Quantcast
Channel: Maharashtra Times

कोविड केअर सेंटरला हेल्पिंग माईंडतर्फे मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्पिंग माईंड या ग्रुपने कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर झालेल्या सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयास पन्नास बेड, पन्नास गाद्या आणि उशा भेट देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

नागरिकांना मदत करताना सिटी बँक ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट विशाल गडाख यांनी स्वखर्चाने सिन्नर तालुक्यातील २० हजार कुटुंबांना होमिओपॅथिक औषधांचे वितरण केले. सिन्नर तालुक्यात करोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहले आहे. या स्थितीत सामाजिक संस्था व व्यक्तींनी सिन्नर कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ज्वालामाता लॉन्सचे संचालक व बांधकाम व्यावसायिक शेखर गोळेसर, विशाल गडाख, ॲड. योगेश गडाख, डॉ. हर्षद महात्मे, ॲड. धीरज रहाटळ, सोमनाथ नाठे, भाऊसाहेब खैरनार व रवी गोजरे या मित्रांनी एकत्रित येत सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव आदी उपस्थित होते.

स्वत:च विणल्या बाजा

बेड तयार करण्यासाठी लोखंडी साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र, विणकामासाठी कारागीर मिळत नव्हते. या तरुणांनी यू ट्यूबच्या माध्यमातून बाज विणण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. या मित्रमंडळींमध्ये विशाल गडाख यांनीही आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत तब्बल १२ खाटा विणल्या. बेड निर्मितीमध्ये मधुकर नाठे व संतोष भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वीस हजार कुटुंबात औषध वाटप

नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम ३० बी या औषधाचे सिन्नरसह तालुक्यातील २० हजार कुटुंबांना वाटप करण्यात आले. या कामात विशाल गडाख यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधला. आणखी काही मित्र परिवाराच्या वतीने अन्य २० हजार कुटुंबांपर्यंत औषधे पाठविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषिमंत्र्यांच्याच गावात मिळेना युरिया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशन करून तेथील युरियाची साठेबाजी उजेडात आणली. मात्र खुद्द कृषिमंत्र्यांच्याच गावी मात्र बळीराजावर युरियासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री भुसे यांनी बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचे आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची कामे आटोपली आहेत. आता शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात युरीयाची मागणी होत असल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार मालेगावातील शासकीय गोदामात असलेला बफर्स स्टोकमधील युरिया उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्याचे वाटप सुरू होते. मात्र मंगळवारी ( दि २१) या युरिया वाटप केंद्रावर युरिया मिळत नसल्याने उपस्थित संतप्त शेतकरी कॅम्प रस्त्यावर उतरले.

शहरातील कॅम्प रस्त्यावरील शासकीय गोदाम मधून शेतकऱ्यांना खतांची विक्री करण्यात येत होती. मंगळवारी (दि. २१) सकाळी खत घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नसल्याचे सांगण्यात आल्याने ते संतप्त झाले आणि कॅम्प रस्त्यावर उतरले. यावेळी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे आदींसह शेतकरी सहभागी झाले. दरम्यान शेतकरी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजित राजपूत, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. अखेर शेतकऱ्यांना गोदामात शिल्लक साठ्यामधून प्रत्येकी एक गोणी युरिया देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रशासनाचे षडयंत्र ?

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे मिळावे यासाठी विविध योजना राबवीत आहेत. परंतु मालेगावात शेतकऱ्यांना युरियासाठी रस्त्यावर उतरावे लागत असून कृषिमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी अधिकारी षडयंत्र करीत युरियाचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी केला. मंत्री भुसे यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लॉकडाउनमध्ये आंदोलनाची वेळ

'मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट'अशी ओळख पुसण्यात आला कुठे प्रशासनाला यश मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्या वाढीवा वेग मंदावला आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांना मालेगावत रस्त्यावर उतरावे लागले. यामुळे संचारबंदीच्या नियमांचा तर भंग झालाच, शिवाय करोनाचा प्रसार होण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळसेतील बछडा बोरीवलीला रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

पळसे गावाच्या शिवारातील संतोष रामदास गायधनी यांच्या शेतातील पिंजऱ्यात मंगळवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास बिबट्याचा दीड वर्षे वयाचा बछडा जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांतील जेरबंद झालेला हा तिसरा बिबट्या असून, यापूर्वी सामनगाव आणि जाखोरी येथे बिबट्या जेरबंद झाला होता.

दारणा काठावरील गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दोनवाडे, बाभळेश्वर आणि हिंगणवेढे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकाना आपले प्राणही गमावे लागलेले होते. त्याशिवाय शेवगेदारणा, पळसे, सामनगाव, चेहेडी आणि कोटमगाव आदी ठिकाणी नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासून वन विभागातर्फे या भागातील गावात बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू होती. सोमवारी पळसे गावातील गवंदे मळ्यातील वन विभागाने पिंजरा ठेवला होता. या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे दीड वर्षे वयाचा मादी बछडा जेरबंद झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या बछड्याला ताब्यात घेतले. हा मादी बछडा येथून पुढे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्कामी राहणार आहे. वन विभागाच्या खास वाहनातून या बछड्यास बोरीवली येथे धाडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील नगरसूल ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करीत डॉक्टरांवर दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांवरील या भ्याड हल्याचा निषेध करीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संरक्षणार्थ उपाययोजना करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने येवला प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे आणि तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन प्रसंगी पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, कोविड केअर सेंटरप्रमुख डॉ. आनंद तारु, नोडल अधिकारी येवला ग्रामीण डॉ. शरद कातकडे, डॉ. हनुमान पळवे आदी उपस्थित होते.

येवला तालुक्यातील नगरसूल कोविड सेंटर येथे सोमवारी (दि.२०) रात्री एका ६२ वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ही महिला मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराने ग्रस्त असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. या रुग्णाची ऍन्जीओप्लास्टी सुद्धा झालेली होती. सदर रुग्णेवर आयसीएमआरच्या नियमानुसार योग्य पद्धतीने उपचार सुरू होते. परंतु तिला श्वसनास त्रास वाढू लागल्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजनसह सर्व औषधोपचार तातडीने केले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान सदर रुग्ण दगावला. रुग्ण दगावल्याची बातमी समजताच मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी डीएचसी आवारात लोकांचा जमाव गोळा करुन डॉक्टरांना शिवीगाळ केली व डॉक्टरांवर दगडफेकीचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात वैद्यकीय अधिकारी साहेबराव मदनुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड हे थोडक्यात बचावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कोमॉर्बिड रुग्णांचा शोध घेणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील करोनाबळींमध्ये गुंतागुतीचे आजार असलेले (कोमॉर्बिड) रुग्ण अधिक असल्याने महापालिकेने आता अशा रुग्णांची मिशन झिरोअंतर्गत शोधमोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्युदर वाढण्यामागे करोनासोबतच हदयरोग, रक्तदाब, मधुमेह, अतितणाव, किडणीचे आजार, दमा आदी आजार प्रामुख्याने समोर येतात. अशा रुग्णांना करोनाची लागण झाल्यानंतर गुंतागुत वाढण्यासह त्यांच्यावर उपचाराला विलंब होत असल्याने आता महापालिका स्वतंत्रपणे या रुग्णांचा शोध घेणार आहे. विविध आजार असलेल्या अशा रुग्णांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमेंनी दिली आहे.

सध्या करोनाची लागण झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला हदयरोग, मधुमेह किंवा रक्तदाब असल्याचे लक्षात येते. त्यामुळे उपचाराला विलंब होऊन करोनाचा प्रसार होण्याबरोबरचं रुग्ण दगावण्याची अधिक शक्यता असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने अशा रुग्णांमुळे करोनाबळींची संख्या वाढत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने मिशन झिरो नाशिकअंतर्गत सर्वसाधारण आजारांची गुंतागुंत असलेले (कोमॉर्बिड) रुग्ण शोधण्याची मोहीम संपूर्ण शहरात हाती घेतली आहे.

मोबाइल डाटा ऑनलाइन होणार

मिशन झिरोअंतर्गत शोध घेतल्या जाणाऱ्या रुग्णांची माहिती आता थेट मोबाइल अॅपवर अपलोड होणार आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अॅप विकसित केले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव, त्याचे वय, त्याला असलेला आजार आदींची माहिती अॅपवर येस, नो या स्वरूपात अडीच मिनिटांत भरली जाणार आहे. याचा फायदा अॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेला डाटा कॉल सेंटरला कन्टेक्ट करून मॉनिटरिंग करता येणार आहे. एखादा रुग्ण दाखल झाल्यास त्याला असलेला आजार, वयोगट आदींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार असल्याची माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणारे उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार पेरणीचे संकट

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : शासकीय नोंदींनुसार जिल्ह्यातील पेरण्यांनी आतापर्यंत सुमारे ८० टक्क्यांचे लक्ष गाठले असले तरीही मधल्या तीन ते चार आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, खरिपाच्या पहिल्या हंगामात केलेली पेरणी काही तालुक्यांमध्ये संकटात सापडली आहे. ज्या ठिकाणी पावसाऐवजी पाण्याच्या स्त्रोतांवर पिकांनी तग धरला, त्या ठिकाणी आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची नामुष्की अगोदरच लॉकडाउनशी झुंजणाऱ्या बळीराजाच्या गळी पडणार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात जोमदार झाली. तत्पूर्वी जिल्ह्याच्या काही भागास निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिला होता. मात्र हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने अल्पावधीतच पेरण्यांनी वेग घेतला होता. शासकीय नोंदीनुसार जिल्ह्यात सुमारे ५ लाख हेक्टरवरील क्षेत्रात पेरण्या झाल्या असल्या तरीही सुमारे तीन आठवडे ते महिनाभराच्या कालावधीदरम्यान पावसाने उघडीप दिली. परिणामी जिल्ह्यातील चांगले पर्जन्यमान असणाऱ्या निफाडसारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी विहिरी, बोअरवेलसारख्या पाण्यावर पिके अद्यापपर्यंत कशीबशी तगविली आहेत. यासंदर्भात तारुखेडले (ता. निफाड) येथील शेतकरी वसंतराव खेलूकर यांनी सांगितले, की मधल्या काळात अपेक्षित पाऊस न पडल्याने आमची सोयाबीन, मका ही पिके जळाली आहेत. त्यामुळे पुन्हा पेरणी करण्याशिवाय गत्यंतर नाही.' वडाळीभोई (ता. चांदवड) येथील शेतकरी मनोज आहेर यांनी सांगितले, की बोअरवेल व विहिरीसारख्या स्त्रोतांवर कशीबशी पिके सांभाळली असली तरीही या क्षणासही पावसाची प्रतीक्षा आहे. चांदवड व नजीकच्या नांदगाव, येवला यासारख्या तालुक्यातील पहिल्या पेरणीतील पिके तग धरण्याचे चित्र फारसे आशादायक नाही. लवकर पाऊस न झाल्यास बहुतांश तालुक्यात दुबार पेरणी करावी लागेल. पाटोळा (ता. सिन्नर) या गावातील शेतकरी संदीप खताळे म्हणाले, की सुमारे वीस ते तीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी पहिल्या पेरण्या उतरणीस न लागल्याने आता दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.

चोहोबाजूंनी बळीराजाची कोंडी

दुबार पेरणीच्या संभाव्य संकटास यंदा केवळ पावसाचे लांबणे इतकेच एकमेव कारण नाही. तर या सोबतीला शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले बोगस बियाणे, खतांचा झालेला काळाबाजार, पिकांवर खोडकिडीसारखे उद्भवलेले नवीन रोग, पावसावरचे अवलंबित्व, जमिनीच्या पोटातील पाण्याची घटलेली पातळी, खतांची अनुपलब्धता, लॉकडाउनमुळे पिकांचे पडलेले भाव परिणामी भांडवलाची अनुपलब्धता आदी कारणांमुळे सर्वच स्तरांवर बळीराजाची कोंडी झाली आहे.



भात आवणीही संकटात

इतर पिकांसोबतच आदिवासी पट्ट्यात भाताच्या लागवडीनेही वेग धरला होता. काही दिवसांपूर्वींच्या कृषी विभागाकडील नोंदींनुसार १५ ऑगस्टपर्यंत भाताची लागवड शंभर टक्क्यांपर्यंत जाणार असल्याचा दावा केला जात होता. पण आता पावसाने दडी मारल्याने भात आवणीदेखील संकटात सापडली आहे. जिल्ह्यातील पेरण्यांच्या स्थितीमध्ये सिन्नर, मालेगाव, बागलाण, नांदगाव या तालुक्यांमध्ये सुमारे ९० टक्के; देवळा, येवला व निफाड तालुक्यात ८० टक्के, तर कळवण व चांदवड तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झाल्या आहेत. पेठ व सुरगाणा तालुक्यात २६ टक्के, नाशिकमध्ये ४३ टक्के, दिंडोरीत ५० टक्के, इगतपुरीत ३९ टक्के तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या १५ टक्के पेरण्यांची नोंद करण्यात आली आहे.

...

यंदा पावसाचा जोर नाही

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर नाही. गतवर्षी जुलैमध्ये ४५ टक्के पाऊस झाला होता, यंदा मात्र ही नोंद सहा टक्क्यांनी कमी म्हणजे ३८ टक्के इतकी आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. यंदा जूनमध्ये सिन्नर, बागलाण, मालेगांव, येवला या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. मात्र पेठ, चांदवड, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांनी सरासरीदेखील गाठलेली नाही. जुलै महिन्यात अवघा ४० टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात केवळ नांदगांवमध्ये सरासरीच्या पावसाची नोंद झाली. तर जुलै महिन्यात बागलाण तालुक्यातही सरासरीस अपेक्षित पाऊस झाला. मात्र दिंडोरी तालुक्यात अवघा १४ टक्के पाऊस पडला आहे. निफाड, सिन्नर, येवला, नाशिक या तालुक्यांसह आदिवासी पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांमध्ये सरासरीच्या अपेक्षेत निम्म्यापेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याधीच बेतताहेत जिवावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करोनाचा संसर्ग जीवघेणा ठरत असून, आतापर्यंत या विषाणूने ४१२ जणांचा बळी घेतला आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा तपशील धक्कादायक आहे. करोनाबरोबरच उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार, मधुमेह, दम्यासारखे श्वसनाचे विकार यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना मृत्यू लवकर गाठत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांमधील सूत्रांनी दिली.

शारीरिक व्याधी असलेल्या २८८ जणांना मृत्यूने गाठले आहे. यामध्ये उच्च रक्तदाबाचे ८२, मधुमेह व हृदयाचे विकाराचे ११५, दमा व श्वसनासारखे विकार असणारे ३० जण तर किडनीचे विकार, एड्स व तत्सम आजार असणाऱ्या ६१ जणांच्या मृत्यूला करोना संसर्ग हे निमित्त ठरले आहे. ७० टक्के रुग्णांना करोनाच्या संसर्गाबरोबरच अन्य गंभीर आजार होते. ते आटोक्यात न आल्याने या रुग्णांचा बळी गेला आहे. तर ३० टक्के रुग्ण अन्य कोणतीही शारीरिक व्याधी नसतानाही केवळ करोना संसर्गामुळे दगावल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. सर्दी, ताप, खोकला, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसत असतानाही करोनाची तपासणी करवून न घेणे, वेळीच उपचारांना प्राधान्य न देणे, अहवाल विलंबाने प्राप्त होणे बाधित रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. प्रकृती अधिक ढासळल्यानंतर हॉस्पिटल्समध्ये दाखल झालेल्या ४२० पैकी १६६ बाधितांचा पहिल्या दिवशीच मृत्यू होणे चिंताजनक आहे.


७३ टक्के मृत्यू व्हेंटिलेटरवर

करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३०१ जणांचे म्हणजेच ७३ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेऊन त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. यामध्ये १७२ रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते. ४१ ते ६० वयोगटातील ९३ रुग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात आले. परंतु, ते वाचू शकले नाहीत. ४१२ पैकी ४०९ रुग्णांचे मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले असून, दोन मृत्यू कोविड केअर सेंटरमध्ये, तर एक मृत्यू कोविड केअर हॉस्पिटलमध्ये झाला आहे. यापैकी २७४ रुग्णांचे मृत्यू पहिल्या दोन दिवसांत झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या दोन दिवसांत २७४ म्हणजेच ६६ टक्के मृत्यू

१६६ म्हणजे ४० टक्के मृत्यू पहिल्या दिवशी.

१०८ म्हणजे २६ टक्के मृत्यू दुसऱ्या दिवशी

मृतांपैकी ७० टक्के रुग्णांना होते गंभीर आजार.

२.१८ टक्के म्हणजेच नऊ रुग्णांचा मृत्यू झाला घरीच.

मृतांमध्ये १३७ महिला तर २८३ पुरुषांचा समावेश.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करोनाविरुद्ध नव्हे, पक्षांतर्गतच पेटला संघर्ष!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

करोना संसर्गाचा शहरात उद्रेक होत असताना नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, आयुष काढावाटप करण्यासह स्क्रीनिंग टेस्टसारखे सामाजिक उपक्रम भाजप नगरसेवकांनी हाती घेतले आहेत. मात्र, एकाच प्रभागात नगरसेवकांकडून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी वेगवेगळ्या चुली मांडण्याचा प्रकार नागरिकांना खटकू लागला आहे. नगरसेवकांच्या अशा विसंगत वागण्यामुळे भाजप पदाधिकारीही वैतागल्याचे दिसून येत आहे.

नाशिकरोड परिसरातील प्रभाग २० मधील नगरसेवक संभाजी मोरुस्कर आणि शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड यांनी आपापल्या संपर्क कार्यालयात औषधवाटप, स्क्रीनिंग चाचणी उपक्रमाची बुधवारी सुरुवात केली. मोरुस्कर यांच्याकडील कार्यक्रमास आमदार अॅड. राहुल ढिकले, तर गायकवाड यांच्याकडील कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

एकाच प्रभागात एकत्र येण्याऐवजी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याने गायकवाड आणि मोरुस्कर यांच्यातील राजकीय कुरघोडीची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड यांच्या गळ्यात नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्षपदाची माळ पडल्याने गायकवाड विरुद्ध मोरुस्कर असा सुप्त राजकीय संघर्ष आक्रमक झाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अन्य विविध सामाजिक उपक्रमांमधूनही या दोन्ही नेत्यांमधील कटुता वेळोवेळी दिसून आलेली आहे. याशिवाय नाशिकरोड मंडळात ढिकले समर्थकांशिवाय माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थकांचा गट अजूनही सक्रिय आहे.

रुग्णांची लूट थांबली

करोनाबाधितांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात येताच भाजपने राज्य सरकारवर दबाव आणत सर्व खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराचे दरपत्रक लावण्यास भाग पाडल्याचा दावा आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी केला. प्रभाग क्रमांक २० मध्ये आर्सेनिक अल्बम औषधी, आयुष काढा वाटप आणि नागरिकांची स्क्रीनिंग चाचणी उपक्रम प्रारंभी ते बोलत होते. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून करोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भाजप करणार भीती दूर

नागरिकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवकांकडून केला जाणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. शिक्षण सभापती संगीता गायकवाड यांच्या पुढाकारातून त्यांच्या संपर्क कार्यालयात टेंपरेचर स्क्रीनिंग आणि पल्स ऑक्सिमीटर चाचणीप्रारंभी महापौर बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते सतीश सोनवणे, मंडलाध्यक्ष हेमंत गायकवाड, नगरसेवक संगीता गायकवाड, शरद मोरे, डॉ. अनुप गावंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील धरणे तहानली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अजूनही तहानलेली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा नऊ टक्क्यांनी अधिक असला तरी तीन धरणांनी तळ गाठला आहे. ७ जुलैला धरणांत ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पावसामुळे १५ दिवसांत तो पाच टक्क्यांनी वाढला आहे.

जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण २४ धरणे आहेत. ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. शेती, उद्योग, आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी याच धरणांमधील पाणीसाठा उपयोगात येतो. त्यामुळे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे बहुतांश धरणे पुर्ण क्षमतेने भरली. मात्र, पाणी वापरही होत असल्याने आजमितीस या धरणांमध्ये २५ हजार ५४३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. १५ दिवसांपूर्वी म्हणजेच ७ जुलैला जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा २० हजार ३५४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३१ टक्के होता. परंतु, २२ जुलै रोजी त्यात ५ हजार १८९ दशलक्ष घनफूटने वाढ होऊन ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. गतवर्षीच्या तुलनेत धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा समाधानकारक असला तरी पुढील सव्वा दोन महिन्यांत चांगला पाऊस झाला तरच धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकणार आहेत.

पालखेडसह गिरणा खोऱ्याला लाभ

काही दिवसांत नांदगाव, मालेगावसह अन्य काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाचा लाभ पालखेड आणि गिरणा धरण समूहाला झाला. त्यामुळे ओझरखेड धरणातील पाणीसाठा ११ वरून ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणातील पाणीसाठा ४४ वरून ६० टक्क्यांवर तर भावलीतील पाणीसाठा ४१ वरून ७६ टक्क्यांवर पोहोचला. वालदेवी, कडवा या धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

धरणनिहाय पाणीसाठा टक्केवारी (७ जुलै आणि २२ जुलै)

धरण ७ जुलै २२ जुलै

गंगापूर ४७ ५२

काश्यपी २१ २४

पालखेड ३२ ३१

गौतमी १६ २१

वाघाड १६ ०९

करंजवण १७ १८

दारणा ४४ ६०

भावली ४१ ७६

मुकणे २३ २७

वालदेवी १५ ३४

गिरणा ३८ ३९

ओझरखेड ११ ४०

पुणेगाव ११ ११

तिसगाव ०८ ०९

कडवा ०४ २०

नागासाक्या १९ २३

पुनद ४५ ४५

माणिकपुंज ०० १६

आळंदी ० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार उद्या नाशिक दौऱ्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यासह शहरातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशकात येणार अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आता उद्या, शुक्रवारी नाशिकला येऊन करोनाचा आढावा घेणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेण्यासाठी पवार शुक्रवारी (दि. २४) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे असणार आहेत. पवार करोना नियंत्रणाचा कार्यक्रम घेऊनच दौऱ्यावर येणार असल्याने यंत्रणांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बळ वाढणार आहे. पवार करोनासंदर्भात जिल्ह्यातील सामाजिक संस्था, सेवाभावी कार्यकर्ते यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शहरासह जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असतानाच जिल्ह्यातील करोना नियंत्रणांसाठी खुद्द पवारच नाशिकच्या मैदानात उतरल्याने आता त्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.


सांगितले मुख्यमंत्री, अवतरणार पवार!

नाशिक शहरातील लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री ठाकरे नाशिकला येणार होते. त्यासंदर्भातील सूतोवाच खुद्द पालकमंत्री भुजबळ यांनीच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री येणार अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पवारांनी जिल्ह्यात एंट्री घेत लीड घेतला आहे. त्यामुळे घोषणा ठाकरेंच्या दौऱ्याची, पण अवतरणार पवार अशी स्थिती पहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करोनायोद्धे पाहिजेत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एकीकडे करोनाचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे या करोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेला आता करोनायोद्ध्यांची उणीव जाणवत आहे. आरोग्य विभागात डॉक्टर, परिचारिकांची संख्या तुटपुंजी ठरत असल्याने महापालिकेने वैद्यकीय विभागातील रिक्त पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात तब्बल ७६१ पदांची भरती केली जाणार असून, ही सर्व पदे तीन ते सहा महिन्यांसाठी मानधनावर भरली जाणार आहेत. तातडीची बाब म्हणून ही भरती करण्यात येत आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी अशी महत्त्वाची पदेही भरली जाणार आहेत. त्यामुळे करोना संकटात या जम्बो भरतीने दिलासा मिळणार आहे.

शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिकेकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. शहरात सुरुवातीच्या काळात करोना नियंत्रणात होता. मात्र, अनलॉक झाल्यापासून शहरात करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे कोविड सेंटर्समुळे वैद्यकीय विभागावर मोठा ताण आहे. सध्या महापालिकेकडे आरोग्य व वैद्यकीय विभागातील कर्मचारी निरंतर काम करीत असून, अशा वेळी त्यांना तात्पुरती विश्रांती देण्याची गरज आहे; अन्यथा आरोग्य व्यवस्थाच पांगळी होण्याची भीती आहे. सरकारकडेही पर्यायी कर्मचारी उपलब्ध नाहीत. सरकारच्या पोर्टलवरून आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कर्मचारी मागवले जात असले तरी ते रुजू होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता महापालिकेने डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी भरती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांपासून अगदी एएनएमपर्यंत भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यात तब्बल अडीचशे पदे स्टाफ नर्ससाठी आहेत, तर बीएएमएस म्हणजेच आयुर्वेद पदवीधरांसाठीही शंभर जागा आहेत. त्याचप्रमाणे मल्टिस्किल हेल्थ वर्करचीही शंभर पदे भरण्यात येणार आहेत. पन्नास वैद्यकीय अधिकारी भरण्यात येणार आहेत. याशिवाय फिजिशियन, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञांचीही भरती करण्यात येणार आहे. ही पदे तीन महिन्यांसाठी असून, जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत त्यात वाढ केली जाणार आहे. ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसेनेचा पाठपुरावा

शहरातील करोना नियंत्रणासाठी महापालिकेत वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी यासाठी महिनाभरापासून पाठपुरावा सुरू केला होता, तर कृषिमंत्री दादा भुसे यांनीही दोन दिवसांपूर्वी महापालिकेत बैठक घेऊन पदे भरण्याचे निर्देश दिले होते. सरकारकडून या पदांना मंजुरी देण्यात येईल असे आश्वासनही भुसे यांनी दिले होते. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तत्काळ ७६१ पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.

ही प्रमुख पदे भरणार

फिजिशियन : १०

भूलतज्ज्ञ : १०

वैद्यकीय अधिकारी : ५०

वैद्यकीय अधिकारी (आयुष) : १००

स्टाफ नर्स : २५०

मिश्रक : ६५

समुपदेशक : ३०

एएनएम : १५०

मल्टिस्किल हेल्थ वर्कर : १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीची सभा ‘व्हिसी’द्वारेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष घ्यावी की व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हिसी) घ्यावी, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थायी समितीची सभा 'व्हिसी'द्वारेच घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची पुढील सभा 'व्हिसी'द्वारेच होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेण्याचा आदेश सरकारने ३ जुलै २०२० रोजी जारी केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभा 'व्हिसी'द्वारे घेण्यात येत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांकडून प्रत्यक्ष सभा घेण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात जिल्हा परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्यक्ष सभेला अनुमती मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन मागविले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत जिल्हा परिषदेला पत्र झाले आहे. त्या पत्रात करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडील मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच जिल्हा परिषदेने 'व्हिसी'द्वारेच सभा घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेली आढावा बैठक व प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यक्रम घेताना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेण्यात आली होती का? जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रात नगरविकास विभागाचा संदर्भ जोडला आहे. जिल्हा परिषदेला ग्रामविकास विभागाचे आदेश लागू होतात. प्रशासनाने याबाबत दिशाभूल करू नये.

- डॉ. आत्माराम कुंभार्डे,

सदस्य, स्थायी समिती, जि. प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात चिंता वाढली; तिसऱ्या आमदाराला करोनाची लागण

$
0
0

म टा वृत्तसेवा । कळवण

नाशिक जिल्ह्यातील देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांना करोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळताच त्यांनी स्वतःला होम कॉरंटाइन करून घेतले आहे. (BJP MLA Dr. Rahul Aher tests Covid Positive)

सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, विधिमंडळ सदस्य, मंत्री देखील करोना बाधित होताना दिसून येत आहेत. देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे, विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे नंतर आता देवळ्याचे आमदार डॉ. आहेर हे देखील पॉझिटिव्ह निघाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

वाचा: अधिवेशनाच्या तोंडावरच विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास करोना

तब्येतीबाबत थोडीशी शंका आल्याने आहेर यांची स्वतःची करोना चाचणी करून घेण्याचे ठरविले. त्यांची शंका बरोबर ठरली. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल मिळताच त्यांनी मतदारसंघात दौरा करताना आपल्या संपर्कात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. कुणाला काही त्रास जाणवत असल्यास तात्काळ आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. जनतेच्या आशीर्वादाने आपण लवकरच बरे होऊ व पुन्हा जनसेवेसाठी तत्पर राहू,' असा विश्वास आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: नव्या रुग्णांना बेड मिळावे म्हणून नगरमध्ये केला जातोय 'असा' जुगाड

करोनाची लागण झालेले आहेर हे जिल्ह्यातील तिसरे आमदार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहेर या करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर त्या आता बऱ्या झाल्या आहेत. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे हे करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आहेर यांच्यावरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाचा: लोक लॉकडाऊनला कंटाळलेत, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना आमदाराची करोना टेस्ट नाशिकमध्ये पॉझिटिव्ह, मुंबईत निगेटिव्ह

$
0
0

नाशिक: गेल्या काही दिवसात करोना अहवालांच्या बाबतीत विविध तर्कवितर्क आणि अनेक चर्चांना ऊत आलेला असताना विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा अहवाल नाशिक येथील एका लॅबमध्ये करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील तपासणीत लगेच निगेटिव्ह आला. याशिवाय दराडे यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांचे अहवाल नाशिकच्या शासकीय लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. परिणामी हा विषय चर्चेचा ठरला आहे. (Covid Test Results)

Live: सांगलीत लॉकडाऊन सुरू; ३१ जुलैपर्यंत निर्बंध राहणार

दराडे हे अनेकदा कार्यकर्त्यांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणे नसताना केवळ शंकानिरसन म्हणून त्यांनी प्रवरा येथील एका खासगी लॅबमध्ये आपल्या स्वॅबची तपासणी केली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह दाखवला गेल्याने संपूर्ण कुटुंबालाच हादरा बसला. यानंतर दराडे यांनी मुंबईला धाव घेतली आणि फोर्टिस रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले. या रुग्णालयात दराडे यांचा स्वॅब घेऊन पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या वतीने आमदार दराडे यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.

वाचा: पुण्यातील लॉकडाऊन उद्यापासून उठणार?

आमदार नरेंद्र दराडे यांचा प्रारंभीच्या तपासणीत अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने येथील ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयाच्या वतीने तातडीने दराडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कात आलेले शिक्षक अशा एकूण २२ जणांचे स्वॅब घेऊन ते शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे मंगळवारी अहवाल प्राप्त होताना त्यातील ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण दराडे कुटुंबालाच हादरा बसला होता. बरोबरच मनस्ताप देखील झाला. करोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर एकालाही करोनाची लक्षणे नसल्याने सर्वांनी बुधवारी लागलीच पुन्हा खासगी लॅबमध्ये आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचे अहवाल आज सकाळी प्राप्त होताना सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहवाल निगेटिव्ह आल्याने दराडे कुटुंबासह समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’मध्ये चिनी कॅमेऱ्यांचा वॉच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात चिनी बनावटीचे ११०० कॅमेरे बसविण्याचा घाट भाजप घालत आहे. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने या निकृष्ट कॅमेऱ्यांवर फुली मारली असताना नाशिक महापालिकेतील सत्ताधारी तसेच कंपनीवर संचालक असलेल्या भाजप सदस्यांनी मात्र या चिनी साहित्याबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारली आहे. या निकृष्ट कॅमेरे खरेदीच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात भाजपचे संचालक आहेत. स्मार्ट सिटीत आता शहरात ११०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हिकव्हिजन या कंपनीस कंत्राट देण्यात आले आहेत. या कंपनीने २० ते २५ कॅमेरे प्रायागिक तत्वावर बसविले असून त्याची चाचपणी सुरू आहे. या कंपनीच्या कॅमेऱ्याच्या दर्जाविषयी असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या बसविलेले कॅमेरे नवीन नामांकन नियमात बसत नसल्याची तक्रार रंजन ठाकरे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.

याच हिकव्हिजन कंपनीने नागपूर शहरातही ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर दर्जाचा प्रश्न निर्माण झाला. त्या कॅमेऱ्यांची तीन वेळेस चाचणी घेतल्यानंतर त्यात ओएफसी केबलचा निकृष्ट असल्याच्या तक्रारीमुळे भाजपने त्याला विरोध केला. मात्र, आता त्याच कंपनीला नाशिकमध्ये कंत्राट देण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चिनी अॅपवर बंदी घालत आहेत. मात्र, त्यांच्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पात निकृष्ट दर्जा असलेले चिनी कॅमेरे खरेदी केले जात आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करून ही निविदा रद्द करावी.

- रंजन ठाकरे,

शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकर भरतीसाठी पालिकेत तोबा गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने वैद्यकीय विभागात डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ७६१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. थेट मुलाखतीद्वारे होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत गुरुवारी तोबा गर्दी केली. यामुळे महापालिकेला यात्रेचे स्वरुप आले होते. महापालिकेत सुरक्षित वावरच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र होते.

शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिकेकडे असलेली वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे कोविड सेंटर्समुळे वैद्यकीय विभागावर मोठा ताण येत आहे. त्यामुळे महापालिकेने आता थेट डॉक्टर, नर्स व कर्मचारी भरतीसाठी मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांपासून अगदी एएनएमपर्यंत भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यात तब्बल अडीचशे पदे स्टाफ नर्ससाठी तर बीएएमएस म्हणजेच आयुर्वेद पदवीधरांसाठीही शंभर जागा आहेत. तसेच मल्टीस्किल हेल्थ वर्करचीही शंभर पदे आणि ५० वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. याशिवाय फिजिशियन, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशीदेखील पदे भरण्यात येणार आहेत. सदरची पदे तीन महिन्यांसाठी भरली जाणार असून अधिकाधिक सहा महिन्यांपर्यंत त्यात वाढ केली जाणार आहे. थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार असून त्यासाठी प्रक्रिया महापालिकेत सुरू झाली आहे. भरतीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

रविवारपर्यंत चालणार प्रक्रिया

पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी महापालिकेत गर्दी केली. त्यामुळे महापालिकेले यात्रेचे स्वरूप आले होते. ही भरती प्रक्रिया रविवारपर्यंत (दि. २६) चालणार आहे. त्यात उमेदवारांच्या कागदपत्रे तसेच मुलाखतींचे गुण एकत्रित करून निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निघाला बांगलादेशला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याची मागणी वाढल्याने बुधवारी रात्री लासलगाव रेल्वे स्टेशनवरून पहिल्यांदाच पार्सल व्हॅनने बांगलादेशात कांदा निर्यात केला असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. लासलगाव रेल्वे स्थानकातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातिसाठी रवाना होत आहे. यापूर्वी प्रवासी रेल्वे गाड्यांना पार्सल बोगी जोडत भाजीपाला, फळे आणि इतर मालाची वाहतूक होत असत, आता प्रथमच लासलगाव रेल्वे स्थानकातून पार्सल व्हॅनच्या माध्यमातून कांदा बांगलादेशसाठी कांदा रवाना करण्यात येत आहे.

बुधवारी रात्री लासलगाव रेल्वे स्टेशन येथून २० पार्सल व्हॅनच्या माध्यमातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशमधील दर्शना येथे रवाना करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळणाऱ्या कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधीतील छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ८ लाख ६२ हजारांची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. नाशिकमध्ये याआधी झालेल्या कारवाईत तिघांना पकडण्यात आले होते.

रेल्वेने १२ मेपासून १५ वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यानंतर १ जूनला निवडक मेल/ एक्स्प्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून अनेक दलालांनी ई-तिकिटे काढून या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. आतापर्यंत या लॉकडाउन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून ६ लाख ९,२९८ किंमतीची ३२८ लाइव्ह इ-तिकिटे जप्त केली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजसेवेतही आघाडी

कोविड-१९ साथीच्या काळात सामाजिक उपक्रमांमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी करोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाउन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्नाचे पॅकेटचे त्यांनी वितरण केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी प्रयत्न केले. ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना जागा उलब्ध करून देणे, तसेच गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाऱ्यांकरिता नाविन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गड दत्तक घ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील सप्तशृंगगड देवस्थान दर्शनासाठी खुले करा अन्यथा गाव तरी दत्तक घ्या, असा इशारा ग्रामस्थांनी एकत्र येत देवस्थान व्यवस्थापनाला दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउनच्या पहिल्याच टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गडावरील चैत्रोत्सवदेखील रद्द करण्यात आला. भाविक, पर्यटकांवरच येथील अर्थव्यवस्था निर्भर असल्यामुळे आता गड ग्रामस्थांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी खूले करावे, अन्यथा देवस्थानने गाव दत्तक घ्यावे अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे संस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांना देण्यात आले.

करोनामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून सप्तशृंगगड लॉकडाउन असल्यामुळे येथील व्यावसायिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. पालकमंत्री व तहसीलदार यांना विनंती आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.

-संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते

गावाची लोकसंख्या तीन ते चार हजार असून, सर्व दुकाने व छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. नागरिकांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. एकतर मंदिर सुरू करावे अन्यथा संस्थानने गाव दत्तक घ्यावे.

-राजेश गवळी उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडीचे इंजिन झाले ‘अनलॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांची वाहने घरातच असल्याने व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता. गाड्यांचे इंजिन बंद पडल्यामुळे जीवनाचे इंजिनच बंद होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, लॉकडाउन उघडताच व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली आहे.

बाळू पंडित हे एसटी कॉलनी, गंगापूररोडवर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवतात. पंडित हे परभणी जिल्ह्यातील सेलू गावचे रहिवासी, परभणी जिल्ह्य दुष्काळी असल्याने त्यांचे कुटुंब रोजीरोटीसाठी नाशिकला स्थायिक झाले. आयटीआयमध्ये गाडी दुरुस्तीचे शिक्षण घेतल्यानंतर दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करून त्यांचा चरितार्थ सुरू होता. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते याच व्यवसायात आहेत. बाळू पंडित हे वयाच्या पंधराव्या वर्षांपासून दुचाकी दुरुस्तीचे काम करत असून, त्यांनी पाच वर्षांपूर्वी एसटी कॉलनीतील फुटपाथवर दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाउन होण्याअगोदर सर्व व्यवहार सुरळीत होते. रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई व्हायची. अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने होत्याचे नव्हते झाले. रोजची कमाई बंद झाली. खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. घराबाहेर पडून लोकांच्या गाड्या दुरुस्त करता येत नव्हत्या.

मात्र, लॉकडाउन उघडताच त्यांच्या गॅरेजवर ग्राहकांची अचानक गर्दी झाली. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या गाड्या सुरू होण्यास अडचण निर्माण होत होती. ग्राहकांच्या घरी जाऊन गाड्या चालू करून द्यावे लागत होत्या. ग्राहकांची संख्या जास्त होती मात्र वेळेचे गणित जमत नव्हते. गॅरेजमध्ये ते एकटेच असल्याने वेळही अपुरा पडत होता. लोकांना गरज आहे म्हणून जास्त पैसे आकारणे हे त्यांच्या मनाला पटत नव्हते, असे पंडित सांगतात. आज पैसे जास्त घेतले तर उद्या आपल्याकडे येणारे ग्राहक नाराज होतील, म्हणून रोजच्या ग्राहकांना फक्त सेवा देण्याचे काम सुरू ठेवले. येत्या काही दिवसांत पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील यात शंका नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

लॉकडाउनमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. किराणा, दूध याची बिले थकली आहेत. आता रात्रंदिवस कष्ट करून पुन्हा पहिल्यासारखे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

- बाळू पंडित, गॅरेज मालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखंडित वीज मिळणार

$
0
0

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

२२० केव्ही आणि त्याहून जास्त अतिउच्च दाबाच्या वीज वितरण केंद्रांसाठी आतापर्यंत वापरले जाणारे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे तंत्रज्ञान आता ३३ बाय ११ केव्हीच्या वीज उपकेंद्रासाठी वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानावर आधारित एकलहरे येथे उभारण्यात येत असलेले वीज उपकेंद्र जिल्ह्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन ठरणार आहे. यामुळे अखंडित वीजपुरवठा तर मिळणार आहेच शिवाय वीज फिडर ट्रीप होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडळातर्गत नाशिक शहर मंडळातील नाशिक शहर विभाग २ मधील शिखरेवाडी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या एकलहरे येथील सध्याच्या अस्तित्वातील एअर इन्सुलेटेड सबस्टेशनच्या जागेवरच जिल्ह्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन महावितरणच्या पायाभूत आराखडा विभागाच्या (इन्फ्रा) मार्गदर्शनाखाली आकारास येत आहे. मे. बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीकडून या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची निर्मिती सुरू आहे. केंद्राच्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम टप्पा क्रमांक एक अंतर्गत या खास सबस्टेशनची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी राज्यातील अतिवेगाने विकसित होत असलेली आणि यापुढील काळात देखील विकासास मोठा वाव असलेल्या ११२ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ४३ ठिकाणच्या सबस्टेशनची उभारणी सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात एकलहरे सबस्टेशनची निवड करण्यात आली आहे. या सबस्टेशनच्या उभारणीसाठी जवळपास ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

काय आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन

महावितरणच्या सध्याच्या अस्तित्त्वातील सबस्टेशनला एअर इन्सुलेटेड सबस्टेशन असे म्हणतात. या सबस्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बाहेर राहून प्रत्येक टप्प्यावर काम करावे लागते. परंतु गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांना इनडोअर राहूनच सर्व कामे करता येतात. प्रत्यक्ष सबस्टेशनमधील संबधित विद्युत यंत्रणेजवळ जावे लागत नाही. फिडरमधील त्रुटी, दुरुस्ती या एकाच जागेवरून करता येतात अशी यंत्रणा कार्यान्वित केली जाते. आतापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर २२० केव्ही किंवा त्यापेक्षा अति उच्च दाबाच्या सबस्टेशनवरच होत होता.

गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे फायदे-

वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होतो. पारंपरिक सबस्टेशनपेक्षा दहा पटीने जागा कमी लागते. देखभाल व दुरुस्ती खर्च अत्यल्प येतो. फिडर ट्रीप होण्याचे प्रमाण शून्यावर येते. सबस्टेशनवरील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढते.

या भागाला होणार फायदा

एकलहरे सबस्टेशनमधून सध्या एकलहरे कॉलनी, एकलहरे रोड, चेहेडी पंपिंग स्टेशन आणि सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज अशा चार वीज वाहिन्या बाहेर पडतात. या भागातील वीज ग्राहकांना या सबस्टेशनचा फायदा होणार आहे. शहराच्या या पूर्व भागाचा वेगाने विकास सुरू असून भविष्यातही या भागात विकासास मोठी संधी आहे.

मालेगावची संधी हुकली

महावितरणच्या प्रत्येक मंडळात एक गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन उभारण्याची योजना आहे. नाशिक परिमंडलात नाशिक, मालेगाव आणि नगर हे तीन मंडळ आहेत. त्यापैकी नगर मंडळात बोलेगाव, ता नगर येथे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे. नाशिक मंडळात एकलहरे येथे अशा प्रकारचे सबस्टेशन आकारास येत आहे. मालेगाव मंडळात मात्र वेळेत जागा उपलब्ध न झाल्याने मालेगाव मंडळात गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन उभारण्यावर फुली लागली आहे.

गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हे अत्यंत कमी जागेत आणि कर्मचाऱ्यांना सर्व कामे इनडोअर पद्धतीने करता येतील अशा तंत्रज्ञानावर आधारित असून एकलहरे येथे जिल्ह्यातील अशा प्रकारचे पहिले सबस्टेशन उभारण्यात येत असून काही दिवसांतच ते प्रत्यक्ष कारान्वित होणार आहे.

-संजय खंडारे, प्रभारी मुख्य अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार नाशिकला पोहोचण्याआधीच 'या' अधिकाऱ्याची उचलबांगडी

$
0
0

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्र्यंबके हे मलेरिया तज्ञ असतानाही त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाचा पदभार होता. करोनाचा उद्रेक झाला असतानाही महापालिकेत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नव्हता. टोपे आणि पवार यांच्या आजच्या आढावा बैठकीत यावरून वादंग होण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच शासनाने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे.

वाचा: शिवसेना आमदाराची करोना टेस्ट नाशिकमध्ये पॉझिटिव्ह, मुंबईत निगेटिव्ह

करोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचं कारण देत राज्यातील अनेक महापालिकांच्या आयुक्तांच्या बदल्या मागील तीन महिन्यात सरकारनं केल्या आहेत. नाशिकची परिस्थिती काहीशी वेगळी होती. इथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीच नव्हता. ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न नागरगोजे यांच्या नियुक्तीद्वारे करण्यात आला आहे.

राज्यातील करोना साथीची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. नुकताच त्यांनी सोलापूरचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देणार असून तेथील अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

वाचा: 'मी इथेच बसलोय; मुलाखत सुरू असताना सरकार पाडा'

सरकारमधील मंत्री वगळता अन्य नेत्यांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी हजेरी लावू नये, असं परिपत्रक सरकारनं काढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पवारांच्या दौऱ्यावर विरोधी पक्ष भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजेश टोपे यांच्या नावानं पवार हे बैठक घेणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सांगितले मुख्यमंत्री, अवतरणार पवार!

नाशिक शहरातील लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री ठाकरे नाशिकला येणार होते. त्यासंदर्भातील सूतोवाच खुद्द पालकमंत्री भुजबळ यांनीच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री येणार अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पवारांनी जिल्ह्यात एंट्री घेत लीड घेतला आहे. त्यामुळे घोषणा ठाकरेंच्या दौऱ्याची, पण अवतरणार पवार अशी स्थिती पहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्वास नांगरे-पाटलांनी 'असा' घेतला नाशिककरांचा निरोप

$
0
0

नाशिक: मुंबईत कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालेले नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आज मुंबईला रवाना झाले. नव्या आयुक्तांकडे पदभार सोपवून शहर सोडताना नांगरे-पाटील भावूक झाले होते. ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातील धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नांगरे-पाटील मागील दीड वर्षे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते. ठाकरे सरकारने नुकत्याच केलेल्या ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. त्यांना आता मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मिळाली आहे. या काळात आलेले अनुभव नांगरे-पाटील यांनी आपल्या ऑडिओ संदेशातून व्यक्त केले आहेत.

वाचा: बदल्या तर होणारच; शिवसेनेने विरोधकांना ठणकावले!

नाशिककरांना नमस्कार करून त्यांनी ऑडिओ संदेशाची सुरुवात केली आहे. ते म्हणतात, 'नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्षे आपली सेवा करण्याची मला संधी मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार नवे आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला निघालोय. नाशिकसारख्या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला सांस्कृतिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक असा वारसा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगानं सुरू आहे. इथं काम करताना इथली माणसं, इथली माती, इथलं पाणी, इथला निसर्ग याच्या प्रेमातच माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना अंत:करण जड आहे. मात्र, हा ऋणानुबंध निश्चितच कायम राहील. आपण माझ्या सदैव संपर्कात राहाल. आपलं प्रेम, आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

वाचा: याला धमकी समजा किंवा सल्ला... कंगनाला 'मनसे' स्टाइल इशारा

'कोविडसारख्या संक्रमणाचा काळ असो, निवडणूक, सण-उत्सव असो, या काळात आपण सदैव माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. नाशिकची जनता प्रगल्भ, कायद्याचं पालन करणारी आहे. प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवणारी आहे. त्यामुळंच या शहराची प्रगती वेगाने होत आहे. या शहराच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सुयश चिंतितो,' असंही नांगरे-पाटील यांनी शेवटी म्हटलं आहे.

वाचा: माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाचीही नार्को टेस्ट करा, पण... राम कदम यांचं आव्हान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅनिटायझरमुळं कारमध्ये भडकली आग; राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू

$
0
0

मुंबईः नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई- आग्रा महामार्गावर चालत्या गाडीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग अधिक भडकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. हँड सॅनिटायझरमुळं ही आग अधिक भडकल्यानं हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय शिंदे हे त्यांच्या कारमधून नाशिककडे जात असताना चांदवडजवळ धावत्या कारनं पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जातंय. त्यातच गाडीत असलेल्या सॅनिटायझरमुळं ही आग अधिक पसरली. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा संजय शिंदे यांनी गाडीतून बाहेर पडण्यासाठी गाडीचा दरवाजा व खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला मात्र, कारचं सेंट्रल लॉक लागल्यानं ते दरवाजा उघडू शकले नाही आणि कारमध्येच होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम; पुण्यातील 'ही' धरणं तुडुंब

संजय शिंदे हे नाशिकमधील प्रसिद्ध द्राक्षे निर्यातदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली आहे. शिंदे किटकनाशके खरेदी करण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना त्यांच्या चालत्या गाडीने अचानक पेट घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कारनं पेट घेताच स्थानिक रहिवाशांनी संजय शिंदे यांना कारमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

पंढरपूर दुर्घटनाः दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

पुण्यात पावसाचं धुमशान; दुकानांमध्ये शिरले पाणी, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई; छगन भुजबळ यांना 'ही' शंका

$
0
0

मुंबई: 'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं,' अशी शंका व्यक्त करतानाच, 'कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,' असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. (Chhagan Bhujbal on Operation Lotus after ED raid on Pratap Sarnaik)

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी ईडीला भाजपच्या १०० नेत्यांची यादी देण्याची तयारी दर्शवली आहे. तर, छगन भुजबळ यांनी हे सरकार पाडण्याचे प्रयत्न असू शकतात, अशी शंका व्यक्त केली आहे. ते 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांचा वापर कशासाठी केला जातो हे आता गुपित राहिलेलं नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना न आवडणारं बोललं की विरोधकांना त्रास देण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. मागे आम्ही जास्त बोललो तर आम्हाला त्रास दिला गेला. पवार साहेब बोलले तर त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली. कंगना राणावत सारख्या काही प्रकरणांत प्रताप सरनाईक आपल्या पक्षाच्या बाजूनं बोलत होते. त्यामुळं त्यांच्या विरोधातही असं काही होईल असं वाटतंच होतं. तसं ते होतंय. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी हे सगळं केलं जातंय,' असं भुजबळ म्हणाले.

वाचा: भाजपच्या १०० लोकांची यादी पाठवून देतो; राऊतांचं ईडीला आव्हान

'ऑपरेशन लोटसचं हे पहिलं पाऊल असू शकतं. मी नाकारणार नाही. पण ते यशस्वी होणार नाही. अशा दबावामुळं काही घडेल असं वाटत नाही. पण केंद्रातील सत्ताधारी प्रयत्न करतच राहणार,' असंही भुजबळ म्हणाले. 'राजकीय हेतूनं काही करायचं ठरवलं की ते काहीही करतात. त्याला काही धरबंद नाही. जणू नियमावलीच ठरून गेलीय. मध्य प्रदेश, राजस्थान सगळीकडं होतंय. महाराष्ट्रातही प्रयत्न होणार. पण त्यांचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,' असं भुजबळ ठामपणे म्हणाले.

वाचा: शिवसेनेचे मुखिया सुद्धा असेच उद्योग करतात; सोमय्यांचा ठाकरेंवर आरोप

सरनाईकांवरील कारवाईबाबत बोलताना, कायद्याला कायद्याचं काम करू द्या, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही भुजबळ यांनी टोला हाणला. 'कायद्याला त्याचं काम करू द्या हे बोलणं सोपं आहे. पण त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं प्रचंड नुकसान होतं. अनेकदा कारण नसताना वर्षानुवर्षे एखाद्या माणसामागे कायद्याचा ससेमिरा लागतो. त्यामुळं ते बोलणं सोपं आहे. वास्तव वेगळं असतं,' असं भुजबळ म्हणाले.

वाचा: ...म्हणून ईडीने सरनाईकांच्या घरावर धाड टाकली असेल: फडणवीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट





Latest Images