पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांकडे झालेले दुर्लक्ष, घंटागाडी ठेका देताना काही मिळते का याची दिर्घकाळ चाललेली चाचपणी, डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या औषध फवारणी योजनेचा उडालेला बोजवारा यामुळे नाशिक शहर अस्वच्छतेच्या खाईत ढकलत जात आहे. ठराविक नगरसेवकाचे वार्ड स्वच्छ असणे म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ असा अर्थ होत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, मनसेने शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यावर गांभीर्याने विचार केलाच पाहिजे.
↧