अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून कर्ज काढून देतो म्हणून १९ महिलांना प्रत्येकी पाच हजारांचा गंडा घातल्याची तक्रार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड येथे राहणारे सूर्यकांत चिंतामण भालेराव आणि औरंगाबाद येथे राहणारे शितला सूर्यकांत भालेराव, शेषराव वामनराव नाठे यांनी द्वारका येथे राहणाऱ्या निर्मला मधुकर मोरे यांना कर्ज मिळवून देतो, असे सांगितले.
↧