सह्याद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक वसलं आहे. पवित्र क्षेत्र असा नावलौकिक मिळालेल्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये असंख्य तीर्थ आणि कुंडं आहेत. या सर्वांना एक इतिहास आहे. प्रत्येकामागे एक अख्यायिका जोडली गेली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उरल्यासुरल्या तीर्थ अन् कुंडांना संजीवनी मिळेल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नाशिकच्या या तीर्थ अन् कुंडांविषयी...
नाशिक तीर्थ अन् कुंडांचं
↧
↧
अवकाळीने हिरावलं जगणं!
वर्षभर अवकाळी पाऊस व गारपिटीचे थैमान सुरूच असून, बळीराजा काकुळतीला आला आहे. खरिपाची दैना झाली अन् रब्बी व फळपकिांची गारपिटीने वाट लावली. दोन महिन्यांतील नुकसानीचा आकडा अडीच हजार कोटींवर गेला आहे.
↧
युध्द हे अंतिम उत्तर नाही
काश्मरिी खोऱ्यातील भाबड्या जनतेची वेळोवेळी पाकिस्तानातील चथिावणीखोर नेत्यांनी वैचारीक दशिाभूल केली आहे. परिणामी या जनतेच्या मनातील संभ्रम अद्यापही कायम आहे. युध्दाने जिंकणे शक्य असणाऱ्या भूमतिील मनेही भारतीयच हवी असतील तर काश्मीरच्या चघिळलेल्या प्रश्नाचे अंतिम उत्तर केवळ युध्दच ठरू शकत नाही, असे मत नविृत्त लेफ्टनंट जनरल सैय्यद हुसनैन यांनी व्यक्त केले.
↧
खेल अभियानाला अंमलबजावणीचे कोंदण
देशातील ग्रामीण भागात क्रीडा सुविधांची निर्मिती व्हावी क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने युवा व क्रीडा खेल अभियान ही योजना सुरु केली होती. मात्र त्यातील त्रुटींमुळे या योजनांची अंमलबजावणी होत नव्हती. केंद्राने या तुटी दूर करीत या योजनेचे नाव आता राजीव गांधी खेल अभियान केले असून महाराष्ट्रात यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
↧
शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार
सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची प्रदूषण व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
↧
↧
नुकसानीची झिरवाळांकडून पाहणी
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी, तळेगाव, सोनजांब, शिंदवड, खेडगाव, तिसगाव शिवारात झालेल्या गारपिटीने द्राक्ष पीक उद्धवस्त झाले आहे. आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी सोनवणे यांच्यासह सदर गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
↧
तातडीने पंचनामे करा
मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसनाग्रस्त भागाची राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी पाहणी केली.
↧
संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सातत्याने नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी शिरवाडे वणीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. कर्जमाफी, वीजबिल माफी, नुकसानभरपाईची मागणी करीत द्राक्ष उत्पादकांनी महामार्गावरच ठिय्या दिला होता.
↧
‘चोरावर मोर’ अखेर निलंबित
चोरीचे सोने खरेदी केल्याने कारवाईची भीती घालून शहरातील एका सराफाकडून उपनगर पोलिसांनी एक तोळा सोने व दहा हजारांची रोकड हस्तगत केली. मात्र, हस्तगत केलेले सोने व रोख रक्कमेची नोंदच केली नाही. सराफाच्या तक्रारीनंतर पोलिसांची बनवाबनवी समोर आल्याने तिघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
↧
↧
वेधशाळा करतात काय?: राज ठाकरे
‘अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील वेधशाळा पुढच्या आठ दिवसांच्या हवामानाचे अंदाज वर्तवून नुकसान टाळतात. मात्र आपल्याकडील वेधशाळा अंदाजही वर्तवू शकत नसल्याने देशातील वेधशाळा करतात काय ?’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
↧
अवकाळीने ३८ हजार हेक्टरची दैना
निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या दोन दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार ४३० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानीचे प्राथमिक आकडेवारी शनिवारी जाहीर केली.
↧
फळबागांनाही देणार नुकसान भरपाई
जिल्ह्यातील फळबागांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फळबाग वाचविण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
↧
नवी फॅशन आयकॉन
बॉलिवुडमध्ये दर शुक्रवारी नंबर वन पदासाठीची रस्सीखेच सुरू असते आणि आठवड्याला स्टार बदलतात असं म्हटलं जातं, बाकी काहीही असलं तरी ‘फॅशन आयकॉन’ या बिरुदासाठी अभिनेत्रींमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगते.
↧
↧
रंगला झुम्बा डान्स
थंडीचा महिना म्हणजे आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम महिना. थंडीचा आनंद घेता घेता आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न सर्व लोक करत असतात. यामध्ये मग लहानग्यांनीही का मागे रहावे यासाठीच महाराष्ट्र टाइम्सतर्फे झुम्बा विथ किडस् या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.
↧
३६ वर्षांनी भेटला आधाराचा हात
जन्मदात्यांनीच स्वत:पासून तोडल्यानंतर घारपुरे घाटावरचा आधाराश्रमच त्याच्यासाठी आधाराचा हात बनला. तेव्हा तो अवघा पाच वर्षांचा जंगलू नावाचा नरिागस मुलगा होता.
↧
चौफुली नव्हे, मृत्यूचा सापळाच
वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, बंद सिग्नल यंत्रणा, चारही रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणारी वाहने या गराड्यातून जीव मुठीत घेऊन हजारो नागरिकांना मृत्यूचा सापळा बनू पाहणारा वडाळा नाका चौफुली ओलांडून दररोज ये-जा करावी लागत आहे.
↧
महापालिका शाळांसाठी सुरक्षारक्षक!
समाजकंटाकाकडून शाळांमध्ये होणारी दादागिरी आणि गैरप्रकार रोखणे तसेच चोरीच्या घडणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने प्रशासनासमोर ठेवला आहे.
↧
↧
चाकोरीबद्ध शिक्षण नकोच!
आजच्या २१ व्या शतकात करिअरचे असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. असं असलं तरी आजचा समाज चौकट मोडून बघायची हिंमत करत नाही. आजचा तरुण सजग आहे आणि शिक्षणाची खरी व्याख्या तो जाणतो म्हणूनच आपल्यातलेच काही तरुण नोकरीचं प्रतिष्ठीत लेबल लावलेले मार्ग सोडून वेगळया मार्गावरून चालायची हिंमत करून पुढे जात आहेत आणि याचा त्यांना पश्चात्ताप नाही तर अभिमान आहे.
↧
युवकाने खडूत साकारले महापुरुष
जन्मजात अंगभूत कला असली तर ती कधी झाकून ठेवता येत नाही. कलाकार हे मुळातच एका अनामिक उर्जेने झपाटलेले असतात. अभोणा गावातील एका ध्येयवेड्या पदवीधर तरुणाने खडूवर कलाकुसरीने महापुरुषांच्या आकर्षक मूर्ती साकारल्या आहेत. त्या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे प्रशांत गांगुर्डे.
↧
आमदार गावितांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी
गावाच्या विकासाची जवाबदारी ग्रामस्थांसोबत ग्रामसेवकावर असून, जर ग्रामसेवकाच्या तक्रारीच राजस्व अभियानातील आढावा बैठकीत होत असेल तर हे निंदनीय आहे. त्याबाबत पुढील तीन महिन्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सुधारणा होणे आवश्यक आहे, असे खडेबोल आमदार निर्मला गावित यांनी हरसूल येथे झालेल्या राजस्व अभियानांतर्गत तालुक्याच्या आढावा बैठकीत सुनावले.
↧
More Pages to Explore .....