Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ सोसायट्यांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन सहकार कायद्यानुसार राज्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार निबंधकांमार्फत निवडणुका घेणे बंधनकारक केले असले, तरी नाशिक तालुक्यातील १४४९ संस्थांचे पत्तेच मिळत नसल्याचे वास्तव दोन महिन्यांपूर्वीच समोर आले आहे. त्यामुळे या बिनपत्त्याच्या संस्थांच्या निवडणुका सहकार निबंधक कशा घेतील, असा प्रश्न आहे. एका तालुक्यात ही स्थिती आहे, तर जिल्ह्यातील १४ तालुक्यांत काय असेल, ही गोष्टही या निवडणुका बंधनकारक करताना सहकार विभागाने समोर ठेवलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गृहनिर्माण संस्थांची तपासणी करून त्या अवसायनात काढल्या जात आहेत. पण, ही प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नसताना सहकार विभागाने नागपूरच्या अधिवेशनात शनिवारी या निवडणुका घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या निवडणुका कशा घ्यावात, असा प्रश्न सहकार निबंधकांना पडला आहे. मुंबईत या सोसायाट्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच व्यवस्था करावी लागणार आहे.

या निवडणुकांबरेबरोबरच गृहनिर्माण संस्था, पतसंस्था व सहकारी बँका आदी सहकारी संस्थांना यापुढे वित्तीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या पॅनलवरील सनदी लेखापाल, लेखापरीक्षकांमार्फतच सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करता येईल, अशी तरतूदही या नव्या कायद्यात केली आहे.

लेखापरीक्षणाचाही प्रश्न

जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या सोसायटीचे अवसायक नेमल्यानंतर त्यांना आतापर्यंत प्रत्येक सोसायटीचे दप्तरसुद्धा बघता आले नाही. त्यामुळे त्याचे लेखापरीक्षण हे कसे करणार हादेखील प्रश्न उद्भवला आहे.


पुरेशा कर्मचारीवर्गाचा अभाव

सहकारी गृहनिर्माण सोसायटीत आधी पदाधिकारी बनण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. आता निवडणुका बंधनकारक केल्यामुळे काही सोसायट्यांमध्ये निवडणुका रंगणार आहेत. त्यात स्थानिक नगरसेवकसुद्धा आपल्या मर्जीतले चेअरमन व्हावेत यासाठी या निवडणुकीत उतरू शकतात. त्यामुळे या निवडणुका आता काही ठिकाणी रंगतदार, तर काही ठिकाणी बिनविरोध होऊ शकतात. दरम्यान, सहकार विभागाकडे निवडणूक प्रक्रिया घेण्यास पुरेसा कर्मचारीवर्गच नाही. त्यामुळे या निवडणुका कशा घेणार हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्डे बुजविण्याला आली गती...

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा कृती आराखडा सरकारने तयार केला असून, त्यानुसार युद्धपातळीवर खड्डे भरण्याचे काम सुरू आहेे. नाशिक जिल्ह्यातही १६ डिसेंबरपर्यंत राज्य मार्गाचे ९७ टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले, तर प्रमुख जिल्हा मार्गांचे ८१ टक्के काम झाले आहे. राज्यातील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत भरले जातील, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांवर खड्डा दाखवून देणाऱ्यास एक हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या सर्व अभियंत्यांना हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बक्षीससुद्धा ठेवले असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी कामे झालेल्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणांसाठी पंचवार्षिक धोरण

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराचा नवा विकास आराखडा प्रस्तावित असतानाही पूर्वीच्या विकास आराखड्यातील जवळपास ५४६ आरक्षणे ही अद्यापही भूसंपादनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेने या आरक्षणांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी समितीची स्थापना केली आहे. या समितीने बैठक घेऊन आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी पंचवार्षिक नियोजन केले आहे. महापालिकेतील सर्व विभागांना त्यांच्या विभागांतील आरक्षित भूखंडांचा प्राधान्यक्रम सादर करण्याच्या सूचना समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिले आहेत. दर वर्षी बजेटमध्ये २० टक्के तरतूद ही भूसंपादनासाठी राखीव ठेवली जाणार असून, आवश्यक त्याच मिळकती संपादित केल्या जाणार आहेत.

शहरवासीयांना सध्या नव्या विकास आराखड्याची प्रतीक्षा आहे. परंतु, महापालिकेला सध्या अस्तित्वात असलेल्या विकास आराखड्यातील सार्वजनिक हितासाठी आरक्षित केलेल्या जमिनी संपादित करण्याची चिंता सतावत आहे. नव्या भूसंपादन विधेयकामुळे जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच १९९२ च्या विकास आराखड्यात आरक्षित केलेले ५४६ भूखंड ताब्यात घेतलेले नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे सर्वच आरक्षणे सरसकट संपादित करता येणार नाहीत. नव्या कायद्यामुळे महापालिकेने आरक्षित केलेली सर्वच आरक्षणे ताब्यात घ्यायची असतील, तर जवळपास पाच हजार कोटींची गरज आहे. महापालिकेची तेवढी आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे महापालिकेने या आरक्षणांचा प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक तीच आरक्षणे संपादित करण्याचा निर्णय स्थायीत घेतला होता.

स्थायीच्या निर्णयानुसार आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची बैठक झाली असून, समितीने आता ही आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या बजेटच्या २० टक्के रक्कम दर वर्षी भूसंपादनासाठी राखीव ठेवली जाणार आहे. दर वर्षी आवश्यक तेवढीच आरक्षणे संपादित केली जाणार आहेत. त्यांचा प्राधान्यक्रम ठरल्यानुसार आरक्षणांची यादी तयार केली जाणार आहे. पुढील निर्णयासाठी येत्या २७ डिसेंबरला पुन्हा समितीची बैठक होणार असून, त्यात अत्यावश्यक आरक्षणांची यादी तयार केली जाणार आहे, तसेच १२७ च्या नोटिसांचाही तत्काळ निपटारा केला जाणार आहे.



जमिनी मूळ मालकांना परत

बांधकाम, शिक्षण, आरोग्य, उद्याने, पाणीपुरवठा, नगररचना अशा विभागांसाठी सार्वजनिक हिताची आरक्षणे टाकली जातात. समितीने या विभागांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या आरक्षणांचे प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश दिले आहेत. या विभागांनी आरक्षितपैकी अत्यावश्यक असलेल्या आरक्षणांचा क्रम समितीला सादर करायचा आहे. समिती त्यानुसार या आरक्षणांचा निर्णय घेणार असून, त्यांचा प्राधान्यक्रम ठरणार आहे, तसेच आवश्यक नसलेल्या जमिनी या मूळ मालकांना परत केल्या जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यधीश शहाच्या डायरीत नाशिकचे नाव

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com
Tweet : @sanchetigMT

नाशिक : केंद्राच्या उत्पन्न घोषित योजनेत १३ हजार ८६० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा गुजरातमधील उद्योजक महेश शहाच्या डायरीद्वारे नाशिक कनेक्शन पुढे आले आहे. गूढरीत्या गायब झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने त्याला आठ दिवसांपूर्वी ताब्यात घेतल्याने त्याची कसून चौकशी सुरू झाली आहे. शहा याच्याकडून विभागाने एक डायरी जप्त केली आहे. शहा हा अहमदाबाद, बडोदा, राजकोट, मुंबई, पुणे व नाशिक या शहरांतील एकूण १८ जणांच्या संपर्कात असल्याचे नमूद झाले आहे. त्यामुळे शहाबरोबर नाशिकची कुठली व्यक्ती संपर्कात होती, याचा शोधही प्राप्तिकर विभागाने सुरू केला आहे.

केंद्र सरकारच्या अघोषित संपत्ती जाहीर करण्याच्या योजनेच्या शेवटच्या दिवशी अहमदाबादमधील महेश शहा यांनी संपत्ती जाहीर केली होती. उत्पन्न प्रकटन योजना २०१६ नुसार काळ्या पैशासंबंधी स्वेच्छेने खुलासा करणाऱ्यांना सवलत देण्यात आली होती. या योजनेनुसार अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत कराचा पहिला हप्ता भरावा लागणार होता. शहा यांना ४६०० कोटी रुपये एवढा कर भरावा लागणार होता. या करातील ९७५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३० नोव्हेंबरपर्यंत द्यायचा होता. मात्र, शहा यांनी हप्ता भरण्यास दिरंगाई केली होती. त्यानंतर शहा हा चर्चेत आला.

शहाकडे पैसे आले कुठून?

अहमदाबादमधील एका जुन्या इमारतीत फोर बीएचके फ्लॅटमध्ये राहणारा महेश शहा हा रिक्षाने कामावर जात होता. त्याच्याकडे इतके पैसे कसे आले म्हणून आयकर विभागही चक्रावला. त्यामुळे त्यांनी याची पाळेमुळे शोधत अखेर शहाला ताब्यात घेतले. त्यातून अनेक कनेक्शन उघड होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसात नाशिकचे दोन जण सुरतमध्ये सापडले व त्यानंतर हे कनेक्शन समोर आले आहे. शहच्या डायरीत असलेल्या नाशिकच्या व्यक्तीची चौकशी होणार असून, त्यानंतर त्यातून खरा प्रकार समोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌‌शिक जिल्हा विभाजनाची निकष निश्चिती अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. वृत्तसवा, मालेगाव

जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्याकरिता अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीचा अहवाल अंतिम करण्यात आला असून, हा अहवाल शासन मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंदक्रांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. तारांकित प्रश्नाचे लेखी उत्तरातून त्यांनी ही माहिती दिली.

मालेगावसह राज्यातील नवीन जिल्हे व तालुके निर्मितीच्या मागणीचे अनुषंगाने आमदार डॉ. अपूर्व हीरे यांच्यासह अन्य सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मंत्र‌िमंडळाच्या मान्यतेने निश्चित केल्या जाणाऱ्या निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे विभाजन व पुनर्रचना प्रकरणी उचित निर्णय घेण्याचे शासनाने योजिले आहे. प्राप्त अहवालातील शिफाराशींच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आलेले अभिप्रायदेखील शासनास प्राप्त झाले असून, त्यांचा विचार करून जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. सदर धोरण निश्चित झाल्यानंतर याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी उत्तरात दिली. मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या कित्तेक वर्षापासून प्रलंबित असून, निकष निश्चित करण्या संबंधीची बाब अंतिम टप्पात आल्याने जिल्हा निर्मितीबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनीच वाटले टोकन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

भऊर (ता. देवळा) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांनी एकच गर्दी केल्याने पोल‌िस यंत्रणेला यात हस्तक्षेप करून ग्राहकांना शांत करावे लागले. तसेच पोल‌िस निरीक्षक सतीश माने यांनी स्वतः बँक कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोल‌िसांच्या मदतीने खातेदारांना टोकन वाटल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाने ग्रामीण भागातील बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी वेळेवर पैसे उपलब्ध होत नसल्याने तासनतास बँकेत ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. जिल्हा बँकेच्या शाखांना चक्क कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. भऊर येथील महाराष्ट्र बँकेत ग्राहकांनी एकच गर्दी केल्याने बँक प्रशासनाला पोलिसांना पाचारण करावे लागले. देवळा पोल‌िस ठाण्याचे निरीक्षक सतीश माने यांनी लवाजम्यासह भऊर गाठून शाखेतील ग्राहकांना, नागरिकांना शांत केले. पैसे वाटण्यासाठी टोकन देण्याचे काम करून बँकेतील गर्दी कमी केली. पोल‌िस यंत्रणा मदत करीत असल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोजच घसरण

$
0
0

दररोजच घसरण
म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सातत्याने ढासळणाऱ्या कांदा बाजारभावाचे अर्थसंकट उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक कांदा बाजारभाव खाली खाली येत असल्याने ‘लाल कांदा घसरतोय, बळीराजा झुरतोय’ असंच म्हणण्याची वेळ आली आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन दिवसात लाल कांदा बाजारभावाचा आलेख किमान, कमाल तसेच सरासरी तब्बल दोनशे रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांपुढील चिंता वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल उपबाजार आवारात दररोजच लाल कांदा बाजारभाव कोसळत आहेत. लाल कांदा बाजारभावात दररोजच होणारी घसरण पुढील काळातही होत गेल्यास यंदाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गणित एकदमच कोलमडून त्याचे ‘अर्थचक्र’ अन् ‘शेतीचक्र’ पुन्हा बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या जीवाला घोर
नगदी पिक समजला जाणारा कांदा हमखास गाठीला श्रम अन् घामाचे देईल, त्यातून निदान बिघडलेलं ‘अर्थचक्र’ तरी सुरळीत होण्यास हातभार लागेल ही कांदा उत्पादकांची आशा अनेकदा फोल ठरली आहे. येवला बाजारसमितीत

सुरवातीला दररोज चाळीस पन्नास रुपयांनी खाली येणारे बाजारभाव गुरुवारनंतर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. त्यामुळे आधीच नोटाबंदीने हैराण झालेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण तलाव पाडण्यास स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात पांझरा नदीलगत असलेल्या जयहिंद जलतरण तलावाचे अतिक्रमण काढण्यावरून काही दिवसांपासून जलतरण तलावाचे पदाधिकारी व लोकसंग्रामच्या कार्याकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण धुळे जिल्हा कोर्टात गेले असता, तलाव पाडण्याच्या निर्णयावर स्थगिती मिळाली असल्याची माहिती जयहिंद ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.

धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी शहरातील विविध १९ ठिकाणांचे अतिक्रमण काढून रस्त्यांना मोकळा श्वास देण्याचे ठरविले आहे. या अतिक्रमणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासह शिवसेना महानगरप्रमुखांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्त्वज्ञान व अध्ययन केंद्र यासह अन्य ठिकाणे आहेत. दुसरीकडे पांझरा नदीकिनारी दोन्ही बाजूला साडेचार किमीचा रस्ता तयार करण्यासाठी जयहिंद जलतरण तलावदेखील पाडण्याबाबत विचार करण्यात येत आहे. त्यावरून जलतरण तलावाचे पदाधिकारी व आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दीक चकमक होऊन हा वाद धुळे जिल्हा न्यायालयात गेला होता. जलतरण तलावास तत्कालीन धुळे नगरपालिकेने परवानगी दिली असून, शासनाकडून अनुदान मिळाले आहे. तलावाचे बांधकाम अतिक्रमित ठरविणे योग्य नसल्याचा दावा करीत जलतरण तलावाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. मोटे यांच्या कोर्टात कामकाज झाले. दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने तलावाचे बांधकाम काढण्यास स्थगिती दिली असल्याची माहिती जयहिंद ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीतही वाढली लाचखोरी!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhav

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना पैशांची चणचण भासली. अजूनही ही परिस्थिती काही अंशी कायम आहे. नोटांच्या उपलब्धतेबाबत सर्वत्र ओरड असताना नाशिकसह राज्यभरातील लाचखोर मात्र जोरात राहिले. या वर्षातील सापळ्यांच्या सर्वाधिक घटना नोव्हेंबर महिन्यातच घडल्या असून, एसीबीचे अधिकारीदेखील या परिस्थितीमुळे बुचकाळ्यात पडले आहेत.

देशात खळबळ उडवून देणारा नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. व्यवहारातील हजारो कोटी रुपये यामुळे बँकांत जमा झाले. हातातील पैसा जाताना तितका पैसा सर्वसामान्यांकडे परतला नाही. या पार्श्वभूमीवर काळे धंदे थंडावल्याचे चित्र तयार झाले. मात्र, राज्यातील लाचखोरीला या काळातच बहर आल्याचे दिसते. लाच स्वरूपात मिळणाऱ्या नोटा बँकेत भरण्यासाठी पुरेसा कालावधी असल्याने नोव्हेंबर महिन्यात पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर झाली. त्यात एसीबीकडे आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली. नाशिक विभागामध्ये नोव्हेंबर महिन्यात १६ सापळे रचण्यात आले. या वर्षात सापळ्यांच्या संख्येच्या दृष्टीने हे प्रमाण सर्वाधिक ठरले. राज्याचा विचार करता, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये सापळ्यांच्या संख्येत २० टक्के घट झालेली दिसते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत फक्त नोव्हेंबर महिन्याचा कालावधी अपवाद ठरला. या महिन्यात एसीबीच्या सापळ्यांच्या संख्येत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याबाबत नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितले की, तक्रारदारांच्या तक्रारीवरच सापळ्यांची संख्या ठरते. नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी करण्यात आली असली तरी चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्यास मुदत देण्यात आली होती. याचा फायदा घेत भष्ट्र अधिकारी वा कर्मचारी लाचेच्या रकमेची मागणी करताना आढळून आले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस मात्र, बऱ्यापैकी शांतता झाली. आता पुन्हा तक्रारींचा ओघ सुरू झाला असून, मागील ४८ तासांत आम्ही चार ते पाच यशस्वी सापळे रचल्याचे उगले यांनी स्पष्ट केले. पैशांची उपलब्धता आता होत असून, अगदी ५०० रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत पैशांची मागणी होत असल्याचे पुढे आले आहे.

नाशिक विभाग

महिना - सापळा कारवाई

जानेवारी - १३, फेब्रुवारी - ११, मार्च - १५, एप्रिल - ११, मे - ८, जून - १०, जुलै - १४, ऑगस्ट - १३, सप्टेंबर - १३, ऑक्टोबर - १५, नोव्हेंबर - १६
डिसेंबर - ६

राज्यस्तरीय सापळ्यांची कारवाई

महिना - २०१६ - २०१५ - फरक

जानेवारी - ९५ - १०६ - ११ घट, फेब्रुवारी - ८० - १११ - ३१ घट, मार्च - १०० - १०८ - ८ घट, एप्रिल - ९१ - ९१ - ०, मे - ८६ - ८७ - १ घट, जून - ७३ - १०७ - ३४ घट, जुलै - ७७ - ११३ - ३६ घट, ऑगस्ट - ८१ - १०५ - २४ घट, सप्टेंबर - ७३ - १२९ - ५६ घट, ऑक्टोबर - ७१ - ९१ - २० घट,
नोव्हेंबर - ७४ - ७२ - २ वाढ, डिसेंबर - ३० - ४८ - १८ घट, एकूण -९३१ - ११६८ - २३७ घट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’च्या चौकशीची मागणी

$
0
0

आमदार जयंत जाधव यांच्याद्वारे विधान परिषदेत प्रश्न उपस्थित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला आहे. यामध्ये काही अधिकारी बळजबरीने जमीन विकण्यास भाग पाडत असल्याची तक्रारही शेतकरी कृती समितीने केलेली आहे. तसेच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या असून या प्रकारांची एसआयटी नेमून चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी लक्षवेधीद्वारे केली आहे.

आमदार जाधव यांनी मांडलेल्या या लक्षवेधी सूचनेवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र त्यांनी तात्पूरता उत्तरे न देता दिलासादायक उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार जाधव यांनी सभात्याग केला.

या वेळी चर्चेदरम्यान आमदार जाधव यांनी भाजप पक्ष स्वप्नरंजन करण्यात नेहमीच पुढे असतो. मात्र यावेळेला शिवसेनेचे मंत्रीही स्वप्नरंजन करत असल्याचा आरोप केला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाला आपल्या जमिनी देण्यास विरोध केला असून तशी निवेदनही दिली आहेत. तरीही तक्रारी आल्या नसल्याची माहिती देत सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. शेतकरी कृती समितीने ८ डिसेंबरला अधिकाऱ्यांच्या नावासह तक्रारीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावा जाधव यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँकेस आरबीआयचा नकार

$
0
0

ऐनवेळेस करन्सी चेस्टमधून पैसे घेण्याचे निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात कॅश शॉर्टेजचा प्रश्न सुटणार, अशी स्थिती असताना स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळणारे २०० कोटी रुपये शुक्रवारी (दि. १६) मिळाले नाहीत. स्टेट बँकेला पैशांसाठी मुंबईला बेलापूर येथे रिझर्व्ह बँकेने बोलावले होते. पण ऐनवेळी पैसे देण्यास नकार देऊन या बँकेला मुंबई व ठाण्याच्या स्टेट बँकेच्या करन्सी चेस्टमधून पैसे घेण्यास सांगितल्यामुळे स्टेट बँकेतही कॅश तुटवडा येत्या काही दिवसात निर्माण होणार आहे. सद्यस्थितीला स्टेट बँकेच्या नाशिक विभागीय कार्यालयात केवळ ४० कोटी रुपये तर जिल्हा विभागीय कार्यालयात ३०० कोटींहून अधिक पैसे आहेत. त्यामुळे स्टेट बँकेला तातडीने पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहे.

स्टेट बँकेला त्यांच्याच बँकेच्या करन्सी चेस्टमधून आता किती पैसे मिळतात हे अद्याप शनिवारी (दि. १७) सायंकाळपर्यंत स्पष्ट नव्हते. गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँकेचे एटीएम शहरात सुरू होते तर त्यांच्या सर्व शाखांमधून पूर्ण पैसेही दिले जात होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ बँकांपैकी स्टेट बँकेच्या शाखांत कॅशचा तुटवडा जाणवला नव्हता. याबरोबरच रिझर्व्ह बँकेतून मिळणाऱ्या पैशांतून मोठ्या प्रमाणात नव्या पाचशेच्या नोटा मिळणार होत्या पण ते पैसे न मिळाल्यामुळे आता दोन हजारच्या नोटाच तूर्त स्टेट बँकेच्या एटीएममधून मिळणार आहेत.

इतर बँकांतही शॉर्टेज

जिल्ह्यातील तीन मोठ्या बँकांप्रमाणे इतर बँकांतही कॅश शॉर्टेजचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत तर या बँकांचे चलन पुरवठ्याचे वास्तव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्याकडील कॅश शॉर्टेज दिसून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठवण तलावात शिक्षकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येथील रहिवाशी असलेल्या एका शिक्षकाने नगरपालिकेच्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी समोर आली. सुरेंद्र भगीरथ गायकवाड (वय ३३) असे या शिक्षकाचे नाव असून शनिवारी सकाळी तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर तलावातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोल‌िस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील मनमाड रोडलगतच्या गायकवाड वस्तीवरील रहिवाशी व लासलगाव येथील जैन विद्यालयात प्राथमिक शिक्षक असलेले सुरेंद्र गायकवाड हे डोके दुखत असल्याचे कारण देत गेल्या दोन तीन दिवसांपासून रजा टाकून घरी होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपण गावात चाललो असे सांगून ते आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. सुरेंद्र हे घरी न परतल्याने घरच्यांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली.

सुरेंद्र गायकवाड यांचे काका शांताराम गायकवाड यांनी याबाबत येवला शहर पोलिसांना खबर दिली होती. शनिवारी सकाळी साठवण तलावाजवळ सुसाईड नोट लिहिलेली एक वही, मोटरसायकला आणि चपला आढळून आल्या. पोहणाऱ्या काही युवकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत सुरेंद्र शहरातील एन्झोकेम हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक भगीरथ गायकवाड यांचे पुत्र होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूबाधितेवर उपचारास डॉक्टरचा नकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील एका बालरोगतज्ज्ञाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नाकारून डेंग्यूबाधित एका रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. हातात सुटे पैसेच नसल्याने वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रुग्णाला अन्य दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले.

जुने धुळे परिसरातील निकिता खैरनार (वय १०) या बालिकेला गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने तिला तिचे वडील विश्वनाथ पंडित खैरनार यांनी उपचारासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील रुग्णालयात नेले होते. या रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवार १४ रोजी, निकिताला उपाचारासाठी दाखल करून घेतले आणि सातशे रूपये भरण्यास सांगितले. मात्र, तिच्या नातेवाईकांकडे पाचशे व हजाराच्याच नोटा असल्याने डॉक्टरांनी या नोटा घेतल्या नाहीत. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकिताच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आवश्यक खर्चाची रक्कम डॉक्टरांनी पाचशे व हजाराच्या नोटामध्ये न स्वीकारता मुलीच्या नातेवाईकांना रुग्णालयातून हाकलून दिल्याचे सांगण्यात आले. अखेर मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रुग्ण मुलीला अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, तक्रार अर्जावर चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे-नाशिक रेल्वेमार्गावर विचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे आणि नाशिक ही औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची शहरे रेल्वेमार्गाद्वारा एकमेकांना जोडण्यावर केंद्रीय मंत्र्यांच्या पातळीवर विचार सुरू झाला आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारताना धुळे ते नाशिक हा रेल्वेमार्ग देखील मार्गी लागू शकतो, अशी आशा आहे.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांत भूमिपूजन करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत दिले होते. त्याबद्दल गडकरींचे आभार मानण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. भामरे यांनी धुळे आणि नाशिक ही शहरे रेल्वेने जोडण्याकडे लक्ष वेधले. त्यावर गडकरी यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगत धुळे-नाशिक यांनाही रेल्वेने जोडण्याचा मानस व्यक्त केला.जेएनपीटी बंदराच्या विकासाबरोबरच तेथून होणार असलेल्या वाहतुकीला सहायभूत ठरेल, असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्याजवळ तयार केले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या ड्रायपोर्टवरील वाहतुकीला उपयुक्त ठरेल या दृष्टीने धुळे-नाशिक ही दोन शहरे रेल्वेद्वारे जोडण्याची नवीन संकल्पना नितीन गडकरी यांनी मांडली आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धुळे जिल्हा बँक नोटांपायी अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत दर दिवशी होत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयांचा फटका धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला बसला आहे. या गोंधळात डिसेंबरअखेर बँकेला अपेक्षित सीआर रेट साधता न आल्यास बँकिंग परवाना धोक्यात येऊ शकतो अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाद नोटा स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरपासून या नोटा बँकेत स्वीकारणे बंद करण्यात आले. तीन दिवस पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत स्वीकारण्यात आल्या, त्यावेळी बँकेत ३७ कोटी रूपयांचे व्यवहार झाले. त्यात चार कोटी २९ लाख रुपये गेल्या तीन वर्षांपासूनची कर्जवसुली होती. वीबिल भरण्यापोटी दोन कोटी २० लाख रुपये, ३१ कोटी २५ लाखांचा खातेदारांनी पाचशे व हजाराच्या नोटांचा भरणा केला. या व्यवहारांमुळे बँक सुस्थितीत येणार होती. परंतु बँकेने जुन्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश झाल्याने जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला केलेले मनाई आदेश अद्यापही कायम असल्याने गेल्या पाच दिवसांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर २०१७ अखेर बँकेचा सीआर नऊ टक्के गाठता आला नाही, तर बँकेची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बँकांमधून जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश पारित करावेत, असेही चेअरमन कदमबांडे यांनी मटाशी बोलताना सांगितले. चालू वर्षात जिल्हा बँकेने एक लाख २५ हजार सभासदांना २१५ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आणि गेल्या तीन वर्षापासून कर्जदाराकडे थकीत असलेली रक्कम ३१२ कोटी रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रांगेत मृत्यू झालेल्यांना शहीद म्हणणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशात पाचशे, हजाराच्या नोटा बदलाच्या निर्णयामुळे जवळपास ६० लोकांनी जीव गमावला. त्या सर्वांना सरकार शहीद घोषित करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला. ते शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजीमंत्री आमदार वर्षा गायकवाड यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी खासदार चव्हाण यांनी शहादा नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता कायम ठेवा, असे आवाहन केले. नोटबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

काँग्रेसच्या कार्यकाळात सरकार निर्णय घ्यायचे, पण जनतेला त्रास झाला, तर निर्णय मागेही घेत असे. पण सध्याचे सरकार मुस्कटदाबी करून चालविले जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. धुळे आणि नंदुरबार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून येथे विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा टोलाही चव्हाण यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात वसुलीतून १२ कोटी ८५ लाख जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत विविध करांसाठी हजार व पाचशे रुपयांचे जुने चलन स्वीकारण्याची गुरूवारी (दि. २४) शेवटची मुदत होती. त्यामुळे मनपात करदात्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही. कारण १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवपासून कर भरण्यासठी मनपामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी शहरातील वृद्ध, अपंग, आजारी असलेल्या करदात्यांसाठी ‘महापालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत विविध कर भरण्यासाठी मनपाने काही दिवसांपासून थकीत कर दात्यांकडे धडक वसुली मोहीमही सुरू केली आहे. याद्वारे मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी मोठे सहकार्य मनपाला केल्याने मनपातर्फे आयुक्त धायगुडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. तर ज्या नागरिकांचे कर भरणा बाकी असले त्यांनीदेखील तत्काळ भरणा करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात संघर्ष मूकमोर्चा उद्या

$
0
0

अॅट्रॉसिटी महामोर्चाची तयारी जाेरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात शनिवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दलित-आदिवासी अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीने केले आहे. दरम्यान मोर्चाला अनेक संघटनांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

दलित-आदिवासी-मुस्लिम-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे कोणीही नेतृत्व करणार नसून समावेशक मोर्चा असणार आहे. तसेच मोर्चाचे निवेदन महिला, मुली हे उपस्थित जनसमुदायास मंचावरून संबोधित करणार आहेत. या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोलिस कवायत मैदान, मनोहर चित्रमंदिर, आग्रारोड, कराचीखुंट, मनपा, झाशी राणी पुतळा या मार्गाने जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चासाठी मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्यावतीने आज शनिवारी (दि. २६) रोजी शहरात अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होणार आहे. त्यासाठी मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन व तयारीचे काम सुरू होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह संचारला असून तर मोर्चामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तर मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहनही संघर्ष मोर्चा समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चात लाखोंचा जनसमुदाय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गावाबाहेर राहत असलेले दलित आदिवासी, भटके विमुक्त हे जसे जाती व्यवस्थेचे बळी आहेत. त्याचप्रमाणे गावामधील माळी, साळी, कोळी, लोहार ओबीसी जातीदेखील व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित असलेल्यांसाठी घटनात्मक तरतूद करून ठेवली आहे. त्यानुसारच मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांत मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणूनच आज दलित आदिवासींवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा प्रतिक्रिया मोर्चात व्यक्त करण्यात आल्या.

आता परिवर्तनाची आणि प्रबोधनाची लढाई करावी लागणार आहे. तसेच रस्त्यावर उतल्याशिवाय व संघर्ष करून मागण्या मागाव्या लागत आहेत. जर अॅट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला गेला तर दलित आदिवासींनाच नाही तर इतरांनादेखील न्याय मिळणार आहे. धुळ्यात शनिवारी (दि. २६) दलित अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने भाषणातून या प्रतिक्रिया समोर आल्या. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चातील पाच युवतींनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. शहरातील निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मोर्चेकरी सहभागी झाले होते.

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीतर्फे शनिवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यंत शिस्तीने मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहसमोर दुपारी एक वाजता सभेत झाले. मोर्चात दलित आदिवासींसह समाजातील लोकांसह स्थानिक राजकीय नेते, वकील, डॉक्टर, प्राध्यापक यांची सहभाग होता. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नऊशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते. तर शहरातील पंधरा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images