गरीबीचे चटके सोसत तो मोठा झाला. हातावरचं पोट आणि मजुरी जेमतेमच. यामुळे आई वडीलही हवालदिल. अपंग बहिणीच्या काळजीनं तर घरात अस्वस्थताच. अशाही परिस्थितीत शिक्षण व इंडियन आर्मीत जाऊन देशसेवा करायची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
↧