सिडकोतील स्टेटबँक चौक आणि या चौकातील मयुरी बाल उद्यानातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना त्यांचा वापर करणे कठीण झाले आहे. स्टेट बँक चौकातील स्वच्छतागृह कायमचेच हटविण्याचा पुन्हा घाट घातला जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था
↧
↧
नंदुरबारचे पालकत्वही महाजनांकडेच
आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याकडे गेल्या अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांच्या रुपाने बिगर आदिवासी नेत्याकडे पालकमंत्रिपद गेले आहे. राज्यातील नव्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांच्या गळ्यात अद्याप मंत्रिपदाची माळ पडू शकलेली नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांची तोरा जिल्ह्यात अधिकच असणार आहे.
↧
नाशकातून विमानाचे टेक ऑफ
ओझर येथील विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून येत्या महिनाभरात येथून विमानाचे उड्डाण शक्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील ४० अनावश्यक टोल बंद करण्याचा विचार सरकार करीत आहे.
↧
जागल्याची भूमिका बजवावी
औषधांचा अधिकाधिक जबाबदारीने उपयोग करण्याच्या दृष्टीने औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी जागल्याची भूमिका बजवावी, असे आवाहन इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. मुंदडा यांनी केले.
↧
छंद व्यक्तिमत्व फुलवितात
अभ्यासाच्या सोबतीलाच इतर छंदही जोपासले जायला हवेत. हे छंद सर्वांगिण व्यक्तिमत्व घडवितात. आधुनिकतेच्या अंगाने जाणाऱ्या कार्यक्रमांची गरज विद्यार्थ्यांना आहे, असे मत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांनी व्यक्त केली.
↧
↧
गिरीश महाजन कुंभमेळामंत्री
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदासह कुंभमेळा मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन यांच्याकडे अगोदरच भाजपच्या संपर्कमंत्रीपदासह नाशिकच्या कुंभमेळयाच्या समन्वयाची जबाबदारी होती.
↧
महिन्याला सरासरी ३मातांचा मृत्यू
माता मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी तीन महिलांचा गरोदरपणात मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २४ माता मृत्युमुखी पडल्या आहेत.
↧
आघाडीने काढले राज्याचे दिवाळे
मागील आघाडी सरकारने राज्याची तिजोरी पूर्ण रिकामी केली असून, येत्या काही दिवसांत महसुलात वाढ न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विदारक आर्थिक स्थितीची कबुली येथे दिली.
↧
कळसुबाई शिखरावर शुभमंगल!
कुणी विमानात विवाह करतात, कुणी पॅराशूटमध्ये, तर काही जोडप्यांनी खोल समुद्रातही लग्नाच्या रेशीमगाठी बांधल्याचे आपण ऐकले आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मुंबईच्या विलास पाटील या गिर्यारोहकाने कळसुबाई शिखरावर लग्नसोहळा आयोजित केला आहे.
↧
↧
लुटीतील तीन संशयितांना अटक
बुलडाण्यातील साखरखेर्डा गावाजवळ स्टेट बँकेच्या वाहनावर हल्ला करून ३० लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील तिघांना नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संशयितांना पकडण्यात यश आल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांना सोपे ठरणार आहे.
↧
आदिवासी प्रकल्पांना मिळेना ‘IAS’
राज्यातील एक कोटी पाच लाख आदिवासींच्या विकासाबाबत राज्य सरकारच गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
↧
अवघ्या १९ वृक्षप्रेमींच्या हरकती
सिंहस्थ कामासाठी होणाऱ्या वृक्षतोडीबाबत हरकती आणि सूचनांवरील सुनावणीकडे वृक्षप्रेमींनी चक्क पाठ फिरवली. ६६ पैकी अवघ्या १९ जणांनी उपस्थित राहून आपल्या हरकती आणि सूचना मांडल्या.
↧
अन् खेळण्याही तुटलेल्या
जुने सिडकोतील सारंग चौक उद्यानाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, याच उद्यानात महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे छोटे कार्यालयही आहे. तरी देखील उद्यानात अस्वच्छता आहे.
↧
↧
भाषेचा अभिमान बाळगा
हल्लीच्या मुलांमध्ये मराठीची गोडी निर्माण करण्याची गरज असून, सर्वांनी देश आणि भाषेचा अभिमान बाळगायला हवा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी नाशिक येथे व्यक्त केले.
↧
सापाने उडवली धम्माल
राज्यातील भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्यांना पकडता यावे, यासाठी राजा विश्वासू सेवकाच्या सांगण्यावरून एक युक्ती योजतो. आपल्याला शेपटी फुटेल या धाकाने जो तो चांगले वागण्याचा प्रयत्न करतो.
↧
बंद कंपन्यांमुळे कामगार वाऱ्यावर
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बीसीएल फोर्जिंग, बिजनेस कम्बाईन व एक्स्लो कंपनीतील कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यातच बंद असलेल्या कंपन्यांमुळे कामगारांचे जगणे अवघड झाले आहे.
↧
युवकांना जागृत करण्याची गरज
विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयक्तीक आयुष्य, विद्यार्थी दशेतील जबाबदाऱ्या आणि सोशल मीडिया यांचा योग्य ताळमेळ घालण्याचे सल्ले मानसतज्ज्ञ देत आहेत. या नवमाध्यमांच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरही मानसिक दुष्परीणाम दिसून येतात.
↧
↧
मुंबईतील मायलेकींचा अपघाती मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावरील लतीफवाडी जवळील कसारा घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे भरधाव वेगाने जाण्याऱ्या (होडांई आय १०) गाडी दरीत कोसळल्यामुळे गाडीतील मायलेकींचा मृत्यू झाला.
↧
महापालिकेच्या जागेवर रूबाब!
बोरगड येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रानंतरच संबंधीत जागेवर अतिक्रमणे झाली आणि मोठा पेच निर्माण झाला.
↧
मनसेला पुन्हा धक्का
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सतिश सोनवणे, मालेगाव विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसे आणि शहर विकास आघाडीला धक्का बसला आहे.
↧