिवसांसाठी याच गाडीचा रेक स्पेशल एसी

एक्स्प्रेस म्हणून २०१३ पासून लखनौ मार्गावर वापर होत आहे. आज हीच गाडी लखनौसाठी नियमित करण्यामागे उत्तर प्रदेशकरिता विशेष प्रेम म्हणून, असेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वरमध्ये पार्वतीच्या मूर्तीवरून रंगला आखाडा

$
0
0

साधू, महंत व विश्वस्त हमरीतुमरीवर; आज पुन्हा येणार आमनेसामने

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीमातेच्या मूर्तीवरून साधू-महंत व विश्वस्त यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. सोमवारी समन्वय बैठकीत मूर्ती बसविण्यावरून हे प्रकरण हमरीतुमरीवर गेले. मूर्ती ताब्यात घेण्यावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे ग्रामस्थांसह भाविकांचे आज (दि. १८) काय घडते याकडे लक्ष लागले आहे.

खंडित पार्वतीमातेची मूर्ती बदलून त्या ठिकाणी हुबेहूब बनविलेली नवी मूर्ती बसविण्यावरून साधू-महंत व त्र्यंबक देवस्थान विश्वस्तांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद मिटविण्यासाठी तहसीलदार महेंद्र पवार यांनी सोमवारी समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. उभयतांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन पवार यांनी केले. पूर्वापार साधू येथे वास्तव्यास असल्याने मंदिराबाबत साधूंचा देखील अधिकार आहे. त्यामुळे साधू ढवळाढवळ करीत आहेत, या विश्वस्त यादवराव तुंगार यांच्या आरोपावर सागरानंद सरस्वती यांनी आक्षेप नोंदवला.

विश्वस्त मंडळ १७ मे २०१७ रोजी देवस्थान चेअरमनसोबत विश्वस्तांची बैठक आयोजित करणार असून, त्यावेळेस मूर्ती प्रतिष्ठापनेच्या तारखा निश्चित करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. यावर डॉ. बिंदू महाराज यांनी आक्षेप घेऊन इतका कालपव्यय करण्याची गरज नाही. तातडीने खंडित मूर्ती बदला असे ठणकावले. डॉ सत्यप्रिय शुक्ल यांनी साधूंचा काही अधिकार नाही यावर ठाम वक्तव्य केल्याने साधू आणि विश्वस्त हामरीतुमरीवर उतरले. जयंत शिखरे, अॅड. गायधनी, पाचोरकर यांनी हात जोडून साधूंच्या विनवण्या केल्या. तहसीलदार पवार, पोलिस निरीक्षक मांडवकर व उपनिरीक्षक आकुले यांनी परिस्थिती संयमाने हाताळत सर्वांना शांत केले. दरम्यान, पोलिस प्रशासनानेदेखील १६ मेपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर हा प्रश्न चेअरमनच्या संमतीने मार्गी लावावा, अशी मागणी केली.

या बैठकीस षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद महाराज, डॉ. बिंदुजी महाराज, विश्वस्त ललिता शिंदे आणि तुंगार ट्रस्ट अध्यक्ष व देवस्थान ट्रस्ट सदस्य यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, सचिन पाचोरकर, जयंत शिखरे, मंदिर प्रशासन अधिकारी समीर वैद्य आदी उपस्थित होते.

निर्णयाकडे लक्ष

तहसीलदार महेंद्र पवार यांनी हा प्रश्न सुटल्याचे सांगितले आहे. परंतु, डॉ. बिंदू महाराज यांनी आज, मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी ११ वाजता साधू मंदिरात येतील आणि मूर्ती ताब्यात घेतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आज काय घडते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कवींनी एकत्र येत ताकद वाढवावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जागतिकीकरणात विचार स्वातंत्र्याचा अंत झालेला आहे. विचार नामशेष करण्याचे षडयंत्र रचले जात असून, उदारमतवादाचे अवशेष शिल्लक राहणार नाही, अशी अवस्था आपण अनुभवत आहोत. अशा या विघटनाच्या प्रक्रियेत सर्व कवीकुळांनी एकत्र येऊन ताकद वाढवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले.

परिवर्त परिवार, नाशिक यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्ताने जागर समतेचा काव्य यात्रेचा समारोप, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि उपक्रमशील आयोजकांचा सत्कार व कवी अरूण काळे स्मृती अजातशत्रू काव्य पुरस्काराच्या वितरण समारंभात त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास कवी प्रकाश होळकर, अमोल बागूल, अविनाश गायकवाड, प्रा. गंगाधर अहिरे, करुणासागर पगारे, प्रा. जयश्री बागूल आदी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातील प्रा. सुनील अभिमान अवचार यांच्या ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ’ या काव्यसंग्रहाला अजातशत्रू काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरूप होते. देवेंद्र उबाळे यांनी प्रास्ताविक केले तर किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहित गांगुर्डे यांनी मानपत्राचे वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिताच्या विद्यार्थ्यांना अंदाजपंचे मार्क्स!

$
0
0

पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पिंपळगावमध्ये उघड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बी.एससी. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका न तपासताच गणिताच्या विद्यार्थ्यांना अंदाजपंचे गुणदान केल्याचा धक्कादायक प्रकार एका सजग कार्यकर्त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला आहे. चक्क भंगार खरेदीच्या गाडीवर उत्तरपत्रिकांचा गठ्ठा एका कार्यकर्त्याच्या हाती लागल्यानंतर उघडकीला आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

पुणे विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ सायन्स (बी.एससी.) या पदवी अभ्यासक्रमांतर्गत सन २०१५ मध्ये पहिल्या वर्षाच्या पार पडलेल्या परीक्षेतील या उत्तरपत्रिका आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव येथील व्यावसायिक व युवा सेनेचे उपशहरप्रमुख दीपक गोसावी यांना एका भंगारवाल्याच्या गाडीवर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिसून आला. त्यांनी उत्सुकतेने हा गठ्ठा बघितल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या आतमध्ये त्या तपासल्याच्या कुठल्याही खुणा त्यांना आढळून आल्या नाहीत. मात्र, पहिल्या पानावरील रकान्यात लालशाईत गुणदान करण्यात आले आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गणित विषयाच्या या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या काही समीकरणांमध्ये खाडाखोड करण्यासाठी चक्क व्हॉईटनरचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळेही या प्रकरणातील संशय वाढीला लागत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. या उत्तरपत्रिका पिंपळगाव बसवंत येथील एका स्थानिक महाविद्यालयाच्याच असल्याचेही ते म्हणाले. मात्र, हे प्रकरण थेट विद्यापीठाशी निगडीत असल्याने विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयात या संदर्भात त्यांनी तक्रारही दिली आहे. विद्यापीठाने या संदर्भातील दोषींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.

आमच्याकडे या प्रकरणी अद्याप तपशीलवार माहिती मिळालेली नाही. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तथापि, प्राध्यापकांना कुठल्याही उत्तरपत्रिका स्वत:जवळ बाळगण्याचे अधिकार नाहीत. त्या विद्यापीठाकडे जमा कराव्या लागतात. या प्रकरणी तथ्य आढळल्यास कारवाई करू.

- अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत आजपासून ‘वन वे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहने व त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता कॅन्टोन्मेंट बोर्डाने ‘वन वे’चा तोडगा काढला आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेला हौसनरोड व वडनेररोड हे दोन्ही रस्ते आज, मंगळवार (दि. १८)पासून सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेदरम्यान ‘वन वे’ करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी दिली.

देवळालीतील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी होणारी गर्दी व वाहनांचा अडथळा यामुळे शहरात प्रवेश करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने २८ फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. त्याकरिता शहरात प्रवेश करणारा प्रमुख मार्ग असलेल्या हौसनरोडवरील सतीश कॉम्प्लेक्स ते झेंडा चौकादरम्यान सायंकाळी केवळ शहरात प्रवेश करण्यासाठी एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरा मुख्य मार्ग असलेला वडनेररोड कॅन्टोन्मेंट लायब्ररीपासून झेंडा चौकादरम्यान वरील वेळेत एकतर्फी वाहतूक राहणार आहे. या दोन्ही मार्गांवरून शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्ग मेन स्ट्रीटपासून सतीश कॉम्प्लेक्स व गुरुनानी कॉम्प्लेक्सपासून गुरुद्वारारोड मार्गाने आनंदरोडवरून वडनेररोड किंवा संसरी नाक्याकडे बाहेर निघण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

--

पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता येणारे वाहनधारक रस्त्याच्या कडेला वाहने लावून खरेदीसाठी जातात. परिणामी वाहतुकीचा खोळंबा निर्माण होताना दिसतो. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी बोर्डाने स्वतंत्र मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. गुरुद्वारारोडवरील मोकळी जागा, कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोरील पार्किंगची जागा, बोहरा मशिदीजवळील मोकळी जागा, हौसनरोडवरील लहान मुलींची शाळा, देना बँकेजवळील कॅन्टोन्मेंटची जागा आदी ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

--

चार दिवस अतिक्रमण निर्मूलन

देवळाली कॅम्प ः शहर परिसरात आज, मंगळवार (दि. १८)पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवर, तसेच फूटपाथ व अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत बांधण्यात आलेले ओटे, कॅन्टोन्मेंटच्या जागेवर असलेले अतिक्रमण शुक्रवार (दि. २१)पर्यंत सुरू राहणाऱ्या मोहिमेत हटविण्यात येणार असून, याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनातर्फे जाहीर नोटिसीद्वारे सूचित करण्यात आले आहे.

देवळालीतील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय करणारे विक्रेते व कॅन्टोन्मेंटच्या जागेवर व रस्त्यावर बांधण्यात आलेले दुकानांचे ओटे, लेव्हिट मार्केट परिसरातील व्यावसायिकांनी मर्यादित जागेपेक्षा अधिक जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाने वारंवार सूचित करूनदेखील अतिक्रमण वाढतच आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने हौसनरोड, मिठाई स्ट्रीट, वडनेररोड, लामरोड, मेन स्ट्रीट, मशीद स्ट्रीट आदी रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमण काढण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी तथा आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगाराची डॉक्टरला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

डॉक्टर वेळेत आले नाहीत, या कारणास्तव नाशिकरोडच्या प्रेस रुग्णालयात प्रेस कामगारांनी डॉक्टरांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यात डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ले केल्याचे प्रकार ताजे असतानाच नाशिकरोडची ही घटना घडली.

नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी अॅण्ड करन्सी प्रेसचे नाशिक-पुणे मार्गावरील घंट्या म्हसोबा मंदिरासमोर मोठे रुग्णालय आहे. ओपीडीमध्ये डॉ. शीतल भीमराव जाधव (वय ४५, अशोका मार्ग, नाशिकरोड) हे अनेक दिवसांपासून सेवा देत आहेत. सोमवारी सकाळी साडेऊनच्या सुमारास डॉ. जाधव हे अॅम्ब्युलन्स विभागात काम करीत होते. त्यावेळी प्रेस कामगार पी. एन. सोनवणे हे तेथे आले. डॉक्टर तुम्ही आज वेळेत ओपीडीत का आले नाही, असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. डॉ. जाधव यांना या कामगाराने शिवीगाळ केली नंतर मारहाणही केली.

शिष्टमंडळ भेटीला

डॉ. जाधव यांना मारहाण झाल्याचे वृत्त समजताच नाशिकरोडच्या डॉक्टरांनी त्यांची भेट घेतली. घटनेचा तीव्र निषेध करून नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. तेथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. डॉक्टर हे प्रेस कामगारांच्या आरोग्यासाठी काम करीत असताना त्यांना अशी मारहाण करणे चुकीचे असल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला. संबंधित कामगारावर पोलिसांनी त्वरित कारवाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिव्ह यूअर हॉर्न अ ब्रेक...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजविण्याची वाहनधारकांची सवय सुटावी, ध्वनिप्रदूषण टळावे यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून शहरात ‘नो हॉर्न डे’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (दि. १७)देखील शहराच्या विविध भागात या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यासंदर्भात प्रबोधनासाठी विद्यार्थी, तरुणाईने विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. सिग्नल्सवर फलकांद्वारे जनजागृती करण्यात आली.

पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचारी, वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी-कर्मचारी, तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी असे सुमारे ५०० जण जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. सकाळी दहापासूनच सारडा सर्कल, कॅनडा कॉर्नर, स‌िटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर आयटीआय आदी ठिकाणच्या अनेक सिग्नल्सवर पोलिस, तसेच विद्यार्थी, युवकांनी जनजागृती केली. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे व ‘गिव्ह यूअर हॉर्न अ ब्रेक’, ‘नो हॉर्न प्लीज’ असे आवाहन करणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. जनजागृती करणाऱ्या पॉम्प्लेट्सचे वाहनधारकांना वाटप करण्यात आले. त्यांना प्रबोधनपर व्ह‌िडीओ चित्रफीतदेखील दाखविण्यात आल्या. आयुक्त डॉ. सिंगल यांनी शहरात वाहनधारकांना गुलाबपुष्पांचे वाटप करून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. द्वारका चौकात बच्चेकंपनीने वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप केले. नागरिकांनी गरज असेल तेव्हाच हॉर्न वाजवावा, शक्यतो सोमवारी हॉर्नचा वापर पूर्णत: टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले. आणखी काही सोमवार वाहनचालकांचे प्रबोधन सुरूच राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पोलिस कारवाईकडे वळणार आहेत. गरज नसतानाही कुणी कर्णकर्कश्श हॉर्न वाजविताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

--

‘अनावश्यक वापर टाळा’

सिन्नर फाटा ः शहर ध्वनिप्रदूषणातून मुक्त करण्यासाठी हॉर्नचा अनावश्यक वापर टाळा व रहदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सोमवारी येथे वाहनचालक व नागरिकांना केले. नाशिकरोड बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपायुक्त विजय पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ, निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, पंडित आवारे, प्रा. शरद मोरे, अंबादास पगारे, अशोक सातभाई, तसेच रिक्षाचालक, अन्य वाहनचालक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीवर ‘स्वाक्षरी’ची मात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरात अवैध वृक्षतोड सुरू केली असून, ती थांबवावी व न्यायालायाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी नाशिक शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी संस्थांनी एकत्र येत महापालिकेत सोमवारी स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी ३५० नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.

महापालिकेने शहरात वृक्षतोड करताना न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला असून, सुरू असलेली वृक्षतोड ही अवैध असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्याचा विपर्यास करून वाहतुकीला अडथळा नसलेली झाडेदेखील सर्रास तोडली जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. रस्त्याचा कडेला असलेली झाडेदेखील तोडली जात असून, असे प्रकार थांबविण्यात यावेत व जी अत्यावश्यक गरजेची आहेत तीच झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने वृक्षतोड करताना जी झाडे तोडणे गरजेचे नाही ती झाडेदेखील तोडली आहेत. वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी संस्थांना विचारात घेऊन वृक्षतोड करावी. ज्या झाडांचे पुनर्रोपण शक्य आहे, अशा झाडांचे पुनर्रोपण करावे. कोणतेही झाड तोडण्यापूर्वी मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, नाशिक यांच्या देखरेखीखालील तज्ज्ञ समितीची संमती महापालिकेने घेणे आवश्यक आहे. झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेने वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांची लागवड केलेली असावी. झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेकडे रिप्लांट केलेल्या आणि नवीन लावलेल्या झाडांच्या दीर्घकालीन संवर्धनाचे नियोजन आणि कृती कार्यक्रम असला पाहिजे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आठ दिवस मोहीम

ही मोहीम आठ दिवस सुरू राहणार असून, १० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील विविध कॉलेजेस, जॉगिंग ट्रॅक येथेदेखील या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वृक्षप्रेमींंनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या योजनांचा अभाव

$
0
0

मनपाचे चालू वर्षाचे बजेट १,४१० कोटींचे; जुन्या योजनांसह ई-गव्हर्नसवर भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१८-१८ या आर्थिक वर्षाचे तब्बल १,४१० कोटींचे बजेट स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे. गेल्या वर्षाचे सुधारित बजेट हे १,४०२ कोटींवर गेले असून, चालू वर्षाच्या बजेटमध्ये सहा कोटीची शिल्लक दाखविण्यात आली आहे. आर्थिक स्थितीमुळे बजेटमध्ये नव्या योजनांचा मोह टाळून आहे त्या योजना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. बजेटमध्ये वाहतूक सेल, पार्किंग, कालीदासचे नूतनीकरण, डीपीरोडच्या विकासावर भर देण्यात आला आहे. प्रशासनाने ई-गव्हर्नन्सला अधिक प्राधान्य दिले असले तरी, जुन्याच योजनांचा मारा या बजेटमध्ये करण्यात आला आहे.

पालिका निवडणुकांमुळे महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे बजेट दोन महिना उशीराने सोमवारी (दि. १७) स्थायी समितीला सादर करण्यात आले. प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याकडे ५ कोटी ९८ लाख रुपये शिलकीचे १४१० कोटी ७ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. गेल्या वर्षाचे बजेट हे १,३५८ कोटींचे होते. ते उत्पन्न वाढीमुळे १,४०२ कोटींपर्यत सुधारित पोहचले असून, चालू वर्षाच्या बजेटमध्ये गेल्या वर्षापेक्षा ६२ कोटींची अधिकची वाढ झाली आहे. या बजेटमध्ये १२२८ कोटींचे उत्पन्न दाखविले आहे. तर महसूली जमा १३९६ कोटी ७० लाख रुपये दाखवण्यात आले आहेत. एलबीटी धोरणात झालेला बदल आणि शासकीय अनुदानांना कात्री लागल्याने या वर्षी बजेट सादर करण्यात आले. बजेटमध्ये एलटीबी आणि शासकीय अनुदान पकडून ७७४ कोटी रुपये धरण्यात आले आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन योजना, अमृत व स्मार्ट सिटी योजनांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. बजेटमध्ये स्मार्ट सिटीसाठी ५० कोटींची तरतूद केली आहे.

नगरसेवक निधीला ब्रेक

बजेटमध्ये विकासकामांसाठी केवळ १३० कोटी रुपयेच धरण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांना पहिल्याच वर्षी नगरसेवक निधीपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. महापालिकेडून दरवर्षी आर्थिक स्थितीप्रमाणे ५० लाखांपेक्षा जास्त निधी हा नगरसेवक निधी म्हणून दिला जातो. परंतु, हा नगरसेवक निधी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

विकास शुल्कावर भर

महापालिकेत घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ झाली असली तरी, त्यातून १५ ते २० कोटीच रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा भर हा नगररचना विभागाकडून मिळणाऱ्या विकास शुल्काकडेच राहणार आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये ९७ कोटी रुपयांचे उत्पन्न विकास शुल्कातून अपेक्षित धरण्यात आले आहे. बांधकामांना परवानग्या देण्यास सुरुवात झाल्याने दोन वर्षांचा विकास शुल्कातून बॅकलॉग भरण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाआरोग्य’अंतर्गत लठ्ठपणाची शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत पाथर्डी फाटा येथील विकास छबुराव फुकटे या रिक्षाचालकावर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत करण्यात आली. लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणी व औषधोपचारांसह अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण, या विनामूल्य शिबिराच्या माध्यमातून संबंधित रुग्णास नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचारांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात आली. तपासणी, औषधोपचार व इतर खर्च कॉलेजमार्फत उचलण्यात आला. शिबिराच्या माध्यमातून झालेली ही राज्यातील पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे.

दि. १ जानेवारी रोजी नाशिक येथे विविध आजारावर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्याकरिता विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभही झाला. या शिबिरांतर्गत प्रथमच लठ्ठपणा या आजाराविषयी तपासणी कक्ष ठेवण्यात आले होते. या तपासणी कक्षांतर्गत जिल्ह्यातील २७७ रुग्णांची तपासणी पुणे येथील प्रसिद्ध बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी केली होती. त्यापैकी ४० रुग्णांना लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया करण्याबाबत सुचविण्यात आले होते. इतर रुगणांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व औषधे देण्यात आली होती. ४० रुग्णांची रक्त तपासणी व आवश्यक त्या चाचण्या नाशिकच्या गुरुजी रुग्णालयमार्फत मोफत करण्यात आल्या.

रिक्षाचालक विकास फुकटे घरातील एकमेव कर्ते असून, त्यांच्यासोबत वृद्ध आई-वडील आहेत. लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या फुकटे यांची शस्त्रक्रियेसाठीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी व रुग्णालयामार्फत भागविण्यात आला.

-गिरीश महाजन, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र अन् येथे दारिद्रय'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सटाणा :

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शेतकऱ्याच्या नशिबी दारिद्रय, अशी भयावह परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल करतानाच बळीराजाला सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय विरोधी पक्ष गप्प बसणार नाही, असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

मालेगावहून निघालेली संघर्ष यात्रा दुपारी सटाण्यात दाखल झाली. येथील बाजार समितीच्या आवारात सभेचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण म्हणाले, आता खऱ्या अर्थाने भाजप सरकारशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सरकार जोपर्यंत न्याय देत नाही व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करीत नाही, तोपर्यंत संघर्ष यात्रा सुरूच राहणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली. अडीच वर्षात राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सरकार केव्हा सातबारा कोरा करणार आहे. २०१९ सालातील निवडणुका डोळ्यासमोर कर्जमाफ करणार असेल तर तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, विद्यमान सरकार हे शेतकरी हिताचा आव आणणारे आहे. केवळ घोषणाबाजी करून सत्ता संपादन केल्यावर शेतकरी हिताकडे डोळे झाक केली आहे. उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कर्जमाफी केली जात आहे. मग महाराष्ट्रावर अन्याय का केला जात आहे. सरकारविरोधात ही संघर्ष यात्रा असल्याचे पवार म्हणाले.

कर्जमाफी कधी?

कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी रोजच आपले जीवन संपवत आहेत. यावर उपाययोजना करण्याचे सोडून राज्य सरकार मात्र बड्या उद्योगपतींना कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी कधी देणार, असा सवाल उप‌स्थ‌ित करून शेतमालास हमीभाव मिळावा, त्याचा ७/१२ कोरा करावा, हाच संघर्ष यात्रेमागील हेतू आहे. आणि जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोवर ही संघर्ष यात्रा सुरू राहील, असा इशारा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मालेगावच्या सभेत दिला.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा सोमवारी मालेगावात येथे दाखल झाली. यावेळी शहरातील मनमाड चौफुली येथे आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते रोहिदास पाटील, समाजवादी पक्षाचे आबू आझमी, आमदार भाऊसाहेब कांबळे, गोपालदास अग्रवाल, हेमलता पाटील, बी. डी. पाटील, शोभा बच्छाव, हिना गावित, पंकज भुजबळ, तुषार शेवाळे आदी विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडे राज्यात बुलेट ट्रेन, विमान वाहतूक आदींसाठी कोट्यवधी रुपये आहेत. केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? हे केवळ राजकारण आहे. मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट पाहत असून, अजून किती शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री कर्जमाफीचा निर्णय घेणार आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, नाबार्डने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकरी आत्महत्येवर राजकारण करणे चुकीचे असून शेतकरी जगाला पाहिजे.

यासाठी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना या विवंचनेतून बाहेर काढणे गरजेचे आहे. जापर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही संघर्ष यात्रा सुरू राहणार असेही पवार यांनी स्पष्ट केले. या सभेस तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यानच तालुक्यातील वाके येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी सजल्याने सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी वाके जावून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर संघर्ष यात्रा बागलाण तालुक्यातील नामपूर, सटाण्याकडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ निश्चयाला दिग्गजांचा सलाम

$
0
0



pravin.bidve@timesgroup.com
Tweet :@bidvepravinMT

नाशिक : ‘शिवडा चावल’ ही तांदळाची जात ज्या गावाने बहाल केली ते गाव म्हणजे सिन्नर तालुक्यातील शिवडे. येथील रसदार टोमॅटो वर्षानुवर्षे दुबईला निर्यात होतो. द्राक्षांचे युरोपीय देशांत चवीने सेवन केले जाते. असे हे गाव समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढ्यामुळे देशाच्या नकाशावर झळकले आहे. गावाच्या इतिहासात आमदार किंवा एखाद्या नेत्यापलीकडे गावात कुणी फिरकले नाही. परंतु, आघाडी सरकारच्या निम्मे मंत्रिमंडळासह राजकीय पक्षांमधील अनेक दिग्गजांना या गावात यावेच लागले. ‘ऐसे निश्चयाचे बळ ‍तुका म्हणे तेचि फळ’ याची प्रचिती शिवडे ग्रामस्थांनी त्यांच्या संघर्षातून दिली आहे.

चारशे उंबरे आणि सात हजार लोकवस्तीचे शिवडे गाव. वर्षात तीन पिके घेणारं. सुपिकतेला अंगाखांद्यावर खेळविणारं. या गावातील सुमारे ५५ हेक्टर जमीन समृध्दी महामार्गात जाते आहे. या प्रकल्पासाठी शिवडेतील ग्रामस्थांना त्यांची जमिन द्यावीच लागणार की सरकार विरोधात त्यांनी उभारलेला लढा यशस्वी होणार हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु, या ग्रामस्थांनी समृध्दी विरोधात पेटविलेल्या ठिणगीला आता वणव्याचे स्वरूप येऊ लागले आहे. भूमिहीन होण्याच्या आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या चिंतेने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी ‘करो या मरो’ ची भूमिका स्वीकारून शेती वाचविण्यासाठी लढा उभारला आहे. जमिनींच्या मोजणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला पिटाळून लावल्याने हे गाव राज्यात चर्चेत आले. गत आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या गावात येऊन शेतकऱ्यांना बळ दिले. पाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण सहा राजकीय पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्षयात्रेतील दिग्गज नेत्यांनाही या गावाला टाळून पुढे जाणे शक्य झाले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, राजेश टोपे, राधाकृष्ण विखे पाटील, भाई जगताप, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे यांसह तब्बल ६० आमदारांनी एकाचवेळी या गावात हजेरी लावली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यांच्या संघर्षाला सलाम केला. इतकेच नव्हे तर आम्ही या लढ्यात तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत आश्वस्तही केले. एवढे दिग्गज नेते पहिल्यांदाच गावात पहात असल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

शिवडेचे ग्रामस्थ ‘यू-ट्यूब’वरही

शिवडे ग्रामस्थांच्या संघर्षाची माहिती राज्यातील दिग्गज नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. आपली आईच आपल्यापासून हिरावून नेण्याचा घाट घातला जात असल्याने गावातील महिलाही आक्रमक झाल्या आहेत. जीव गेला तरी चालेल पण जमिनी देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थ खुलेआम जाहीर करीत आहे. यू-ट्यूबवरही ग्रामस्थांच्या संवादाच्या व्हिडीओ क्लिप पाहावयास मिळू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बातों से मानणार की लातों से?’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या तीन शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमुळे विरोधक कर्जमाफीसाठी अधिकच आक्रमक झाले असून सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ त्यांचे कुटुंबीयही आत्महत्या करत असल्याचे इतिहासात कधी पाहिले नाही असे सांगत, आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

संघर्ष यात्रेच्या दबावामुळेच ‘मी मुख्यमंत्री बोलतोय!’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आता मन की नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी धन की बात करा, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा संपल्यानंतर राज्यात प्रक्षोभ उठून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल असा इशारा देत, या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी सरकारला दिला आहे. आता ‘बातो से मानणार की लातो से’ असा सवाल विरोधकांनी सरकारला उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधीपक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचे नाशकात आगमन झाले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांची सहनशील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करताच आमचे आमदार निलंबित करण्यात येउन आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राज्यात कर्जमाफी मागणे हाही गुन्हा आहे काय? असा सवाल करत आम्ही सनदशीर मार्गाने लढा देत आहोत, असे विखे पाटील यांनी सांगितले. संघर्षयात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर या रस्त्यावर उतरून संघर्ष तीव्र केला जाईल. यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील.

कर्जमाफीचा ठराव

एक मे या महाराष्ट्र दिनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव असा ठराव राज्य सरकारकडे पाठवून लोकशाहीच्या आयुधाचा वापर करावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. वाढत्या कर्जामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असतांना मुख्यमंत्री उत्तर प्रदेश पॅटर्नचा अभ्यास करतो, म्हणतात. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय!’ मधून नवीन काही बोलले नाहीत, असेही ते म्हणाले.

यूपी पॅटर्न अभ्यासण्याची दुर्दैवी वेळ

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला विविध योजना दिल्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी या देशाला समतेची शिकवण दिली. त्याच महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्जमाफीच्या उत्तर प्रदेश पॅटर्न अभ्यासण्याची दुर्दैवी वेळ आल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. परंतु, आम्हाला उत्तर प्रदेश पॅटर्न मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सत्तेवर येतांना या सरकारने अनेक आश्वासने शेतकऱ्यांना दिली होती. मात्र आजवर एकाही आश्वासनाची पूर्ती करण्यात आली नाही. ७० हजार कोटींचा समृध्दी प्रकल्प सुरू करतात परंतु या राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसे नाही. मात्र, आता कर्जमाफीशिवाय थांबणार नाही, असे तटकरे यांनी सांगितले.

सहनशिलतेचा अंत पाहू नका

राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकारच्या कामगिरीबाबत शेतकरी समाधानी नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सहनशिलता संपली असून यानंतर उदभवणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. शेतकऱ्यांचे कुटुंबीय आता आत्महत्या करू लागले आहेत. मात्र, सरकार ढिम्म आहे. इतिहासात असे कधी घडले नाही. शेतमालाला भाव नाही. तूरखरेदी थांबविण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची तूरखरेदी केली जाते पण शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नाही. उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणार सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. मात्र, संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा रायगड येथून लवकरच सुरू होणार असून हा संघर्ष अधिक तीव्र केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

बुर्ज खलिफा कोणासाठी?

दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबईत उभारण्याचा मानस भाजप सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांचा मानस आहे. पण या बुर्ज खलिफामध्ये कोणता सामान्य शेतकरी जाणार आहे असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उपस्थित केला.

लढा सुरूच राहणार

खोटं बोलून सत्तेत आलेल्या सरकारने जागे व्हावे. स्वामीनाथन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा ही, आमची मागणी असून हा लढा सुरूच राहणार असल्याचे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादा भडकले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप सरकार विरोधातील संघर्षयात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित असतांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी भाजप सोबत का? असा प्रश्न विचारताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी चांगलेच भडकले.

संघर्षयात्रेच्या निमित्ताने मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. यात नेत्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आमची संघर्ष यात्रा भाजप सरकारविरोधी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यावर भाजपविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेसाठी एकत्र कसे? लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा? असा प्रश्न पत्रकारांनी केला. या प्रश्नावर अजित पवार भडकले. ही यात्रा शेतकऱ्यांसाठी आहे. सभापतीपदाचे काय घेऊन बसलात? हा स्थानिक विषय आहे, असा सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. त्यावर पत्रकारांनी पुन्हा कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे विचारताच अजितदादा अधिकच चिडले. आम्ही आमदाराकी, खासदारकी ओवाळू टाकू, तुम्ही काय शुल्लक पदांचे सांगताय? मी सांगितलेले फायनलच असते, खडे बोल पत्रकारांनाच सुनावले. दादाचा वाढलेला पारा लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मध्यस्ती करत, सारवासारव करण्याचा प्रयत्न करत हा स्थानिकस्तरावर विषय आहे, आंदोलन राज्यात सुरू असल्याची त्यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे यांनी माईक हाती घेत संघर्षयात्रेशी या विषयाचा संबंध नसल्याचा खुलासा केला. या प्रकारनंतर लागलीच पत्रकार परिषद आटोपटी घेण्यात आली.

अजित पवारांचाच टीआरपी हाय!

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विश्रामगृहावर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आले होते. अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, सनील तटकरे, पतगंराव कदम, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी यांच्यासह दिग्गज नेते होते. परंतु, या सर्वांमध्ये शेतकऱ्यांचा ओढा होता तो अजित पवारांकडेच. कर्जमाफीसाठी शेतकरी पवारांचीच भेट घेऊन त्यांनाच आपल्या व्यथा सांगून कर्जमाफी कराच अशी विनवणी करत होते. पत्रकार परिषदेनंतर पवारांच्या उपस्थिती ‘कर्जमाफी झालीच पाहिजे, भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आला. शेतकऱ्यांनी यावेळी दादाना गराडा घातला. शेतकऱ्यांच्या गराड्यामुळे संघर्षयात्रेच्या बसला नाशिकमधून निघण्यास उशीर झाला. या यात्रेतील सर्वनेत्यांमध्ये अजित पवार यांचाच टीआरपी सर्वात जास्त दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या प्रतीकात्मक पार्थिवाचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समृध्दी महामार्गाविरोधात एकवटलेल्या शिवडे ग्रामस्थांनी राज्यसरकारची प्रतिकात्मक तिरडी बांधून तिचे दहन केले. आमच्या काळ्या आईकडे वाकड्या नजरेने पहाल तर खबरदार असा इशाराही ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे. समृध्दी महामार्गासाठी शिवडे गावातील सुमारे १०० कुटंबांची ५५ एकर जमीन जात आहे. वडिलोपार्जित जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला असून त्याला पाठबळ देण्यासाठी संघर्ष यात्रा मंगळवारी या गावात दाखल झाली. संघर्षयात्रा गावातून बाहेर पडत असताना शेतकऱ्यांनी राज्य सरकार बद्दलचा रोष व्यक्त केला. राज्य सरकारची तिरडी बांधून तिचे प्रतिकात्मक दहन केले. ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आमच्या जमिनींकडे वाकड्या नजरेने पहाल तर सोडणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेला दिला. मंगला चव्हाणके या तरुणीने व्यक्त केलेल्या मनोगताने उपस्थित सर्वांच्याच अंगावर शहारे उभे केले. ‘हा बरबादी महामार्ग असून काळ्या आईचा सौदा आम्ही कदापी होऊ देणार नाही’, असा इशारा यावेळी देण्यात आला. देशाला समृध्द करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्याला समृध्द करावे लागेल या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची यावेळी आठवण करून देण्यात आली. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी सरकारच्या विरोधातील घोषणांचे फलक लावून संताप व्यक्त केला. आम्हाला सहानूभूती तसेच आश्वासने नको तर सहकार्य हवे आहे, असे संघर्ष यात्रेतील नेत्यांना सांगण्यास ग्रामस्थ विसरले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'...तर सरकारला पळता भुई थोडी करू'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात, हे सरकारने विसरू नये. आम्हीदेखील सरकार चालविले आहे. समृध्दीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसालासुध्दा पोलिसांना धक्का लावू देणार नाही. दडपशाहीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला, तर पळता भुई थोडी करू, असा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

राज्याचा कानाकोपरा पिंजून काढणारी संघर्षयात्रा मंगळवारी सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात पोहोचली. समृध्दी महामार्गाला शिवडे ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. आम्ही आमच्या वडीलोपार्जित जमिनी कदापी देणार नाही, अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली असून त्यांना पाठबळ देण्यासाठी संघर्षयात्रा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या गावात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, की आम्ही आश्वासने द्यायला नव्हे येथील वस्तुस्थिती समजून घ्यायला आलो आहोत. नागपूर आणि मुंबईला जोडणारा सध्याचा महामार्ग दोन्ही बाजूने दोन-दोन पदरी वाढविला तरी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था होऊ शकते. जुन्या सुविधा असताना नवीन महामार्ग उभारण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या महामार्गासाठी राज्यातील तब्बल ५२ हजार एकर जमीन वापरली जाणार असून हा समृध्दी महामार्ग नव्हे तर ‘उध्वस्त महामार्ग’ असल्याची टीका पवार यांनी केली. जातपात विसरून तसेच ‘शेतकरी’ ही एकच जात मानून या महामार्गाला विरोध करण्यासाठी एकजूट कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. मोजणीसाठी गावात कुणाला पाय ठेऊ देऊ नका, असे आवाहन करताना आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

महेश पाटील, मर्यादेत राहा

प्रांताधिकारी महेश पाटील अत्यंत मग्रुरीची भाषा वापरतात त्यांना कसे वागावे, महिलांशी कसे बोलावे याचे भान नाही, अशा तक्रारी संघर्षयात्रेतील नेत्यांकडे जाहीरपणे करण्यात आल्या. विखे पाटील यांनी पाटील यांचा समाचार घेतला. अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा सांभाळाव्यात. फार मस्ती येऊ देऊ नये. आम्हाला मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही. अधिकाऱ्यांची केव्हा विकेट जाईल, हे त्यांनाही कळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिष्ठा पणाला लावू

समृध्दी महामार्ग जातो त्या आसपासच्या परिसरात अधिकाऱ्यांनीच जमिनी घेऊन ठेवल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारने या महामार्गासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली तर आम्ही देखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पगाराएवढेच काम करा

‘जेवढा पगार मिळतो तेवढेच काम करा’, असा खोचक टोलाही त्यांनी पोलिसांनी लगावला. खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्याच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना राजिनामा देण्यास भाग पाडावे. गावातून त्यांची मिरवणूक काढू. परंतु, त्यांनी तसे केले नाही तर त्यांची गाढवावरून धिंड काढायला सुध्दा मागे पुढे पाहिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी विखे पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केंद्रातर्फे मदतीसाठी पुढाकार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकमध्ये असहाय अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांना केंद्र सरकारतर्फे आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी दिले. १९३० ते १९६० या तीन दशकांत बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची त्यांच्या निवासस्थानी खासदार गोडसे यांनी भेट घेत विचारपूस केली. अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचा एकांतवास सर्वप्रथम ‘मटा’नेच प्रकाशात आणला होता.

सर्वप्रथम बंगाली चित्रपटांतून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीस प्रारंभ करणाऱ्या स्मृती बिश्वास-नारंग यांनी पुढे लाहोर, कोलकाता व मुंबई या ठिकाणी तब्बल ९० चित्रपट केले. ‘नेकदिल’, ‘हमसफर’, ‘अनुराग’, ‘डाका’, ‘मॉडर्न गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही भारतीय सिनेरसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. या अभिनयाच्या साम्राज्ञीला वार्धक्यात मात्र कफल्लकपणा वाट्याला आला असून, त्यांच्यावर एकांतवासात राहण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे ‘मटा’ने उजेडात आणले होते. त्यानंतर खासदार गोडसे यांनी सोमवारी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत मदतीबाबत विचारणा केली असता त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यावर केंद्रातर्फे मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार गोडसेंनी यावेळी दिले. या भेटीप्रसंगी अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचे पुत्र राजीव नारंग उपस्थित होते.

अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रपटसृष्टीतील योगदान उल्लेखनीय आहे. त्याची दखल शासकीय पातळीवर नक्कीच घेतली जाईल. ज्येष्ठ कलाकार या नात्याने केंद्र सरकारमार्फत त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देईन.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाकडून एक लाखाचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अहमदाबाद-धुळे एसटी बसमध्ये एका प्रवाशाच्या ताब्यात प्रतिबंध असलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा हिरा गुटखा व सुगंधित तंबाखूचे चार पोते आढळून आल्याने मंगळवारी (दि. १८) साक्री पोलिसांकडून ते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संशयित रमेश रामचंद्र पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदाबाद-धुळे या एसटी बसमधून (एमएच २०, बीएल ४१३१) प्रतिबंध असलेला गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर साक्री शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एसटी बसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रमेश पाटील यांच्या ताब्यात सुमारे १ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मृती संगीत सभा शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वर्गीय प्राध्यापक अरूण वसंत दुगल स्मृती संगीत सभेचे आयोजन शनिवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे करण्यात आले आहे.

या सभेत पुण्यातील विख्यात गायिका सानिया कुलकर्णी पाटणकर यांच्या शास्त्रीय व नाट्यसंगीताची प्रस्तुती होईल. सानिया कुलकर्णी पाटणकर या जयपूर, अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदूषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या आहेत. त्यांनी सवाई गंधर्व (पुणे), सप्तक (अहमदाबाद), पाडवा पहाट (पिंपळपार, नाशिक), तानसेन महोत्सव (ग्वाल्हेर), बाबा हरवल्लभ समारोह (जालंधर) यासारख्या भारतातील सर्व महत्त्वाच्या संगीत महोत्सवात तसेच परदेशातही आपल्या गायकीचा ठसा उमटवला आहे. त्या आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘अ’ श्रेणीच्या कलाकार असून, भारत सरकारच्या शास्त्रीय संगीतासाठीच्या कलाकार पॅनलवरदेखील नियुक्त आहेत. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यदायी कारले खातेय भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आरोग्यादायी गुणांमुळे कारल्याला वर्षभर मागणी असते. त्यामुळे वर्षभर पिकणाऱ्या कारल्याचे उत्पादन यंदा मात्र कमी झाल्याने त्यांची आवकही घटली आहे. सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ शंभर ते दीडशे क्रेट्स आवक होत असल्याने त्यांना ८०० ते ९०० रुपये प्रतिक्रेट दर मिळत आहे. त्यामुळे सध्या कारले भाव खात असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोंपर्यंत दर पोहोचले आहेत.

गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा कारल्याचे दर वाढले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी येणारे कारले १० किलोंच्या क्रेट्समध्ये आणले जातात. त्यांना ८०० ते ९०० रुपये भाव मिळत असला, तरी हा भाव होलसेलचा असल्याने किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोपेक्षा कमी दरात कारले मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी कारले आणखी कडू झाले आहे.

शेतकरी वर्षभर कारल्याचे पीक घेत असतात. मात्र इतर ऋतूंप्रमाणे उन्हाळ्यात हे पीक घेणे अवघड असते. पाण्याची टंचाई, रोगांचा आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव आदींमुळे पिकाचे उत्पादन घटते. नाशिक जिल्ह्यात तर सध्या केवळ वैतरणा डॅम परिसरात कारल्याचे उत्पादन होत आहे. याच भागातून कारले विक्रीसाठी बाजार समितीत येत आहेत. कारले पिकावर बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनात घट येते. प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. गेल्या काही महिन्यांपासून कारल्याला भाव मिळत नसल्यामुळे, तसेच पाणीटंचाईमुळे कारल्याची लागवड कमी झालेली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांपर्यंत कारल्याचे दर कमी होणार नसल्याची शक्यता आहे.

कारले उत्पादनासाठी साधारणपणे एकरी ७५ हजार रुपये खर्च येतो. उन्हाळ्यात फूल आणि कळी गळतात. जोराचा वारा सुटल्यास हे प्रमाण वाढते. परिणामी उत्पादन घटते. चांगले दर मिळत असले, तरी आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होतो, असे नाही.

- दत्तू तांबे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images