Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दंडाच्या रकमेत एक कोटीने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिसांनी यंदा दंड वसुलीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, गत वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रक्कमेत तब्बल एक कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत दंड वसुलीचा आकडा दोन कोटी २३ लाख २० हजार ९०० रुपये इतका झाला असून, आगामी १५ दिवसांत हा आकडा अडीच कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

शहरात वाहनांची संख्या प्रचंड गतीने वाढत असून, यामुळे वाहतूक नियमांची सर्रास पालमल्ली होताना दिसते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गत काही वर्षांपासून दंडात्मक कारवाईवर जोर दिला आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने मोटार वाहन नियमातील तरतुदींमध्ये बदल केला असून, यामुळे दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. जानेवारी ते १४ डिसेंबर या कालावधीत तब्बल एक लाख ९६ हजार ९२६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई झाली. तेच गत वर्षात हे प्रमाण अवघे एक लाख १५ हजार ८३९ इतके होते. या वर्षात वाहतूक विभागाने एक कोटी २२ लाख २० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा हा आकडा एक कोटी रुपयांनी वाढला आहे. वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता, वाहनांची वाढती संख्या अशा कारणांमुळे हा आकडा वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेल्मेटचा दणका

शहर वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीबाबत जोर लावला आहे. बुधवारी दिवसभरात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १९४ दुचाकी चालकांकडून तब्बल ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाई सुरू झाल्यापासून एक हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई झाली असून, नियमांचे पालन करण्यावर भर दिला तर दंडात्मक कारवाईचे कटू प्रसंग टाळता येतील, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.

चार दिवसात ई चलन कार्यान्वित

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर स्वाइप मशिन उपलब्ध करून देणाऱ्या शहर पोलिस दलातर्फे पुढील चार दिवसांतच ई-चलन सुरू करण्यात येणार आहे. गेट वे पेमेंटच्या काही तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागल्यामुळे हे काम रखडले होते. आता सर्व बाबी अंत‌िम टप्प्यात असून, चार दिवसांत पहिले ई-चलन फाडले जाईल, असे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. ‘ई-चलन’ हा त्याचाच भाग असून, यामुळे वाहतूक पोलिसांसह वाहनचालकांनाही सोयीस्कर ठरणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ई-चलन पध्दतीचा वापर मर्यादीत होणार असून, विशेषतः पार्किंग नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे ई-चलन फाडले जाणार आहे. बेशिस्त पध्दतीने वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस जागेवर दंडात्मक कारवाई करतात किंवा ही वाहने उचलून शरणपूर रोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली जातात. यामुळे वाहनांचे नुकसान होणे तसेच आर्थिक गैरकारभार होणे याविषयी तक्रारी येतात. विशेषतः चारचाकी वाहनमालकांकडून ही ओरड नेहमीच होते. या पार्श्वभूमीवर ई-चलन ही पध्दत फायदेशीर ठरू शकते. ई-चलन फाडलेल्या वाहनचालकास थेट घरीच नोटीस मिळणार असून, त्यात दंडाची रक्कम व कारवाईची इतर माहिती नमूद असेल. नोटीस मिळाल्यानंतर ठराविक दिवसांत दंडाची रक्कम भरली गेली नाही, तर वाहनचालकास थेट कोर्टात पाठवण्यात येईल.

ई-चलन पुढील दोन-चार दिवसांत सुरू होईल. वाहतुकीला शिस्त लागावी व हे करताना वाहतूक पोलिसांसाठी सोयीस्कर पध्दत असावी, या दृष्टीने उपाययोजना राबवल्या जात आहेत. दंडाचा आकडा प्रचंड वाढलेला दिसत असला तरी यामुळे वाहनचालकांचा बेशिस्तपणा अधोरेख‌ित होतो. पुढील वर्षी हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. वाहनचालकांनी शिस्त पाळली तरच दंडाचा आकडा कमी होईल.

-विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्मविश्वासाने गड सर करा

$
0
0

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

अल्पसंख्याक म्हणून स्वत:ला संबोधून सरकारी मदतीवर विसंबून न राहता ध्येय मनाशी बाळगून फक्त मीच विजेता हे तंत्र जोपासत स्वत:मधील ताकद ओळखल्यास यश संपादन करणे निश्चित असते, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

नॅशनल सिनिअर कॉलेजचे स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे उद््घाटन राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १५) सकाळी झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल श्रीनिवास पाटील बोलत होते.

राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास महत्त्वाचा घटक आहे. मुलाखातकाराची आवडनिवड ओळखून सकारात्मक दृष्टीकोनातील उत्तरे देण्याचे कलागुण स्वत:जवळ असल्यास मग कोणीही स्पर्धक उमेदवाराला नाकारू शकणार नाही. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान बरोबरच आवडही तितकीच महत्त्वाची असते. मुस्लिम समाजातील मुलींची उच्च शिक्षणाचे वाढते प्रमाण निश्चितच भूषणावह असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजात होत असलेली शैक्षणिक क्रांती समाजाला उच्च शिखरावर नेईल, असा विश्वास असल्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शेवटी सांगितले.

संस्थेचे सचिव प्रा. जाहिद शेख यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थाध्यक्ष हाजी बबलू पठाण यांनी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकारी मदत मिळाली तर निश्तिच प्रगतीचा पल्ला गाठू, असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी नात-ए-पाक, व कुरआन श्लोक विद्यार्थ्यांनी सादर केले. सूत्रसंचालन सज्जाद हैदर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जवाद एस. खान यांनी मानले.

खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतिब, अलिम शेख, अॅड. एजाज सय्यद, हबीब खान, सलिम सय्यद, एजाज काझी, रऊफ पटेल, उपप्राचार्य डॉ नुर-ए-इलाही, मुख्याध्यापक सादीक शेख, मुख्याध्यापिका शाहीन खान यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागांवर घोंगावतेय संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आधीच नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. परिसरातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या बदलाचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. सतत ढगाळ हवामान तयार होत असल्याने बहरात असलेल्या द्राक्ष पिकावर त्याचा विपरित पर‌िणाम होण्याची भीती आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून किनारपट्टीवर वादळ धडकल्याने त्याचे परिणाम राज्यातील हवामान बदलावर झाले आहेत. द्राक्ष उत्पादकांचे माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हवामान बदलाने बागायतदारांना चिंतेत टाकले आहे. अंतिम टप्यात असलेला द्राक्ष हंगाम यामुळे कचाट्यात सापडला आहे. द्राक्षबागांवर लाल कोळी, तुडतुडे, भुरीसह चिकट्याचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीसाठी धावाधाव करीत आहेत.

जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, नाशिक, मालेगाव, सटाणासह येवला, सिन्नर तालुक्याच्या काही भागात द्राक्ष बागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्षबागांची डिपिंग, थिनिंग तसेच परिपक्वता येण्यासाठी पोषक घटकांची मात्रा देणे अशी कामे सुरू आहेत. एकिकडे चलनाच्या तांत्रिक तुटवड्याने वैतागलेले शेतकरी आता निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडले आहेत.

दोन दिवस धोक्याचे
दरम्यान ढगाळ हवामान अजून एक दोन दिवस राहणार असल्याचे खासगी हवामान संकेतस्थळावरील माहितीद्वारे स्पष्ट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. त्यानंतर हवामानात बदल होवू शकतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नामको’चे रेडिएशन सेंटर लवकरच

$
0
0

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते होणार उद््घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॅन्सर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक क्रिष्णा डायग्नोस्टिक सेंटर आणि लिनियॅक रेडिएशन विभागाचे उद््घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी दिली.

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पेठरोडवरील कॅन्सर हॉस्पिटलचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले असून, त्याअंतर्गत कॅन्सर उपचार पद्धतीत अत्याधुनिक समजले जाणारे कोट्यवधी रुपये किमतीचे लिनियॅक मशिन नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. डिसेंबरअखेरीस डायग्नोस्टिक सेंटर व लिनियॅक विभागाचे काम पूर्ण होणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही विभागाचे उद््घाटन केले जाणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांनी भाजपचे नेते सुरेश बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व आयएएस अधिकारी विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण दिले.

या वेळी चर्चेप्रसंगी आरोग्यमंत्री नड्डा यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगत रुग्णालयाला राजीव गांधी योजनेंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचेही आश्वासन दिले.

धुळ्यातही रुग्णालय

नामको ट्रस्ट संचालित कॅन्सर रुग्णालयाची एक शाखा धुळ्यातदेखील सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असा मानस संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी बोलून दाखविला. त्यासाठी मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले. दर्जेदार व विनामूल्य सेवा देणे हे खरोखरच कठीण आहे, असे सांगताना मी गेल्या काही वर्षांत अनेक रुग्णांना या रुग्णालयात जाण्यास सूचविले असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसने घ्य‍ायला गेला आणि चोवीस लाखांना मुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघे सव्वा लाख रुपये उसने घेण्यासाठी मित्राकडे गेलेल्या व्यावसायिकाकडील २३ लाख ८५ हजार रुपयांची रोकड घेऊन संबंध‌ित मित्राने धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, संशयितांच्या शोधासाठी मध्यप्रदेशात पथक पाठवले आहे.

मुकेश चंदुलाल जैन (परिमल सोसायटी, होलाराम कॉलनी) असे पैसे घेऊन पळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी परदेस दीपक देवनानी (२५, रा. सुरूची अपार्टमेंट, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूररोड) या फूटवेअर व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. नामांक‌ित कंपनीची एजन्सी चालवणाऱ्या देवनानी यास कंपनीला २५ लाख रुपयांचा भरणा करायचा होता. नोटांच्या चणचणीमुळे देवनानीने ओळखीच्या लोकांकडून पैसे उभारण्यास सुरुवात केली. जवळपास २३ लाख ८५ हजार रुपयांची रोकड देवनानीने संकल‌ित केली. मात्र, तरीही भरण्यासाठी एक लाख १५ हजार रुपयांची आवश्यकता होती. ही रक्कम घेण्यासाठी देवनानीने संशयित आरोपी मुकेश जैन यास कॉल केला. उसने पैसे देण्यासाठी जैनने तत्काळ होकार दर्शवला. त्यानुसार, पैसे घेण्यासाठी देवनानी मुकेश जैनच्या फ्लॅटवर पोहचला. यावेळी पैशांनी भरलेली बॅग देवनानीजवळ होती. मित्रत्वाचे संबंध असल्याने देवनानीने विश्वासाने पैसे जवळ ठेवले होते. जैनकडून मिळालेले पैसे घेऊन पुढे बँकेत भरणा करू असा विचार देवनानी केला. मात्र, जैनच्या घरात पोहचल्यानंतर चहापाणी झाला. गप्पा सुरू असतानाच जैनने पैशांची बॅग उचलली आणि तो आत गेला. बऱ्याच वेळानंतर जैन परत येत नसल्याने देवनानीने आत जाऊन पाहिले तर फ्लॅटला दोन दरवाजे असल्याचे लक्षात आले. मागील दरवाजाने पैशांची बॅग घेऊन संशयित आरोपीने पलायन केल्याची बाब देवनानीच्या लक्षात आली. त्याने तत्काळ सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मूळचा मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे राहतो. काहीतरी व्यवसायानिमित्त तो फ्लॅट घेऊन शहरात राहत होता. त्यानुसार, संशयित आरोपीच्या शोधासाठी काही पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच संशयिताला ताब्यात घेण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचना स्थगिती हायकोर्टातही ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवरील स्थगिती जिल्हा न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत कायम ठेवल्याने धास्तावलेल्या पालिकेने गुरुवारी (दि. १५) हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही पालिकेला दिलासा देण्यास नकार दिला असून दिवाणी न्यायालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे.

दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील २१ डिसेंबरला हायकोर्टाने सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे पालिकेची प्रभागरचना आता चांगलीच अडचणी आली असून हायकोर्टातही दिलासा न मिळाल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. प्रभागरचनेवर हरकतदार हर्षल जाधव यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यात त्यांनी चुकीच्या पद्धतीने गुगल मॅपवर प्रगणक गटाची रचना केल्याचा आरोप केला आहे. न्या. ए. एच काशीकर यांनी हा अर्ज दाखल करून घेत प्रभाग रचनेला स्थगिती दिली आहे. महापालिकेने दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रालाच आव्हान दिल्याने पालिकेची अडचण झाली आहे. कोर्टाने पालिकेचे अपील दाखल करून घेत, दिवाणी न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच दिवाणी न्यायालयात १९ तारखेला सुनावणी झाल्यानंतर २१ डिसेंबरला पुढील सुनावणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षातील दोघांकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मालेगाव येथील तरुणाचे रिक्षातून अपहरण करून दोघांनी लुटल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली. युवकास बेदम मारहाण करण्यात आली असून, डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अपहरण व लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत सुरेश सूर्यवंशी (३७, रा. श्रीरामनगर, मालेगाव) या युवकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सोमेश्वरकडून नवशा गणपतीकडे हेमंत पायी जात असताना हा प्रकार घडला. गंगापूरकडून आलेल्या रिक्षाचालकाने (एमएच १५, ईएच २७५९) त्याच्याजवळ थांबवून त्यास बळजबरीने रिक्षात बसविले. काही अंतरावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकासह पाठीमागे बसलेल्या अन्य प्रवाशाने हेमंतला दमदाटी करून मोबाइल आणि पैशांची मागणी केली. हेमंतने विरोध करताच संशय‌ितांनी त्यास वाहनाखाली उतरवून देत डोक्यात बिअरची बाटली मारली. यामुळे हेमंत रक्तबंबाळ झाला. याचा फायदा घेत संशय‌ितांनी त्याचा मोबाइल व खिशातील रोख रक्कम असा सुमारे तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाडवी करीत आहेत.
पंचवटीत घरफोडी
दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे २९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. अनिता दीपक दुगजे (रा. उमा रेसिडेन्सी, राजमाता मंगल कार्यालय) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बुधवारी दुगजे कुटूंबिय काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने, असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षकर होडे करीत आहेत.
दागिन्यांवर डल्ला
वृध्द महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोख रकमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना भगूर येथे घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवळाली व उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत अशा पध्दतीने सातत्याने चोऱ्या होत असून, पाळत ठेऊन गुन्हेगार हात साफ करीत आहेत.
हेमंत मनोहर टिळे (रा. टिळकपथ, तेली गल्ली, भगूर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या आईस दिसायला कमी असल्याने चोरट्यांनी ही संधी साधली. मंगळवारी दुपारी उघड्या दारातून घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि अलंकार असा ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत. मागील महिन्यात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत असे दोन गुन्हे घडले होते. वृध्द व्यक्तीस नातेवाईक असल्याचे सांगत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
युवकाची आत्महत्या
गोसावीवाडीतील जमादार चाळीत राहणाऱ्या १७ वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अझर अमीज शेख (रा.जमादार चाळ, गोसावीवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या जागेवर घुसखोरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या पार्किंगचे थेट स्टेशनवरच अतिक्रमण होताना दिसत असून, त्याचा जाच मात्र प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे देवी चौकात जुने पार्किंग आहे. तेथे सुमारे दीड हजार दुचाकी पार्क करता येतात. मात्र, येथे वाहनांची एवढी गर्दी होते, की प्रवाशांना वाहन शोधावे लागते. ते बाहेर काढणेही अवघड होते. गाड्यांवर प्रचंड धूळ साचलेली असते. या पार्किंगपासून रेल्वे स्टेशन दीडशे ते दोनशे मीटर दूर आहे. रोज अप-डाऊन करणारे येथे गाड्या लावतात. सकाळी गाडी पकडण्यासाठी व तिकीट काढण्यासाठी त्यांची प्रचंड ओढाताण होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीत तिकीट विक्री केंद्राशेजारीच दुसरे पार्किंग सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह गैरसोय टळत आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पूर्वीपासून अतिक्रमणांचा विळखा असल्याने पार्किंगची समस्या गंभीर आहे. सिन्नर फाटा सोडल्यास सर्व बाजूंनी रेल्वे स्टेशनमध्ये वाहने उभी केलेली असतात. रेल्वे स्टेशनमध्ये मित्र-आप्तेष्टांना सोडण्यास आलेल्यांना वाहने उभी करण्यास जागाच राहत नव्हती. त्यामुळे नवीन पार्किंगचे स्वागत करण्यात आले होते.

क्षमतेपेक्षा जास्त वाहने

रेल्वे पोलिस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत काँक्रिटीकरण करून नवीन पार्किंग सुरू झाले आहे. हा ठेका १४ एप्रिल २०२० पर्यंत असून, अडीचशे वाहन क्षमतेच्या या पार्किंगसाठी ५ लाख ४७ हजार ५०० रुपये लायसन्स फी आणि २६ लाख ४९ हजार ९०० रुपयांची सुरक्षा ठेव घेण्यात आल्याचे परवानगीपत्रात नमूद केले आहे. तथापि, पार्किंग करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने अडीचशेपेक्षा जास्त वाहने येथे उभी केली जात आहेत. ठेकेदाराला जेवढी जागा दिली त्यापेक्षा जास्त जागा त्याने व्यापल्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्यांनीच केली आहे. परिणामी या पार्किंगचे जणू रेल्वे स्टेशनवरच अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चारचाकींचेही पैसे

नवीन पार्किंग फक्त दुचाकींसाठीच आहे. चारचाकीकडून पैसे घेण्यास परवानगी नाही. मात्र, चारचाकी वाहने येथे प्रवाशांना घेण्यासाठी थांबल्यास त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, अशी तक्रार आहे. नवीन वाहनचालक पार्किंगचा बोर्ड बघून मुकाट्याने पैसे देतात. पार्किंगचे दर फक्त दुचाकींना परवडणारे आहेत. सहा तासांसाठी दहा रुपये, सहा ते बारा तास पंधरा रुपये, बारा ते चोवीस तासांसाठी वीस रुपये पार्किंग दर आहेत.

भ्रष्टाचाराचा संशय

रेल्वे कर्मचाऱ्यांना पार्किंगसाठी पार्सल ऑफिस आणि रेल्वे पोलिस स्टेशनमागे जागा होती. तथापि, नवीन पार्किंग झाल्याने आमच्याकडूनही पैसे घेतले जातात, प्लॅटफॉर्मवर पार्किंग केले, तर रेल्वेकडून कारवाई होते. आम्हाला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी तक्रार एका रेल्वे कर्मचाऱ्याने केली. यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा संशय त्याने व्यक्त केला आहे.

नवीन पार्किंगचा जाच होणार नाही याची काळजी ठेकेदाराने घ्यावी. फक्त दुचाकी चालकांकडूनच पैसे घ्यावेत. चारचाकी वाहनचालकांकडून पैसे घेऊ नयेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना पार्किंगमध्ये जागा द्यावी. भ्रष्टाचार होत असल्यास रेल्वेने कारवाई करावी.

-राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांची आणखी चलनकोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा बाद झाल्यानंतर ३७ दिवसांनी बँकांकडे असलेल्या चलनाचे वास्तव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत समोर आले. जिल्ह्यातील एकूण ५२५ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ६,४०० कोटींची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांना केवळ १,९६८ कोटी रुपये मिळाले आहेत.


या बँकांकडे केवळ ४१७ कोटी रुपये शिल्लक असून, त्यात ३४९ कोटी एकट्या स्टेट बँकेकडे आहेत, तर इतर बँकांकडे केवळ ६८ कोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकांची चलनकोंडी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

नोटा बाद झाल्यानंतर बँकांनी एकत्र माहिती दिली नसल्याने जिल्ह्यातील कॅश तुटवड्याचे हे भीषण चित्र सुरुवातीला समोर आलेच नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हे आकडे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या सर्व बँकांमध्ये पाचशेच्या नोटा केवळ १७ कोटी २५ लाख रुपये आतापर्यंत चलनात आले असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ९०३ पैकी स्टेट बँकेचेच ८० टक्के एटीएम सुरू होते, तर उर्वरित ५२४ बँकांचे एटीएम या काळात जवळपास बंदच होते. त्यातील तुरळक एटीएम चालू-बंद होते. अशा परिस्थितीत सरकारने एटीएम सुरू केल्याचा दावाही कसा फोल ठरला हेही समोर आले आहे.

शुक्रवारी या बँकांना रिझर्व्ह बँकेतून सायंकाळपर्यंत पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे तो आकडा समोर आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर बँकांची स्थिती खूपच भयावह असली तरी त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत जिल्हाधिकारीही हतबल आहेत. याअगोदरच त्यांनी समान कॅश वाटप व्हावी यासाठी अधिकार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता; पण त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही.

सात गावे घेतली दत्तक

कॅशलेस गावे व्हावी यासाठी प्रत्येक बँकेने एक गाव दत्तक घ्यावे, या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला सात बँकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाने सय्यदपिंप्री, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दरी महिरवणी, महाराष्ट्र बँकेने चांदवड तालुक्यातील भोयेगाव, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, देना बँकेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली तर बँक ऑफ बडोदाने येवला तालुक्यातील अंदरसूल ही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये आता कॅशलेस व्यवहार व्हावे यासाठी बँकांकडून बँकिंग सुविधाही देण्यात येणार आहेत.

वाटप १,२०० कोटी

जिल्ह्यात आतापर्यंत किती पैसे वाटले याचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत १,५५० कोटी रुपये वाटप झाल्याचा ढोबळ आकडा सांगण्यात आला. त्यात ३०० कोटींहून अधिक रुपये नाशिकमधील बँकांच्या करन्सी चेस्टमधून बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत, तर आतापर्यंत केवळ १,२०० कोटींच्या आसपासच पैसे वाटप झाल्याची चर्चाही या बैठकीत होती. त्यामुळे जिल्ह्यात एकूण किती पैसे वाटले, याबाबतही ठळक आकडेवारी समोर आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीन, इजिप्तचा कांदा ठरतोय सरस

$
0
0

म. टा. वृत्तोवा, निफाड
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची विक्रमी आवक होण्यास सुरुवात झाल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचे भावात १ हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. देशांतर्गत गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाल्याने बाजार भावात घसरण होत आहे. तसेच चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून आखाती देशात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने ही घसरण होत आहे.

निर्यात बंदचा फटका

ख्रिसमसमुळे श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया तसेच फिलीपीन्स या देशांत १० जानेवारीपर्यंत निर्यात बंद राहणार असल्याने कांद्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केली.

असा घसरला लाल कांदा (दर क्विंटलचे)

१ डिसेंबर : जास्तीत जास्त १६००, सरासरी ९५१ आणि कमीत कमी ५०० रुपये

१५ डिसेंबर : जास्तीत जास्त १०५०, सरासरी ७५० आणि कमीत कमी ५१५ रुपये

१६ डिसेंबर : जास्तीत जास्त ८६०, सरासरी ७०० आणि कमीत कमी ४०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकांची झाली वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक रस्ता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष‌ित झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. दुभाजकांची उंची कमी, काही ठिकाणी तोडफोडमुळे वाहतुुकीस अडथळा होत आहे.

पहिला हरित चौपदरी रस्ता म्हणून कौतुक झालेल्या या मार्गाचे चौपदरीकरण करतांना दाखविलेले चित्र आणि प्रत्यक्षात रस्ता यामध्ये बरीच मोठी तफावत आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुभाजक करताना अत्यंत अरुंद आणि उंचीला कमी केल्याने वेगवान वाहने या दुभाजकावर धडकण्याची भीती वाढली आहे. बहुतेक ठिकाणी हा दुभाजक फोडून परिसरातील फार्महाऊस हॉटेल, धाबेचालकांनी सोयीचा रस्ता तयार केला आहे. या दुभाजकांमध्ये फुलझाडे लावली आहेत. काही ठिकाणी यांना बहर आला आहे, तर बऱ्याच ठिकाणी देखभालअभावी झाडे वाळली आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल, धाबे यांचा सुकाळ आहे. या व्यावसायिकांनी त्यांचे फलकांचे अतिक्रमण रस्त्याच्या साईड पट्ट्यावर केल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

आश्वासनांचा पडला विसर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायी चालणारे आणि सायकलस्वारांसाठी ट्रक करणार असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र आज या रस्त्याची स्थिती पाहता साइडपट्टीदेखील सुस्थितीत राहीलेली नाही. साईभक्तांची यामार्गावर वर्दळ असते तसेच वारकरी भाविकदेखील मोठ्या प्रमाणात दिंडीने येत असतात. त्यांना पायी चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि ठिकठिकाणी विश्रांतीस्थळे तयार करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. त्याचा
आता सर्वांनाच विसर पडला आहे. जवळपास २० किलोमीटर अंतरात २५ थांबे तयार झाले असताना स्वतंत्र साइडट्रक तयार केला असता, तर त्याचाच वापर पायी चालणाऱ्या भाविकांनादेखील झाला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात आता प्लास्टिकचे रस्ते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांपैकी काही कामे प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिक वापरून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार उपविभागांत आठ रस्त्यांच्या कामात प्लास्टिकचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबतच्या कामासाठी टेंडर काढण्यात आले असून, या रस्त्यांची कामे महिनाभरात सुरू होणार आहेत. नाशिक विभागात सर्वाधिक एकूण चार रस्त्यांवर हॉटमिक्स करताना त्यात प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे.

विविध राज्यांतून रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबरामध्ये प्लास्टिक मिसळल्यामुळे रस्ता दर्जा सुधारला आहे, तसेच प्लास्टिक कचऱ्याची समस्याही सुटण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मुख्य सचिवांनी प्लास्टिकच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले. या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व मुख्य अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक काम प्लास्टिकच्या वापर डांबरामध्ये करून प्रायोगिक तत्त्वावर हे काम हाती घेण्याचे सांगण्यात आले होते.

अहवाल सरकारला जाणार

प्लास्टिकचा वापर करून रस्ते बनवण्याच्या प्रायोगिक तत्त्वाच्या आठ कामांत काही ठिकाणी एक ते दोन किलोमीटरचे रस्ते असतील, तर काही ठिकाणी नऊ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या वापराने प्लास्टिकच्या किमतीत किती फरक पडतो, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रत्येक तीन महिन्यांनी तपासणी करून एक वर्षानंतर या कामाचा अहवाल सरकारला पाठवला जाणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या आठही रस्त्यांच्या कामावर ९ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करताना तो हॉटमिक्समध्येच केला जाणार आहे. त्यामुळे अगोदर रस्त्याचे इतर प्राथमिक कामे केली जातील व त्यानंतर प्लास्टिकचा वापर होणार आहे.

मार्गदर्शक सूचना

प्लास्टिकचा वापर करताना राज्य सरकारने भारतीय रस्ते महासभेकडून प्रकाशित मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे काम करताना या सूचनांचे काटेकोर पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सूचनांमध्ये रस्ते तयार करताना त्या कामात प्लास्टिकचे प्रमाण किती असावे व ते कोणत्या पद्धतीने वापरावे, अशा सर्वांचा समावेश आहे.

या रस्त्यांचा समावेश (अंतर किलोमीटरमध्ये)

- पंचाळे ते शहा रस्ता - १.५
- साकूर फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्ता - १
- साकोरे-कोकणगावजवळील रस्ता - १.५
- पिंपळगाव ते चिंचखेड रस्ता - १
- पेठ-तोरंगण-हरसूल रस्ता - ५
- मालेगाव ते चंदनपुरी येसगाव - ९
- मालेगाव ते सटाणा रस्ता - ५.४६५
- खामखेडा-सावळी रस्ता, देवळा - २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकाणी वाचनालयात ज्ञान, प्रबोधनाची मेजवानी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नुकतीच झालेली महास्वच्छता मोहीम आणि त्यानंतर शहरात पसरलेला थंडीचा गारवा यामुळे सगळीकडेच उल्हस‌ित वातावरण झाले आहे. या वातावरणात मालेगावकरांना ज्ञान, प्रबोधनासह मनोरंजनाची संधी चालून आली आहे. येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारपासून (दि. १८) २५ डिसेंबरपर्यंत ग्रंथालय सप्ताह आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आला आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांनी दिली.

शतकोत्तर कार्यकाल पूर्ण करणाऱ्या या वाचनालयाचा हा उपक्रम अर्धशतकाहून अधिक काळ सातत्याने सुरू आहे. रविवारी १८ डिसेंबर रविवारी येथील मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्या हस्ते ग्रंथालय सप्ताहाचे उदघाटन होईल. त्यादिवशी सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि एवरेस्ट मोहिमेचे कप्तान उमेश झिरपे (पुणे) यांचे ‘एवरेस्ट मोहिमेचा प्रवास’ या विषयावर एवरेस्टच्या स्लाइड शोसह व्याख्यान होईल. यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध विषयांवरील व्याख्याने स्लाईड शोसह या व्याख्यानमालेत श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेतील सर्व कार्यक्रम रोज रात्री ८ वाजता वाचनालयील सभागृहात होतील. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांचा व सभासद योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह आणि प्रदीप कापडिया, अॅड. उदय कुलकर्णी, मिलिंद गवांदे, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार, पुरुषोत्तम तापडे या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मराठी गझल मुशायराने समारोप

शतकोत्तर परंपरा असलेल्या या व्याख्यानमालेचा शेवट यावेळी रविवार, २५ डिसेंबर रोजी सुरेश भट गझल मंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग-मराठी गझल मुशायरा’ ह्या आगळ्या साहित्यिक कार्यक्रमाद्वारे होईल. शाहीर सुरेशकुमार वैराळकर सूत्रसंचालन करीत असलेल्या ह्या कार्यक्रमात दहा नामवंत गझलकार कवी सहभागी होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले हे प्रमुख पाहुणे असतील.

विषय व व्याख्याते

१८ डिसेंबर - एवरेस्ट मोहिमेचा प्रवास - एव्हरेस्टवीर उमेश झिरपे (पुणे)

१९ डिसेंबर - संघर्षग्रस्त ईशान्य भारत आणि आपण' - मिलिंद चंपानेरकर(पुणे)

२० डिसेंबर - आकाशातील आश्चर्ये - पंचांगकर्ते श्री. दा. कृ. सोमण (ठाणे)

२१ डिसेंबर - समान नागरी कायद्याबद्दलचे समज आणि गैरसमज-सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रमा सरोदे (पुणे)

२२ डिसेंबर - चित्रसृष्टी आणि साहित्य सृष्टीत इथे-तिथे - सिने-साहित्य पत्रकार रवीप्रकाश कुलकर्णी (डोंबिवली)

२३ डिसेंबर - काश्मीर: काल, आज आणि उद्या ' - जाहिद भट्ट

२४ डिसेंबर - नोटबंदी आणि सर्वसमावेशक विकास - अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर (नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाचखोरांना घेतले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबर महिन्यात थंडावलेले लाचखोरीचे प्रकार पुन्हा जोर धरू लागले आहेत. नोटांची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे तर हे प्रकार वाढीस लागले असावेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. अॅण्टी करप्शन ब्युरोने शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे मारीत चार जणांना जेरबंद केले. यात एका सहायक पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे.

केतन काशिनाथ राठोड असे मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तब्बल चार महिन्यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली हे विशेष. मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून ऑगस्ट महिन्यात तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांविरुध्द छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात नियमित हजेरी टाळण्याबरोबरच सहाय्य करण्याच्या मोबदल्यात एपीआय राठोड याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी रक्कम देण्याचे ठरले होते. यावेळी एसीबीसह तक्रारदाराने योग्य खबरदारी घेतली. एपीआय राठोड मुंबई नाका पोलिस स्टेशनजवळील साहेबा हॉटेलसमोर आपल्या कारमधून आला होता. त्याने तक्रारदारास इशारा करून कारच्या दिशेने बोलावले. मात्र, सापळ्याची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला. या घटनेची तब्बल चार महिन्यांपासून एसीबीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत राठोड पैशांची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १५ प्रमाणे मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीने गुरुवारी रात्री उशिरा राठोडला ताब्यात घेतले. ही कारवाई उपअधीक्षक प्रभाकर घाडगे यांच्या पथकाने केली.

मुख्याध्यापकासह उपशिक्षक जाळ्यात

दहावी बोर्डाच्या परीक्षेचा बाह्यविद्यार्थी म्हणून १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ तालुक्यातील कुंभाळे येथील चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत राघो भामरे आणि उपशिक्षक पंकज कारभारी गरूड यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मूळ तक्रारदार आणि त्याच्या मित्राने १७ नंबरचा फॉर्म भरला. मात्र प्रत्यक्ष परीक्षेचा फॉर्म भरून घेण्यासाठी लाचखोर शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी पंधराशे रुपयांची मागणी केली. यापैकी एकाने पाचशे, तर दुसऱ्याने एक हजार रुपये परीक्षा फी ५ डिसेंबर रोजी जमा केली. उर्वहित पैसे नंतर देण्याचे ठरले होते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने मुलांच्या पालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करीत गुरुवारी ही कारवाई केली. लाचखोर मुख्याध्यापक भामरे यांच्या दालनात एसीबीने सापळा रचून दोघांना जेरबंद केले.

तलाठी सापडला

सिन्नर तालुक्यातील पाथरे-सायाळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर तहसील कार्यालय परिसरात धान्य गोदामाजवळ १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कुमारसिंग मगनसिंग परदेशी (वय ५४) असे या तलाठ्याचे नाव असून, सध्या ते पाथरे-सायाळे येथे कार्यरत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाइट ड्रेस घोटाळा विधिमंडळात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील नाइट ड्रेस घोटाळा शुक्रवारी राज्य विधिमंडळात गाजला असून, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच नैतिकता असेल तर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचा राजीनामा द्यावा, असे आव्हान विखे-पाटील यांनी सावरांना दिले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी आदिवासी विभागातील २२ कोटींचा नाइट ड्रेस खरेदीचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला या प्रश्नी जाब विचारला असून, शनिवारी सरकारकडून यावर उत्तर दिले जाणार आहे.

राज्य सरकारला अंधारात ठेवून तत्कालीन दोन आयुक्तांनी २२ कोटींचे नाइट ड्रेस परस्पर आपल्या अधिकारात खरेदी केल्याचे प्रकरण ‘मटा’ने उघडकीस आणले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरत, या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत जाब विचारला. कुपोषणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना चांगलेच फैलावर घेतले. या विभागात यापूर्वी स्वेटर, रेनकोट खरेदी घोटाळे झाले आहेत. आता नाइट ड्रेसचा घोटाळा समोर आला आहे. नाइट ड्रेसची खरेदी करण्याच्या निर्णयावर निशाणा साधताना ते म्हणाले, की आदिवासी विकास विभाग कुपोषित आदिवासी बालकांना पोषण आहार देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे नाइट ड्रेस दिला तर उपाशी, अर्धपोटी कुपोषित बालकांना शांतपणे झोप लागेल, अशी या सरकारची भूमिका असल्याचा टोमणा त्यांनी सरकारला लगावला. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारावर सातत्याने पांघरुण घातले जात आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर मंत्री कारवाई करीत नाहीत आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करीत नाही. नैतिकता असती तर आदिवासी विकासमंत्र्यांनी आतापर्यंत स्वतःच राजीनामा दिला असता, असेही विखे-पाटील म्हणाले. या २२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत, खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शनिवारी सरकार यावर काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेखा विभाग संशयाच्या भोवऱ्यात

वित्तीय मान्यता नसतानाही तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव यांनी खरेदीचा आदेश दिला, तर सोनाली पोंक्षे यांनी बिल अदा करण्याचे आदेश दिले. मात्र, ज्या लेखा विभागाने हे बिल अदा केले, त्यांनाही वित्तीय आदेशाचा विसर पडला आहे. त्यामुळे बिल अदा करणारे लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारीही अडचणीत येणार आहेत. आदिवासी विभागाकडून या घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा होणार असल्याने हे सर्व अधिकारीही अचडणीत सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यागाच्या बळावरच शिक्षण संस्थांची प्रगती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामदार गोखले यांनी आपल्या बुद्धिमत्तेने ब्रिटिशांना प्रभावित केले होते. त्यांनी स्थापन केलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीमुळे अनेकांना दर्जेदार शिक्षण तर मिळालेच शिवाय, मोठमोठ्या संधीही प्राप्त झाल्या. स्थापनेच्या वेळी अनेक बाबींचा त्याग त्यांना करावा लागला असेल. मात्र, त्यागाच्या बळावर चालणाऱ्या संस्थाच शतकपूर्तीकडे वाटचाल करतात, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या पदव्युत्तर विभागाचे व ‘एसएमआरके’ कॉलेजमधील ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. संस्थेतील कार्याला प्रोत्साहन देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेतर्फे राज्यपालांना सन्मानपत्र देण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी शिक्षणातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलवता आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षण क्षेत्रात राबविल्या जाण्याऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या विभागीय सचिव, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी प्रास्ताविकात ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट केली.

राज्यपाल पाटील यांनी एसएमआरके कॉलेजच्या ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन करून अशा प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना निश्चितच आपल्या करिअरच्या दिशा गवसतील, असे प्रतिपादन केले. या समारंभाला इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी, इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, शैलेश गोसावी, प्राचार्य शिंपी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, उपप्राचार्या साधना देशमुख, डॉ. कविता पाटील व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. डॉ. मोहिनी पेटकर व रसिका सप्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी आभार मानले.



‘सृजन’शीलतेचे आविष्कार...

नाशिक ः एसएमआरके कॉलेजमध्ये आयोजित ‘सृजन’ प्रदर्शनात कॉलेजमधील एकूण ३३ विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. ‘वैश्विक शांततेकडे वाटचाल’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन होते. ह्युमन डेव्हलपमेंट, होम सायन्स, टेक्सटाइल विभाग, संगीत विभाग, न्यूट्रिशियन अॅण्ड डाएटिशियन आदी विभागांचा यात समावेश होता. टेक्सटाइल म्हणजेच वस्त्रशास्त्र विभागाने खादी ही संकल्पना मांडली. अन्नशास्त्र विभागाने क्षुधाशांतीतून वैश्विक शांततेकडे हा संदेश व संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले. भाषा विभागाने साहित्यातून शांततेचा संदेश दिला आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक साहित्यातून शांततेचा संदेश देणारे साहित्य ग्रंथ त्यांनी ठेवले आहेत. ज्युनिअर कॉलेजने दहशतवादाचे दुष्परिणाम व सामाजिक विषमतेतून निर्माण होणारी हिंसा व त्यासाठीचे उपाय, नवीन समृद्ध जगाची कल्पना मांडली. कॉमर्स विभागाने शांततेच्या दिव्य प्रकाशाची प्रतिकृती साकारून प्रकाश पुढे पाठवत राहण्याचा संदेश दिला. फॅशन डिझायनिंग विभागाने टाकाऊतून टिकाऊद्वारे शांततेचा संदेश दिला आहे. बीबीए विभागाने गौतम बुद्धांची प्रतिकृती साकारून शांतता स्थापित करण्याचा संदेश दिला. संगीत विभागाने संगीताच्या माध्यमातून शांततागीत साकारले. गृह सजावट विभागाने वास्तुशास्त्र व शांतता यांचा संबंध स्पष्ट करून प्रत्येक घरात शांतता नांदावी, असा संदेश दिला.या प्रदर्शनाला शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टर्स, मॉडेल्सद्वारे प्रदूषणमुक्तीचा संदेश

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विविध प्रकारच्या प्रदूषणाचा विळख्याने पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. प्रदूषण टाळल्याने अनेक समस्या सोडविता येतील, हे दाखविण्याचे काम शहरातील माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केले आहे. पोस्टर्स आणि मॉडेल्सच्या अफलातून कल्पनेतून त्यांनी प्रदूषणमुक्तीच्या विविध उपाययोजना मांडल्या आहेत.

महात्मा फुले कलादालनात हरितकुंभ समन्वय समिती, शिक्षण उपसंचालक आणि महापालिकेतर्फे प्रदूषणमुक्तीसाठी पोस्टर्स व मॉडेल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात नदी प्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, कचरा व्यवस्थापन यावरील उपाययोजना कशा प्रकराच्या असायला हव्यात, हे विद्यार्थ्यांनी दर्शविले आहे. विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हरितकुंभ समन्वय समितीचे सदस्य निशिकांत पगारे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, शिक्षण विभागाच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, महापालिका शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, सुनील मेंढेकर, अॅड. अमोल घुगे, योगेश बर्वे, अॅड. गिरीश दंदणे, उदय थोरात, सचिन बरलीकर, कृष्णकुमार सोनवणे, प्रकाश बर्वे, किशोर पहाडी, कैलास दराडे, मनोज खरात, दत्ताराम बैरागी, श्वेताली खरात, रवी सोनवणे, राज चंद्राहास आदी उपस्थित होते.


३५० पोस्टर्स अन् १६ मॉडेल्स

प्रदर्शनात शहरातील शाळांमधून ३५० पोस्टर्स व १६ मॉडेल्सद्वारे प्रदूषणमुक्तीसाठीच्या उपाययोजना मांडण्यात आलेल्या आहेत. हे प्रदर्शन शनिवार (दि. १७)पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून, नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---

प्रदूषणमुक्तीसाठी नागरिकांचा सहभाग असावा आणि तो दिसावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांने स्वतःपासून प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतल्यास ही समस्या सुटू शकेल.

-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर मनपा प्रशासनाने गुरुवारी बोलडोझर चालवले. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात अनधिकृत रिक्षा थांबे, हॉटेल व्यासायिक, फेरीवाले यांचे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. त्यात नवीन बसस्थानक याच रस्त्यावर असल्याने बस वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होतो.

या परिसरात अनेक शाळा कॉलेज, बाजारपेठ असल्याने नागरिकांनादेखील या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालण्यास देखील जागा नसते. बेशिस्त वाहतूक, अनधिकृत थांबे, अतिक्रमण अशा अनेक समस्यांच्या विळख्यात नवीन बस स्थानक परिसर अडकला आहे. येथील मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव विभागाला मात्र अखेर जाग आली असून, या नवीनबस स्थानकाबाहेरील रस्त्यालगत मनपाच्या जागेवरील अतिक्रमण हाटवण्याची कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण नि‌र्मूलन अधीक्षक दीपक हादगे, शहर अभियंता कैलास बच्छाव तसेच नगररचना विभाग अधिकारी, बीट मुकादम संजय जगताप आदींसह अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचारी यांनी दोन जेसीबी तसेच एक ट्रॅक्टरच्या साह्याने हे अतिक्रमण हटवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगीत मानापमान’ने वसंतोत्सवास सुरुवात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिशय धीरगंभीर पदे, श्रीमंतीचा थाट, दागिने, भरजरी पोशाखांची अक्षरश: लयलूट अशा वातावरणात संगीत मानापमान नाटक सादर झाले. नाशिकमध्ये शुक्रवार (दि. १६) पासून दुसऱ्या वसंतोत्सवास दमदार सुरुवात झाली. पुढील दोन दिवसांत प्रसिद्ध गायकांकडून गाण्यांची मेजवानी मिळणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वसंतोत्सव’ हा शास्त्रीय संगीतमय कार्यक्रम होत असतो. वसंतोत्सवाचे नाशिकमधले यंदाचा दुसरे वर्ष आहे. या संगीतमय कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती यांच्यासह डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन नाशिककरांना ऐकण्याची संधी लाभणार आहे. वसंतोत्सवात पहिल्या दिवशी संगीत मानापमान नाटक झाले.

नाट्यसंगीत या शब्दामधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही दिग्गज मंडळी पदे गायची तेव्हा प्रेक्षक बेहोष होत असत. अनेक नाट्यपदे आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही. संगीत मानापमान हे नाटक त्यापैकीच एक.

त्या काळात गाजलेल्या संगीत नाटकांपैकी ‘संगीत मानापमान’ हे नाटक अतिशय गाजलेले नाटक आहे. या नाटकाचे पुनरूज्जीवन शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांनी केले. महाराष्ट्रात या नाटकाचे अनेक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नाशिकला बऱ्याच वर्षांनी या नाटकाचा प्रयोग झाला. दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी यांनी केले आहे तर राहूल देशपांडे यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.

परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून ‘मानापमान’ सुरू होते व नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वकर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली ‘भामिनी’, ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’ अशी ईर्ष्या यातून दिसते.

आज वसंतोत्सवात

आज (दि. १७) वसंतोत्सवात सकाळच्या सत्रात ७ वाजता आनंद भाटे यांचे गायन तर सायंकाळच्या सत्रात ६ वाजता राहूल देशपांडे यांचे गायन व नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा परीक्षा निकालावर आक्षेप

$
0
0

चुकीच्या प्रश्नाला दिले सरसकट गुण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलसंपदा विभागाच्या राज्यभर झालेल्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदाच्या सरळसेवा भरती परीक्षेत चुकीचे प्रश्न व उत्तर दिल्यामुळे तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना ८ ते १० गुणांची खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या सत्रात बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत ही गुण पद्धत आमच्यावरच अन्याय करणार असल्याची सांगत जाहीर पत्रक प्रसिद्धीस दिल्याने या परीक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या परीक्षेत राज्यभरातून ३५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून दोन सत्रात बसलेल्यांची संख्या ही २४ हजारांच्या आसपास आहे. या परीक्षा सकाळ, दुपार व सायंकाळ अशा सत्रात होत्या. त्यात सर्वच प्रश्नपत्रिका या वेगवेगळ्या होत्या. या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत नव्हती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शंभर प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. परंतु तिसऱ्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत असलेल्या चुकीच्या प्रश्नांचे व उत्तरांचे गुण देण्यात आले आहे. त्याबाबत जलसंपदा विभागाच्या परीक्षा नियंत्रणाकडून तसे ई-मेल सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. तक्रार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत अन्याय झाले असल्याचे सांगितले. तरी त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांवर पैशाची खैरात केली आहे. ते सर्वच प्रश्न त्यांचे बरोबर आले नसते तसे गृहित धरणेही चुकीचे आहे. दोन सत्रांतील विद्यार्थ्यांना या अतिरिक्त गुणांचा फटका बसेल. त्यामुळे या परीक्षेबाबत सरकारने पुनर्विचार करावा, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रदीप कातकडे, जयराम वरपे, योगेश कातकडे, माधुरी मेवाडे, हर्षला देवरे यांनी तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images